गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करुन प्रथम घरच्या देवांची पुजा केली. मग आवरुन शोभायात्रेसाठी निघाले . यावर्षी चित्ररथात सहभाग नव्हता .. पण यात्रा पहायला जाणार होते...
यंदा खूप कमी रथ सहभागी झाल्याने मिरवणुकीचा रुट कमी टप्प्याचा होता . मी तेथे पोचेतो मिरवणुक खूप पुढे आली होती म्हणुन मी तशीच पुढे जाउन सुरवातीच्या रथापाशी थांबले. ज्यायोगे सर्व यात्रा पाहाता येईल ... दर्वर्षीप्रमाणेच लोक नवनवीन पारंपारीक पोषाख घालुन आले होते सर्वत्र उत्साहाचे आनंदाचे जल्लोषाचे वातावरण होते लोकांचा हा उत्साह रस्ताभर आणि वातावरणातही ओसंडुन वहात होता .
आठच वाजत होते तरीही उन्हाळा चांगलाच जाणवत होता .. पण त्याची तमा न बाळगता सगळे हा सण खुपच जल्लोषात साजरा करीत होते . विशेष उल्लेखनिय रथ म्हणजे सर्जिकल स्ट्रॉइक विषयावरिल मुलानी दाखवलेले युध्दाचे प्रात्यक्षिक. त्याशिवाय मुलींची तलवारबाजी, लेझीम , भजनी गृपचे भजनाच्या तालावर झांज वाजवित केलेले नृत्य, मुलींची पारंपारिक नौवारी साडी, फेटा घालुन केलेली बुलेट राईड ,सायकल राईड .असे विविध विषयांवरील रथ पाहुन डोळ्याचे पारणे फिटत होते . या सर्व आनंदोत्सवाची उर्जा वातावरण भाराउन टाकित होती त्यातील काही उर्जा घेउन अतीषय समाधानाने मी घरी परतले ...
परतताना मात्र अंतर्मुख करायला लावणारे नेहमिचेच दृश्य दिसले ... एरविही स्वछ दिसणारे रस्ते विदृप झाले होते रस्त्यावर काढलेल्या सुरेख रांगोळ्या रहदारी,वारा, माणसांची येजा यामुळे पार उस्कटुन गेल्या होत्या . बरे रांगोळ्या तर उस्कटतातच पण इतर कचरा ...
यात्रेतल्या सहभागिंसाठी संस्थांकडुन तसेच वैयक्तीकही पुरवले जाणारे नाष्टा, पाणी आणि सरबत यांचे प्लॅस्टीकचे ग्लॉस ,डिशेस रस्ताभर इतस्ततः विखुरले होते .. रस्त्याला अवकळा आली होती हे पाहुन मन विषण्ण झाले ...
संध्याकाळी तलावाच्याकाठी फिरायला गेले होते तीथेही हिच अवस्था होती. आदल्या संध्याकाळी दरवर्षी प्रमाणे बसण्यासाठी तलावा भोवती बांधलेल्या कट्ट्यावर ओळीने एकालाएक लागुन पणत्या लावल्या होत्या .. रांगोळीही काढली होती पण आता तेथे दिसत होता तेलाने आणी मेणाने तेलकट चिकट झालेला कट्टा . ऱांगोळी वाऱ्यामुळे तलावात जाउन पडत होती आणी तलाव आणखी खराब होत होता.. लोकाना बसायला केलेला कट्टा खराब झालेला. लोक कागद वैगरे टाकुन तरीही कडेला बसायचा प्रयत्न करीत होते.. शहराच्या गर्दीतली संध्याकाळी विसाव्याची ही एकच तर जागा होती ...
खुप विषाद वाटला हे सारे पाहुन ....
यासाठी काय करता येइल ?
काळाप्रमाणे बदल स्वीकारुन जुन्यानव्याचा समन्वय साधला पाहिजे ..
तलावावर पणत्यांएवजी विद्युत रोषणाई करता येइल. परंपरा म्हणुन एके ठिकाणी पाच पणत्या लावाव्यात त्यांच्याखाली तेल सांडु नये म्हणुन ताटल्या ठेवाव्यात. रस्त्यांवर रॅपर्स गोळा करायला कंटेनर ठेवावेत... कचरा त्यातच टाकला जाईल हे बघायला स्वयंसेवक ठेवावेत ..
खरोखर असे झाले तर अतिशय देखण्या समारंभाला अशाप्रकारे गालबोट तर नाही लागणार ...
बघा तुम्हाला पटतेय का ते ....
वाचने
2894
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला हा शोभायात्रा नामक
सजावट शहर विद्रुप करणार नाही
In reply to मला हा शोभायात्रा नामक by एस
हम्म
आमच्या
In reply to हम्म by पैसा
डोंबिवलीच्या यात्रेत शेवटचा
सलाम
In reply to डोंबिवलीच्या यात्रेत शेवटचा by वेल्लाभट
हे वर्णन ठाण्याचे दिसतेय.
होय ..ठाण्याचेच ..
In reply to हे वर्णन ठाण्याचे दिसतेय. by किसन शिंदे
भिकारी मानसिकता आहे. तुम्ही
ज्यावेळी याची परवानगी घेतली
In reply to भिकारी मानसिकता आहे. तुम्ही by हेमंत८२
जर साधारणतः एक km साठी जर
In reply to ज्यावेळी याची परवानगी घेतली by वेल्लाभट
अगदी योग्य मुद्दा पकडलाय !
रांगोळ्या
नागपूर