पोलीस यंत्रणा नेहमी व्हिलन सारखी का वागते?

वटवट's picture
वटवट in काथ्याकूट
17 Oct 2016 - 12:10 pm
गाभा: 

खूप दिवस ही मळमळ मनात खदखदत होती... मिपाचा हा प्लॅटफॉर्म एखादा विषय चर्चिण्यासाठी अगदी योग्य आहे. आणि मुळात, मला माझे मत बदलायचे आहे ह्यासाठी हा विषय मी इथे मांडत आहे...

पोलीस कायद्याचे रक्षक आहेत. ते आपल्यासाठी आहेत. ते आपल्यासाठी त्यांचे कर्तव्य पार पाडत असतात. ते खूप हालअपेष्टा सोसत असतात. त्यांचा पगार खूप कमी असतो. तरी ते आपल्यावर उपकारासारखं काहीतरी करत असतात. आपण त्यांचा आदर केला पाहिजे. आपण पोलीस मित्र म्हणून वागलं पाहिजे. आपलं संरक्षणखातं आणि पोलीस खातं एकंच काम करतं. ते बाहेरच्या शत्रूंच्या विरोधात लढतात आणि हे आतल्या शत्रूंच्या विरोधात... वगैरे वगैरे... लहानपणापासून हेच ऐकत आलोय. वर्तमानपत्रातून... रेडिओवर... चर्चासत्रांतून... सोशल मीडियातून हाच सूर दिसतो. पण माझं निरीक्षण खूप वेगळं आहे. कदाचित सगळ्यांचंच तेच निरीक्षण असेल.

१. पोलीसखातं महसूल खात्यासारखंच अत्यंत करप्ट आहे. बहुतेक पोलिसांचं पोट उगाच वाढलेलं नसतं. जे उन्हातान्हातून ट्रॅफिक आणि गर्दी कंट्रोल करतात ते जास्त करून झीरो पोलीस असतात, कॉन्ट्रॅक्टबेसिस वरचे. तेही अधूनमधून हात मारतच असतात. पुण्यात जवळपास बर्याच पोलीस स्टेशन जवळ ऑनलाईन मटका जोरात चालतो. तिथले पोलीस आंधळे नसतात. दणक्यात मलिदा मिळतो... अगदी कमिशनर पर्यंत हे पैसे जातात असं ऐकलंय... नॉन-करप्ट पोलीस माझ्यातरी पाहण्यात नाही. आमच्या गावातल्या एका पोलिसांचं प्रकरण तर विधानसभेत गाजलं होतं.. आता त्यांना आमदारकीची स्वप्ने पडत आहेत.

२. पोलीस कधीही आपले मित्र म्हणून वागत नाहीत. उलट त्यांचे हात मोकळे करायचे साधन म्हणजे सामान्य जनता, बऱ्याचदा असंच त्यांचं वर्तन असतं. अश्यातला माझा अनुभव सांगतो.. आमच्या कॉलेजमध्ये एक प्रकरण घडलं होतं. मुलीच्या तक्रारीवरून मुलाला वाकड पोलीस चौकीवर बोलावलं. तिच्या नुसत्या तक्रारी वरून मुलाला बेदम मारलं.. एक दिवस कस्टडीत पण होता तो. आम्ही फॅकल्टी म्हणून तिथे गेलो होतो. त्यांनी आम्हाला विचारलं "इथे कशाला #$%$ घालायला आला आहात?" आम्ही म्हणालो कि आमचा विद्यार्थी आहे तो म्हणून आलोय. मग ते म्हणाले "मग काय त्याला आमच्या $%# वर बसवू" आंम्ही म्हणालो "अहो तो मुलगा लहान आहे हो आणि काहीच चौकशी नं करता का त्याला मारताय?" त्यांनी आमचा अजून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. आणि आमच्या अंगावर "जाता कि नाही आता" म्हणून आले. आम्ही निघालो. दुसर्या दिवशी त्याला बेल मिळाली. एक आठवड्यात त्याने कॉलेज मधून टीसी घेतला. कॉलेजची बदनामी नको व्हायला म्हणून आम्हाला शांत बसायला सांगितलं गेलं. निदान मला तरी तुलनेने कायदे जरा जास्त माहिती आहेत. काय उपयोग? फाटायची ती फाटलीच कि... सामान्य माणसाची काही वेगळी गत असते? नुसत्या तक्रारीवरून कुठलीही चौकशी नं करता मारहाण करायचा त्यांना परवाना दिलेला असतो.

३. कुठलाही नवीन कायदा पास झाला कि ह्यांना चरायला कुरण सापडतं. ह्यांना खायच्या संधी मिळतात. साधारण आरोपी जरी असला तरी त्याला नं मारण्यासाठीसुद्धा पोलीस पैसे घेतात. बलात्काराचा आरोपी असला तर विचारायलाच नको. त्यातल्यात्यात जेंव्हा डोमेस्टिक व्हायोलन्स ऍक्ट पास झाल्यापासून तर त्यांना दाबून पैसे कमावण्याची संधी प्राप्त झालीये. एका केसमागे कित्येक लाख मिळतात, तेही बिनबोभाट... खरंतर इतकि उदाहरणे मला व्यक्तिशः माहित आहेत पण असल्या गोष्टींचे पुरावे नसतात कधीच म्हणून इथे लिहिता येत नाहीत... जर कोणी गरीब ह्या भानगडीत फसला तर मेलाच म्हणून समजा... हे खातं गरिबांसाठी नाही... आताच ट्रॅफिकरुल्स अजून कडक केलेत आणि दंडाची रक्कमपण वाढलीये...सो.. पोलिसांचा भाव पण वाढलाय.

४. जेल ऍडमिनिस्ट्रेशन आणि तिथे चालणारे गोंधळ ह्यावर तर एक मोठा प्रबंध होऊ शकेल. श्रीमंत आणि सेलिब्रिटी गुन्हेगारांना प्रचंड ऐषाराम कसा मिळतो आणि त्यावर कसं त्यांचं अर्थपूर्ण जीवन अवलंबून असतं हे सर्व ओपन सिक्रेट आहे. अबू सालेम ने जेलमधला महागडा असा टीव्ही फोडला होता. कोण त्याला बोलल्याचं ऐकिवात नाही. त्याने त्याच्या वाढदिवसाची जंगी पार्टी दिली होती, हे चालवून घेतलं जातं? त्यांच्यादृष्टीने देशद्रोही बिशद्रोही असलं काही नसतं... त्यांचा देश आणि धर्म एकंच... पैसा.

५. काही पोलिसांना मारलं कि लगेच सगळ्या देशातून पोलिसांच्या बाजूने आवाज सुरु लागला. अर्थात मी पोलिसांना मारण्याच्या बाजूने अजिब्बात नाही. पण त्याहीपेक्षा पोलिसांनी निरपराध लोकांना बेदम मारहाण केल्याची असंख्य उदाहरणे मी पहिली होती, पाहत आहे. त्यांना असे लायसन्स दिली आहेत.

६. गेल्या महिन्यात बाणेरच्या यशदामध्ये माजी आयपीएस अधिकारी वाय.पी.सिंग दिग्दर्शित आणि लिखित "क्या यही सच है" ह्या चित्रपटाचे स्क्रिनिंग होते. तेंव्हा मी आमच्या कॉलेजच्या मुलांना घेऊन तिथे गेलो होतो. चित्रपट तांत्रिक आणि अभिनयाच्या बाबतीत फार काही उच्च वगैरे नाही. अगदीच साधारण आहे. पण ज्या काही गोष्टी दाखवल्या त्या खूप हॉरिबल होत्या. काही गोष्टींचा अंदाज येणं वेगळं आणि त्याच गोष्टी खऱ्या आहेत ह्याची खात्री होणं वेगळं. कमिशनरच्या नेमणुकीला स्पॉन्सर लागतात आणि त्याचा जो काही रेट असेल तो ते स्पॉन्सर देतात, हे मला नवीन होतं. चित्रपट दाखवून झाल्यावर मी खुद्द वाय.पी. सिंग ह्यांनाच मी प्रश्न विचारला होता कि, जर एव्हढं हे खातं भ्रष्ट आहे तर आम्ही त्याच्यावर विश्वास का आणि कसा ठेवावा? त्यावर त्यांनी थातूरमातूर उत्तर देऊन वेळ टाळली. मला काय ते उत्तर मिळायचं ते मिळालं.

७. बांधकाम क्षेत्रात आज कित्येक अंडरवर्ड डॉन्सचे पैसे गुंतले जात आहेत आणि पुण्यात तरी बहुतेक एजंट्सना ते माहित आहे. पोलिसांना माहित नसेल?

८. अंतर्गत सुरक्षा खरंच ते सांभाळतात? ह्यावर मला खरंच शंका आहे. कारण पोलीस खातं हे नेहमी नेहमी विकलं जाऊ शकणारं खातं आहे.

९. मुळात मला पोलिसांबद्दल अजिब्बात आदर वगैरे नाही. उलट माझी सटकते, नेहमीच.

ही सर्व माझी वैयक्तिक मते आहेत.

(माझी ही मते फक्त पोलिसांसंबंधीच आहेत)

प्रतिक्रिया

sश्रिकान्त's picture

17 Oct 2016 - 12:50 pm | sश्रिकान्त

आदर त्यांचाच करायचा आसतो जो दुसर्याचा करतो. पोलीसानी कदी दसर्याचा आदर केला का? सनीयर िसटीजन आसो वा महीला आसो, य
पोलीसांना काही फरक पडत नाही आपमान करताना.

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Oct 2016 - 1:02 pm | कैलासवासी सोन्याबापु

मुळात तुमचा विचार
मला पोलिसांबद्दल अजिब्बात आदर वगैरे नाही. उलट माझी सटकते, नेहमीच.
असे आहे त्यात तुम्ही "माझे विचार बदलायला मळमळ काढतोय" वगैरे म्हणताय, हे काँट्राडिक्शन काही खास पचले नाही, त्यामुळे तुम्हाला चार मुद्दे सांगून काही खास हाती येऊन मला काही नवे शिकता येईल असेही वाटत नाही, तस्मात तुमच्या धाग्यावर तुम्हाला आवडेल असेच बोलून मी रजा घेतो,

"सगळे पोलीस हरामखोर असतात, १००% पोलीस ऐदी ऐतखाऊ अन जनतेचे दुश्मन असतात, त्यांचे सख्य फक्त पैश्याशी असते"

धन्यवाद.

वटवट's picture

17 Oct 2016 - 1:04 pm | वटवट

धन्यवाद..

बोका-ए-आझम's picture

17 Oct 2016 - 1:15 pm | बोका-ए-आझम

याला पोलिसही अपवाद नाहीत. मला पोलिसांचे चांगले-वाईट असे दोन्हीही अनुभव आहेत. त्यामुळे मी टोकाची भूमिका घेणार नाही.

मुलीच्या तक्रारीवरून मुलाला वाकड पोलीस चौकीवर बोलावलं. तिच्या नुसत्या तक्रारी वरून मुलाला बेदम मारलं.. एक दिवस कस्टडीत पण होता तो.

त्या मुलाने काहीही केलं नव्हतं आणि मुलीची तक्रार विनाकारण होती असं म्हणायचंय का तुम्हाला?

चूक दोघांचीही होती... पण काहीतरी चौकशी करायला हवी होती ना? काहीच ना चौकशी करता केवळ मुलगी म्हणते म्हणून मारणं कितपत योग्य?

वरुण मोहिते's picture

17 Oct 2016 - 2:23 pm | वरुण मोहिते

चांगले वाईट सगळेच असतात त्याला पोलीस पण अपवाद नाहीत तुम्ही म्हणालात ना चांगले हि अनुभव आहेत ते पण लिहा त्यांचं मनोबल वाढेल अजून . लोकं पण याला कारणीभूत आहेत म्हणून असं चालू आहे. वाईट आहे अगदी शिळफाट्याला रात्री 3-4 मध्ये एका तथाकथित भाईची लोकं महिन्यातून डान्सबारला एकदा यायची परवानगी मिळायची त्यांना याला मी साक्षीदार आहे तळोजा जेल मधून यायची .पण तसेच 10-10 दिवस एक गुन्हा असेल तरी पैसे न घेता काम करणारे पोलीस आहेत कि त्यामुळे आपल्याला विश्वास आहे. काही झालं तरी ते हि चांगलं काम करतात काही अपवाद असतील पण सर्वसकट अस बोलून काही होणार नाही . तुमचेही काही मुद्दे बरोबर असतील ते नंतर बोलूच

कपिलमुनी's picture

17 Oct 2016 - 2:26 pm | कपिलमुनी

मला वैयक्तीकरीत्या पोलीसांचे आलेले अनुभव अतिशय वाईट होते असे सखेदाने सांगतो .
तरीही उडदामाजी काळेगोरे असावे आणि काही पोलीस चांगले असावेत अशी आशा करतो .

पोलीस आणि सैन्यामधे खूप फरक असतो .
तळेगाव टोलनाक्याला एक भीषण अपघात झाला होता . आम्ही अँब्यूलन्सला फोन केला आणि जवळच्या चौकीकडे मदत मागितली तर ते आमच्या हद्दीत नाही असा उत्तर देउन तो पोलीस निवांत बसला होता . बर्‍याच विनंती नंतर डाफरला पण आला नाही किंवा कंट्रोल रूम ला कळवले नाही.
त्याच वेळी तिथे सीआरपीएफ चा ट्रक चालला होता , त्या जवानांनी गर्दी बाजूला करून जखमींना बाहेर काढून त्याच ट्रकमधून दवाखान्यात अ‍ॅडमिट केला. पोलीसदलामधे शिस्तीचा अभाव दिसतो .
सतीश शेट्ट्यी हत्येप्रकरण वाचलात तर ह्या सीस्टीमला लागलेली कीड किती भयंकर आहे ते समजेल .

अशातला एक अंगावर शहारे आणणारा अनुभव सांगतो..
माझ्याच विद्यार्थ्याचा आहे. त्याचा एक जबर्दस्स्त अपघात झाला होता. दुचाकीवरून जाताना गाडी घसरली. सोबतचा ऑन द स्पॉट गेला. ह्याचं डोकं फुटलं. एक डोळा फुटून बाहेर आला. रस्त्यावर रक्तच रक्त. तडफडायचं पण त्राण नव्हतं त्याच्यात. फक्त पोट तेव्हढं हलताना दिसत होतं... त्याच्या दुर्दैवाने त्याला शुद्ध होती. तसा तो पडलेला असताना एक पोलीस आला आणि त्याच्या अंगावर कापड टाकलं, मेला म्हणून... एक रिक्षावाला बाजूने जात होता. त्याने ते बघितलं. तो त्या पोलिसाला म्हणाला कि अहो तो मेला नाहीये... तेंव्हा तो पोलीस म्हणाला कि जावा तुम्ही एव्हढं डोकं फुटल्यावर कोणी जिवंत नसतं राहात... मरेलच थोड्यावेळात... हे सगळं ते पोरगं बघत होतं बरं, ऐकत होतं बरं... विचार करा काय वाटलं असेल त्याला.... शेवटी त्या रिक्षावाल्यानेच त्याला ऍडमिट केलं... आभाळाभरून खर्च आला आणि ते पोरगं वाचलं... काही दिवसात त्याच्या डोळ्यावर पण ऑपरेशन होईल.... ते पोरगं जेंव्हा मला सांगत होतं तेंव्हा मला थरथर सुटली होती अंगाला...
इतकं असंवेदनशील आणि संतापजनक उदाहरण माझ्या पाहण्यात नाही...

टवाळ कार्टा's picture

17 Oct 2016 - 3:28 pm | टवाळ कार्टा

समोरचा पोलिस या टाईपचा आहे / नाही / कधीकधी या टाईपचा हे कसे समजणार...सामान्य माणसांना काडीचीही किंमत नाहीये

विशुमित's picture

17 Oct 2016 - 3:43 pm | विशुमित

प्रचंड सहमत---

म्हणजे सामान्य माणसाने सुद्धा आपली किंमत वाढवावी..

हे व्हॅल्यू ऍडिशन कुठे करून मिळतं?

एखादा तरी क्लासमेट, जवळचा मित्र, नातेवाईक पोलीसात असावा.
इतरही भरपूर मार्ग आहेत. ते झेपत नाहीत मध्यमवर्गाला.

अहो ते सामान्य माणसाबद्दल बोलत आहेत... ज्यांचे लग्गे असतात ते सामान्य असतात होय?

ते तर असामान्य कॅटेगरीतले...

chitraa's picture

17 Oct 2016 - 2:53 pm | chitraa

आमच्या हद्दीत नाही म्हटले की त्याला कोणाच्या हद्दीत येते विचारुन त्याचा फोन नंबर मागायचा... त्यांच्याकडे असेल तर ते देतात. बहुतेक वेळा ते देतातच... मग त्याना फोन करायचा.

एम एल सी इन्फोर्मेशनला हे आम्ही असेच करतो. त्यात पोलिसांचा दोष नसतो

कपिलमुनी's picture

17 Oct 2016 - 3:20 pm | कपिलमुनी

सर्व प्रयत्न केले होते . असो !
पुढच्या वेळी मदत करताना हद्द , १०० नंबर इत्यादी लक्षात ठेवेन.

पोलीस मॅन्युअल नुसार एका पोलीस स्टेशनच्या हददीत जर गुन्हा घडला तर दुसर्या पोलीस स्टेशनचे पोलीस त्याची दखल घ्यायला नकार नाही देऊ शकत... झिरो एफ आय आर त्यासाठीच असतो.... जस्टीस वर्मा कमिटीच्या रिपोर्ट मध्ये ही शिफारस केली गेली.. आता तो कायदा आहे... आणि असं ना केल्यावर तो गुन्हा आहे सीआरपीसी नुसार सहा महिन्यापर्यंत शिक्षा होऊ शकते प्लस खात्याची कारवाई वेगळी...

सो...

ठरवा आता पोलिसांचा दोष असतो कि नसतो ते...

chitraa's picture

17 Oct 2016 - 3:51 pm | chitraa

ते सगळं थेरॉटिकल आहे.

त्यापेक्षा आपण कुठल्या हद्दीत येतो , त्य पोलिस स्टेशनला जावे.

ते झिरो नंबर वगैरे काही स्पेशल सिचुएशनला असते... उदा. पेशंट लोणावळ्याला पडला... नातेवाइकानी त्याला डायरेक्ट चेंबूरच्या हस्पिटलात आणला. आता चेंबुरचा डॉक्टर लोणावळा पोलिसाना कसं बोलावणार ? म्हणुन चेंबुरचेच पोलिस एम एल सी करतात.

पण डायमंड गार्डनजवळ पेशंट पडला तर त्याची अर्धी हद्द गोवंडीत व अर्धी चेंबुरात येते... तिथे झिरोचा फंडा घेउन चेंबुर पोलिसला गेलात आणि ते जर गोवंडी हद्दीत असेल , तर तो ऐकणार नाही , तो गोवंडीतच जायला सांगतो.

( गावांची नावे केवळ उदाहरणादाखल वापरली आहेत. )

तुमचं चालू द्या हवं तसं.... नेहमीप्रमाणे..
फक्त एक सांगतो सगळे कायदे आधी थेरॉटिकलच असतात.. नंतर प्रॅक्टिकलमध्ये येतात.

विशुमित's picture

17 Oct 2016 - 3:11 pm | विशुमित

100 नंबर वर कॉल केला तर कंट्रोल रूम ला हमखास दखल घ्यावीच लागते. नेमकं आपण तेच करत नाही.

कपिलमुनी's picture

17 Oct 2016 - 3:15 pm | कपिलमुनी

हे केला होता .
फोन लागला नाही.
बर्‍याच वेळेस १०० नंबर लागत नाही.

माझ्या मते तरी शक्यता खूप कमी आहे की 100 नंबर फोन नाही लागला.
पण तुम्हाला अनुभव आला असेल तर असू शकेल, हा विश्वास आहे तुमच्यावर.

ज्यावेळेस अशी एखादी घटना घडत/घडलेली असते आणि आपल्याला निर्णय घेता येत नसेल तर सर्व आपत्कालीन क्रमांकावर जरून फोन करून कळवा, नक्की दखल घ्यावीच लागते हे माझ्या अनुभवरून मी सांगत आहे.

ही सर्वाना कळकळीची विनवणी आहे.

गणामास्तर's picture

18 Oct 2016 - 9:59 am | गणामास्तर

माझा अनुभव जरा वेगळा आहे. 100 नंबर ला सलग 3-4 वेळा कॉल करूनही उचलला गेला नव्हता.

बर्र... हा घ्या फर्स्ट हँड अनुभव..

मागच्या महिन्यात मी आणि एक मित्र पुणे-खंबाटकी घाट-पुणे अशा प्रॅक्टीस राईडसाठी सायकलने जात होतो.
शिरवळच्या अलिकडे नीरा नदी लागते, ती नदी ओलांडल्यानंतर सातारा जिल्ह्यात आपण प्रवेश करतो. त्या हद्दीच्या बोर्डनंतर काही मीटर्स अंतरावर आम्हाला एका ट्रकने मागून धडक दिली, सायकलींनी सगळा धक्का सहन केला आणि दोघेही खाली पडलो. मित्राला भरपूर मुका मार आणि खरचटले. मलाही मुकामार लागला, किरकोळ खरचटले.

ट्रक पुढे निघून गेला.

मी मित्र तसा ठीक आहे हे बघून एक अनोळखी दुचाकी थांबवली आणि ट्रकचा पाठलाग केला व ४ किमी अंतरावर ट्रक थांबवला.

ट्रक ड्रायव्हरला खाली घेतले आणि पब्लीकने त्याला मारहाण करू नये याची काळजी घेत पहिला १०० नंबरला कॉल केला.

१०० नंबर चे उत्तर - हा फोन पुणे शहर ला लागला आहे, अपघात आमच्या हद्दीत झाला नाहीये, पुणे ग्रामीणला फोन करा. (पुणे ग्रामीणचा नंबर दिला)

पुणे ग्रामीणचे उत्तर - हा अपघात सातारा जिल्ह्यात झाला आहे, आमच्या हद्दीत नाही, सातारा जिल्ह्याला फोन करा.
(सातारा जिल्हा पोलीस ठाण्याचा नंबर दिला)

सातारा जिल्हा पोलीस ठाण्याचे उत्तर - हा अपघात शिरवळ हद्दीत झाला आहे, शिरवळ पोलीस ठाण्याला फोन करा.

मग मी वैतागून विचारले, ते पण मीच करू का? तुम्ही माझा नंबर घ्या आणि शिरवळ पोलीसांना फोन करायला सांगा

थोड्या वेळात शिरवळ पोलीसांचा फोन - कुठे येवू...? (१०० नंबरला फोन केल्यापासून १५ मिनीटांनंतर)

मी पत्ता सांगितला..

आणखी २० मिनीटांनी पुन्हा फोन - कुठे येवू..?

(मित्राला आणखी जास्त वेळ एकटे सोडणे शक्य नसल्याने मी ट्रक ड्रायव्हरला आणि तेथे अचानक उगवलेल्या एका गुंठामंत्र्याला घेवून अपघातस्थळी परत येत होतो. )

मग पोलीसांना सांगितले की "आता आमचे आम्ही बघतो, तुम्ही येवून काय करणार..?"

"बरं.." म्हणाले आणि फोन ठेवला. नंतर काहीही फोन नाही किंवा काय झाले ते विचारण्यासाठीही फोन नाही.

आपले सरकार पोर्टलवर ही घटना टाकली, १६ दिवसांचा समस्या निवारण कालावधी आहे, एक महिना झाला तरी अजून उत्तर नाही.

मग अशा अनुभवांनंतर पोलीसांचा आदर किंवा मान का राखला जाईल..? आमच्या ठिकाणी एखाद्या बड्या नेत्याचा मुलगा असता तर सगळे पोलीस नेत्यांच्या पाया पडत गेले असते याबद्दल शंका आहे का..?

टवाळ कार्टा's picture

17 Oct 2016 - 3:47 pm | टवाळ कार्टा

बाब्बो...ट्रकवाल्याला भर दिवसा समोरुन जाणार्या २ सायकली दिसत नाहीत?

नाखु's picture

17 Oct 2016 - 4:02 pm | नाखु

वयक्तीक अनुभवातून एक्च गोष्ट लक्षात आली की त्यांचे ब्रीद वाक्यात थोडीशी (उलटापालट)दुरुस्ती करून काय्म अंगिकारले आहे.

खलनिग्रहणाय सतरक्षणाय.

माझ्या आईला आलेला अनुभव उपायुक्त (तत्कालीन) फरासखाना स्टेशनमधला नुसता संतापजनक नाहीच तर अत्यंत माजुर्‍रडा आणि अधिकाराचा प्रचंड माज (हे कुठे जाणार आहेत असा) होता.

ज्यांच्यावर आरोप आहेत त्याच आरोपींच्या गाडीतून रोज (नित्यनेमाने) चौकी पोलीस न्यायालयात येत असत्,व अगदी सलगीमेने आरोपींबरोबर फिरताना पाहिले आहे.चौकीत तक्रार घेतानाही शिताफीने ज्यांच्याविरूद्ध तक्रार आहे त्यांनाच (हळूच सहय्यकाला सांगून) ,बाहेर पाठवून बोलावून घेतले व माझ्यावर तक्रार देऊ नये असा (निर्लज्ज) दबाव आणला गेला.

इतके असूनही काही (एखादाच) सहृदय्,सुशील पोलीस असेल तर तो फक्त त्याच्या घरच्या संस्काराने असेल आणि त्याला फक्त त्यालाच माझा सलाम असेल (एकून दहापैकी नऊ अनुभव घृणास्पद्/कटु) आलेला आहे.

त्यामुळे त्यांच्याबद्दल कणव अनुकंपा सहानुभुती अजिबात नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दल कणव अनुकंपा सहानुभुती अजिबात नाही, सैन्याबद्दल जितके तुरळक वाईट वाचले जाते त्याहीपेक्षा अगदी कमी पोलीसांबद्दल चांगले वाचले/सांगीतले जाते.

अर्थात पोलीसांनाही पैश्यासमोर्/माजासमोर अश्या बाबींची कधी फिकिर्/तमा/पर्वा असेल असे वाटत नाही,पुढेही वाटेल असे वाटत नाही.

मुर्दाड्+लाचखाऊ आणि रानटी पोलीसानुभावने उद्वीग्न नाखु

विशुमित's picture

17 Oct 2016 - 5:07 pm | विशुमित

पोलिसांनी मुर्दाड् आणि रानटी असायलाच पाहिजे गुळगुळीत राहून नाही चालणार, असा माझं वैयक्तिक मत आहे.
लाच खाऊ बद्दल तुमच्या बरोबर.

कपिलमुनी's picture

17 Oct 2016 - 5:11 pm | कपिलमुनी

मुर्दाड् चा अर्थ काय आहे ??

विशुमित's picture

17 Oct 2016 - 5:15 pm | विशुमित

संवेदना नसणारा...

हो लाच खाऊ बद्दल एकदम लेटेस्ट किस्सा--

खराडी वाघोली रस्त्यावरील जकात नाक्यावर आज जी वाहने चेकिंग चालू होती त्यातील प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला रु.10,000 टार्गेट आहे, ते पूर्ण केल्यावरच घरी जायचं. SP चा (आभासी) आदेश आहे. निवडणूक आल्या आहेत ना.
सगळ्यांना वाटतंय दिवाळी आली म्हणून स्वतःचे खिसे भरतात.
(चेष्टा नाही करत खरंच आहे )

अभ्या..'s picture

17 Oct 2016 - 5:18 pm | अभ्या..

हे बरंय राव.
आता कॉन्स्टेबलांचा नाविलाज पासून पीएसाय एपीआय, पीआय, एसीपी, डीसीपी करण्यापेक्षा डायरेक्ट मोदीकाकांनाच जबाबदार धरावं आपण हे उत्तम.

विशुमित's picture

17 Oct 2016 - 5:28 pm | विशुमित

अहो अभ्या जी...

खरंच त्यांना रु. 10,000 टार्गेट आहे, पैसे नक्की कोठे जाणार आहेत हे नाही माहित त्या पामरांना.

अभ्या..'s picture

17 Oct 2016 - 5:31 pm | अभ्या..

माहीताय की सोयरे.
सगळे माहीती आहे, मुद्दा हा की जबाबदार धरता येत नै ना कुणाला.
रांजण तर भरलेत खड्याने, पाप घ्यायचे कुणी?

त्यांचं म्हणणंय कि सामान्य माणसाने किंमत आणि हिम्मत वाढवावी.... नाहीतर मोदी जबाबदार...
चालायचंच

विशुमित's picture

17 Oct 2016 - 5:42 pm | विशुमित

<<<<<<त्यांचं म्हणणंय कि सामान्य माणसाने किंमत आणि हिम्मत वाढवावी>>>>>>
एक्साक्टली....!!

<<<<<नाहीतर मोदी जबाबदार...>>>
या महान आत्म्याला या मध्ये नका ओढू. (त्यांचा संबंध मी इथे जोडण्याचा प्रयत्न नाही करत, कृपया याची नोंद घ्यावी )

सामान्य माणसाने किंमत आणि हिम्मत वाढवावी

सोबत ओळखी ही.
फ्लॅट २४ तास बंद करुन फेस्बुकावर फ्रेंडसलिस्ट वाढवण्यापेक्षा असली ओळखी/कामाच्या ओळखी वाढवाव्यात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Oct 2016 - 6:16 pm | कैलासवासी सोन्याबापु

=))

म्हणजे ज्याची कुणाशी ओळख नाही त्याने मुकाट्याने अन्याय सहन करावा? काही लोक भिडस्त स्वभावाचे असतात, त्यांच्या व्यवसाय /नोकरीतही त्यांचा जास्त लोकांपर्यंत संपर्क येत नाही त्यांनी काय करावे??

शाम भागवत's picture

18 Oct 2016 - 10:50 am | शाम भागवत

त्यांनी भिडस्त राहू नये. श्रीयुत अभ्या यांना व्यनी करून त्यांचा क्लास लावावा.
:))

नुसत्या ओळखींचा फायदा शुन्य आहे. पैसा हवा.

खराडी वाघोली रस्त्यावरील जकात नाक्यावर आज जी वाहने चेकिंग चालू होती त्यातील प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला रु.10,000 टार्गेट आहे, ते पूर्ण केल्यावरच घरी जायचं. SP चा (आभासी) आदेश आहे.

नगर रोडवरच्या जकात नाक्यावर दिवसाला दहा हजार रुपये टार्गेट??

मिपाचाच जन्म होऊन दहा वर्षं झाली. मिपाकर त्याआधीच जन्माला आले होते हो!

अभ्या..'s picture

17 Oct 2016 - 5:58 pm | अभ्या..

१० प्रत्येकी हो.
आता टोळी कीती जणाची आहे त्यावर डिपेंडस. आक्खा ट्रूप लावला असेल तर काय सांगता येतंय.

ठीके ना. प्रत्येकी दहापण फारच कमी झाले.

नगर रोडवरच्या फॅक्ट्रीज पाहिल्यास तर वेकफील्ड, जॉन डियर (सणसवाडी), ट्रँटर (बहुतेक सणसवाडीच), इंटरव्हेट, माणिकचंद, फियाट, बेकर गॉजेस, डेन्सो, यामाझाकी मझाक एवढ्यांशी तर माझाच या ना त्या मार्गे संबंध आलाय. आणखी कितीतरी असतील.

विशुमित's picture

17 Oct 2016 - 3:01 pm | विशुमित

मुद्दा 1-नॉन-करप्ट माणूस मी तरी अजून पृथ्वीतलावर पाहिला नाही . कोणीच धुतल्या तांदळाचे नाही मीपण नाही तुम्ही पण. जर तुम्ही जुगाराचे अड्डे पाहत असाल तरी तुम्ही कधी ही त्याबद्दल तक्रार केली नसणार. त्यामुळे पोलिसांना नैतिकता शिकवण्याचा आपल्या अधिकाराला मर्यादा येतात.

मुद्दा 2- भविष्यात तुमच्या बाजूच्या मुलीने तक्रार केली आणि त्यावर काहीच कारवाई नाही केली तर तुम्हीच पुन्हा ओरड कराल. मुळात तुम्ही असल्या प्रकरणामध्ये मध्ये पडायलाच नव्हतंच पाहिजे. आणि पडायचं होतं तर वकिला मार्फत पोलीस स्थानकात गेला असता तर ही शिव्या खायची वेळ तुमच्यावर आलीच नसती. शिव्या देणे हे जरी तुम्हाला अपमानास्पद वाटत असले तरी "इट इज द लान्गव्हेज ऑफ फोर्स". आर्मी मध्ये तर 28-29 राज्यातील 28-29 हजार प्रकारच्या शिव्या दिल्या जातात.

मुद्दा 3- या मध्ये फक्त पोलिसच नाहीत..वकील, डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट, टॅक्स कॉन्सुलटन्ट आणि ज्याला चरायला रान मिळतं ते सर्वच करतात. मुद्दा 1 मध्ये सांगितलंच आहे.

मुद्दा 4-सर्वानी किती ही डिंग्या हाकल्या तरी सर्वांचा कमी अधिक प्रमाणात देश आणि धर्म एकंच... पैसा

मुद्दा 5-तुम्हाला शिव्या दिल्यावर तुम्ही कसे मिपावर येऊन कळवळु लागला अगदी सेम तसेच. अर्थात मी पोलिसांनी तुम्हाला शिव्या देण्याच्या बाजूने अजिब्बात नाही. पण त्याहीपेक्षा काही मिपाकरांनी निरपराध लोकांना बेदम शाब्दिक मारहाण केल्याची असंख्य उदाहरणे मी पहिली होती, पाहत आहे. त्यांना असे लायसन्स दिली आहेत काय?

मुद्दा 6- शेवटी पिचरच तो

मुद्दा 7- कायदेशीर बाबी बाबत कोणी तज्ज्ञ मिपाकर उत्तर देतील

मुद्दा 8- अभ्यास वाढवा

मुद्दा 9- तुम्हाला कोणा बाबत आदर आहे कृपया यावर पण एक धागा काढा म्हणजे आम्हाला आम्हाला पण मळमळून आमचे मत परिवर्तन करण्यासाठी मदत होईल.

कपिलमुनी's picture

17 Oct 2016 - 3:19 pm | कपिलमुनी

>>>नॉन-करप्ट माणूस मी तरी अजून पृथ्वीतलावर पाहिला नाही

बरेचजण नॉन करप्टेड असतात . तुम्हाला भेटला नाही याचा अर्थ दृष्टी किंवा संगत सुधारा.

पहिल्या मुद्द्या नंतर बाकी मुद्दे गैरलागू आहेत.

आदूबाळ's picture

17 Oct 2016 - 4:08 pm | आदूबाळ

सहमत आहे.

जास्त मोठा पृथ्वीतल बघायच्या कामाला लागा.

वटवट's picture

17 Oct 2016 - 3:20 pm | वटवट

मुद्दा १ - नॉन करप्ट ही संज्ञा मी पैशाच्याच संदर्भात वापरली आहे... मी आत्तापर्यंतच्या आयुष्यात एकही नवा वा जुना पैसा कुणालाही चारलेला नाही... तुमच्यासमोरची एक नॉन-करप्ट व्यक्ती मी... पोलिसांचं ड्युटी मॅन्युएल मधली गोष्ट आहे जुगारावर नियंत्रण आणणे... मला माझा जीव प्यारा आहे म्हणून मी तक्रार करू शकत नाही. हा डिफेन्स पोलिसांना लागू होत नाही. त्यांना तसे अधिकार असतात, सामान्य माणसांना नसतात.

मुद्दा २ - तुमच्या जास्त माहितीसाठी सांगतो. मी स्वतः वकीलच आहे. लॉ कॉलेज मध्ये प्राध्यापक आहे सध्या. त्यामुळे कुठे काय आणि कसं करायचं हे मला माहित आहे. माझा विरोध शिव्या द्यायला नाही तर तो कोणालाही द्यायला आहे.. (डिफेन्स आणि पोलीस वेगवेगळे ... गल्लत नको)

मुद्दा ३ - प्रत्येक माणसाची समाजात पत आणि स्थान हे वेगवेगळं असतं... एक पेशंट चुकीचा तपासला गेला तर त्या वैयक्तिक व्यक्तीला हानी होते आणि एक गुन्हेगार जर जाणून बुजून सोडला तर समाज धोक्यात जातो... (अर्थात पेशंट चुकीचा तपासण्याचं मी समर्थन करत नाही... हे विशेष सांगणे नं लगे)

मुद्दा ४ - विषय हा कमी अधिक प्रमाणाचा नाही तर सर्वस्वाचा आहे...

मुद्दा ५ - नॉट रिलीव्हन्ट

मुद्दा ६ - अभ्यास वाढवा जमल्यास (जमल्यास वायपी सिंग पण सर्च करा)

मुद्दा ७ - निकाली निघालाय..

मुद्दा ८ - तो तर चालूच असतो सतत माझा... सल्ल्याबद्दल आभारी आहे.

मुद्दा ९ - त्याबद्दल मी आधीच लिहिलं आहे, नंतर पण लिहीन... जमल्यास वाचा... प्रतिसाद नाहीत दिला तरी चालेल.

माझ्या ऐकीव माहिती नुसार वकील आणि पत्रकार लोकांचं पोलिसांबरोबर विळ्या भोपळ्याचा नातं असतं म्हणतात.(कृपया हा. घ्या.)

जर तुम्ही वकील आहात म्हणत असाल तर मला नाही वाटत कोण्या पोलिसांची टाप असेल तुम्हाला किंवा तुमच्या विध्यार्थ्याला शिविगाळ करण्याची.
पोलीस असे का वागतात हे वकील असणाऱ्या माणसाला काही वेगळं सांगायची गरज आहे, असे नाही वाटत.

बाकी चालू द्यात...

वकील आणि पोलीस ह्यामध्ये कधीच विळ्याभोपळ्याचे सख्य नसतं दादा... ते दोघे हातात हात घालून जात असतात सगळीकडे... नाहीतर दोघांचाही अवघड होइल...

जर तुम्ही वकील आहात म्हणत असाल तर मला नाही वाटत कोण्या पोलिसांची टाप असेल तुम्हाला किंवा तुमच्या विध्यार्थ्याला शिविगाळ करण्याची.
>>> आता शिवीगाळ झाली ह्याची ऑडिओ क्लिप नाही ओ काढली मी नाहीतर इथे नक्की टाकली असती..

पोलीस असे का वागतात हे वकील असणाऱ्या माणसाला काही वेगळं सांगायची गरज आहे, असे नाही वाटत.>> म्हणून तर मी माझे अनुभव टाकलेत.. आणि निरीक्षण पण नोंदवलय.

मोदक's picture

17 Oct 2016 - 3:47 pm | मोदक

हा प्रसंग घ्या..

नो पार्किंगमधल्या दुचाकी उचलणार्‍या टेम्पोने नेहमीप्रमाणे वेड्यावाकडया पद्धतीने दुचाकी उचलल्या आणि नेमका तोच टेम्पो सिग्नलला माझ्या शेजारी येवून थांबला.

नजरेच्या टप्प्यात एक घड्याळाचे चित्र असलेली स्विफ्ट नो पार्किंग बोर्डच्या बरोब्बर खाली उभी होती.

पोलीसाला खुण करून विचारले

"हे तुमच्या हद्दीत येत नाही का..?"

तो म्हणला, "ते आपले काम नाही"

वटवट's picture

17 Oct 2016 - 3:51 pm | वटवट

हा हा हा हा.... प्रसंग डोळ्यासमोर आणून पाहिला...

मोदक's picture

17 Oct 2016 - 3:59 pm | मोदक

असे लै प्रसंग आहेत.

कार्बाईन लटकावून सायकल ट्रॅकमधून बिनदिक्कतपणे चुकीच्या साईडने गाडीने येतात आणि विचारले तर नेहमीचे उत्तर असते, "इमर्जन्सी आहे"

स्वारगेटच्या वाहत्या ट्रॅफिकमध्ये वन वे रस्त्यावर काहीही सूचना न देता, डायरेक्ट यु टर्न मारणार्‍या महिला कॉन्स्टेबल..

वरचे लोक चांगले असतीलही पण आपण डायरेक्ट वरच्या लोकांपर्यंत जावूनही फार फायदा होत नाही. तळातल्या याच गणंग लोकांकडून आपले काम थांबवले जाते.

साहेब ...वरचे लोक चांगले असते तर ह्या खालच्या लोकांची काय बिशाद अशी वागण्याची.

खालचे आणि वरचे लोक असे संबोधून नवा जातीवाद निर्माण होण्याची भीती वाटते.

विशुमितजी... आता ह्यात जात कोठून आली? दादा.. मनापासून विनंती आता ह्यात जात आणू नये...

चिनार's picture

17 Oct 2016 - 4:28 pm | चिनार

वटवट भाऊ..
तुम्हाला गम्मत कळली का ?...जात आली पण अजून 'साहेब' नाही आलेत..

हम्म्म... येतील लवकरच... मग विषय राहिला बाजूला ह्यांचीच ओढाओढी सुरु होईल...

विशुमित's picture

17 Oct 2016 - 3:59 pm | विशुमित

धनुष्यबाण , कमळ, हत्ती असला असता तर लगेच कारवाई झाली असती हेच सूचित करायचं दिसतंय तुम्हाला.

तुमच्या वाक्यातून "धनुष्यबाण, कमळ, हत्ती असला तरी चुकीला चूकच म्हटले जाते, आणि कोणाचाही काका, पुतण्या असला तरी दोषींवर कारवाई केलीच जाते" असा संदेश जात आहे.

जरा विचार करून फाटे फोडा हो... ;)

मी असं म्हणेन की प्रत्येकाची किंमत असते. एखादा non-corrupt आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ एकच. त्याची किंमत जास्त आहे एवढंच. आता याला cynical म्हणा किंवा काहीही. So, there can be non-corrupt people but no one is non-corruptible

अगदी... पाणी आहे ते घाण होऊ शकण्याच्या शक्यतेवरच....
फक्त... प्रत्येकाने आपापले पाणी ठरवावे...

माझीही शॅम्पेन's picture

17 Oct 2016 - 3:02 pm | माझीही शॅम्पेन

माझा कोणाही पोलिसा विषयी आकस नाही पण तुम्ही मांडलेले बरेचसे मुद्दे खरे आहेत

मागे कुठे तरी वाचल होत , पोलिस म्हणजे भारतातील सर्वात संघटित गुन्हेगारी संघटना आहे म्हणून.
असो अभावानेच चांगले अनुभव सुद्धा येतात
जो पर्यंत पोलिसांच्या कंट्रोलस नेत्यांच्या हातात आहेत तो पर्यंत काही खर नाही :(

दोन वर्षांपूर्वी घरातील दागिने आणि मोबाईल दिवसाढवळ्या चोरीला गेले. मोबाईल ट्रेकिंगमुळे काही दिवसांनी चोर पकडले गेले. चोर म्हणजे आठवी-नववीतले 2 पोरं होते. मुलांनी गुन्हा काबुल केला पण दागिने मिळाले नाहीत ! या केसमध्ये एकदोन पोलीस नसून स्वतः पोलीस कमिशनरसुद्धा इन्व्हॉल्व होते.

पोलिसांच्या मते : ही मुलं अतिशय बदमाश असून अजिबात सहकार्य करत नाहीत. खोटंनाटं सांगतात. मुलं लहान असल्यामुळे थर्ड डिग्री वापरता येत नाही. त्यामुळे दागिने कुठे आहेत हे आम्हाला कळू शकत नाही.

चौदा-पंधरा वर्षांच्या मुलांकडून पोलीस माहिती काढू शकत नसतील हे ज्याला पटते त्यांनी पोलिसांचा जयजकार करावा.

chitraa's picture

17 Oct 2016 - 4:28 pm | chitraa

अरेरे ! मोदी येउनही असेच आहे ?

हजारात एखादा चांगला नेक बंदा असतो, तोही कसा ड्युटी करत असेल उरलेल्या ९९९ जणात कोण जाणे.
बाकी माझ्या इथे ३-४ पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रे (खाजगी) आहेत. तिथल्या प्रशिक्षणार्थींचा आत्तापासूनचाच माजुर्डेपणा पाहून पुढे कशा टाइपचे पोलीस पाहायला मिळतील त्याचा अंदाज आलेला आहे.
माणूस चांगला अथवा वाईट ह्याचे जे मीटर दुसर्‍याला जज करताना लावतो ते पार गंडलेले आहे. पोलीस हे तर गंडलेल्या मीटरांसोबतच जास्त काळ असलेने त्याबाबतीत काही बोलणे अवघड झालेले आहे.

मी त्याच नेक बंद्याच्या शोधात आहे..

अभ्या..'s picture

17 Oct 2016 - 5:05 pm | अभ्या..

आम्हाला माहीतीय.

विशुमित's picture

17 Oct 2016 - 5:37 pm | विशुमित

पोलीस यंत्रणा नेहमी व्हिलन सारखी का वागते?

या धागा शीर्षका खाली विचारण्यात आलेला प्रश्न बाबतची उत्तर दिली तर एक सकस चर्चा होईल असं वाटतं, नाही तर कोणी एकचं पोलिसांची बाजू घेणार आणि बाकी त्याच्यावर तुटून पडणार यात काही हाशील नाही.

अशी काय कारणं असतील ज्यामुळे पोलीस यंत्रणा व्हिलन सारखी वागत असतील ??

1)सामाजिक कारण
2)राजकीय कारण
3)नैतिक कारण
4)कायदेशीर कारण
5)व्यक्तिसापेक्ष कारण
6)भौतिक कारण
7)पारिवारिक पार्श्वभूमी चे कारण
8)अजून काही इतर कारण

वटवट's picture

17 Oct 2016 - 5:45 pm | वटवट

कसंय विशुमित जी... ज्यांना पोलिसांची बाजू घ्यायची आहे ना त्यांनी कारणे द्यावीत.... जे पोलिसांच्या ह्या वर्तनाचे बळी आहेत किंवा ज्यांना त्यांचं वागणं पटत नाही ते कशाला कारणं देतील... आणि कारणं दिली तर चूक बरोबर मध्ये परावर्तित होत नाही...
नाहीतर प्रत्येक गुन्हेगार असंच म्हणत फिरेल कि मी काही हा गुन्हा विनाकारण केलेला नाहीये. शिव्या घालण्याऐवजी माझी कारणं समजून घ्या... हे असं नाही ना चालत?

हेच्च म्हणतो..कारण काहीही असलं तरी सामान्य माणसाला पोलीस खात्याचा उपयोग तर होतंच नाही उलट त्रास होतो. पोलिस खातं ज्या उद्देशानं स्थापन करण्यात आलं आहे ते दूरच राहिलं..अर्थात हे वाक्य अन्य कितीतरी खात्यांविषयी पण तितकंच खरं आहे. पण पोलिसखात्याचा संबंध नागरिकांच्या सुरक्षेशी आहे. आणि सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य असलं पाहिजे.

विशुमित's picture

17 Oct 2016 - 5:52 pm | विशुमित

<<<<<<<<जे पोलिसांच्या ह्या वर्तनाचे बळी आहेत किंवा ज्यांना त्यांचं वागणं पटत नाही ते कशाला कारणं देतील... आणि कारणं दिली तर चूक बरोबर मध्ये परावर्तित होत नाही...>>>
-- सहमत

विशुमित's picture

17 Oct 2016 - 5:53 pm | विशुमित

<<<<जे पोलिसांच्या ह्या वर्तनाचे बळी आहेत किंवा ज्यांना त्यांचं वागणं पटत नाही ते कशाला कारणं देतील... आणि कारणं दिली तर चूक बरोबर मध्ये परावर्तित होत नाही...>>>>
--सहमत

माझीही शॅम्पेन's picture

17 Oct 2016 - 6:20 pm | माझीही शॅम्पेन

मोबाईल सरळ सरळ चोरीला गेला तरी हरवला आहे अशी तक्रार नोंदवायला सांगतात !!!

कारण त्यांना "किती चोर्‍या झाल्या आणि त्यातल्या किती उघडकीस आल्या" याचा रिपोर्ट द्यावा लागतो.

संदीप डांगे's picture

17 Oct 2016 - 8:54 pm | संदीप डांगे

जास्त काही सांगत नाही, टेराबाईटी होईल, एका कमिश्नराच्या कुटुंबाशी घनिष्ठ संबंध होते काही काळ, त्यामुळे गाळ किती, चिखल किती, चांगले स्वच्छ पाणी किती याचे फर्स्ट हॅन्ड अनुभव आहेत,

अर्थात लेखातल्या मुद्द्यांशी सहमत, वेळ मिळाल्यास अधिक लिहीन.

अनुप ढेरे's picture

17 Oct 2016 - 9:11 pm | अनुप ढेरे

डांगेजींना प्रत्येक गोष्टीत फष्ट ह्यांड अनुभव कस्काय असतात? पोलीस, कॉर्पोरेट जगत, राजकीय जगत, शिक्षण जगत अनेक प्रकारच्या धाग्यांवर यांचे फष्ट ह्यांड अनुभव असतात. बराच लोकसंग्रह दिसतोय!

संदीप डांगे's picture

17 Oct 2016 - 11:16 pm | संदीप डांगे

आम्ही लिहितो, इतर लिहीत नैत. अनुभव प्रत्येकाकडे असतातच.

बाकी आमची लाईफष्टुरी अंमळ डिफ्रंट असल्याने आश्चर्य वाटणे साहजिक आहे, आत्मचरित्र लिहू तेव्हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, :) ;)

आमच्या साठी राखून ठेवणे आपल्या सहीसक्ट...

चौकशी : नाव नोंदणी कुठे चालू आहे?

संदीप डांगे's picture

17 Oct 2016 - 8:56 pm | संदीप डांगे

बाकी घाटपांडे सर खुद्द dipartment वाले, त्यांचे अनुभव इतर कुणापेक्षाही जास्त विश्वासू असतील..

प्रकाश घाटपांडे's picture

18 Oct 2016 - 3:34 pm | प्रकाश घाटपांडे

अहो आम्ही बिनतारी पोलीस म्हणजे बिनविषारी सापासारखे. भ्रष्टाचार अनास्था सगळीकडे भरलेली आहे. निवृत्त झाल्यावर ही आम्हाला त्रास होता व आहे. पहा http://bintarijagat.blogspot.in/2007/08/blog-post.html

तुमच्या ब्लॉग वरचा मिपाचा दुवा मिसळपावा.कॉम असा आहे..

तो सवडीने नीट कराल का..?

प्रकाश घाटपांडे's picture

18 Oct 2016 - 4:32 pm | प्रकाश घाटपांडे

धन्यवाद! दुरुस्ती केली आहे

एकदा दुपारी घरीच सुटीवर होतो. मुलाच्या शाळेतील एक बाई एका रिक्शात बसलेल्या होत्या. तो रिक्शावाला त्यांना मोबाईल वर काहीतरी दाखवत होता. ती बाई गयावया करुन बोलत होती. आमच्या वरच्या घरातील बाईने सदर बाब सांगितली. मी जोशात पोलिसांना फोन करुन बोलावले. दोन पोलिस गाडीवरुन आले आणि त्याला घेउन गेले. बाईला थांबायला सांगितले. पण बाई गायब. दोन तीन दिवसांनी माझ्या स्वयंपाकाच्या रुमची काच रात्री १० च्या आसपास दगड मारुन फोडली गेली. तपास केला तर तोच माणुस होता असे समजले. मुले आणि सौ घाबरले. मग मी ती घटना सांगितली. सौ आणि मुलांकडुन अजुन उपदेशाचे डोस घेतले. असे काही अत्यंत घाणेरडे अनुभव या खात्याने दिलेत. त्यांच्यावर होणार्‍या हल्याबद्दल अजिबात आश्चर्य वाटले नाही. आणि वाईटतर त्याहुन नाही. असतील काही चांगले पण ते गुलबकावलीचे फुल. कोणी पाहिले?

रविकिरण फडके's picture

17 Oct 2016 - 9:58 pm | रविकिरण फडके

पण पोलीस विनोदीसुद्धा असतात हो.
साधारण दोन वर्षांपूर्वी रस्त्यावर उभी केलेली एक मोटार गाडी आमच्या कॉलनीतून रात्रीच्या वेळेस चोरीला गेली. मालक सकाळी बाहेर येऊन पाहतो तो मोटार गायब. मग पोलिसात तक्रार इ. सोपस्कार झाले.
काही महिन्यांनी गाडी कुठेतरी सोडून दिलेले मिळाली आणि त्यानंतर त्या मालकाच्या पोलीस स्टेशनला फेऱ्या सुरु झाल्या. कशाला? तर कुणी संशयित आरोपी मिळाला की पोलीस मालकाला बोलवायचे, चोराची ओळखपरेड व्हायची. बिचारा मालक मेटाकुटीस आला; तो घरात झोपलेला असताना गाडी रस्त्यावरून चोरीला गेली तर कसा ओळखणार तो चोराला?
पण पोलिसांना काही हे पटत नाही. ते आपले बोलवीत राहतात गाडीच्या मालकाला.
दोन तीन महिन्यांपूर्वी त्याच्या मुलाची नवीन कोरी व महागडी सायकल चोरीला गेली. मी विचारलं तू तक्रार केलीस का पोलिसात? तेव्हा त्याने मला वरील किस्सा सांगितला.
'मेरा भारत महान' असे म्हणून मी त्याचा निरोप घेतला, आणखी काय?

चांगले पोलीस ... वारजे पोलीस चौकीतले डी टी चव्हाण आणि कॉन्स्टेबल कदम

रात्री 2 ते 7 पाच तास काम करूनही त्यांनी एकही रुपया घेतला नाही - आम्ही स्वखुशीने देऊनही.

सविस्तर लिहितो नंतर, पण इतक्या वाईट अनुभवांमध्ये एक तरी चांगला असावा म्हणून टाकली प्रतिक्रिया.

अभिजीत अवलिया's picture

18 Oct 2016 - 2:11 am | अभिजीत अवलिया

जास्त अनुभव नाही पोलिसांचा. एकदा कोथरूडमध्ये बाईक वर थांबलो होतो सिग्नलला. एक रिक्षावाला मागून येऊन धडकला. त्याच्या हेडलाईटची काच फुटली. वर माझ्याकडेच 200 रु. भरपाई मागू लागला.
देणार नाही बोलल्यावर 'अमके तमके साहेब माझ्या ओळखीचे आहेत. फोन करीन बोलला.'
मी पण बोललो 'कर फोन आणि बोलावं तुझ्या साहेबाला.' हा फोन लावतोय तर नंबर 'आऊट ऑफ सर्विस' :)
मग मीच 100 नंबर वर फोन केला. 5 मिनिटात 2 बीट मार्शल आले. तिथून सगळी वरात चौकीत. 'कितीही वेळ काथ्याकूट होऊ दे. एक पैसा पण देणार नाही. मला घरी जायचे अजिबात घाई नाही' असे स्पष्ट्पणे बोललो. रिक्षावाला पण कंटाळला नंतर. 200 रु. भरपाई मागण्याच्या नादात बिचाऱ्याचा 2 तास धंदा बुडाला. पोलीस पण कंटाळले. 100 नंबर वर फोन करून बोलावले असल्याने गुन्हा नोंद झाला होता. मग आमची एकमेकांबद्दल काहीही तक्रार नाही ह्या स्टेटमेंट वर सही घेऊन जायला सांगितले. :)

मला तर पोलिसांची दयाच जास्त येते. हजारो निरर्थक कायदे बजावण्याची ह्यांच्यावर जबाबदारी.

ह्या पैकी अनेक कायदे तर एकदम मुंडू लेव्हल चे असतात. पासपोर्ट व्हेरिफिकेशन ह्यातील पहिल्या नंबर वर आहे. आमचे एक स्नेही पासपोर्ट करून देण्याचा धंदा चालवतात. तर म्हणे पोलिसांना महिन्याला अमुक इतकी रक्कम दिली कि कुणाचाही पासपोर्ट वेरिफिकेशन थे थांबवून ठेवत नाहीत.

सगळ्यांत भिकार कायदा कुठला असेल तर "दारू पिऊन चालवण्याचा". म्हणजे कायदा बरोबर असला तरी तोंडाचा वास घेण्याचे जे काम काही पोलीस करतात हे मानवी अधिकारांचे उल्लंघन असेच समजले पाहिजे (दोघां साठी). कायदा केला आहे तर किमान पोलिसांना ब्रेथ एनएलझेर तरी द्या. फायदा एक कि तरी वाट्टेल तशी गाडी दुचाकी चालवली तरी महिलांना मात्र पोलीस थांबवू शकत नाहीत !

पोलीस खाते राज्य सरकारच्या हातांत ठेवायचा जो नियम आहे जो बहुदा ब्रिटिश सरकार साठी बरोबर होता कारण मूठभर सत्ताधारी लोकांना इतर जनतेची गळचेपी करणे सोपे जात होते. राज्य पोलिसांची संख्या कमी करून खरे तर नगरपालिका, ग्रामपंचायत ह्यांना आपले छोटे पोलीस ठाणे चालविण्याची मुभा असली पाहिजे. बहुतेक मुंडू लेव्हल ची जी कामे असतात ती तरी सहजगत्या होतील. भाडेकरू ओळख, नोकर ओळख, पासपोर्ट व्हेरिफिकेशन, समन्स बजावणे इत्यादी इत्यादी जी फुटकळ कामे असतात ती कमी खर्चांत लोकल बॉडी जास्त चांगल्या पद्धतीने करू शकत त्या शिवाय चांगली सर्व्हिस नाही मिळाली तर आम्ही लोकल प्रतिनिधींना भेटून किमान तक्रार तरी करू शकतो.

अगदीच अपवाद सोडला (तोही रिमूव्ह केला जाईल लवकरच) तर एकही कायदा निरर्थक नाही.
आणि पोलीस खाते जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यात जर दिले. सरळसरळ ते ताटाखालचं मांजर होऊन बसेल.
आमदार आणि नगराध्यक्ष अनभिषिक्त सम्राट होतील तालुक्याचे जे अत्यंत धोकादायक आहे...
अंमलबजावणी करणारं खातं आणि कायदे बनवणारं खातं ह्यामध्ये अंतर असायलाच हवं...नाहीतर गोष्टी अजून कॉम्प्लिकेटेड होतील... असं मला वाटतं.
आणि जेव्हढे जास्त कायदे तेव्हढे त्यांचे इन्कम सोर्स जास्त हे खरं...

बापू नारू's picture

18 Oct 2016 - 9:52 am | बापू नारू

आत्तापर्यंतच्या आयुष्यात तर यांचा फक्त त्रासच झालाय ,आंदोलने-दंगली होतात तेव्हा सगळ्यात जास्त तोडफोड हीच मंडळी करते आणि नाव आंदोलकांचं लावून मोकळे होतात ,कोल्हापूर मधील शेतकरी आंदोलनावेळी प्रत्यक्ष पाहिलं होत ,एकाही आंदोलकाने कोणत्याही गाडीची तोडफोड केली नव्हती ,यांच्याच पार्किंग van मधून रस्त्यावरील 2-wheeler भरून-भरून
पोलीस स्टेशन मध्ये आणून 5-6 जण लोखंडी रॉड ने त्या चेपवत होते. हि जात किती नीच असते हे त्यावेळी चांगलच अनुभवलं .

सतीश कुडतरकर's picture

18 Oct 2016 - 11:57 am | सतीश कुडतरकर

वरळीला पासपोर्ट औफिस आणि परीसरात रात्री अपरात्री नेहमी वाटमारी व्हायची. पोलिसात गेल्यावर थातुरमातूर लिखापढी करून फिर्यादीला परत पाठवले जायचे. तक्रारीवर कधीच कार्यवाही केली जात नव्हती. कारण?

वाटमारी करणारे पोलिसांचीच मुलं, वरळीच्या पौलिसकैंपात राहणारी.

मावळच्या गरीब शेतक-यांमागे धाऊन गाेळीबार करणारे आझाद मैदानात महिला पाेलिसांची अब्रु वाचवू शकले नाहीत. तिथे का ह्यांना लकवा मारला हाेता?

संपादित

प्रतिसाद लिहिताना सभासदांनी भान राखावे अशी किमान अपेक्षा आहे. : संपादक

मोदक's picture

18 Oct 2016 - 1:25 pm | मोदक

???

माफ करा, पण पोलीसांच्याबद्दल तुम्हाला कितीही राग असला तरी हा प्रतिसाद पटला नाही.

अनिरुद्ध.वैद्य's picture

18 Oct 2016 - 1:41 pm | अनिरुद्ध.वैद्य

असे प्रतिसाद नकोतच.

तुकाराम ओंबळे, करकरे, साळस्कर, कामटे हेदेखील पोलीसच होते. या प्रतिक्रियेशी तिव्र असहमत.

नाखु's picture

18 Oct 2016 - 12:25 pm | नाखु

प्रतिक्रिया किमान "पोलीसांच्या भावाने/मुलाने/मित्राने" वाचल्यावर किमान पोलीसाम्बद्दल सर्वांची फक्त भ्र्ष्ट(लाच खाणारा) अशी नसून अमानवी/घृणास्पद वागणूक देणारा आणि उपद्रवी/माजुरडा (प्रंसगी राजसत्तेसमोर/गुंडासमोर्/पैशासमोर लाळघोट्या) आहे हे पुन्हा पुन्हा अनुभवले आहे म्हणून अत्यंतीक तिडीकेने लिहिल्या आहेत.

अपवादात्म्क चांगले अनुभव असतील तर नावानिशी प्रसिद्द करावेत भांगेत तुळस पहायला हवीच की सगळ्यांना !!!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Oct 2016 - 1:08 pm | कैलासवासी सोन्याबापु

काेणताही पाेलिस मेल्याची बातमी मी वाचतो तेव्हा मला खूप समाधान वाटते.

असेच समाधान नक्सली, दहशतवादी, पाकिस्तानी इत्यादींना ही वाटते,

विकृती एट इट्स बेस्ट. असो, जास्त बोलून उपयोग नाहीये इथे तरीही राहवले नाही.

संदीप डांगे's picture

18 Oct 2016 - 1:24 pm | संदीप डांगे

आपापले अनुभव आहेत बापू, ज्यांना तुळस मिळत नाही त्यांच्या भावना विकृत वाटणे साहजिक आहे!

सुबोध खरे's picture

18 Oct 2016 - 1:50 pm | सुबोध खरे

बापूसाहेबांशी सहमत
निर्ढावलेला गुन्हेगार किंवा दहशतवादी मारला गेला तर त्याचे समाधान वाटणे एक गोष्ट आहे
पण एखादे लहान बालक मग ते पाकिस्तानी जरी असेल तरीही त्याच्या मृत्यू बद्दल समाधान वाटणे बरोबर नाही.
"कोणताही" पोलीस मेल्या बद्दल "समाधान वाटणे" हि आत्यंतिक प्रतिक्रिया आहे आणि वाईट अनुभवातून गेल्यामुळे भावनेच्या भरात श्री राम राम यांनी हि प्रतिक्रिया दिली असावी असे मी समजतो.
पण जर थंड डोक्याने विचार केल्यावर त्यांना "तसेच" वाटत असेल तर मात्र ते विकृतीचे लक्षण समजावे लागेल.

संदीप डांगे's picture

18 Oct 2016 - 2:10 pm | संदीप डांगे

सहमत आहे,

संदीप डांगे's picture

18 Oct 2016 - 1:27 pm | संदीप डांगे

परवाचीच गोष्ट, एक पोलीस नो हेल्मेट, नंबर नसलेली, काहीतरी 'आई' असे लिहिलेली बुलेट चालवत जात होता, कोणाला जाब विचारावा याबद्दल!

चांदणे संदीप's picture

18 Oct 2016 - 2:21 pm | चांदणे संदीप

अतिशय एकांगी अशी 'वटवट' इथे चाललेली पाहून मनाला फारच क्लेष झाले. या अशा तद्दन फालतू चर्चांमुळे आणि विखारी विचारांना उथळ खळखळाटायला मिळते हे पाहूनच मिपावरचा वावर कमी केलाय हल्ली!

मला कधी पोलीसांना पाहून भीती नाही वाटली. उलट रस्त्यावर कधी कोणाला पत्ता विचारायचा असेल तर मी रस्त्यावर उभा असलेला पोलीसच प्रेफर करतो. इथे कोणाला अशाही वेळी पोलीस व्हिलन का वाटावेत समजत नाही. असो...

प्रतिक्रिया देणारही नव्हतो पण इथे काही महाभाग, पोलीसांना मारल्यावर खूष होतायत काहींना पोलीसांना जीवे मारल्यावर आनंद होतोय हे पाहिल्यावर संताप संताप होतोय माझा. माझ्या समोर उभा राहून कोणी हे बोलत असत तर माहित नाही काय झाल असतं माझ्या हातून!

पोलीसांच्या माजोरडेपणाचा, लाचखाऊपणाचा अनुभव मीही घेतलेला आहे पण असे विचार बाळगून मी फिरत नाही व तसा प्रचारही करत नाही आणि करणारही नाही. दुसऱ्या बाजूला काय असत हे पाहण्याचा प्रयत्न कधीतरी इथे विखारी प्रतिसादकर्त्यांनी केला आहे काय?? करणार काय?? उत्तर नाही असेल तर मुस्काड आवरा!

मूर्ख लेकाचे!

Sandy

नाखु's picture

18 Oct 2016 - 2:30 pm | नाखु

शांत गदाधारी शांत...

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Oct 2016 - 2:55 pm | कैलासवासी सोन्याबापु

शांत व्हा सँडी भाऊ, शांत व्हा. म्हणूनच मी कमी बोलायचे नियम पाळले इथे. शेवटी एकच प्रश्न विचारावा वाटतो,

जर पोलीस इतकेच माजुरडे हलकट हरामखोर मरण्यालायक आहेत तर एकदा विचार करा जर पोलीस खातेच बंद केले तर काय होईल?

अधिक माहिती करता जमल्यास पर्ज हा सिनेमा नक्की पहा ही विनंती

वकील लोक तर पोलिसांपेक्षा महा माजुर्डे. वरच्या धाग्या मध्ये पोलिसांनी केलेल्या कारनाम्याला कळस चढवणारे कोण असतील तर भिकार, महा माझुर्डे, कपटी, हलकट आणि पैशाला हपापलेले वकील च असतात.
वटवट करून 3-4 हिअरिंग मध्ये निकाल लागू शकणारी केसेस 15-20 वर्ष चालवतात आणि बेइंग ह्यूमन ची बिरुद मिरवणाऱ्याना "बिग बॉस " मध्ये घर मिळवून देतात...

(वटवट हा शब्द धागा कर्त्याला उद्देशून वापरला नाही, गैरसमज करून घेऊ नये)

पोलीस खातेच बंद केले तर काय होईल?>> सोन्याभाऊ कोण म्हणतंय हे खातं बंद करायला... व्यवस्थित काम नाहीये ते करत हा विषय आहे ह्या धाग्याचा....
झाल्यास "क्या यही सच है" बघा....

आपले जर काही चांगले अनुभव असतील तर टाका कि दादा मग...
अर्थात पोलिसांना मारणे आणि त्यात आनंद मिळणे ह्याचं समर्थन कधीच होत नाही... ह्या धाग्याचा तोच विषय नाहीये... तुम्हाला पोलिसांची भीती वाटली नाही हा तुमचा वैयक्तिक अनुभव.. जर चांगल्या अनुभवाचं प्रमाण जास्त असलं असतं तर तोही धागा निघाला असताच कि... काय म्हणताय? आणि दुसरी बाजू कितीही काळी असली तरी परिणाम जर घाणेरडा असेल तर त्या परिणामांचं समर्थन नाही ना होत... ऑ?? काय?

वरुण मोहिते's picture

18 Oct 2016 - 3:10 pm | वरुण मोहिते

हेच बोलायचं होतं काही चांगलं असलं कि का बोलत नाही कोण ..असतील ना वाईट अनुभव पण आय ऍग्री . पण हे मेल्यावर समाधान किंवा मारल्यावर समाधान हे काय आहे

मावळच्या शेतक-यांमागे धाऊन गाेळीबार करणारे पोलिस पाहून माझे मत बनलेले आहे हे लक्षात घ्यावे हि विनंती

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Oct 2016 - 10:25 pm | कैलासवासी सोन्याबापु

मग

काेणताही पाेलिस मेल्याची बातमी मी वाचतो तेव्हा मला खूप समाधान वाटते.

हा (तुमचाच) नियम लावला तर, मावळ मध्ये पोलिसांनी गोळीबार केला म्हणून काश्मीरात आंदोलनकरत्यांचे दगड पेट्रोलबॉम्ब खाऊन मेलेला पोलीसही तुम्हाला समाधान देत असेल नाही का? राग मावळ पोलिसांवर आहे तर तसे स्पष्ट लिहा, असले सार्वत्रिकरण कश्याला?

तुम्ही काही मावळ मधला एखादा पोलीस मेला तर मला समाधान वाटते म्हणले असते तर वैयक्तिक अनुभव म्हणून सोडून देता आले असते (तसे पाहता तेही आमच्यालेखी अक्षम्यच आहे पण तितके म्हणायचा तुमचा अनुभवसिद्ध अधिकार आहे हे लगोलगी मान्यच करून टाकतो कसा)

संदीप डांगे's picture

19 Oct 2016 - 12:11 am | संदीप डांगे

भावनाओको समझो बापुसाहेब, दिल कि भडस है, त्यांचे खरोखर असे मत का झाले हे ऐकण्यास उत्सुक आहे,

अर्थात त्यांच्या सरसकट मताला माझे अजिबात समर्थन नाही हे लक्षात घेणे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Oct 2016 - 8:16 am | कैलासवासी सोन्याबापु

वो मै समझ गया डांगे बुआ, मावळ मध्ये जेव्हा हे शेतकरी आंदोलन झाले तेव्हा मी खुद्द तळेगाव दाभाडेत राहत असे, तेव्हा एसपी संदीप कर्णिक होते, गोळीबार झाला होता पण त्याचे डायनॅमिक्स खूप वेगळे होते, पोलिसांवर खापर फोडणे सोपे आहेच, पण त्या आंदोलनादरम्यान एका "लाल मारुती स्विफ्टवर" खूप मोठे प्रश्नचिन्ह लागले होते त्यावर रामराम बुआ बोलतील का?

संदीप डांगे's picture

19 Oct 2016 - 8:57 am | संदीप डांगे

ते काय?

बापू साहेब आझाद मैदान मोर्चा विषयी आपण मत का बरे मांडले नाही?

काही दिवसापूर्वी लोकसत्तेत अर्थतज्ञ प्रोफेसर अविनाश दिक्षीत यान्ची मुलाखत वाचली त्यात ते म्हणतात, "नोकरशहा आणि राजकारणी यांच्याकडून भ्रष्टाचार दूर होण्याची अपेक्षाच करता नये. याचं कारण- तेच याचे सर्वात मोठे वाटेकरी आहेत. तेव्हा स्वत:च्या हातानं ते आपल्या उत्पन्नावर हातोडा पाडून घेणार नाहीत". पोलिस पण त्यातलेच.

बबन ताम्बे's picture

19 Oct 2016 - 12:35 pm | बबन ताम्बे

केस मिटवामिटवी करणारे एजंट आहेत. बहुतेकांचे राजकीय लागेबांधे असतात. "अडल्या हरी.." कडून पैसे घेऊन स्वतःच्या आणि पोलिसांच्या तुंबड्या भरतात.

मराठी_माणूस's picture

19 Oct 2016 - 12:48 pm | मराठी_माणूस

"नोकरशहा आणि राजकारणी यांच्याकडून भ्रष्टाचार दूर होण्याची अपेक्षाच करता नये. याचं कारण- तेच याचे सर्वात मोठे वाटेकरी आहेत.

नोकरशहा आणि राजकारणी हे तर प्रत्येक देशात असतात . मग इथेच ही समस्या एव्हड्या मोठ्या प्रमाणात का ?

नाखु's picture

19 Oct 2016 - 12:59 pm | नाखु

बाकी ठिकाणी वचक असतो आणि भ्र्ष्टाचाराला समाजमान्यता नसते,

म्हणजे बघा "अ"ने ओळखी पाळखीतून किंवा पैसे देऊन एखादे काम करून घेतले की तो प्रौढी मारून कसे पैश्याने काम करून घेतले ते सांगतो.(लायक व पात्र नसताना).

तेच पैसे घेणारा चार ठिकाणी (दानधर्माचे) थेंब उडवून बाकी उजळ माथ्याने उडवत फिरतो,कारण ज्या समाजात राहतो त्याची त्याला साथच असते (सोबत बसण्याची).आणि म्हणून्च जे विकले जाऊ शकत नाहीत ते मारले जातात सतीश शेट्टीसारखे.

या पैसे खाऊंवर त्यांच्या घरच्या लोकांचाच सत्सत्विवेकाचा वचक्/प्रेमळ धाक नसतो तर मित्रांची/जात बांधवांची/समाजाची कसली आली आहे चाड?

सुबोध खरे's picture

19 Oct 2016 - 6:12 pm | सुबोध खरे

बाडीस