परवाच इन्डियन एक्स्प्रेस वॄत्तसमूहाने घेतलेल्या सर्व्हे मध्ये पन्तप्रधान नरेन्द्र मोदी जी यांच्या नेतॄत्वाखाली भाजप सरकार वर जनतेचा पूर्ण विश्वास असून २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा भाजपच विजयी होइल असा निष्क्रर्ष व्यक्त केला आहे.
http://indianexpress.com/article/india/india-news-india/70-percent-india...
ही एक अतिशय आशादायी बाब असून मोदींच्या नेतॄत्वाखाली भाजपने देशाला स्थिर आणि कणखर सरकार दिलेले आहे. आन्तरराष्ट्रीय राजकारणात भारताची पत उंचावलेली असून आर्थिक आणी अन्य सामाजिक्/प्रशासकीय सुधारणांचा गाडा पुढे चालवून सरकारच्या कामगिरीचे ग्राउन्ड रिझल्ट्स दिसायचे असतील तर मोदी सरकार मोठ्या कालावधी साठी सत्तेत असणे गरजेचे आहे. त्याबरोबरच याआधीच्या सरकारानी प्रचंड बिघडवून ठेवलेल्या गोष्टी सुधारायच्या तर पुरेसा वेळ हवाच .
पण त्याबरोबरच आणखी एक गोष्ट महत्त्वाची वाटते ती म्हणजे आता केन्द्र सरकार असे म्हणत आहे की देशातील विविध निवडणुका एकत्र घेतल्यास प्रचंड पैसा आणि मनुष्यबळ वाचेल . हे तात्त्विक दॄष्ट्या बरोबर असले तरी प्रॅक्टी़कली योग्य दिसत नाही . याचे कारण वाजपेयी सरकारने अशाच हव्यासापायी केन्द्र आणि राज्यातील सहा महिन्याचा कार्यकाळ वाया घालविला होता ,शेवटी लवकर निवडणुका घेवून केन्द्र आणी राज्य दोन्ही ठिकाणी आपटी खाल्ली होती हा इतिहास विसरू नये असे वाटते.
आपणास काय वाटते?
प्रतिक्रिया
8 Sep 2016 - 10:56 pm | चंपाबाई
१६ ... १७ .... १८ अजुन बाकी आहे.
9 Sep 2016 - 10:39 am | पथिक
:)
10 Sep 2016 - 12:19 pm | मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
10 Sep 2016 - 7:09 pm | चंपाबाई
करी मनोरंजन जो मुलांचे (जनांचे)
जडेल नाते प्रभूशी तयाचे.
..साने गुरुजी.
.....
तुमचे मनोरंजन केल्याने माझे नाते प्रभूशी जुळले आहे.
... चंपे गुरुजी
10 Sep 2016 - 7:49 pm | अभ्या..
आता रेल्वेत काही प्रॉब्लेम आला की चंपे गुरुजींना ट्वीट करायचे. त्यांचे नाते आहे प्रभूंशी.
8 Sep 2016 - 11:08 pm | अभ्या..
जनतेचा विश्वास हाय ना, मग कशाला इलेक्शन बिलेक्शन?
इलेक्शनचा खर्च लोकसंख्येने डिव्हाईड करून खात्यावर जमा द्या म्हणावं. आधीचे 15 पण पेंडिंग आहेत.
9 Sep 2016 - 1:21 am | अभिजीत अवलिया
बरं ...
9 Sep 2016 - 8:40 am | टर्मीनेटर
नरेन्द्र मोदी हे देशाला लाभलेले चांगले पंतप्रधान आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाची निश्चितच प्रगती होईल. परंतु सर्व्हेचा हा निष्कर्ष : "परवाच इन्डियन एक्स्प्रेस वॄत्तसमूहाने घेतलेल्या सर्व्हे मध्ये पन्तप्रधान नरेन्द्र मोदी जी यांच्या नेतॄत्वाखाली भाजप सरकार वर जनतेचा पूर्ण विश्वास असून २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा भाजपच विजयी होइल असा निष्क्रर्ष व्यक्त केला आहे." काही तेवढा खरा नाही वाटत. पन्तप्रधान नरेन्द्र मोदी जी यांच्यावर जनतेचा पूर्ण विश्वास आहे परंतु भाजप वर नक्कीच नाहीये. शत प्रतिशत भाजपा या ध्येयाने पछाडलेल्या भाजप च्या नेते मंडळींनी जवळपास सर्व राज्यात आपल्या मित्र पक्षांशी शत्रुत्व निर्माण करून ठेवले आहे. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत ह्या पक्षाला बहुमत मिळणे हि अशक्य गोष्ट वाटते, निकाला नंतर ह्याच दुखावलेल्या मित्र पक्षांच्या मदतीच्या कुबड्या घेऊनच पुन्हा सरकार स्थापन करता येण्याची शक्यता अधिक वाटते.
9 Sep 2016 - 10:35 am | महेश शिपेकर
जनतेचा विश्वास आहे ना
मग जनतेन च त्याना कुबड्या घ्यायचि गरज भासु देउ नये
कारन कुबड्या घेउन चालनरे सरकार हे अपन्ग असनार हे नक्कि
मग अपन्ग सरकार निवदुनच देउ नका
9 Sep 2016 - 1:20 pm | पक्षी
ते सिगरेट सोडायचा प्रयत्न करणारे फिलॉसॉफर तुम्हीच का ???
सुटली का सिगरेट?
9 Sep 2016 - 1:32 pm | पाटीलभाऊ
नक्कीच..नमो पंतप्रधान म्हणून चांगले आहेतच...त्यात वाद नाहीच...!
पण भाजपा मध्ये काही वाचाळ वीर आहेत...त्यांना जरा लगाम घातला तर..बरं होईल.
उदो उदो ऐवजी...नमो नमो करणारा..
पाटील !
9 Sep 2016 - 1:40 pm | अनुप ढेरे
बर्नॉल कुठली कंपनी बनवते? त्या कंपनीचे शेअर घेऊन ठेवावे म्हणतो. वर म्हटल्याप्रमाणे झालं खर तर बर्नॉलचा खप खूप वाढेल.
9 Sep 2016 - 4:06 pm | संदीप डांगे
फक्त 9 प्रतिसाद, मोदी असून???
9 Sep 2016 - 4:36 pm | विकास
मोदींना मते मिळतात, हे कदाचीत बहुमताने मान्य असेल. त्यामुळे प्रतिसादाची काय गरज? ;)
9 Sep 2016 - 4:45 pm | मोदक
अहो अजेंडा राबवायचा आहे ना तुम्हाला..? मग असे नसते बोलायचे.
"हिटलर मोदीच्या फॅसीस्ट हुकुमशाहीला मते मिळतात, हे कदाचीत बहुमताने मान्य असेल"
असे काहीतरी लिहा. ;)
9 Sep 2016 - 5:23 pm | गॅरी ट्रुमन
हिटलरही लोकशाही पध्दतीनेच निवडून आला होता हे विसरलात का मोदकराव? तेव्हा हिटलर मोदीच्या फॅसीस्ट हुकुमशाहीला मते मिळणे अगदीच शक्य आहे :)
9 Sep 2016 - 8:11 pm | मोदक
हा हा..
बादवे, मोदी २०१९ ला निवडणूक जिंकले तर त्यांना पुढील दशकात एखाद्या कारणाने नोबेल प्राईझ मिळण्याची दाट शक्यता आहे.
...आणि जर चुकून ते शांती साठी मिळाले तर किती जणांची दुकाने बंद होतील देव जाणे. :)
10 Sep 2016 - 9:16 am | गॅरी ट्रुमन
बाकी कुणाची नाही तरी बुबुडाविपुमाधविंची (बुध्दीजीवी बुध्दीप्रामाण्यवादी डावे विवेकवादी पुरोगामी मानवतावादी धर्मनिरपेक्ष विचारवंत) दुकाने मात्र लवकरात लवकर कायमची बंद व्हावीत असे फार वाटते.
भारताचे तुकडेतुकडे होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही ही जे.एन.यु मधील घोषणा त्यांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य वाटते पण माजी लष्करी अधिकारी जी.डी.बक्षी यांनी "आमच्या पिढीने पाकिस्तानचे दोन तुकडे केले आता तुमच्या पिढीने पाकिस्तानचे आणखी चार तुकडे केले पाहिजेत" असे म्हटले तर ते विधान द्वेषपूर्ण वाटते. असली हरामखोर जमात आहे ही बुबुडाविपुमाधवि म्हणजे!!
10 Sep 2016 - 7:29 pm | फेदरवेट साहेब
बाकी कुणाची नाही तरी बुबुडाविपुमाधविंची (बुध्दीजीवी बुध्दीप्रामाण्यवादी डावे विवेकवादी पुरोगामी मानवतावादी धर्मनिरपेक्ष विचारवंत) दुकाने मात्र लवकरात लवकर कायमची बंद व्हावीत असे फार वाटते.
हे असले शॉर्ट फॉर्म तुम्हाला फारच उच्च विनोद वगैरे वाटतात का?
9 Sep 2016 - 7:36 pm | संदीप डांगे
2019 मघ्ये उत्तर देईल ह्या प्रतिसादाला... तोवर वाट बघूया! ;)
9 Sep 2016 - 8:20 pm | मोदक
2019 मघ्ये उत्तर देईल ह्या प्रतिसादाला... तोवर वाट बघूया! ;)
असे असेल तर "फक्त 9 प्रतिसाद, मोदी असून??? " येथे नक्की कसले प्रतिसाद अपेक्षित होते..?
9 Sep 2016 - 9:37 pm | संदीप डांगे
तुमची कॉपी मारण्याचा प्रयत्न केला ;))
निस्ते मोदीं चे नाव घेतले की प्रतीसादाचे रतीब पडतात, इसबार ऐसा होते नही देखा;))
9 Sep 2016 - 10:07 pm | मोदक
बहुत बार ऐसा नहीं हुवा है, पढाई जारी रख्खे..! :))
9 Sep 2016 - 7:41 pm | जेपी
एक पण मेगाबायटी प्रतिसाद नाही.लेखाच विश्लेषण नाही.
हंत्तप्रभो:
9 Sep 2016 - 9:26 pm | तिमा
हल्ली मोदीभक्त आणि मोदीद्वेष्टे अशी दोन टोकाचीच माणसे पहायला मिळतात. माझ्या मते २०१९ मधे मोदींनी हरावेच.
कारण कितीही काम केले तरी जनतेच्या शिव्याच खायच्या असतील तर कशाला यायचे सत्तेवर. लोकांना पुन्हा एकदा जुन्या राजवटीचा अनुभव घेऊ दे. हरण्याचा दुसरा फायदा म्हणजे, भाजपातले इतर मूर्ख लोक तरी ताळ्यावर येतील.
यथा प्रजा तथा राजा, हेच आपल्या देशाला लागू आहे आणि तसेच होईल.
10 Sep 2016 - 2:42 am | बॅटमॅन
बरेच लोक असे आहेत की मोदी किंवा भाजपाचे विशेष प्रेम नाही पण सिकुलर व काँग्रेस यांच्यावर प्रचंड राग आहे. अशा बहुसंख्यांच्या मनाप्रमाणे व्हायचे तर मोदी अजून एकदा पीयेम होऊदेत.
10 Sep 2016 - 3:43 am | विकास
मला किंचीत वेगळे वाटते...
मला मोदींनी जिंकावे असेच वाटते... पण ते व्यक्तीगत झाले. पण त्याहूनही असे वाटते की, मोदींनी हरावे का जिंकावे या पेक्षा, मोदींना (कुठल्याही अथवा एकत्रीत) विरोधी पक्षाकडून त्यांच्या कार्यशक्तीशी आणि एथिक्सला तुल्यबळ ठरेल अशा एखाद्या नेत्याकडून आव्हान मिळावे. त्यातून देशाचे पण भले होईल आणि राजकारण्यांमधे पण सकारात्मक इर्षा जागॄक होईल. (काही पण वाटते मला! ;) :( )
अगदी सुरवातीस मला व्यक्तीगत आवडत नसले तरी केजरीवाल तसे होऊ शकतील असे वाटत होते... पण नीळा कोल्ह्याचा रंग देखील पाण्यात पडून निघून जायला जितका काळ लागला असेल तितका देखील या माणसाला दम ठेवता आला नाही! :( त्यामुळे ते बाद. दुसरे म्हणजे नितिशकुमार वाट होते... पण लालूशी गटबंधन करून सगळे मुसळ केरात गेले आहे असे वाटते.
भारत हा सव्वाशे कोटींचा देश आहे. मोदींना तुल्यबळ ठरेल असा एक नेता इतक्या पैदाशीतून निघू नये?
10 Sep 2016 - 8:06 am | मंदार कात्रे
+१००
10 Sep 2016 - 8:51 am | चंपाबाई
भाजपा भगवा कोल्हा आहे.
10 Sep 2016 - 12:18 pm | मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
10 Sep 2016 - 10:41 am | इरसाल
२०१९ च्या सुरुवातीला मोदींनी कॉग्रेस जॉईन करावी म्हणजे मग,
मोदीसमर्थक आणी कॉग्रेस समर्थक एकमत होवुन एक सुरळीत चालणारे सरकार मिळेल.
दोन्ही बाजुची कटकट बंद होईल नी डुआय्ड्या गप्चिप उताण्या पडुन रहातील.
10 Sep 2016 - 4:52 pm | फेदरवेट साहेब
एकच उदाहरण देतो,
गावात एकमेकांवर भुकायला बंद केले कुत्र्यांनी तर चोराचिलटांचे फावते अन घरफोड्या वाढत्यात.
त्यामुळे गावात एकमेकांवर भुकणाऱ्या कुत्र्यांच्या टोळ्या असाव्यातच, नाहीतर कुत्रीच एकत्र होऊन गावकऱ्यांच्या बकऱ्या फाडाय लागतील बघा.
म्हणजे किमान, आमच्या कुत्रे समाजात तरी असंच असतं बुआ, तुम्हा माणसांनी अजून पातळी वैग्रे सोडली असल्यास कल्पना नाही
(जय हाडूक मिळवून खा किडूकमिडूक संघटना, कचरापेटी क्रमांक 3, वॉर्ड क्रमांक चार, बोंबलवाडी खुर्द, शाखाअध्यक्ष)
ढेल्या