Skip to main content

राष्ट्रपाव

लेखक तर्राट जोकर यांनी बुधवार, 02/03/2016 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
उ.ठाक्रे: माध्यमं कधी शिवसेनेची चांगली कामे दाखवत नाही. खरे बोलले. शिवसेनेने किती चांगली कामे केली आहेत. मरगळलेल्या मराठी माणसाला बलशाली बनवलं. उद्द्यमशील बनवता बनवता उत्सवशील बनवलं. त्या उत्सवास सहृदयतेने निरपेक्ष मदत न करणार्‍यास योग्य ती मायेची समज देण्याइतकं कनवाळू बनवलं. आपल्या हक्कांसाठी जागरुक राहायला शिकवलं. माध्यमं: शंभर वडापाव फुकट दिले नाहीत म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्याने वडापाववाल्याला बांबूने मारहाण केली. मला काथ्याकूट करायची हुक्की आली, उचकी आली. कारण का तर हा प्रश्न दारूच्या ग्लासात बर्फाच्या जागी पडला होता. ही माध्यमं बेणी नेअमी चुकीच्या बातम्या का ब्रे देतात? मंडली, हाय काय उत्तर? (धागा राजकिय नाही. गैरसमज करुन घेऊ नये. भावना दुखावल्यास शिवसेनास्टाईल उत्तर दिले जाईल) - (कुठलाही जोक न मारणारा) तर्राट जोकर

वाचने 18561
प्रतिक्रिया 134

प्रतिक्रिया

In reply to by जेपी

वड़ापाव काय पिज़्ज़ा पण खायला मिळेल जन्तेला! छया लइच वंगाळ केलान सेनेने, इटालियन सरकार चांगले होते. हां आव्वाज कोणाचा? कोणचाच नाय बाबा, तेरी भी चुप आणि मेरी भी चुप! आपण सगले भाऊ भाऊ, सगले मिलून 2जी चा प्रसाद खाऊ, आणि वर कोळश्याने तोंड काळे पण करून घेऊ.

In reply to by होबासराव

सांबार म्हणा की कोथिंबीरीला. -(अर्धा वैदर्भी) उका!

मि ""ते हिरवि चटणि नका लाउ पावा ले निरा सांबारच असते त्यात"" असेच लिहिणार होतो...पण इथे समजले नसते कोणाला :)

१०० वडापाव विकत घ्यायला पैसे नाहीत? इतके गरीब कशामुळे झाले ते?

In reply to by पैसा

गरीब नाहीत ते. दुसर्‍यांना दानाचं पुण्य मिळवून देण्यात पुढाकार घेतात. महिन्याला लाखो वडापाव विकणार्‍याने दिले असते शंभर फुकट तर काय बिघडलं असतं? शंभर वडापावसाठी लाखो शिवसैनिकांची मानहानी करुन टाकली. :( कुणी ह्या शिवसैनिकांच्या शिवकालीन युटोपियाबद्दल का बोलत नाही?

हेच थे निष्पाप रमेश किणीला संपवणारे मेंदू। जाे एकच चारित्र्यवान शिवराय हाेऊन गेला त्याच्या जिवावर यांचं दुकान सुरू आहे ।

काय मंग मांजरि चे जंत झाले का बरे..म्हणजे मांजर जंता पासुन झालि का मुक्त ?

In reply to by किचेन

@
हे ४ वेळा का दिसतय? मदत करा
>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing016.gif तू खूप दिवसांनी आलीस ना किच्चु ताई, म्हणून तुला बोनस मिळाला असेल! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing010.gif

त्यांना चिकन सूप चारदा प्यायची आवश्यकता आहे म्हणून देव प्रसन्न होऊन चारदा कंमेन्ट पब्लिश करीत आहे।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

असुर शब्दावरून आठवले, असुरांना(अहुरांना) इराणी(पर्शियन) लोक पुजतात. "हिंदू" हा शब्दही त्यांचीच देणगी आहे असे म्हणतात. त्यांच्या दृष्टीने सिंधू(हिंदू) नदीच्या पलिकडले ते हिंदू.

In reply to by सतिश गावडे

अहुर माझ्दा असा काहीतरी त्यांचा देव आणि त्याचा प्रतिस्पर्धी म्हणजे अहिरमन असे वाचल्याचे आठवते.

In reply to by सतिश पाटील

चटणी तिखटच असली पाहिजे असे काही नाही. दाक्षिणात्य उपाहारागृहात खोबर्‍याची पांढरी चटणी देतात, ती तिखट नसते. असो, मला वडापाव हा लसणाची सुकी चटणी आणि तळलेल्या मिरच्यांसोबतच आवडतो.

In reply to by सुनील

+ १ कोलंबी घातलेला वडा+सुकटाची चटणी+तळलेला जवळा+लसणाची चटणी+तळलेल्या मिरच्या+कांदा ====> ताटात स्वर्ग आमच्या स्वर्गाच्या कल्पना ताटातूनच येतात. बटाटेवड्या बरोबर खजूराची किंवा चिंचेची चटणी खाणारे, श्रीखंडाचे पाणी पण पियूष म्हणून पितात.

In reply to by मुक्त विहारि

सहमत ! या यादीत भाजलेल्या सुक्या बोंबलची चटणी, तळलेल्या सुक्या बोंबलची चटणी, या पण सामील करा !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पण चूलीत भाजलेल्या बोंबलाची चव कश्शा कश्शाला येत नाही. फ्लॅट मध्ये रहात असल्याने, ह्या अशा साधारण आणि म्हणूनच अमुल्य गोष्टींना पारखे झालो. मस्त पऊस कोसलत असावा, वातावरणात मातीचा (आणि जोडीला गोठ्यातील गुरांचा) सुगंध दरवळत असावा.एखादी दार बुलंद नमक कलाकारी नुकतीच संपवत आलेली असावी आणि चुलीत बोंबलाला सारले गेले असावे. ताटात काळ्या वाटाण्यांची उसळ्+भाताचा ढिगारा आणि जोडीला चूलीत भाजलेला बोंबील. आमच्या मित्राच्या घरी गेलो की, हे हमखास जेवायला मिळायचे. (ह्या एका कारणासाठीच शालेय कैद परत भोगीन.)

In reply to by सतिश पाटील

चाटून खायचा पदार्थ अशा अर्थी चटणी हे नाव पडले असावेसे वाटते. चटणी ओली असो वा सुक्की, फार चावून खाणे अपेक्षित नसते. बंगालातही 'चाटनि' (च चहाचा) नामक गोड चटणी असते.

बाळासाहेब ठाकर्‍यांनी केलेली उपयुक्त एक-दोन कामे कोणी सांगेल का? की ज्यानी महाराष्ट्राचा फायदा झाला? आणि शरद पवारांची देखील.

In reply to by अनुप ढेरे

बाळासाहेब आणि पवारसाहेब यांनी आपापसात अनुक्रमे 'हिंदूह्रिदयसम्राट' व 'जाणता राजा' ह्या उपाधी वाटून घ्रेतल्या. याहून मोठे असे कोणते विधायक कार्य आपल्याला अपेक्षित आहे ?

मला मात्र तळलेल्या मिरच्या अजिबात आवडत नाहीत. खोबर्याची चटणी मात्र आवडते. कोणाकडे आहे का खोबर्याच्या चटणीची रेसिपी.

अजुन एक बातमी या अगोदर २ दिवसांपुर्वी घडलेली. ठाण्याच्या मुंबई आग्रा हमरस्त्याला सिग्नल सुटूनही सेना माजी शाखाप्रमुख गाडी थांबवून बोलत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. - म्हणुन महिला वाहतुक पोलीस हवालदार बाईंनी हटकले तर तिलाच मारहाण केली त्या महिला पोलीसाच्या नाकातुन रक्त आले. झी बातम्यांमध्ये सतत ती चित्रफीत दाखवत होते. सदर इसम हा शिवसेना माजी शाखाप्रमुख होता. आणि अजुनही काही गुन्हे त्याच्या नावावर आहेत. पण सेनेने आपला हात वर केला. त्याचा आणि आमचा आता काही संबंध नाहीये म्हणे. मुळ बातमी.

In reply to by प्रमोद देर्देकर

टाईम्स नाऊवर त्या महिला वाहतुक पोलीस बाईची बाजू ऐकली. पत्रकार तिला हिंदीत प्रश्न विचारत असला तरी ती स्पष्टपणे मराठीत ऊत्तर देत होती हे ऐकुन छान वाटले.

भाजपाचे समर्थक गालात गुलुगुलु हसत असतील मुंबई महानगर पालिका निवडणूक बहुदा एकट्याने लढून मग प्रमुख पक्ष बनून सेनेच्या मदतीने वेळ पडल्यास सत्ता स्थापन करण्याचा मनसुबा सफल होईल त्यांनी शाई फेकून जे साध्य केले नाही ते कनैह्या बोंबा मारून भाजपला साध्य करून देत आहे रोहित ते उमर ते इशारत चे प्रकरण पाहता हिंदुच्या मताचे दृविकरण भाजपसाठी त्यांचे विरोधक आयते करून देत आहेत व त्यात सेना सुशिक्षित मराठी आपले मतदार भाजपच्या ओंजळीत स्वहस्ते देत आहे. उरलेले काम मुब्र्यांचा इशारत चा भाईजान करत आहे.

भाजपाचे समर्थक गालात गुलुगुलु हसत असतील मुंबई महानगर पालिका निवडणूक बहुदा एकट्याने लढून मग प्रमुख पक्ष बनून सेनेच्या मदतीने वेळ पडल्यास सत्ता स्थापन करण्याचा मनसुबा सफल होईल त्यांनी शाई फेकून जे साध्य केले नाही ते कनैह्या बोंबा मारून भाजपला साध्य करून देत आहे रोहित ते उमर ते इशारत चे प्रकरण पाहता हिंदुच्या मताचे दृविकरण भाजपसाठी त्यांचे विरोधक आयते करून देत आहेत व त्यात सेना सुशिक्षित मराठी आपले मतदार भाजपच्या ओंजळीत स्वहस्ते देत आहे. उरलेले काम मुब्र्यांचा इशारत चा भाईजान करत आहे.

काही धाग्यांवर जाऊन लिहावेसे वाटते, पण लोक अवांतर केल्याचा ठणाणा करतात. त्यावर काय क्रवे ब्रे असा विचार आला. म्हटले आपल्याच धाग्यावर करु अवांतर. वाचायचं तर वाचा, नै तो इग्नोरास्त्र अ‍ॅक्टीवेट करा. धागा: क्रिकेट >> प्रतिसादः तिकडे जवान सीमेवर लढतायत, रक्त वाहतायत आणि इकडे हे क्रिकेटवर चर्चा करतायत.

धागा: #PledgeForParity शपथ समतेची (धागालेखिकेची क्षमा मागून) >> प्रतिसाद: मोहनरावांसाठी भारतमाताकीजय असे शिकवणे हे स्त्री-पुरुष समता शिकवण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही भारतमाता चा सन्मान करायला पोकळ बांबूंचे फटके देऊन शिकवू पण आमच्या संघटनेत महिलांचा प्रवेश निषिद्ध ठरवू.

धागा: मराठीची गळचेपी किंवा मराठीची हत्या, आपणच करत आहोत का? प्रतिसादः कॉस्मोपोलीटन शहरात राहणार्‍या जनतेला एवढ्या मोठ्या काळज्या का पडतात? चार लोक दुसर्‍या भाषेचे आजूबाजूला असले की कोंदटल्यासारखं वाटतं म्हणून असे प्रश्न पडतात काय? चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरा कार्पोरेटातून बाहेर पडून. कोणाचीच कसली गळचेपी, हत्या होत नाही आहे. देशभरातले अठरापगड लोक येऊन खिचडी झालेल्या मुंबईत मराठीच मुख्य भाषा असावी हा फक्त कल्पनाविलास आहे. मुंबईच्या बाहेर खूप मोठा महाराष्ट्र आहे. अजून तो ४२ च्या काय बोलींमधे मराठी रक्तात खेळवून आहे. मारवाड्यापासून पंजाबी, मुसलमान, बिहारी सगळे अमराठी इतकी सहज मराठी बोलतात जितकी मुंबईत जन्म घालवलेल्या मराठी माणसाला येणार नाही. उगा काळजी करु र्‍हायले.

धागा: सेल्फी - एक विकार??? >> १. सिलेक्टीव मोरल पोलिसिन्गचा आगावूपणा करणार्‍यांची तक्रार कुठे बरे करावी? २. जब लोक आपके खिलाफ बोलने लगे तो आप तरक्की कर रहे हो असे मोदींबद्दल अभिमानाने म्हटले इथे. च्यामारी लोक आता माझ्या खिलाफही बोलू लागलेत, मी पण तरक्की करु र्‍हायलो का? smile

काय मग राष्ट्रपाव? ऐकलं का? एखाद्याला डुक्कर म्हणणे पातळी सोडून असते पण कचरा म्हणणे नाही, बरं का? लक्षात असू दे नाहीतर पोर्क पोटात घालून कचर्‍यात फेकला जाशील.

In reply to by nandan

होय होय! आणि तामस पण - मंदिरांसमोर चिकन पण केले होते. राजस केले होते का ते आठवत नाही, पुढच्या वेळी बासुंदी आंदोलन बहुतेक.

ह्याला मणतात जबरदस्त गेम . तुम्ही भारत माता की जय म्हटलं नै तर तुम्ही देशद्रोही. तुम्ही म्हटलं तरी पंचायत, नै म्हटलं तरी पंचायत. म्हणणार नाही बोलले तरी पंचायत. पण असं म्हणण्यावर देशभक्ती ठरवणारे तुम्ही कोण हे मात्र तुम्ही विचारलं नाय पायजे. फाउल होतो.

"Are Hafiz Saeed and Lakhvi on your radar", asks Owaisi ending...Owaisi says 'Jai Hind'

Posted by Hzt Aurangzeb Alamgir - RA on Wednesday, March 16, 2016

In reply to by तर्राट जोकर

मला ओवेसीने विचारलेले प्रश्न आवडले. म्हणजे विचारण्याची पद्धत आवडली. मी ओवेसीची वक्तव्ये फक्त पेपरात वाचली आहेत. कधी त्याचा व्हिडिओ पाहिला नव्हता. आज पहिल्यांदाच त्याला बोलताना ऐकले. केवळ आणि केवळ ह्याच क्लिपवरुन माझे मत थोडेसे बदलले आहे. १. प्रश्न सुस्पष्ट आहेत. उत्तरे नक्की काय आहेत ते माहित नाहीत. पण नुसताच आवेश पण मुद्दा काही नाहीच. किंवा नुसतीच डायलॉगबाजी.. ह्याच प्रकारात आजकाल क्लिप्स पहायला मिळतात. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की मोदी सुद्धा फार महान भाषण करत नाहीत. थोडा ड्रामा जास्त असतो. म्हणुनच मला इराणी बाईंचे भाषणही नाट्यमय करायची गरज नव्हती असे वाटले होते. बीजेपी सोयीस्कर तेच दाखवतो.. त्याच क्लिप्स बरोब्बर व्हायरल होतात. मी मुख्यतः फेसबुकवर अशा राजकीय गोष्टी पहाते. माझ्या मित्रयादीतले लोक शक्यतो भाजप आणि संघवाले असल्याने माझ्यावरही त्याच पोस्टचा मारा होतो. भाजपच्या सोयीचेच मला वाचायला मिळते. इतर कुणाचे काही ऐकायला मिळत नाही. मी सुद्धा त्यासाठी काही विशेष प्रयत्न करत नाही. अशा वेळेस, ओवेसी बद्दल केवळ वाईटच ऐकलेले असताना, त्याने फापटपसारा न मांडता धडाधड जे प्रश्न विचारलेत ते आवडले. उगाच शाब्दिक जंजाळ नसल्याने ऐकायला बरे वाटले. मागे चक्क काही गोंधळ नसल्याने ऐकु आलेही. २. तो भाषणाच्या शेवटी "जय हिंद" म्हणाला. "भारतमाता की जय" चा फंडा काय आहे त्याचा माहित नाही. मुसलमान लोक देशाला आई मानत नाहीत म्हणुन वंदे मातरमही म्हणणार नाही असे मध्ये वाचले होते. त्याचेच हे पुढचे पाऊल वाटले. पण शब्द काही का असेनात, तो जय हिंद म्हणतोय ना, मग का वाद होतोय अशी शंका आली. मग ज्या प्रमाणे मला भाजपाच्ला सोयीस्कर मजकुरच कळतो, त्याच प्रमाणे ही बातमी सुद्धा अर्धवट संदर्भाशिवाय कळाली असेल का असेही वाटले. * माझा कोणत्याच राजकीय पक्षावर फारसा विश्वास नाही. त्यातल्या त्यात भाजप बराय एवढेच माझे मत आहे. सरसकट मुसलमान वाईट आहेत असेही मला वाटत नाही. पण मुसलमान धर्मिय डोईजड आहेत आणि भलेही त्यांच्यातले मुठभर उपद्रवी असले तरी ते जगाला पुरुन उरणार असे मला वाटते.

In reply to by पिलीयन रायडर

* नुसताच आवेश, मुद्दा काही नाहीच. किंवा नुसतीच डायलॉगबाजी.. ह्याच प्रकारात आजकाल क्लिप्स पहायला मिळतात.. ओवेसीची क्लिप त्याप्रकारातली वाटली नाही. असे वाचावे.

In reply to by पिलीयन रायडर

उर्वरीत पक्षिय अभ्यासपुर्ण आणि तर्कसुसंगत पणे मुद्दे खोडत नाहीत त्यामुळे कट्टरवादी सुद्धा उजवा दिसतो. ओवेसींनी टागोरांचा नॅशनलीझम आदर्श असल्याची दुहाई दिली आहे, पण टागोरांचे जे वाक्य वापरले आहे त्याचा ज्याला जसा वापर करावयाचा तसा करता येतो मग औरंगजेब, निझाम, रझाकार हे सुद्धा हिरो बनवता येऊ शकतील का अशी शंका वाटते. टागोरांचा त्यांनी दाखला दिलाच आहे तर तो विचार तपासला जावा म्हणून टागोर आणि सावरकर तत्वज्ञानातील साम्य आणि फरक हा वेगळा धागा टाकला पण मिपा पब्लिक देखनोको तय्यारीच नइ !

In reply to by श्री गावसेना प्रमुख

अख्तर साहेबांच्या नावावर जाऊ नका. ते नास्तिक आहेत. त्यांनी मुस्लिम धर्म केव्हाच सोडून दिलाय. प्रस्तुत भाषणातले मुद्दे आणि प्रश्न बघा, कोणी दिलंय ते बघू नका. कोणी काय म्हणायला पाहिजे ह्यापेक्षा ओवेसीने विचारलेले हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत.

In reply to by तर्राट जोकर

बरं...ते नास्तिक आहेत म्हणून भारत माता कि जय बोलले कि काय,मुस्लिम राहिले असते तर बोलले नसते?

In reply to by श्री गावसेना प्रमुख

धर्माचे पाईक हा धार्मिक आधारावर त्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा शब्द आपण वापरला. मुस्लिम नाव असले की तो पार आयसिस प्रेमीच असतो ह्या गृहितकावर आधारित तुमचा प्रतिसाद होता. म्हणजे ओवेसीच्या ज्या धर्माचा आहे त्याच धर्माचा अख्तर असुन त्याल काय प्रोब्लेम नाय तर ह्याला काय असावा असा तुमचा प्रश्न आहे. आता अख्तर मुस्लिम नाही म्ह्टल्यावर तुम्ही म्हणताय तो मुस्लिम असता तर काय बोलला नसता काय? अहो लाखो-करोडो मुस्लिम आहेत जे वंदेमातरम पासुन भारतमाता की जय सगळं म्हणतात. बरं ते नाही म्ह्टलं तर ते देशभक्त नाहीत हा जावई शोध लावणारे संघवाले कोण लागून गेलेत? हा फुकटचा आगावू उपयोगशून्य जिंगोइजम देशाला अजिबात गरजेचा नाही. भारतमाताकीजय म्हनुन मल्ल्या गेला पळून, त्याच्या देशभक्तीवर आपण शंका घेणार की नाही घेणार?

In reply to by श्री गावसेना प्रमुख

अहो लाखो-करोडो मुस्लिम आहेत जे वंदेमातरम पासुन भारतमाता की जय सगळं म्हणतात. >>> ह्यात तुम्हाला उत्तर नाही मिळालं काय?

In reply to by श्री गावसेना प्रमुख

अख्तर साहेब पण ह्याच धर्माचे पाईक आहेत ना, >> ह्याचा काय अर्थ आहे ते जरा विस्ताराने सांगा मग तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल. संदिग्ध प्रश्न मांडणे ही मिपावर फॅशन होत चालली आहे.

In reply to by तर्राट जोकर

तुम्हाला कुठे संदीग्ध वाटले हो माझा प्रश्न सरळ आहे मुस्लिम राहिले असते तर बोलले नसते?

In reply to by श्री गावसेना प्रमुख

हे मी कसे सांगणार? हा प्रश्न जावेद अखतरांसाठी आहे. त्याचे उत्तर तेच देऊ शकतील. ;-) जावेद अख्तर ह्याच धर्माचे पाईक ना ह्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी दिले. खरे तर ते उत्तर नसून माहिती होती. मत तर अजिबात नव्हते.

"भारत माता कि जय" या घोषणेवर कोणाचेही पेटंट नाही.संघाचेही नाही. मग ही घोषणा देताना औवेसीच्या गळ्यात काय हाड अडकतयं कोणास ठाऊक? केवळ भागवत म्हणाले कि "भारत माता कि जय" म्हणायला सर्वांना शिकवलं म्हणजे,म्हणून औवेसीला पिसाळायचं काहीच कारण नव्हतं.ती घोषणा संघाची असल्याचा त्याचा कडू गैरसमज झाला असावा. सगळं कसं अंगावर ओढून घ्यायचं,वातावरण तापवायचं अन् भुंकत सुटायचं हा त्याचा छंदच आहे. निवळ्ळ चमकोगिरी करण्यापलिकडे त्याच्या राजकारणाला कवडीचीही किंमत नसावी. वारिस पठाणला निलंबित केलं आहे,हे सर्वपक्षीय ठरावाने झालं आहे.त्यामध्ये काँग्रेस,राष्ट्रवादीही येतात. पण त्याची देशभक्ती ठरवणारे हे काँग्रेस+राष्ट्रवादीवाले कोण?

खालील सर्व म्हणायला कोणाच्या गळ्यात हाड अडकू नये म्हणजे झालं... Hail Mother India કરા મધર ઇન્ડિયા Karā madhara inḍiyā শিলাবৃষ্টি মাদার ইন্ডিয়া Śilābr̥ṣṭi mādāra inḍiẏā அன்னை வாழ்க இந்தியா Aṉṉai vāḻka intiyā వడగళ్ళు తల్లి భారతదేశం Vaḍagaḷḷu talli bhāratadēśaṁ جی ماں بھارت भारतमम्मी की जय भारतअम्मी की जय भारतअम्मा की जय भारतमॉम की जय. जय हिंद हिंदुस्तान जिंदाबाद

In reply to by तर्राट जोकर

Hail Mother India
चे
শিলাবৃষ্টি মাদার ইন্ডিয়া
ज्याने केले त्या स्युडोटागोरास माझा नोमोश्कार. ( कहानीमध्ये बॉब बिस्वास (खरा उच्चार 'बिश्शाश') 'नोमोश्कार. अ‍ॅक मिनिट.' म्हणतो त्यातला.) Hail = शिलावृष्टी? लैच तर्राट, नव्हे लिटरर्राट धावली ट्रान्सलेटरची बुद्धी. =)) गेलाबाजार कण्टेक्स्ट तरी बघायचा म्हण्टो मी. =))

In reply to by बॅटमॅन

हे हे. वो गुगल ट्रान्सलेटकी बुद्धी है. तुमच्यासारख्या म्होट्या माणसाने वळीकने म्होटी गोट नाय. =)) तुम्ही रजेवर हुते नैतो तुम्हालाच सगळे भाषांतर विचारणार हुतो. पण त्या सगळ्या प्रकारात वेळ गेला असता आणि लोहा थंड झाला असता, मग काय मिळेल तो हातोडा मारला. ;-) बाकी आम्ही भाता हलवत बसणारे लोहार. लोक आगीकडे बघतात, हत्यारांकडं नाही. तुमच्यासारखा पारखी आणी बेरकी येकांदाच. =))