काय वाचावे?

निळकंठ दशरथ गोरे's picture
निळकंठ दशरथ गोरे in काथ्याकूट
26 Feb 2016 - 11:05 pm
गाभा: 

कोणीतरी म्हटले आहे की,"वाचाल तर वाचाल ." ह्याचा सोयीस्कर अर्थ आजच्या पिढीने whatsapp पोस्ट वाचणे असाच घेतला आहे. mobile मध्ये डोके घालून जोक किंव्हा दुसारांचे मते वाचल्याने आपणास काय मिळणार आहे? जोक वाचून करमणूक करणे हे काही क्षणापुरते ठीक आहे. पण अधिकांश वेळ त्याला देऊन आपण आपला वेळ वायाच घालतो. वर्तमानपत्रे वाचणारे वाचक देखील बहुतेक करून बलात्कार, विनयभंग, चोरी, खून इत्यादी मादक विषयीच वाचन करतात. ह्यातून मिळणार काय? मादक वाचक वर्ग! म्हणूनच आजच्या पिढीला काय वाचावे हेच शिकविण्याची गरज आहे. उपरोक्त वाक्यप्रचार बदलून त्याचे नवीन रुपांतर खालील प्रमाणे करायला हवे.
" वाचाल तर वाचाल,
पण काहीपण वाचाल,
तर कायमचे जाचाल,
आणि योग्य वाचाल,
तर आयुष्यभर वेचाल."

काय वाचावे हे शिकविण्या अगोदर एक गोष्ट प्रकर्षाने सांगावी वाटते, ती म्हणजे प्रत्येकाचे स्वतःचे मत असणे गरजेचे आहे. मी ह्याच्याशी सहमत आहे अशी वरकरणी विचारसरणी नको. जो पर्यंत वाचकाचे वैयक्तीक मत बनत नाही, तो पर्यंत तो वाचक नाही. हल्लीतर social site वर ' एक like तो बनता ही है |' असा आग्रह नसून भीक मागितली जाते आणि विवेकशून्य वाचक तो देतो ही.
वाचकाची हीच विवेकबुद्धी जागी करण्यासाठी काय वाचावे ह्या लेखाची दोन विभागातून सविस्तर वर्णन केलेले आहे
१. social मेडिया वाचन
२. वर्तमानपत्रे वाचन

१ social मेडिया वाचन
Social मेडिया वाचन हे बेशिस्त वाचन संस्कृतीचा भाग मानावे लागेल. वाचनामध्ये कुठलीच शिस्त आढळून येत नाही.पूर्वी शाळांमध्ये कोणती पुस्तके वाचावे किंवा पुस्तकाचे वाचन करून घ्यायचे त्याप्रमाणे social मेडियावर काय वाचावे व काय वाचू नये ह्याची शिस्त शाळांमध्येच लावला हवी.नाहीतर तीच मुले mobile हातात आला की वेगळ्याच चक्रव्युहात ओढलो जातील. नियम घालून दिल्याशिवाय शिस्त लागत नाही. त्यामुळे social मेडिया वाचनाचे नियम जरी वैयक्तिक आसले तरी त्याला सामाजिक रूप यायला हवे.mobile ची रिंग वाजली कि हातात असलेले महत्वाचे काम सोडून देणारी आजची पिढी, message tone नाही ऐकली तर बैचन होतात की फोन ला काही झाले तर नसेल ना?

Social मेडिया वर वाचण्याचे नियम:
Forward संस्कृती बंद:
आला message की केला forward, मग तो message दुसरा ही forward करतो. अशाने फक्त ऐकाच व्यक्तीचे(ज्याने तो message बनवला आहे त्याचेच) विचार सर्वत्र प्रसारित होतात.नेमके हेच गमक ओळखून राजकीय पक्ष social मेडिया operator ठेवून पक्षाचे विचार समाजात रुजवतात.ह्याला खीळ बसवायची असेल तर forward संस्कृती बंद करून opinion (मत) संस्कृती चालू व्हायला हवी. खरेतर social मेडिया वाल्यांनी मुळ message आणि त्याचा लेखक सर्वाना दिसेल,अशी सोय करून दयाला हवी व इतर सर्वाना फक्त मत मांडण्याचा अधिकार.वाचकांनीही फक्त अंगठे दाखवून मत मांडण्यापेक्षा अंगठ्याबरोबर अक्षरे लिहून मत मांडावे.मुद्दा समजलाच नसेल तर गप्प राहणे केव्हापण योग्य.म्हणूनच फक्त अंगठे दाखवणे बंद व्हायला हवे.Social मेडियाचा आवाका इतका जास्त आहे की जगातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत अगदी दुसऱ्याच क्षणी पोहचू शकतो.त्यामुळे ऐका विचारी समाजाकडे पाउल टाकता येईल.हा message दहा जणांना पाठवा तुम्हाला काही तरी खुशखबर मिळेल अशी forward पद्धती तत्काळ बंद व्हायला हवी कारण खुशखबर फक्त कष्ट केल्याने मिळते, message forward केल्याने नाही. ही आंधळी संस्कृती विचारी समजाचे विघटन करते व समाजाला तकलादू बनवते.मत संस्कृती रुजवण्यासाठी वाचकाने संयम बाळगून मत मांडायला शिकले पाहिजे.

मत निर्भीडपणे मांडणे :
लोक स्वतःच्या group वर मत मांडताना भितात कारण आपल्या मतामुळे सर्वांसमोर आपले हसे होईल ह्यामुळे गप्प राहतात तर काहीजण काहीही अविचारी मांडून सर्व हसण्यावर घेऊन जातात. जर आपल्या मित्रांमध्ये आपण मत मांडू शकत नसू तर जनते समोर कसे मांडणार? लहानपणी वक्तृत्व स्पर्धेत लोकांसमोर बोलताना भीती वाटते आता अप्रत्येक्षपणे group समोर मत मांडतानाही तीच भीती.ही भीती नष्ट करायची असेल तर स्वतःचे मत निर्भीडपणे मांडा. काही मुद्द्यावर लोक हसतील, त्यांना हसू द्या पण मत बदलू नका. आणि हो स्वतःचे आणि कुटुंबाचे selfie टाकण्यापेक्षा स्वतःचे मत जर प्रभावीपणे मांडले तर ती खरीखुरी selfie ठरेल.Social मेडिया प्रभावीपणे वापरायचा असेल तर सर्वप्रथम group मध्ये कोणास घ्यायचे हे ठरवून द्यायला हवे. कारण जत्रा गोळा कराल तर फक्त गोंधळच होईल. Group कमी लोकांचा(५ ते १०) असेल तरी चालेल पण सर्वजण प्रभावी मत मांडणारे व विवेकी असावे.

राजकीय प्रसारकांना आळा:
राजकीय प्रसारक विविध चित्रित व लिखित साहित्याद्वारे आपले मन आकर्षित करतात.त्यामुळे आपले वैयक्तिक मत प्रभावित होतात आणि स्वविचार खुंटीत होतात.त्यामुळे राजकीय विचार शुन्य होतात आणि आपण पक्षीय विचारात वाहून जातो.जर राजकीय विचार मांडायचे असतील तर स्वभोतालाच्या राजकारणावर,विकासकामे,जाहीरनामे, राजकीय चरित्र,त्यांचा प्रवास ह्याबद्दल मते मांडा.त्यामुळे राजकीय पक्षदेखील त्यांची वचने पाळायला सुरुवात करतील.

Social मेडियावर काय वाचावे:
नियम घालून दिल्यानंतर काय वाचावे? ह्या बद्दल सांगणे क्रमप्राप्त. आपल्या mobile मध्ये येणाऱ्या मजकुरापैकी बहुतेक करून दोघातिघांच्या गप्पा, खेचाखेची,येणाऱ्या शनिवार रविवारचे नियोजन आणि trending मजकूर असतो. गप्पांमध्ये भाग घ्या पण त्यातच रमून जाऊ नका.तुमचे नियोजन सांगून बाजूला व्हा.हसून बाजूला व्हा आणि नाहक चर्चा टाळा.इतर मजकुरामध्ये काहीही येत असते. त्यामध्ये काही आपल्या आवडीचे तर काही न आवडणारे असेल ही,पण काय वाचावे हे स्पष्ट असणे गरजेचे आहे.

सरकारी योजना:
सरकारच्या योजना, धोरण, नवीन कायदे ह्या बद्दल अवश्य वाचा. कारण सरकारी योजना गरजू व्यक्ती पर्यंत पोहचवणे देखील आपलेच कर्तत्व आहे.सरकारी योजनेमध्ये सामील झाल्याने लाचखोर प्रवृतीना आळा बसेल व सरकारी कामांना वेग येईल. आतातर प्रत्येक सरकारी कार्यालयाचे/मंत्रालायचे Twitter handle आहे.त्याचे follower झालात की सरकारी निर्णयाची इतम्बात माहिती लगेच उपलब्ध होते व सामन्य नागरिक देखील थेट सवांद साधून सरकारी योजनेत भाग घेऊ शकतो. असे करणे म्हणजे देशसेवाच करणे ठरेल.

आरोग्यविषयक:
आरोग्यविषयक सल्ले अवश्य वाचा. शक्य असेल तर एक डॉक्टर मित्र Group मध्ये अवश्य सामील करा. त्याचे सल्ले अवश्य घ्या. आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य सभाळणे म्हणजे सर्वच मिळवणे.आरोग्यविषयक माहिती तपासून पहा.जर फायदा झाला तर इतरांना कळवा.स्वतःचा अनुभव सांगितलाच तर उत्तमच. धावत्या जीवनशैलीमुळे थोडा आराम देऊन योगासने व प्राणायाम करायला हवेत.प्राणायाम किव्हा योगासने करतानाचे फोटो इतरांना पाठवा व त्याचे फायदे नमूद करा.त्यामुळे लोक चांगल्या जीवनशैलीकडे अत्मियेतेने पाहतील.

विज्ञान व तंत्रज्ञान विषयक:
विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयी स्वतःला अत्याधुनिक ठेवा. बाजारात येणाऱ्या नवनवीन उपकरणाची माहिती वाचा व पूर्ण समजल्या नंतर त्याचा चांगल्या वाईट बाजूंवर मत नोदवा व ते प्रसारित करा.विज्ञानातील चालू संशोधनावर लक्ष असू द्या. संशोधनाचा भाग असाल तर उत्तमच नाहीतर संशोधनाला प्रोत्साहित करणारा मजकूर अवश्य प्रसारित करा

इतिहास विषयक:
इतिहासाचे दाखले, महान व्यक्तींचे चरित्र वर्णन अवश्य वाचा. त्याबद्दल अधिक माहिती गोळा करा.महान व्यक्तीचा चरित्रातील तुम्हाला आढलेला पैलू अधोरेखित करा. अश्याने त्यांचे कार्य समाजात खोलवर पसरते आणि त्यांना हीच खरी आदरांजली. पण लक्षात असू द्या जो इतिहास विसरतो त्याला भविष्य विसरते.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी विषयक:
स्वतःला आंतरराष्ट्रीय स्थरावर घेऊन जाण्याचे सामर्थ्य social मेडियामध्ये आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडीवर लक्ष असू द्या. त्या घडामोडीचे भारतावर होणारे परिणाम अभ्यासा. सर्व घटनांची चर्चा करा,त्यामुळे जागतिक मत बनवता येईल.

भूगोल व परिसर अभ्यास विषयक:
भौगोलिक बदल जाणून घ्या, आपल्या परिसरातील पावसाचे प्रमाण खालावेले असेल तर समाजात विविध उपक्रम राबवून,झाडे लावतांचे फोटो सर्वत्र पाठवा व इतरानाही प्रोत्साहित करा.

अर्थ विषयक:
शेअर बाजारातील उतार चढाव,रुपयाचे मुल्यांकन, सरकारी बजेट, विवध वस्तूंचे भाव ह्या बद्दल माहिती मिळवत राहा, वाचत राहा.बजेट मधल्या चांगल्या वाईट गोष्टींची चर्चा घडवून आणा.स्वतःचे अर्थ विषयक मत प्रसारित करा. शक्य असेल तर group मधील एक व्यक्ती अर्थसुज्ञ असायला हवा. हिम्मत करा व अर्थ अर्जन करा.

मोठ्या कंपन्यांच्या branding:
Maggi विषयी खूप माहिती social मेडियावर आली. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या अश्या कंपनांच्या जाळ्यात फसू नका. कंपनांचे branding मुळे फसवणूक होते. तुम्हाला माहित असलेल्या/कळलेल्या फसवणुकीबद्दल सर्वाना सतर्क करा.

शेतीविषयक:
सर्वज्ञात आहे की नाम foundation साठी पूर्ण महाराष्ट्रभर social मेडियावर खूप आव्हान केले होते.त्यात महाराष्ट्राने उत्फूर्त सहभाग घेतला.शेतीतील तंत्रज्ञान समजून घ्या आणि गरजू शेतकऱ्या पर्यंत त्याला पोहचवा. शेतकरी बाधावांचे संकट समजून घ्या. त्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहा. शेतकऱ्यांसाठीच्या विविध सरकारी योजना गरजू शेतकऱ्या पर्यंत पोहचवण्यासाठी गावाकडील शेत्कारीमित्राना group मध्ये अवश्य घ्या.त्यांना सुज्ञ करा.

सिनेमाविषयक:
सिनेमावाले लोक social मेडिया प्रभावीपणे वापरून अर्थार्जन करतात.त्यांच्या जाळ्यात पडू नका. पहिल्याच दिविशीचा शो बघायचा मोह टाळा. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सर्व माहिती घेवून सिनेमा पहा. तुम्हाला आवडला तर तुमची मत इतरांना कळ्वा. सिनेमाच्या चांगल्या वाईट बाजू मांडा. सिनेमाचे समाजावर होणारे परिणाम विशेष करून नमूद करा.

आतंकवाद व नक्षली:
Social मेडिया मुळे आतंकवाद अगदी घराजवळ आला आहे. पोलिसांना त्यांच्या मुसक्या आवळ्याला वेळ लागतो, म्हणून आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की समाजाचे आणि देशाचे रक्षण करणे. पोलिसांना संशयित हालचाली,वस्तू इत्यादी माहिती तत्काळ कळवा.अनोळखी group मध्ये जाऊ नका आणि अनोळखी व्यक्तींना group मध्ये घेऊ नका. आतंकी घटनांचा निषेध अवश्य नोंदवा.समाजात एकोपा राहील ह्याची काळजी घ्या.

पौराणिक कथा/धर्मविषयक :
पौराणिक कथा अवश्य वाचा पण त्यातून अंधश्रधा वाढणार नाही ह्याची खबरदारी घ्या. धर्म,धर्मग्रंथ अवश्य वाचा त्याबद्दल अधिक माहिती मिळावा व आपल्या समाज कसा पुढे जाईल ह्या बद्दलचे मत मांडा.धर्माबद्दल लोकांच्या भावना तीव्र असतात त्यामुळे social मेडियावर मजकूर लिहिताना तारतम्य बाळगा.भावनांना आवर घालू विवेकी बुद्धीने विचार मांडा.

मागील वाचानांचे पुढील संबध:
एखादा मुद्दा भूतकाळात वाचलेले असतो त्याची अत्याधुनिक माहिती नेहमी समोर येत असते.त्याला आवर्जून वाचा.त्यासंबाधित तुमचे वाचन वाढेल आणि तुम्ही देखील तज्ञ होऊ शकता.
लक्षात असू द्या, माहिती हि पावसासारखी असते थेंब थेंब पडणारी,जितकी जास्त खोली तितकी साठवण जास्त.
वरील मुद्दे निर्देशक आहेत त्यात आणखीन भर पडू शकते. वाचकांची संख्या जास्त असल्यामुळे लेखकांनी त्यांची भूक मिटविण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. छोट्या छोट्या लिखाणातून अत्याधुनिक माहिती वाचकासमोर आणणे लेखकाचे कर्तव्य आहे.काही वर्षांनी social मेडियावर साहित्याचे एक भव्य साहित्य सम्मेल्लन झाले तर नवल वाटायला नको.त्यामुळे हा social मेडिया लेखांची अधिरतेने वाट पाहत आहे,वाचनाचा समुद्र निर्माण करा आणि नाहून निघू देत प्रत्येक वाचकाला ह्या ज्ञानगंगेत.

२. वर्तमानपत्र वाचन:
वर्तमानपत्रे वाचन हा सावियीचा भाग असते.वर्तमानपत्रे वाचनात मथळे वाचन करून पाने पुढे ढकलली जातात.मथळे वाचन हे मुखवटा असतो. मथळे वाचनाने पूर्ण ज्ञान मिळेलच असे नाही म्हणून वर्तमानपत्रे वाचताना घ्यावयाची काळजी खालील प्रमाणे नमूद केली आहे.

वर्तमानपत्रे एक सवय:
जेव्हा वर्तमानपत्र सवय बनते तेव्हा काही गोष्टी नकळत वाचल्या जातात.आपल्या आवडत्या गोष्टी आपण वाचतो आणि त्याला ज्ञान समजून गैरसमज करून घेतो.सवय म्हणून वर्तमानपत्र वाचणे म्हणजे दात घासायचे म्हणून brush करणे पण आपला मूळ उद्देश दात साफ करणे किव्हा तोंडाचा वास येऊ नये म्हणून brush करणे असा असायला हवा,त्याचप्रमाणे वर्तमानपत्रे वाचायचे म्हणून हातात घ्याल तर फक्त अक्षर वाचनच होईल.आता साहजिकच प्रश्न पडेल की वर्तमानपत्र वाचावी कशी? कोणते मुद्दे वाचायचे?मुद्द्याच्या किती खोलवर जायचे?वर्तमानपत्रे वाचणे हे एक दिवसापुरते मर्यादित असते की ही एक अविरत ज्ञान अर्जांची प्रक्रिया आहे?

मथळे वाचणे सोडून अंतरवाचन:
मथळे वाचून लगेचच त्याच्या अंतरवाचन करा. त्या मथळ्या संबधीत काही मजकूर इतर पानांवर असतो तो पूर्ण वाचण्याची तयारी असू द्या.त्यामुळे त्यादिवीशी घडलेल्या विशिष्ट घटनेची संपूर्ण माहिती तुमच्या जवळ असेल.मथळे छापताना चिन्हांचा वापर खूप केला जातो त्यामुळे त्याचा अर्थ समजून घ्या. जसे "?" चिन्ह म्हणजे चित्र स्पष्ट नाही .हे समजून घेतल्यामुळे माहिती योग्य व अचूक राहते व गैरसमज कमी होऊन अफवांना आळा बसतो.
गुन्हेगारी बद्दल वाचणे सोडून द्या:
जर आपण सामान्य नागरिक,विध्यार्थी,गृहिणी असाल तर गुन्हेगारी बद्दल वाचणे सोडून द्या. ह्या वाचनातून काही ज्ञान अर्जन होत नाही उलटपक्षी मन दुषित होते. जर पोलिस असाल तर अवश्य वाचा कारण गुन्हेगार पकडण्यास मदत होईल. इतर सर्वांनी गुन्हेगारी बद्दल वाचणे टाळावे.

संपादकीय:
संपादकीय वाचणारे खूप कमी असतात त्याचे एक कारण म्हणजे ह्या पानावर चित्रस्वरूप माहिती कमी असणे असू शकते.पण संपादकीय हे वर्तमानपत्राचा गर्भ असतो. विविध मुद्यांचे तज्ञांकडून विश्लेषण केलले असते त्यामुळे घटनेची दुसरी बाजू समजून घेता येते. पण संपादकीय वाचल्या नंतर लगेच आपले मत बनवू नका कारण ते फक्त त्या व्यक्तीचे वैयक्तिक मत असू शकते.

सर्वेक्षण, करार व कायदे:
वर्तमानपत्रात येणारे सर्वेक्षण अवश्य वाचा. त्यातले तक्ते समजून घ्या.सर्वेक्षणामुळे देशाचा ओघ कळतो. सर्वेक्षणामुळे आपली सध्य:परिस्तिथी कळते व भविष्यातील योजना आखता येतात. सर्वेक्षणातील माहिती सर्वस्वी खरी नसली तरी विषयाचे स्वरूप,गांभीर्य व महत्व समजते. विविध देशाशी होणारे करार,कराराच्या अटी बारकाईने अभ्यासा. विवध घटनांमुळे कायद्यात होणारे बदल वाचा कारण ह्या गोष्टी नंतर पुस्तके वाचल्याशिवाय अभ्यासता येत नाहीत त्यामुळे जेव्हाचे तेव्हाच वाचणे योग्य.

पुरवणी वाचन:
पुरवणी वाचन हे वर्तमानपत्रे वाचण्यापेक्षा खूप वेगळे असते, येथे लेखक आणि वाचक ह्यांचा थेट संबंध असतो. पुरवणीत समाजातील घुसमट,दुखः अधोरेखित होते. त्यामुळे पुरवणी वाचून न्यूनगंड दूर होतात व जगण्यात नव चैतन्य येते.
वर्तमानपत्रे वाचनासाठी वेळ मर्यादित असतो त्यामुळे कमी वेळात जास्त ग्रहण करण्यासाठी विशिष्ट वाचन कौशल्य असणे गरजेचे आहे. शेवटी वाचन ही गरज नसून कला म्हणून जोपासायला हवी.

प्रतिक्रिया

वाचनाविषयी केलेले विचारमंथन आवडले...

एवढे छान विश्लेषण पण प्रतिक्रिया एकच

गोरेजी, ते आधीच्या धाग्यातले श्री व सौ लिंडेन कोण ते सांगा ना.

मोदक's picture

2 Mar 2016 - 3:42 pm | मोदक

दासबोध वाचा.