Skip to main content

रानभाज्या महोत्सव.

लेखक कलंत्री यांनी गुरुवार, 13/08/2015 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
भीमाशंकरजवळील आहुपे या निसर्गरम्य गावामध्ये रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. शेकडो वर्षांपासून जतन करण्यात आलेल्या देवराया, नैसर्गिक धबधबे, उंच कडे आणि खोल खोल अशा दर्‍या, भोळे आणि शहरीकरणापासून दूर असलेले वनवासी / आदिवासी, अशा या ठिकाणी २१ आणि २२ ऑगस्टला आपणास येता येईल. निगडी अथवा पुण्याहून जाता येईल. जंगलामध्ये होणार्‍या अनेक भाज्या आणि त्यांच्या नैसर्गिक चवींचा आस्वादही घेता येईल. वनवासी कल्याण आश्रम यांनी याचे आयोजन केले आहे. संपर्क : ९१६८८०७७३३ आणि ९६०४६२२६२८.

वाचने 4316
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

फोन करून बघतो. खवय्यांची धाव नक्की जाणार इथे ! बघूया जमतंय का

चांगली माहिती!
भीमाशंकरजवळील आहुपे
गुगलवर पाहिले तर भीमाशंकरच्या आधीच १४ कि मी वर उजवीकडे फाटा फुटतोय.