मोर पंखी कावळा
एक काळा कावळा, मोरांच्या देशी गेला.
मोर पंखी ‘बपतिस्मा’, लाऊन घरी परतला.
‘श्रेष्ठत्वाची’ जाणीव, त्याला आता झाली.
पोरांसाठी वेगळी, ‘संस्कृती’ शाळा बांधली.
जेवणाची सोय ही, त्याने वेगळी केली.
पाण्याची विहीर आता, कालबाह्य होती.
‘त्यागण्या’ साठी बांधले, टॅायलेट चकाकी.
सुगंधित लहारदार, कोक पेक्षा स्वादिष्ट
आवडत होते त्याला, त्याचेच शिवाम्बू
कुणा शुद्राच्या घामाच्या, दुर्गंधी कसे झाले?
मोरपंखी कावळ्याची, इनसल्ट कोणी केली?
तुज्याच पूर्वजाने, केली होती विहीर अशुद्ध.
तोडले होते तेंव्हा, त्याचे हात नी पाय.
कावळ्या वर ही करू, अनुशास्नात्मक कार्यवाही.
वाळीत त्याला टाकू, तबाह करू करिअर.
काळ बदलला, मुखौटे बदलले
रूप बदलूनी, मोरपंख लाविले
मानसिकता मात्र, बदलली नाही.
उच्चाधिकारी झाले, कालचे ब्राम्हण.
राग मानू नये पण..
सत्या पासून आपण पळू शकत नाही.