एजबेस्टन कसोटी

खेडूत क्रिडा जगत
एजबेस्टन कसोटीत भारताचा पराभव आता औपचारिकता राहिली आहे. प्रवीण कुमार ने प्रेक्षणीय खेळी केली तेवढीच भारताची जमेची बाजू. (मी आशावादी आहे पण म्हणून काय इशांत आणि श्रीशांत द्विशतके करतील? ). मागच्या आठवड्यात मी ऑन लाईन तिकीट काढले तेव्हाच शेजारच्या डेस्क वरचा इंग्रज मला हसत होता. हाच मागे वल्ड कप च्या वेळी '' कसला वल्ड कप? ओहो ! क्रिकेटचा होय? '' म्हणाला होता, कारण इंग्लंड चे आव्हान तेव्हा संपले होते. त्याला वाटले मी बराच आशावादी आहे की भारतीय संघ किमान हरणार तरी नाही. मलाही ते पटत होते, पण मुख्य कारण होते लक्ष्मण, सचिन आणि द्रविड कदाचित इथे शेवटची मालिका खेळतायत. प्रत्यक्ष स्टेडीयम मध्ये जाऊन खेळ पहाण्याचा आनंद वेगळाच असतो. (पण कसले काय). मागे एकदा जर्मनी मध्ये स्तुतत्गार्त आणि बायर्न मुनिक मधला फुटबॉल सामना पाहायचा योग आला होता आणि तो अविस्मरणीय अनुभव होता! म्युनिक कडे राष्ट्रीय संघातले बरेच खेळाडू होते. साहजिकच स्तुत्गार्त हरले आणि स्थानिक लोक त्यांच्या प्रशिक्षक आणि खेळाडूना शिव्या घालत होते.. '' एकेक मिलियन युरो घेतात आणि ...'' आता काळ बदलला, इथे लोक आय पी एल ला दोष देतात आणि '' सेकंदाला हजार पौंड घेऊन यांना आय पी एल खेळायला पाहिजे पण देशासाठी खेळायला नको '' असे म्हणतात. मला हा हजार पौंड चा हिशेब काही कळला नाही, असो. लहानपणी बेदी आणि गावस्कर यांच्या संघाचे पाहिलेले अनेक पराभव विसरता येत नाहीत. पंचवीस वर्षे क्रिकेट पाहूनही प्रेक्षक म्हणून मला पराभव सहज पचत नाही. खेळाडूना असे होते का? तिकिट वाया गेले, ठीक आहे, कसोटीतला नंबर १ घालवल्याचे पण वाईट वाटले नाही. ज्या प्रकारे गेम सोडून दिला ते नक्कीच निषेधार्ह होते. खेडूत
वर्गीकरण

7 टिप्पण्या 14,518 दृश्ये

Comments

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

प्रवीणकुमार आणि धोणीची फलंदाजी पाहिल्यावर आत्ता जरा बरं वाटलं होतं. खरं तर आपण आपली क्रिकेटमधील लाज टीकवण्यासाठी दंगलीचे कारण पुढे करुन शेपूट घालून मायदेशी परतावे असे मला वाटत आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकल्यानंतर आणि भरपूर पैशासहित कौतुक झाल्याने खेळाडूंच्या हातापायाच्या हालचाली ’सखे मंद झाल्या तारका’ प्रमाणे झाल्या आहेत. मला तर सध्या एकाही भारतीय खेळाडूचं तोंड पाहावं वाटत नाही. -दिलीप बिरुटे (संतप्त भारतीय क्रिकेटप्रेमी)

इरसाल नवीन

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ. शी सहमत. साल्यांना IPL खेळायला सांगा. पूर्वी पैश्यासाठी नितीमत्ता गहाण टाकत आता तर ............... "सखे बंद झाल्या तारखा (IPL च्या )"

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

In reply to by इरसाल

इरसालसेठ, भारतीय क्रिकेटमधील दिग्गज म्हणून मिरवणार्‍या फलंदाजांनी गेल्या तीन कसोटीत जे शेपूट घातलं तो एक खेळाचा भाग म्हणून समजून घेता येईल. खेळ म्हटल्यावर हार-जीत चालायचीच हेही जड अंतःकरणाने आपण मान्य करु पण आज पेप्रात वाचलं डेली मेल ने म्हणे आपल्या टीमला 'मरतुकडे कुत्रे' म्हटले आहे. आरं तिकडं कोणी मिपाकर राहात असेल तर डेली मेलच्या संपादकाकडे (पत्र व्यवहार करा रे) जरा पाहा रे....! :) -दिलीप बिरुटे

इरसाल नवीन

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ. साहेब. ती बातमी मी पण पहिली टीवी वर. आता आपले खेळाडू डिफेन्स वर उतरलेत. पळवाटा शोध्तायेत बाकी पत्रव्यवहार करून काही होणार नाही.जिथे एवढ्या मोठ्या टीम ला भिक नाही घालत तिथे पत्राची काय वासलात लावतील ?

मी-सौरभ नवीन

अपली टीम सध्या बॅड पॅच मधून जात आहे...त्यांना शुभेच्छा !! चॅम्पियन्स लीग मधे हेच परत जोमाने खेळू लागतील बघ!!!

गणपा नवीन

In reply to by मी-सौरभ

चॅम्पियन्स लीग मधे हेच परत जोमाने खेळू लागतील बघ!!!
खेळतीलही कदाचीत जिंकतीलही... पण महाराजा जो हौद गयी वो बुंदसे नही आयेगी. ;)