प्रवास वर्णन-ईशान्य भारत
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
इशान्य भारतात जाण्यासाठी निघणे हा माझ्यासाठी नेहमीच एक प्रफुल्लीत करणारा अनुभव असतो. दरवर्षी हा अनुभव मी सातत्याने घेत आलो आहे. आणि दरवेळी मी नव्या उत्साहाने प्रवासाला निघतो तसाच. २३मे ला मुंबईहुन सकाळच्या ७.५० च्या एअरटेल च्या विमानात माझे आऱक्शण असल्याने पुण्याहुन २२ला मी संध्याकाळी नीता ट्रवेल ने निघालो. मुंबईला नितीन घोडके मला घ्यावयास आले. ते देखील आसाम मध्ये काही वर्षे असल्याने इशान्य भारत या विषयावर आमच्या रात्री १२ वाजेपर्यंत गप्पा रंगल्या. सकाळी लवकर उठुन व स्नानादि कार्यक्रम आटोपुन नितीन ने मला कार ने एअरपोर्ट वर सोडले. दरवेळी विमान प्रवासात खिडकितुन दिसणारे नभांचे खेळ साठवुन ठेवण्याचा मानस असुनही विमान प्रवासात मोबाईल बंद करावा लागत असल्याने यावेळि मी निकॊन चा कैमेरा मुद्दाम विकत घेतला होता. दोन तास आकाशात असल्याने मला नविन कैमेरा ने फोटो काढण्यास निवांत वेळ मिळाला व मी त्याचा भरपुर व मनसोक्त उपयोग करुन घेतला.
कलकोता विमानतळावर उतरतांना
पुनःश्च उड्डाण अगरताला साठी
अगरताळा विमानतळावर उतरतांना
गोहाटी विमानतळावर उतरतांना दिसणारे विशाल ब्रम्हपुत्रेचे पात्र
गोहाटी हे शहर म्हणजे इशान्य भारताचे प्रवेशद्वार आहे. तसेच या भागातील सर्वात मोठे शहर. दिसपुर हे आसामच्या राजधानीचे शहर हे देखील गोहाटीच्या मध्यभागी आहे. युनायटेड किंगडम(U.K.) माध्यमाच्या सर्वे नुसार गोहाटी हे जगातील जलद वाढीसाठी प्रसिधद असणार्या १०० शहरामध्ये एक तर भारतातील जलद वाढत असलेल्या ५ शहरातील एक म्हणुन प्रसिध्द आहे. पुर्व-पश्चीम ४५ कि.मी तर उत्तर दक्षीण १४ कि.मी अशा परिसरात हे शहर पसरलेले आहे. ब्रम्हपुत्रेच्या दक्षिण किनार्यावर वसलेले हे शहर या नदामुळे समुद्र किनार्यावर वर वसलेल्या शहराचा आभास निर्माण करते. दमट हवामानामुळे येथे कायम गर्मी भासत असते. ब्रम्हपुत्रेचे पात्र काही ठिकाणी ६ ते ८ कि.मी तर सराइघाट येथील पुलाजवळ कमितकमी म्हणजे १-२ कि.मि. इतके आहे. नदित अनेक लहान मोठी बेटे असली तरी उमानंदा हे बेट गोहाटी शहरामध्ये असुन फारच निसर्ग रम्य असे आहे.
अपुर्ण
अपुर्ण
प्रतिक्रिया
पहिल्या(अॅक्चूअली सगळ्याच)
तंतोतंत सहमत
एएम-पीएमचा घोळ असावा
विमान उतरताना इलेक्ट्रॉनिक
चुका