तात्या आपले आभार कसे मानू हे कळत नाहिये. मी सुद्ध हे गाणं कधी पासून शोधत होतो. पुन्हा एकदा धन्यवाद.
अक्षरश: भिडतं
उलट प्रेम तर बर्याचदा मुकंच असतं! ते एकमेकांचं एकमेकांनी समजून घ्यायचं असतं!
१०००००% सहमत
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
वाह, तात्या...
आज बर्याच दिवसांनी संगिताच्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद. पुरियाधनश्री मध्ये इतकी आर्तता दुसर्या कुठल्या रागात क्वचीतच आढळते. फारच छान राग. शब्द भिडतात ह्या गाण्याचे...
असेच संगीत विषयक रागदारी लेख येऊ द्यात हीच विनंती.
आपला,
मुकुल
अप्रतिम. तुझे वेदनेवरचे भाष्य पण खरे आहे. जगातील बहुतेक सर्व महान साहित्यकृति ह्या वेदनेतूनच जन्माला आल्या आहेत किंवा परिणत झाल्या आहेत. रामायण हे क्रौंच युगुलाच्या वेदनेने प्रेरित झाले तर महाभारतामध्ये सुद्धा जगातील काही महानतम वेदनादायक घटना आहेत. अभिजात प्राचीन ग्रीक साहित्य तर 'ट्रॅजेडी' साठीच प्रसिद्ध आहे.
दुव्या साठी धन्यवाद.
(मृणाल कुलकर्णीचा फॅन) बिपिन.
अवांतरः 'दुव्या साठी' की 'दुव्यासाठी' :D
फारच छान लिहीलंत तात्या. गाण्याचं विश्लेषण समर्पक शब्दात केले आहे.
या निमित्ताने 'स्वामी ' मालिकेची आठवण जागी झाली. त्याकाळची माझी आवडती मालिका होती
गाण्याला व तात्यांना दोघांना मनापासून दाद.
-- हेच म्हणते मी
ईश्वरी
गाण्यातील व्याकरण समजले नाही तरी गोडवा जाणवतो. स्वामी ही एक उत्कट मालीका होती. रविंद्र मांकणींचा कसदार अभिनय, मृणाल कुळकर्णींची लावण्यवती रमा, राघोबादादांमधील 'राघोबत्व' ह्या सर्व जमेच्या बाजूंनी 'स्वामी' अजरामर झाले.
धन्यवाद तात्या.
यावरून थोरले आबासाहेब व सईबाईसाहेबांचा विचार मनात येतो!
सईबाई ही थोरल्या आबासाहेबांची अत्यंत लाडकी! परंतु थोरले आबासाहेब सतत मोहिमेवर! त्यातच सईबाईंचे निधनही फार लवकरच झाले. त्यामुळे त्याही थोरल्या आबासाहेबांना फारश्या लाभल्या नाहीत!
थोरल्या आबासाहेबांची राजकीय कारकीर्द तर तुम्हाआम्हाला तोंडपाठ आहे. परंतु सईबाईच्या निधनामुळे तो पहाड मनातल्या मनात किती ढासळला असेल, आतल्या आत किती दु:खी झाला असेल हे तुम्हाआम्हाला कधी कळलंच नाही आणि कळणारही नाही!
अजून एक पुरियाधनाश्री! दुसरं काय?!
आपला,
(थोरल्या आबासाहेबांचा निस्सीम भक्त!) तात्या.
शिर्षक गीत (जो जनतेचे..) आणि अंतीम गीत (माझे मन...) दोन्ही डोक्यात बसलेली गाणी.
पुरीयाधनश्रीच्या माहीतीबद्दल धन्यवाद!
>>>ऐन तारुण्यात माधवरावांच्या आयुष्याची संध्याकाळ व्हावी आणि ही भावना, ही पार्श्वभूमी हे गाणं ऐकत असताना सतत कुठेतरी जाणवते! म्हणून तर मोघेसाहेबांनी या गाण्याकरता पुरियाधनाश्री निवडला असेल आणि एका विराणी स्वरुपात हे गाणं आपल्यापुढे मांडलं असेल असं मला वाटतं!
छान विश्लेषण. १००% पटले.
________
या गाण्या संदर्भात अजून एक आठवत असलेला भागः स्वामी मालीका चालू असताना अथवा त्याच सुमारास राजस्थान मधील रूपकंवरच्या सतीचा किस्सा घडला होता. आणि त्यावर स्वाभावीक आरडाओरडा चालू होता. त्यात स्वामी नाटकाचा शेवट हा रमाबाईंच्या सती जाण्याने असल्यामुळे काही संघटना ते दाखवायला अथवा त्याचा उल्लेख करायला विरोध करत होत्या. तो भाग न सांगणे म्हणजे कादंबरी आणि इतिहासावर अन्याय असे इतरांचे म्हणणे. त्यातून कल्पकता दाखवून या गाण्याचा उपयोग केला गेला होता. स्वामी कादंबरीत माधवरावांच्या निधनाच्या वेळचे जे हेलावून टाकनारे वर्णन आहे, ते चित्ररूपाने दाखवत त्यांनी त्यांचे डोळे मिटताच बाकी "फिल्मी सेंटीमेंटलपणा" न करता दोन पांढरे पक्षि एकत्र उडत आकाशात जात असताना आणि त्याच वेळेस तीच जोगीण हे गाणे म्हणत रानावनातून फिरताना दाखवली होती. अर्थातच हा प्रसंग फिल्मी नसला तरी भावनात्मक नक्कीच झाला आणि म्हणूनच दिग्दर्शकाच्या (आणि माझ्या सारख्या प्रेक्षकांच्या) दृष्टीने यशस्वीपण ठरला.
त्यामुळे दोन आत्मे एकमेकात विलीन होत असताना ते, ते एकमेकांना संबोधून आणि जोगीण तेच गाणे ईश्वराला संबोधून म्हणत संसारापासून लांब जात आहे असा "सटल" अर्थ त्यातून ध्वनीत केला गेला आणि रमाबाई सती गेली, कशी गेली, त्याला प्रोत्साहन दिले का नाही इत्यादी प्रश्न दूर राहीले!
चित्ररूपाने दाखवत त्यांनी त्यांचे डोळे मिटताच बाकी "फिल्मी सेंटीमेंटलपणा" न करता दोन पांढरे पक्षि एकत्र उडत आकाशात जात असताना आणि त्याच वेळेस तीच जोगीण हे गाणे म्हणत रानावनातून फिरताना दाखवली होती.
विकासराव, आपली आठवण अगदी बरोबर आहे. ती जोगिण हे गाणं गात आहे आणि या गाण्याच्या पार्श्वभूमीवर दोन पक्षी आकाशात उडत गेलेले दाखवत या मालिकेचा अतिशय सुंदर व टचिंग शेवट साधला होता...
तात्या.
श्री. विकास यांनी सांगितलेली आठवण अगदी बरोबर आहे. स्वामी मालिकेचे जे चित्रीकरण प्रथम झाले होते त्यात रमाबाई सती जाते असा प्रसंग शेवटच्या भागात होता. त्याच सुमारास राजस्थानमधे रूपकुंवर ही महिला सती गेली व त्यावरून प्रचंड वादळ उठले. सतीच्या प्रथेचे कोणत्याही प्रकाराने गौरवीकरण माध्यमातून केले जाऊ नये असा योग्य निर्णय त्यावेळी सरकारने घेतला. मूळ कथेतील गंभीरता तर टिकली पाहिजे पण सती जाणे या परंपरेचा साधा उल्लेखही होता कामा नये या कात्रीत सापडलेले मालिकेचे लेखक व दिग्दर्शक यांनी हे गाणे वापरून या मालिकेची हृदयाला भिड्णारी समाप्ती केली होती.
'स्वामी' काद॑बरी म्हणजे एक साहित्यलेण॑च आहे.. सुदैवाने त्यावर आधारित मालिकाही चा॑गली झाली होती. गजानन जागीरदारा॑सारखे अनुभवी दिग्दर्शक आणि श्रीका॑त मोघे॑सारखे कल्पक निर्माते लाभल्यामुळे मालिका जमली. सगळी पात्रे काद॑बरी वाचता॑ना जशी इमॅजिन केली होती तशीच होती. माधवराव- रवि॑द्र म॑कणी, रमाबाई- मृणाल देव, गोपिकाबाई- दया डो॑गरे, राघोबा- श्रीका॑त मोघे, सखारामबापू- सुधीर दळवी, त्र्य॑बकमामा पेठे- रवि पटवर्धन, ग॑गोबातात्या- बाळ कर्वे, श्रीपती- उदय टिकेकर, विसाजीप॑त लेले- अन॑त जोग, मल्हाररा॑व होळकर- सूर्यका॑त, रामशास्त्री- अभ्य॑कर (नाव विसरलो) अशी सॉलिड स्टारकास्ट होती.
स्वामीचे चित्रिकरण पुण्यातल्या विश्रामबागवाड्यात झाले होते.
मस्त लिहिले आहेत तात्या.. पुरिया धनश्रीतल्या 'पायलिया झनकार..' ची रम्य आठवण झाली. हाच राग ए.आर. रहमानने 'हाये रामा ये क्या हुआ' (र॑गीला) या गाण्यात मस्त वापरला आहे.
तात्या,
गाण्याचं विश्लेषण मस्त केले आहे, लेखन आवडले.
पुरियाधनाश्री म्हणजे प्रार्थना, पुरियाधनाश्री म्हणजे आर्तता! केवळ अन् केवळ समर्पणाची भावना असलेला, असा हा एक विलक्षण स्वरसामर्थ्य असलेला राग!
क्या बात है !!! पुरियाधनाश्रीची ओळख आवडली.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाय रामा ये क्या हुआ रंगीला
रुत आ गयी रे १९४७ - अर्थ
लबोंसे चूम लो, आंखोंसे थाम लो मुझको आस्था
कितने दिनोंके बाद है आयी ,सजना रात मिलनकी..." आये मिलन की रात
रंग और नूर की बारात किसे पेश करूं ..( फिल्म आठवत नाही...)
अहाहा आत्ता सगळी गाणी जमेल तशी वाजवून पाहत आहे...
मजाय हं यात....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
रंग और नूर की बारात किसे पेश करूं ..( फिल्म आठवत नाही...)
गझल.. स॑गीत मदनमोहन नामक एक शापित यक्ष.. मनाला विव्हल करणारे अप्रतिम गाणे रफीसाहेबा॑च्या स्वर्गीय सु॑दर आवाजात सुनील दत्तने पडद्यावर साकार केले आहे. त्याच चित्रपटातले 'नगमा और शेर कि' हेही गाणे असेच सैरभैर करणारे आहे..
(मदन मोहनचा वेडा) प्रसाद
तात्या,
खरंच प्रेम हे मुकंच असतं. समजून घेणार्याला ते कळलं तर प्रेम करणारा नशिबवान असतो...
अतृप्तीची भावना वाईट नसते! आयुष्याच्या सार्थकतेची, भरभरून जगलेल्या सहजीवनाची किनार जर त्या भावनेला असेल तर त्या अतृप्तीतही कुठेतरी एक आनंद असतो, एक समाधान असतं! परंतु जर तिथे अकाली, ऐन तारुण्यात आलेल्या मृत्युची एक भकास किनार असेल तर त्यातून आलेली अतृप्ती ही जीवघेणी ठरते, सरभैर, बेचैन करणारी ठरते!
एकदम पटलं.
वेदना जेवढी सुंदर बोलते तेवढं कुणीच बोलत नाही!
हे अगदी खरंय.
अतिशय सुंदर विश्लेषण केलं आहे गाण्याचं. मालिका थोडिफारच आठवते. पण कादंबरीची पारायणं केली आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
सुंदर गाणे....
छान आठवणी स्वामी मालिकेच्या च्या....
अतृप्तीची भावना वाईट नसते! आयुष्याच्या सार्थकतेची, भरभरून जगलेल्या सहजीवनाची किनार जर त्या भावनेला असेल तर त्या अतृप्तीतही कुठेतरी एक आनंद असतो, एक समाधान असतं! परंतु जर तिथे अकाली, ऐन तारुण्यात आलेल्या मृत्युची एक भकास किनार असेल तर त्यातून आलेली अतृप्ती ही जीवघेणी ठरते, सरभैर, बेचैन करणारी ठरते!
मस्त ओळी.....
तात्यांनी अगदी भारावुन लिहिल्यामूळे सर्वच लिखाण मनाला भिडते.
माधवारावांचा गुणग्राहकत्व मनालाही प्रत्यक्ष इतिहास वाचताना मनाला भिडते. सखारामबापू हे साडेतिन शहाण्या पैकी एक. दुर्दैवाने त्यांचे आणि माधवरावांचे पटले नाही. त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. नागपूरचे भोसले माधवरावांच्या विरुद्ध आणि त्यांनी लढ्यासाठी पुण्याकडे प्रयाण केले अशी पार्श्वभूमी, माधवरावांना हा लढा नको होता त्याचबरोबर हा टाळता येणार नाही हेही समजले होते.
अश्या पार्श्वभूमीवर भोसल्यांचा वकिल सखारामबापू बोकिल यांना भेटण्याची अनुमती मागतो. माधवराव परवानगी देतात. बापू आणि वकिल २ तास एकत्र बसतात आणि संवादा शिवाय बैठक संपते. माधवराव हेराला विचारतात काय वार्ता झाली काय? तो म्हणतो काहीच बोलणे झाले नाही, फक्त एकदा बुद्धिबळाचा खेळ चालु असतांना बापू बोलले की राजा दोन घरे मागे घ्या.
८/१० दिवसांनतर कळते की भोसल्यांचे सैन्य माघारी गेले आहे.
माधवराव बापुंना चांदीचा बुध्दिबळाचा संच भेट म्हणून पाठवतात.
मराठ्यांच्या राजकारणातील हा परमोच्च बिंदु असावा.
इतिहास तज्ज्ञ आणि विष्लेषक ( १/२ शहाणा) कलंत्री
स्वामी मालिका फारच छान होती... ते शेवटचे गाणे आत्ता आठवत नव्हते... लिन्क पाहिली....
खूप छान...
मंडळी, पुरियाधनाश्री बद्दल मी काय लिहू? माझे शब्द खूप तोकडे आहेत! पुरियाधनाश्री म्हणजे प्रार्थना, पुरियाधनाश्री म्हणजे आर्तता! केवळ अन् केवळ समर्पणाची भावना असलेला, असा हा एक विलक्षण स्वरसामर्थ्य असलेला राग! उत्तर संध्याकाळच्या सुमारास गायला जाणारा. ...जर तिथे अकाली, ऐन तारुण्यात आलेल्या मृत्युची एक भकास किनार असेल तर त्यातून आलेली अतृप्ती ही जीवघेणी ठरते, सरभैर, बेचैन करणारी ठरते!
वाह तात्या...काय एकेका रागात साली ताकद असते...
उत्तम लेख... मजा आली....
........ अवांतर : आम्हाला मारवा रागाने सुद्धा सालं असंच भकास, अतृप्त, सैरभैर आणि बेचैन वाटतं.... ( पुरिया मारवा थाटातलाच का? )
तुम्ही अजून वेगवेगळ्या रागांबद्दल असंच लिहा..
_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
मस्त. हे गाणं मी विसरुन गेलो होतो पण तुमच्या लेखाने पुन्हा ते ऐकण्याचा आनंद दिलात.
अप्रतिम काव्य, तेवढीच उत्तम चाल आणि सुरेल आवाज! क्या बात है! 'पूरियाधनश्री' ने हेलावून जायला होतं.
धन्यवाद तात्या.
(स्वगत - 'बसंतच्या' लग्नाचा समारंभ पुढे कधी सुरु होणार? :W :? )
चतुरंग
अप्रतिम लेख झाला आहे. खरच ह्या गाण्याचे शब्द, सुर, गायिकेचा भावपूर्ण आवाज, दिग्दर्शन आणि कलाकारांचा साधा अभिनय सगळच सुरेख! मी ही हे गाणे खूप दिवस शोधत होते, निदान नुसते ऐकायला तरी मिळेल म्हणुन, पण त्याबरोबर व्हिडीओ दुवा आणि तुमचा अप्रतिम लेखही मिळाला म्हणजे दुग्धशर्करा योग! धन्यवाद!
>>उलट प्रेम तर बर्याचदा मुकंच असतं! ते एकमेकांचं एकमेकांनी समजून घ्यायचं असतं!>>
खूप दिवसांनी मनमोकळं रडले..... कचेरीत असूनही स्वतःला लपवून रडले.
इतकं सुंदर, इतकं सुंदर कोणी लिहू शकतं सहजीवनाबद्दल? किती हळूवार .... किती किती सुरेख.
विश्वास .... सहजीवनाचा पाया!!!
तात्या मला फार अवडला हा लेख .... माझी पहीली -वहीली वाचन-खूण भलतीच गोजीरवाणी निघाली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
अतिशय सुरेख गाणे, मनाला भिडणारे शब्द आणि पूरियाधनश्री!
शिवाय ज्यांच्यावर हे गाणं बेतलंय ती रमामाधवासारखी मनाला हुरहूर लावणारी जोडी!
त्या सुरांत जी डोळ्यांत टचकन पाणी आणण्याची ताकद आहे त्यांचे वर्णन काय करावे? केवळ अप्रतिम!
धन्यवाद तात्या, इतक्या सुंदर गाण्याची अशी हळूवार आठवण करून दिल्याबद्दल!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
अतिशय सुरेख राग आणि तितकंच सुंदर गाणं. मला 'मालवून टाक दीप' ऐकताना सुद्धा नेहमी असंच एखादं महालातलं राजेशाही तरुण जोडपं डोळ्यासमोर येतं. का कोण जाणे पण या रागांच्या स्वरांनाच ( कोमल रिषभ, तीव्र मध्यम, शुद्ध निषाद ) असं काही खानदानी वजन आहे असं वाटतं.
तात्या, अगदी भारावून टाकणारे लिखाण.
संगीत व इतिहास आपले हातखंडा विषय मग काय बहारच बहार.
आणखी येऊ द्या हो. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत
मंत्रमुग्ध करणारे शब्द आणि तशीच चाल, गायन @)
शब्दांना पुर्ण गुण द्यावेत की गायनाला ? काही कळत नाही :?
पहिल्यांदा मालिका बघीतली तेव्हा हे गाणं एवढं काही कळलं नाही(कदाचीत वयामुळे :) )
पण आता हे गाणं परत ऐकून, जी काही अवस्था झालीय ती शब्दात नाही सांगता येणार :<
धन्यवाद तात्या!
प्रतिक्रिया
तात्या
वाह : क्या कहेने
वा तात्या...
केवळ अप्रतिम
फारच छान
तात्या,
सुंदर
सुंदर...
मस्त लेख!
स्वामी
थोरले आबासाहेब व सईबाई!
डोळ्यात पाणी...
जो जनतेचे रक्षण करतो, पालन करतो
जो जनतेचे
जो जनतेचे ...
सुरेख
धन्यवाद
टचिंग..
सती जाण्याचा प्रसंग
छान.
'स्वामी'
मस्त !!!
सुंदर
सुंदर लेख!
पुरिया धनश्री...
रंग और नूर
उरले ना वेगळाले!
वा....
सुंदर लेख
सुंदर लेख...
गुणग्राहक राजा.
स्वामी
वा वा वा तात्या, एकदम कातिल आठवण!
वा तात्या
यू ट्यूब
आभार...
माझे मन.....
अप्रतिम लेख
सुंदर!
>>उलट प्रेम
सुरेख गाणे
अतिशय सुरेख राग
आता मी श्रीमंत होणार !!
संगीत व इतिहास आपले हातखंडा विषय मग काय
निशब्द!!!
येऊ द्या
एक आवडते गाणे
मी भूतकाळात गेलो
मंत्रमुग्ध