बाल आणि बालाजी

कैलासराजा's picture
कैलासराजा in काथ्याकूट
21 May 2008 - 1:40 pm
गाभा: 

तिरुपती बालाजी ला जावून लोक टक्कल का करतात ?

प्रतिक्रिया

वेलदोडा's picture

21 May 2008 - 1:51 pm | वेलदोडा

देवाला केस वाह्ण्याची तिथे री त आहे. तिथे देवाला केस वाहणे हे पुण्यकर्म , एक धार्मिक कार्य समजतात. त्यामुळे दर्शनाला जाण्यापूर्वी लोक मुंडन अर्थात टक्कल करतात बाकी अशी रीत का आहे ह्याचा जाणकारांनी उलगडा करावा.
हे केस लिलावात मोठमोठ्या किमंतीना विकले जातात. अनेक फार्मास्युटिकल , कॉस्मॅटिक कम्पन्या हे केस विकत घेतात.

प्रियाली's picture

21 May 2008 - 6:18 pm | प्रियाली

असे वाहलेले केस विकण्यापासून भारतात सुमारे ६२ मि. डॉ.चा व्यवसाय होतो असे कालच वाचले.

हे केस प्रामुख्याने ज्यू लोक विकत घेत असत. ज्यू धर्मसंकल्पनेप्रमाणे बायकांनी केस दाखवू नयेत असा संकेत असल्याने बायका हे विग्ज वापरत असत. जेव्हा हिंदू देवाला दान केलेल्या केसांचे विग आपण वापरतो हे त्यांना कळले तेव्हा अशा केसांची जाहिर होळी करण्यात आली.

संदर्भः डोन्ट नो मच अबाऊट मायथॉलॉजी - केनेथ डेविस

श्रीनिवास's picture

21 May 2008 - 2:23 pm | श्रीनिवास

माझ्या मते कारण असं असावं की देव आपल्याला इतकं देतो तर आपण त्याची परतपफेड कशी करणार ? म्हणून आपण असं काही तरी द्यायचं की जे मोजता येणं केवळ अशक्य असेल. आता केस हे अगणित असल्यामुळे तिथे केस दान करत असावेत.

विसोबा खेचर's picture

21 May 2008 - 4:59 pm | विसोबा खेचर

केस हा माणसाचा मानबिंदू असतो. आपल्या केशरचनेच्या बाबतीत माणूस अत्यंत जागरूक व आग्रही असतो. भांग पाडण्याची ष्टाईल, केसांची निगा राखणे, आरशात पाहून ठीकठाक केस विंचरून आपण नीट दिसतो आहोत ना, इत्यादी गोष्टी माणूस वारंवार अन् वरचेचर करत असतो. माणसाचा सारा अभिमान त्याच्या केसात असतो असं मानलं गेलं आहे. आणि म्हणूनच तिरुपतीला जाऊन गोटा करून घेऊन सगळा अभिमान प्रतिकात्मक रुपाने ईश्वरासमोर उतरवायचा असतो अशी धारणा आहे..

आपला,
तात्याबालाजी.

भडकमकर मास्तर's picture

21 May 2008 - 6:14 pm | भडकमकर मास्तर

माझा एक मित्र ( जो एरवी देव देव करणारा नाही आणि इतर देवस्थानांची मॅनेजमेंट वगैरे वरती फारसे बरे बोलत नाही)
तो तिकडे एकदा केस उतरवून आला आणि भारावून असेच बोलत होता... की शब्दांत सांगणं कठीण आहे पण एकदम सगळा गर्व उतरून गेल्यासारखे वाटले...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आर्य's picture

21 May 2008 - 6:06 pm | आर्य

केस दान करून घेऊन सगळा अभिमान प्रतिकात्मक रुपाने ईश्वरासमोर उतरवायचा असतो अशी धारणा आहे
हेच कारण माझ्याही ऐकीवात आहे.

काही लोकांना सर्वस्व दान केल्यावरही मंदिर ऊत्पनाची माहीती हवी असते, यांच्या अधिक माहीती साठी -
मंदिराचे वार्षिक अंदाजपत्रक -अंदाजे १२१६ कोटी (०७-०८)
(ऊत्पन - ४२५ कोटी निव्वळ हुंडीतुन, ३११ कोटी गुंतवणुकीतुन, १०० कोटी केस दानातुन + ईतर)
( अन्य हुंडी उत्पन्न - ५ किलो हिरे +रत्न , २ किलो मोती + ३५० किलो सोनं, ३५०० किलो चांदी ईत्यादी)
भाविक - ५० हजार ते १ लाख प्रतिदिन (५ लाख प्रतिदिन ब्रह्मोत्सव काळात)
मंदिर पुजारी - ८०० (२००७ पर्यंत) + १५०० सेवेकरी + अन्य =ऐकुण १४०००
क्षेत्र - ८०,६२८ ऐकर (हिंदू क्षेत्र -या क्षेत्रात हिंदूंखेरीज अन्य कोणत्याही धर्माला / कार्याला मज्जाव आहे.)
यादेवाची गोष्टही फार गंमतशीर आहे लवकरच सांगतो.

श्रीनिवास भक्त आर्य
भक्त वत्सल लक्ष्मीकांत व्यंकटरमणा गोविंदा - गोविंदा

कैलासराजा's picture

23 May 2008 - 8:33 am | कैलासराजा

सन्मित्र श्रीनिवास जी,
सान्गणार बालाजी भगवाची कथा सान्गणार होता ती वाचण्याची मी वाट पहात आहे....
आपका स्नेहाभिलाशी कैलासराजा.....

केस हे मनुष्याच्या अहंकाराचे प्रतीक आहे. आपण आपला अहंकार बाजुला ठेवुन देवाच्या दर्शनाला गेलो तर देव आपल्यावर प्रसन्न होतो अशी धारणा आहे.केस पुर्ण काढल्या मुळे आपला अहंकार नष्ट पावतो व आपण खरया अर्थाने देवासमोर नतमस्तक होतो. म्हनुन केशदान करुन तिरुपतीचे दर्शन घेतले जाते. अशी माहिती मला मिळाली. जय गोविंदा
वेताळ