अनाथ लेकरायची माय
अनाथ लेकरांची माय सिंधुताई सपकाळ. दोन हजारापेक्षा अनाथ मुलांना सांभाळणारी. घरातून हाकलून दिल्यानंतर वणवण फिरणारी. आपल्या पोटच्या मुलीला दुस-याकडे सोपवून मोठ्या जिद्दीने अनाथ मुलांना सांभाळणारी. अशी ही माय गावोगाव आपले अनुभव सांगत असते. आपण काय जगतो त्या कष्टांचा पाढा वाचते. आयाबायांना जगायची हिम्मत देते. त्यायचे अनुभव ऐकतांना डोळे भरतात. तीन वर्ष भीक मागावी लागली. स्मशानात झोपावं लागलं. काय नी काय अनुभव. वक्तृत्त्व पाहिल्यानंतर बहिणाबायची आठवण येते. आता कितीतरी पुरस्कार आणि कितीतरी मोठं काम चालू आहे. अनुभव कथन संपल्यानंतर लेकरांसाठी जमले तशी मदतीची हाक भरते. अनुभव ऐकायला आलेल्या लोकामधी झोळी फिरवते. जमलेल्या पैशातून मुलांना सांभाळते. त्यायच्यावर ’मी सिंधुताई सपकाळ’ असा सिनेमा बी निघालाय.’सिनेमातलं तुमचं आयुष्य खरं खुरं हाय काय ” असं इचारल्यावर त्या म्हणल्या ”मी नव-याकडे परत जाते तेवढा प्रसंग सोडला तर सारं बरोबर उतरलं हाय” अशी माय म्हणते. ज्याला कोणीच नाय अशा लहानग्या लेकरायला जगवणारी आणि त्यायची माय होणारी अशी माय जगावेगळीच नाय का. त्यायच्या कार्याची चर्चा व्हावी,वळख व्हावी. अजून माहिती असलेले नसलेले गोष्टी कळाव्या म्हणून ह्यो धागा प्रपंच. ह्यो एक आन ह्यो एक व्हिडो पाहा.
वर्गीकरण
उत्तम वक्तृत्व
धन्यवाद बाबुराव
............ काहिही शब्द
मदर तेरेसांसारखीच गाथा आहे.
अधिक माहिती
खरचं खूप मोठं कार्य करताहेत सिंधूताई
सलाम!
सिंधुताई सपकाळ यांना माझा
आभार.................