आजी-माजी संमेलनाध्यक्षांची ग्रंथनगरीकडे पाठ..
आजपर्यंत मराठी साहित्यिकाच्याच बाबतीत जे विधान केले जात होते ते आता संमेलनाध्यक्षांच्या बाबतीतही करावेसे वाटते. दिनांक २४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६:३०वाजता ग्रंथदिंडी दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये वेळेवर पोहोचली. त्यावेळी सपट परिवार लोकमानसचा चर्चेचा कार्यक्रम मुख्य मंडपात नुकताच संपला होता. चर्चेत डॉ. द.भि. कुलकर्णी हेही सहभागी होते. त्यामुळे ते त्याच मंडपात होते. ते ग्रंथप्रदर्शनासाठी येणार आहेत काय हे पहायला मी गेलो. तोपर्यंत त्यांना कोणी चहा दिला नव्हता. म्हणून चहाची ऑर्डर द्यायला मी मंडपाच्या बाहेर आलो खरा...! पण त्याचवेळेस श्री. उत्तम कांबळेसाहेब ग्रंथदिंडी घेऊन पोहोचले सुद्धा. द.भि. कुलकर्णींना बोलावले गेले. ते तसेच मंडपातून त्यास्थळी आले. कांबळे आणि कुलकर्णी मिळून लाल फीत सोडून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करणार होते. मिडियावाल्यांचे कॅमेरे सरसावले गेले. फीत सोडून उद्घाटन झाले. टाळ्या वाजल्या. पटापट शंभरएक फोटो निघाले. चला, आता दोघेही प्रथेप्रमाणे ग्रंथप्रदर्शनात येणार अशी माझी भावना होती. मात्र, बाहेरच असलेल्या एका स्टॉलवरच्या एका पुस्तकाचे प्रकाशन दभिंनी त्या स्टॉलवरच केले. १० फोटो झाले. त्यानंतर त्या गर्दीतून वाट काढत श्री. कांबळे कसेबसे त्या स्टॉलमध्ये पोहोचले. मात्र, सर्व फोटो झाल्यामुळे सर्वजण बाहेर पडले. चला, आता पुढील स्टॉलवर दोघे जातील असे वाटले. पण, झाले भलतेच!
महिला साहित्यिकांनी दभि आणि कांबळे यांना प्रकाशन मंचावर बोलावले. तेथे काही भाषणे झाली. पुन्हा फोटोसेशन. सर्वांनी आपापली हौस भागवून घेतली. आता त्यानंतर तरी ज्या ग्रंथनगरीचे उद्घाटन केले तेथे हे दोघे जातील असे वाटले. पण नाही. मंचावरून कांबळे खाली उतरले. मात्र दभि वरच होते. तेथे त्यांची मुलाखत सुरू झाली. एक चॅनल झाले कि दुसरे. दुसरीकडे कांबळे एक-दोन मिनिटे एकटेच दिसले. त्यामुळे त्यांना सांगण्यासाठी मी गेलो. तेवढ्यात एक चॅनलवाला पुन्हा आडवा आला. त्याने श्री. कांबळे यांना बाजूला बोलावले. कॅमेरा सरसावला. मुलाखत सुरू झाली. जशी मुलाखत सुरू झाली तसे गुळाभोवती मुंगळे जमा व्हावेत तसे लोक कांबळे यांच्या आजुबाजूला जमा झाले. अधून-मधून टाळ्याही पडत होत्या. त्या नेमक्या का पडत होत्या हे पहायला मी तेथे थांबलो नाही. कारण, पुढे काय होणार आहे हे मला माहीत होते. दभिंच्या मुलाबरोबर मी तेथेच पायरीवर गप्पा मारत बसलो. कांबळे यांची मुलाखत झाल्यावर ते निघून गेले. दभिंची मुलाखत झाल्यावर मी उठलो. आता दभि मोकळे झाले असे वाटले. पण पुन्हा ते कोणाबरोबरतरी निघाले. तोही चॅनलवालाच होता. त्याने मला सांगितले की दभिंची आता लाईव्ह मुलाखत आहे. त्यामुळे ते येऊ शकणार नाहीत. त्यावेळी साडेसात झाले होते. साडेनऊ वाजेपर्यंत सर्वजण सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेत होते की काय करीत होते माहीत नाही.
मात्र, ज्या ग्रंथनगरीचे उद्घाटन या (सा)मान्यवरांच्या हस्ते झाले ते फक्त आपल्या प्रसिद्धीशिवाय दुसरे काहीच बघू शकत नाहीत की काय असे वाटते. साहित्यिकांना आपली पुस्तके काढायला प्रकाशक लागतात. मात्र त्या प्रकाशकांसाठी थोडा वेळ द्यावासाही त्यांना वाटत नाही.
दुसरीकडे दुकान मांडून बसलेल्या प्रकाशकांना साहित्याशी काहीच देणेघेणे नसते. फक्त आपली पुस्तके कशी प्रसिद्ध होतील एवढेच त्यांना हवे असते असे दिसले. एकंदरीतच अशी संमेलने भरतातच कशाला? असे वाटल्याखेरीज राहिले नाही.
संमेलनात आणखी बर्याच उणीवा दिसल्या. त्या नंतर सांगेन.
वर्गीकरण
(प्रस्थापित असतात प्रगल्भ हे गृहीत धरायचे असते )
मीही एक दिवस या साहित्य
ग्रंथनगरीकडे पाठ फिरवली तर
मेनु
या संमेलनांना 'सहित्य संमेलन'
अत्यंत दु:खद घटना
अध्यक्ष होणारी साहित्यिक