Skip to main content

मिपा व ईतर संस्थळांवर वैचारीक चर्चा करुन........

मिपा व ईतर संस्थळांवर वैचारीक चर्चा करुन........

Published on 07/12/2010 - 23:49 प्रकाशित मुखपृष्ठ

याद्या 1184
प्रतिक्रिया 19

मिपा व इतर संस्थळांवर वैचारिक चर्चा करुन मला भोवतालची नवीन माहीती मिळते व ज्ञानात भर पडते परंतु ह्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कोणताच परिणाम सत्यस्थितीवर होतोच असे नाही. हं! माझी वाद घालायची क्षमता वाढते पण इतरांवर काही परीणाम होत नाही,नसती बडबड ती! इतरः १. बर्‍याचदा माझी करमणूक होते. २. बर्‍याचदा या लोकांना वाद घालायला एवढा मोकळा वेळ कसा त्याचा हेवा वाटतो. ३. कधीकधी या लोकांना सक्तमजूरीची शिक्षा फर्मावावी अशी इच्छा होते. ४. कधीतरी लोकांची नावे बघूनच मी प्रतिसाद वाचत नाही. तेव्हा स्वतःच्या स्मार्टनेसचे कौतुक वाटते. ५. वगैरे वगैरे (शिक्रेट आहे.) हलकेच घ्या.

In reply to by प्रियाली

मला भोवतालची नवीन माहीती मिळते व ज्ञानात भर पडते. असचं मी म्हणेन.

In reply to by विकि

@प्रियाली आपण आपले मत मांडलेत्,चांगलय्,हलके वगैरे घेण्याचे काय गरज? @बिपिन कार्यकर्ते मी वाद घालण्यासाठीच लेख लिहतो असे आपले मत झाल्याचे वाटते.पण तस नाहीये. @अवलिया +१ :-) आपले मतही नोंदवा @विकि,शुची,चिंतामणी,३_१४ विक्षिप्त अदिती प्रतिसादाबद्दल आभार. येथील काही टीकाकारांचे मी अनुकरण करत नाही,कारण प्रत्येकवेळी गरज नसताना टीका ,मस्करी करणे म्हणजे तुच्छ विचार होत ह्याचे त्यांना ज्ञान नाही.पण मला आहे.मी अनेक संस्थळांवर वावरलो आहे.तेव्हा आता त्यांना दुर्लक्षित करणेच योग्य समजतो. अकुल,अधर चित्तधारा | तात्पर्य तुच्छ व्यक्तित्व |

In reply to by pramanik

माहिती व ज्ञान यात मुलभूत फरक आहे..आपणास माहिती आहे म्हणजे ज्ञानी आहोत असे असते तर गुगळुन सारे जग ज्ञानी झाले असते

In reply to by प्रियाली

तू हुशार असण्याचं मिपावरच वाचलं होतं ते खोटं नाही तर! (मी इथे नाहीये, पळाले आहे आधीच.)

In reply to by प्रियाली

मिपा व इतर संस्थळांवर वैचारिक चर्चा करुन मला भोवतालची नवीन माहीती मिळते व ज्ञानात भर पडते परंतु ह्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कोणताच परिणाम सत्यस्थितीवर होतोच असे नाही. हं! माझी वाद घालायची क्षमता वाढते पण इतरांवर काही परीणाम होत नाही,नसती बडबड ती! इतरः १. बर्‍याचदा माझी करमणूक होते. २. बर्‍याचदा या लोकांना वाद घालायला एवढा मोकळा वेळ कसा त्याचा हेवा वाटतो. ३. कधीकधी या लोकांना सक्तमजूरीची शिक्षा फर्मावावी अशी इच्छा होते. ४. कधीतरी लोकांची नावे बघूनच मी प्रतिसाद वाचत नाही. तेव्हा स्वतःच्या स्मार्टनेसचे कौतुक वाटते. ५. वगैरे वगैरे (शिक्रेट आहे.)
+१
हलकेच घ्या.
आग्रह नाही. ज्याने त्याने आपापल्या कुवतीप्रमाणे करावे.

In reply to by प्रियाली

ऑल ऑफ द अबौव्ह अॅँड देन सम म्हणणारा प्रियालींचा प्रतिसाद आवडला. अदिती म्हणते त्याप्रमाणे हुशारीची चुणूक दिसतेच. (हलकेच घेणे)

In reply to by राजेश घासकडवी

अदिती म्हणते त्याप्रमाणे हुशारीची चुणूक दिसतेच. (हलकेच घेणे)
हा मला अपमान वाटतो त्यामुळे मी अदिती आणि राजेश यांचा निषेध करत आहे. मी हुशार सोबत हायटेक आणि रामसे चान आहे हे कृपया विसरू नये. काही सर्वद्वेष्टेही याला पुष्टी देऊ शकतील असे वाटते. असो. ;)

In reply to by प्रियाली

सगळेच पर्याय कसे निवडावे या विचारात असताना हा प्रतिसाद वाचला आणि +१!!

मी बरीच घुमी बनले होते. तो घुमेपणा दूर झाला. लहानपणापासून मला सा।हीत्य (कविता विशेष) आवड होती. इथे समानशील-व्यसनेषु माणसे पाहून खूप छान वाटलं. संस्थळांवर माणसांची मनं, विचार या अमूर्त गोष्टी जवळून पहायला मिळतात जे या जन्मी अन्य कोणत्याही मार्गी शक्य नव्हते. म्हणून मला हे कट्टे (क्लब्ज) आवडतात. वाद घालण्याची क्षमता वाढलीच पण त्यापेक्षाही मनाला संवेदनशीलता पुनर्प्राप्त झाली याचं जास्त कौतुक वाटतं.

मिसळपाव वरिल चर्चे ने भारताचे परराष्ट्र धोरण ठरण्यास मदत होते. बाकी मग वांझोट्या चर्चा आम्ही लांबुनच स्किप करतो :) त्यामुळे त्यातुन स्वतःला जज करण्याची गरज भासत नाही . 'चर्चा' केल्यामुळे 'क्षमता' वाढते हे रोचक वाटले :)

या स्थळावर वैचारीक चर्चा करून आपण या भवसागरात तसेच मिपानामक किंवा एकंदरच जालसागरातही किती सूक्ष्म आहोत, याची जाणीव होते. नि मग अतिसूक्ष्म झालेले आम्ही खसखशीच्या सूक्ष्म दाण्यावरच्या आमच्या लाडक्या सूक्ष्म बाप्पाला शरण जातो. तो पर्याय नसल्याने 'इतर'ला मत दिले आहे. (गणेशभक्त)बेसनलाडू

इतर संस्थळावर जात नाही. आपण जाता हे कौलाद्वारे कळवल्याबद्दल धन्यवाद. साला आजकाल स्वगृह कुठले आणि खरडफळा कुठला हेच कळेनासे झाले आहे.

In reply to by वेताळ

माझी अध्यात्मातील प्रगती अजस्त्र व अफाट झाली आहे. एकापेक्षा अधिक हट्ट न सोडणारे विक्रमादीत्य वेताळाच्या अध्यात्मिक प्रगतीस कारणीभूत असावेत. ;)