Skip to main content

तुला आपलेसे करावे किती ?...

लेखक मयुरेश साने यांनी रविवार, 05/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
तुला आपलेसे करावे किती ? जगावे किती ? मी ! मरावे किती ? किनाराच मी ! भरती ओहटिचा बुडावे किती ? मी ! तरावे किती ? तू जवळून जाता ! मनी बाग फुलते तू खुडावे ! मी ! मोहरावे किती ? तुझी याद येते ! तसा तोल जातो सावरून मी ! वावरावे किती ? ते "कुबेरास- लक्ष्मीस" घेऊन आले लिलावात माझ्या ! हरावे किती ? चांदणे सारखे आज जाळू पहाते तुझे आज नसणे स्मरावे किती ? मिठी दे युगांची ! धुके दूर सारु फुलांनीच दव पांघरावे किती ? तुला "मी "- मला "तू" - मला "तू" - तूला "मी" परक्या परी -हे झुरावे किती ? मयुरेश साने...दि.०५-डिसेंबर-१०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1341
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

कविता चांगली आहे. लिहीत रहा. मिठी दे युगांची ! धुके दूर सारु फुलांनीच दव पांघरावे किती ? इथे मला मिठी दे, युगांचे धुके दूर सारु अधिक आवडलं असतं.

ते "कुबेरास- लक्ष्मीस" घेऊन आले लिलावात माझ्या ! हरावे किती ? थोडे संदिग्ध वाटते आहे. कविता आवडली. गझल असे नाही म्हणणार कारण, थोडी वृत्ताची गडबड वाटते आहे. किनाराच मी ! भरती ओहटिचा बुडावे किती ? मी ! तरावे किती ? तू जवळून जाता ! मनी बाग फुलते तू खुडावे ! मी ! मोहरावे किती ? हे छान!