भोचकगुरुजी,
अतिशय प्रासादिक आणि सात्विक लेख लिहिला आहे. वाचून प्रसन्न वाटलं!
हा नारळ थोडा भाजला गेल्यानंतर होळीतून बाहेर काढला जायचा. आणि मग तो फोडून त्यातलं खोबरं खायचं. या खोबर्याची चव निव्वळ अप्रतिम. होळीच्या धुराचा सुगंधही या खोबर्यात मिसळलेला असायचा. तो गंध आजही आठवण काढली तरी नाकात येतोय.
क्या बात है, मिलाव हाथ! अगदी मनातलं बोललात बघा भोचकगुरुजी! :)
लेख वाचून 'हावलूबाई'च्या आमच्याही लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या! अजूनही असेच उत्तमोत्तम लेखन अवश्य येऊ द्या!
अवांतर - का माहीत नाही, परंतु आप्पाकाकांचं व्यक्तिचित्र वाचावं असं उगाचंच मनात येऊन गेलं! खूप इंटरेस्टींग व्यक्तिमत्व असणार या आप्पाकाकांचं! :)
असो...
आपला,
(होलिकोत्सव प्रेमी) तात्या.
क्या बात है शेठ...
गावाकडले दिवस आठवले.
आमचा वात्रटपणा आणि चालूपणा अगदी असाच चालायचा...अगदी होळी नसतानाही :-))
पण होळीची खुमारी वेगळीच... ह्याला शिव्या दे त्याला शिव्या दे...आमची शिव्या॑ची स्पर्धाही चालायची मित्रा-मित्रा॑त, जो जि॑केल त्याला एक चॉकलेट बक्षिस :-)) आता सगळ्या वेडेपणाच॑ हसु येत॑ आणि आठवणी॑नी रडूही.
मजा आली!
आपला,
- (गावाकडचा) ध मा ल.
सगळ्यांचे आभार. तात्या मनातलं बोललात. फार दिवसांपासून अप्पाकाकांचं व्यक्तिमत्व लिहायचं हे मनात आहे. पण का कुणास ठाऊक लिहिलं जात नव्हतं. पण आता खरंच लिहायला पाहिजे असं वाटतंय. तु्म्ही म्हणता तसंच इंटरेस्टिंग होतं, त्यांचं जीवन.
प्रतिक्रिया
वा! वा!
क्या बात
सगळ्यांचे