शाहरुखसाहेबांनी नेमके काय म्हटले? त्याची लिंक द्याल काय?
------------------------
सुधीर काळे
बाद मुद्दत उन्हें देखकर यूँ लगा, जैसे बेकार दिलको करार आ गया!
एवढेच नाही तर बहुतेक गाणी आणि चित्रपट पंजाबच्या पार्श्वभूमीचे असतात. जणू पंजाब म्हणजेच भारत आहे की काय असे वाटावे. किंवा भारतात सर्वत्र पंजाबी संस्कृती आहे.
नितिन थत्ते
शहारुख जे बोलला त्यात आक्षेपार्ह काहीच वाटले नाही.
यांच्या मते पाकिस्तान हा उत्तम शेजारि आहे, आणि पाकिस्तानी खेळाडुंचे भारतात स्वागत आहे
"There are issues between India and Pakistan" हे ही तो म्हणाला. शिवाय पाकिस्तानला २०-२० मध्ये सहभागी करायचे की नाही ह्याचा निर्णय भारतातर्फे कोणत्या ढुढढाचार्यानी घेतला हे बघितले पाहिजे. एकदा सहभागी करुन घेतले की मग दोष देण्यात काय अर्थ आहे?
भेंडी
P = NP
शहारुख पाकी प्रेमी आहे की नाही माहित नाही पण धुर्त बिझनेसमॅन आहे हे नक्की.
भारतात नसताना त्याने पाकी खेळांडुंवर भाष्यकरुन वादाला तोंड फोडल.
(तो म्हणाला की जर आय पी एल ने संघातल्या परदेशी खेळाडुंच्या संख्येवरचे निर्बंध उठवले तर त्याके पाकी खेळाडुंना त्याच्या संघात स्थान दिल असत. )
जर त्याला खरच त्या पाकी खेळाडुंचा इतका पुळका होता तर त्याने लिलाव चालला असतानाच का बर पाकी खेळाडुंची निवड केली नाही?
तेव्हा त्याने सोईस्कर रितीने इतर विदेशी खेळाडुंची खरेदी केली.
तर या सगळ्यातुन त्याला त्याच्या येउ घातलेल्या चित्रपटाची सवंग प्रसिद्धी करयाची होती हे बालवाडीतल पोर पण सांगेल.
युएस युके मधुन त्याने सेने विरुद्ध विधान करुन वातावरण तापत ठेवल, पण काल-परवा मुंबईत उतरताच सपशेल कोलांटी उडी मारुन आपण माकडांचे वंशज असल्याची खात्री दिली.
(आता कुणी कुणाला माकड बनवले तुम्हीच ओळखा ;))
माझ्या मते आय पी एल मध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंची निवड नहोण्यात भारत सरकारचा हात होता असा कांगावा पाकिस्तान करीत होते.
शाहरूखने उलट पाकिस्तानच्या खेळाडूंना गुणवत्तेमुळेच निवडता आले नाही असे स्पष्ट केले. (आणखी जागा असत्या तर घेतले असते म्हणजेच जेवढ्या जागा होत्या त्यात निवड होण्याची त्यांची लायकी नव्हती असाच त्याच्या वक्तव्याचा अर्थ होतो).
उलट त्याने भारत सरकारची बाजू उचलूनच धरली आहे. त्याने माफी मागण्यासारखे काहीही नाही.
नितिन थत्ते
आणखी जागा असत्या तर घेतले असते म्हणजेच जेवढ्या जागा होत्या त्यात निवड होण्याची त्यांची लायकी नव्हती असाच त्याच्या वक्तव्याचा अर्थ होतो
पटत नाही. असं त्यानं स्पष्ट सांगितलेलं नाही. उलट निराशावादी सूरात म्हणाला तो असं. थोडक्यात काय .. "आपणांस पाकिस्तानी खेळाडूंना घ्यायची इच्छा होती परंतु आपण ते करू शकत नाही" (हे त्याचं विधान नाही) असं त्यानं अत्यंत धूर्तपणे स्पष्ट केलंय. म्हणजे आपण यात नाहीच! झाले की शाहरूखभाई मोठे! आणि येऊ घातलेल्या शीणेमाची फुकट प्रसिद्धी!! गणपाने नमूद केल्याप्रमाणे तो नक्कीच एक धूर्त बिझनेसमन आहे. आपल्या फायद्यासाठी कधी काय बोलावं याची त्याला व्यवस्थित जाण आहे. त्यामुळे त्याने भारत सरकारची बाजू उचलूनच धरली आहे हे आपलं विधानही पटत नाही. त्याने आपली बाजू सावरली इतकंच.
आता त्यानं माफी मागावी की मागू नये या राजकारणात आपल्याला रस नाही ब्वॉ!
(अवांतरः लायकीचं म्हणाल तर सध्या T20 साठी सर्वोत्तम अष्टपैलू निर्विवादपणे शाहीद आफ्रिदीच आहे! आणि बर्याच आयपीएल संघांची पहिली च्वाईससुद्धा. अर्थात खेळाडूंच्या निवडीवर पडलेल्या निर्बंधांपूर्वी! आता हे निर्बंध कुणी लादले, का लादले यावर आम्ही वक्तव्य न केलेले बरे, नाही का?)
-- माय नेम इज ओगले!
(प्रदर्शित होईल तेव्हा होईल, प्रसिद्धीकरता कुणास टार्गेट करू याचा विचार करतोय!)
हो आणि त्या सामन्यात कप्तानपद मिळाल्याने माजलाही होता!! वर काय तर म्हणे माझा संघ जिंकावा म्हणून मी असं केलं!!!
असो तो वेगळा मुद्दाय!
--
माफ करा.. अर्थातच, ही प्रतिक्रिया अदितीतैंच्या प्रतिक्रियेस उत्तर आहे.
मला पडलेले प्रश्न व संभाव्य उत्तरे:
१.शहारुखला पाकिस्तानी खेळाडुंचा पुळका का ?
त्याला आपले सिनेमे पाकिस्तानमधेही चालावे असे वाटत असावे.
२.एकाच दिवशी शहारुख व शिवसेना का थंडावले ?
आर्थिक व्यवहार पूर्ण झाले असावेत.
३.शरदराव भेटताच ऑस्ट्रेलियन खेळाडुंबद्दल पुनर्विचार करण्याची भाषा का सुरु झाली ?
उ त्तर दोन नंबरच्या प्रश्नाप्रमाणेच!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
प्रतिक्रिया
शाहरुखसाहेबांनी नेमके काय म्हटले?
शाहरुख हा
http://www.youtube.com/watch?
अहो हल्ली
भारत = पंजाब?
आक्षेपार्ह
शहारुख
उलट बाजू सावरून धरली
आणखी जागा
अवांतरः
हो आणि
आ.पी.एल
प्रश्न