सगळीच गीत रामायणातील गाणी मला फार आवडतात.
"आज का लतिकावैभव सले,पाहूनि वेलीवरची फुले"
"स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची"
"सावधान राघवा"
"रामावीण राज्यपदी कोण बैसतो"
वेड लाऊन जातात या ओळी.
सर्वच फार फार सुंदर गाणी आहेत हो....गीत रामायण खरेच फार अजब आणि आनंददायी काव्य आहे..
अवांतरः शब्दप्रभू ग.दि.मा. यांच्या कवितेच्या ओळी कुठल्यातरी लेखकाने उधृत केल्या होत्या. फार छान होत्या त्या.
'जा एकली, सखी तू,दोघे सुखात भेटा,
मी पाहीजे कशाला,फुलत्या फुलात काटा'
संपूर्ण कविता कोणाला माहीत असेल तर कळवावी.
पुण्याचे पेशवे
गदिमांनी केवळ गीतरामायणच जरी लिहिले असते तरी ते अजरामर झालेच असते!
गीतरामायणा संदर्भात एक किस्सा आत्ताच्या गीत रामायणामध्ये जे क्रमांक एकचे गाणे आहे ते गाणे मूळ गाणे नव्हे.
त्याबाबतची श्टोरी अशी - गदिमांनी पहिले मूळ गाणे बाबूजींना दिले त्याला बाबूजींनी चाल लावली सगळे झाले.
रेकॉर्डिंगच्या आदल्या दिवशी गाण्याचा कागदच हरवला!!
हवालदिल बाबूजी आण्णांकडे दाखल झाले, आण्णांनी विचारले काय झाले तर गाणे हरवल्याचे समजले.
सिध्दहस्त शब्दप्रभू म्हणाले "हात्तिच्या, एवढंच ना? हे घ्या दुसरं गाणं!" कागद-लेखणी घेऊन झटक्यास दुसरे गाणे तयार!
हेच ते "कुश-लव रामायण गाती स्वये श्री रामप्रभु ऐकती"!
त्याला बाबूजींनी लगेच स्वरबध्द केले आणि रेकॉर्डिंग सुरळित पार पडले!
प्रभु रामाची आणि सरस्वतीचीच कृपा!!
चतुरंग
प्रतिक्रिया
अगदी खरे आहे..
सहमत..
एकमेवाद्वितीय!