उत्तम लेख. आपण असल्या स्थानांपर्यंत जायची तसदी घेतलीत ह्याबद्दल आपले कौतूक. आम्ही कुठल्याही गावात गेलो तर सगळ्यात उपेक्षीत असलेल्या देवळात जाऊन १० मिन्टे टेकतो. गॅरेंटीड समधान मिळते.
- चंबा मुतनाळ
अशा प्रसिद्ध मंदिरांपेक्षा बहुतेकांना माहीत नसलेली आणि ज्या मंदिरांचे व्यापारीकरण झालेले नाही अशी मंदिरे फार छान/सुंदर्/स्वच्छ असतात..
रतनगड चे अमृतेश्वर मंदिर बघा ..मन कसे प्रसन्न होते...
अशा प्रसिद्ध मंदिरांपेक्षा बहुतेकांना माहीत नसलेली आणि ज्या मंदिरांचे व्यापारीकरण झालेले नाही अशी मंदिरे फार छान/सुंदर्/स्वच्छ असतात..
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
देव दर्शनाने मन प्रसन्न करणे आणि आत्मिक समाधान मिळवणे हा हेतु असतो.
परंतू आत्तापर्यंतचा अनुभव प्रशुंच्या अनुभवाप्रमाणेच होता.
प्रशुंनी गर्दीतली घुसाघूसी फक्त किहीलीय. अस्वच्छता ही गहन समस्या आहे असे मला वाटते.
मी अत्तापर्यंत भेट दिलेल्या एकाही तीर्थक्षेत्री मला पवित्र असे कधीही वाटले नाही, त्यामुळे प्रसन्न वाटले नाही, त्यामुळे आत्मिक समधान तर अजिबात नाही.
ह्याउलट अनुभव मला चर्च मधे येतो आणि विषेश म्हणजे चर्चमधे जाताना वहाणा काढाव्या लागत नसूनही स्व्च्छता वादातीत असते. चर्च मधल्या गहन शांततेमुळे देवशी संवाद साधता येउन आत्मिक समधान मिळते.
वरील सर्व प्रतिसादांशी सहमत.
चर्च बद्दल तेवढं मी खूप सांगू शकणार नाही. कारण प्रत्यक्षात मी चर्च मध्ये २-३ वेळाच गेलो आहे.
आणखी एक उपाय असा आहे की... त्या त्या देवाच्या ठरलेल्या दिवशी न जाता दुसर्याच कुठल्यातरी दिवशी दर्शनाला जाणे. म्हणजे...विठ्ठलाच्या दर्शनाला जाताना एकादशी नाही ना हे पाहून जाणे. शिवाय जमल्यास रविवार सोडून इतर दिवशी जाणे.
अर्थात हे त्यांच्यासाठीच, ज्यांना देवळात आत्मीक समाधानासाठी जायचं आहे ( केवळ नियम, नवस वगैरे म्हणून नाही. )
शिवाय स्वाच्छतेचा मुद्दा हा शिल्लक राहतोच :(
--स्वानन्द
वनी आनन्द, भुवनी आनन्द, मिपा वर स्वानन्द !
आपण जेव्हा चर्च आणि देवळातील स्वच्छता, शिस्त याची तुलना करतो तेव्हा एक गोष्ट विसरतो. चर्च एखाद्या ऑफिस सारखे चालवले जाते. चर्चच्या सभसदांना दर महिना ठरावीक रक्कम चर्चसाठी द्यावी लागते. चर्च स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घ्यावी लागते. आठवड्याची कामे नेमलेली असतात. नारळ फोडणे, हळद-कुंकू, फुले या मुळे होणारा कचरा नसतो. आपल्या इथली देवळे चालवलीच वेगळ्या पद्धतीने जातात. त्यातुन भ्रष्टाचार आपल्या पाचवीला पुजलेला. त्यामुळे भाविकांची गर्दी असणार्या देवळात तो आढळला तर नवल वाटायला नको. तरीही गावाकडची लहान देवळे छान स्वच्छ ठेवतात. दर्शनही निवांतपणे होते.
हिमाचल प्रदेशातील देउळे उपरोक्त अनुभवापेक्षा खुप चांगली वाटली.
हारतु-या साठी कुणी मागे लागत नाही. भिकारी एक ही दीसला नाही. स्वछता वाखणण्या जोगी. हिमाचल प्रदेश म्हणजे देवभुमीच सगळ (देवळातलं व देवळाबाहेरचा निसर्ग) वातावरण सुंदर वाटल. मन प्रसन्न झाल. मजा आली.
बाकी देव काही भेटला नाही. माणसांची गर्दी वाढल्याने बहुदा त्याने पळ काढला असावा."मन प्रसन्न करणे आणि आत्मिक समाधान मिळवणे" हा हेतु असेल तर विपश्यना एक सुंदर उपाय ठरु शकेल.
भवतु सब्ब मंगल
___________________________________________________
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
माझा अक्कलकोटचा अनुभव अगदी चांगला आहे. मी परवाच म्हणजे १७/११/२००९ ला गेलो होतो . दर्शन अतिशय उत्तम रीतिने झाले.बाकी तुळजापुरचा ५ते ६ वर्शापुर्वीचा अनुभव अतिशय वाइट होता.
समर्थांची क्रुपा दुसरे काय.
प्रतिक्रिया
वा
अशा
+१ सहमत
अस्वच्छता...
वरील सर्व
आपण जेव्हा
कुठे शोधसी रामेशवर अन कुठे शोधसी काशी
अक्कलकोट,