Skip to main content

प्रतिक्रिया

मिपा विडंबन स्पर्धा - मतदान : फजिती

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 19/03/2016 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरहो नमस्कार, मिपा विडंबन स्पर्धा, या एका आगळ्यावेगळ्या आणि काहीशा अनवट स्पर्धेला अनेक मिपाकरांनी हिरिरीने प्रतिसाद दिलेला आहे. प्रेम, राजकारण, फजिती या तीनही विषयांवर आधारित विडंबनांच्या प्रवेशिकांचा ओघ उत्साहवर्धक असा होता. विडंबनपटूंनी रंगांची उधळण तर करून झालेली आहे; आता वेळ आहे कुठला रंग सगळ्यात उठून दिसतो ते ठरवण्याची. आणि ही जबाबदारी स्पर्धेच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे सगळ्या मिपाकरांची आहे. मतदान ! आलेली एकापेक्षा एक सरस विडंबनं बघता, विडंबन करण्याइतकंच आव्हानात्मक हे मतदान असणार आहे.

मिपा विडंबन स्पर्धा - मतदान : राजकारण

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 19/03/2016 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरहो नमस्कार, मिपा विडंबन स्पर्धा, या एका आगळ्यावेगळ्या आणि काहीशा अनवट स्पर्धेला अनेक मिपाकरांनी हिरिरीने प्रतिसाद दिलेला आहे. प्रेम, राजकारण, फजिती या तीनही विषयांवर आधारित विडंबनांच्या प्रवेशिकांचा ओघ उत्साहवर्धक असा होता. विडंबनपटूंनी रंगांची उधळण तर करून झालेली आहे; आता वेळ आहे कुठला रंग सगळ्यात उठून दिसतो ते ठरवण्याची. आणि ही जबाबदारी स्पर्धेच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे सगळ्या मिपाकरांची आहे. मतदान ! आलेली एकापेक्षा एक सरस विडंबनं बघता, विडंबन करण्याइतकंच आव्हानात्मक हे मतदान असणार आहे.

भारतमाता की जय - वारीस पठाण आणि सर्वपक्षीय ठराव

लेखक गॅरी शोमन यांनी शनिवार, 19/03/2016 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
"भारतमाता की जय" चा जयघोष स्वातंत्र्य पुर्व काळापासुन होत आहे. भारतमाता की जय असे म्हणणे स्वातंत्र्यपुर्व काळात देशद्रोहाचे लक्षण असेल तर स्वातंत्र्योत्तर काळात असे न म्हणणे म्हणजे देशद्रोह आहे की काय असा चर्चेचा सुर आहे. ओवेसी यांनी तर घटनेत असे कुठे म्हणले आहे अस म्हणत उजव्या आणि कडव्या देशप्रेमी विचारधारेला कडाडुन विरोध दर्शवला आहे. उजवी विचार धारा सातत्याने आपल्या देशप्रेमाचे प्रदर्शन संघ स्थानावर करते जेणे करुन परकीय आक्रमणांच्या पुर्वी अनेक राजेशाही मधे विभागलेला खंडप्राय देश जरी तिर्थस्थाने, पुराणे आणि संस्कृतीने एकत्र असला तरी एकछत्री नव्हता.

प्रसिद्धीसाठी राष्ट्रद्रोह

लेखक रणजित चितळे यांनी मंगळवार, 15/03/2016 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारीच्या ९ तारखेला रशीद जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम अफझल गुरुला फाशी दिल्याच्या निषेधार्थ आयोजित केला होता व अशा तर्‍हेचे पोस्टर्स जेएनयूमध्ये सगळीकडे चिकटवली गेली होती. गेली तीन वर्षे अफजल गूरच्या फाशी दिनी असे कार्यक्रम होत होते अशा बातम्या आहेत. कार्यक्रमाची तयारी जोरात होती. ह्या समारंभाला कन्हैय्या व त्याच्या माववादी (डिएसयू) संघटनेचा पाठिंबा होता. ह्या कार्यक्रमाच्या रूपाने अर्थातच न्यायालयाची अवमानना केली गेली कारण फाशी न्यायालयाने ठोठावली.

नाव सोनीबाई आणि ................

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 07/03/2016 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
परदेशी कंपन्यांची ग्राहकांप्रती इतकी बांधीलकी असते की एखाद्या ग्राहकाने त्यांचे उत्पादन सदोष आहे या कारणाने परत आणले तर वितरकांनी काहीही प्रश्न न विचारता उत्पादन परत घेऊन ते बदलून द्यावे किवा किंमत परत करावी अशा सूचना त्यांना दिलेल्या असतात, अशा सुरस चर्चा ऐकायला मिळतात. परंतु त्याच कंपन्या भारतात कसा दुटप्पी व्यवहार करतात याचे उदाहरण म्हणून ही न्यायालयीन सत्यकथा वाचा ----- निषाद कुलकर्णी या मुंबई आय. आय. टी. च्या विद्यार्थ्याने औरंगाबाद येथील मे. सोनी एक्स्क्लुझिव या सोनी इंडिया प्रा. लि. चे अधिकृत विक्रेते यांच्याकडून २९ एप्रिल २००९ रोजी सायबर शॉट डिजिटल कॅमेरा रु. १२५००/- ला विकत घेतला.

मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 25/02/2016 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण यूट्यूबवर पाहिले. ते खाली पाहता येईल... हे इथे टाकण्यामागे दोन उद्देश आहेत... १. या भाषणातून सध्या गरमागरम चर्चा चालू असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबादमधील विद्यापीठ आणि मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या इतर सर्व विद्यापीठांसंबंधी अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहीत होतील. २.

< दोन पक्षी (एकाच वेळी) >

लेखक नाखु यांनी गुरुवार, 25/02/2016 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर मी सात वर्ष ११ महिन्यांपुर्वीच आलो आहे. तसे मिपाचे चिंतन आणि मनन खूप दिवसांपासून करत आहे.

"मोरेंचे डोके ठिकाणावर आहे काय?" किंवा, "मोरे तुम्ही स्वतःला काय समजता?" किंवा, "माझी नस्ती उठाठेव."

लेखक Anand More यांनी रविवार, 21/02/2016 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
आरोप: तुम्ही फार मानभावी आणि कृत्रिम होत चालला आहात. स्पष्ट शब्दात दिलेली समज:
  1. तुम्हाला कुणीही त्रास वगैरे दिलेला नाही, नियम वगैरे सांगितलेले नाहीत. माझे मत आहे असे त्यात स्पष्ट लिहिलेले आहे. साधं सोपं म्हणलं तर नवे लेखन यामध्ये वर्गीकरण स्पष्ट लिहिलेले आहे.
  2. फेसबुकावर आपण लिहिता आनंदच आहे. ब्लॉग पण असावा. पण तिथे जसे वातावरण असेल तसेच इथे नाही. रॅगिंग सर्वानाच झालेय.

प्रेम !!! ???

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 15/02/2016 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम दिवसाच्या निमित्ताने ही आठवण! आपल्या प्रियतमेची मोजून ५३ वर्षे, सात महिने, एकरा दिवस आणि अकरा रात्री , निरंतर वाट पाहणारा प्रियकर खऱ्या जगात असतो कि नाही माहित नाही, पण Gabriel García Márquez च्या ‘Love in the Time of Cholera’ या सुमारे साडेतीनशे पृष्ठांच्या कादंबरीत तो परतपरत जगतामरता भेटत राहतो. मूळ Spanish भाषेत लिहिलेली ही कादंबरी १९८५ मध्ये प्रसिद्ध झाली आणि १९८८ साली त्याचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला. यावर आधारित याच नावाचा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला. तसे सरधोपट कथानक! किशोरवयीन फ्लोरेन्तिनो फार्मिनाच्या प्रेमात पडतो. बिचारा गरीब असतो.पण त्याचे प्रेम भारी असते.

दिल से सलूट....

लेखक dipak bhutekar यांनी रविवार, 14/02/2016 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच 26 जानेवारीला गणराज्य दिना निमित्त झालेल्या पुरस्कार सोहळ्या मध्ये महाराष्ट्राच्या चार शुर मुलाना "भारत पुरस्कार" या सर्वोच्य राष्ट्रिय बाल शौर्य पुरस्कार साठी गौरवण्यात आले त्यात वैभव घंगारे (वर्धा) , नीलेश भिल्ल (जळगाव), मोहित दळवी (मुंबई) ह्याची शौर्य पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे. तर, नागपुरच्या गौरव सहस्त्रबुध्दे (वय15) ह्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे गौरवने आपल्या जीवाची काळजी न करता आपल्या चार मित्रांना वाचवन्या साठी आपला जिव धोक्यात घातला मित्राचे प्राण तर त्याने वाचवले पण स्वतःचा जिव मात्र त्याला गमवावा लागला.