Skip to main content

लेख

बटाट्याची चाळ, बाजीराव आणि मस्तानी

लेखक कुमार जावडेकर यांनी मंगळवार, 21/07/2020 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
चाळकऱ्यांनी एकजुटीने 'बाजीराव मस्तानी' पाहायला जाण्याच्या घटनेची तुलना फक्त मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावण्याच्या बातमीशीच होऊ शकते. भन्साळी यांनी चित्रपट बनवायला एका तपाहून अधिक वेळ घेतला; पण तो एकत्रितपणे बघण्यासाठी चाळकऱ्यांना जी तपश्चर्या करायला लागली तीही काही कमी नव्हती. अनेकांचा अनेक दिवस हे खरं होईल यावरच विश्वास बसत नव्हता. झालंच तरी सर्व संकटांमधून पार होऊन ती वेळ येईपर्यंत हा चित्रपट डब्यात गेला असेल आणि त्यांना भन्साळी यांनी काढलेला दुसऱ्या बाजीरावाच्या प्रेमलीलांवरचा 'सिक्वल' बघायला लागेल अशी शंका ते व्यक्त करत होते.

अवेळीचा पाहुणा .

लेखक Jayant Naik यांनी सोमवार, 20/07/2020 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
अवेळीचा पाहुणा सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करायची सवय असणाऱ्या स्वरूप ने आपल्या बेड शेजारील टेबल वरच्या नोटपॅड वर लिहिलेल्या नोंदिकडे परत एकदा अगदी शेवटची नजर टाकली. एक ,दोन ,तीन असे इंग्रजीत आकडे लिहून त्या पुढे इंग्रजीत सुवाच्य अक्षरात लिहिलेल्या यादीत काही विसरले तर नाही ना ? याची खात्री करून घेतली. बाहेरचा मुख्य दरवाजा नीट लावला होता. बाहेरच्या दरवाज्यावर उद्या दुध नको अशी चिठ्ठी लिहिली होती.घरातील सगळे नळ नीट बंद केले होते. उगाच एखादा नळ चालू राहिला तर त्याच्या आवाजाने शेजारच्या सदनिकेतील कोणी ठणाणा करत येऊ नये. आता संध्याकाळचे सात वाजले होते.

वेडा (रहस्यकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी शनिवार, 18/07/2020 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
वेडा (रहस्यकथा) शहराचा तो मध्यवर्ती भाग नेहमी गजबजलेला असे. महत्वाची कार्यालये, शाळा, बँका याच भागात असल्याने, हा सगळा परिसर गर्दीचा बनला होता. या गजबजलेल्या भागाच्या बरोबर मधून डांबरी रोड गेल्यामुळे, या भागाचे दोन विभाग पडले होते. एक दक्षिणेकडचा आणि दुसरा उत्तरेकडचा. उत्तरेकडच्या भागात एक मोठी खासगी शाळा होती. तिच्याच शेजारी एक राष्ट्रीयीकृत बँक होती. शाळा आणि बँक असल्याने तो भाग नेहमी वर्दळीने भरलेला असे. मोठी वाहने, जीप, रिक्षा, सायकली, हातरिक्षा, पादचारी यांच्या गजबजाटीने हा भाग नेहमी व्यस्त असे. शाळेच्या शेजारी एक मोठे वडाचे झाड होते.

पाप आणि पुण्य

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 15/07/2020 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे देवाला आपण माणसासारखं उभं केलं. म्हणजे देवाची मूर्ती आपण माणसाच्या रूपासारखी बनवतो. आपल्याच रूपात आपण त्याला पहात आलोत. राग, लोभ, प्रेम, काही प्रमाणात दोषही माणसासारखेच आपण त्याला बहाल केले. माणूस आनंद व्यक्‍त करतो वा रागावतो तसा देवही प्रसन्न होतो वा कोपतो. याचा अर्थ माणसाच्या रूपातच सर्व देव आहेत. सगळ्या देवांवर आपण माणसासारख्या नाना तर्‍हा आरोपीत केल्या. काही देवांना आपण आपल्या वासना सुध्दा बहाल केल्या. माणसापासून आपण देवाला खूप दूर जाऊ दिलं नाही. माणुसकी हे मानवी समाजाचं मूल्य आहे. संस्कृती सोबत अधिक प्रगल्भ होत गेलेलं तत्व म्हणजे माणुसकी.

गुलाबी कागद निळी शाई - पत्रांक ८ कॉफी

लेखक @tul यांनी बुधवार, 15/07/2020 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियांसी खूप काही सांगायचंय पण लिहितात येत नाहीये आज. आपल्या आवडत्या व्यक्तीचा परिचय करून घ्यावा की हळूहळू ओळखावं त्याला? व्यक्तिमत्व हळूहळू उमलले, अलगत उलगडले की जास्त भावेल, नाही का? giftbox सारखं. आकार केवढाही असला तरी आत काय असेल याची उत्सुकता कायम राखणारा. गम्मत म्हणजे देणारा आणि घेणारा दोघेही तितकेच उतावीळ, उत्सुक, अस्वस्थ!! देणारा फारच विचार करून देतो आणि मग अस्वस्थ होतो आवडेल की नाही. एक गिफ्ट योजलय तुझ्यासाठो . आणि बघ ना gift च्या नुसत्या विचारांनी हृदयाचे ठोके वाढले. तू ते अलगद उघडताना दिसतेयस. किती रोमांचकारी क्षण असेल तो.

गुलाबी कागद निळी शाई - पत्रांक ८ कॉफी

लेखक @tul यांनी बुधवार, 15/07/2020 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियांसी खूप काही सांगायचंय पण लिहितात येत नाहीये आज. आपल्या आवडत्या व्यक्तीचा परिचय करून घ्यावा की हळूहळू ओळखावं त्याला? व्यक्तिमत्व हळूहळू उमलले, अलगत उलगडले की जास्त भावेल, नाही का? giftbox सारखं. आकार केवढाही असला तरी आत काय असेल याची उत्सुकता कायम राखणारा. गम्मत म्हणजे देणारा आणि घेणारा दोघेही तितकेच उतावीळ, उत्सुक, अस्वस्थ!! देणारा फारच विचार करून देतो आणि मग अस्वस्थ होतो आवडेल की नाही. एक गिफ्ट योजलय तुझ्यासाठो . आणि बघ ना gift च्या नुसत्या विचारांनी हृदयाचे ठोके वाढले. तू ते अलगद उघडताना दिसतेयस. किती रोमांचकारी क्षण असेल तो.

कंदील (रहस्यकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी मंगळवार, 14/07/2020 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
कंदील (रहस्यकथा) मार्चचा महिना लागून काहीच दिवस उलटले होते.तरी वातावरणात उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत होत्या. वातावरण संमिश्र होऊन,कधी उन्हाचा चटका बसायचा,तर मध्येच थंडीची झुळूक अंगाला झोंबून जायची.कदाचित वीस तीस मैलावर असलेल्या पश्‍चिम घाटाचा तो परिणाम असावा. पण हे वातावरण कसेही असो,कनकपुरचा प्राचीन वस्तूंचा बाजार माणसांनी फुलून गेला होता.आठवड्यातील गुरुवारी भरणारा तो बाजार,सगळ्या दक्षिण भारतात प्रसिद्ध होता.कनकपुर म्हटले,की डोळ्यापुढे केवळ प्राचीन वस्तूंची रासच दिसायची.

मुक्काम पोस्ट कॉरन्टाईन सेंटर

लेखक लेखनवाला यांनी सोमवार, 13/07/2020 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
****** जसं रामाने रावणाला मारलं, ओबामाने ओसामाला मारलं, अगदी तसचं कोरानाला जर एकूण समाजाने मारायचं म्हणजे संपवायचं असेल तर मग ‘कॉरन्टाईन’ होणं हाच जालीम उपाय, करोनापूर्वी ‘कॉरन्टाईन’ या शब्दाचा तसा काही परिचय नव्हता पण आता हा जीभेवर रेंगाळला, ते शुदध मराठीत ‘विलगीकरण’ बोलायला मजा नाही येत… ते जीभेवरुन विरघळल्यासारखं वाटतं…. ****** काळाचं मनुष्याच्या शरीररुपी अस्तित्वाला आपल्या कवेत घेणारं कोरानाच्या स्वरुपातलं अदृश्यरुप आता मात्र थोडसं का होईना प्रत्येकाच्या मनात काहूर माजवत होतं.

करोना व्हायरस - अंताची सुरवात?

लेखक नेत्रेश यांनी सोमवार, 13/07/2020 07:07 या दिवशी प्रकाशित केले.
२०व्या शतकाच्या उत्तरार्धात जग खुप जवळ आले. परदेश प्रवास नित्याची बाब झाली. वेगवेगळ्या देशातील लोक दुसर्‍या देशात सहजपणे स्थायीक होउ लागले. मेल्टिंग पॉट चा कॉन्सेप्ट काही शहरापुरता मर्यादीत न रहाता जगभर पसरला. अत्यंत जोमाने आर्थिक भरभराट होउ लागली. २१व्या शतकाच्या सुरवातीला नवनवीन गॅजेट्स स्वस्तात उपलब्ध झाली. व्हॉट्सअ‍ॅपने STD / ISD कॉल्स ईतिहासजमा केले. पण त्याचबरोबर नैसर्गीक साधनसंपत्ती प्रचंड महागली. अवघ्या काही वर्षांतच सोने, जमीन ईत्यादी १० तो १५ पट महागले. लोकांचे आयुष्यमान खुप वाढले. पुढारलेल्या देशात लोक सहजपणे ९० - १०० वर्षे जगु लागली.

स्मृतीची पाने चाळताना: तीन

लेखक चंद्रकांत यांनी शुक्रवार, 10/07/2020 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्याचं नामकरण कोणत्या विचारांनी केलेलं असतं, त्यांनाच माहिती. नाव गुलाब असणं आणि त्याच्या देखणेपणाची कोणतीही लक्षणे त्यात शोधूनही न सापडणं, याला विपर्यास शब्दाशिवाय आणखी काय म्हणता येईल? माहीत नाही. असंच काहीसं गुलाबबाबत घडलं. गुलाबचा ‘गुल्या’ झाला आणि तीच त्याच्या नावाची अमीट ओळख झाली. हा संक्षेप कुणी केला, केव्हा आणि कसा केला, कुणास ठाऊक. काळाच्या वाहत्या प्रवाहात गावात अनेक गोष्टी घडल्या आणि बिघडल्याही. बदलांच्या वाटांनी नव्या गोष्टी आल्या. त्यांच्या आवेगात टिकाव धरू न शकल्याने जुन्या गोष्टी शेवाळावरून घसरून पडावे, तशा निसटल्या. बदलला नाही तो ‘गुल्या’ शब्द. तसंही नावात काय असतं म्हणा!