Skip to main content

लेख

प्रेम आणि द्वेष

लेखक Jayant Naik यांनी गुरुवार, 23/12/2021 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम आणि द्वेष . उद्यानातील कोपऱ्यात असलेल्या त्या निष्पर्ण ,निर्जीव आणि निरुपयोगी झाडाकडे आता कोणीही बघत नव्हते. ते उद्यान सुद्धा आता कुलूप लावून बंद केले होते. काही दिवसापासून अगदी अघोरी वाटाव्यात अश्या घटना त्या झाडा भोवती होत होत्या. काही दिवसापूर्वी एकाएकी ते सुंदर झाड वाळायला लागले. सगळी पाने गळून गेली. सगळी फळे सुकून गेली . आणि एक उग्र वास त्या झाडाच्या अवती भोवती पसरला. आपल्या जवळ कुणीही येऊ नये अशी त्या झाडाची योजना असेल का ? कुणास ठाऊक पण अगदी ..परवा परवा पर्यंत कसे छान बहरलेले होते ते झाड !... कसली तरी छोटीशी लाल चुटूक फळे लागायची त्याला.

जंगल (२०१७)

लेखक चिमी यांनी सोमवार, 20/12/2021 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या बाबांना survival story based सिनेमे आणि डॉक्युमेंटरीजची भारी आवड. बाबांजवळ बसून The Edge, The Poseidon Adventure सारखे कित्येक सिनेमे मी रात्री जागू जागू पाहिलेले. पुढचे २-४ दिवस त्यातले अस्वल किंवा भेसूर चेहरे स्वप्नात येऊन दचकवून परत जागरण घडवायचे तो भाग वेगळा. कितीही घाबरीफाईड झालं, तरी परत पुढचा सिनेमा बघायला मी मोठ्या उत्साहाने तयार असायचे. कारण बाबांच्या मागे लपून बसून तर बघायचे असायचे. तेव्हा सर्वांत सेफ जागा म्हणजे बाबांच्या मागे. तिकडे टीव्हीवर एखाद्या अस्वलाने किंवा मगरीने कोणावर तरी हल्ला करण्यासाठी आ.. केला की दुसरा आआआं.. माझा असायचा.

कॅप्टन कूल - महेंद्रसिंह धोनी

लेखक सुजित जाधव यांनी बुधवार, 15/12/2021 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला शेवटच्या ओव्हर मध्ये १२ धावांची गरज आहे....प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार ३० पेक्षा अधिक धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे..अश्या वेळेस विश्वातला कोणताही कर्णधार शेवटची ओव्हर संघातील सर्वात अनुभवी गोलंदाजाला देणे पसंत करेल.....पण ३ यष्टयांच्या मागे उभ्या असलेल्या कर्णधाराच्या मनात वेगळाच प्लॅन होता. त्याने शेवटची ओवर फक्त ३ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या जोगिंदर शर्माला दिली आणि इथेच भारतीय क्रिकेट मधल्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. तो सामना होता पहिल्यावहिल्या T-२० विश्वचषकाचा अंतिम सामना.

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ४: गूंजीच्या दिशेने...

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 14/12/2021 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) २: सत्गड परिसरातील भ्रमंती हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ३: अग्न्या व बुंगाछीना गावामधील ट्रेक २८ ऑक्टोबरच्या सकाळी बुंगाछीना- अग्न्या परिसरामध्ये मस्त ट्रेक झाला. हे गाव अगदी डोंगराच्या मधोमध आहे! नुसतं बसावं आणि समोरचं खरंखुरं वॉलपेपर डोळ्यात साठवावं!

नवी दिल्ली @ 110

लेखक पराग१२२६३ यांनी रविवार, 12/12/2021 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिटनचे राजे जॉर्ज (पंचम) आणि राणी मेरी यांचा भारताचे सम्राट आणि सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक सोहळा 12 डिसेंबर 1911 ला दिल्लीतील निरंकारी सरोवराजवळच्या बुरारी मार्गावर पार पडला होता. त्यासाठी खास ‘दिल्ली दरबार’ भरवण्यात आला होता. ब्रिटनच्या राजा आणि राणीचा भारताचा सम्राट आणि सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक करण्यासाठी दिल्लीत भरवण्यात आलेला हा तिसरा दरबार होता. राज्याभिषेकानंतर लगेचच सम्राट जॉर्ज (पंचम) याने ब्रिटिश भारताची राजधानी कोलकत्याहून दिल्लीला स्थानांतरित केल्याचे घोषित केले.

२२ यार्ड

लेखक श्रीगणेशा यांनी शनिवार, 11/12/2021 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी नव्वदच्या दशकातही, आमच्या डोंगरपायथ्याला बिलगून असणाऱ्या छोट्याश्या गावात क्रिकेट हा लहान-थोर सर्वांचा आवडता खेळ. त्याचं स्वरूप थोडंसं वेगळं असेलही पण उत्साह मात्र तोच, जो भारतात क्रिकेटसाठी इतरत्र कुठेही दिसेल. फळी (बॅट) विकत आणलेली बॅट त्यावेळी गल्ली क्रिकेटमधे तरी अपवादानेच सापडायची. एखादी लाकडी फळी शक्य असेल त्या पद्धतीने बॅट मधे रूपांतरीत केली जायची. त्या बॅटने खेळायची एवढी सवय व्हायची की कोणीतरी रेडिमेड बॅट आणली की रुळायला वेळ लागायचा. एकदा वाढदिवसाला हट्ट करून मिळालेल्या नवीन बॅटचा इतका आनंद झाला की मी भारतीय संघात खेळतोय अशी स्वप्न पडायला लागली.

रस्ते

लेखक अनुस्वार यांनी शुक्रवार, 10/12/2021 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्यांदा कधी तुडवला आपण हा रस्ता? 'तुडवणारे' आपण कोण म्हणा? रस्ता तुडवायला मोठ्ठं काळीज आणि पाऊल लागत असणार. अखंड पसरलेल्या जमिनीवर नेमक्या जागी पाऊल ठेवून रस्ता रुजवायला हत्तीचं बळ लागतं. तर आता सोपा प्रश्न. पहिल्यांदा कधी वापरलात हा रस्ता? नसेल आठवत. कुणीतरी (किंवा गुगलने) दिशा दाखवली आणि तेव्हापासून अगदी सवयीचा असल्याप्रमाणे यावरून चालणं झालं असेल आजवर. किती जणांच ... कुणास ठाऊक? गंमत तर बघा. रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला कोणीही उभं नाहीये. हे सांगायला की हा रस्ता आम्हाला किती मदत करतो. तो रस्ता संपला की सगळेजण आपापली दुसरी वाट पकडतात. वळून मागे सुद्धा पाहत नाहीत.

75 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी...

लेखक पराग१२२६३ यांनी गुरुवार, 09/12/2021 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
ठीक 75 वर्षांपूर्वी 9 डिसेंबरला घटना परिषदेची (Constituent Assembly) स्थापना होऊन स्वतंत्र भारतासाठीच्या राज्यघटनेच्या निर्मितीच्या कार्याचा शुभारंभ झाला होता. भारताच्या इतिहासात प्रथमच असे घडत होते. देशभर झालेल्या निवडणुकांमधून निवडून आलेल्या 299 सदस्यांची ही घटना परिषद होती. घटना परिषदेच्या सिद्धांतांचा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी घनिष्ठ संबंध राहिलेला होता. त्यामुळे तिच्या स्थापनेपूर्वीच्या महत्वाच्या घडामोडींही पाहणे आवश्यक ठरते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे 17व्या शतकाच्या प्रारंभी भारतात आगमन झाल्यापासूनच भारताचा घटनात्मक विकास सुरू झाला.

[लघुलेख] सोबत

लेखक तर्कवादी यांनी मंगळवार, 07/12/2021 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
स्माजात वावरताना आपल्या डोळ्यासमोर रोज अनेक गोष्टी घडत असतात. काही महत्वाचे किंवा विशेष प्रसंग दीर्घकाळ लक्षात राहतात पण कधीकधी एखादा छोटासा प्रसंगही लक्ष वेधून घेतो आणि आपला त्या प्रसंगाशी काहीही संबंध नसतानाही मनात घर करून जातो. असाच एक गेल्या काही दिवसापूर्वीचा आमच्या सोसायटीतला एक प्रसंग. सायंकाळच्या वेळी मी सोसायटीमध्ये फिरत असताना माझ्यापासून थोड्या अंतरावर एक कार मोकळ्या जागेतील पार्किंगमध्ये येऊन थांबली. कारमधून पति, पत्नी आणि दहा-बारा वर्षे वयाचा मुलगा असे कुटुंब खाली उतरले ( मी त्यातल्या कुणालाही ओळखत नसलो तरी ते पती-पत्नी व मुलगा असे कुटुंब असावे असे मानायला हरकत नव्हती ).