Skip to main content

लेख

संगोपन आणि आत्मनिर्णय.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 19/09/2009 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
माझा मित्र रघुनाथ खाडिलकर अगदी सुरवातीपासून बेफिकीर वृत्तिचा पण तोलूनमोजून निर्णय घेणारा असा होता.काल त्याची आणि माझी गाठ एका सायन्स सेमिनारमधे पडली. "अरे,परत तू ह्या विषयात भाग घ्यायला सुरवात कशी केलीस.तू तर सर्व सोडून जवळ जवळ संन्यास घेतलास असं मला मागे भेटला होतास त्यावेळी म्हणाला होतास ते मला आठवलं.सोन्यासारखी कंपनी सोडून तू कसलंच काम न करण्याचा विचार केला होतास.ज्या कंपनीत तू होतास तिला वर यायला तू खूपच मेहनत घेतली होतीस.तुझ्या कर्तुत्वाच्या जोरावर सि.इ.ऒ.झालास म्हणून माझाच एक मित्र तुझा विषय निघाला त्यावेळी तुझी स्तुती करून सांगत होता.तुझं काही खरं नाही बाबा." रघुनाथला काहीच बोलायला न

" मित्र हवा असल्यास एकच मार्ग आहे कुणाचा मित्र झालं पाहिजे."

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 18/09/2009 06:06 या दिवशी प्रकाशित केले.
"मला वाटतं, लोक जोपर्यंत त्यांना जे वाटतं ते कसलीच भिडभाड न ठेवता बोलूं शकले तर त्यांना भविष्याबद्दल आशावादि राहायला काहीच हरकत नसावी." माझ्या आईच्या जून्या घराची डागडूजी करायला मला माझ्या गावी जावं लागलं.पैसे आहेत म्हणून सरळ कॉन्टॅक्टरला बोलवून घर दुरस्त करता येत नाही.हे मला गांवात गेल्यानंतर कळलं.म्युनिसिपालिटीची परवानगी असावी लागते.प्लान पास करून घ्यावा लागतो.वगैरे वगैरे.मी घेतलेल्या सुट्टीत ही कामं पुर्ण होतील ह्याची मला खात्री नव्ह्ती.पण एकदाचा म्युनिसिपालिटिच्या कचेरीत गेलो.चौकशी केल्यावर मला कळलं.

आणि मी डीझायनर झालो!

लेखक विनायक पाचलग यांनी गुरुवार, 17/09/2009 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या संस्थळाच्या ओपनिंगच्या निमित्ताने माझ्या ब्लॉगवर लिहिलेला हा लेख.... जसाच्या तसा इथे! स्वतःची वेबसाईट असावी अशी प्रत्येकाची इच्छा असती, माझीदेखील होती,त्यामुळे ११वीत गेल्यावर जेव्हा घरी संगणक आला तेव्हा साईट कशी करता येईल हाच विचार मनात होता. मात्र ,मी १६ वर्षाचा असल्याने आणि कमाईचा कोणताही मार्ग नसल्याने जे काही करायचे ते फु़कटच करावे लागणार होते. अशातच मग हुडकाहुडकी सुरु झाली आणि एक साईट सापडली ,मग काय माझ्या परीक्षेसाठी बनवलेल्या फाईलमध्ये त्या साईटचे नाव दिमाखात विराजमान झाले.

दयाशील असणं ही एक प्रकारची देणगी आहे.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 17/09/2009 07:01 या दिवशी प्रकाशित केले.
"जेव्हा दयाशीलता आणि प्रेम ह्या मधली संदिग्धता जास्त स्पष्ट होत जाते तेव्हा त्या मधली बारकाई पाहून मी बराच प्रभावित होतो." कमलाकर धारणकर हा माझा शाळकरी दोस्त.आपल्या आईवडीलांचा एकूलता एक मुलगा.म्हणून लाडावलेला नव्हता. लहानपणापासूनच तो हुशार आणि शिस्त बाळगून होता.हे गुण त्याच्या अंगात उपजतच आले होते.कधी कधी आम्ही भेटलो की बालपणाच्या आठवणी काढून गप्पा मारतो.आणि आता ह्या वयावर त्यावेळच्या मनावर बिंबवून गेलेल्या आठवणीत ठेवण्यासारख्या घटनांचं चर्वीचरण करून एखाद्या तरी निर्णयाला येतो.कमलाकर मनाने अळकूळा होता.जरा मन दुखलं की रडायचा. "तू लहानपणी खूपच भावनाप्रधान होतास.तसाच आता आहेस का?

१९ सप्टेंबरची अमावस्या कुणाला कशी?

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 15/09/2009 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
१९ सप्टेम्बर २००९ रोजी सायन कन्या राशीत अमावस्या २६ अंश २ मि. वर होत आहे. ही अमावस्या गोचर शनीच्या युतीत होत असल्यामुळे, तसेच गोचर प्लुटॊशी केंद्र योग करत असल्याने फलिताच्या दृष्टीने अतिशय महत्वाची ठरणार आहे.

दिर्घ आयुष्याची गुरूकिल्ली.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 15/09/2009 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
"समूहात गाणं म्हणजेच तल्लीन होऊन गाणं.सहमूहात गाताना इतर वाद्दांची जरूरी भासत नाही.तसंच सर्वांमधे सामिल होऊन गाणं म्हटल्याने स्वतःला समूहात विलीन झाल्यासारखं वाटतं." मी मधे खानोलीला जत्रा पहायला गेलो होतो.जत्रेला खूपच मजा आली.त्यानंतर मी एक आठवडा खानोलीत मुक्काम केला होता.विषेश करून मला खानोलीची समुद्रचौपाटी खूपच आवडते.आणि जास्तकरून घाटीच्या माथ्यावरून फेसाळलेला तो समुद्र पाहून मन प्रसन्न होतं.आठ दिवसाच्या मुक्कामात मी रोज घाटीवर चढून जात असे.रोज कोण ना कोण तरी गावातले प्रतिष्टीत बरोबर फिरायला यायचे किंवा वाटेत भेटायचे.असेच एकदा मला प्रमोद खानोलकर आणि त्यांचे स्नेही विजय खानोलकर भेटले.घाटी चढ

लहान लहान विचार.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 13/09/2009 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आम्ही मुंबईहून न चुकता उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात आंबे, गरे,बोंडू खाण्यासाठी आणि विश्रांती आणि मजा मारण्यासाठी जात असूं. आता संसाराच्या रग्याड्यात,तसंच ऑफिसच्या कामाच्या व्यापात कोकणातल्या आमच्या खेपा त्यामानाने कमीच झाल्या आहेत. पण कधी कधी उलटं होतं.अलीकडे कोकणातून उन्हाळ्याच्या सुट्टीत आमची मित्रमंडळी आणि नातेवाईक मुंबईला येतात.

अंगात चांगूलपणा सहजासहजी येत नसतो.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 11/09/2009 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
"मी माझ्या लेखनात नेहमी, स्वातंत्र्य,कायद्याची अंमलबजावणी,ईश्वराचं महत्व आणि धर्मातून ईश्वराकडे पोहोचणं ह्या विषयावर लिहित असते." कमला पेंडसे यांचे बरेचसे लेख मी काही मासिकात वाचले आहेत.निरनीराळ्या विषयावरचे त्यांचे लेख वाचायला मला आवडतं.कधी तरी त्यांना प्रत्यक्ष भेटून हे विषय त्यांना कसे सुचतात म्हणून विचारावं असं माझ्या मनात नेहमी यायचं. माझा मित्र नाना पेंडसे ह्याला मी एक दिवस सहज विचारलं, "काय रे नाना, ही कमला पेंडसे जी लेखिका म्हणून प्रसिद्ध आहे ती तुझी आडनांव-भगीनी आहे का, की तुझं तिच्याशी खरंच नातं आहे.?" आश्चर्याची गोष्ट म्हणजे नाना म्हणाला, "अरे ती माझी सख्खी चुलत बहिण आहे.दादरला गो