Skip to main content

लेख

मोक्ष

लेखक विनीत संखे यांनी बुधवार, 31/08/2011 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज मोक्ष मिळायला हवाच... उगीच ह्या मृगजळात अडकलोय... दरदिवशीची कटकट, साडेसातची लोकल, ऒफिसचा ऊशीर, मोठ्या साहेबांचं तणतणणं. घरी गेल्यावर मुलांच्या मागण्या, सौ ची कैफियत. आज हे महाग तर उद्या ते. छ्या किती सहन करायचं? किडामुंगीशी जवळीक साधायची ती अशी? एवढं राब राब राबून विरंगुळ्याचे क्षणच दुर्मिळ झालेत ... मोबाईलच्या रेडियोवर एकशेसातवर जाऊन जुनं मदन मोहन ऎकावं... आयुष्य सार्थकी लागावं असं काहीतरी... तो तर गेला त्याच्या स्वरलता सोडून... पण आम्ही काय सोडलं? आमचं नाव? की आडनाव? आमची सौ की ती पिल्लावळ? ...

भ्रष्टाचाराविरुद्ध लढा

लेखक रणजित चितळे यांनी सोमवार, 29/08/2011 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
जन लोकपाल हे विधेयक संसदेत आणण्यासाठी अण्णा हजारे ह्यांच्या आमरण उपोषणा बद्दल लोकांकडून व सरकार कडून बरेच प्रश्न विचारले जात आहेत. प्रामुख्याने त्यातले काही प्रश्न असे आहेत. अ) जन लोकपाल किंवा लोकपाल विधेयक आणल्याने भारतातला भ्रष्टाचार संपणार नाही. ब) अण्णा हजारे ह्यांचे आमरण उपोषण हे असंविधानिक आहे व पुढे हेच उदाहरण घेऊन बाकीची लोकं सरकारला वेठीस धरू लागतील. क) जन लोकपाल विधेयक लागू करण्यालायक नाही. त्यातल्या तरतुदी लोकशाहीच्या तत्त्वांविरुद्ध आहेत. ड) विधेयक संसदेत आणायला व ते पारित होण्यास वेळ लागतो.

पाऊसगोष्ट तुझी माझी

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 27/08/2011 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
तू मजसोबत येशील अशी शक्यता वाटत नव्हती. पण तू पटकन गाडीवर माझ्यामागे सावरून बसलीस. तेव्हा खरे तर माझ्या मनात कल्लोळ उठला होता. तुझं तसं मजसमीप असणं जगावेगळं वाटत होतं. त्यात मौसम ‘घन उतरू आलं...’ अशा झिम्मड पावसाचा. तुला कुठे सोडायचं हे ठरलं नव्हतं. मी तर थेट तुझ्या घरापर्यंत साथसोबत केली असती पण तुझ्या मनात ते जलतरंग होते कुठे? नव्हतेच. मीच आपला सप्तरंगी स्वप्नायुष्य भन्नाटवेगे पळवत चाललो होतो... रस्ते म्हणजे खड्डेच की. तू माझ्यावर मागून आदळली नाहीस असं होणार नव्हतं. तरीपण तुझाही तोल सावरीत मी बेताने गाडी घेतली आणि माझं ते संयत वागणं पाहून त्या वरच्या मसीहाला माझी दया आलीच.

प्रचलित व्यवस्थेत भ्रष्टाचाराची अनिवार्यता : लेखांक - ३

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 25/08/2011 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
प्रचलित व्यवस्थेत भ्रष्टाचाराची अनिवार्यता : लेखांक - ३
              समाज जसजसा पुढे जातो तसतशी नैतिकता आणि भ्रष्टाचाराची परिमाणे बदलत जाणे अपरिहार्य असते. कालची अनैतिकता ही आजची नैतिकता व कालचा असंस्कृतपणा हा आजचा संस्कृतपणा ठरत असतो. आजीबाईला नातीच्या ड्रेसमध्ये असंस्कृतपणा दिसणे किंवा देवाला दिलेले दान यात लाचलुचपतखोरी न आढळणे, ही मानसिकता याच वाहत्या काळाच्या वाहत्या बदलातून आलेली असते.

ज न नी हि ता य (प्रकरण १ ते २५)

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी गुरुवार, 25/08/2011 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
महिलांच्या आरोग्यविषयक समस्या या विषयावर इंग्रजीत विपुल माहिती उपलब्ध आहे. परंतु या विषयी समग्र अशी माहिती मराठीत फारशी उपलब्ध नाही. मराठीत याविषयावर माझ्यासंग्रही असलेल्या लेखांपैकी सुरूवातीची २५ प्रकरणे ही किरण फॉन्ट वापरून टंकलिखीत केली असल्याने त्यातील मजकुर इथे थेट चिकटविता येत नाही. यास्तव पीडी फाईल्स बनवून त्या गुगल डॉक्स मध्ये लोड करून त्यांच्या लिंक्स इथे देत आहे. यापुढची प्रकरणांचे (प्रकरण क्रमांक २६ पासून) लेखन युनिकोड मध्ये करीत असल्याने ती पुढच्या भागात क्रमश: इथे थेट पद्धतीने प्रकाशित केली जातील. सध्या प्रकरण एक ते पंचवीस च्या लिंक्स देत आहेत.

मैत्र !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 24/08/2011 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
एक जवळचा मित्र ! आपल्या आयुष्यातील कितीतरी, म्हणजे कितीतरी तास आपण या लाकडाच्या अडीच फूट बाय ३/४ फूट तुकड्यावर घालवतो. टेबलाशी निगडीत अनेक चांगल्या वाइट आठवणींचा आपल्या डोक्यातल्या हार्डडिस्कवर एक वेगळा ड्राईव्ह केला तरी चालेल एवढ्या आठवणी सहज असतात. कामाचा पहिला दिवस, मधल्यावेळेचा डबा, मित्रांचे कोंडाळे, साहेबाची बोलणी, पडलेला चेहरा, बढती, बढतीची मेजवानी....शेवटचा दिवस.... अशा अनेक आठवणी आपण या टेबलाशी बोलू शकतो. अशा अनेक टेबलांनी आपल्या आयुष्यात आपल्या मित्रांप्रमाणे आपली सोबत केलेली असते. जरा आठवून पहा आणि तुम्हाला आढळेल किती महत्वाचा आणि जवळचा मित्र होता हा !