Skip to main content

लेख

यादवी माजली

लेखक मृत्युन्जय यांनी गुरुवार, 06/02/2014 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
यादवी युद्ध किंवा यादवी माजली हे शब्द आपण वर्तमानपत्रांतुन बर्‍याचदा वाचत असु कदाचित. पण या शब्दाचा उगम कदाचित आपल्याला माहिती नसेल. आजच्या काळाचा विचार करता याचा संबंध बिहारच्या लालुप्रसाद यादवांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाइल. या सत्शील माणसापाठी या असल्या भयंकर शब्दाचा उगम जोडला जाउ नये या साठी हा लेखन प्रपंच. "यादवी माजली" या शब्दामागे आहे खरे सांगायचे तर एक आद्य अट्टलबिहारी. वाजपेयी नव्हेत. खरोखरचा अट्टल बिहारी. श्रीकृष्ण. (अटलबिहारी म्हणजे माझ्या मते विष्णुचा आठवा अथवा सर्वात महत्वाचा अवतार.) तर यादवीचा संबंध आहे श्रीकृष्णाशी.

दुर्योधन

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 05/02/2014 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
अतिदानात बलिर्बद्धो , अतिमानात सुयोधन:| विनष्टो रावणो लौल्यात , अति सर्वत्र वर्जयेत || अतिरेकी दानशूरते पायी बळीराजा पाताळात गेला, अतिगर्विष्टपणाने दुर्योधन आणि अति स्त्रीलोभाने रावण नष्ट झाला. कोणत्याच गोष्टीमध्ये अतिरेक करू नये हेच खरे. एक अतिरेकी अहंकार सोडला तर दुर्योधनाने त्याचे आयुष्य अतिशय सूत्रबद्ध रीत्या जगले आणि उपभोगले.

पंडित भगवानलाल इंद्रजी

लेखक राही यांनी मंगळवार, 04/02/2014 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
The Asiatic Society of Bombay च्या Gallery of Excellence या नावाच्या एका प्रकाशनामध्ये पण्डित भगवानलाल इंद्रजी यांच्या विषयी एक चरित्रात्मक लेख आहे. हे लिखाण प्रताधिकाराखाली असल्याने थेट भाषांतर देता येणार नाही, पण कदाचित गोषवारा देता येईल. पंडित भगवानलाल यांचा जन्म ७-११-१८३९ रोजी सौराष्ट्रातील जुनागढ येथे झाला. तिथे त्या काळी इंग्रजी शिक्षणाची सोय नव्हती. पण संस्कृत भाषा आणि आयुर्वेदउपचारपद्धतीचे शिक्षण मात्र त्यांना मिळाले. गिरनारच्या वाटेवरील पाषाणलेखाने लहानपणीच त्यांना या विषयी कुतूहल निर्माण झाले आणि पुढे पुराभिलेख आणि नाणकशास्त्राचा अभ्यास हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय बनले.

फेब्रुवारी महिना, मराठीची लेणी, ज्ञानकोश आणि ज्ञानकोशकर्ते

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 31/01/2014 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारी महिना येतो, तोच मुळी मराठी भाषेच्या मुकूटातील काही महत्वपूर्ण क्षणांचे आणि हिर्‍यांचे स्मरण देत. ६ फेब्रुवारी (१९३३) अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपट प्रदर्शित झाला. आणि त्याच वर्षी ९ फेब्रुवारीला सानेगुरुजींनी श्यामची आईचे लेखन चालू केले.

आधी शरीर कि मन? योगाच्या दृष्टीकोणातुन - भाग १

लेखक Atul Thakur यांनी शनिवार, 25/01/2014 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
हठं विना राजयोगो राजयोगं विना हठः| न सिध्यति ततो युग्ममानिष्पत्ते समभ्यसेत्|| हठप्रदीपिकेतल्या द्वितीय उपदेशातील शहात्तराव्या श्लोकाचा हा भाग आहे. सर्वसाधारण योगाभ्यासी मंडळींना हठप्रदीपिका माहीत नसली आणि त्यावाचुन फारसं काही अडत नसलं तरी या लिखाणाच्या अनुषंगाने त्याबाबत थोडं स्पष्टीकरण आवश्यक आहे. परंपरेत योगाचे अनेक प्रकार मानले जातात. राजयोग, हठयोग, ध्यानयोग, नादयोग वगैरे. यापैकी हठयोग व राजयोग हे प्रमुख दोन मार्ग अनुक्रमे शरीर व मनाशी संबंधीत आहेत.

प्रादेशिक परिवहन अधिकारी यांस पत्र

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 23/01/2014 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रति, प्रादेशिक परिवहन अधिकारी विषय: रस्ता सुरक्षा सप्ताहाबद्दल अभिनंदन आणि आभार a माननीय महोदय, सर्वप्रथम आपल्याला आणि समस्त वाहतुक नियंत्रकांना माझा सप्रेम नमस्कार. नुकताच रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न झाला. त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. रस्ता सुरक्षा ही खरोखरच किती महत्वाची गोष्ट आहे याची जाणीव खरं तर आज प्रत्येकाला होणं गरजेचं आहे.

अंधश्रद्धा - कर्मकांड

लेखक kalpana joshi यांनी गुरुवार, 23/01/2014 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
नको लागूस माणसा तू, अंधश्रद्धा व कर्मकांडाच्या मागे नाही त्यातून चांगले ते निष्पन्न निघे। अडकता माणूस त्या भोवऱ्यात नाही सुटका होत त्यातून, माणसा तुझे कर्तव्य तू करत जा नको मागे लागू अंधश्रद्धेच्या आणि कर्मकांडाच्या आता तरी शहाणा हो व त्या गर्तेतून घे मोकळा श्वास। शिकून-सवरून तू मोठा झालासी, विज्ञानाचा वापर तू करू लागलासी, काय सत्य ते तुला ठाऊक तरी तू आहारी जातसे कर्मकांड व अंधश्रद्धेच्या! जे व्हायचे ते होणार असते नको अडकू तू या कर्मकांड व अंधश्रद्धे च्या फेऱ्यात माणसा माणसा, आता तरी तू डोळस हो. बघ जग कुठे चालले आहे?

सखा सखी

लेखक kalpana joshi यांनी बुधवार, 22/01/2014 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
सखी शेजारिणी तू हसत रहा, हसत रहा हास्यात फुले गुंफीत रहा... प्रत्येक व्यक्तीला सखा, सखीची अगदी लहानपणापासून गरज असते.तान्ह्यबाळासाठी त्याची आई ही सखी असते. तिच्या मायेच्या सावलीत सुरक्षितपणे हा जीव लहानाचा मोठा होत होत स्वतःच्या पायांवर उभा राहतो. आपले आई-बाबा, भावंडे, मित्र हे आपले सखाच असतात. इंग्रजीत म्हण आहे, फ्रेंड इन नीड इज अ फ्रेण्ड इनडीड. मित्र, जो कोणतीही अपेक्षा न करता आपल्या मित्रांना अडीअडचणीच्या वेळी हवी ती मदत करतो, विठ ठल माउलीसारखा तो मित्रांसाठी धावत येतो, तो खरा सखा. जमिनीतून बाहेर येणाऱया नवांकुरांना भूमातेच्या कुशीची ऊब मिळते .

ड्रिमगर्ल !

लेखक तुमचा अभिषेक यांनी मंगळवार, 21/01/2014 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
गेले तीन दिवस ती ऑफिसला आली नाही. अन आज चौथ्या दिवशी जाणवू लागले की काहीतरी चुकतेयं. पाणवठ्यावर बाटली भरायला जाताना वाटेतले एक प्रेक्षणीय स्थळ नाहिसे झालेय. त्यामुळे बाटली पाण्याने पुर्ण भरली तरी तहान भागेनाशी झालीय. आज मला समजले की तिला तिथे बसलेले बघण्याची मला सवयच लागली होती. वाढलेली तहान आणि बाटलीचा छोटा होत जाणारा आकार याला तीच जबाबदार होती. जरी तिने ती घेतली नाही तरी तीच होती. तिने मात्र कधीही मान वर करून समोरून कोण जातेय ते पाहिले नसावे. मग आमच्याकडे बघण्याचा योग तरी कुठून यावा. कदाचित येणारा जाणारा प्रत्येक जण आपल्याकडेच नजर टाकत जातो याची तिला जाणीव असावी.

२६ फेब्रुवारी वीर सावरकर ह्यांची पुण्य तिथी निमित्य .

लेखक kalpana joshi यांनी सोमवार, 20/01/2014 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचं भारतीय व्यक्तिमत्त्व - स्वातंत्र्यवीर सावरकर “धगधगत्या ज्वाला पेटवून ह्र्दयात, स्वातंत्र्य चे स्वप्न पाहिले क्रांतिविरांनी त्यात , कितीएक प्राणाच्या आहुत्या पडल्या , त्या स्वातंत्र्याच्या महासंग्रात ” ब्रिटीशांच्या तावडीतून आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणपणाने लढा दिला, त्या क्रांतिवीरची नावे किती घेणार ? मंगल पांडे, गांधीजींना सत्य, अहिंसा, प्रेम मार्गें स्वातंत्र हवे होते . ते देशाचे बापूजी होते. बाल गंगाधर टिळक, हे जहाल मतवादी होते.