Skip to main content

लेख

बंदूक भाग १.

लेखक Deepak Pawar यांनी शुक्रवार, 03/03/2023 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच पावसाळा संपून जिकडे तिकडे आनंदाचे वारे वाहू लागले.शेतकऱ्याची तर नुसती धांदल उडाली होती. कुणाची भात कापणी सुरु होती.कुणी नाचणीची कणसं वेचत होतं, तर कुणी कापून आणलेल्या धान्याच्या अडव्या घालत होतं. गुरं पोट टम्म भरेपर्यंत चरत होती. नुकत्याच कापून झालेल्या शेतात; कणसातून पडलेले दाणे टिपण्यात पाखरं मग्न होती. त्याची तर मजाच-मजा. धान्य टिपणारी पाखरं बघणं तर त्याहून मजेदार.म्हणजे ती दाणे टिपताना दोन-तीन दाणे टिपणार, मान वर करून आजूबाजूला टकामका बघणार,परत दोन-तीन दाणे टिपणार परत मान वर करून टकामका बघणार. काही धोका नसे पर्यंत हे न थकता सुरूच राहणार.

मराठी भाषा दिनानिमित्त...

लेखक सुजित जाधव यांनी मंगळवार, 28/02/2023 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम मराठी भाषा बोलणाऱ्या मराठी, अमराठी, विविध जाती व पंथांच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या मराठी मायभूमी पासून हजारो कोसो दूर राहून सुद्धा मराठी भाषा, संस्कृतीशी असलेली नाळ तुटू न देणाऱ्या सर्वांना काल झालेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा.! रविवारच्या लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणी मध्ये पहिल्या पानावर "भाषेच्या खऱ्या वैभवासाठी..." या मथळ्याखाली एक लेख छापून आला होता.

मराठी भाषा दिनानिमित्त...

लेखक सुजित जाधव यांनी मंगळवार, 28/02/2023 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम मराठी भाषा बोलणाऱ्या मराठी, अमराठी, विविध जाती व पंथांच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या मराठी मायभूमी पासून हजारो कोसो दूर राहून सुद्धा मराठी भाषा, संस्कृतीशी असलेली नाळ तुटू न देणाऱ्या सर्वांना काल झालेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा.! रविवारच्या लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणी मध्ये पहिल्या पानावर "भाषेच्या खऱ्या वैभवासाठी..." या मथळ्याखाली एक लेख छापून आला होता.

गाठीचे लाकूड

लेखक देवू यांनी गुरुवार, 16/02/2023 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
ए ! " तांब्यात पाणी घेऊन ये जरा, ह्या गाठीने नाकात दम आणलाय माझ्या. ह्या कुऱ्हाडीची धार बोथट करून टाकली तिने ". अहो! निदान आज तरी लाकडं फोडू नका, अजयचा मॅट्रिकचा रिझल्ट आहे. शाळेत गेला आहे तो, येईल थोड्या वेळात मित्रांबरोबर घरी, तेव्हा दारात असा पसारा बरोबर दिसणार नाही. तुझा लेक काय दिवे लावणार आहे माहीत आहे मला. आणि उद्या बंबात काय घालू? तुझ्या लेकाची लाकडं? अहो असं अभद्र तरी बोलू नका आपल्या लेकराबद्दल. अजय लहानपणापासून खोडकर. अभ्यासात फार गती नव्हती. शाळेतून आला की मित्र गोळा करून खेळायला जात असे. त्याचे मित्रही त्याच्यासारखे उनाड आणि खोडकर, रोज काहीतरी उपदव्याप केल्याशिवाय घरी येत नसे.

आत्या नावाची जिव्हाळ्याची स्पेस

लेखक मार्गी यांनी बुधवार, 15/02/2023 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
✪ प्रखरता नव्हे शीतलता ✪ पूर्वाश्रमीची वासंती वेलणकर अर्थात् सौ. सुमित्रा भांडारी ✪ परभणी ते देवगड व्हाया बस्तर ✪ "छांदसी आणि सुमित्रा" ✪ पतझड़ है कुछ, है ना? ✪ मृत्युसाठी आपण काय करू शकतो? ✪ मै अहम हूँ यही वहम था सर्वांना नमस्कार. मनामध्ये आलेल्या अनेक भावना आणि विचारांना व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आहे. आत्या... आणि त्याबरोबरच मामा, काका अशा जागा अतिशय जिव्हाळ्याच्या असतात. सतत जवळ असल्यामुळे आणि उग्र अशा प्रखरतेमुळे आई- बाबा ही नाती काहीशी दुरावलेली असतात. किंवा निकटता आणि प्रखरता असल्यामुळे डोळ्यांवर काहीशी अंधारी आलेली असते. सतत समोर असलेली गोष्ट आपले डोळे हळु हळु बघणं कमी करतात.

वाई ते पुणे

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 11/02/2023 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडेच एके दिवशी पाचगणीला गेलो होतो. बऱ्याच वर्षांनी पाचगणी, वाईला भेट देत असल्यामुळं गेल्या वेळेपेक्षा आता तिथं बदललेलं बरंच काही दिसत होतं. पाचगणीची भेट आटपून पुण्याला परत येण्यासाठी सकाळी निघालो. पाचगणीच्या एसटी स्थानकात पोहचल्यावर पुण्याच्या बसला वेळ आहे समजलं. त्यामुळं समोर उभ्या असलेल्या वाईच्या बसमध्ये आम्ही बसलो. वाईला पोहचल्यावर काही वेळानं पोलादपूर-स्वारगेट बस आम्हाला मिळाली. पोलादपूर ते स्वारगेट बस कोणत्या मार्गावरून जाते, हे पाहिल्यावर असा पूर्ण प्रवास एकदा करावा असं वाटू लागलं. बसच्या फलकावर पोलादपूर-महाबळेश्वर-पाचगणी-वाई-खंडाळा-शिरवळ-स्वारगेट असे लिहिलेलं होतं.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वस्तीशाळेवरचा अनुभव

लेखक मार्गी यांनी बुधवार, 08/02/2023 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
✪ शाळा सोडून जाणा-या शिक्षिकेद्वारे विद्यार्थ्यांसाठी आकाश दर्शनाचं आयोजन ✪ ८० हून अधिक मुलं, ३५ हून अधिक पालक, शिक्षक व ग्रामस्थांचा सहभाग ✪ बलून प्रज्वलनाद्वारे सत्राची सुरुवात! ✪ औरंगाबादच्या लाडसावंगीजवळ गवळीमाथा येथील सुंदर आकाश ✪ ग्रह, तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ आणि "शाळा चांदोबा गुरुजींची" ✪ धुमकेतू बघण्याचा दुर्मिळ अनुभव आणि डोळ्यांची तपासणी! ✪ समंजस ग्रामस्थांचा आणि उत्साही विद्यार्थ्यांचा सहभाग ✪ विद्यार्थी नव्हे, ही तर सावित्रीची लेकरं! ✪ अंधारलेलं आकाश पण अनेक उजळलेल्या चांदण्या सर्वांना नमस्कार. औरंगाबादमध्ये काल दि.

वास्तुशांती ते मनःशांती

लेखक देवू यांनी बुधवार, 08/02/2023 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
मित्राने त्याच्या गावी बऱ्याचदा येण्याचा आग्रह केला होता. एकतर त्याचे गाव बरेच दूर होते आणि हातात असलेल्या कामामुळे दोन ते तीन दिवस सुट्टी काढून जाण्याचा योग येत नव्हता. यावेळेस त्याच्या घराची वास्तुशांती असल्याने त्याचे आमंत्रण स्वीकारले. त्यानिमित्ताने ग्रामीण जीवन प्रत्यक्ष जवळून बघण्याचा अनुभव घ्यायला मिळणार होता. हातातील कामे थोडे जास्त वेळ काम करून पूर्ण केली. सकाळची सहाची बस पकडली आणि दुपारी दोन वाजता मित्राच्या गावी पोहोचलो. बस स्टॅन्ड पासून त्याचे घर चालत फार तर दहा मिनिटाच्या अंतरावर होते, तरीही मित्राने मला घ्यायला गाडी पाठवली होती.

शंभर अदाणी हवे आहेत…

लेखक सुधीर मुतालीक यांनी सोमवार, 06/02/2023 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
...आमच्या शेतकऱ्यांना सरकारचा इथला एखादा निर्णय अमान्य असेल तर आमचे शेतकरी आणि आमचे सरकार काय करायचे ते बघून घेतील. शेतकऱ्यांना अगदी एखादे सरकार पसंत नसेल तर त्यांना ते सरकार खाली खेचायचा देखील नैतिक अधिकार आहे. पण इथल्या शेतकरी आंदोलनामध्ये काड्या घालणारे, ते भडकाविणारे आपल्या देशा बाहेरचे खलनायक होते हे अलीकडे लक्षात आले :टुल किट गॅंग ! महामारी नंतर तर आर्थिक दृष्ट्या सावरलेला भारत हा जगाच्या पाठीवरचा एकमेव बडा देश आहे. केवळ सावरलेलाच नाही तर आर्थिकदृष्ट्या उत्तम स्थिती असणारा आणि प्रगती करत असणारा.

सुचलेले विषय पण हुकलेले लेखन

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 01/02/2023 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
नियमित लेखनाचा छंद लागला की कालांतराने एक समस्या जाणवू लागते - लेखनासाठी नित्य नवे विषय सुचणे. आपल्या वाचन, मनन आणि निरीक्षणातून मनात अनेक ठिणग्या पडतात आणि त्यातून अनेक विषय मनात रुंजी घालतात. पण त्यातला लेखनासाठी कुठला विषय गांभीर्याने निवडावा यावर मनात बरेच दिवस द्वन्द्व होते. अशी संभ्रमावस्था बराच काळ चालते आणि मग अचानक एखादा विषय मनात विस्तारू लागतो. तो विषय आळसावर मात करून नेटाने पुढे रेटला तरच त्याचा लेख होतो. लेखकाच्या मनात घोळत असलेल्या अनेक विषयांपैकी किती विषयांचे लेखन पूर्ण होते हा एक उत्सुकतेचा विषय आहे.