Skip to main content

लेख

दिवाळीच्या शुभेच्‍छा नकोत

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 15/11/2015 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे तुम्ही एखाद्या मित्राला दिवाळीच्या शुभेच्‍छा पाठवल्या आणि पलिकडून उत्तर आले की, ‘मला तुमच्या दिवाळीच्या शुभेच्‍छा नकोत’, तर तुमच्या मनाची अवस्था काय होईल? माझ्या मनाची अवस्थाही तशीच झाली. दिवाळीच्या दिवशी मी माझ्या एका मित्राशी संवाद साधण्यासाठी काहीतरी निमित्त म्हणून दिवाळीच्या शुभेच्छांचा एसेमेस इतरांसोबत त्यालाही पाठवला. मित्राचे तिकडून जे उत्तर आले ते वाचून मी हादरलोच. त्याने उत्तराच्या संदेशात म्हटले होते, मी हिंदू नाही. दिवाळी हा हिंदूचा सण आहे. म्हणून मला दिवाळीच्या शुभेच्छा देऊ नयेत. बाप रे!

आदूमामा

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 14/11/2015 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
तुला म्हणून सांगतो बे आभ्याs, या दारूच्या व्यसनात दोनच स्टेज असतात. पहिल्या स्टेजमध्ये आपण दारू पितो, तर दुसर्‍या स्टेजमध्ये दारू आपल्याला. या आदूची पहिली स्टेज तर केव्हाच पार झालीये. आता हि दुसरी कुठवर नेते हे बघायचय." .. कालपरवाच बोलल्यासारखे आदूचे हे शब्द कानात घोळत होते, अन इतक्यात दादरावरचा कोलाहल अचानक शांत झाला. कल्पना असूनही काळजात धस्स झाले. पाहिले तर चार टाळकी आदूच्या घराबाहेर जमताना दिसली. मी काय ते समजून चुकलो. आदू दुसरी स्टेज ओलांडून तिसर्‍या स्टेजला गेला होता. कधीही न परतण्यासाठी, कायमचाच! ***** आदूस !

जंटलमन्स गेम - २ - विझी, लाला आणि सीके

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 14/11/2015 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात आणि भारतीय उपखंडात क्रिकेटचा खेळ आणला तो ईस्ट इंडीया कंपनीच्या गोर्‍या इंग्रज साहेबांनी! भारतीय उपखंडात खेळल्या गेलेल्या क्रिकेटचा पहिला संदर्भ सापडतो तो ईस्ट इंडीया कंपनीच्याच एका रिपोर्टमध्ये. १७३७ मधल्या या रिपोर्टात बडोद्याजवळ कॅम्बे इथे १७२१ पासून इंग्रज अधिकारी क्रिकेट खेळत असल्याचा स्पष्टं उल्लेख आढळतो. पुढे १७८२ मध्ये कलकत्ता फुटबॉल आणि क्रिकेट क्लबची स्थापना झाली. काही वर्षांनीच मद्रासलाही क्रिकेट खेळलं गेल्याचा उल्लेख आढळतो.

"जय" हो "श्री" "खंडुबाकी"

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 14/11/2015 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
*ढिस्क्लेमर* १. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही. २. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी). ३. फालतु वाद घालणार्याच्या घरच्या स्त्रीवर्गास हे एपिसोड्स डाउनलोड करुन डीव्हीडी/ पेन ड्राईव्ह मार्गे पुरवुन बदला घेणेत येईल. ४.

शरद मामा

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 11/11/2015 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
शरद मामा शरद मामा माझा सख्खा मामा... शरद मामा, भटजी... सध्या पालीला असतो. दोन मुलीआहेत, एकिचं लग्न झालंय आणि दुसरी अजून शाळेत आहे.

टॉम ग्रेव्हनी - महा 'हलकट' माणूस!

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 11/11/2015 02:45 या दिवशी प्रकाशित केले.
१९५१ सालचा डिसेंबर महिना... मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडीयमवर भारत - इंग्लंड टेस्ट मॅच सुरू होती... दिल्लीला झालेली पहिली टेस्ट ड्रॉ झाली असली तरी पहिल्या इनिंग्जमध्ये सदु शिंदेंच्या (शरद पवारांचे सासरे!) लेगस्पिनने इंग्लंडला २०३ मध्ये गुंडाळलं होतं. विजय मर्चंट (१५४) आणि विजय हजारे (१६४*) यांच्या २११ रन्सच्या पार्टनरशीपच्या जोरावर (आठवा अमिताभचा नमक हलाल मधला अजरामर सीन!) भारताने ४१८ / ६ वर इनिंग्ज डिक्लेअर केली होती.

बापट काका

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 10/11/2015 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
बापट काका आमच्या आक्षीच्या घराच्या पुढेच ५मिनिटावर एक शंकराचं मंदिर होतं, घरालाच जोडलेलं असं आणि घरातच पुढचा भाग दुकानात 'एडजस्ट' केलेला... म्हणजे बघा घर-मंदिर-दूकान... हे सगळं एकाच वास्तुत, कमाले नई! इंदुताइंच दूकान म्हणून प्रसिद्ध होतं ते, असो... त्याच वास्तू समोर एक वाडी होती, बहुतेक सर्वांची घरं रस्त्याच्या जवळ होती, पण त्या वाडीतलं घर जरा रस्त्यापेक्षा लांब, आणि जुने ही नव्हते... म्हणजे ८०सालात वगैरे बांधलेले...

प्रिय पु ल काका

लेखक शीतल जोशी यांनी रविवार, 08/11/2015 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय पु ल काका , लहानपणी ,मला रोज रात्री गोष्टी ऐकत झोपायची सवय होती , मग मी हळू हळू मोठी झाले , गोष्ट ऐकायची सवय मात्र कायम राहिली , पण तो जादू करणारा आवाज आता बदलला होता , तो होता तुमचा … पुलकीत आवाज . माणूस लिखाणानी आणि आपल्या आवाजांनी कायम अमर आणि चिरंजीवी राहू शकतो हे तुम्हीच दाखवून दिले . आयुष्यात असे किती पण अवघड, उदास प्रसंग आले , आणि असे वाटले कि आज तरी काय झोप लागणार नाही आणि वाचायचा मूड पण नाहीये तर तुमचे कोणतही कथाकथन किंवा एकपात्री निवडावे आणि ऐकावे , मन प्रसन्न होते , आणि माणूस नावाच्या प्राण्यात पुन्हा एकदा प्रेमात पडते .

अळुची भाजी खाऊन वाचलो तर…...

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 08/11/2015 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांचं नुकतंच लग्न झालं होतं.नेहमीच्या रिवाजाप्रमाणे त्यांना त्यांच्या सासरवाडील एका लग्नाच्या निमीत्तानं जेवायला बोलावलं होतं.ताट, पाट मांडून पंगत तयार झाली होती. सर्वांना आपआपल्या पाटावर बसायला आमंत्रण दिलं होतं.जांवयाचा मान म्हणून त्यांच्या ताट्पाटा सभोवती रांगोळी घालून त्याची जागा सुशोभीत केली होती.

पहिली आठवण अन पहिला क्षण

लेखक शीतल जोशी यांनी गुरुवार, 05/11/2015 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
पहिली आठवण अन पहिला क्षण पहिला दिवस, प्रत्येक वेळी हा पहिला दिवस फार संस्मरणीय असतो ना!!! शाळेतला पहिला दिवस तसा नाही आठवणार आता, पण थोडे काही दिवस आठवत आहेत, अगदी सुरवातीला जेव्हा लहान गट मध्ये गेले तेव्हाचा युनिफोर्म चा रंग आठवतो आहे, पण गम्मत अशी कि लहानगट मधेच शाळा बदलेली आणि सांगलीला नव्या शाळेत घातले त्यावेळचे म्हणजे म्हणजे कोणत्या रंगाची waterbag होती आणि कंपास box हे मात्र आठवतंय.