Skip to main content

लेख

शिकण्याच्या पद्धती (Learning methods)

लेखक मंजूताई यांनी गुरुवार, 20/04/2017 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
सेतू - अ कॉन्शस पॅरेंट फोरम तर्फे मैत्रेयीचा(समुपदेशक) शिकण्याच्या पध्दतीवर एक चर्चात्मक कार्यक्रम घेतला. मैत्रेयीने टाटा इंस्टीट्युट ऑफ सोशल वर्कमधून एमएसडब्ल्यू केले आहे. पौगंडावस्थेतील मुला व मुलींच, विवाहपूर्व व विवाहत्तोर जोडप्यांच समुपदेशन करते. आज शिकण्याच्या पद्धती सांगितल्या, उद्या तुम्ही त्या अमलात आणल्या व लगेच मुलाचे मार्क्स वाढले असं खात्रीलायक होईलच, असं नाही पण ह्या पालकांना मार्गदर्शक नक्कीच ठरतील. शिकण्याच्या पद्धतीत तीन महत्त्वाच्या बाबी आहेत. १) इन्फर्मेशन /माहिती २) नॉलेज/ज्ञान 3)प्रयत्न.

मायानगरी

लेखक ज्ञानदेव पोळ यांनी गुरुवार, 20/04/2017 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतल्या घरांना पत्र्याचा सोफा नाही कि सोफ्यात चूल नाही. चूल असली तरी त्या चुलीत विस्तवाचा फुललेला आर नाही कि चुलीत भाजलेल्या शेंगा नाहीत. इथल्या घरांना आंगण नाही कि अंगणात तुळस नाही. दारात कुरड्या सांडग्याची वाळवण नाहीत कि वाळवणाला काठी हलवत राखण बसलेली म्हातारी नाही. मुंबईतल्या घरासमोर गुरांचा गोठा नाही कि "गोठ्यात चिळ चिळ वाजणारा धारेचा आवाज नाही. दाराला राखण करीत आडवा पडलेला राजा कुत्रा नाही कि उकिरंडयावर पायानं उकरणाऱ्या कोंबडया नाहीत. नातवडांना जत्रेला घेऊन निघालेला धोतर पटक्यातला म्हातारा इथल्या रस्त्यावर नाही कि मधल्या लेकीकडं साखरचं गठुळ घेऊन निघालेली लुगडया चोळीतली म्हातारी नाही.

ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन!

लेखक मार्गी यांनी बुधवार, 19/04/2017 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. काही गोष्टी बोलाव्याशा वाटल्या. म्हणून हे आधी लिहिलेलं पत्र नावं व किरकोळ संदर्भ बदलून आपल्यासोबत शेअर करतो आहे. आपल्या आयुष्यातले ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन! दि. ३ जुलै २०१६ प्रिय लोकेश आणि तेजश्री वहिनी! तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आज सकाळी उठल्यापासूनच लोकेशशी बोलणं सुरू होतं. तेव्हा म्हंटलं चला थोडं सविस्तर बोलू. त्या दिवशी आम्ही भेटलो असतानाही भेटायचं चाललं होतं. तेव्हा आता इथे पत्रातूनच भेटावं म्हंटलं. आणि मला पत्रातून भेटायला खूप आवडतं. जेव्हा प्रत्यक्ष भेटतो; तेव्हा खूप वेळ फॉर्मल बोलण्यात- हाय हॅलोमध्ये जातो किंवा जनरल बोलण्यात जातो.

ही आगळी कहाणी : एक आगळावेगळा कथासंग्रह

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी बुधवार, 19/04/2017 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
जेवणात गुलाबजाम अन वाचनात लघुकथा आवडत नाहीत असा व्यक्ती सापडणे अवघड. नारळीकर, धारप, वपू, मिरासदार, मतकरी वगैरे कथाकारांच्या लिखाणाने कित्येक पिढ्यांची वाचनभूक भागवली आहे. मराठी वाचक नेहमीच उत्तमोत्तम कथांच्या शोधात असतो. आजच्या धकाधकीच्या अन तणावग्रस्त आयुष्यात काही खुसखुशीत वाचायला मिळालं तर ! हीच गरज निलेश मालवणकर यांचा 'ही आगळी कहाणी' हा नवीन कथासंग्रह पुर्ण करतो. सहज म्हणून मी पुस्तक हाती घेतलं आणि संपेपर्यंत हातातून सुटलं नाही. इतक्या सहजपणे आणि विनोदी शैलीत कथाविषय मानण्याचं कसब फार कमी लेखकांकडे असतं. पुस्तकाचं रुपडं चित्ताकर्षक आहे.

रम्य ते बालपण- आंब्याचा सिझन

लेखक Omkar Bapat यांनी मंगळवार, 18/04/2017 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
रम्य ते बालपण- आंब्याचा सिझन ------------------------------------- आंबा या शब्दांतच मला फार रस आहे. सर्व फळांचा हा राजा. त्यात देवगडचा/रत्नागिरी हापूस म्हणजे जणू चक्रवर्ती सम्राटच. केसरी, तोतापूरी, पायरी, बैंगनपल्ली इ. बाकीच्या आब्यांच्या जाती या सम्राटाचे जणू मांडलिक राजेच. उन्हाळ्यात दिग्वीजयाला निघालेला हा सम्राट पुण्या-मुंबईतच श्रीमंताचा पाहुणचार करत रमायचा. सोलापूरसारख्या कोकणापासून दूर रहाणार्‍या आम्हां सामान्य जनतेला आमच्या लहानपणी याची फारच वाट पहावी लागायची. सामान्य जनतेला हा सम्राट फारच “महाग” होता.

हाॅटेलमधील आरोग्यदायी जेवण

लेखक Dr prajakta joshi यांनी सोमवार, 17/04/2017 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
"हाॅटेलमधील आरोग्यदायी जेवण" "रोगी चिरप्रवासी परान्न .भोजी परावसथशायी। यज्जिवती तन्मरणं यन्मरणं सो स्य विश्राम:।" अर्थ - आजारी व्यक्ती,नेहमी हिंडणारा ,बाहेरचे खाणारा,दुसर्याच्या आश्रयाने राहणारा यांचे जीवन मृत्युसमान असते.(आरोग्यास हानिकारक) आजच्या काळात मात्र फिरतीवर असणे व बाहेरचे खाणे ही जीवनशैली बनली असून ती अनिवार्य आहे. हाॅटेल मधील जेवण,फास्ट फुड,शीतपेय हे सारं नकळत तुमच्या -माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होवून गेले आहेत. हाॅटेलमधील जेवण हे आजकाल बहुतांशवेळा स्वच्छतेच्या दृष्टीने काटेकोर असते. पण टिकाऊपणासाठी वापरलेली रसायने, आकर्षकतेसाठी शरीरास अहितकर गोष्टीदेखील वापरल्या जातात.

उधई माले गिळी टाकई!...

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 16/04/2017 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
-डॉ. सुधीर रा. देवरे पुस्तकांसाठी (1993 ला) ओसरीच्या एका भिंतीला प्लायवूडचे शेल्फ तयार करून घेतले होते. मी जी पुस्तके विकत घेतो आणि वर्गणी भरून जी नियतकालिके मागवतो ती या शोकेसमध्ये ठेवत होतो. हया पुस्तकांमध्ये अनेक दुर्मिळ पुस्तकं होती की ते आता विकत घ्यायचं ठरवलं तरी मिळणार नाहीत. संदर्भासाठी जे पुस्तक लागतं ते काढून काम झाल्यावर पुन्हा जागेवर ठेऊन द्यायचं असा परिपाठ. पुस्तक केव्हाही लागतं म्हणून चाळवाचाळव नेहमी होत होतीच. असंच एका दिवशी मला कुठलंतरी पुस्तक हवं होतं म्हणून काढायला गेलो तर एका पुस्तकाला उधई लागलेली दिसली.

मूर्खांची लक्षणे !

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 14/04/2017 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
नाही नाही...हुरळून जाऊ नका..हे माझं आत्मचरित्र नव्हे.आतमध्ये काहीही लिहिलं तरी नावं त्याला साजेसं देऊ नये इतपत समज आलीये एव्हाना.आता आत्मचरित्र नसलं तरी ही लक्षणं माझी आणि माझ्यासारख्याच इतर अनेकांची आहेत हे लक्षात येईलच! रविवारचा दिवस! म्हणजे झी सिनेमा आणि सेट मॅक्सवर अनुक्रमे हम आपके है कौन आणि सूर्यवंशम पाहण्याचा दिवस! त्यातल्या त्यात सूर्यवंशम हा कुठल्याही समीक्षेच्या पलीकडे पोहोचलेला सिनेमा आहे.

चकवा

लेखक उपेक्षित यांनी शुक्रवार, 14/04/2017 16:58 या दिवशी प्रकाशित केले.

चकवा

खरे तर वाचन म्हणजे माझा जीव कि प्राण, अगदी लहानपणापासून मला हे वेड आहे जे आजपर्यंत टिकून आहे. साधा भेळीचा कागद सुद्धा पुरतो मला वेळप्रसंगी... ‘त्या’ विलक्षण घटनाक्रमाला पण अशीच वरवर पाहता साध्या गोष्टीने सुरवात झाली होती. आपल्या आयुष्यातपण अशा बर्याच चांगल्या-वाईट गोष्टी असतात ज्या वर-वर पाहता साध्या, शुल्लक वाटत असतात पण त्याच शुल्लक गोष्टी वेळ आली कि किती महत्वाच्या होऊन जातात नाही का ? ‘त्या’ दिवशी घरी कोजागिरीनिमित्त मसाला दुध आणि भेळ असा साधासा बेत ठरला.

आड (बावडी)

लेखक ज्ञानदेव पोळ यांनी मंगळवार, 11/04/2017 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
...गावात आड होता. आडावर रहाट होता. रहाटाला मोठी साखळी होती. साखळीला बादली अडकवून भल्या पहाटे पाणी ओढणारी माणसं होती. आडाचं पाणी पोटात साठवणारे मातीचे रांजण होते. रहाटाला करकरणारा आवाज होता. बाजूला धुणी धोपटणाऱ्या कासोट्यातल्या बायका होत्या. खाली घरंगळत वाहणाऱ्या पाण्यात खोटी शेती पिकवणारी लहान पोरं होती. "नांदायला नांदायला आडाचं पाणी शेंदायला!" गाणी गाणारे आवाज होते. पण काळाचा पक्षी उंच उडतो. गावासोबत आडही आटून जातो. आड रिता रिता होत जातो... ...आड आजही असतो. वरती मोडलेला रहाटही असतो. गंजलेली साखळीही असते. पण पाण्यात तरंगणारं कासव कधीच मेलेलं असतं.