Skip to main content

लेख

गावातला आड

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 15/11/2018 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे पूर्वी गावात आड असत. घरोघरी नसले तरी प्रत्येक पंधरा वीस घरांमागे एक आड असायचाच. घराच्या मागच्या दारी आड खोदला जायचा. जमिनीत चाळीस पन्नास हात खोल जाताच आडाला पाणी लागायचं. आडाची रूंदी चार बाय चार हात अथवा तीन बाय तीन हात असायची. या रूंदीला कडं म्हटलं जायचं. ‘आडनं कितीनं कडं घिदं?’ उत्तर यायचं ‘चार हात’. ‘हेरनं (विहिरीचं) कितीनं कडं घीदं?’ उत्तर यायचं ‘बारानं कडं’. (म्हणजे बारा बाय बारा हात). आड धसू नये म्हणून तो बांधून घेतला जायचा. दगड आणि चुना यात तो खालून वरपर्यंत गोल आकाराने बांधावा लागायचा. आडाच्या वर लाकडी रहाट बसवलं जायचं.

Cold Blooded - १० (अंतिम)

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 15/11/2018 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
रोशनी, जवाहर आणि अखिलेश या तिघांचीही हत्या करण्यासाठी बॅट्रॅकटॉक्सिन वापरण्यात आलं आहे हे ऐकून चारु नखशिखांत हादरली होती. रोहित बँगलोरला डॉ. मालशेंच्या लॅबमध्ये आलेला असतानाची सारी चर्चा क्षणांत तिच्या नजरेसमोर फिरुन गेली! "मिसेस द्विवेदी, तुम्ही डॉ. मालशेंच्या लॅबमध्ये असिस्टंट म्हणून काम करता, राईट?" "येस!" चारु स्वत:ला सावरत उत्तरली. "तुम्ही आणि शेखर अमेरीकेहून परत येताना कोलंबियात थांबून बॅट्रॅकटॉक्सिन घेवून मुंबईला आलात, करेक्ट?" "येस! मी व्हेकेशनसाठी स्टेट्सला जाणार आहे हे कळल्यावर परत येताना बॅट्रॅकटॉक्सिनचा स्टॉक आणण्याची डॉ. मालशेंनी सूचना केली होती.

अच्छे चाचा कच्चे चाचा

लेखक सुधीर मुतालीक यांनी बुधवार, 14/11/2018 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
"स्वातंत्र्य दिल्यावर तथाकथित भारतीय नेते थोडयाच कालावधीत भारताची वाट लावतील.भारतीय लोकांकडे राज्य करण्याची क्षमताच नाहीय, ते फक्त गुलामच राहू शकतात.... " तत्सम इंग्रजी वल्गनांच्या गदारोळात भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दिवसात स्वतंत्र भारतचे सक्षम नेतृत्व करू शकेल असा नेता जवाहरलाल नेहरू यांच्या इतका कुणी होता असे मला तरी आजही वाटत नाही. तत्कालीन परिस्थिती मध्ये नेहरू हे सर्वात अधिक योग्य नेतृत्व होते. आज रुजलेल्या आणि प्रगल्भ होऊ घातलेल्या लोकशाही व्यवस्थेतल्या दिवसात त्यांच्या नेतृत्वाचे अनेक अंगानी विश्लेषण होईल वा होते आहे.

Cold Blooded - ९

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 12/11/2018 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
रोहित अतिशय शांतपणे आपल्या आयपॅडवर काहीतरी वाचत होता. कोलंबियातून बॅट्रॅकटॉक्सिन आणणार्‍या डॉ. मालशेंच्या असिस्टंटची सखोल चौकशी केल्यावर त्याने थेट एअरपोर्ट गाठला होता आणि मिळालेली पहिली फ्लाईट पकडून रात्री अकराच्या सुमाराला तो मुंबईत उतरला होता. फ्लाईटच्या प्रतिक्षेत असताना त्याने डॉ. रेड्डींना फोन करुन डीएनए टेस्टच्या रिपोर्ट्सची चौकशी केली तेव्हा अद्यापही काही टेस्ट्स बाकी असून दुसर्‍या दिवशी सकाळी किंवा जास्तीत जास्तं दुपारपर्यंत त्याला रिपोर्ट इमेल करण्याचं डॉ. रेड्डींनी कबूल केलं होतं. संपूर्ण प्रवासामध्ये आतापर्यंतच्या तपासात पुढे आलेल्या माहितीची तो डॉ.

Cold Blooded - ८

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 10/11/2018 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
रोहित थंडपणे समोरच्या खुर्चीत बसलेल्या अल्ताफकडे पाहत होता. दिल्लीहून निघाल्यावर त्याने बरेली पोलीसांना फोन करुन अल्ताफला अ‍ॅरेस्ट करण्याची सूचना दिली होती. त्याचा फोन येताच इन्स्पे. शेख सादीकनी आपल्या स्टाफसह एजाज नगरकडे धाव घेतली. निसारच्या घराभोवती चारही बाजूला पोलीसांचं कडं उभं करुन ते आपल्या स्टाफसह आत घुसले. रात्री एक वाजता ध्यानीमनी नसताना पोलीस घरात घुसलेले पाहून तिथे एकच गोंधळ उडाला. आतल्या खोलीत असलेले अल्ताफ आणि रुक्साना जागे झाले होते. पण कोणतीही हालचाल करण्याची संधी मिळण्यापूर्वीच शेखनी त्याच्यावर झडप घालून त्याच्या हातात बेड्या चढवल्या होत्या!

फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : ११

लेखक रा.म.पाटील यांनी गुरुवार, 08/11/2018 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - ११ ( Decorate Your Love ) दीपावली.. प्रेमाचा गोडवा.. 'लाडू..' दिवाळीची गोड चव.. पण ती चव आता त्याच्यासाठी एक कडू आठवण झाली होती.. त्यामुळेच की काय त्याने लाडू खायचे सोडून दिले होते, त्याच्या आईला राहून राहून आश्चर्य वाटायचे की एकेकाळी ह्याच लाडूसाठी हट्ट धरायचा तो हाच का, मग आता इतका तिटकारा का आलाय त्याचा..? माझ्या हातच्या लाडूची चव बिघडली तर नाही ना.! मागच्या दिवाळीत त्याच्या आईने त्याला ह्याबद्दल विचारून पाहिले होते..

Cold Blooded - ७

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 08/11/2018 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी साडेआठ वाजता वाजता रोहितने आपलं हॉटेल चेक-आऊट केलं आणि एअरपोर्टला जाण्यासाठी टॅक्सी पकडली. तासाभराने तो एअरपोर्टवर जवळपास पोहोचला असताना त्याच्या मोबाईलवर कदमांचा फोन आला. "गुड मॉर्निंग! बोला कदम....." "सर....." "आर यू शुअर कदम? तुमची पूर्ण खात्री आहे?" "येस सर ....." कदमांच्या शब्दाशब्दाला त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बदलत होते. गेले दहा - बारा दिवस दिल्ली, सिमला, मंडी, कलकत्ता अशी सुरु असलेली अथक धावपळ आणि इन्क्वायरी आणि त्यातून पुढे आलेली माहिती याची नव्याने सांगड घालणं आता क्रमप्राप्तं होतं! डॉ. भरुचांवर त्याचा पूर्ण विश्वास होता.

Cold Blooded - ६

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 06/11/2018 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्‍या दिवशी सकाळी नऊच्या सुमाराला रोहित हेडक्वार्टर्सला पोहोचला तेव्हा कोहली त्याची वाटच पाहत होते. "सरजी, हा फिंगर प्रिंट्सचा रिपोर्ट! जवाहर कौलच्या घरात सापडलेली ती फिंगर प्रिंट ट्रेस झाली आहे." "प्रिंट ट्रेस झाली?" रोहितने अधिरतेने विचारलं, "कोणाची आहे ही प्रिंट?" "अल्ताफ हुसेन कुरेशी! हा अल्ताफ एक पैसे घेवून खून करणारा सुपारी किलर आहे सरजी! मूळचा तो उत्तर प्रदेशातल्या आझमगड जिल्ह्यातला आहे. तिथे त्याची प्रचंड दहशत आहे. आत्तापर्यंत त्याने सहा खून केले आहेत!

पहिले महायुद्ध! प्रकरण २ भाग १-बेल्जियमवरचा बलात्कार आणि श्लिफेन योजनेची अपरिहार्यता.

लेखक आदित्य कोरडे यांनी मंगळवार, 06/11/2018 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या महायुद्धाला तोंड कसे लागले ह्याचा संक्षिप्त इतिहास आपण पहिल्या प्रकरणात पहिला . ह्या युद्धात सगळ्यात आधी बळी गेले ते बेल्जियम हे चिमुकले राष्ट्र. ह्या बेल्जियम च्या तटस्थ राहण्याच्या हक्कावरूनच- त्या हक्काच्या जर्मनीने केलेल्या पायमल्लीमुळे हे युद्ध युरोपातील देशात लढले गेलेले एक छोटे मोठे युद्ध न राहता ते जागतिक महायुद्ध बनले. पहिले महायुद्ध प्रकरण दुसरे, भाग १ बेल्जियमवरचा बलात्कार आणि श्लिफेन योजनेची अपरिहार्यता. इतिहास काळात बेल्जियमचा भूभाग रोमन साम्राज्यात मोडत असे. त्यापूर्वी त्या भागाला गॉल असे संबोधले जाई.

आर्थिक गुंतवणूक आणि घोटाळे

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 05/11/2018 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
वीस एक वर्षांपुर्वी नाशकातल्या त्रिमुर्ती चौकात दक्षिण भारतीय लोकांनी एक बंगला भाड्याने घेतला होता. तेथे त्यांनी संसारोपयोगी वस्तू विकण्याचा धंदा सुरू केला होता. म्हणजे लोखंडी खुर्च्या, पातेले, जग, कढई, चटया, कूकर, फॅन, पलंग अगदी पाण्याचा पेला देखील. तर या सार्या वस्तू ते कमी किमतीत विकत. काही दिवसांत त्यांचा जम बसला. त्यावेळी लोकवस्ती नवीनच होती. लोकं वस्तू विकत घेत आणि इतर वस्तूंची आगावू मागणी करत. आगावू मागणीच्या वस्तूसाठी ते लोक आधीच पैसे मागत. गिर्हाईकही स्वस्तात वस्तू मिळते म्हणून पैसे जमा करत. असे सहा सात महीने झाले.