मानवाला पाच ज्ञानेंद्रिये आहेत असे सामान्यतः मानले जाते. डोळे, कान, नाक , जीभ , त्वचा ह्या इंद्रियांनी अनुक्रमे दृष्य , ध्वनी, गंध, चव, स्पर्श या भौतिक गोष्टींचे ज्ञान होते.
पण मला वाटते मानवाचे स्नायू हे देखील मानवाला ताण ,वजन या भौतिक गोष्टीचे ज्ञान होते. त्यामुळे ते एक ज्ञानेंद्रिय मानायला हवे. हे ज्ञान स्पर्शातून होणार्या ज्ञानापेक्षा पुर्ण वेगळे आहे. उदा एखादा गॅस सिलिंडर भरलाय की रिकामा हे त्याला बघून समजणार नाही, त्याला कुरवाळूनही कळणार नाही पण उचलल्याने लगेच कळेल. तेव्हा मानवाचे असे स्नायू जे वजन ओढणे, ढकलणे या करिता कामात येतात त्यांना एक ज्ञानेंद्रिय मानावे.
आपणास काय वाटते ?