मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ज्याचा त्याचा समाजवाद

प्रकाश घाटपांडे ·

कानडाऊ योगेशु Sun, 02/09/2025 - 11:39
>>स्वत:चा विकास करताना सोबत समाजाचाही विकास व्हावा या दृष्टीने काही योगदान देता आले तर ते पाहणे. मी स्वतः माझ्या बिगिरी च्या काळात अश्या एन.जी.ओ सोबत काम केले होते व सध्या जवळचा एक नातेवाईक सरकारी नोकरीत काम करतोय व त्याचा अश्या एन.जी.ओ शी संबंध येतो. इथे प्रकार एकदम उलटा आहे. समाजाचा विचार करताना स्वतःचा विकास कसा व्हावा ह्याला प्राथमिकता दिली जाते किंबहुना तसे होत नसेल तर मॅनेज होणार्या इतर एन.जी.ओ शी संपर्क केला जातो हे पाहिले आहे. पुस्तकी तत्वे व मुल्ये ही पुस्तकातच ठिक असतात किंवा अश्या मुल्यांचा जाहीररित्या उदो उदो करणारेच वेळप्रसंगी ती मुल्ये/तत्वे सोयीस्कररित्या वाकवतात व आपले मातीचे पाय दाखवुन देतात. लेख थोडा शब्दबंबाळ व त्यामुळे निबंधात्मक दुर्बोध झाला आहे. थोडे एडिटींग केले गेले असते व अनुभव टाकले असते तर जास्त वाचनीय झाला असता.

चौथा कोनाडा Sun, 02/09/2025 - 20:16
स्वत:ला पटत नसलेल्या अनेक गोष्टी आपण तडजोड म्हणून करत असतो. कधी ज्या समाजात रहायचे असते त्यापासून तुटून पडू नये म्हणून, कधी कुटुंबाच्या सुखासाठी, कधी व्यावहारिक सोयी साठी. एक मन विचार करते तर दुसरे मन भावनेच्या आहारी जाते. अशा वेळी मेंदु सोयीस्कर निर्णय घेत असताना तो भावनेच्या आहारी बर्‍याचदा जातो. कधी संघर्षाची ताकद संपली असते. असहाय्य असतो. कधी अस्तित्वाची लढाई असते. लोक काय म्हणतील या पेक्षा अस्तित्व टिकवणे महत्वाचे असते.
अस्तित्व ही जैविक प्रेरणा आहे ते टिकवण्यासाठी मेंदु काही निर्णय चक्क तुमच्या नकळत घेत असतो. एक प्रकारची प्रतिक्षिप्त क्रिया म्हणा ना! fight or flight रिस्पॊन्स मधे मेंदु असे निर्णय घेत असतो. पुढे हा प्रश्न Does free will really exists पर्यंत जाउ शकतो. समाजधुरीणांवर आपण आदर्शवादाचे आरोपण करत असतो. त्याच ओझ त्यांनाही होत असत.समाजाच्या नजरेतुन आपण उतरले जाउ हे भय. त्यांचा तुज आहे तुजपाशी मधला आचार्य होतो. वर आपण विचारांमधे होणार्‍या बदलामुळे कृतीतील बदल पाहिला. वाल्याचा वाल्मि्की हा बदल रामायणातल्या कथांमधे दिसतो. प्रत्यक्ष अवती भवती पण दिसतो.बदल हा निसर्गाचा नियम आहे.थोडक्यात उक्ती व कृती यातील फरक हा प्रत्येकवेळी दांभिक,लबाडी,स्वार्थ असा नसतो. त्यात सर्वायवल इन्सटिंक्ट असते. शिवाय व्यक्ती तितक्या प्रकृती आहेच. राजकाराणात ही याच समाजातल्या व्यक्ती आहेत.हे आपण विसरुन चालणार नाही.
हे दोन्ही परिच्छेद पटले, लोकमान्य टिळकांची आठवण झाली. रष्ट्रिय पातळीवरचे राजकारण करण्यासाठी त्यांनी स्वतःत वेळोवेळी बदल केल्याचे वाचले होते हे आठवते.

कानडाऊ योगेशु Sun, 02/09/2025 - 11:39
>>स्वत:चा विकास करताना सोबत समाजाचाही विकास व्हावा या दृष्टीने काही योगदान देता आले तर ते पाहणे. मी स्वतः माझ्या बिगिरी च्या काळात अश्या एन.जी.ओ सोबत काम केले होते व सध्या जवळचा एक नातेवाईक सरकारी नोकरीत काम करतोय व त्याचा अश्या एन.जी.ओ शी संबंध येतो. इथे प्रकार एकदम उलटा आहे. समाजाचा विचार करताना स्वतःचा विकास कसा व्हावा ह्याला प्राथमिकता दिली जाते किंबहुना तसे होत नसेल तर मॅनेज होणार्या इतर एन.जी.ओ शी संपर्क केला जातो हे पाहिले आहे. पुस्तकी तत्वे व मुल्ये ही पुस्तकातच ठिक असतात किंवा अश्या मुल्यांचा जाहीररित्या उदो उदो करणारेच वेळप्रसंगी ती मुल्ये/तत्वे सोयीस्कररित्या वाकवतात व आपले मातीचे पाय दाखवुन देतात. लेख थोडा शब्दबंबाळ व त्यामुळे निबंधात्मक दुर्बोध झाला आहे. थोडे एडिटींग केले गेले असते व अनुभव टाकले असते तर जास्त वाचनीय झाला असता.

चौथा कोनाडा Sun, 02/09/2025 - 20:16
स्वत:ला पटत नसलेल्या अनेक गोष्टी आपण तडजोड म्हणून करत असतो. कधी ज्या समाजात रहायचे असते त्यापासून तुटून पडू नये म्हणून, कधी कुटुंबाच्या सुखासाठी, कधी व्यावहारिक सोयी साठी. एक मन विचार करते तर दुसरे मन भावनेच्या आहारी जाते. अशा वेळी मेंदु सोयीस्कर निर्णय घेत असताना तो भावनेच्या आहारी बर्‍याचदा जातो. कधी संघर्षाची ताकद संपली असते. असहाय्य असतो. कधी अस्तित्वाची लढाई असते. लोक काय म्हणतील या पेक्षा अस्तित्व टिकवणे महत्वाचे असते.
अस्तित्व ही जैविक प्रेरणा आहे ते टिकवण्यासाठी मेंदु काही निर्णय चक्क तुमच्या नकळत घेत असतो. एक प्रकारची प्रतिक्षिप्त क्रिया म्हणा ना! fight or flight रिस्पॊन्स मधे मेंदु असे निर्णय घेत असतो. पुढे हा प्रश्न Does free will really exists पर्यंत जाउ शकतो. समाजधुरीणांवर आपण आदर्शवादाचे आरोपण करत असतो. त्याच ओझ त्यांनाही होत असत.समाजाच्या नजरेतुन आपण उतरले जाउ हे भय. त्यांचा तुज आहे तुजपाशी मधला आचार्य होतो. वर आपण विचारांमधे होणार्‍या बदलामुळे कृतीतील बदल पाहिला. वाल्याचा वाल्मि्की हा बदल रामायणातल्या कथांमधे दिसतो. प्रत्यक्ष अवती भवती पण दिसतो.बदल हा निसर्गाचा नियम आहे.थोडक्यात उक्ती व कृती यातील फरक हा प्रत्येकवेळी दांभिक,लबाडी,स्वार्थ असा नसतो. त्यात सर्वायवल इन्सटिंक्ट असते. शिवाय व्यक्ती तितक्या प्रकृती आहेच. राजकाराणात ही याच समाजातल्या व्यक्ती आहेत.हे आपण विसरुन चालणार नाही.
हे दोन्ही परिच्छेद पटले, लोकमान्य टिळकांची आठवण झाली. रष्ट्रिय पातळीवरचे राजकारण करण्यासाठी त्यांनी स्वतःत वेळोवेळी बदल केल्याचे वाचले होते हे आठवते.
समाजवादी याचा काल सुसंगत व व्यापक अर्थ असा की आपण ज्या समाजात राहतो त्याचे काही देण लागतो या दृष्टीने आपल्या कुवतीनुसार समाज उन्नती साठी शक्य असेल ते काम करणे. स्वत:चा विकास करताना सोबत समाजाचाही विकास व्हावा या दृष्टीने काही योगदान देता आले तर ते पाहणे. व्यवहारिक दृष्ट्या स्वार्थ व परमार्थ दोन्ही कसा साधता येईल हे पहाणे. व्यक्तिगत पातळीवर समाजहिताचे व्यापक काम करताना अनेक मर्यादा येतात. त्यामुळॆ संघटनात्मक पातळीवर देखील हे काम केले जाते. एनजीओ, चळवळी, ट्र्स्ट अशा समाजसेवी संस्थांच्या मार्फत हे काम होत असते.