Skip to main content

संसदीय कामकाज

शेवटी न्यायालय, संसद, विधीमंडळे आणि सामान्य जनतेचे काय ?

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 08/12/2015 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
एखादी गोष्ट रोज घडली तर त्याकडे सर्वसामान्यपणे दुर्लक्ष केले जाते या अर्थाची 'रोज मरे, त्याला कोण रडे' अशी मराठी भाषेत म्हण आहे. आला दिवस गेला दिवस संसदेचे काम बंद पाडूनच अथवा रस्त्यावर उतरुनच आपला आवाज दाखवायचा या सर्वच राजकीय पक्षांच्या नितींचा एक सामान्य माणूस म्हणून कंटाळा आला आहे, मग असे उद्योग करणारे कोणत्या अबकड पक्षाचे आहेत का हळक्षज्ञ पक्षाचे आहेत त्याने काहीच फरक पडत नाही.