मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सरसंघचालकांचे आवाहन - अवैज्ञानिक रूढी आणि परंपरांचा त्याग

संदीप ताम्हनकर ·

संजय पाटिल Fri, 09/25/2015 - 13:26
सर्व प्रथम हे सरसंघचालक यांचे वैयक्तिक मत आहे का संघाची भुमिका म्हणून मांडलिये, हे बघावे लागेल. अर्थात अत्ता पर्यंतचा ईतिहास बघता संघचालक यांचे मत हेच संघाची भुमिका समजले गेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याला विरोधासाठी विरोध करणारे पण हळूच पुढे येतील. प्रत्येक वेळी हिंदुनांच का सुधारणांचा सल्ला दिला जातो?( आता हे विचार्णारे कोण असतील हे वेगळे सांगायला नको) काहिही असो, तुम्ही म्हणताय तसे जर खरेच असेल तर संघ सुधार्तोय असेच म्हणावे असे वटते.

In reply to by संजय पाटिल

बाळ सप्रे Fri, 09/25/2015 - 18:40
संघ सुधार्तोय असेच म्हणावे असे वाटते
परफेक्शन को इंप्रूव्ह करना ना मुमकीन होता है.. हे माहीत नाही ??

In reply to by संजय पाटिल

विजुभाऊ Tue, 09/29/2015 - 09:56
सर्व प्रथम हे सरसंघचालक यांचे वैयक्तिक मत आहे का संघाची भुमिका म्हणून मांडलिये, हे बघावे लागेल
सांघाच्या बाबतीत हे सर्वात सोपे समीकरण आहे. जोपर्यन्त वादविवाद होत नाहीत तोपर्यन्त ते संघाची भुमीका असते. वाद उफाळली तर सोयीनुसार ते वैयक्तीक मत होते.

सरसंघचालकांचे आवाहन - अवैज्ञानिक रूढी आणि परंपरांचा त्याग
सत्यनारायण ही हिंदु उपासनेतील सर्वात जास्त अवैज्ञानिक प्रथा आहे , तिला कोणत्याही वेदांचा उपनिषदांचा गीता ब्रह्मसुत्रांचा आधार नाही , एव्हन , कसलाही पौराणिकही आधार नाही ! वैज्ञानिक आधार तर नाहीच नाही अन ऐतिहासिक आधारही नाही .....आणि कथेतील कित्येक भाग तर सरळ सरळ अध्यात्मिक दहशतवाद आहे ! आता पाहुया, सरसंघचालकांचे आवाहन ऐकुन पुरोहितवर्ग आणि सश्रध्द हिंदु समाज ह्या परंपरेचा त्याग करतो की स्वमतांध दांभिकता चालु ठेवुन स्वतःची तुंबडी भरत ह्या परंपरा चालु ठेवतो आणि वर परत संघावरच टीका करत रहातो ते !! =))

In reply to by सुनील

बॅटमॅन Fri, 09/25/2015 - 14:55
असेच म्हणतो. ध्यान केल्यावर शरीरात न्यूट्रिनो नामक कण येतात अशी मोलाची माहिती आम्हांस अलीकडेच मिळालेली आहे. (ते कण आल्याने काय फायदा होतो हे सांगितले नाही हा भाग वेगळा)

In reply to by बॅटमॅन

सुनील Fri, 09/25/2015 - 15:06
ध्यान वैग्रे तर सोडाच. ती तर लैच अ‍ॅडवान्स्ड गोष्ट. पण कानावर जानवे अडकवल्याने मुत्राशयाकडे जाणारी नस उत्तेजीत होते, असेही आयकले हाये!!

In reply to by सुनील

बॅटमॅन Fri, 09/25/2015 - 15:17
शिवाय मराठी व्हेज जेवणच सर्वांत सात्त्विक असे मराठी माणसाचे लेख आणि केरळी जेवण व पर्यायाने नारळाचे तेलच आयुर्वेदिकली सर्वांत बेस्ट असे केरळी माणसाचे लेखनही वाचनात आलेय. झालंच तर शिवलिंग म्हणजे न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर हे राहिले का? ;) आणि संध्याकाळपेक्षा सकाळी देवळात गेल्यावर १०.२३४५८७६% जास्त पुण्य मिळते हेही विसरलोच होतो.

In reply to by बबन ताम्बे

बॅटमॅन Fri, 09/25/2015 - 15:30
ऐकावे ते नवलच. जर असे असेल तर मग गोमांसाबद्दलचे विचार पाहता प्राचीन भारतातील ऋषींची बौद्धिक पातळी एकदम खालच्या पातळीवर होती असेच म्हटले पाहिजे. अन किरणोत्साराचे माहिती नाही, पण अशा माहितीच्या उत्सर्गाने एखाद्याचा मेंदू भरून गेला तर नंतर कितीही प्रबोधन केले तरी उपयोग होत नाही हे खरेच आहे.

In reply to by बबन ताम्बे

नाव आडनाव Fri, 09/25/2015 - 15:44
च्यायला, ते पाकडे धमकी देतात अणुयुद्धाची. आता टाका म्हणावं अणुबाँब. तो फुसका करण्याची टॅक्ट आली आहे आमच्याकडं. स्मार्ट सिटीतल्या सगळ्या ईमारतींवर बाहेरून शेण लावलं तर त्या अजून स्मार्ट होतील. स्मार्ट सिटीत आतून सुद्धा फरश्या बसवण्यापेक्षा सारवून घेणं कंपल्सरी केलं पाहिजे. मग तर आपली अणुबाँब पासून कायमची सुटका झाली असं म्हणायचं. आता गोहत्या बंदी आहे त्यामुळे पाहिजे तितकं शेण (जसं पाहिजे तसं - गावरान किंवा जर्सि) मिळायला प्रॉब्लेम नाही.

In reply to by नाव आडनाव

पिवळा डांबिस Fri, 09/25/2015 - 22:00
पण सगळ्या इमारती आतून-बाहेरून सारवून घ्यायच्या म्हणजे खर्च खूप येईल हो! त्यापेक्षा समस्त नागरिकांनी आपल्या सर्व शरीरावर शेण थापून घेणं कंपल्सरी केलं तर? अणुसर्गापासून सुरक्षा तर मिळेलच शिवाय काळे-गोरे, सुरूप-कुरूप हा भेद नष्ट होऊन समाज एकसंध व्हायला किती मदत होईल!!! :)

In reply to by नाव आडनाव

द-बाहुबली Sat, 09/26/2015 - 14:04
स्मार्ट सिटीतल्या सगळ्या ईमारतींवर बाहेरून शेण लावलं तर त्या अजून स्मार्ट होतील........ ....तर आपली अणुबाँब पासून कायमची सुटका झाली असं म्हणायचं.
मायला अधिकृतपणे स्मार्ट ठरुनही सिटीच्या नशीबी... हे ऐकणं आहेच :D :D :D :=))

In reply to by बबन ताम्बे

विकास Fri, 09/25/2015 - 17:16
ही बातमी एकदम रोचक वाटली म्हणून खणायला गेलो... Journal of Radioanalytical and Nuclear Chemistry मध्ये Biosorption of radiotoxic 90Sr by green adsorbent: dry cow dung powder हा एक पेपर दिसला... कदाचीत Journal of Radioanalytical and Nuclear Chemistry ऑरगनायजरच्याच छापखान्यात छापले जात असावे झालं...

In reply to by बबन ताम्बे

माहितगार Fri, 09/25/2015 - 17:43
ताम्बे साहेब आणि ब्याटमनराव तुम्ही कै म्हणा, त्या न्युक्लीयरच्या सुडोवैज्ञानिक गप्पा सोडल्यातर Zelia Nuttall या बाईंच्या The Fundamental Principles of Old and New World Civilizations यांच्या पुस्तकातील गोमाते विषयीचे संदर्भ गैर हिंदूंना आणि अरबस्थानात मूळ शोधणार्‍यांना कदाचित उपयूक्त असावेत.

In reply to by बबन ताम्बे

श्रीगुरुजी Sat, 09/26/2015 - 13:03
>>> अणुबॉम्बलाही निष्प्रभ करतं गायीचं शेण!: RSS हा दावा "राष्ट्रीय मुस्लिम मंच" या संघटनेने केला आहे असे या लेखात लिहिले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

https://en.m.wikipedia.org/wiki/Muslim_Rashtriya_Manch लाभ घ्या!!! ह्याच मुस्लिम राष्ट्रिय मंच (पेरेंट आर्गेनाइजेशन आरएसएस) ने पार्लियामेंट एनेक्स ला इफ्तार पार्टी दिली होती !! दादुमियां न हे गुर्जी दोघे बसवायला हवे होते तिथे सोबत!

In reply to by बॅटमॅन

विकास Fri, 09/25/2015 - 17:43
ध्यान केल्यावर शरीरात न्यूट्रिनो नामक कण येतात अशी मोलाची माहिती आम्हांस अलीकडेच मिळालेली आहे. मला असे कोणी म्हणलं असल्यास आश्चर्याचा धक्का बसणार नाही! (पक्षी: तुमच्याशी सहमती). पण नक्की असेच म्हणलेले आहे का? कारण मला वाटते हे सगळे महर्षी महेश योगींच्या transcendental meditation च्या संदर्भातील असावे असे वाटते. आपण उल्लेखलेल्याचा जर नक्की संदर्भ माहीत असला तर सांगावा.

In reply to by विकास

बॅटमॅन Fri, 09/25/2015 - 19:38
नक्की काय लिहिलेले आहे ते माहिती नाही. मला एकाने एकदम सिरियसली सांगितले, अगदी कालचीच गोष्ट आहे म्हणून लक्षात राहिले इतकेच. बाकी त्या पेपरमध्ये नक्की काय म्हटले आहे ते सांगाल का? बायोसॉर्प्शन म्हणजे काय? कसले प्रयोग केले? इ.इ. म्हणजे नक्की कळेल तरी की आरेसेसच्या न्यूजमागचा क्लेम खर्‍या माहितीच्या आधारावर बेतलेला आहे की असंच काहीतरी ठोकून दिलंय ते.

In reply to by बॅटमॅन

विकास Sun, 09/27/2015 - 01:15
नक्की काय लिहिलेले आहे ते माहिती नाही. मला एकाने एकदम सिरियसली सांगितले हे बरे आहे. कोणी तरी नाकावरची माशी न उडवता सांगितले आणि तुम्ही ते गांभिर्याने घेतले. विश्वास ठेवला आणि त्याचा उपयोग माहिती न शोधता कुणाला तरी ठोकायला केला. प्रश्न विचारून खात्री कराविशी वाटली नाही का? बघा तुमच्यावर विश्वास असल्याने मी पण आधीच सहमती दर्शवली होती... ;) असो. बाकी त्या पेपरमध्ये नक्की काय म्हटले आहे ते सांगाल का? बायोसॉर्प्शन म्हणजे काय? कसले प्रयोग केले? इ.इ. आत्ता लक्षात आले की त्या पेप्राचा दुवा का माहीत नाही, आधी चिकटला गेला नव्हता... हा घ्या येथे... तुम्ही वाचून त्यात काय म्हणले आहे ते लक्षात घेऊ शकता. तुमच्या सारख्याला माझ्यासारख्याने सांगणे योग्य वाटत नाही... मी पडलो फंडू - आय मीन फंडामेंटल हिंदू ;) मी बोलून कसे चालणार?

In reply to by विकास

बॅटमॅन Wed, 09/30/2015 - 12:05
हे बरे आहे. कोणी तरी नाकावरची माशी न उडवता सांगितले आणि तुम्ही ते गांभिर्याने घेतले. विश्वास ठेवला आणि त्याचा उपयोग माहिती न शोधता कुणाला तरी ठोकायला केला. प्रश्न विचारून खात्री कराविशी वाटली नाही का? बघा तुमच्यावर विश्वास असल्याने मी पण आधीच सहमती दर्शवली होती... ;) असो.
उगा काहीतरीच?
आत्ता लक्षात आले की त्या पेप्राचा दुवा का माहीत नाही, आधी चिकटला गेला नव्हता... हा घ्या येथे... तुम्ही वाचून त्यात काय म्हणले आहे ते लक्षात घेऊ शकता. तुमच्या सारख्याला माझ्यासारख्याने सांगणे योग्य वाटत नाही... मी पडलो फंडू - आय मीन फंडामेंटल हिंदू ;) मी बोलून कसे चालणार?
हेही आपले उगीच आहे. बाकी पुस्तीची गरज नव्हती.

एस Fri, 09/25/2015 - 14:38
यातूनही स्वतःला सोयीस्कर असा आणि तेवढाच अर्थ घेऊन हिंदू धर्म कसा पुरोगामी, विज्ञानवादी, सर्वश्रेष्ठ आहे असाच प्रचार केला जाईल. प्रत्यक्षात हिंदू धर्मातील साचलेपणा आणि इतर जे काही दोष असतील ते जिथल्या तिथेच राहतील. बाकी लेख रा. स्व. संघाला छान चिमटे काढणारा आणि उपरोधिक झाला आहे.

छ्या! हिंदू धर्मातल्या वैदिक विज्ञानाची खिल्ली उडवायचे काम नाही सांगतो, भारतीय ईतिहासातील घोडचुका आणि जागतिक इतिहासातील खिंडारे ही पु ना ओक यांची पुस्तके राष्ट्रीय ग्रंथ म्हणुन मोदी काकांनी घोषित करावीत

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रगो,वेदांमध्ये प्रचंड विज्ञान आहे त्यामुळे त्यावर पुरोगामी लोक टिका करुन वेदांना बदनाम करत असतात.आजकालचे हे क्वांटम मॅकॅनिक्स,जेनेटिक इंजिनिअरींग,सबॲटोमीक फिजिक्स,थिअरॉटीकल फिजिक्स,बायोमेकॅट्रोनिक्स,कॉस्मॉलॉजी, इव्हॉल्युशनरी बायॉलॉजी हे सगळे ज्ञान आमच्या वेंदांमध्ये होते , पाश्च्यात्य ख्रिस्ती लोकांनी जुने ग्रंथ व वेद इथुन तिकडे नेले व आज ते आम्हालाच विज्ञान शिकवत आहेत.आ हा त कु ठे ??????

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

आजकालचे हे क्वांटम मॅकॅनिक्स,जेनेटिक इंजिनिअरींग,सबॲटोमीक फिजिक्स,थिअरॉटीकल फिजिक्स,बायोमेकॅट्रोनिक्स,कॉस्मॉलॉजी, इव्हॉल्युशनरी बायॉलॉजी हे सगळे ज्ञान आमच्या वेंदांमध्ये होते , पाश्च्यात्य ख्रिस्ती लोकांनी जुने ग्रंथ व वेद इथुन तिकडे नेले व आज ते आम्हालाच विज्ञान शिकवत आहेत.आ हा त कु ठे ??????
तुम्हाला कोणी सांगितलय हो हे ? उगाचच कोणाच्या काहीतरी बोलण्यावरुन काहीतरी मते बनवायची अन मग विरोध करत बसायचे ... ? बाकी , गणितामध्ये भारतीयांनी प्रचंड प्रगती केली होती ह्यात शंका नाही पण तुम्ही मात्र नेमका तोच उल्लेख टाळलेला आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Fri, 09/25/2015 - 18:48
प्रचंड प्रगती केली होती ह्यात शंका नाही पण तुम्ही मात्र नेमका तोच उल्लेख टाळलेला आहे !" अहो, कदाचित ते विसरले असतील. किंवा कदाचित त्यांना असलेले ज्ञान त्यांना इथे मिपाकरांना द्यायचे पण नसेल. आता हेच बघाना, गेले कित्येक दिवस, ते "http://misalpav.com/comment/reply/31763/712577" ह्या बाबत काहीच ज्ञान देत नाही आहेत. आता बोला. (फुजि ह्यांच्या ज्ञानकणांचा फॅन) मुवि

In reply to by प्रसाद गोडबोले

@प्रगो,बंधो ,वेदांमध्ये अफाट विज्ञान आहे हे कुणि सांगायला का हवे, जसा सुर्याच्या प्रकाशाने सर्वांचेच डोळे दिपतात तसेच वेदातल्या ज्ञानाचं आहे, जे ज्ञानसाधनेच्या मार्गावरील पांथस्थाला वाट दाखवन्याचे अविरत कार्य करत आहेत. पण या अफाट विज्ञानाचा गैर वापर होऊ शकतो हे आपल्या प्राचीन ऋषिमुनींना ठाऊक होते त्यामुळे त्यांनी संस्कृतसारख्या देवभाषेत हे ज्ञान लिहून ठेवले. नुकतेच max plank institute of planetary sciences चे संशोधक फ्रेडरीक वॅन गॉफ यांनी ऋग्वेदातल्या फक्त काही ऋचांचा अभ्यास करुन ion engine चा शोध लावला आहे, आता मनुष्य सलग अनेक वर्श अंतराळात प्रवास करु शकतो.आह्हात्त क्कुठ्ठे!!!!!!!!!!

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

थोडक्यात आपण कोणताच रेफरन्स द्यायला तयार नाही आहात तर ! तुमचे म्हणणे म्हण्जे नुसती हवा आहे तर !

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

मुक्त विहारि Fri, 09/25/2015 - 18:43
"वेदांमध्ये प्रचंड विज्ञान आहे त्यामुळे त्यावर पुरोगामी लोक टिका करुन वेदांना बदनाम करत असतात.आजकालचे हे क्वांटम मॅकॅनिक्स,जेनेटिक इंजिनिअरींग,सबॲटोमीक फिजिक्स,थिअरॉटीकल फिजिक्स,बायोमेकॅट्रोनिक्स,कॉस्मॉलॉजी, इव्हॉल्युशनरी बायॉलॉजी हे सगळे ज्ञान आमच्या वेंदांमध्ये होते , पाश्च्यात्य ख्रिस्ती लोकांनी जुने ग्रंथ व वेद इथुन तिकडे नेले व आज ते आम्हालाच विज्ञान शिकवत आहेत.आ हा त कु ठे ??????" वरील माहितीबद्दल धन्यवाद..... पण काय हो, तुम्ही पण, काही गोष्टी इथे मिपावर सांगणार होतात ना? त्याचे काय झाले? लिंक देत आहे. "http://misalpav.com/comment/reply/31763/712577"

In reply to by मुक्त विहारि

मांत्रिक Sat, 09/26/2015 - 16:04
@ फु.जी.. वैदिक ऋचांमध्ये सूर्याच्या रथाला ७ घोडे असल्याचा उल्लेख आहे. सूर्यप्रकाश ७ रंगांत विभाजीत होतो हे वैज्ञानिक सत्य तुम्हाला माहीत असेलच.. या साम्यस्थळाचे स्पष्टीकरण काय? वेदांतील १००% गोष्टींत वैज्ञानिक सत्य नसेल पण काही काही सत्ये तर नक्कीच दडलेली आहेत.

In reply to by मांत्रिक

खरय हो! फक्त वेदातले हे ज्ञान सरळ सांगितले असते तर् लोकांनी त्याचा गैरवापर केला असता म्हणून रथाची चाके , घोडे अशा सांकेतीक भाषेत ते सांगिअतले . एवढेच प्रसिद्ध फ्रेंच वैज्ञानिक लई झूटोस्की यांचेही असेच म्हणने आहे,2000 साली याविषयीचा त्यांचा लेख national institute of advancement of science च्या proceeding's मध्ये आला आहे. लिंक मिळाल्यास देईनच...

In reply to by मांत्रिक

dadadarekar Sat, 09/26/2015 - 20:28
रंग अनेक असतात. त्यातले सात दिसतात. इन्फ्रारेड , अल्ट्रावायोलेट दिसत नाहीत... ज्ञान नेमक्या भाषेत सांगावे लागते.. आजकालच्या जमान्यात तरच त्याला मान्यता मिळते.

In reply to by dadadarekar

सुबोध खरे Sat, 09/26/2015 - 20:38
हितेस भाऊ जे दिसतात त्यांना रंग म्हणतात. इन्फ्रा रेड किंवा अल्ट्रा व्हायोलेट हे रंग नव्हे तर तरंग आहेत. ज्ञान नेमक्या भाषेत सांगावे लागते असे म्हणालात म्हणून लिहिले अन्यथा पास दिला असता.

In reply to by dadadarekar

सुबोध खरे Sat, 09/26/2015 - 20:46
परत तेच जे दिसतात त्यांनाच रंग म्हणतात जे दिसतात आणी दिसत नाहीत(अदृश्य आहेत) अशा सगळ्याना तरंग म्हणतात. सगळे रंग हे तरंग आहेत पण सगळेच तरंग हे रंग नव्हेत.

In reply to by सुबोध खरे

dadadarekar Tue, 09/29/2015 - 08:53
आपापल्या पट्टीत गावे.. काळी दोन काय नी पांढरी पाच काय ! आपली पट्टी सोडू नये. .... पं. विष्णू दिगंबर पलुस्करांचा गाववाला ... ( उस्ताद दादाखान कुरुंदवाडकर )

In reply to by dadadarekar

दादूस, तुमी नुसता अवैचारीक वितंडवाद घाला हो, त्यात तुमचा हातखंडा आहे. उगा शास्त्रिय कारण्परंपरेत घुसू नका... कारण तिथे तुम्ची पय्ल्याच बॉल्ला विकेट पड्तिया =)) =))

In reply to by सुबोध खरे

वगिश Tue, 09/29/2015 - 16:25
इथे थोडी चुक झाली आहे. " सर्व रंग हे तरंग असतात." जे तरंग मानवी डोळे बघु शकतात त्यांना आपण रंग म्हणून ओळखतो. इतर प्राणी वेगळे तरंग बघु शकतात.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

श्रीगुरुजी Fri, 09/25/2015 - 23:15
>>> भारतीय ईतिहासातील घोडचुका आणि जागतिक इतिहासातील खिंडारे ही पु ना ओक यांची पुस्तके राष्ट्रीय ग्रंथ म्हणुन मोदी काकांनी घोषित करावीत चुकलात नाना! त्याऐवजी तुमच्या लाडक्या खेडेकर आणि कोकाटेची महान पुस्तके राष्ट्रीय ग्रंथ म्हणून जाहीर व्हायला हवीत.

तुडतुडी Fri, 09/25/2015 - 16:59
हिंदूंनी अवैज्ञानिक रूढी आणि परंपरा पाळणे बंद करणं हि अतिशय चांगली गोष्ट आहे . इतर धर्मियांचं काय ? भूत, चमत्कार, अलौकिक शक्ती, गुप्त धन, अतींद्रिय शक्ती, कारणी, जादूटोणा, जारणमारण, चेटूक, मंत्राने विष उतरवणे,
ह्या अंधश्रधा आहेत म्हणणार्यांना त्या करायला जमत नाहीत . ह्या गोष्टी खरोखर अस्तित्वात आहेत . अंधश्रद्धा नाहीत . पण त्या करण जमत नसताना आपल्याला जमतात असं खोटंच सांगणं ,त्यासाठी पैसे उकळणं , अत्याचार करणं , फ़सवणं हे मात्र गुन्हे आहेत . एखाद्याकडे अतींद्रिय शक्ती खरोखर असेल पण त्याचा दुसर्याला काहीच त्रास होत नसेल तर अशी शक्ती असणं हा गुन्हा ठरत नाही .
चितेवर मृतदेहाचे दहन, यज्ञ-याग
हे हवेच्या प्रदूषणात येतात ? थोडक्यात हिंदू धर्म लोकांनी सोडूनच द्यावा असं म्हणायचय तुम्हाला .
जर असे असेल तर मग गोमांसाबद्दलचे विचार पाहता प्राचीन भारतातील ऋषींची बौद्धिक पातळी एकदम खालच्या पातळीवर होती असेच म्हटले पाहिजे.
आधार ?मुल्ला मौलवींची बौद्धिक पातळी काय आहे ह्याच्यावर हि बोला अतिशय गैरसोयीचा असलेला काळा रंगाचा बुरखा वापरायची सक्ती ,शिक्षण घेण्याला बंदी , पहटे ५ लाच मशिदीतून ओरडून लोकांची झोपमोड करणं (ध्वनिप्रदूषण),४ बायका करून व्यभिचार करणं, शेखसल्ल्याच्या उर्सामध्ये मोठमोठ्या दाभणी टोचणं (ह्या दाभणी फक्त सध्या पाण्यात धुतल्या जातात . त्याच पुढच्या वर्षी दुसर्यांसाठी वापरतात . ) , ताबूत च्या वेळी अनैसर्गिक त्रास करून घेणं आणि इतरांवर तशी सक्ती करणं ,बकरी ईद च्या नावाखाली हजारो मुक्या जीवांची कत्तल करणं, माझाच धर्म मोठा बाकी सगळे काफर म्हणून त्यांना हिणवण ,सतत त्यांच्यावर टीका करणं, दंगली करणं , अजिबात स्वच्छता न पाळणं ह्या सुधा सगळ्या अवैज्ञानिक रूढी आणि परंपरा पाळणे बंद करायला हवे .

In reply to by तुडतुडी

तर्राट जोकर Sun, 09/27/2015 - 00:48
अतिशय गैरसोयीचा असलेला काळा रंगाचा बुरखा वापरायची सक्ती ,शिक्षण घेण्याला बंदी , पहटे ५ लाच मशिदीतून ओरडून लोकांची झोपमोड करणं (ध्वनिप्रदूषण),४ बायका करून व्यभिचार करणं, शेखसल्ल्याच्या उर्सामध्ये मोठमोठ्या दाभणी टोचणं (ह्या दाभणी फक्त सध्या पाण्यात धुतल्या जातात . त्याच पुढच्या वर्षी दुसर्यांसाठी वापरतात . ) , ताबूत च्या वेळी अनैसर्गिक त्रास करून घेणं आणि इतरांवर तशी सक्ती करणं ,बकरी ईद च्या नावाखाली हजारो मुक्या जीवांची कत्तल करणं, माझाच धर्म मोठा बाकी सगळे काफर म्हणून त्यांना हिणवण ,सतत त्यांच्यावर टीका करणं, दंगली करणं , अजिबात स्वच्छता न पाळणं
थोड्याफार फरकाने कित्येक हिंदूंतही ह्याच चालिरीती आढळतात तसेच सरसकट सगळ्या मुसलमानांंमधे आढळत नाहीत. तुमची 'हिंदू' या शब्दाची काय व्याख्या आहे? त्यात भारतातल्या सगळ्या जाती-प्रदेश-पंथ येतात ना? (अर्थात मुस्लिम सोडून) मग 'अभ्यासोनि प्रगटावे | अन्यथा झाकोनि असावे | प्रकटोनि नासणे । बरे नव्हे|' १. पहाटे चारपासूनच कित्येक मंदीरांचे भोंगे काकडारत्या उगाळत अस्तात. त्या आपल्या म्हणून त्रास होत नाही. २ एकापेक्षा अधिक बायका करण्याचा रिवाज हिंदूंमधेही आहे. आत्ता आत्ता कायद्याने बंदी आली म्हणून बंद झाले (तेही वर वर). नाही तर 'पूर्वजांची सांगे किर्ती' वाल्यांनी जरा वंशावळ्या धुंडाळाव्या. व्यभिचार करायला लग्न करावंच लागतं असं नाही. दर्शनी एक बायको ठेवायची मग वेश्यालयात मुशाफिरी करायची हा काही एका विशिष्ट धर्माचा प्रांत नाही. ३. कित्येक हिंदू जत्रांमधे उरुसांपेक्षाही अनेक हिंसक, विभत्स, मूर्ख प्रकार बघायला मिळतात. दरवर्षी ह्या देवीच्या, त्या देवाच्या नावाने लाखो प्राणी तर हिंदूही मारतातच. फक्त मुसलमानांनी मारलेले बकरेच बरे डोळ्यात खुपतात... ४. माझीच जात मोठी, माझाच धर्म मोठा असं हिंदू करत नाहीत? अहो इकडून तिकडे लग्न केले तर लोक कापून काढतात हिंदूंमधे. धर्म एकच असला तरीही माज आहे मी अमुक तमुक असण्याचा असे मिरवतात हिंदू लोक. ते कोण मग? ५. स्वच्छता पाळणे ह्याचा धर्माशी काय संबंध? तिकडे गंगा बघा, अगदी आरशासारखे स्वच्छ पाणी आहे की नाही? अर्धवट जळलेले मृतदेह सरळ पिण्याच्या पाण्यात, जिला पवित्र माता म्हणतात त्या गंगा नदीत सोडून देतात. ही हिंदूंची स्वच्छता काय? दंगली करणं हा मुद्दा तर सोडूनच द्या. सगळ्या दंगली राजकीय हेतूनी राजकीय लोकांकडून केल्या जातात. दोन्ही धर्मातले लोक दुसर्‍या धर्मातल्या लोकांनी कसे आपल्यावर अत्याचार केले याच्या कहान्या पुढच्या पिढ्यांना सांगत भविष्यातल्या दंगलींची बीजे पेरत राहतात. आता हा किल्मिषांचा बाजार थांबवुया. येणार्‍या पिढ्यांना सिरीया, अफगाणिस्तान सारखा सतत धुमसत राहणारा देश द्यायचा आहे का आपल्याला? त्याचीच बीजे असल्या नकारात्मक, खोट्या, एकांगी प्रतिसादांतून सतत सांडत असतात. सगळ्या मुसलमानांना कायम अतिरेकी ठरवणारे स्वतः आरशात कधी बघणार आहेत? आपणही अतिरेक करून देशाचे वातावरण दूषित करत आहोत हे कळत नाही का? उगा फालतू गोष्टींच्या चर्चा करायच्या. इतकीच जळजळ होती, हिंमत होती, धमक होती तर कश्मिरात पंडीतांना वाचवायला एकही मायचा लाल हिंदूराष्ट्रवादी का नाही गेला? इथे मारतायत नि:शस्त्र, थकलेल्या, बेसावध म्हातार्‍यांना. आले मोठे आम्ही हिंदू हिंदू करणारे. जरा कुणी धर्मसुधारणेच्या चार गोष्टी केल्या की "त्यांना आधी सांगा" असा घोषा का लावता तुम्ही लोक? त्यांचे ते बघून घेतील. तुमची खरकटी तुम्ही साफ करा. तुमच्या तोंडाला खरकटं लागलंय असं कुणी सांगतंय तर लगेच त्याला 'अरे त्या मुसलमानाने तर आठ दिवस आंघोळच नाही केली, त्याला आधी सांग' चा मूर्ख पवित्रा घेता. शतकानुशतके मुक्तधर्माचा पुरस्कार करणार्‍या, सतत उत्क्रांत होत राहिलेल्या हिंदूधर्माच्या सुधारणांचे बेंचमार्क मुसलमान धर्म ठरवून आपण आपल्याच धर्माला कमीपणा आणतो आहोत हे कळत कसं नाही दिडशाहाण्यांना?

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे Mon, 09/28/2015 - 09:59
शतकानुशतके मुक्तधर्माचा पुरस्कार करणार्‍या, सतत उत्क्रांत होत राहिलेल्या हिंदूधर्माच्या सुधारणांचे बेंचमार्क मुसलमान धर्म ठरवून आपण आपल्याच धर्माला कमीपणा आणतो याच्याशी सहमत. हिंदू धर्मातील भंपक रूढी आणि परंपरा न पूर्ण फाटा दिला पाहिजे हि वस्तुस्थिती असली तरी शेजार्याने वाटेल तिथे गाडी पार्क करायची आणि तुम्हाला त्रास द्यायचा पण तुम्ही मात्र शिस्तीत गाडी लावायची हे सर्वसामान्य माणसाच्या मनाला पटत नाही. नो एन्ट्री मध्ये घुसल्याबद्दल तुम्हाला पकडले आणि तुम्ही दंड भरत असताना त्याच वेळेस एखादा गणवेशातील पोलिस त्याच नो एन्ट्री मध्ये घुसताना आढळला आणि तोच पोलिस तिकडे काना डोळा करताना आढळला तर तुमची जी स्थिती असते तीच आज सर्व सामान्य हिंदू माणसाची आहे. एकदा सर्व जण एक समान आहेत असे म्हटल्यावर सर्व धर्म जाती आणि वर्गाला समान न्याय लावला पाहिजे. तुम्ही तुमचे पहा असे म्हणणे कितपत संयुक्तिक आहे?

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर Mon, 09/28/2015 - 18:30
नो एंट्रीवाले उदाहरण सपाट चुकले आहे. कायदा-सिविक सेन्स आणि धार्मिक चालिरीती दोन्ही मधे मूलभूत फरक आहे. मुसलमानांनी दाढ्या राखल्याने, सुंता केल्याने, बुरखा घातल्याने, चार बायका केल्याने, बकरे कापल्याने, आठ दिवस आंघोळ न केल्याने, रोजा धरल्याने, पाच वेळा नमाज पढल्याने हिंदूंच्या जगण्याच्या/स्वतंत्रतेच्या कोणत्या मूलभूत हक्कांवर गदा येते हे अजून कळलेले नाही. तुमच्या पार्किंगवाल्या उदाहरणास इथे बसवले तर ते सपशेल चुकतंय. तुमच्या उदाहरणानुसार हिंदूस वरील गोष्टी करायची सवलत मिळत नाही आणि मुसलमानास बिनबोभाट मिळते आहे असे तुम्ही मांडत आहात. नेमका कोण तो पोलिस आहे जो हिंदूंना वरील गोष्टी करण्यास (ज्या त्यांना जणू खरंच करायच्या आहेत) नाकारत आहे? हिंदूंचे कायदे हिंदूंनीच बनवले की आणखी कोणी?

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे Mon, 09/28/2015 - 19:37
@TJ साहेब तुमचे म्हणणे सकृतदर्शनी बरोबर वाटत असेल तरीही जर दुसरी माणसे नो एन्ट्री मध्ये घुसतात तर मीच काय पाप केलं आहे अशा विचाराने आपणही घुसतात आणी वाहतुकीचा खोळंबा होतो. मुसलमानांना चार मुलं असायला धर्माने परवानगी दिली तर हिंदू धर्मातील धर्म मार्तंड हिंदुनी सुद्धा पाच मुले वाढवायला हवी असा आग्रह धरतात आणी त्यामुळे कोणत्याही राष्ट्रीय धोरणाला हरताळ फसला जातो. एकीकडे आपण म्हणायचे समज सुधारणा झाली पाहिजे आणी चार बायका केल्याने कोणते नुकसान झाले ते विचारता? दुसरी बायको केल्याने पहिल्या बायकोच्या हक्कावर गदा येते त्याचे काय? आता तुम्हाला असे म्हणायचे असेल कि मला काय त्याचे तर मग एखाद्याने आत्महत्या केली तरी मला काय फरक पडतो? किंवा लोकांना पिण्याचे पाणी नसले तर मला काय फरक पडतो माझ्या तरणतलावात पाणी असले कि झाले हे म्हणण्य़ासारखे आहे. मतांच्या राजकारणासाठी मुसलमानांना आरक्षण देण्याचे सुद्धा घाट घातले जातात. एकदा एकच न्याय सर्वाना लावला जाईल हा घटनेतील मूळ मुद्दा ( कलम १४) लाच हरताळ फासला गेला कि घटनेची पायमल्ली करायला किती वेळ लागतो? म्हणूनच अबू आझमी सारखे नालायक लोक भर सभेत असे म्हणून शकतात कि "देश के कितने भी तुकडे होने दो! हम किसीको अपने मजहब के साथ खिलवाड नही करने देंगे! माझे म्हणणे एकच आहे सर्वाना समान न्याय मिळेल हे जर घटनेतील मुलभूत कलम आहे तर त्यावर अंमल बजावणी करताना कोणत्याही धर्माचा बागुलबुवा येत कामा नये आणी धर्म हा घरातच राहिला पाहिजे रस्त्यावर येण्यास मनाई च ठेवली पाहिजे या उप्पर आपल्याला वितंडवाद घालायचा असेल तर माझा पास

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर Mon, 09/28/2015 - 20:02
परत परत तेच. तुमची पोस्ट परत एकदा वाचा आणि तुम्हाला वितंडवाद म्हणजे काय हे लक्षात येइल. धर्म घरात ठेवा म्हणायचं आणि लोकांच्या बेडरूममधे डोकावून बघायचं ह्याला काय अर्थ. एकीकडे आपण म्हणायचे समज सुधारणा झाली पाहिजे आणी चार बायका केल्याने कोणते नुकसान झाले ते विचारता? दुसरी बायको केल्याने पहिल्या बायकोच्या हक्कावर गदा येते त्याचे काय? समाजसुधारणेची चरचा इथे हिंदूंची चालली आहे. एका मुस्लिमाच्या कितव्या बायकोच्या कोणत्या हक्कांवर गदा येते हे बघणे हे हिंदूंचे काम आहे की मुस्लिम सुधारकांचे? हिंदूंची बहुपत्नित्व प्रथा हिंदूंनी बंद केली की इतरांनी? आता तुम्हाला असे म्हणायचे असेल कि मला काय त्याचे तर मग षःएट्खाऋय़ाणीओ आत्महत्या केली तरी मला काय फरक पडतो? किंवा लोकांना पिण्याचे पाणी नसले तर मला काय फरक पडतो माझ्या तर्न्तालावत पाणी असले कि झाले हे म्हणण्य़ासारखे आहे. - हा वितंडवाद. नागरी, शासकिय, राजकिय धोरणांचा आणि धार्मिक चालीरीतिंचा बादरायण संबंध दाखवून बुद्धीभ्रम करायचा. अबू आझमीसारख्यांचे वक्तव्य फार मनाला लावून घेताय. तोगडीया प्रभृती काही वेगळ्या नाहीत. त्याबद्दल काय मत? समान नागरी कायदा व धर्म रस्त्यावर येऊ नये ही सूचना हिंदूच स्वतः किती पाळतात ते बघायला उत्सूक आहोत.

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे Mon, 09/28/2015 - 20:25
अबू आझमीसारख्यांचे वक्तव्य फार मनाला लावून घेताय. हा माणूस आपला लोकनियुक्त प्रतिनिधी( आमदार) आहे आणि तो देशाचे तुकडे करण्याची भाषा बोलतो आहे आणि तुमचे म्हणणे ते मनाला लावून घ्यायचे नाही? बाकी आपली विचार सरणी पाहून आमचा पास तोगडिया आणि अबू आझमी यांना एकाच न्याय लावला पाहिजे याबद्दल दुमत नाहीच. जाता जाता -- आपण सरकारी नोकर आहात काय?

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर Wed, 09/30/2015 - 13:20
मतपेटीकडे डोळे ठेवून लोकनियुक्त प्रतिनिधींनी आतापर्यंत किती आणि काय काय वादग्रस्त बोलले आहे याचा आपला किती अभ्यास आहे हे माहित नाही. पण अबू आझमींसारख्यांच्या निवडक वक्तव्यांना सिंगल-आउट करून "हे असलेच" असा छापा तमाम मुस्लिमांवर मारण्याचे काय प्रयोजन? तसेच या वक्तव्यांना मनाला लावून घेणार्‍या राष्ट्रप्रेमी-देशप्रेमी लोकांनी उत्तरादाखल काय केले हेही सांगितले तर बरे होईल. तुमच्या पासचे विशेष कौतुक नाही. आमच्या एकाक्ष विचारसरणीसमोर रंगीत चष्मे घालणार्‍यांची डाळ शिजत नाही हा नेहमीचा अनुभव आहे. तोगडीया-अबूआझमी ला एकच न्याय लावत आहात याबद्दल धन्यवाद! जाता जाता: सरकारी नोकरीत तेही लष्करात आपण होता असे कळते. इतकी वर्षे तिथे काढूनही असले रंगीत विचार बघून मौज वाटली.

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे Wed, 09/30/2015 - 18:37
TJ साहेब लष्करात सर्वांचा रंगीतच चष्मा असतो आणि ते रंग फक्त तिरंग्याचे असतात आणि मध्ये अशोक चक्र हि असते. फक्त भगवा किंवा हिरवा नसतो. तेथे सर्वाना एकच न्याय असतो. तो काय असतो हे मी मिपावर बर्याच ठिकाणी लिहिले आहे. आपणाला शोधायची तसदी घ्यायची असेल तर शोधा. तुम्हाला कशात मौज वाटते ते तुम्ही पहा. एकाक्ष झाल्याने फक्त कोणत्याही विषयाची खोली लक्षात येत नाही किंवा त्रिमिती समजत नाही. बाकी आमचा पास आहेच त्याचे कौतुक कुणीहि का करावे? मज पामरासी काय थोरपण पायीची वहाण पायी बरी.

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे Wed, 09/30/2015 - 19:11
लष्कराची "आठवण" करून द्यायची आपल्याला गरज नाही. आयुष्याची २३ सोनेरी वर्षे मी लष्करात काढलेली आहेत. तेथे एकच न्याय सर्वाना आहे. मुसलमान असलात तरी आपल्याला चारच काय दोन लग्ने करायची परवानगी नाही. आपल्याला दाढी वाढवायची परवानगी नाही. नौदलात दाढी वाढवण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते( कारण आज वाटले दाढी ठेवली आणी उद्या काढली असे चालत नाही. ओळख पत्रावरील फोटो बदलावा लागतो). तेथे मशिदिवरच काय पण मंदिरावरही बोम्बल्या( लाउड स्पीकर लावण्याची परवानगी नाही). आपला धर्म आपल्या घरातच ठेवावा लागतो.शाकाहारी हिंदू किंवा जैन असेल तरीही तुम्हाला कर्तव्याचा भाग म्हणून मांस हाताळावे लागेल असे लिहून द्यावे लागते. तेथे कधीही अशी धार्मिक भांडणे होत नाहीत. अकारविल्हे असल्याने माझा सहभागी साडे पाच वर्षे (माजीद) खान होता. असो. लष्करात धर्मांधाना किंवा निधर्मांधाना थारा नाही. आणी असेच सिव्हील आयुष्यात असावे असे मला ठामपणे वाटते. मग आपण त्याला रंगीत म्हणा किंवा रंगान्ध्ता म्हणा इति लेखनसीमा.

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर Wed, 09/30/2015 - 19:57
चला तर तुम्ही आता सिविल आयुष्यात आहात याची तरी आठवण करून द्यावी. तर लष्करी कायदे व त्याचे उपयोग, औचित्य लष्कराच्या अखत्यारीत. तिथल्या प्रत्येक अटी-शर्ती-कायद्याला योग्य असे उपयुक्त कारण आहे. कुणाला सहज वाटले म्हणून तिथले नियम बनत नसतील. पण कुणाची कितीही वैयक्तिक हुकुमशाहीची इच्छा असली तरी सर्व देश लष्करी कायद्याप्रमाणे चालणार नाही कारण इथे लोकशाही आहे. इथे आपआपले रंग उधळायला सर्वांना सूट आहे जोवर हे रंग आपल्यालाच त्रासदायक ठरत नाहीत. कोल्हापूरच्या गणेशमंडळांनी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने डीजेबंदी केली. कारण स्वतःलाच त्रास होतो हे लक्षात आले म्हणून. असो. निवृत्त लष्करी अधिकार्‍यांनी जनतेत परत आल्यावर 'प्रहार'च्या नानाच्या भूमिकेत राहून उपयोग नाही. तरी माझ्या प्रश्नांचे उत्तर तुम्ही सातत्याने टाळत आहात ते का समजले नाही. भारतातल्या तेरा टक्के मुस्लिमांनी बकरे कापले, गायी खाल्या, चार बायका ठेवल्या (प्रत्यक्षात किती टक्के मुस्लिम करतात हाही संशोधनाचा विषय आहे म्हणा) दाढ्या वाढवल्या, नमाज पढली, उरुस काढले, सुंता केली, बुरखा घातला तर ऐंशी टक्के हिंदूंच्या नेमक्या कुठल्या संवैधानिक हक्कांवर गदा येते? हा माझा मूळ प्रश्न तुमच्या नो-एन्ट्रीच्या उदाहरणासाठी.

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे Wed, 09/30/2015 - 20:49
मी माझ्याच अगोदर दिलेल्या प्रतिसादातील वाक्ये आपल्या निरीक्षणासाठी परत आपल्यापुढे ठेवत आहे. पटत असेल तर घ्या नाही तर सोडून द्या. जर दुसरी माणसे नो एन्ट्री मध्ये घुसतात तर मीच काय पाप केलं आहे अशा विचाराने लोक आपणही घुसतात आणी वाहतुकीचा खोळंबा होतो. दुसरी बायको केल्याने पहिल्या बायकोच्या हक्कावर गदा येते त्याचे काय? त्याच वेळेस एखादा गणवेशातील पोलिस त्याच नो एन्ट्री मध्ये घुसताना आढळला आणि तोच पोलिस तिकडे काना डोळा करताना आढळला तर तुमची जी स्थिती असते तीच. तुम्ही तुमचे पहा असे म्हणणे कितपत संयुक्तिक आहे? आपले म्हणणे--- बकरे कापले, गायी खाल्या, चार बायका ठेवल्या (प्रत्यक्षात किती टक्के मुस्लिम करतात हाही संशोधनाचा विषय आहे म्हणा) दाढ्या वाढवल्या, नमाज पढली, उरुस काढले, सुंता केली, बुरखा घातला. याने काहीच फरक पडत नाही कारण हा त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे आणि त्यात कोणीही दखल देऊ नये याबद्दल दुमत नाही. पण "चार बायका ठेवल्या"--- बायकाना आपण गायी आणि बकरे यांच्या पातळीवर आणत आहात याची खंत वाटते. मुस्लिम वैयक्तिक कायद्यात स्त्रियांची काय परिस्थिती आहे हे आपण जाणता. एकदा धार्मिक बाबतीत "कोणालाच"(यात न्यायालये सुद्धा आली) दखल देता येणार नाही असे म्हटले कि त्यात सुधारणा करण्याचा मार्गच खुंटला. ५० टक्के लोकसंख्येला श्रुन्खलात बंदिस्त करून एखाद्या समाजाची प्रगती कशी साधता येणार? आणि समाजाच्या एका घटकाची प्रगती खुंटली असेल तर राष्ट्राची पण प्रगती खुंटते. हे विचार उदात्त आणि अव्यावहारिक आहेत असे आपले म्हणणे असेल तर काय बोलावे? शिवाय तुम्हाला असे म्हणायचे असेल कि मला काय त्याचे? त्यांचे त्यांनी बघून घ्यावे. असे असेल तर मग --एखाद्या शेतकर्याने आत्महत्या केली तरी मला काय फरक पडतो? किंवा लोकांना पिण्याचे पाणी नसले तर मला काय फरक पडतो माझ्या तरणतलावात पाणी असले कि झाले हे म्हणण्य़ासारखे आहे. आपण मी काय म्हणतो यावर विचार करून पहा. राहिली गोष्ट प्रहार मधील नाना पाटेकर ची उपमा देण्याची. आपल्याला माझ्याबद्दल किती माहिती आहे? तशी नसताना आपण या पातळीवर उतरला याबद्दल काय म्हणणे? संवाद व्यक्तिगत पातळीवर आला नसता तर बरे झाले असते असे वाटते. असो आपली मते आपल्यापाशी.

त्यामुळे धर्म आणि देव या संकल्पनांच्या गाभ्याला कोणताही धक्का न लावता इतर अशास्त्रीय रूढी नक्कीच तत्काळ बंद करता येऊ शकतील.
बाबा रे संदीपा, समजा तू सुचवलेले बदल भागवतांनी,संघाने स्वीकारले व देशातल्या नागरिकांना आवाहन केले तर लोक ऐकतील का? की वागळे,सरदेसाई पुन्हा 'व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी' म्हणणार? म्हणजे गंगेत निर्माल्य टाकू नये असे संघाने सुचवले तर किती पत्रकार व लोक ते ऐकतील? सरकार असो वा संघटना , धार्मिक चालीरिती ह्या हळूहळू मर्यादित स्वरूपातच बदलाव्या लागतात असे ह्यांचे मत.

विवेकपटाईत Sat, 09/26/2015 - 09:34
अधिकांश लोकांना संघ आणि त्याच्या कामांबाबत माहित नाही. संघाचे स्वयंसेवक सुरवातीपासूनच अंधविश्वास इत्यादींवर विश्वास ठेवीत नाही. सकारात्मक रीतीने अंधविश्वास निर्मूलाचे जेवढे कार्य संघाने केले आहे तेवढे कार्य इतरांनी कधीच केले नाही. बाकी केवळ चर्चा, सेमिनार इत्यादी करतात.

नितिन थत्ते Sat, 09/26/2015 - 13:43
>>हिंदुनी शास्त्रीय पाया नसलेल्या संकल्पना सोडून दिल्या पाहिजेत हिंदू धर्मातली कुठली रूढी/प्रथा/संकल्पना शास्त्रीय पाया नसलेली असू शकते हेच आम्हाला मान्य नाही. तशी शंका कोणाला असेल तर इथे जाऊन त्या रूढीमागची वैज्ञानिक संकल्पना जाणून घ्यावी. =))

In reply to by नितिन थत्ते

विकास Sun, 09/27/2015 - 01:10
हिंदू धर्मातली कुठली रूढी/प्रथा/संकल्पना शास्त्रीय पाया नसलेली असू शकते हेच आम्हाला मान्य नाही. तशी शंका कोणाला असेल तर इथे जाऊन त्या रूढीमागची वैज्ञानिक संकल्पना जाणून घ्यावी. =)) हे लिहीणारा आणि सनातन प्रभातचे दुवे देणारा (पक्षी: जाहीराती करणारा) आयडी, हा परात्पर गुरू डॉ. आठवले यांचा ड्युप्लिकेट आयडी तर नसावा ना असे सनातन प्रभातची आर एस एस बद्दलची मते माहीत असल्याने वाटू लागले आहे.... =))

मोहन भागवत ह्यांनी आव्हान केले आहे आदेश दिलेला नाही आता ब्रह्मवृदांची दावे उजवे सगळे मिळून काय शास्त्रीय व काय असाष्ट्रीय त्याची एक यादी बनवला माझ्यापुरते हे तत्व मी कधीच अंमलात आणले आहे , तातायारावंचे विचार काही अंशी तरी आता जनमानसात रुजतील अशी एक आशा करतो , डोंबिवली मधील स्मशानात विद्युत वाहिनी आहे तिच्याबद्दल बोंबाबोंब झालेली ऐकवत नाही मात्र असे काशी वाराणसी येथे सक्तीने लागू केल्यास गहजब होईल तेव्हा अनेक रूढी व परंपरा ह्यांच्यातील अश्या अनके अनावश्यक रूढी लोकजागृती करून समाजातून हद्द पदर कराव्यात काही ठिकाणी सरकारने कायद्याने हस्तषेप करावा , जशी सतीची चाल साहेबाने बंद केली .

In reply to by निनाद मुक्काम …

सुबोध खरे Sat, 09/26/2015 - 19:25
निनाद शेट विद्यूत दाहिनी न येऊ देण्याची कारणे "वेगळी"असतात. आमचे सासरे CSIR मध्ये शास्त्रज्ञ होते. ते एल पी जी वर चालणारी विद्युतदाहिनी विना नफा तत्वावर बसवून देतात.लातूर महापालिकेच्या क्षेत्रात अशी वाहिनी बसविण्यासाठी त्यांना पाचारण केले. परंतु प्रत्यक्षात तेथे गेल्यावर आमच्या धर्मावर गदा येते असे राजकारण केले. तेथे कांग्रेस आणि राष्ट्रवादीचे बहुमत आहे. पण अंदरकी बात तेथे स्मशानात लाकडे पुरवणारा कान्ग्रेसचा कार्यकर्ता आहे. त्याच्या धन्द्यावर टाच येते. "अडचणीत सापडले कि धर्म आठवतो" या उक्ती प्रमाणे आमच्या सासर्यांना ते काम करू दिले नाही. शेवटी धर्म हा निधर्माचे गोडवे गाणारे लोकांच्याही कामाला येतोच कि. त्यांनी लातुरलाच ग्यासची शवदाहिनी बसवली पण ती मारवाडी समाजाची खाजगी आहे. आणि तेथे जास्त लोक जातात असे ऐकून आहे. हीच कहाणी इतर बर्याच ठिकाणी आहे. त्यांनी पनवेल महापलिकेच्या शवदाहीनीत अशी दोन उपकरणे बसविली आहेत. त्यामध्ये एका माणसाचे शव जाळण्यासाठी एका सिलिंडरचा खर्च येतो. या सिलिंडरला सरकारी सबसिडी मिळावी असे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. याठिकाणी गरीब माणसाला ८०० रुपयात अंत्यसंस्कार करता येतात.ते ४५० रुपयात काम होईल. तेवढेही पैसे नसतील तर पनवेलचा रोटरी क्लब तेही पैसे पुरवतो. शिवाय धूर नाही घाण नाही आणि पर्यावरणाची हानी हि नाही. तेंव्हा मुद्दा लक्षात घ्या.

दत्ता जोशी Sat, 09/26/2015 - 15:25
"प्रगो,वेदांमध्ये प्रचंड विज्ञान आहे त्यामुळे त्यावर पुरोगामी लोक टिका करुन वेदांना बदनाम करत असतात.आजकालचे हे क्वांटम मॅकॅनिक्स,जेनेटिक इंजिनिअरींग,सबॲटोमीक फिजिक्स,थिअरॉटीकल फिजिक्स,बायोमेकॅट्रोनिक्स,कॉस्मॉलॉजी, इव्हॉल्युशनरी बायॉलॉजी हे सगळे ज्ञान आमच्या वेंदांमध्ये होते ", अहो, इलेक्ट्रोनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, स्पेस रिसर्च इ. विसरलात की!. तसंच modern apllied enginnering आणि टेक्नोलॉजी शी संबंधित पाण्याखालील जोडकाम ( वेल्डिंग ), पाण्याखालील रासायनिक रंगकाम इ. गोशी पण आहेत. अजून सांगू का?

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

दत्ता जोशी Sat, 09/26/2015 - 21:50
तर काय ....मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या म्हणजे काय त्यासाठी अभ्यास थोडाच करावा लागतो? अजून काही concept फेकायच्या असल्या तर सांगा. टाकू आपण.

In reply to by दत्ता जोशी

श्रीगुरुजी Sat, 09/26/2015 - 18:18
मोहन भागवतांचं सोडा हो. ते संघाचे म्हणजेच पुराणमतवादी, खोटारडे, दांभिक, प्रतिगामी, संकुचित विचारांचे, जातीयवादी इ. इ. पण पद्मभूषण पुरस्कार मिळालेले इस्रोचे माजी अध्यक्ष माधवन नायर काय म्हणतात ते पहा. http://www.firstpost.com/living/aryabhatta-discovered-gravity-newton-says-former-isro-chief-g-madhavan-nair-2118331.html One of the country's leading scientists and former ISRO chairman G Madhavan Nair today propounded the theory that some shlokas in the Vedas mentioned about presence of water on the moon and astronomy experts like Aryabhatta knew about gravitational force much before Issac Newton. The 71-year-old Padma Vibhushan awardee said the Indian vedas and ancient scriptures also had information on metallurgy, algebra, astronomy, maths, architecture and astrology way before the western world knew about them. peaking at an international conference on Vedas, he however, added that the information in vedas was in a "condensed format" which made it difficult for the modern science to accept it. "Some sholkas in one of the Vedas say that there is water on the moon but no one believed it. Through our Chandrayaan mission, we could establish that and we were the first ones to find that out," Nair said, adding that everything in Vedas could not be understood as they were in chaste Sanskrit. He also talked very highly about fifth century astronomer- mathematician Aryabhatta saying, "We are really proud that Aryabhatta and Bhaskara have done extensive work on planetary work and exploration of outer planets. It was one of the challenging fields. "Even for Chandrayaan, the equation of Aryabhatta was used. Even the (knowledge of) gravitational field... Newton found it some 1500 years later... the knowledge existing (in our scriptures)," he said. Nair, who was ISRO chairman from 2003 09, also claimed geometry was used to make calculations for building cities during the Harappan civilisation and the Pythagorean theorem also existed since the vedic period.

In reply to by अमृतेश सराफ

दत्ता जोशी Sat, 09/26/2015 - 22:41
पण डोळ्यावर आणि बुद्धीवर पिवळे पण चढलेल्या काही लोकांना ते दिसत नाहीत ना! ते संदर्भ वाचायला लागतात. विकी आणि आंजावर अनेक paper आहेत, संदर्भ आहेत. जे verified आहेत. ४थ्या शतकापासून भारतात बनत असलेले wootz स्टील बनवण्याचे प्रयत्न आजही जगभरात सुरु आहेत. याची माहिती सहज उपलब्ध आहे. दिल्लीचा न गन्ज्णारा खांब अजूनही न गंजता सुमारे १६०० वर्षांपासून उभा आहे. गणितातील भारतीय गणितज्ञांच्या कार्य बद्दल माहिती https://en.wikipedia.org/wiki/Indian_mathematics वरपाहायला मिळेल. आपल्याच गणितज्ञांनी या गोष्टी जगासमोर आणली आहेत. अधिकाधिक संशोधन होणे गरजेचे आहे आणि ते भारतीयांनीच करायचे आहे. सुरवात तर काही दशकांपासून झाली आहे अजून बर्याच गोष्टी हळूहळू समोर येतील अर्थात त्याला वेळ लागेल. काही लोक आपल्या डोळ्यावरचा चष्मा ना काढता वाद करत राहणारच पण निंदकाचे घर असावे शेजारी या उक्ती प्रमाणे त्यांचे स्वागतच आहे. गाईच्या शेणाविषयी: १९८६ साली चेर्नोबिल येथे झालेल्या जगातल्या सर्वात मोठ्या अणु अपघातानंतर एक धक्कादायक बाब समोर आली होती - पूर्व युरोपात सगळी जमीन अन्नधान्य, चार, गुरे, दुध दुभते radioactive झाले असताना एका सक्तीच्या सरकारी तपासणीत ऑस्ट्रिया येथील एक फार्म वरील दुध आणि चार्यात धोकादायक पातळीपेक्षा कमी radioactivity सापडली होती . Karin Heschl नावाच्या बाईंचे ते फार्म होते. सरकारी अधिकाऱ्यांनी यामागील रहस्य शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या फार्म वर केरिन बाई सूर्योदय आणि सूर्यास्ताला न चुकता अग्निहोत्र करीत होत्या इतकाच त्यांच्या आणि इतर फार्म ( जिथे दुध आणि चाऱ्याची radioactivity धोकादायक पातळीवर होती ) मध्ये फरक होता हे समोर आले. पण अर्थात मेडीयात त्याची जास्ती वाच्यता झाली नाही. पण अग्निहोत्र आणि गोमया विषयी त्या भागात बरीच चर्चा झाली. चेर्नोबिलच्या बाजूच्या सोविएट रशियाच्या सर्व लोकांनी आपापल्या घरांच्या भिंती गोमयाने सारवल्या होत्या अशी नोंद आहे. केरिन बाई अजूनही जगभर अग्निहोत्राच प्रचार आणि प्रसार करत आहेत. अर्थात याविषयी जास्ती बोलायला कोणी तयार नाही. आन्जावर याविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. आता हे जर खरे असेल तर यावर अधिक संशोधन व्हावे लागेल आणि ते संशोधन आपणच करणे आणि छातीठोकपणे जगासमोर आणणे क्रमप्राप्त आहे.

In reply to by श्रीगुरुजी

त्येच तर मी म्हणतोय श्रीगुरुजी , आमच्याकडे वेदातल्या ज्ञानाची फारच उपेक्षा झाली आहे.त्यात हे पुरोगामी लोक वेदांवर टिका करायला आघाडीवर. calculous, discrete mathematics, statistics, ह्यांची ईत्यंभूत माहीती वेदांम्ध्ये आहे, फक्त ती सांकेतीक स्वरुपात आहे, म्हणजे बघा हा कसे, एका झाडावर दहा पक्षी बसले आहेत, तिथे एक पारधी आला, त्याने तिथे फटाका फोडला ,तर झाडावर कीती पक्षी शिल्लक राहतील?????? आता हे उदाहरण जरी बाळबोध वाटले तरी या उदाहरणात मागाल ते शास्त्र आहे , काय समजलात?

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

दत्ता जोशी Sat, 09/26/2015 - 22:48
"calculous, discrete mathematics, statistics, ह्यांची ईत्यंभूत माहीती वेदांम्ध्ये आहे" आहेच. आणि गुप्त सांकेतिक वगैरे काही नाही. फक्त आपल्याला माहिती नाही म्हणजे तसे नाहीच हि वृत्ती सोडून स्वयंघोषित विद्वानांनी डोळे उघडून पाहणे गरजेचे आहे. https://en.wikipedia.org/wiki/Indian_mathematics

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

श्रीगुरुजी Sat, 09/26/2015 - 22:54
फुलबॉटल डबियस, तुझ्यासारख्या पारध्याने तुझ्यासारखेच कितीही सादळलेले आणि फुसके फटाके फोडले तरी नुसती वात जळून जाईल. पण आवाज होणार नाही, प्रकाश दिसणार नाही आणि धूरही येणार नाही. त्यामुळे झाडावरचे सगळे पक्षी शिल्लक राहतील.

मोहन भागवतांना अधुन मधून पुडी सोडायचा नाद लागलेला आहे, पण जे काही मत मांडलं आहे त्याचं ब्वा मी स्वागत करतो. बोलणे आणि वर्तन यात सारखेपणा यावा व संघाचा आधुनिक विचाराकडे पावलं पडावीत यासाठी संघाला मी शुभेच्छा देतो. -दिलीप बिरुटे

दत्ता जोशी Sun, 09/27/2015 - 11:24
मुख्य विषय बाजूलाच राहिला. हिंदू धर्मातील वाईट प्रथा आणि रूढी या पुर्ण सोडल्याच पाहिजेत. हे त्यांचे म्हणणे आहे पण उगीच विषयांतर केले गेले आहे. आज चेपू वर एक इंटरेस्टिंग पोस्त वाचली सहज डकवतो. ----------------------------------------------------------------------------------------------------------------- काय गम्मत आहे बघा - आज एकही सेलेब्रिटी आला नाही ईद कशी साजरी करावी हे सांगायला. आज एकही पर्यावरणवादी आला नाही रक्तविरहित ईद साजरी करा असं सांगायला. एकही प्राणी प्रेमी आला नाही कापल्या जाणाऱ्या करोडो बकऱ्यांविषयी कणव व्यक्त करायला. ईद चा 'खरा अर्थ' काय आहे हे सांगायला एकही बुद्धिवादी आला नाही. आणि गम्मत म्हणजे एकही पुरोगामी आला नाही हे सांगायला, की दीड हजार वर्षांपूर्वी काहीतरी घटना घडली म्हणून आज निष्पाप जीवांची निर्घृण कत्तल करणं हे किती 'मागासलेपणाचं' आहे. पण कसे येणार म्हणा, आपण तर भारतात राहतो ना. त्यामुळे फक्त रक्षाबंधन, वटपौर्णिमा, दिवाळी, गणपती, मकर संक्रांत, पाडवा हे उत्सव कसे साजरे करावेत हेच आपल्याला शिकवलं जाणार.

In reply to by दत्ता जोशी

श्रीगुरुजी Sun, 09/27/2015 - 12:56
>>> आज चेपू वर एक इंटरेस्टिंग पोस्त वाचली सहज डकवतो. जबरी पोस्ट! >>> आणि गम्मत म्हणजे एकही पुरोगामी आला नाही हे सांगायला, की दीड हजार वर्षांपूर्वी काहीतरी घटना घडली म्हणून आज निष्पाप जीवांची निर्घृण कत्तल करणं हे किती 'मागासलेपणाचं' आहे. बादवे, बकरी ईदसाठी ज्या घटनेचा संदर्भ दिला जातो ती घटना महंमदाच्या काळात १४०० वर्षांपूर्वी घडलेली नसून त्यापूर्वी अनेक शतके घडलेली आहे असे मुस्लिम सांगतात. ज्या काळात फक्त हिब्रू (ज्यू) धर्म होता व ख्रिश्चन व मुस्लिम धर्म जन्माला आले नव्हते त्या काळातील ही घटना आहे असे सांगितले जाते.

In reply to by दत्ता जोशी

दत्ता जोशी, तुम्हाला बकरी ईद दिवशी दालच्याची दावत मिळाली नाही म्हणुन मुसलमानांना काहून हो टार्गेट करता.????

In reply to by दत्ता जोशी

श्रीगुरुजी Sun, 09/27/2015 - 13:21
>>> आणि गम्मत म्हणजे एकही पुरोगामी आला नाही हे सांगायला, की दीड हजार वर्षांपूर्वी काहीतरी घटना घडली म्हणून आज निष्पाप जीवांची निर्घृण कत्तल करणं हे किती 'मागासलेपणाचं' आहे. व्याख्या - ज्याला/जिला अगदी दूरच्या अंतरावरून हिंदूंच्या डोळ्यातील कुसळ दिसते आणि अगदी जवळून सुद्धा इतर धर्मियांच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही त्यालाच/तिलाच "निधर्मी आणि पुरोगामी विचारवंत" असे म्हणतात.

In reply to by दत्ता जोशी

गुलाम Wed, 09/30/2015 - 14:49
दुर्दैवाने हा धागा उशिरा उघडला त्यामुळे खुपच उशिरा प्रतिसाद देतोय. अंनिस ने इतर धर्मातल्या अंधश्रद्धांबद्दलची आपली भुमिका वेळोवेळी स्पष्ट केली आहे. ज्या त्या धर्मातल्या प्रागतिक विचारांच्या लोकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अंनिस त्याला सक्रिय पाठिंबा देईल अशी ती भुमिका होय. परंतु तरीही काही सनातनी लोक मुद्दाम असा प्रचार करुन बुद्धीभेद करतात आणि काही फेक्युलर लोकही हिंदूंवर टोकाची टिका करुन सर्वसामान्य हिंदूधर्माभिमानी लोकांच्या मनात किंतु निर्माण करतात. आपण अशा दोन्ही प्रवृत्तींपासून दूर राहिले पाहिजे. या वर्षी बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम सत्यशोधक समाजाने बकरी कापण्याऐवजी रक्तदान करा (त्यागाचे प्रतिक म्हणून) असा उपक्रम राबवला होता. अंनिसने त्याला सक्रिय पाठिंबा दिला. अनेक कार्यकर्त्यांनी त्यात रक्तदान केले. आपण अशा उपक्रमांना उत्तेजन दिले पाहिजे. अवांतरः मी अंनिसचा प्रवक्ता किंवा गेलाबाजार पदाधिकारीही नाहिये. वरील प्रतिसाद केवळ अनिसचा हितचिंतक या नात्याने दिलेला आहे.

In reply to by गुलाम

तर्राट जोकर Wed, 09/30/2015 - 14:57
या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! काही स्वयंघोषीत हिंदूधर्मरक्षक ह्या धाग्यावर असाच उच्छाद मांडत आहेत. त्यांना सणसणीत चपराक आहे हा प्रतिसाद.

In reply to by गुलाम

सूड Wed, 09/30/2015 - 15:03
ज्या त्या धर्मातल्या प्रागतिक विचारांच्या लोकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अंनिस त्याला सक्रिय पाठिंबा देईल अशी ती भुमिका होय.
याचा अर्थ हिंदू शिवाय इतर धर्मात पुढाकार घेऊन काम करण्याइतके गट्स नाहीत असाच होतो. म्हणजे असंतोषाची लाट फुटली तर ती आमच्यावर नको, दुसर्‍यांनी पुढाकार घ्या आम्ही पाठिंबा देतो.

In reply to by सूड

तर्राट जोकर Wed, 09/30/2015 - 16:19
याचे उत्तर यॉर्कर यांनी खाली दिले आहे. प्रश्न गट्सचा नाही, औचित्याचा आहे. उद्या क्रिश्चनांनी हिंदूंमधल्या अंधश्रद्धांबद्दल अंनिससारखे काम हाती घेतले तर हिंदूंची काय प्रतिक्रिया असेल याचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का? इतर धर्मिय कट्टर आहे म्हणून अंनिसची फाटते असा गोड गैरसमज असणार्‍यांनी अंनिस एखाद्याची खरोखर फाटेल अशा वातावरणात काम करत आहे हे माहित नसते. पूर्ण माहिती व ज्ञानाशिवाय अंनिसला तुच्छ टोमणे मारणे हे अंनिससारखे काम स्वत: करून पाहण्यापेक्षा लाख पटीने सोपे आहे. संबंध नसलेले निरर्थक प्रश्न विचारण्यासही खास बुद्धीमत्ता लागत नाही.

In reply to by सूड

गुलाम Wed, 09/30/2015 - 16:30
याचा अर्थ हिंदू शिवाय इतर धर्मात पुढाकार घेऊन काम करण्याइतके गट्स नाहीत असाच होतो.
तुम्हाला पाहिजे तो अर्थ काढायला तुम्ही मोकळे आहात. परंतु हिंदू धर्मामध्ये चार्वाकापासून ते तुकारामांपर्यंत धर्मचिकित्सेची परंपरा आहे. तशी ती मुस्लिम धर्मामध्ये दुर्दैवाने नाही. हिंदूंना या परंपरेचा अभिमान वाटायला हवा. पण आजकालचे काही कट्टर हिंदू उलट चिकित्सा करणार्‍यावरच तुटून पडतात. ते असो.
म्हणजे असंतोषाची लाट फुटली तर ती आमच्यावर नको, दुसर्‍यांनी पुढाकार घ्या आम्ही पाठिंबा देतो.
पीके चित्रपटाच्यावेळी झालेला गदारोळ आठवत असता तर तुम्ही असं म्हणलं नसतं. त्यावेळी पीकेला विरोध करणार्‍या लोकांचा (अगदी मिपावरदेखील) मुख्य आक्षेप होता की अमीर खान मुस्लिम आहे. म्हणजे कसंय बघा हं, जे लोक अमीर खानला आमच्या धर्मात हस्तक्षेप करायचा अधिकार नाही असं तावातावाने म्हणत होते. तेच लोक चिकित्सक हिंदूंना मात्र मुस्लिम धर्माबद्द्ल का बोलत नाही असंही विचारतात.

In reply to by गुलाम

सूड Wed, 09/30/2015 - 16:56
@ट्ज काका आणि गुलामभाऊ एखादी गोष्ट केवळ आपल्याला पटतेय म्हणून तिच्यातील त्रुटींवर पांघरुण तुम्हा दोघांची घालायची कला शिकण्यासारखी आहे. बाकी चालू द्या!!

In reply to by सूड

तर्राट जोकर Wed, 09/30/2015 - 17:10
एखादी गोष्ट आपल्याला पटत नाही म्हणून तिच्यात नसलेल्या त्रुटी दाखवण्याची तुमचीही कला उत्तमच आहे. तरी वर उल्लेखलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले असते तर जास्त बरे वाटले असते. असो. मुद्देसूद वाद प्रत्येकाला झेपत नाहीत हेच खरे.

In reply to by तर्राट जोकर

सूड Wed, 09/30/2015 - 21:04
एखादी गोष्ट आपल्याला पटत नाही म्हणून तिच्यात नसलेल्या त्रुटी दाखवण्याची तुमचीही कला उत्तमच आहे.
अरे वाह!! तुम्हालाही पटलं तर!!
तरी वर उल्लेखलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले असते तर जास्त बरे वाटले असते. असो. मुद्देसूद वाद प्रत्येकाला झेपत नाहीत हेच खरे
तुमच्या वरील वाक्यातच उत्तर आहे. वाद घालण्यात आम्हाला शष्प रस नाही. आणि अचानक एखाद्या धाग्यावर कुत्र्याच्या छत्रीसारखे उगवून ऊर बडवत बसणार्‍या आयडींना आम्ही फाट्यावर मारण्यायोग्यही समजत नाही. तुमचे रणकंदन असेच उत्तरोत्तर बहरत जाऊन धाग्याला ५०० प्रतिसाद मिळवून द्याल ही शुभेच्छा!! तुम्हाला गळे काढायला मिळतील असे आणखी धागे मिपावर येवोत ही त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना करतो. इति लेखनसीमा!!

In reply to by गुलाम

बॅटमॅन Wed, 09/30/2015 - 17:06
म्हणजे कसंय बघा हं, जे लोक अमीर खानला आमच्या धर्मात हस्तक्षेप करायचा अधिकार नाही असं तावातावाने म्हणत होते. तेच लोक चिकित्सक हिंदूंना मात्र मुस्लिम धर्माबद्द्ल का बोलत नाही असंही विचारतात.
हा हा हा, हा बाकी एकदमच बिनतोड मुद्दा आहे. मान गये.

In reply to by गुलाम

dadadarekar Wed, 09/30/2015 - 17:53
हिंदू धर्मामध्ये चार्वाकापासून ते तुकारामांपर्यंत धर्मचिकित्सेची परंपरा आहे. ......... हो . आणि असे अनेक चार्वाक व अनेक तुकाराम लबाड धर्मवाद्यानी सदेह स्वर्गालाही धाडले आहेत. आमचेही कितीतरी आयडी धर्मयुद्धातच नष्ट केले गेलेले आहेत.

In reply to by dadadarekar

पैसा Wed, 09/30/2015 - 17:58
यादी द्या की. मिपा हे तुमचे धर्मयुद्ध आहे का? ब्वार्र.

In reply to by dadadarekar

हा हा ! म्हणजे, आपल्या अनेक डूआयड्या असल्याची कबुली दिलीच शेवटी ! चोर स्वतःला कितीही हुशार समजत असला तरी कोणते तरी धागेदोरे मागे सोडतो ते असे =)) =)) =))

In reply to by गुलाम

कपिलमुनी Wed, 09/30/2015 - 16:12
ज्या त्या धर्मातल्या प्रागतिक विचारांच्या लोकांनी
अंनिस वाले "धर्म" मानतात हे वाचून डोळे पाणावले. हमीद आठवला :) अवांतरः मी अंनिसचा प्रवक्ता किंवा गेलाबाजार पदाधिकारीही नाहिये आणि विरोधक नाही सनातनी नाही ! माताय्य , मी कुणीच नाही :(

In reply to by कपिलमुनी

गुलाम Wed, 09/30/2015 - 16:53
अंनिस वाले "धर्म" मानतात हे वाचून डोळे पाणावले.
हा विरोधकांचा आणखी एक आवडता शब्दच्छ्ल. अंनिस धर्म मानत नाहिच. पण समाजात त्याचा प्रभाव आहे हे तर मान्य करावेच लागेल. तो न मानण्याची शहामृगी भुमिका सामाजिक संघटनेला घेऊन चालत नाही. हिंदू सुधारकांनी मुस्लिम धर्मासाठी पण काम करावं ही आदर्शवत परिस्थिती झाली. पण सध्या तरी ते प्रॅक्टीकली शक्य नाही.

In reply to by गुलाम

सूड Wed, 09/30/2015 - 16:58
तुमचाच प्रतिसाद परत वाचा. पहिल्या वाक्यात लिहिलंत त्याच्या नेमकं उलट शेवटच्या वाक्यात लिहीलंय. अता मात्र हद्द झाली. =))

दत्ता जोशी Sun, 09/27/2015 - 13:08
पण त्यासाठी अश्या रूढी कोणत्या याची सूची तयार झाली तर आपल्याला ठरवता येईल ना! किमान कोणत्या रूढी कशा समाजात आल्या आणि त्या का टाकावू आणि निरर्थक आहेत याचा विचार तरी होईल. बाय द वे, तुमच्या प्रमाणेच मी हि बळी प्रथा, बुवाबाजी इत्यादीच्या विरूद्धच आहे.

दत्ता जोशी Sun, 09/27/2015 - 13:18
विनोद म्हणून ठीक आहे पण तर्क किंवा निष्कर्ष असेल तर परत एकदा साफ चुकीचा. कारण मी बाय चोइस शुद्ध शाकाहारी आहे शिवाय मला स्वतःला अनेक मुसलमान मित्र आहेत. त्यांच्या घरी मी शिरकुर्मा खायला जातो कि. इतका काही ओर्थोडोक्स नाहीये हो मी. गेली १३ वर्षे मध्यापूर्व, आफ्रिका आणि युरोपात काम करतोय तेव्हा अनेक राष्ट्रीयत्वाचे आणि धर्माचे ( तसेच जातीचे) मित्र आहेत. त्यांच्या घरी जेव्हा जेवायला बोलावतात तर माझ्यासाठी खास शाक बनवले जाते. :-)

पहिला ते कुठले देऊळ आहे तिथे नवस पूरा करायला म्हणून पोरे मंदिराच्या छतावरुन खाली ताणलल्या चादरीत सोडतात तो मूर्खपणा बंद करायला हवा राव!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

श्रीगुरुजी Sun, 09/27/2015 - 13:31
ती प्रथा एका देवळात होती. तिथे मुलांना छतावरून सोडत नाहीत, पहिला मजल्यावरून खाली उभे असलेल्यांच्या चादरीत टाकतात. अर्थात छतावरून किंवा पहिल्या मजल्यावरून टाकणे हा पराकोटीचा मूर्खपणा असून अत्यंत क्रूरपणाचे लक्षण आहे. आता बहुतेक ती प्रथा बंद झाली असावी कारण मागील २-३ वर्षांपासून त्याबद्दल ऐकलेले/पाहिलेले नाही. बादवे, एका मशिदीतही तीच प्रथा होती. वृत्तवाहिन्यांवर देऊळ व मशीद अशा दोन्ही ठिकाणी हे पाहिलेले आहे.

दत्ता जोशी Sun, 09/27/2015 - 13:31
पण दोन्ही बाजू समजून घ्यायला आवडतील. म्हणजे हि प्रथा का बंद व्हावी आजपर्यंत किती अपघात घडले इ. इ. तसेच असे नवस का बोलले जातात, ते पूर्ण होतात का , लोकांचे अनुभव का आहेत, अशा नवसांनी झालेल्या तान्हुल्यांना असे निर्दयीपणे का फेकले जाते इ.

याॅर्कर Sun, 09/27/2015 - 16:03
त्यामुळे काय होईल, की सगळ्या ज्या रूढी,परंपरा आहेत त्या बंद होण्यास मदत होईल.'निराकार'(निर्गुण), 'एकेश्वरवाद' याबद्दल वेंदांमध्येही उल्लेख आहे.कारण 'साकार'(सगुण), परमेश्वराचे रूप आले कि विधी-विधान,अनुष्ठान,व्रत-वैकल्य हे सारे येणारच म्हणून हिंदूनी आता एकेश्वरवादाकडे वळले पाहिजे,त्यामुळे बर्यापैकी प्रश्न सुटतील जसे कि धर्मकार्यांमुळे होणारे प्रदूषण वगैरे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव,दुर्गा उत्सव,दहीहंडी,नवस करणे,आणि इतर बरेच या गोष्टींची आताच्या अधुनिक काळामध्ये काही गरज नाही असे वाटते. ---(मी हिंदूच आहे गैरसमज नसावा)

In reply to by याॅर्कर

श्रीगुरुजी Sun, 09/27/2015 - 19:18
देवाला निराकार, निर्गुण असे समजल्याने रूढी, परंपरा बंद होणार नाहीत. उलट नवीन रुढी, परंपरा निर्माण होतील. मुस्लिमांमध्ये देवाला निर्गुण, निराकार समजले गेले आहे. त्यामुळे त्यांच्यात मूर्तीपूजा नाही व देवाचे चित्र काढण्यास परवानगी नाही. मशिदीत कोठेही मूर्ती, तस्बीर, चित्र इ. नसते. तिथे सर्वजण मक्केच्या दिशेने तोंड करून प्रार्थना म्हणतात. तरीसुद्धा त्यांच्यात अनेक रूढी, परंपरा, उपासतापास, विधी इ. निर्माण झालेले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव, दुर्गा उत्सव, दहीहंडी इ. धार्मिक कमी आणि सामाजिक व सांस्कृतिक जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे ते सुरू राहणारच. फक्त त्यात शिरलेल्या उपद्रवी गोष्टी कमी करण्याची आवश्यकता आहे. नवस वगैरे आता फारसे कोणी करीत असेल असे वाटत नाही. जरी वैयक्तिक पातळीवर कोणी नवस केला तरी जोपर्यंत त्याचा समाजाला उपद्रव नाही तोपर्यंत त्याला आक्षेप घेता येणार नाही.

राजेश घासकडवी Sun, 09/27/2015 - 19:20
मोहन भागवतांच्या या विधानाचं मनापासून स्वागत. जर संघाने आपली शक्ती विघातक रूढी नष्ट करण्यासाठी पणाला लावली तर खरोखरच अनेक लोकांचं भलं होऊ शकेल. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करणं ही सरकारची जबाबदारी आहे. कायद्याने उघड होणाऱ्या अशा काही प्रकारांना थोडाफार आळा बसेल, पण समाजात जो बदल व्हायला हवा तो कायद्याने होत नाही. त्यासाठी संघासारखी ग्रासरूट्स पातळीवर काम करणारी संघटना प्रचंड प्रभावी ठरते. त्यांचं हे विधान संघाची भूमिका ठरो, आणि त्यातून काही सकारात्मक बदल दिसून येवो ही सदीच्छा.

याॅर्कर Mon, 09/28/2015 - 09:11
चीनमध्ये कोणताही धर्म न मानणारे सुमारे 52.2% लोक आहेत,म्हणजे बहुमतच झालं की? आणि अमेरिकेमध्ये 22.8% लोक कोणताही धर्म मानत नाहीत.म्हणूनच कि काय? हे दोन देश आज प्रगतीच्या शिखरावर आहेत.

In reply to by याॅर्कर

अर्धवटराव Tue, 09/29/2015 - 01:35
वाईड बॉलवर यॉर्कर पडला :) चीन आणि अमेरीकेची प्रगती तिथल्या धर्म न मानणार्‍या लोकांच्या संख्येमुळे झाली हे नवीनच लॉजीक कळलं =))

In reply to by अर्धवटराव

याॅर्कर Tue, 09/29/2015 - 10:32
धर्म न माननार्यांचे तर योगदान आहेच त्यांच्या प्रगतीमध्ये. शिवाय, धर्म माननारे देखील काम सोडून 'भिक्षाम देही' करत फिरत नाहीत. --(क्लीन Bowled मिडल stump)

दत्ता जोशी Mon, 09/28/2015 - 09:42
या निष्कर्षाचा पाया काय? प्रगतीचा मापदंड काय? पर कैपिटा/ दर डोई उत्पन्न का? चीन मध्ये गरिबी नाही म्हणून कोणी सांगितलं? मग युरोप,जपान विषयी काय म्हणावे बुवा? यु ए इ , सौदी, कुवेत, कतार या इस्लामिक स्टेट्स मध्ये पण प्रचंड सुबत्ता आहे. पर कैपिटा उत्पन्नाचा विचार केला तर आफ़्रिकेतिऎल बोट्स्वाना या छोटेखानी देशाचे पर डोई उत्पन्न चीनच्या बरोबरीचे आहे कि. याची सांगड धर्माशी काही काय घालता येईल बरं? आधार : http://data.worldbank.org/indicator/NY.GDP.PCAP.CD

विटेकर Mon, 09/28/2015 - 11:20
मिपावर अनेक दिवसांनी प्रतिक्रिया देत आहे, अगदी राहवत नाही म्हणून ! संघाचे नाव आले की मिपावरचे काही आय डी चवताळून उठतात हा आता नेहमीचा अनुभव झाला आहे, संघावर टिका करणार्‍या कोणीही संघ ना जवळून पाहिला ना स्वतः कधी अनुभव घेतला. कुणीतरी सांगितले म्हणून यांचा संघद्वेष! बरे, संघाचे काम पटत नाही म्हणून काही अन्य विधायक करतात का? ते ही नाही , तिथेही बोंबच , मिपासारखे व्यासपीथ उपलब्ध आहे म्हणून सतत विखारी ओकत राहायचे, मराथीत अशा वागण्याला क्रियानश्ट्पणा म्हणतात ! संघात कधीकाळी गेला आहे आणि त्याला त्यात प्रामाणिक सुधारणा व्हावी असे वाटते, त्याला हे पक्के माहीत आहे की तक्रार करण्याची ही जागाच नव्हे ! अशा न पटलेल्या मुद्द्यांसाठी संघात योग्य ते च्यानेल उपलब्ध आहे , तेव्हढा मोकळा संवाद तिथे करता येतो हा माझा गेल्या ३८ वर्षांचा अनुभव आहे. याचा दुसरा अर्थ असा की - ज्यांना टिका करायची आहे त्यांना फक्त टिका करायची आहे आणि त्यातून राळ उडवायची आहे , चालू द्या ! सरसंघचालकांचे हे विधान हीच संघाची भूमिका १९२५ पासून आहे , संघाच्या कोणत्याही कार्यक्रमात कसल्याही कर्मकांडाचे अवडंबर नसते, त्यामुळे कोणत्याही स्वंयसेवकाला त्यांच्या या विधानाचे अप्रूप वाटणारच नाही , हा संघाचा सहज भाव आहे , त्याचा अभिनिवेश देखील नाही ! १९२५ पासून संघ केवळ हिन्दूसमाज सुधारणेचेच काम करतो, यांत विशेष काहिही नाही. आणि संघ , संघ आणि समाज हे द्वैत मानतच नाही, संघ समाजापेक्शा वेगळा नाही , समाज संघापेक्षा वेगेळा नाही, त्यामुळे सरसंघचालक बोलताना समाजाचाच व्यापक संदर्भ घेतात. १९६५ साली विश्व हिन्दू परिषदेची स्थापना करताना द्वितीय सरसंघचालकांनी सर्व शंकराचार्य आणि धर्माचार्याच्या उपस्थितीत न हिन्दू पतितो भवेत | अशी घोषणा केली होती आणि संघाने तत्पूर्वीच ते आचरणातही आणले होते ! आज दुर्दैवाने मिडियाचे वलय संघाला प्राप्त झाले आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीची घटना होते, विरोधक चवताळतात , आणि मदार्‍याचा खेळ होतो. आपल्याकडेही ( मला अजूनही मिपा आपले वाटते , असेच चालू राहीले तर मी किती दिवस येत राहीन हाही प्रश्नच आहे , आणि अर्थात माझ्या जाण्याने इथे शष्प देखील फरक पडणार नाही हे ही मला माहीत आहे !) संघ / हिन्दु धर्म हा विषय निघाला की ब्याटमन, जिनियस मंडळीना चेव चढतो, दुर्दैवाने हे सारे हिन्दु=भारतीय आहेत, त्यांना परके तरी कसे म्हणू ? सावरकरांचा " सदगुण विकृती " हा शब्द इथे चपखल बसतो ! आमच्याच बाजूल गोल मारण्याची आमची जयचंदी अवसानघातकी वृत्ती आम्हाला आणखी किती वेळा रसातळाला नेणार आहे , हे तो सृष्टीकर्ताच जाणो ! हिन्दूंचा हिन्दूंचा जितका घात केला तितका आक्रमकांनी देखील केला नाही. यांना आपल्याच डोळ्यातील कुसळ मुसळाएवढे दिसते...! र्खरेच अशा ठिकाणी का यावे आणि वृथा व्यतित व्हावे ?

In reply to by विटेकर

नाखु Mon, 09/28/2015 - 11:38
लेखातील बहुअंशी बाबींशी सहमत पणः ब्याटमन ला विचारजंताचे यादीत बसविल्याबद्दल तीव्र निशेध आणि जोरदार आक्षेप. स्वगतः तुमको बॅट्या सम्झ्याच नही (जितके त्याच्याशी संवाद साधाल तितके तुम्हाला तो सम्जत जाईल) बॅट्या १/२५ सम्जला आहे तरीही अश्या समजुतीतही आनंद मिळविणारा नाखु.

In reply to by नाखु

अहाहा काय हा बंधुभाव ! स्वमतांध दांभिकतेच्या युगात असले निर्व्याज्य प्रेम पाहुन डोळे पाणावले की आमचे =)) ऐसी जिव्हाळ्याची जाती | करी लाभेविण प्रीती || अहाहा , सलाम नाखु सलाम ! __________________________________/\______________________________________

In reply to by विटेकर

पैसा Mon, 09/28/2015 - 16:13
( मला अजूनही मिपा आपले वाटते , असेच चालू राहीले तर मी किती दिवस येत राहीन हाही प्रश्नच आहे , आणि अर्थात माझ्या जाण्याने इथे शष्प देखील फरक पडणार नाही हे ही मला माहीत आहे !)र्खरेच अशा ठिकाणी का यावे आणि वृथा व्यतित व्हावे ?
एवढ्यापुरतेच बोलते. तसे काही लोक बोलतात, ती मिपाची अधिकृत भूमिका आहे का? नाही. कोणाला काय वाटते ते बोलतात. त्यात आक्षेपार्ह म्हणजे बदनामीकारक, असभ्य काही असेल तर त्यावर कारवाई केली जाते. जर संपादकांनी पाहिले नाही तर कोणीही सदस्य लक्षात आणून देऊ शकतो. पण मिपा या अशा बोलण्याहून खूप काही आहे. केवळ तेवढ्यासाठी, २/४ लोकांच्या बोलण्यावरून इथून निघून जाणे हे काही मला पटत नाही. तुम्ही असे निघून गेलात की मग इथे फक्त एका बाजूने लिहिणारे शिल्लक राहतील. ते तुम्हाला आवडेल का? बरे दुसर्‍या बाजूने बोलणारे तुम्ही चूक होतात म्हणून पळून गेलात असे ओरडतील, तेही तुम्हाला आवडेल का? त्यापेक्षा श्रीगुरुजी असे काही असेल तर ती लिहायला चांगली संधी आहे असे समजून लिहितात. ते मला आवडते. वाद प्रतिवाद तर होणारच!

In reply to by पैसा

वाद प्रतिवाद तर होणारच!
एवढ्यापुरतेच विचारतो काही व्यक्ती जाणीवपुर्वक दुसर्‍यांच्या धार्मिक भावना दुखावणारे लेखन करीत असतात आणि सतत त्या धर्माचा चेष्टेत उलेख करीत असतात (ह्या धाग्यावरही केलेला आहेच पहा ), आणि अशा व्यक्तींचा प्रतिवाद कसा करायचा ? ह्यावर मार्गदर्शन अपेक्षित आहे . कारण सदर व्यक्ती ज्या गटातील आहेत त्या गटातील अतिअत्यल्प लोकंच असे विचित्र वागतात म्हणुन त्या गटावर टीका टिप्पण्णी करणे योग्य नाही आणि जर समजा त्या व्यक्तीवर टिप्पण्णी केली तर सदर व्यक्ती " व्यक्तिगत आरोप केले " असे रडगाणे गात संपादक मंडळामागे लपते आणी धागे / प्रतिक्रिया संपादित करुन घेते असा अनुभव आहे . प्रश्न असा की अशा व्यक्तींचा प्रतिवाद कसा करायचा ?

In reply to by प्रसाद गोडबोले

पैसा Mon, 09/28/2015 - 18:53
सगळे मिपाकर तेवढे हुशार आहेतच! काहीही लिहिताना ते मिपाच्या धोरणाच्या चौकटीत असले की झाले. कोणी कोणाच्या मागे लपण्याचा प्रश्नच नाही. वैयक्तिक शेरे कोणत्याही परिस्थितीत मुख्य बोर्डावर राहणार नाहीत. एखादा चुकून राहिला तर जरूर सं मं ला कळवा.

In reply to by पैसा

वैयक्तिक शेरे कोणत्याही परिस्थितीत मुख्य बोर्डावर राहणार नाहीत. एखादा चुकून राहिला तर जरूर सं मं ला कळवा.
असे असेल तर मग सदर व्यक्तीने सनातन धर्माची सतत उडवलेली टर मुख्यबोर्डावर का रहाते ? "धार्मिक शेरेबाजी चालेल पण वैयक्तिक शेरेबाजी चालणार नाही" असे काही धोरण आहे का ? असे असल्यास सदर व्यक्तीचा प्रतिवाद करावा तरी कसा ??? - ( अत्यंत विनम्रपणे आणि तितक्याच गांभीर्याने प्रश्न विचारत आहे )

In reply to by प्रसाद गोडबोले

पैसा Mon, 09/28/2015 - 22:22
दुसऱ्याची भाषा पटली नाही तर सं.मं. कडे तक्रार करा. तुम्ही कधी कोणाविरुद्ध अशी असभ्य भाषेबद्दल तक्रार केली होती का?

In reply to by पैसा

ओके। सनातन वैदिक धर्माचा उल्लेख सतत टनाटन ऐसा करणे ( तेहि उपनिषदोक्त धर्माचा काडी मात्र अभ्यास नसताना ) हे आक्षेपार्ह आहे । आता संपादक मंडलाकडे तकरार करुन पहातो काही कार्रवाई होते का ते । धन्यवाद

In reply to by प्रसाद गोडबोले

बाळ सप्रे Tue, 09/29/2015 - 10:57
प्रगो, एखाद्या विचारसरणीवर टीका ही इथे होणारच.. काही लोकांना असे शब्दप्रयोग करुन लिहीण्याची सवय असते. टनातन या शब्दाप्रमाणे सिक्युलर, निधर्मांध, विचारजंत, आपटार्ड, प्रेस्टीटयुट, मोदीभक्त, संघिष्ट, खांग्रेसी असे अनेक शब्द अनेकांच्या विचारसरणीवर टीका करण्यास वापरले जातात. यापुढे जाउन अनेक लोक इतरांच्या आयडींवर देखिल असे विकृत संस्कार करतात (जे एकवेळ वैयक्तिक टीकेत येउ शकेल) आपल्याला पटणार्‍या विचारसरणीवर होणार्‍या टीकेमुळे जर भावना दुखावु लागल्या तर इथे काहीच वादविवाद होउ शकणार नाहीत. कारण गवि, विकास वगैरेंसारखे संतुलित लि़खाण सगळ्यांना जमेलच असे नाही. किंबहुना जमणारच नाही कारण ते फार मोठे कौशल्य आहे. पण हे कौशल्य नसूनही एखाद्याकडे काही चांगले मुद्दे असू शकतात. त्यामुळे लिखाण अथवा प्रतिसादातील आपल्याला जे चांगले वाटते ते घेणे व इतर गोष्टींकडे कानाडोळा करणे हेच इष्ट.

In reply to by बाळ सप्रे

टनातन या शब्दाप्रमाणे सिक्युलर, निधर्मांध, विचारजंत, आपटार्ड, प्रेस्टीटयुट, मोदीभक्त, संघिष्ट, खांग्रेसी असे अनेक शब्द अनेकांच्या विचारसरणीवर टीका करण्यास वापरले जातात.
सारे शब्द नीट वाचले मात्र ह्यातील अन्य कोणता शब्द धार्मिक भावना दुखावणारा आहे हे कळाले नाही . केवळ सनातन धर्माची टिंगल उडवली जाते अन्य धर्माविषयी असे काही बोलण्याचा , धर्माची नामविकृती करण्याचा कोणा धर्मसुधारकाच्या त दम नाही ...
त्यामुळे लिखाण अथवा प्रतिसादातील आपल्याला जे चांगले वाटते ते घेणे व इतर गोष्टींकडे कानाडोळा करणे हेच इष्ट.
हा मुद्दा पटलेला आहे :)

In reply to by प्रसाद गोडबोले

बाळ सप्रे Tue, 09/29/2015 - 15:46
भावनेला केवळ धार्मिकता ही एकच मिती असते का? (खास करुन दुखावणार्‍या) इतर शब्दात अन्य विचारसरणींबद्दल निंद्य्/तुच्छ/हीन भाव आहेत असे वाटत नाही का?

In reply to by बाळ सप्रे

भावनेला केवळ धार्मिकता ही एकच मिती असते का?
नाही... तसे नाही . पण धार्मिकतेची मिती ही व्यक्तिमत्वाच्या मीती इतकीच श्ट्राँग असते . जर व्यक्तिगत टिप्पण्णी खपवुन घेतली जात नसेल तर धार्मिक टिप्पण्णी तरी का बरे खपवुन घेतली जावी ? इतकाच माक्झा प्रश्न होता . आणि मुळ प्रश्न रहातोच की समजा एक व्यक्ती समस्त धर्मावर टीका करत असेल तर त्याचा प्रतिवाद कसा करायचा ? म्हणजे कोणी सतत हिंदु धर्माची हेटाळणी करत असेल तर त्याला उत्तर कसे द्यायचे ? कारण सदर व्यक्तीला उत्तर दिले की ती व्यक्तिगत टिप्पण्णी ठरणार अन सदर व्यक्ती संपादकंकडे जाऊन मुळूमुळू रडणार अन प्रतिक्रिया संपादित करुन घेणार ! मग उत्तर द्यायचे तरी कसे ???

In reply to by प्रसाद गोडबोले

बाळ सप्रे Wed, 09/30/2015 - 10:27
पण धार्मिकतेची मिती ही व्यक्तिमत्वाच्या मीती इतकीच श्ट्राँग असते
ते तुमच्या बाबतीत.. अथवा बहुसंख्यांच्या बाबतीतही असेल. पण सरसकट सगळ्यांना लागू करणे शक्य नाही. काहींच्या दृष्टीने धर्म, काहींच्या दृष्टीने जात, काहींच्या दृष्टीने देश, काहींच्या दृष्टीने भाषा, काहींच्या दृष्टीने राज्य, काहींच्या दृष्टीने शहर, काहींच्या दृष्टीने व्यवसाय, काहींच्या दृष्टीने कला हीच आपली ओळख इतकी घट्ट बांधिलकी असते. कशाकशावरची टीका व्यक्तिगत मानणार?? त्यामुळे इतक्या diverse लोकसमूहात या सगळ्या अट्रीब्युट्सना वैयक्तिक ठरवणे कठीण आहे.बाकी काय वैयक्तिक नि काय नाही यबद्दल मिपाचे धोरण आहेच. आणि सं मं त्या धोरणानुसार निर्णय घ्यायला सक्षम आहेच.. एखादी व्यक्ती सतत समस्त धर्मावर टीका करत असेल आणि तुम्ही त्यातील मुद्द्याचा प्रतिवाद केल्यास मला नाही वाटत संपादक त्यांच्या मुळूमूळू रडण्याला भीक घालून तुमची प्रतिक्रीया संपादीत करेल. मात्र आपण मुद्द्याचाच प्रतिवाद करण्याकडे लक्ष देणे महत्वाचे.

याॅर्कर Mon, 09/28/2015 - 11:33
धर्माच्या ,संस्कृतीच्या, रूढी पंरंपरेच्या नावाखाली आपणच स्वतःला त्रास करून घेतोय आणि दुसर्यांनाही त्रास देतोय.आपल्याला न पटणार्या आपल्याच धर्मातील चालिरीती,परंपरा बंद झाल्या पाहिजेत,नुसता टाईमपास आहे सगळा,बाकी काय? - वटसावित्री(तथ्य काय ?) -सत्यनारायण(नाही केला तर?) -वारी(एकाच दिवशी लाखो लोकांनी जमून तिथे सगळी अस्वच्छता का करायची?) -दहीहंडी(ट्रॅफिकची कोंडी आणि स्तःची हाडे मोडून घेणे दुसरं काय?) -सार्वजनिक गणेशोत्सव(ध्वनी प्रदूषण करून आणि दारू पिऊन धिंगाणा घालणे,तसेच दोन मंडळातील खुन्नस ही आलीच.काही चांगली मंडळे अपवाद असू शकतात.) -जत्रा/यात्रा(काही देवतांना म्हणे मांसाहाराच्या नैवेद्याचा मान लागतो) -शिमगा(उगाचच बोंब मारायची?) आणि इतर बरेच काही. हे सगळ नाही केलं तर काय होणार आहे? मोगलांनी,पोर्तुगीजांनी,इंग्रजांनी,डच,फ्रेंच यांनी आपल्याला इकडे येऊन बदडले, तरी आणि तेच सगळं.अजून शहाणपण आलेले नाही? मुलांच्या भविष्याचा विचार न करता मुलं जन्मास घालणारे हे आपले लोक काय झेंडा लावणार आहेत?(काही अपवाद) म्हणून धर्मातून चांगली शिकवण घेतली पाहिजे,चांगल्याही बर्याच गोष्टी आहेत धर्मात. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद !जय महाराष्ट्र!!

In reply to by याॅर्कर

यॉर्करा, धर्म ही अफुची गोळी आहे असे तो कार्ल मार्क्स म्हणायचा ते उगीच नाही.वटसावित्री,सत्यनारायण न करून काही होणार नाही पण मग काही लोक करत असतील तर काय बिघडणार आहे?दही हंडी,सार्वजनिक गणेशोत्सव ह्या उत्सवांचे प्रमाण महाराष्ट्रातच जास्त आहे.तेव्हा त्यावर मर्यादा हवी. दुसर्यास अपद्रव होणार नसेल तर उत्सव्,व्रतवैकल्ये जरूर करावीत.

संजय पाटिल Fri, 09/25/2015 - 13:26
सर्व प्रथम हे सरसंघचालक यांचे वैयक्तिक मत आहे का संघाची भुमिका म्हणून मांडलिये, हे बघावे लागेल. अर्थात अत्ता पर्यंतचा ईतिहास बघता संघचालक यांचे मत हेच संघाची भुमिका समजले गेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याला विरोधासाठी विरोध करणारे पण हळूच पुढे येतील. प्रत्येक वेळी हिंदुनांच का सुधारणांचा सल्ला दिला जातो?( आता हे विचार्णारे कोण असतील हे वेगळे सांगायला नको) काहिही असो, तुम्ही म्हणताय तसे जर खरेच असेल तर संघ सुधार्तोय असेच म्हणावे असे वटते.

In reply to by संजय पाटिल

बाळ सप्रे Fri, 09/25/2015 - 18:40
संघ सुधार्तोय असेच म्हणावे असे वाटते
परफेक्शन को इंप्रूव्ह करना ना मुमकीन होता है.. हे माहीत नाही ??

In reply to by संजय पाटिल

विजुभाऊ Tue, 09/29/2015 - 09:56
सर्व प्रथम हे सरसंघचालक यांचे वैयक्तिक मत आहे का संघाची भुमिका म्हणून मांडलिये, हे बघावे लागेल
सांघाच्या बाबतीत हे सर्वात सोपे समीकरण आहे. जोपर्यन्त वादविवाद होत नाहीत तोपर्यन्त ते संघाची भुमीका असते. वाद उफाळली तर सोयीनुसार ते वैयक्तीक मत होते.

सरसंघचालकांचे आवाहन - अवैज्ञानिक रूढी आणि परंपरांचा त्याग
सत्यनारायण ही हिंदु उपासनेतील सर्वात जास्त अवैज्ञानिक प्रथा आहे , तिला कोणत्याही वेदांचा उपनिषदांचा गीता ब्रह्मसुत्रांचा आधार नाही , एव्हन , कसलाही पौराणिकही आधार नाही ! वैज्ञानिक आधार तर नाहीच नाही अन ऐतिहासिक आधारही नाही .....आणि कथेतील कित्येक भाग तर सरळ सरळ अध्यात्मिक दहशतवाद आहे ! आता पाहुया, सरसंघचालकांचे आवाहन ऐकुन पुरोहितवर्ग आणि सश्रध्द हिंदु समाज ह्या परंपरेचा त्याग करतो की स्वमतांध दांभिकता चालु ठेवुन स्वतःची तुंबडी भरत ह्या परंपरा चालु ठेवतो आणि वर परत संघावरच टीका करत रहातो ते !! =))

In reply to by सुनील

बॅटमॅन Fri, 09/25/2015 - 14:55
असेच म्हणतो. ध्यान केल्यावर शरीरात न्यूट्रिनो नामक कण येतात अशी मोलाची माहिती आम्हांस अलीकडेच मिळालेली आहे. (ते कण आल्याने काय फायदा होतो हे सांगितले नाही हा भाग वेगळा)

In reply to by बॅटमॅन

सुनील Fri, 09/25/2015 - 15:06
ध्यान वैग्रे तर सोडाच. ती तर लैच अ‍ॅडवान्स्ड गोष्ट. पण कानावर जानवे अडकवल्याने मुत्राशयाकडे जाणारी नस उत्तेजीत होते, असेही आयकले हाये!!

In reply to by सुनील

बॅटमॅन Fri, 09/25/2015 - 15:17
शिवाय मराठी व्हेज जेवणच सर्वांत सात्त्विक असे मराठी माणसाचे लेख आणि केरळी जेवण व पर्यायाने नारळाचे तेलच आयुर्वेदिकली सर्वांत बेस्ट असे केरळी माणसाचे लेखनही वाचनात आलेय. झालंच तर शिवलिंग म्हणजे न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर हे राहिले का? ;) आणि संध्याकाळपेक्षा सकाळी देवळात गेल्यावर १०.२३४५८७६% जास्त पुण्य मिळते हेही विसरलोच होतो.

In reply to by बबन ताम्बे

बॅटमॅन Fri, 09/25/2015 - 15:30
ऐकावे ते नवलच. जर असे असेल तर मग गोमांसाबद्दलचे विचार पाहता प्राचीन भारतातील ऋषींची बौद्धिक पातळी एकदम खालच्या पातळीवर होती असेच म्हटले पाहिजे. अन किरणोत्साराचे माहिती नाही, पण अशा माहितीच्या उत्सर्गाने एखाद्याचा मेंदू भरून गेला तर नंतर कितीही प्रबोधन केले तरी उपयोग होत नाही हे खरेच आहे.

In reply to by बबन ताम्बे

नाव आडनाव Fri, 09/25/2015 - 15:44
च्यायला, ते पाकडे धमकी देतात अणुयुद्धाची. आता टाका म्हणावं अणुबाँब. तो फुसका करण्याची टॅक्ट आली आहे आमच्याकडं. स्मार्ट सिटीतल्या सगळ्या ईमारतींवर बाहेरून शेण लावलं तर त्या अजून स्मार्ट होतील. स्मार्ट सिटीत आतून सुद्धा फरश्या बसवण्यापेक्षा सारवून घेणं कंपल्सरी केलं पाहिजे. मग तर आपली अणुबाँब पासून कायमची सुटका झाली असं म्हणायचं. आता गोहत्या बंदी आहे त्यामुळे पाहिजे तितकं शेण (जसं पाहिजे तसं - गावरान किंवा जर्सि) मिळायला प्रॉब्लेम नाही.

In reply to by नाव आडनाव

पिवळा डांबिस Fri, 09/25/2015 - 22:00
पण सगळ्या इमारती आतून-बाहेरून सारवून घ्यायच्या म्हणजे खर्च खूप येईल हो! त्यापेक्षा समस्त नागरिकांनी आपल्या सर्व शरीरावर शेण थापून घेणं कंपल्सरी केलं तर? अणुसर्गापासून सुरक्षा तर मिळेलच शिवाय काळे-गोरे, सुरूप-कुरूप हा भेद नष्ट होऊन समाज एकसंध व्हायला किती मदत होईल!!! :)

In reply to by नाव आडनाव

द-बाहुबली Sat, 09/26/2015 - 14:04
स्मार्ट सिटीतल्या सगळ्या ईमारतींवर बाहेरून शेण लावलं तर त्या अजून स्मार्ट होतील........ ....तर आपली अणुबाँब पासून कायमची सुटका झाली असं म्हणायचं.
मायला अधिकृतपणे स्मार्ट ठरुनही सिटीच्या नशीबी... हे ऐकणं आहेच :D :D :D :=))

In reply to by बबन ताम्बे

विकास Fri, 09/25/2015 - 17:16
ही बातमी एकदम रोचक वाटली म्हणून खणायला गेलो... Journal of Radioanalytical and Nuclear Chemistry मध्ये Biosorption of radiotoxic 90Sr by green adsorbent: dry cow dung powder हा एक पेपर दिसला... कदाचीत Journal of Radioanalytical and Nuclear Chemistry ऑरगनायजरच्याच छापखान्यात छापले जात असावे झालं...

In reply to by बबन ताम्बे

माहितगार Fri, 09/25/2015 - 17:43
ताम्बे साहेब आणि ब्याटमनराव तुम्ही कै म्हणा, त्या न्युक्लीयरच्या सुडोवैज्ञानिक गप्पा सोडल्यातर Zelia Nuttall या बाईंच्या The Fundamental Principles of Old and New World Civilizations यांच्या पुस्तकातील गोमाते विषयीचे संदर्भ गैर हिंदूंना आणि अरबस्थानात मूळ शोधणार्‍यांना कदाचित उपयूक्त असावेत.

In reply to by बबन ताम्बे

श्रीगुरुजी Sat, 09/26/2015 - 13:03
>>> अणुबॉम्बलाही निष्प्रभ करतं गायीचं शेण!: RSS हा दावा "राष्ट्रीय मुस्लिम मंच" या संघटनेने केला आहे असे या लेखात लिहिले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

https://en.m.wikipedia.org/wiki/Muslim_Rashtriya_Manch लाभ घ्या!!! ह्याच मुस्लिम राष्ट्रिय मंच (पेरेंट आर्गेनाइजेशन आरएसएस) ने पार्लियामेंट एनेक्स ला इफ्तार पार्टी दिली होती !! दादुमियां न हे गुर्जी दोघे बसवायला हवे होते तिथे सोबत!

In reply to by बॅटमॅन

विकास Fri, 09/25/2015 - 17:43
ध्यान केल्यावर शरीरात न्यूट्रिनो नामक कण येतात अशी मोलाची माहिती आम्हांस अलीकडेच मिळालेली आहे. मला असे कोणी म्हणलं असल्यास आश्चर्याचा धक्का बसणार नाही! (पक्षी: तुमच्याशी सहमती). पण नक्की असेच म्हणलेले आहे का? कारण मला वाटते हे सगळे महर्षी महेश योगींच्या transcendental meditation च्या संदर्भातील असावे असे वाटते. आपण उल्लेखलेल्याचा जर नक्की संदर्भ माहीत असला तर सांगावा.

In reply to by विकास

बॅटमॅन Fri, 09/25/2015 - 19:38
नक्की काय लिहिलेले आहे ते माहिती नाही. मला एकाने एकदम सिरियसली सांगितले, अगदी कालचीच गोष्ट आहे म्हणून लक्षात राहिले इतकेच. बाकी त्या पेपरमध्ये नक्की काय म्हटले आहे ते सांगाल का? बायोसॉर्प्शन म्हणजे काय? कसले प्रयोग केले? इ.इ. म्हणजे नक्की कळेल तरी की आरेसेसच्या न्यूजमागचा क्लेम खर्‍या माहितीच्या आधारावर बेतलेला आहे की असंच काहीतरी ठोकून दिलंय ते.

In reply to by बॅटमॅन

विकास Sun, 09/27/2015 - 01:15
नक्की काय लिहिलेले आहे ते माहिती नाही. मला एकाने एकदम सिरियसली सांगितले हे बरे आहे. कोणी तरी नाकावरची माशी न उडवता सांगितले आणि तुम्ही ते गांभिर्याने घेतले. विश्वास ठेवला आणि त्याचा उपयोग माहिती न शोधता कुणाला तरी ठोकायला केला. प्रश्न विचारून खात्री कराविशी वाटली नाही का? बघा तुमच्यावर विश्वास असल्याने मी पण आधीच सहमती दर्शवली होती... ;) असो. बाकी त्या पेपरमध्ये नक्की काय म्हटले आहे ते सांगाल का? बायोसॉर्प्शन म्हणजे काय? कसले प्रयोग केले? इ.इ. आत्ता लक्षात आले की त्या पेप्राचा दुवा का माहीत नाही, आधी चिकटला गेला नव्हता... हा घ्या येथे... तुम्ही वाचून त्यात काय म्हणले आहे ते लक्षात घेऊ शकता. तुमच्या सारख्याला माझ्यासारख्याने सांगणे योग्य वाटत नाही... मी पडलो फंडू - आय मीन फंडामेंटल हिंदू ;) मी बोलून कसे चालणार?

In reply to by विकास

बॅटमॅन Wed, 09/30/2015 - 12:05
हे बरे आहे. कोणी तरी नाकावरची माशी न उडवता सांगितले आणि तुम्ही ते गांभिर्याने घेतले. विश्वास ठेवला आणि त्याचा उपयोग माहिती न शोधता कुणाला तरी ठोकायला केला. प्रश्न विचारून खात्री कराविशी वाटली नाही का? बघा तुमच्यावर विश्वास असल्याने मी पण आधीच सहमती दर्शवली होती... ;) असो.
उगा काहीतरीच?
आत्ता लक्षात आले की त्या पेप्राचा दुवा का माहीत नाही, आधी चिकटला गेला नव्हता... हा घ्या येथे... तुम्ही वाचून त्यात काय म्हणले आहे ते लक्षात घेऊ शकता. तुमच्या सारख्याला माझ्यासारख्याने सांगणे योग्य वाटत नाही... मी पडलो फंडू - आय मीन फंडामेंटल हिंदू ;) मी बोलून कसे चालणार?
हेही आपले उगीच आहे. बाकी पुस्तीची गरज नव्हती.

एस Fri, 09/25/2015 - 14:38
यातूनही स्वतःला सोयीस्कर असा आणि तेवढाच अर्थ घेऊन हिंदू धर्म कसा पुरोगामी, विज्ञानवादी, सर्वश्रेष्ठ आहे असाच प्रचार केला जाईल. प्रत्यक्षात हिंदू धर्मातील साचलेपणा आणि इतर जे काही दोष असतील ते जिथल्या तिथेच राहतील. बाकी लेख रा. स्व. संघाला छान चिमटे काढणारा आणि उपरोधिक झाला आहे.

छ्या! हिंदू धर्मातल्या वैदिक विज्ञानाची खिल्ली उडवायचे काम नाही सांगतो, भारतीय ईतिहासातील घोडचुका आणि जागतिक इतिहासातील खिंडारे ही पु ना ओक यांची पुस्तके राष्ट्रीय ग्रंथ म्हणुन मोदी काकांनी घोषित करावीत

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रगो,वेदांमध्ये प्रचंड विज्ञान आहे त्यामुळे त्यावर पुरोगामी लोक टिका करुन वेदांना बदनाम करत असतात.आजकालचे हे क्वांटम मॅकॅनिक्स,जेनेटिक इंजिनिअरींग,सबॲटोमीक फिजिक्स,थिअरॉटीकल फिजिक्स,बायोमेकॅट्रोनिक्स,कॉस्मॉलॉजी, इव्हॉल्युशनरी बायॉलॉजी हे सगळे ज्ञान आमच्या वेंदांमध्ये होते , पाश्च्यात्य ख्रिस्ती लोकांनी जुने ग्रंथ व वेद इथुन तिकडे नेले व आज ते आम्हालाच विज्ञान शिकवत आहेत.आ हा त कु ठे ??????

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

आजकालचे हे क्वांटम मॅकॅनिक्स,जेनेटिक इंजिनिअरींग,सबॲटोमीक फिजिक्स,थिअरॉटीकल फिजिक्स,बायोमेकॅट्रोनिक्स,कॉस्मॉलॉजी, इव्हॉल्युशनरी बायॉलॉजी हे सगळे ज्ञान आमच्या वेंदांमध्ये होते , पाश्च्यात्य ख्रिस्ती लोकांनी जुने ग्रंथ व वेद इथुन तिकडे नेले व आज ते आम्हालाच विज्ञान शिकवत आहेत.आ हा त कु ठे ??????
तुम्हाला कोणी सांगितलय हो हे ? उगाचच कोणाच्या काहीतरी बोलण्यावरुन काहीतरी मते बनवायची अन मग विरोध करत बसायचे ... ? बाकी , गणितामध्ये भारतीयांनी प्रचंड प्रगती केली होती ह्यात शंका नाही पण तुम्ही मात्र नेमका तोच उल्लेख टाळलेला आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Fri, 09/25/2015 - 18:48
प्रचंड प्रगती केली होती ह्यात शंका नाही पण तुम्ही मात्र नेमका तोच उल्लेख टाळलेला आहे !" अहो, कदाचित ते विसरले असतील. किंवा कदाचित त्यांना असलेले ज्ञान त्यांना इथे मिपाकरांना द्यायचे पण नसेल. आता हेच बघाना, गेले कित्येक दिवस, ते "http://misalpav.com/comment/reply/31763/712577" ह्या बाबत काहीच ज्ञान देत नाही आहेत. आता बोला. (फुजि ह्यांच्या ज्ञानकणांचा फॅन) मुवि

In reply to by प्रसाद गोडबोले

@प्रगो,बंधो ,वेदांमध्ये अफाट विज्ञान आहे हे कुणि सांगायला का हवे, जसा सुर्याच्या प्रकाशाने सर्वांचेच डोळे दिपतात तसेच वेदातल्या ज्ञानाचं आहे, जे ज्ञानसाधनेच्या मार्गावरील पांथस्थाला वाट दाखवन्याचे अविरत कार्य करत आहेत. पण या अफाट विज्ञानाचा गैर वापर होऊ शकतो हे आपल्या प्राचीन ऋषिमुनींना ठाऊक होते त्यामुळे त्यांनी संस्कृतसारख्या देवभाषेत हे ज्ञान लिहून ठेवले. नुकतेच max plank institute of planetary sciences चे संशोधक फ्रेडरीक वॅन गॉफ यांनी ऋग्वेदातल्या फक्त काही ऋचांचा अभ्यास करुन ion engine चा शोध लावला आहे, आता मनुष्य सलग अनेक वर्श अंतराळात प्रवास करु शकतो.आह्हात्त क्कुठ्ठे!!!!!!!!!!

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

थोडक्यात आपण कोणताच रेफरन्स द्यायला तयार नाही आहात तर ! तुमचे म्हणणे म्हण्जे नुसती हवा आहे तर !

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

मुक्त विहारि Fri, 09/25/2015 - 18:43
"वेदांमध्ये प्रचंड विज्ञान आहे त्यामुळे त्यावर पुरोगामी लोक टिका करुन वेदांना बदनाम करत असतात.आजकालचे हे क्वांटम मॅकॅनिक्स,जेनेटिक इंजिनिअरींग,सबॲटोमीक फिजिक्स,थिअरॉटीकल फिजिक्स,बायोमेकॅट्रोनिक्स,कॉस्मॉलॉजी, इव्हॉल्युशनरी बायॉलॉजी हे सगळे ज्ञान आमच्या वेंदांमध्ये होते , पाश्च्यात्य ख्रिस्ती लोकांनी जुने ग्रंथ व वेद इथुन तिकडे नेले व आज ते आम्हालाच विज्ञान शिकवत आहेत.आ हा त कु ठे ??????" वरील माहितीबद्दल धन्यवाद..... पण काय हो, तुम्ही पण, काही गोष्टी इथे मिपावर सांगणार होतात ना? त्याचे काय झाले? लिंक देत आहे. "http://misalpav.com/comment/reply/31763/712577"

In reply to by मुक्त विहारि

मांत्रिक Sat, 09/26/2015 - 16:04
@ फु.जी.. वैदिक ऋचांमध्ये सूर्याच्या रथाला ७ घोडे असल्याचा उल्लेख आहे. सूर्यप्रकाश ७ रंगांत विभाजीत होतो हे वैज्ञानिक सत्य तुम्हाला माहीत असेलच.. या साम्यस्थळाचे स्पष्टीकरण काय? वेदांतील १००% गोष्टींत वैज्ञानिक सत्य नसेल पण काही काही सत्ये तर नक्कीच दडलेली आहेत.

In reply to by मांत्रिक

खरय हो! फक्त वेदातले हे ज्ञान सरळ सांगितले असते तर् लोकांनी त्याचा गैरवापर केला असता म्हणून रथाची चाके , घोडे अशा सांकेतीक भाषेत ते सांगिअतले . एवढेच प्रसिद्ध फ्रेंच वैज्ञानिक लई झूटोस्की यांचेही असेच म्हणने आहे,2000 साली याविषयीचा त्यांचा लेख national institute of advancement of science च्या proceeding's मध्ये आला आहे. लिंक मिळाल्यास देईनच...

In reply to by मांत्रिक

dadadarekar Sat, 09/26/2015 - 20:28
रंग अनेक असतात. त्यातले सात दिसतात. इन्फ्रारेड , अल्ट्रावायोलेट दिसत नाहीत... ज्ञान नेमक्या भाषेत सांगावे लागते.. आजकालच्या जमान्यात तरच त्याला मान्यता मिळते.

In reply to by dadadarekar

सुबोध खरे Sat, 09/26/2015 - 20:38
हितेस भाऊ जे दिसतात त्यांना रंग म्हणतात. इन्फ्रा रेड किंवा अल्ट्रा व्हायोलेट हे रंग नव्हे तर तरंग आहेत. ज्ञान नेमक्या भाषेत सांगावे लागते असे म्हणालात म्हणून लिहिले अन्यथा पास दिला असता.

In reply to by dadadarekar

सुबोध खरे Sat, 09/26/2015 - 20:46
परत तेच जे दिसतात त्यांनाच रंग म्हणतात जे दिसतात आणी दिसत नाहीत(अदृश्य आहेत) अशा सगळ्याना तरंग म्हणतात. सगळे रंग हे तरंग आहेत पण सगळेच तरंग हे रंग नव्हेत.

In reply to by सुबोध खरे

dadadarekar Tue, 09/29/2015 - 08:53
आपापल्या पट्टीत गावे.. काळी दोन काय नी पांढरी पाच काय ! आपली पट्टी सोडू नये. .... पं. विष्णू दिगंबर पलुस्करांचा गाववाला ... ( उस्ताद दादाखान कुरुंदवाडकर )

In reply to by dadadarekar

दादूस, तुमी नुसता अवैचारीक वितंडवाद घाला हो, त्यात तुमचा हातखंडा आहे. उगा शास्त्रिय कारण्परंपरेत घुसू नका... कारण तिथे तुम्ची पय्ल्याच बॉल्ला विकेट पड्तिया =)) =))

In reply to by सुबोध खरे

वगिश Tue, 09/29/2015 - 16:25
इथे थोडी चुक झाली आहे. " सर्व रंग हे तरंग असतात." जे तरंग मानवी डोळे बघु शकतात त्यांना आपण रंग म्हणून ओळखतो. इतर प्राणी वेगळे तरंग बघु शकतात.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

श्रीगुरुजी Fri, 09/25/2015 - 23:15
>>> भारतीय ईतिहासातील घोडचुका आणि जागतिक इतिहासातील खिंडारे ही पु ना ओक यांची पुस्तके राष्ट्रीय ग्रंथ म्हणुन मोदी काकांनी घोषित करावीत चुकलात नाना! त्याऐवजी तुमच्या लाडक्या खेडेकर आणि कोकाटेची महान पुस्तके राष्ट्रीय ग्रंथ म्हणून जाहीर व्हायला हवीत.

तुडतुडी Fri, 09/25/2015 - 16:59
हिंदूंनी अवैज्ञानिक रूढी आणि परंपरा पाळणे बंद करणं हि अतिशय चांगली गोष्ट आहे . इतर धर्मियांचं काय ? भूत, चमत्कार, अलौकिक शक्ती, गुप्त धन, अतींद्रिय शक्ती, कारणी, जादूटोणा, जारणमारण, चेटूक, मंत्राने विष उतरवणे,
ह्या अंधश्रधा आहेत म्हणणार्यांना त्या करायला जमत नाहीत . ह्या गोष्टी खरोखर अस्तित्वात आहेत . अंधश्रद्धा नाहीत . पण त्या करण जमत नसताना आपल्याला जमतात असं खोटंच सांगणं ,त्यासाठी पैसे उकळणं , अत्याचार करणं , फ़सवणं हे मात्र गुन्हे आहेत . एखाद्याकडे अतींद्रिय शक्ती खरोखर असेल पण त्याचा दुसर्याला काहीच त्रास होत नसेल तर अशी शक्ती असणं हा गुन्हा ठरत नाही .
चितेवर मृतदेहाचे दहन, यज्ञ-याग
हे हवेच्या प्रदूषणात येतात ? थोडक्यात हिंदू धर्म लोकांनी सोडूनच द्यावा असं म्हणायचय तुम्हाला .
जर असे असेल तर मग गोमांसाबद्दलचे विचार पाहता प्राचीन भारतातील ऋषींची बौद्धिक पातळी एकदम खालच्या पातळीवर होती असेच म्हटले पाहिजे.
आधार ?मुल्ला मौलवींची बौद्धिक पातळी काय आहे ह्याच्यावर हि बोला अतिशय गैरसोयीचा असलेला काळा रंगाचा बुरखा वापरायची सक्ती ,शिक्षण घेण्याला बंदी , पहटे ५ लाच मशिदीतून ओरडून लोकांची झोपमोड करणं (ध्वनिप्रदूषण),४ बायका करून व्यभिचार करणं, शेखसल्ल्याच्या उर्सामध्ये मोठमोठ्या दाभणी टोचणं (ह्या दाभणी फक्त सध्या पाण्यात धुतल्या जातात . त्याच पुढच्या वर्षी दुसर्यांसाठी वापरतात . ) , ताबूत च्या वेळी अनैसर्गिक त्रास करून घेणं आणि इतरांवर तशी सक्ती करणं ,बकरी ईद च्या नावाखाली हजारो मुक्या जीवांची कत्तल करणं, माझाच धर्म मोठा बाकी सगळे काफर म्हणून त्यांना हिणवण ,सतत त्यांच्यावर टीका करणं, दंगली करणं , अजिबात स्वच्छता न पाळणं ह्या सुधा सगळ्या अवैज्ञानिक रूढी आणि परंपरा पाळणे बंद करायला हवे .

In reply to by तुडतुडी

तर्राट जोकर Sun, 09/27/2015 - 00:48
अतिशय गैरसोयीचा असलेला काळा रंगाचा बुरखा वापरायची सक्ती ,शिक्षण घेण्याला बंदी , पहटे ५ लाच मशिदीतून ओरडून लोकांची झोपमोड करणं (ध्वनिप्रदूषण),४ बायका करून व्यभिचार करणं, शेखसल्ल्याच्या उर्सामध्ये मोठमोठ्या दाभणी टोचणं (ह्या दाभणी फक्त सध्या पाण्यात धुतल्या जातात . त्याच पुढच्या वर्षी दुसर्यांसाठी वापरतात . ) , ताबूत च्या वेळी अनैसर्गिक त्रास करून घेणं आणि इतरांवर तशी सक्ती करणं ,बकरी ईद च्या नावाखाली हजारो मुक्या जीवांची कत्तल करणं, माझाच धर्म मोठा बाकी सगळे काफर म्हणून त्यांना हिणवण ,सतत त्यांच्यावर टीका करणं, दंगली करणं , अजिबात स्वच्छता न पाळणं
थोड्याफार फरकाने कित्येक हिंदूंतही ह्याच चालिरीती आढळतात तसेच सरसकट सगळ्या मुसलमानांंमधे आढळत नाहीत. तुमची 'हिंदू' या शब्दाची काय व्याख्या आहे? त्यात भारतातल्या सगळ्या जाती-प्रदेश-पंथ येतात ना? (अर्थात मुस्लिम सोडून) मग 'अभ्यासोनि प्रगटावे | अन्यथा झाकोनि असावे | प्रकटोनि नासणे । बरे नव्हे|' १. पहाटे चारपासूनच कित्येक मंदीरांचे भोंगे काकडारत्या उगाळत अस्तात. त्या आपल्या म्हणून त्रास होत नाही. २ एकापेक्षा अधिक बायका करण्याचा रिवाज हिंदूंमधेही आहे. आत्ता आत्ता कायद्याने बंदी आली म्हणून बंद झाले (तेही वर वर). नाही तर 'पूर्वजांची सांगे किर्ती' वाल्यांनी जरा वंशावळ्या धुंडाळाव्या. व्यभिचार करायला लग्न करावंच लागतं असं नाही. दर्शनी एक बायको ठेवायची मग वेश्यालयात मुशाफिरी करायची हा काही एका विशिष्ट धर्माचा प्रांत नाही. ३. कित्येक हिंदू जत्रांमधे उरुसांपेक्षाही अनेक हिंसक, विभत्स, मूर्ख प्रकार बघायला मिळतात. दरवर्षी ह्या देवीच्या, त्या देवाच्या नावाने लाखो प्राणी तर हिंदूही मारतातच. फक्त मुसलमानांनी मारलेले बकरेच बरे डोळ्यात खुपतात... ४. माझीच जात मोठी, माझाच धर्म मोठा असं हिंदू करत नाहीत? अहो इकडून तिकडे लग्न केले तर लोक कापून काढतात हिंदूंमधे. धर्म एकच असला तरीही माज आहे मी अमुक तमुक असण्याचा असे मिरवतात हिंदू लोक. ते कोण मग? ५. स्वच्छता पाळणे ह्याचा धर्माशी काय संबंध? तिकडे गंगा बघा, अगदी आरशासारखे स्वच्छ पाणी आहे की नाही? अर्धवट जळलेले मृतदेह सरळ पिण्याच्या पाण्यात, जिला पवित्र माता म्हणतात त्या गंगा नदीत सोडून देतात. ही हिंदूंची स्वच्छता काय? दंगली करणं हा मुद्दा तर सोडूनच द्या. सगळ्या दंगली राजकीय हेतूनी राजकीय लोकांकडून केल्या जातात. दोन्ही धर्मातले लोक दुसर्‍या धर्मातल्या लोकांनी कसे आपल्यावर अत्याचार केले याच्या कहान्या पुढच्या पिढ्यांना सांगत भविष्यातल्या दंगलींची बीजे पेरत राहतात. आता हा किल्मिषांचा बाजार थांबवुया. येणार्‍या पिढ्यांना सिरीया, अफगाणिस्तान सारखा सतत धुमसत राहणारा देश द्यायचा आहे का आपल्याला? त्याचीच बीजे असल्या नकारात्मक, खोट्या, एकांगी प्रतिसादांतून सतत सांडत असतात. सगळ्या मुसलमानांना कायम अतिरेकी ठरवणारे स्वतः आरशात कधी बघणार आहेत? आपणही अतिरेक करून देशाचे वातावरण दूषित करत आहोत हे कळत नाही का? उगा फालतू गोष्टींच्या चर्चा करायच्या. इतकीच जळजळ होती, हिंमत होती, धमक होती तर कश्मिरात पंडीतांना वाचवायला एकही मायचा लाल हिंदूराष्ट्रवादी का नाही गेला? इथे मारतायत नि:शस्त्र, थकलेल्या, बेसावध म्हातार्‍यांना. आले मोठे आम्ही हिंदू हिंदू करणारे. जरा कुणी धर्मसुधारणेच्या चार गोष्टी केल्या की "त्यांना आधी सांगा" असा घोषा का लावता तुम्ही लोक? त्यांचे ते बघून घेतील. तुमची खरकटी तुम्ही साफ करा. तुमच्या तोंडाला खरकटं लागलंय असं कुणी सांगतंय तर लगेच त्याला 'अरे त्या मुसलमानाने तर आठ दिवस आंघोळच नाही केली, त्याला आधी सांग' चा मूर्ख पवित्रा घेता. शतकानुशतके मुक्तधर्माचा पुरस्कार करणार्‍या, सतत उत्क्रांत होत राहिलेल्या हिंदूधर्माच्या सुधारणांचे बेंचमार्क मुसलमान धर्म ठरवून आपण आपल्याच धर्माला कमीपणा आणतो आहोत हे कळत कसं नाही दिडशाहाण्यांना?

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे Mon, 09/28/2015 - 09:59
शतकानुशतके मुक्तधर्माचा पुरस्कार करणार्‍या, सतत उत्क्रांत होत राहिलेल्या हिंदूधर्माच्या सुधारणांचे बेंचमार्क मुसलमान धर्म ठरवून आपण आपल्याच धर्माला कमीपणा आणतो याच्याशी सहमत. हिंदू धर्मातील भंपक रूढी आणि परंपरा न पूर्ण फाटा दिला पाहिजे हि वस्तुस्थिती असली तरी शेजार्याने वाटेल तिथे गाडी पार्क करायची आणि तुम्हाला त्रास द्यायचा पण तुम्ही मात्र शिस्तीत गाडी लावायची हे सर्वसामान्य माणसाच्या मनाला पटत नाही. नो एन्ट्री मध्ये घुसल्याबद्दल तुम्हाला पकडले आणि तुम्ही दंड भरत असताना त्याच वेळेस एखादा गणवेशातील पोलिस त्याच नो एन्ट्री मध्ये घुसताना आढळला आणि तोच पोलिस तिकडे काना डोळा करताना आढळला तर तुमची जी स्थिती असते तीच आज सर्व सामान्य हिंदू माणसाची आहे. एकदा सर्व जण एक समान आहेत असे म्हटल्यावर सर्व धर्म जाती आणि वर्गाला समान न्याय लावला पाहिजे. तुम्ही तुमचे पहा असे म्हणणे कितपत संयुक्तिक आहे?

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर Mon, 09/28/2015 - 18:30
नो एंट्रीवाले उदाहरण सपाट चुकले आहे. कायदा-सिविक सेन्स आणि धार्मिक चालिरीती दोन्ही मधे मूलभूत फरक आहे. मुसलमानांनी दाढ्या राखल्याने, सुंता केल्याने, बुरखा घातल्याने, चार बायका केल्याने, बकरे कापल्याने, आठ दिवस आंघोळ न केल्याने, रोजा धरल्याने, पाच वेळा नमाज पढल्याने हिंदूंच्या जगण्याच्या/स्वतंत्रतेच्या कोणत्या मूलभूत हक्कांवर गदा येते हे अजून कळलेले नाही. तुमच्या पार्किंगवाल्या उदाहरणास इथे बसवले तर ते सपशेल चुकतंय. तुमच्या उदाहरणानुसार हिंदूस वरील गोष्टी करायची सवलत मिळत नाही आणि मुसलमानास बिनबोभाट मिळते आहे असे तुम्ही मांडत आहात. नेमका कोण तो पोलिस आहे जो हिंदूंना वरील गोष्टी करण्यास (ज्या त्यांना जणू खरंच करायच्या आहेत) नाकारत आहे? हिंदूंचे कायदे हिंदूंनीच बनवले की आणखी कोणी?

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे Mon, 09/28/2015 - 19:37
@TJ साहेब तुमचे म्हणणे सकृतदर्शनी बरोबर वाटत असेल तरीही जर दुसरी माणसे नो एन्ट्री मध्ये घुसतात तर मीच काय पाप केलं आहे अशा विचाराने आपणही घुसतात आणी वाहतुकीचा खोळंबा होतो. मुसलमानांना चार मुलं असायला धर्माने परवानगी दिली तर हिंदू धर्मातील धर्म मार्तंड हिंदुनी सुद्धा पाच मुले वाढवायला हवी असा आग्रह धरतात आणी त्यामुळे कोणत्याही राष्ट्रीय धोरणाला हरताळ फसला जातो. एकीकडे आपण म्हणायचे समज सुधारणा झाली पाहिजे आणी चार बायका केल्याने कोणते नुकसान झाले ते विचारता? दुसरी बायको केल्याने पहिल्या बायकोच्या हक्कावर गदा येते त्याचे काय? आता तुम्हाला असे म्हणायचे असेल कि मला काय त्याचे तर मग एखाद्याने आत्महत्या केली तरी मला काय फरक पडतो? किंवा लोकांना पिण्याचे पाणी नसले तर मला काय फरक पडतो माझ्या तरणतलावात पाणी असले कि झाले हे म्हणण्य़ासारखे आहे. मतांच्या राजकारणासाठी मुसलमानांना आरक्षण देण्याचे सुद्धा घाट घातले जातात. एकदा एकच न्याय सर्वाना लावला जाईल हा घटनेतील मूळ मुद्दा ( कलम १४) लाच हरताळ फासला गेला कि घटनेची पायमल्ली करायला किती वेळ लागतो? म्हणूनच अबू आझमी सारखे नालायक लोक भर सभेत असे म्हणून शकतात कि "देश के कितने भी तुकडे होने दो! हम किसीको अपने मजहब के साथ खिलवाड नही करने देंगे! माझे म्हणणे एकच आहे सर्वाना समान न्याय मिळेल हे जर घटनेतील मुलभूत कलम आहे तर त्यावर अंमल बजावणी करताना कोणत्याही धर्माचा बागुलबुवा येत कामा नये आणी धर्म हा घरातच राहिला पाहिजे रस्त्यावर येण्यास मनाई च ठेवली पाहिजे या उप्पर आपल्याला वितंडवाद घालायचा असेल तर माझा पास

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर Mon, 09/28/2015 - 20:02
परत परत तेच. तुमची पोस्ट परत एकदा वाचा आणि तुम्हाला वितंडवाद म्हणजे काय हे लक्षात येइल. धर्म घरात ठेवा म्हणायचं आणि लोकांच्या बेडरूममधे डोकावून बघायचं ह्याला काय अर्थ. एकीकडे आपण म्हणायचे समज सुधारणा झाली पाहिजे आणी चार बायका केल्याने कोणते नुकसान झाले ते विचारता? दुसरी बायको केल्याने पहिल्या बायकोच्या हक्कावर गदा येते त्याचे काय? समाजसुधारणेची चरचा इथे हिंदूंची चालली आहे. एका मुस्लिमाच्या कितव्या बायकोच्या कोणत्या हक्कांवर गदा येते हे बघणे हे हिंदूंचे काम आहे की मुस्लिम सुधारकांचे? हिंदूंची बहुपत्नित्व प्रथा हिंदूंनी बंद केली की इतरांनी? आता तुम्हाला असे म्हणायचे असेल कि मला काय त्याचे तर मग षःएट्खाऋय़ाणीओ आत्महत्या केली तरी मला काय फरक पडतो? किंवा लोकांना पिण्याचे पाणी नसले तर मला काय फरक पडतो माझ्या तर्न्तालावत पाणी असले कि झाले हे म्हणण्य़ासारखे आहे. - हा वितंडवाद. नागरी, शासकिय, राजकिय धोरणांचा आणि धार्मिक चालीरीतिंचा बादरायण संबंध दाखवून बुद्धीभ्रम करायचा. अबू आझमीसारख्यांचे वक्तव्य फार मनाला लावून घेताय. तोगडीया प्रभृती काही वेगळ्या नाहीत. त्याबद्दल काय मत? समान नागरी कायदा व धर्म रस्त्यावर येऊ नये ही सूचना हिंदूच स्वतः किती पाळतात ते बघायला उत्सूक आहोत.

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे Mon, 09/28/2015 - 20:25
अबू आझमीसारख्यांचे वक्तव्य फार मनाला लावून घेताय. हा माणूस आपला लोकनियुक्त प्रतिनिधी( आमदार) आहे आणि तो देशाचे तुकडे करण्याची भाषा बोलतो आहे आणि तुमचे म्हणणे ते मनाला लावून घ्यायचे नाही? बाकी आपली विचार सरणी पाहून आमचा पास तोगडिया आणि अबू आझमी यांना एकाच न्याय लावला पाहिजे याबद्दल दुमत नाहीच. जाता जाता -- आपण सरकारी नोकर आहात काय?

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर Wed, 09/30/2015 - 13:20
मतपेटीकडे डोळे ठेवून लोकनियुक्त प्रतिनिधींनी आतापर्यंत किती आणि काय काय वादग्रस्त बोलले आहे याचा आपला किती अभ्यास आहे हे माहित नाही. पण अबू आझमींसारख्यांच्या निवडक वक्तव्यांना सिंगल-आउट करून "हे असलेच" असा छापा तमाम मुस्लिमांवर मारण्याचे काय प्रयोजन? तसेच या वक्तव्यांना मनाला लावून घेणार्‍या राष्ट्रप्रेमी-देशप्रेमी लोकांनी उत्तरादाखल काय केले हेही सांगितले तर बरे होईल. तुमच्या पासचे विशेष कौतुक नाही. आमच्या एकाक्ष विचारसरणीसमोर रंगीत चष्मे घालणार्‍यांची डाळ शिजत नाही हा नेहमीचा अनुभव आहे. तोगडीया-अबूआझमी ला एकच न्याय लावत आहात याबद्दल धन्यवाद! जाता जाता: सरकारी नोकरीत तेही लष्करात आपण होता असे कळते. इतकी वर्षे तिथे काढूनही असले रंगीत विचार बघून मौज वाटली.

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे Wed, 09/30/2015 - 18:37
TJ साहेब लष्करात सर्वांचा रंगीतच चष्मा असतो आणि ते रंग फक्त तिरंग्याचे असतात आणि मध्ये अशोक चक्र हि असते. फक्त भगवा किंवा हिरवा नसतो. तेथे सर्वाना एकच न्याय असतो. तो काय असतो हे मी मिपावर बर्याच ठिकाणी लिहिले आहे. आपणाला शोधायची तसदी घ्यायची असेल तर शोधा. तुम्हाला कशात मौज वाटते ते तुम्ही पहा. एकाक्ष झाल्याने फक्त कोणत्याही विषयाची खोली लक्षात येत नाही किंवा त्रिमिती समजत नाही. बाकी आमचा पास आहेच त्याचे कौतुक कुणीहि का करावे? मज पामरासी काय थोरपण पायीची वहाण पायी बरी.

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे Wed, 09/30/2015 - 19:11
लष्कराची "आठवण" करून द्यायची आपल्याला गरज नाही. आयुष्याची २३ सोनेरी वर्षे मी लष्करात काढलेली आहेत. तेथे एकच न्याय सर्वाना आहे. मुसलमान असलात तरी आपल्याला चारच काय दोन लग्ने करायची परवानगी नाही. आपल्याला दाढी वाढवायची परवानगी नाही. नौदलात दाढी वाढवण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते( कारण आज वाटले दाढी ठेवली आणी उद्या काढली असे चालत नाही. ओळख पत्रावरील फोटो बदलावा लागतो). तेथे मशिदिवरच काय पण मंदिरावरही बोम्बल्या( लाउड स्पीकर लावण्याची परवानगी नाही). आपला धर्म आपल्या घरातच ठेवावा लागतो.शाकाहारी हिंदू किंवा जैन असेल तरीही तुम्हाला कर्तव्याचा भाग म्हणून मांस हाताळावे लागेल असे लिहून द्यावे लागते. तेथे कधीही अशी धार्मिक भांडणे होत नाहीत. अकारविल्हे असल्याने माझा सहभागी साडे पाच वर्षे (माजीद) खान होता. असो. लष्करात धर्मांधाना किंवा निधर्मांधाना थारा नाही. आणी असेच सिव्हील आयुष्यात असावे असे मला ठामपणे वाटते. मग आपण त्याला रंगीत म्हणा किंवा रंगान्ध्ता म्हणा इति लेखनसीमा.

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर Wed, 09/30/2015 - 19:57
चला तर तुम्ही आता सिविल आयुष्यात आहात याची तरी आठवण करून द्यावी. तर लष्करी कायदे व त्याचे उपयोग, औचित्य लष्कराच्या अखत्यारीत. तिथल्या प्रत्येक अटी-शर्ती-कायद्याला योग्य असे उपयुक्त कारण आहे. कुणाला सहज वाटले म्हणून तिथले नियम बनत नसतील. पण कुणाची कितीही वैयक्तिक हुकुमशाहीची इच्छा असली तरी सर्व देश लष्करी कायद्याप्रमाणे चालणार नाही कारण इथे लोकशाही आहे. इथे आपआपले रंग उधळायला सर्वांना सूट आहे जोवर हे रंग आपल्यालाच त्रासदायक ठरत नाहीत. कोल्हापूरच्या गणेशमंडळांनी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने डीजेबंदी केली. कारण स्वतःलाच त्रास होतो हे लक्षात आले म्हणून. असो. निवृत्त लष्करी अधिकार्‍यांनी जनतेत परत आल्यावर 'प्रहार'च्या नानाच्या भूमिकेत राहून उपयोग नाही. तरी माझ्या प्रश्नांचे उत्तर तुम्ही सातत्याने टाळत आहात ते का समजले नाही. भारतातल्या तेरा टक्के मुस्लिमांनी बकरे कापले, गायी खाल्या, चार बायका ठेवल्या (प्रत्यक्षात किती टक्के मुस्लिम करतात हाही संशोधनाचा विषय आहे म्हणा) दाढ्या वाढवल्या, नमाज पढली, उरुस काढले, सुंता केली, बुरखा घातला तर ऐंशी टक्के हिंदूंच्या नेमक्या कुठल्या संवैधानिक हक्कांवर गदा येते? हा माझा मूळ प्रश्न तुमच्या नो-एन्ट्रीच्या उदाहरणासाठी.

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे Wed, 09/30/2015 - 20:49
मी माझ्याच अगोदर दिलेल्या प्रतिसादातील वाक्ये आपल्या निरीक्षणासाठी परत आपल्यापुढे ठेवत आहे. पटत असेल तर घ्या नाही तर सोडून द्या. जर दुसरी माणसे नो एन्ट्री मध्ये घुसतात तर मीच काय पाप केलं आहे अशा विचाराने लोक आपणही घुसतात आणी वाहतुकीचा खोळंबा होतो. दुसरी बायको केल्याने पहिल्या बायकोच्या हक्कावर गदा येते त्याचे काय? त्याच वेळेस एखादा गणवेशातील पोलिस त्याच नो एन्ट्री मध्ये घुसताना आढळला आणि तोच पोलिस तिकडे काना डोळा करताना आढळला तर तुमची जी स्थिती असते तीच. तुम्ही तुमचे पहा असे म्हणणे कितपत संयुक्तिक आहे? आपले म्हणणे--- बकरे कापले, गायी खाल्या, चार बायका ठेवल्या (प्रत्यक्षात किती टक्के मुस्लिम करतात हाही संशोधनाचा विषय आहे म्हणा) दाढ्या वाढवल्या, नमाज पढली, उरुस काढले, सुंता केली, बुरखा घातला. याने काहीच फरक पडत नाही कारण हा त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे आणि त्यात कोणीही दखल देऊ नये याबद्दल दुमत नाही. पण "चार बायका ठेवल्या"--- बायकाना आपण गायी आणि बकरे यांच्या पातळीवर आणत आहात याची खंत वाटते. मुस्लिम वैयक्तिक कायद्यात स्त्रियांची काय परिस्थिती आहे हे आपण जाणता. एकदा धार्मिक बाबतीत "कोणालाच"(यात न्यायालये सुद्धा आली) दखल देता येणार नाही असे म्हटले कि त्यात सुधारणा करण्याचा मार्गच खुंटला. ५० टक्के लोकसंख्येला श्रुन्खलात बंदिस्त करून एखाद्या समाजाची प्रगती कशी साधता येणार? आणि समाजाच्या एका घटकाची प्रगती खुंटली असेल तर राष्ट्राची पण प्रगती खुंटते. हे विचार उदात्त आणि अव्यावहारिक आहेत असे आपले म्हणणे असेल तर काय बोलावे? शिवाय तुम्हाला असे म्हणायचे असेल कि मला काय त्याचे? त्यांचे त्यांनी बघून घ्यावे. असे असेल तर मग --एखाद्या शेतकर्याने आत्महत्या केली तरी मला काय फरक पडतो? किंवा लोकांना पिण्याचे पाणी नसले तर मला काय फरक पडतो माझ्या तरणतलावात पाणी असले कि झाले हे म्हणण्य़ासारखे आहे. आपण मी काय म्हणतो यावर विचार करून पहा. राहिली गोष्ट प्रहार मधील नाना पाटेकर ची उपमा देण्याची. आपल्याला माझ्याबद्दल किती माहिती आहे? तशी नसताना आपण या पातळीवर उतरला याबद्दल काय म्हणणे? संवाद व्यक्तिगत पातळीवर आला नसता तर बरे झाले असते असे वाटते. असो आपली मते आपल्यापाशी.

त्यामुळे धर्म आणि देव या संकल्पनांच्या गाभ्याला कोणताही धक्का न लावता इतर अशास्त्रीय रूढी नक्कीच तत्काळ बंद करता येऊ शकतील.
बाबा रे संदीपा, समजा तू सुचवलेले बदल भागवतांनी,संघाने स्वीकारले व देशातल्या नागरिकांना आवाहन केले तर लोक ऐकतील का? की वागळे,सरदेसाई पुन्हा 'व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी' म्हणणार? म्हणजे गंगेत निर्माल्य टाकू नये असे संघाने सुचवले तर किती पत्रकार व लोक ते ऐकतील? सरकार असो वा संघटना , धार्मिक चालीरिती ह्या हळूहळू मर्यादित स्वरूपातच बदलाव्या लागतात असे ह्यांचे मत.

विवेकपटाईत Sat, 09/26/2015 - 09:34
अधिकांश लोकांना संघ आणि त्याच्या कामांबाबत माहित नाही. संघाचे स्वयंसेवक सुरवातीपासूनच अंधविश्वास इत्यादींवर विश्वास ठेवीत नाही. सकारात्मक रीतीने अंधविश्वास निर्मूलाचे जेवढे कार्य संघाने केले आहे तेवढे कार्य इतरांनी कधीच केले नाही. बाकी केवळ चर्चा, सेमिनार इत्यादी करतात.

नितिन थत्ते Sat, 09/26/2015 - 13:43
>>हिंदुनी शास्त्रीय पाया नसलेल्या संकल्पना सोडून दिल्या पाहिजेत हिंदू धर्मातली कुठली रूढी/प्रथा/संकल्पना शास्त्रीय पाया नसलेली असू शकते हेच आम्हाला मान्य नाही. तशी शंका कोणाला असेल तर इथे जाऊन त्या रूढीमागची वैज्ञानिक संकल्पना जाणून घ्यावी. =))

In reply to by नितिन थत्ते

विकास Sun, 09/27/2015 - 01:10
हिंदू धर्मातली कुठली रूढी/प्रथा/संकल्पना शास्त्रीय पाया नसलेली असू शकते हेच आम्हाला मान्य नाही. तशी शंका कोणाला असेल तर इथे जाऊन त्या रूढीमागची वैज्ञानिक संकल्पना जाणून घ्यावी. =)) हे लिहीणारा आणि सनातन प्रभातचे दुवे देणारा (पक्षी: जाहीराती करणारा) आयडी, हा परात्पर गुरू डॉ. आठवले यांचा ड्युप्लिकेट आयडी तर नसावा ना असे सनातन प्रभातची आर एस एस बद्दलची मते माहीत असल्याने वाटू लागले आहे.... =))

मोहन भागवत ह्यांनी आव्हान केले आहे आदेश दिलेला नाही आता ब्रह्मवृदांची दावे उजवे सगळे मिळून काय शास्त्रीय व काय असाष्ट्रीय त्याची एक यादी बनवला माझ्यापुरते हे तत्व मी कधीच अंमलात आणले आहे , तातायारावंचे विचार काही अंशी तरी आता जनमानसात रुजतील अशी एक आशा करतो , डोंबिवली मधील स्मशानात विद्युत वाहिनी आहे तिच्याबद्दल बोंबाबोंब झालेली ऐकवत नाही मात्र असे काशी वाराणसी येथे सक्तीने लागू केल्यास गहजब होईल तेव्हा अनेक रूढी व परंपरा ह्यांच्यातील अश्या अनके अनावश्यक रूढी लोकजागृती करून समाजातून हद्द पदर कराव्यात काही ठिकाणी सरकारने कायद्याने हस्तषेप करावा , जशी सतीची चाल साहेबाने बंद केली .

In reply to by निनाद मुक्काम …

सुबोध खरे Sat, 09/26/2015 - 19:25
निनाद शेट विद्यूत दाहिनी न येऊ देण्याची कारणे "वेगळी"असतात. आमचे सासरे CSIR मध्ये शास्त्रज्ञ होते. ते एल पी जी वर चालणारी विद्युतदाहिनी विना नफा तत्वावर बसवून देतात.लातूर महापालिकेच्या क्षेत्रात अशी वाहिनी बसविण्यासाठी त्यांना पाचारण केले. परंतु प्रत्यक्षात तेथे गेल्यावर आमच्या धर्मावर गदा येते असे राजकारण केले. तेथे कांग्रेस आणि राष्ट्रवादीचे बहुमत आहे. पण अंदरकी बात तेथे स्मशानात लाकडे पुरवणारा कान्ग्रेसचा कार्यकर्ता आहे. त्याच्या धन्द्यावर टाच येते. "अडचणीत सापडले कि धर्म आठवतो" या उक्ती प्रमाणे आमच्या सासर्यांना ते काम करू दिले नाही. शेवटी धर्म हा निधर्माचे गोडवे गाणारे लोकांच्याही कामाला येतोच कि. त्यांनी लातुरलाच ग्यासची शवदाहिनी बसवली पण ती मारवाडी समाजाची खाजगी आहे. आणि तेथे जास्त लोक जातात असे ऐकून आहे. हीच कहाणी इतर बर्याच ठिकाणी आहे. त्यांनी पनवेल महापलिकेच्या शवदाहीनीत अशी दोन उपकरणे बसविली आहेत. त्यामध्ये एका माणसाचे शव जाळण्यासाठी एका सिलिंडरचा खर्च येतो. या सिलिंडरला सरकारी सबसिडी मिळावी असे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. याठिकाणी गरीब माणसाला ८०० रुपयात अंत्यसंस्कार करता येतात.ते ४५० रुपयात काम होईल. तेवढेही पैसे नसतील तर पनवेलचा रोटरी क्लब तेही पैसे पुरवतो. शिवाय धूर नाही घाण नाही आणि पर्यावरणाची हानी हि नाही. तेंव्हा मुद्दा लक्षात घ्या.

दत्ता जोशी Sat, 09/26/2015 - 15:25
"प्रगो,वेदांमध्ये प्रचंड विज्ञान आहे त्यामुळे त्यावर पुरोगामी लोक टिका करुन वेदांना बदनाम करत असतात.आजकालचे हे क्वांटम मॅकॅनिक्स,जेनेटिक इंजिनिअरींग,सबॲटोमीक फिजिक्स,थिअरॉटीकल फिजिक्स,बायोमेकॅट्रोनिक्स,कॉस्मॉलॉजी, इव्हॉल्युशनरी बायॉलॉजी हे सगळे ज्ञान आमच्या वेंदांमध्ये होते ", अहो, इलेक्ट्रोनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, स्पेस रिसर्च इ. विसरलात की!. तसंच modern apllied enginnering आणि टेक्नोलॉजी शी संबंधित पाण्याखालील जोडकाम ( वेल्डिंग ), पाण्याखालील रासायनिक रंगकाम इ. गोशी पण आहेत. अजून सांगू का?

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

दत्ता जोशी Sat, 09/26/2015 - 21:50
तर काय ....मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या म्हणजे काय त्यासाठी अभ्यास थोडाच करावा लागतो? अजून काही concept फेकायच्या असल्या तर सांगा. टाकू आपण.

In reply to by दत्ता जोशी

श्रीगुरुजी Sat, 09/26/2015 - 18:18
मोहन भागवतांचं सोडा हो. ते संघाचे म्हणजेच पुराणमतवादी, खोटारडे, दांभिक, प्रतिगामी, संकुचित विचारांचे, जातीयवादी इ. इ. पण पद्मभूषण पुरस्कार मिळालेले इस्रोचे माजी अध्यक्ष माधवन नायर काय म्हणतात ते पहा. http://www.firstpost.com/living/aryabhatta-discovered-gravity-newton-says-former-isro-chief-g-madhavan-nair-2118331.html One of the country's leading scientists and former ISRO chairman G Madhavan Nair today propounded the theory that some shlokas in the Vedas mentioned about presence of water on the moon and astronomy experts like Aryabhatta knew about gravitational force much before Issac Newton. The 71-year-old Padma Vibhushan awardee said the Indian vedas and ancient scriptures also had information on metallurgy, algebra, astronomy, maths, architecture and astrology way before the western world knew about them. peaking at an international conference on Vedas, he however, added that the information in vedas was in a "condensed format" which made it difficult for the modern science to accept it. "Some sholkas in one of the Vedas say that there is water on the moon but no one believed it. Through our Chandrayaan mission, we could establish that and we were the first ones to find that out," Nair said, adding that everything in Vedas could not be understood as they were in chaste Sanskrit. He also talked very highly about fifth century astronomer- mathematician Aryabhatta saying, "We are really proud that Aryabhatta and Bhaskara have done extensive work on planetary work and exploration of outer planets. It was one of the challenging fields. "Even for Chandrayaan, the equation of Aryabhatta was used. Even the (knowledge of) gravitational field... Newton found it some 1500 years later... the knowledge existing (in our scriptures)," he said. Nair, who was ISRO chairman from 2003 09, also claimed geometry was used to make calculations for building cities during the Harappan civilisation and the Pythagorean theorem also existed since the vedic period.

In reply to by अमृतेश सराफ

दत्ता जोशी Sat, 09/26/2015 - 22:41
पण डोळ्यावर आणि बुद्धीवर पिवळे पण चढलेल्या काही लोकांना ते दिसत नाहीत ना! ते संदर्भ वाचायला लागतात. विकी आणि आंजावर अनेक paper आहेत, संदर्भ आहेत. जे verified आहेत. ४थ्या शतकापासून भारतात बनत असलेले wootz स्टील बनवण्याचे प्रयत्न आजही जगभरात सुरु आहेत. याची माहिती सहज उपलब्ध आहे. दिल्लीचा न गन्ज्णारा खांब अजूनही न गंजता सुमारे १६०० वर्षांपासून उभा आहे. गणितातील भारतीय गणितज्ञांच्या कार्य बद्दल माहिती https://en.wikipedia.org/wiki/Indian_mathematics वरपाहायला मिळेल. आपल्याच गणितज्ञांनी या गोष्टी जगासमोर आणली आहेत. अधिकाधिक संशोधन होणे गरजेचे आहे आणि ते भारतीयांनीच करायचे आहे. सुरवात तर काही दशकांपासून झाली आहे अजून बर्याच गोष्टी हळूहळू समोर येतील अर्थात त्याला वेळ लागेल. काही लोक आपल्या डोळ्यावरचा चष्मा ना काढता वाद करत राहणारच पण निंदकाचे घर असावे शेजारी या उक्ती प्रमाणे त्यांचे स्वागतच आहे. गाईच्या शेणाविषयी: १९८६ साली चेर्नोबिल येथे झालेल्या जगातल्या सर्वात मोठ्या अणु अपघातानंतर एक धक्कादायक बाब समोर आली होती - पूर्व युरोपात सगळी जमीन अन्नधान्य, चार, गुरे, दुध दुभते radioactive झाले असताना एका सक्तीच्या सरकारी तपासणीत ऑस्ट्रिया येथील एक फार्म वरील दुध आणि चार्यात धोकादायक पातळीपेक्षा कमी radioactivity सापडली होती . Karin Heschl नावाच्या बाईंचे ते फार्म होते. सरकारी अधिकाऱ्यांनी यामागील रहस्य शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या फार्म वर केरिन बाई सूर्योदय आणि सूर्यास्ताला न चुकता अग्निहोत्र करीत होत्या इतकाच त्यांच्या आणि इतर फार्म ( जिथे दुध आणि चाऱ्याची radioactivity धोकादायक पातळीवर होती ) मध्ये फरक होता हे समोर आले. पण अर्थात मेडीयात त्याची जास्ती वाच्यता झाली नाही. पण अग्निहोत्र आणि गोमया विषयी त्या भागात बरीच चर्चा झाली. चेर्नोबिलच्या बाजूच्या सोविएट रशियाच्या सर्व लोकांनी आपापल्या घरांच्या भिंती गोमयाने सारवल्या होत्या अशी नोंद आहे. केरिन बाई अजूनही जगभर अग्निहोत्राच प्रचार आणि प्रसार करत आहेत. अर्थात याविषयी जास्ती बोलायला कोणी तयार नाही. आन्जावर याविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. आता हे जर खरे असेल तर यावर अधिक संशोधन व्हावे लागेल आणि ते संशोधन आपणच करणे आणि छातीठोकपणे जगासमोर आणणे क्रमप्राप्त आहे.

In reply to by श्रीगुरुजी

त्येच तर मी म्हणतोय श्रीगुरुजी , आमच्याकडे वेदातल्या ज्ञानाची फारच उपेक्षा झाली आहे.त्यात हे पुरोगामी लोक वेदांवर टिका करायला आघाडीवर. calculous, discrete mathematics, statistics, ह्यांची ईत्यंभूत माहीती वेदांम्ध्ये आहे, फक्त ती सांकेतीक स्वरुपात आहे, म्हणजे बघा हा कसे, एका झाडावर दहा पक्षी बसले आहेत, तिथे एक पारधी आला, त्याने तिथे फटाका फोडला ,तर झाडावर कीती पक्षी शिल्लक राहतील?????? आता हे उदाहरण जरी बाळबोध वाटले तरी या उदाहरणात मागाल ते शास्त्र आहे , काय समजलात?

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

दत्ता जोशी Sat, 09/26/2015 - 22:48
"calculous, discrete mathematics, statistics, ह्यांची ईत्यंभूत माहीती वेदांम्ध्ये आहे" आहेच. आणि गुप्त सांकेतिक वगैरे काही नाही. फक्त आपल्याला माहिती नाही म्हणजे तसे नाहीच हि वृत्ती सोडून स्वयंघोषित विद्वानांनी डोळे उघडून पाहणे गरजेचे आहे. https://en.wikipedia.org/wiki/Indian_mathematics

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

श्रीगुरुजी Sat, 09/26/2015 - 22:54
फुलबॉटल डबियस, तुझ्यासारख्या पारध्याने तुझ्यासारखेच कितीही सादळलेले आणि फुसके फटाके फोडले तरी नुसती वात जळून जाईल. पण आवाज होणार नाही, प्रकाश दिसणार नाही आणि धूरही येणार नाही. त्यामुळे झाडावरचे सगळे पक्षी शिल्लक राहतील.

मोहन भागवतांना अधुन मधून पुडी सोडायचा नाद लागलेला आहे, पण जे काही मत मांडलं आहे त्याचं ब्वा मी स्वागत करतो. बोलणे आणि वर्तन यात सारखेपणा यावा व संघाचा आधुनिक विचाराकडे पावलं पडावीत यासाठी संघाला मी शुभेच्छा देतो. -दिलीप बिरुटे

दत्ता जोशी Sun, 09/27/2015 - 11:24
मुख्य विषय बाजूलाच राहिला. हिंदू धर्मातील वाईट प्रथा आणि रूढी या पुर्ण सोडल्याच पाहिजेत. हे त्यांचे म्हणणे आहे पण उगीच विषयांतर केले गेले आहे. आज चेपू वर एक इंटरेस्टिंग पोस्त वाचली सहज डकवतो. ----------------------------------------------------------------------------------------------------------------- काय गम्मत आहे बघा - आज एकही सेलेब्रिटी आला नाही ईद कशी साजरी करावी हे सांगायला. आज एकही पर्यावरणवादी आला नाही रक्तविरहित ईद साजरी करा असं सांगायला. एकही प्राणी प्रेमी आला नाही कापल्या जाणाऱ्या करोडो बकऱ्यांविषयी कणव व्यक्त करायला. ईद चा 'खरा अर्थ' काय आहे हे सांगायला एकही बुद्धिवादी आला नाही. आणि गम्मत म्हणजे एकही पुरोगामी आला नाही हे सांगायला, की दीड हजार वर्षांपूर्वी काहीतरी घटना घडली म्हणून आज निष्पाप जीवांची निर्घृण कत्तल करणं हे किती 'मागासलेपणाचं' आहे. पण कसे येणार म्हणा, आपण तर भारतात राहतो ना. त्यामुळे फक्त रक्षाबंधन, वटपौर्णिमा, दिवाळी, गणपती, मकर संक्रांत, पाडवा हे उत्सव कसे साजरे करावेत हेच आपल्याला शिकवलं जाणार.

In reply to by दत्ता जोशी

श्रीगुरुजी Sun, 09/27/2015 - 12:56
>>> आज चेपू वर एक इंटरेस्टिंग पोस्त वाचली सहज डकवतो. जबरी पोस्ट! >>> आणि गम्मत म्हणजे एकही पुरोगामी आला नाही हे सांगायला, की दीड हजार वर्षांपूर्वी काहीतरी घटना घडली म्हणून आज निष्पाप जीवांची निर्घृण कत्तल करणं हे किती 'मागासलेपणाचं' आहे. बादवे, बकरी ईदसाठी ज्या घटनेचा संदर्भ दिला जातो ती घटना महंमदाच्या काळात १४०० वर्षांपूर्वी घडलेली नसून त्यापूर्वी अनेक शतके घडलेली आहे असे मुस्लिम सांगतात. ज्या काळात फक्त हिब्रू (ज्यू) धर्म होता व ख्रिश्चन व मुस्लिम धर्म जन्माला आले नव्हते त्या काळातील ही घटना आहे असे सांगितले जाते.

In reply to by दत्ता जोशी

दत्ता जोशी, तुम्हाला बकरी ईद दिवशी दालच्याची दावत मिळाली नाही म्हणुन मुसलमानांना काहून हो टार्गेट करता.????

In reply to by दत्ता जोशी

श्रीगुरुजी Sun, 09/27/2015 - 13:21
>>> आणि गम्मत म्हणजे एकही पुरोगामी आला नाही हे सांगायला, की दीड हजार वर्षांपूर्वी काहीतरी घटना घडली म्हणून आज निष्पाप जीवांची निर्घृण कत्तल करणं हे किती 'मागासलेपणाचं' आहे. व्याख्या - ज्याला/जिला अगदी दूरच्या अंतरावरून हिंदूंच्या डोळ्यातील कुसळ दिसते आणि अगदी जवळून सुद्धा इतर धर्मियांच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही त्यालाच/तिलाच "निधर्मी आणि पुरोगामी विचारवंत" असे म्हणतात.

In reply to by दत्ता जोशी

गुलाम Wed, 09/30/2015 - 14:49
दुर्दैवाने हा धागा उशिरा उघडला त्यामुळे खुपच उशिरा प्रतिसाद देतोय. अंनिस ने इतर धर्मातल्या अंधश्रद्धांबद्दलची आपली भुमिका वेळोवेळी स्पष्ट केली आहे. ज्या त्या धर्मातल्या प्रागतिक विचारांच्या लोकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अंनिस त्याला सक्रिय पाठिंबा देईल अशी ती भुमिका होय. परंतु तरीही काही सनातनी लोक मुद्दाम असा प्रचार करुन बुद्धीभेद करतात आणि काही फेक्युलर लोकही हिंदूंवर टोकाची टिका करुन सर्वसामान्य हिंदूधर्माभिमानी लोकांच्या मनात किंतु निर्माण करतात. आपण अशा दोन्ही प्रवृत्तींपासून दूर राहिले पाहिजे. या वर्षी बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम सत्यशोधक समाजाने बकरी कापण्याऐवजी रक्तदान करा (त्यागाचे प्रतिक म्हणून) असा उपक्रम राबवला होता. अंनिसने त्याला सक्रिय पाठिंबा दिला. अनेक कार्यकर्त्यांनी त्यात रक्तदान केले. आपण अशा उपक्रमांना उत्तेजन दिले पाहिजे. अवांतरः मी अंनिसचा प्रवक्ता किंवा गेलाबाजार पदाधिकारीही नाहिये. वरील प्रतिसाद केवळ अनिसचा हितचिंतक या नात्याने दिलेला आहे.

In reply to by गुलाम

तर्राट जोकर Wed, 09/30/2015 - 14:57
या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! काही स्वयंघोषीत हिंदूधर्मरक्षक ह्या धाग्यावर असाच उच्छाद मांडत आहेत. त्यांना सणसणीत चपराक आहे हा प्रतिसाद.

In reply to by गुलाम

सूड Wed, 09/30/2015 - 15:03
ज्या त्या धर्मातल्या प्रागतिक विचारांच्या लोकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अंनिस त्याला सक्रिय पाठिंबा देईल अशी ती भुमिका होय.
याचा अर्थ हिंदू शिवाय इतर धर्मात पुढाकार घेऊन काम करण्याइतके गट्स नाहीत असाच होतो. म्हणजे असंतोषाची लाट फुटली तर ती आमच्यावर नको, दुसर्‍यांनी पुढाकार घ्या आम्ही पाठिंबा देतो.

In reply to by सूड

तर्राट जोकर Wed, 09/30/2015 - 16:19
याचे उत्तर यॉर्कर यांनी खाली दिले आहे. प्रश्न गट्सचा नाही, औचित्याचा आहे. उद्या क्रिश्चनांनी हिंदूंमधल्या अंधश्रद्धांबद्दल अंनिससारखे काम हाती घेतले तर हिंदूंची काय प्रतिक्रिया असेल याचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का? इतर धर्मिय कट्टर आहे म्हणून अंनिसची फाटते असा गोड गैरसमज असणार्‍यांनी अंनिस एखाद्याची खरोखर फाटेल अशा वातावरणात काम करत आहे हे माहित नसते. पूर्ण माहिती व ज्ञानाशिवाय अंनिसला तुच्छ टोमणे मारणे हे अंनिससारखे काम स्वत: करून पाहण्यापेक्षा लाख पटीने सोपे आहे. संबंध नसलेले निरर्थक प्रश्न विचारण्यासही खास बुद्धीमत्ता लागत नाही.

In reply to by सूड

गुलाम Wed, 09/30/2015 - 16:30
याचा अर्थ हिंदू शिवाय इतर धर्मात पुढाकार घेऊन काम करण्याइतके गट्स नाहीत असाच होतो.
तुम्हाला पाहिजे तो अर्थ काढायला तुम्ही मोकळे आहात. परंतु हिंदू धर्मामध्ये चार्वाकापासून ते तुकारामांपर्यंत धर्मचिकित्सेची परंपरा आहे. तशी ती मुस्लिम धर्मामध्ये दुर्दैवाने नाही. हिंदूंना या परंपरेचा अभिमान वाटायला हवा. पण आजकालचे काही कट्टर हिंदू उलट चिकित्सा करणार्‍यावरच तुटून पडतात. ते असो.
म्हणजे असंतोषाची लाट फुटली तर ती आमच्यावर नको, दुसर्‍यांनी पुढाकार घ्या आम्ही पाठिंबा देतो.
पीके चित्रपटाच्यावेळी झालेला गदारोळ आठवत असता तर तुम्ही असं म्हणलं नसतं. त्यावेळी पीकेला विरोध करणार्‍या लोकांचा (अगदी मिपावरदेखील) मुख्य आक्षेप होता की अमीर खान मुस्लिम आहे. म्हणजे कसंय बघा हं, जे लोक अमीर खानला आमच्या धर्मात हस्तक्षेप करायचा अधिकार नाही असं तावातावाने म्हणत होते. तेच लोक चिकित्सक हिंदूंना मात्र मुस्लिम धर्माबद्द्ल का बोलत नाही असंही विचारतात.

In reply to by गुलाम

सूड Wed, 09/30/2015 - 16:56
@ट्ज काका आणि गुलामभाऊ एखादी गोष्ट केवळ आपल्याला पटतेय म्हणून तिच्यातील त्रुटींवर पांघरुण तुम्हा दोघांची घालायची कला शिकण्यासारखी आहे. बाकी चालू द्या!!

In reply to by सूड

तर्राट जोकर Wed, 09/30/2015 - 17:10
एखादी गोष्ट आपल्याला पटत नाही म्हणून तिच्यात नसलेल्या त्रुटी दाखवण्याची तुमचीही कला उत्तमच आहे. तरी वर उल्लेखलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले असते तर जास्त बरे वाटले असते. असो. मुद्देसूद वाद प्रत्येकाला झेपत नाहीत हेच खरे.

In reply to by तर्राट जोकर

सूड Wed, 09/30/2015 - 21:04
एखादी गोष्ट आपल्याला पटत नाही म्हणून तिच्यात नसलेल्या त्रुटी दाखवण्याची तुमचीही कला उत्तमच आहे.
अरे वाह!! तुम्हालाही पटलं तर!!
तरी वर उल्लेखलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले असते तर जास्त बरे वाटले असते. असो. मुद्देसूद वाद प्रत्येकाला झेपत नाहीत हेच खरे
तुमच्या वरील वाक्यातच उत्तर आहे. वाद घालण्यात आम्हाला शष्प रस नाही. आणि अचानक एखाद्या धाग्यावर कुत्र्याच्या छत्रीसारखे उगवून ऊर बडवत बसणार्‍या आयडींना आम्ही फाट्यावर मारण्यायोग्यही समजत नाही. तुमचे रणकंदन असेच उत्तरोत्तर बहरत जाऊन धाग्याला ५०० प्रतिसाद मिळवून द्याल ही शुभेच्छा!! तुम्हाला गळे काढायला मिळतील असे आणखी धागे मिपावर येवोत ही त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना करतो. इति लेखनसीमा!!

In reply to by गुलाम

बॅटमॅन Wed, 09/30/2015 - 17:06
म्हणजे कसंय बघा हं, जे लोक अमीर खानला आमच्या धर्मात हस्तक्षेप करायचा अधिकार नाही असं तावातावाने म्हणत होते. तेच लोक चिकित्सक हिंदूंना मात्र मुस्लिम धर्माबद्द्ल का बोलत नाही असंही विचारतात.
हा हा हा, हा बाकी एकदमच बिनतोड मुद्दा आहे. मान गये.

In reply to by गुलाम

dadadarekar Wed, 09/30/2015 - 17:53
हिंदू धर्मामध्ये चार्वाकापासून ते तुकारामांपर्यंत धर्मचिकित्सेची परंपरा आहे. ......... हो . आणि असे अनेक चार्वाक व अनेक तुकाराम लबाड धर्मवाद्यानी सदेह स्वर्गालाही धाडले आहेत. आमचेही कितीतरी आयडी धर्मयुद्धातच नष्ट केले गेलेले आहेत.

In reply to by dadadarekar

पैसा Wed, 09/30/2015 - 17:58
यादी द्या की. मिपा हे तुमचे धर्मयुद्ध आहे का? ब्वार्र.

In reply to by dadadarekar

हा हा ! म्हणजे, आपल्या अनेक डूआयड्या असल्याची कबुली दिलीच शेवटी ! चोर स्वतःला कितीही हुशार समजत असला तरी कोणते तरी धागेदोरे मागे सोडतो ते असे =)) =)) =))

In reply to by गुलाम

कपिलमुनी Wed, 09/30/2015 - 16:12
ज्या त्या धर्मातल्या प्रागतिक विचारांच्या लोकांनी
अंनिस वाले "धर्म" मानतात हे वाचून डोळे पाणावले. हमीद आठवला :) अवांतरः मी अंनिसचा प्रवक्ता किंवा गेलाबाजार पदाधिकारीही नाहिये आणि विरोधक नाही सनातनी नाही ! माताय्य , मी कुणीच नाही :(

In reply to by कपिलमुनी

गुलाम Wed, 09/30/2015 - 16:53
अंनिस वाले "धर्म" मानतात हे वाचून डोळे पाणावले.
हा विरोधकांचा आणखी एक आवडता शब्दच्छ्ल. अंनिस धर्म मानत नाहिच. पण समाजात त्याचा प्रभाव आहे हे तर मान्य करावेच लागेल. तो न मानण्याची शहामृगी भुमिका सामाजिक संघटनेला घेऊन चालत नाही. हिंदू सुधारकांनी मुस्लिम धर्मासाठी पण काम करावं ही आदर्शवत परिस्थिती झाली. पण सध्या तरी ते प्रॅक्टीकली शक्य नाही.

In reply to by गुलाम

सूड Wed, 09/30/2015 - 16:58
तुमचाच प्रतिसाद परत वाचा. पहिल्या वाक्यात लिहिलंत त्याच्या नेमकं उलट शेवटच्या वाक्यात लिहीलंय. अता मात्र हद्द झाली. =))

दत्ता जोशी Sun, 09/27/2015 - 13:08
पण त्यासाठी अश्या रूढी कोणत्या याची सूची तयार झाली तर आपल्याला ठरवता येईल ना! किमान कोणत्या रूढी कशा समाजात आल्या आणि त्या का टाकावू आणि निरर्थक आहेत याचा विचार तरी होईल. बाय द वे, तुमच्या प्रमाणेच मी हि बळी प्रथा, बुवाबाजी इत्यादीच्या विरूद्धच आहे.

दत्ता जोशी Sun, 09/27/2015 - 13:18
विनोद म्हणून ठीक आहे पण तर्क किंवा निष्कर्ष असेल तर परत एकदा साफ चुकीचा. कारण मी बाय चोइस शुद्ध शाकाहारी आहे शिवाय मला स्वतःला अनेक मुसलमान मित्र आहेत. त्यांच्या घरी मी शिरकुर्मा खायला जातो कि. इतका काही ओर्थोडोक्स नाहीये हो मी. गेली १३ वर्षे मध्यापूर्व, आफ्रिका आणि युरोपात काम करतोय तेव्हा अनेक राष्ट्रीयत्वाचे आणि धर्माचे ( तसेच जातीचे) मित्र आहेत. त्यांच्या घरी जेव्हा जेवायला बोलावतात तर माझ्यासाठी खास शाक बनवले जाते. :-)

पहिला ते कुठले देऊळ आहे तिथे नवस पूरा करायला म्हणून पोरे मंदिराच्या छतावरुन खाली ताणलल्या चादरीत सोडतात तो मूर्खपणा बंद करायला हवा राव!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

श्रीगुरुजी Sun, 09/27/2015 - 13:31
ती प्रथा एका देवळात होती. तिथे मुलांना छतावरून सोडत नाहीत, पहिला मजल्यावरून खाली उभे असलेल्यांच्या चादरीत टाकतात. अर्थात छतावरून किंवा पहिल्या मजल्यावरून टाकणे हा पराकोटीचा मूर्खपणा असून अत्यंत क्रूरपणाचे लक्षण आहे. आता बहुतेक ती प्रथा बंद झाली असावी कारण मागील २-३ वर्षांपासून त्याबद्दल ऐकलेले/पाहिलेले नाही. बादवे, एका मशिदीतही तीच प्रथा होती. वृत्तवाहिन्यांवर देऊळ व मशीद अशा दोन्ही ठिकाणी हे पाहिलेले आहे.

दत्ता जोशी Sun, 09/27/2015 - 13:31
पण दोन्ही बाजू समजून घ्यायला आवडतील. म्हणजे हि प्रथा का बंद व्हावी आजपर्यंत किती अपघात घडले इ. इ. तसेच असे नवस का बोलले जातात, ते पूर्ण होतात का , लोकांचे अनुभव का आहेत, अशा नवसांनी झालेल्या तान्हुल्यांना असे निर्दयीपणे का फेकले जाते इ.

याॅर्कर Sun, 09/27/2015 - 16:03
त्यामुळे काय होईल, की सगळ्या ज्या रूढी,परंपरा आहेत त्या बंद होण्यास मदत होईल.'निराकार'(निर्गुण), 'एकेश्वरवाद' याबद्दल वेंदांमध्येही उल्लेख आहे.कारण 'साकार'(सगुण), परमेश्वराचे रूप आले कि विधी-विधान,अनुष्ठान,व्रत-वैकल्य हे सारे येणारच म्हणून हिंदूनी आता एकेश्वरवादाकडे वळले पाहिजे,त्यामुळे बर्यापैकी प्रश्न सुटतील जसे कि धर्मकार्यांमुळे होणारे प्रदूषण वगैरे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव,दुर्गा उत्सव,दहीहंडी,नवस करणे,आणि इतर बरेच या गोष्टींची आताच्या अधुनिक काळामध्ये काही गरज नाही असे वाटते. ---(मी हिंदूच आहे गैरसमज नसावा)

In reply to by याॅर्कर

श्रीगुरुजी Sun, 09/27/2015 - 19:18
देवाला निराकार, निर्गुण असे समजल्याने रूढी, परंपरा बंद होणार नाहीत. उलट नवीन रुढी, परंपरा निर्माण होतील. मुस्लिमांमध्ये देवाला निर्गुण, निराकार समजले गेले आहे. त्यामुळे त्यांच्यात मूर्तीपूजा नाही व देवाचे चित्र काढण्यास परवानगी नाही. मशिदीत कोठेही मूर्ती, तस्बीर, चित्र इ. नसते. तिथे सर्वजण मक्केच्या दिशेने तोंड करून प्रार्थना म्हणतात. तरीसुद्धा त्यांच्यात अनेक रूढी, परंपरा, उपासतापास, विधी इ. निर्माण झालेले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव, दुर्गा उत्सव, दहीहंडी इ. धार्मिक कमी आणि सामाजिक व सांस्कृतिक जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे ते सुरू राहणारच. फक्त त्यात शिरलेल्या उपद्रवी गोष्टी कमी करण्याची आवश्यकता आहे. नवस वगैरे आता फारसे कोणी करीत असेल असे वाटत नाही. जरी वैयक्तिक पातळीवर कोणी नवस केला तरी जोपर्यंत त्याचा समाजाला उपद्रव नाही तोपर्यंत त्याला आक्षेप घेता येणार नाही.

राजेश घासकडवी Sun, 09/27/2015 - 19:20
मोहन भागवतांच्या या विधानाचं मनापासून स्वागत. जर संघाने आपली शक्ती विघातक रूढी नष्ट करण्यासाठी पणाला लावली तर खरोखरच अनेक लोकांचं भलं होऊ शकेल. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करणं ही सरकारची जबाबदारी आहे. कायद्याने उघड होणाऱ्या अशा काही प्रकारांना थोडाफार आळा बसेल, पण समाजात जो बदल व्हायला हवा तो कायद्याने होत नाही. त्यासाठी संघासारखी ग्रासरूट्स पातळीवर काम करणारी संघटना प्रचंड प्रभावी ठरते. त्यांचं हे विधान संघाची भूमिका ठरो, आणि त्यातून काही सकारात्मक बदल दिसून येवो ही सदीच्छा.

याॅर्कर Mon, 09/28/2015 - 09:11
चीनमध्ये कोणताही धर्म न मानणारे सुमारे 52.2% लोक आहेत,म्हणजे बहुमतच झालं की? आणि अमेरिकेमध्ये 22.8% लोक कोणताही धर्म मानत नाहीत.म्हणूनच कि काय? हे दोन देश आज प्रगतीच्या शिखरावर आहेत.

In reply to by याॅर्कर

अर्धवटराव Tue, 09/29/2015 - 01:35
वाईड बॉलवर यॉर्कर पडला :) चीन आणि अमेरीकेची प्रगती तिथल्या धर्म न मानणार्‍या लोकांच्या संख्येमुळे झाली हे नवीनच लॉजीक कळलं =))

In reply to by अर्धवटराव

याॅर्कर Tue, 09/29/2015 - 10:32
धर्म न माननार्यांचे तर योगदान आहेच त्यांच्या प्रगतीमध्ये. शिवाय, धर्म माननारे देखील काम सोडून 'भिक्षाम देही' करत फिरत नाहीत. --(क्लीन Bowled मिडल stump)

दत्ता जोशी Mon, 09/28/2015 - 09:42
या निष्कर्षाचा पाया काय? प्रगतीचा मापदंड काय? पर कैपिटा/ दर डोई उत्पन्न का? चीन मध्ये गरिबी नाही म्हणून कोणी सांगितलं? मग युरोप,जपान विषयी काय म्हणावे बुवा? यु ए इ , सौदी, कुवेत, कतार या इस्लामिक स्टेट्स मध्ये पण प्रचंड सुबत्ता आहे. पर कैपिटा उत्पन्नाचा विचार केला तर आफ़्रिकेतिऎल बोट्स्वाना या छोटेखानी देशाचे पर डोई उत्पन्न चीनच्या बरोबरीचे आहे कि. याची सांगड धर्माशी काही काय घालता येईल बरं? आधार : http://data.worldbank.org/indicator/NY.GDP.PCAP.CD

विटेकर Mon, 09/28/2015 - 11:20
मिपावर अनेक दिवसांनी प्रतिक्रिया देत आहे, अगदी राहवत नाही म्हणून ! संघाचे नाव आले की मिपावरचे काही आय डी चवताळून उठतात हा आता नेहमीचा अनुभव झाला आहे, संघावर टिका करणार्‍या कोणीही संघ ना जवळून पाहिला ना स्वतः कधी अनुभव घेतला. कुणीतरी सांगितले म्हणून यांचा संघद्वेष! बरे, संघाचे काम पटत नाही म्हणून काही अन्य विधायक करतात का? ते ही नाही , तिथेही बोंबच , मिपासारखे व्यासपीथ उपलब्ध आहे म्हणून सतत विखारी ओकत राहायचे, मराथीत अशा वागण्याला क्रियानश्ट्पणा म्हणतात ! संघात कधीकाळी गेला आहे आणि त्याला त्यात प्रामाणिक सुधारणा व्हावी असे वाटते, त्याला हे पक्के माहीत आहे की तक्रार करण्याची ही जागाच नव्हे ! अशा न पटलेल्या मुद्द्यांसाठी संघात योग्य ते च्यानेल उपलब्ध आहे , तेव्हढा मोकळा संवाद तिथे करता येतो हा माझा गेल्या ३८ वर्षांचा अनुभव आहे. याचा दुसरा अर्थ असा की - ज्यांना टिका करायची आहे त्यांना फक्त टिका करायची आहे आणि त्यातून राळ उडवायची आहे , चालू द्या ! सरसंघचालकांचे हे विधान हीच संघाची भूमिका १९२५ पासून आहे , संघाच्या कोणत्याही कार्यक्रमात कसल्याही कर्मकांडाचे अवडंबर नसते, त्यामुळे कोणत्याही स्वंयसेवकाला त्यांच्या या विधानाचे अप्रूप वाटणारच नाही , हा संघाचा सहज भाव आहे , त्याचा अभिनिवेश देखील नाही ! १९२५ पासून संघ केवळ हिन्दूसमाज सुधारणेचेच काम करतो, यांत विशेष काहिही नाही. आणि संघ , संघ आणि समाज हे द्वैत मानतच नाही, संघ समाजापेक्शा वेगळा नाही , समाज संघापेक्षा वेगेळा नाही, त्यामुळे सरसंघचालक बोलताना समाजाचाच व्यापक संदर्भ घेतात. १९६५ साली विश्व हिन्दू परिषदेची स्थापना करताना द्वितीय सरसंघचालकांनी सर्व शंकराचार्य आणि धर्माचार्याच्या उपस्थितीत न हिन्दू पतितो भवेत | अशी घोषणा केली होती आणि संघाने तत्पूर्वीच ते आचरणातही आणले होते ! आज दुर्दैवाने मिडियाचे वलय संघाला प्राप्त झाले आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीची घटना होते, विरोधक चवताळतात , आणि मदार्‍याचा खेळ होतो. आपल्याकडेही ( मला अजूनही मिपा आपले वाटते , असेच चालू राहीले तर मी किती दिवस येत राहीन हाही प्रश्नच आहे , आणि अर्थात माझ्या जाण्याने इथे शष्प देखील फरक पडणार नाही हे ही मला माहीत आहे !) संघ / हिन्दु धर्म हा विषय निघाला की ब्याटमन, जिनियस मंडळीना चेव चढतो, दुर्दैवाने हे सारे हिन्दु=भारतीय आहेत, त्यांना परके तरी कसे म्हणू ? सावरकरांचा " सदगुण विकृती " हा शब्द इथे चपखल बसतो ! आमच्याच बाजूल गोल मारण्याची आमची जयचंदी अवसानघातकी वृत्ती आम्हाला आणखी किती वेळा रसातळाला नेणार आहे , हे तो सृष्टीकर्ताच जाणो ! हिन्दूंचा हिन्दूंचा जितका घात केला तितका आक्रमकांनी देखील केला नाही. यांना आपल्याच डोळ्यातील कुसळ मुसळाएवढे दिसते...! र्खरेच अशा ठिकाणी का यावे आणि वृथा व्यतित व्हावे ?

In reply to by विटेकर

नाखु Mon, 09/28/2015 - 11:38
लेखातील बहुअंशी बाबींशी सहमत पणः ब्याटमन ला विचारजंताचे यादीत बसविल्याबद्दल तीव्र निशेध आणि जोरदार आक्षेप. स्वगतः तुमको बॅट्या सम्झ्याच नही (जितके त्याच्याशी संवाद साधाल तितके तुम्हाला तो सम्जत जाईल) बॅट्या १/२५ सम्जला आहे तरीही अश्या समजुतीतही आनंद मिळविणारा नाखु.

In reply to by नाखु

अहाहा काय हा बंधुभाव ! स्वमतांध दांभिकतेच्या युगात असले निर्व्याज्य प्रेम पाहुन डोळे पाणावले की आमचे =)) ऐसी जिव्हाळ्याची जाती | करी लाभेविण प्रीती || अहाहा , सलाम नाखु सलाम ! __________________________________/\______________________________________

In reply to by विटेकर

पैसा Mon, 09/28/2015 - 16:13
( मला अजूनही मिपा आपले वाटते , असेच चालू राहीले तर मी किती दिवस येत राहीन हाही प्रश्नच आहे , आणि अर्थात माझ्या जाण्याने इथे शष्प देखील फरक पडणार नाही हे ही मला माहीत आहे !)र्खरेच अशा ठिकाणी का यावे आणि वृथा व्यतित व्हावे ?
एवढ्यापुरतेच बोलते. तसे काही लोक बोलतात, ती मिपाची अधिकृत भूमिका आहे का? नाही. कोणाला काय वाटते ते बोलतात. त्यात आक्षेपार्ह म्हणजे बदनामीकारक, असभ्य काही असेल तर त्यावर कारवाई केली जाते. जर संपादकांनी पाहिले नाही तर कोणीही सदस्य लक्षात आणून देऊ शकतो. पण मिपा या अशा बोलण्याहून खूप काही आहे. केवळ तेवढ्यासाठी, २/४ लोकांच्या बोलण्यावरून इथून निघून जाणे हे काही मला पटत नाही. तुम्ही असे निघून गेलात की मग इथे फक्त एका बाजूने लिहिणारे शिल्लक राहतील. ते तुम्हाला आवडेल का? बरे दुसर्‍या बाजूने बोलणारे तुम्ही चूक होतात म्हणून पळून गेलात असे ओरडतील, तेही तुम्हाला आवडेल का? त्यापेक्षा श्रीगुरुजी असे काही असेल तर ती लिहायला चांगली संधी आहे असे समजून लिहितात. ते मला आवडते. वाद प्रतिवाद तर होणारच!

In reply to by पैसा

वाद प्रतिवाद तर होणारच!
एवढ्यापुरतेच विचारतो काही व्यक्ती जाणीवपुर्वक दुसर्‍यांच्या धार्मिक भावना दुखावणारे लेखन करीत असतात आणि सतत त्या धर्माचा चेष्टेत उलेख करीत असतात (ह्या धाग्यावरही केलेला आहेच पहा ), आणि अशा व्यक्तींचा प्रतिवाद कसा करायचा ? ह्यावर मार्गदर्शन अपेक्षित आहे . कारण सदर व्यक्ती ज्या गटातील आहेत त्या गटातील अतिअत्यल्प लोकंच असे विचित्र वागतात म्हणुन त्या गटावर टीका टिप्पण्णी करणे योग्य नाही आणि जर समजा त्या व्यक्तीवर टिप्पण्णी केली तर सदर व्यक्ती " व्यक्तिगत आरोप केले " असे रडगाणे गात संपादक मंडळामागे लपते आणी धागे / प्रतिक्रिया संपादित करुन घेते असा अनुभव आहे . प्रश्न असा की अशा व्यक्तींचा प्रतिवाद कसा करायचा ?

In reply to by प्रसाद गोडबोले

पैसा Mon, 09/28/2015 - 18:53
सगळे मिपाकर तेवढे हुशार आहेतच! काहीही लिहिताना ते मिपाच्या धोरणाच्या चौकटीत असले की झाले. कोणी कोणाच्या मागे लपण्याचा प्रश्नच नाही. वैयक्तिक शेरे कोणत्याही परिस्थितीत मुख्य बोर्डावर राहणार नाहीत. एखादा चुकून राहिला तर जरूर सं मं ला कळवा.

In reply to by पैसा

वैयक्तिक शेरे कोणत्याही परिस्थितीत मुख्य बोर्डावर राहणार नाहीत. एखादा चुकून राहिला तर जरूर सं मं ला कळवा.
असे असेल तर मग सदर व्यक्तीने सनातन धर्माची सतत उडवलेली टर मुख्यबोर्डावर का रहाते ? "धार्मिक शेरेबाजी चालेल पण वैयक्तिक शेरेबाजी चालणार नाही" असे काही धोरण आहे का ? असे असल्यास सदर व्यक्तीचा प्रतिवाद करावा तरी कसा ??? - ( अत्यंत विनम्रपणे आणि तितक्याच गांभीर्याने प्रश्न विचारत आहे )

In reply to by प्रसाद गोडबोले

पैसा Mon, 09/28/2015 - 22:22
दुसऱ्याची भाषा पटली नाही तर सं.मं. कडे तक्रार करा. तुम्ही कधी कोणाविरुद्ध अशी असभ्य भाषेबद्दल तक्रार केली होती का?

In reply to by पैसा

ओके। सनातन वैदिक धर्माचा उल्लेख सतत टनाटन ऐसा करणे ( तेहि उपनिषदोक्त धर्माचा काडी मात्र अभ्यास नसताना ) हे आक्षेपार्ह आहे । आता संपादक मंडलाकडे तकरार करुन पहातो काही कार्रवाई होते का ते । धन्यवाद

In reply to by प्रसाद गोडबोले

बाळ सप्रे Tue, 09/29/2015 - 10:57
प्रगो, एखाद्या विचारसरणीवर टीका ही इथे होणारच.. काही लोकांना असे शब्दप्रयोग करुन लिहीण्याची सवय असते. टनातन या शब्दाप्रमाणे सिक्युलर, निधर्मांध, विचारजंत, आपटार्ड, प्रेस्टीटयुट, मोदीभक्त, संघिष्ट, खांग्रेसी असे अनेक शब्द अनेकांच्या विचारसरणीवर टीका करण्यास वापरले जातात. यापुढे जाउन अनेक लोक इतरांच्या आयडींवर देखिल असे विकृत संस्कार करतात (जे एकवेळ वैयक्तिक टीकेत येउ शकेल) आपल्याला पटणार्‍या विचारसरणीवर होणार्‍या टीकेमुळे जर भावना दुखावु लागल्या तर इथे काहीच वादविवाद होउ शकणार नाहीत. कारण गवि, विकास वगैरेंसारखे संतुलित लि़खाण सगळ्यांना जमेलच असे नाही. किंबहुना जमणारच नाही कारण ते फार मोठे कौशल्य आहे. पण हे कौशल्य नसूनही एखाद्याकडे काही चांगले मुद्दे असू शकतात. त्यामुळे लिखाण अथवा प्रतिसादातील आपल्याला जे चांगले वाटते ते घेणे व इतर गोष्टींकडे कानाडोळा करणे हेच इष्ट.

In reply to by बाळ सप्रे

टनातन या शब्दाप्रमाणे सिक्युलर, निधर्मांध, विचारजंत, आपटार्ड, प्रेस्टीटयुट, मोदीभक्त, संघिष्ट, खांग्रेसी असे अनेक शब्द अनेकांच्या विचारसरणीवर टीका करण्यास वापरले जातात.
सारे शब्द नीट वाचले मात्र ह्यातील अन्य कोणता शब्द धार्मिक भावना दुखावणारा आहे हे कळाले नाही . केवळ सनातन धर्माची टिंगल उडवली जाते अन्य धर्माविषयी असे काही बोलण्याचा , धर्माची नामविकृती करण्याचा कोणा धर्मसुधारकाच्या त दम नाही ...
त्यामुळे लिखाण अथवा प्रतिसादातील आपल्याला जे चांगले वाटते ते घेणे व इतर गोष्टींकडे कानाडोळा करणे हेच इष्ट.
हा मुद्दा पटलेला आहे :)

In reply to by प्रसाद गोडबोले

बाळ सप्रे Tue, 09/29/2015 - 15:46
भावनेला केवळ धार्मिकता ही एकच मिती असते का? (खास करुन दुखावणार्‍या) इतर शब्दात अन्य विचारसरणींबद्दल निंद्य्/तुच्छ/हीन भाव आहेत असे वाटत नाही का?

In reply to by बाळ सप्रे

भावनेला केवळ धार्मिकता ही एकच मिती असते का?
नाही... तसे नाही . पण धार्मिकतेची मिती ही व्यक्तिमत्वाच्या मीती इतकीच श्ट्राँग असते . जर व्यक्तिगत टिप्पण्णी खपवुन घेतली जात नसेल तर धार्मिक टिप्पण्णी तरी का बरे खपवुन घेतली जावी ? इतकाच माक्झा प्रश्न होता . आणि मुळ प्रश्न रहातोच की समजा एक व्यक्ती समस्त धर्मावर टीका करत असेल तर त्याचा प्रतिवाद कसा करायचा ? म्हणजे कोणी सतत हिंदु धर्माची हेटाळणी करत असेल तर त्याला उत्तर कसे द्यायचे ? कारण सदर व्यक्तीला उत्तर दिले की ती व्यक्तिगत टिप्पण्णी ठरणार अन सदर व्यक्ती संपादकंकडे जाऊन मुळूमुळू रडणार अन प्रतिक्रिया संपादित करुन घेणार ! मग उत्तर द्यायचे तरी कसे ???

In reply to by प्रसाद गोडबोले

बाळ सप्रे Wed, 09/30/2015 - 10:27
पण धार्मिकतेची मिती ही व्यक्तिमत्वाच्या मीती इतकीच श्ट्राँग असते
ते तुमच्या बाबतीत.. अथवा बहुसंख्यांच्या बाबतीतही असेल. पण सरसकट सगळ्यांना लागू करणे शक्य नाही. काहींच्या दृष्टीने धर्म, काहींच्या दृष्टीने जात, काहींच्या दृष्टीने देश, काहींच्या दृष्टीने भाषा, काहींच्या दृष्टीने राज्य, काहींच्या दृष्टीने शहर, काहींच्या दृष्टीने व्यवसाय, काहींच्या दृष्टीने कला हीच आपली ओळख इतकी घट्ट बांधिलकी असते. कशाकशावरची टीका व्यक्तिगत मानणार?? त्यामुळे इतक्या diverse लोकसमूहात या सगळ्या अट्रीब्युट्सना वैयक्तिक ठरवणे कठीण आहे.बाकी काय वैयक्तिक नि काय नाही यबद्दल मिपाचे धोरण आहेच. आणि सं मं त्या धोरणानुसार निर्णय घ्यायला सक्षम आहेच.. एखादी व्यक्ती सतत समस्त धर्मावर टीका करत असेल आणि तुम्ही त्यातील मुद्द्याचा प्रतिवाद केल्यास मला नाही वाटत संपादक त्यांच्या मुळूमूळू रडण्याला भीक घालून तुमची प्रतिक्रीया संपादीत करेल. मात्र आपण मुद्द्याचाच प्रतिवाद करण्याकडे लक्ष देणे महत्वाचे.

याॅर्कर Mon, 09/28/2015 - 11:33
धर्माच्या ,संस्कृतीच्या, रूढी पंरंपरेच्या नावाखाली आपणच स्वतःला त्रास करून घेतोय आणि दुसर्यांनाही त्रास देतोय.आपल्याला न पटणार्या आपल्याच धर्मातील चालिरीती,परंपरा बंद झाल्या पाहिजेत,नुसता टाईमपास आहे सगळा,बाकी काय? - वटसावित्री(तथ्य काय ?) -सत्यनारायण(नाही केला तर?) -वारी(एकाच दिवशी लाखो लोकांनी जमून तिथे सगळी अस्वच्छता का करायची?) -दहीहंडी(ट्रॅफिकची कोंडी आणि स्तःची हाडे मोडून घेणे दुसरं काय?) -सार्वजनिक गणेशोत्सव(ध्वनी प्रदूषण करून आणि दारू पिऊन धिंगाणा घालणे,तसेच दोन मंडळातील खुन्नस ही आलीच.काही चांगली मंडळे अपवाद असू शकतात.) -जत्रा/यात्रा(काही देवतांना म्हणे मांसाहाराच्या नैवेद्याचा मान लागतो) -शिमगा(उगाचच बोंब मारायची?) आणि इतर बरेच काही. हे सगळ नाही केलं तर काय होणार आहे? मोगलांनी,पोर्तुगीजांनी,इंग्रजांनी,डच,फ्रेंच यांनी आपल्याला इकडे येऊन बदडले, तरी आणि तेच सगळं.अजून शहाणपण आलेले नाही? मुलांच्या भविष्याचा विचार न करता मुलं जन्मास घालणारे हे आपले लोक काय झेंडा लावणार आहेत?(काही अपवाद) म्हणून धर्मातून चांगली शिकवण घेतली पाहिजे,चांगल्याही बर्याच गोष्टी आहेत धर्मात. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद !जय महाराष्ट्र!!

In reply to by याॅर्कर

यॉर्करा, धर्म ही अफुची गोळी आहे असे तो कार्ल मार्क्स म्हणायचा ते उगीच नाही.वटसावित्री,सत्यनारायण न करून काही होणार नाही पण मग काही लोक करत असतील तर काय बिघडणार आहे?दही हंडी,सार्वजनिक गणेशोत्सव ह्या उत्सवांचे प्रमाण महाराष्ट्रातच जास्त आहे.तेव्हा त्यावर मर्यादा हवी. दुसर्यास अपद्रव होणार नसेल तर उत्सव्,व्रतवैकल्ये जरूर करावीत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी 13 सप्टेंबर 2015 ला जयपुर येथील एका परिसंवादामध्ये अतिशय महत्वाचे विधान केले. ते म्हणाले की 'हिंदुनी शास्त्रीय पाया नसलेल्या संकल्पना सोडून दिल्या पाहिजेत'. 'हिंदूंनी इतिहासातही जुनाट, अशास्त्रीय आचरणांचा त्याग केला असून जगाकडून नव्या गोष्टी शिकल्या आणि स्वीकारल्या आहेत' असे ही ते म्हणाले.