मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुलवामा : काही प्रश्न

गामा पैलवान ·

या हल्ल्यामुळे सर्व सुरक्षासंस्था (सैनिकी, निमसैनिकी आणि मुलकी) चिडलेल्या असणारच. मात्र, कोणतीही सक्षम आणि विकसित व्यक्ती अथवा संस्थेची प्रतिक्रिया चिडीची व प्रतिक्षिप्त (नी जर्क) नसते. ते काम पूर्ण विचारांती आणि आपण ठरवलेल्या वेळ, स्थळ आणि पद्धतिने करायचे असते... तसे केले तरच स्वतचे शून्य/कमीत कमी नुकसान व शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान/बिमोड करणे शक्य असते. डोके गरम करून केलेली कृती स्वतःचेच जास्त नुकसान करते. पंतप्रधानांनी, त्यासंबंधी आज आणि अगोदरही अनेक संकेत दिलेले आहेतच. तेव्हा, शत्रूची आणि स्वतःची कशी परिस्थिती आहे हे माहीत नसता, उगा तर्क/वितर्क न करता थोडीशी कळ सोसणे आणि नंतर घडलेली सत्य परिस्थिती पाहणे हेच उचीत ठरेल. केवळ, "माझ्या मते काय कृती करावी" असा अपुर्‍या माहीतीवर आधारलेली (uninformed) मागणी/विधान करायचे असले तर, ठीक आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@ गामा पैलवान तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणे सुरू झाले आहे... मात्र, ही फक्त चांचणी परिक्षा आहे. ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यामधले दोन गर्भित संदेश जाणून घेण्याजोगे आहेत... १. उध्वस्त केलेल्या ३ अतिरेकी कँप्सपैकी एक बालाकोट येथिल कँप पाकिस्तानी भूमीवर (पाकव्याप्त काश्मीरमध्ये नाही) आहे (म्हणजे होता, आता १००० किलो वजनांच्या लेझर गायडेड बाँब्जनी नष्ट झाला आहे). ३. एकूण सुमारे २४५ अतिरेकी मारले गेले आहेत. त्यांत, कंदाहार विमान अपहरणात सामील असलेला, मसूद अझरचा जवळचा नातेवाईक मारला गेला आहे. ३. इतकी मोठी सैनिकी कारवाई झाली असूनही पंतप्रधानांनी त्यांचा आजचा एकही कार्यक्रम बदलला नाही. यामधील, त्यांची राजस्थानात चुरू येथे असलेली सार्वजनिक राककिय सभा सुरू झाली आहे. हा पाकिस्तानला, "तू चिलट आहेस. तुला भारत सहज चिरडू शकतो. आजची कारवाई आमच्यासाठी फार साधी आहे.", असा संदेश आहे.

दिगोचि Sat, 02/16/2019 - 05:26
प्रथम म्रुत जवानाना श्रद्धान्जली. सरकार त्यान्च्या कुटुम्बियान्ची उत्तम सोय करेलच ही खात्री आहे. या हल्ल्यात वापरलेली ३५० किलोग्राम स्फोटके काश्मिरात कोठून व कशी आली किसाठवली होतीम्वा येऊ शकली याचा शोध करणे जरूर आहे. तसेच ती आल्यावर कोठे साठवली होती. तसेच इन्टरनेटवरून कोणाशी सम्बन्ध होते हे पण जाणणे जरूर आहे. पाकीस्तानवर हल्ला करायचा असेल तर तो पूर्ण विचार करून करावा. असा हल्ला केला तर त्यासाठी पाकिस्तान तयार असेल व त्यात अनेक सैनिक शहिद होतिल त्याचा परिणाम सरकारवर पर्यायाने मोदीवर म्हणजे होणार्या निवडणुकीवर होईल. सध्या तरी पाकिस्तानवर इतर राष्ट्राकडुन दडपण आणणे, पाकिस्तानी नागरीकाना व्हिसा देणे बन्द करणे वगैरे उपाय करावे.

Rajesh188 Sat, 02/16/2019 - 08:27
निमलष्करी दल आसेल किंवा लष्करी दल आसेल जेव्हा ऐका जागेवरून दुसऱ्या जागेकडे पाठवले जाते तेव्हा त्याचे नक्कीच काहीतरी नियम आसतात .त्यात काश्मीर हा सवेदनशिल भाग आहे म्हणजे तिथे अजून कडकं नियम असणार.पण हयात ज्या मार्गे फोर्स प्रवास करणार आस्ते तो रस्ता सुरक्षित आहे का ह्याची तपासणी केली जाते तशी आता पण केली असणार . ज्या हायवे ज्या चेक पोष्ट होत्या त्या काही कारणाने local सरकारनी हटवल्या होत्या आस मी वाचलं आहे . आणि आपल्याकडे संसाधन ची कमी असल्या मुळे रस्ता खराब जरी आसेल तरी हवाई मार्गे सैन्य पाठवायला मर्यादा आहे . आता ह्या हल्ल्या नंतर जी कारवाई होईल ती गुप्त असणार आणि आसली पाहिजे .आणि हा विषय राजकारणासाठी कोणीच वापरू नये ह्या मध्येच देश हित आहे

In reply to by Rajesh188

ज्या हायवे ज्या चेक पोष्ट होत्या त्या काही कारणाने local सरकारनी हटवल्या होत्या आस मी वाचलं आहे . हे मुख्य दुखणे आहे, जे हितसंबंधी माध्यमे जनतेसमोर आणत नाही. काही काळापूर्वी, जम्मू-कश्मिरमध्ये, बॅरिकेड उभारण्यासाठी कडक नियमावली होती. त्या वेळेस स्वतःला महत्वाचा समजणारी एक व्यक्ती (आता नाव आठवत नाही) बॅरिकेडवर थांबणे म्हणजे अपमान समजली आणि तिने दोन बॅरीकेड्सना धडक देऊन गाडी पुढे काढली. तिसर्‍या बॅरिकेडला तो धडक मारत असताना तेथे असलेल्या सुरक्षासैनिकाने, अर्थातच, त्याच्यावर गोळीबार केला. त्यात ती व्यक्ती मरण पावली. या घटनेवर, त्याकाळी मुख्यमंत्री असलेल्या मेहबुबा मुफ्ती आणि (अर्थातच) मानवतेच्या तथाकथित पाठीराख्यांनी, गदारोळ केला. त्या सुरक्षासैनिकावर खटला भरला गेला आणि त्याला शिक्षा होऊन तो आता (बहुदा तिहार) तुरुंगात खितपत पडला आहे. त्यानंतर, Confidence building च्या नावाखाली सुरक्षादलांच्या बॅरिकेड्स उभारण्याच्या कृतीवर लक्षणीय बंधणे घालण्यात आली. इतर कारणांबरोबरच या कारणामुळे, पुलवामा येथे, अतिरेक्याला कॉन्व्हॉयच्या जवळ जाणे शक्य झाले. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता बॅरिकेड्सचे नियम परत कडक केले जात आहेत, अश्या बातम्या आहेत.

In reply to by अर्वाच्य

Blackcat Tue, 02/19/2019 - 20:09
https://www.indiatoday.in/fact-check/story/fact-check-viral-claim-that-mehbooba-sent-army-jawans-to-tihar-is-false-1459230-2019-02-18 Fact Check: Viral claim that Mehbooba sent Army jawans to Tihar is false BJP leader Subramanian Swami also claimed that the "army jawans were prosecuted and are still in jail". घटना झाली , केस झाली , गोळी घालणार्याला तिहारला नेलेदेखील , रेशीमरेघी मंद लोक खोट्या बातम्या लिहितात की जावेद अख्तरच्या सिनेमाची स्टोरी !!! तीन तासात स्टोरी खल्लास!! अजून एका बातमीत , न थांबणार्या जीपवर सुरक्षाकर्मिने टायरवर गोळी झाडली , पण त्यात काही आक्षेपार्ह मिळाले नसल्याचे दिले आहे,

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

राजाभाऊ Wed, 02/20/2019 - 06:38
काळीमाऊ, तुम्ही दिलेल्या लेखातलाच हा परिच्छेद - >>We reached out to Gen. Bakshi about the claims that he made during the TV show. He admitted that he was wrong about his claim regarding the armymen languishing in jail. However, he insisted that the PDP government was responsible for relaxing the security checking procedures in the Valley which were earlier being followed. व्हेन यु अँड दि सो कॉल्ड प्रेस्टिट्युट्स आर गोइंग टु अ‍ॅडमिट/नोटिस एलिफंट इन दि रूम? इथे महत्वाचं काय आहे - जवानाला झालेली (किंवा न झालेली) शिक्षा कि सिक्युरिटी लॅप्समुळे घडलेली दुर्घटना? सेना दलांच्या बाबतीत तरी हा चूक/तो चूक या पक्षिय राजकारणांतुन वर उठण्याचा प्रयत्न करा...

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अर्वाच्य Wed, 02/20/2019 - 12:51
https://goo.gl/uP1CcQ दिलेलि लिन्क शन्तपने शेवटपर्यंत वाचा. आपले महामहिम ह्याच घटनेसाठी स्वतः श्रेय घेतांना दिसतील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

शब्दबम्बाळ Wed, 02/20/2019 - 13:50
मोदी सरकार पुलवामाच्या घटनेला कसे जबाबदार नाही हे दाखवण्याचा समर्थकांचा/भक्तांचा आटापिटा बघून कीव येते बिचाऱ्याची! आधी कुठलीही योजना मनासारखी झाली नाही कि काँग्रेस वरती ढाकळायचं धोरण होत आता हा हल्ला होऊन इतके जवान शहीद झाले तरी याना आपली कातडी वाचवायचं पडलं आहे फक्त! आणि इतर वेळी आम्ही कोणाचे झेंडे घेऊन फिरत नाही म्हणणारे मिपाचे विद्वान लोक हळूच "फेक न्यूज" ढकलवतात. परत कोणी सांगितलं हे खोट आहे कि म्हणता येतं कि "लोकांनी हे पाहून त्याची समीक्षा वगैरे करावी या उद्देशाने इथे दिले होते वगैरे!" आधी पोस्टकार्ड साईझ यायच्या आता साईझ मोठा आहे. वरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली घटना मुफ्तीच्या CM काळात झालीच नाहीए! जवानांना अटकसुद्धा झालीच नाहीये! त्यात कहर म्हणजे 2014च्या घटनेनंतर स्वतः जेटली यांनी ट्विट करून त्या घटनेचा दुःख व्यक्त करत कारवाईची हमी दिलेली होती. जेटली बीजेपीचे कि आणखी कोणाचे?? त्यावर कहर म्हणजे प्रधानसेवक "मला सेवा करायची संधी द्या" सांगायला जेव्हा 2014ला श्रीनगरला गेलेले तेव्हा मोठ्या तावात (जो की नेहमीच असतो म्हणा) "गेल्या ३०वर्षात कधी असे झाले नव्हते पण केवळ मी आल्यावर सेनेने जाहीर माफी मागितली आहे आणि ज्यांनी गोळ्या चालवल्या त्यांच्यावर केसेस दाखल केल्या गेल्या आहेत. हे फक्त माझ्या सरकारमुळे होऊ शकल आहे" असे स्पष्ट म्हणताना दिसतात. मग आता अचानक यु टर्न कसा घेतला बरे? आणि घटनेचं राजकारण करू नका म्हणायचं आणि बीजेपीचे अध्यक्ष म्हणतात "आमच्या पार्टीचं सरकार आहे काँग्रेसचं नाहीये म्हणून कारवाई होणार दोषी लोकांवर"

In reply to by शब्दबम्बाळ

विनोद१८ Sat, 02/23/2019 - 00:28
'वरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली घटना मुफ्तीच्या CM काळात झालीच नाहीए! जवानांना अटकसुद्धा झालीच नाहीये! त्यात कहर म्हणजे 2014च्या घटनेनंतर स्वतः जेटली यांनी ट्विट करून त्या घटनेचा दुःख व्यक्त करत कारवाईची हमी दिलेली होती. जेटली बीजेपीचे कि आणखी कोणाचे?? त्यावर कहर म्हणजे प्रधानसेवक "मला सेवा करायची संधी द्या" सांगायला जेव्हा 2014ला श्रीनगरला गेलेले तेव्हा मोठ्या तावात (जो की नेहमीच असतो म्हणा ) "गेल्या ३०वर्षात कधी असे झाले नव्हते पण केवळ मी आल्यावर सेनेने जाहीर माफी मागितली आहे आणि ज्यांनी गोळ्या चालवल्या त्यांच्यावर केसेस दाखल केल्या गेल्या आहेत. हे फक्त माझ्या सरकारमुळे होऊ शकल आहे" असे स्पष्ट म्हणताना दिसतात. मग आता अचानक यु टर्न कसा घेतला बरे?' वरच्या तीनही विधानां संबंधी पुरावे दिलेत तर मिपाकरांच्या ज्ञानात भर पडेल. जो प्रश्न गेल्या ७० वर्षापुर्वी निर्माण केला गेला आणि आजपर्यन्त सुटला नाही तो चुटकी सरशी सोडविण्याचा काही उपाय तुमच्याकडे आहे का ?? पुलवामाच्या घटनेची जबाबदारी सरकारने झिडकारली असे का वाटते ?? काय गेल्या ७० वर्षात यापेक्षा भयानक घटना / घातपात देशात झालेच नाहीत का ?? किती माणसे आणि सैनिक या काश्मीरसाठी देशाने गमाविलेत याची मोज्दाद केलीत काय कधी ?? आधी कुठलीही योजना मनासारखी झाली नाही कि काँग्रेस वरती ढाकळायचं धोरण होत आता हा हल्ला होऊन इतके जवान शहीद झाले तरी याना आपली कातडी वाचवायचं पडलं आहे फक्त! कुठे कोणी आणि कशी आपली कातडी वाचविलेली दिसली या प्रकरणी ?? जरा विस्ताराने लिहिलेत तर त्याला काही अर्थ आहे. मुळात ह्या काश्मीर प्रश्ण निर्माण कोणी केला, त्यावर आपले राजकारण कोणी केले हे कसे विसरता येइल.

गेल्या महिन्याभरापासून सी.आर.पी.एफ.वर अधून मधून हल्ले होतच होते. दुर्दैवाने लष्कर प्रमुखांनी "आम्ही कोणत्याही हल्ल्यास तोंड देण्यास तयार आहोत" असे एका प्रश्नाला उत्तर दिले होते. १ फेब्रुवारी- अनंतनाग येथे हल्ला (https://www.tribuneindia.com/news/jammu-kashmir/two-crpf-men-among-8-hurt-in-anantnag-grenade-attack/721944.html ) १८ जानेवारी ला श्रीनगरच्या लाल्चौकात हल्ला https://economictimes.indiatimes.com/news/defence/srinagar-militants-lob-grenade-near-crpf-bunker-in-lal-chowk/videoshow/67587830.cms ११ फेब्रुवारीला ग्रेनेड हल्ला - http://risingkashmir.com/news/4-cops-3-crpf-men-among-11-injured-in-palladium-grenade-blast-343653.html

In reply to by चौकटराजा

तेजस आठवले Wed, 02/20/2019 - 14:59
ह्या बातमीची लिंक मिळेल का? खरंच ते असं म्हणाले ? कठीण आहे. एवढेच काय, उद्या औरंगजेब, अफझलखान आणि गझनीचा मेहमूद ही टोपणनामे घेऊन अनुक्रमे जोशी, बापट आणि गोडबोले ह्यांनी भारतीय जनतेवर अनन्वित अत्याचार केले असे सुद्धा हे ब्रिगेडी लोक ठोकून देतील.

गामा पैलवान Tue, 02/19/2019 - 00:30
लोकहो, पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान व सैन्य जे करायला पाहिजे ते करेलंच. पण एक सामान्य माणूस म्हणून आपण काय करू शकतो, असा प्रश्न पडणं साहजिकंच आहे. माझ्या मते आपण घटनेतलं ३७० कलम रद्द करायचा आग्रह धरू शकतो. बऱ्याच गोष्टी सुरळीत होतील. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

भारतातले राजकीय नेत्रुत्व/यंत्रणा जेव्हा जेव्हा अपयशी ठरते तेव्हा "तुम्ही काय केले देशासाठी?" हा प्रश्न सामान्य मतदारांना नेहमी विचारण्यात येतो. " देश की सेना तो काम कर रही है. लेकिन आपने क्या किया देश के लिये?" इंदिरा गांधीनी दोन-तीन वेळा भाषणात विचारल्याचे स्मरते. असो. १)डिसेंबर पासून हल्ले होत असतना आपली गुप्तचर यंत्रणा गप्प राहिली.. वा अपयशी ठरली. यंत्रणेच्या प्रमुखाने/गृहखात्याने हे सांगायला हवे की नको? २) बी.एस.एफ./सी.आर.पी.एफ. ने डिसेंबरमध्ये मोठ्या संख्येने बसेसने नेण्यास विरोध केला होता. हॅलिकॉप्टरची मागणी केली होती. ती अमान्य झाली. काल सर्वपक्षीय बैठक झाली. ह्यात सर्वानी 'पलिकडून' दहश्तवाद्यांना मिळणार्या मदतीबद्दल धिक्कार केला. ह्या ठरावात "पाकिस्तान' हा उल्लेखही नाही. ! एवढे पोलिटिकली सेफ का? असो. चीन्/सौदी अरेबियाचे काय करायचे? चीन हफीझ सईदला दहशतवादी मानायला तयार नाही. आणी पाकिस्तान हे सर्व धंदे करतो हे माहित असूनही सौदीचे राजपुत्र काल पाकिस्तान भेटीवर गेले व प्रचंड आर्थिक मदतही जाहीर केली. सौदी-पाक मैत्री जुनी आहे. आज ते भारतात येत आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विशुमित Tue, 02/19/2019 - 10:41
असले अडचणीचे प्रश्न विचारयचे नसतात ग माई. घरचा मामला आहे. जनतेने फक्त मेणबत्या पेटवायच्या, जवानांच्या कुटुंबीयांना पेटीएम द्वारे दान करायचे ( खरंच चक्क एकजण असेच म्हटला "दान करायचे,"), ठरल्याप्रमाणे मुस्लिम, कश्मिरी तरूण आणि पाकिस्तानवर बिल फाडायचं. असो..

In reply to by विशुमित

इरसाल Tue, 02/19/2019 - 16:17
ठरल्याप्रमाणे मुस्लिम, कश्मिरी तरूण आणि पाकिस्तानवर बिल फाडायचं. असो.. यातुन ह्या लोकांनी काही केलेले नाही असा अर्थ निघतोय. आणी तुम्ही असं लिहीताय म्हणजे हे कोणी केलय याबाबत तुम्हाला माहिती असावी अस दिसतय. कॄपया सरकारला योग्य ती माहिती पुरवुन गुन्हेगारांना शासन होण्यास मदत करावी ही नम्र विनंती.

In reply to by विशुमित

डँबिस००७ Tue, 02/19/2019 - 23:00
असले अडचणीचे प्रश्न विचारयचे नसतात ग माई. घरचा मामला आहे. सर्व दलीय बैठकीत पाकिस्तानचा उ ल्लेख टाळणे म्हणजे अडचणीचे प्रश्न असतील तर चक्क काँग्रेसच्या उच्च पदस्थांनी बोललेले कोणाला सांगणार ? उदा, ओसामाजी लादेन जी, ( दिग्विजय सींग ) किंवा अफजल गुरुजी ( रणदीप सुरझेवाला) हा तर फक्त कॉग्रेसच्याच घरचा मामला होता.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुबोध खरे Tue, 02/19/2019 - 20:03
१)डिसेंबर पासून हल्ले होत असतना आपली गुप्तचर यंत्रणा गप्प राहिली.. वा अपयशी ठरली. यंत्रणेच्या प्रमुखाने/गृहखात्याने हे सांगायला हवे की नको? पुलवामा मध्ये यापूर्वी म्हणजे २०१८ मध्येच तीन वेळेस चकमकी झाल्या (३० एप्रिल, २९ जून आणि १५ डिसेम्बर) या गुप्तहेर खात्याच्या बातम्यांमुळेच झाल्या ना? कि लष्कर घराघरात शिरून रोज तपासणी करीत होते? १०० धागे दोरे मिळतात त्या सर्वांवर कार्यवाही होत असते पण प्रत्यक्ष एखादाच धागा ठोस पुराव्या सोबत असतो. एक लक्षात ठेवा जेन्व्हा एक हल्ला होतो तेंव्हा त्याच्या मागे कमीत कमी १०० हल्ले निकामी केलेले असतात. खबरी मिळवणे त्याचे विश्लेषण करणे आणि त्यातून सज्जड अशी माहिती तयार करणे हे काय आपोआप होणारे काम आहे का? शेंडा ना बुडखा पण कळफलक बडवायचा २) बी.एस.एफ./सी.आर.पी.एफ. ने डिसेंबरमध्ये मोठ्या संख्येने बसेसने नेण्यास विरोध केला होता. हॅलिकॉप्टरची मागणी केली होती. ती अमान्य झाली. २५०० सैनिकांना जम्मू वरून श्रीनगरला हेलिकॉप्टरने न्यायचे या साठी हेलिकॉप्टरच्या किती फेऱ्या लागतील याची कल्पना आहे का? साधारण माणशी २० रुपये/ किमी या दराने २०० किमी (कावळा उडतो तसे) ४००० रुपये माणशी लागतील म्हणजे १ कोटी रुपये नुसते इंधनावर लागतील. हे सुद्धा सरळ उडायचे असेल तर उंची गाठायची असेल तर हे गणित बदलते. जम्मू समुद्रसपाटीच्या ३५० मीटर वर आहे आणि श्रीनगर १५८५ या उंचीवर चढवण्यासाठी इंधन दुप्पट खर्च होते. बाकी हेलिकॉप्टरच्या ५०० तासांची किंमत त्याच्या पायलटचा पगार अलाहिदा. त्यांना हेलिकॉप्टरने नेण्यासाठी परवानगी कुणी द्यायची (अशी परवानगी मंत्रालयातून मिळण्यास तीन ते चार महिने सहज लागतील). संरक्षण मंत्रालयातील बाबूंनी आणि कॅगने लेखा हरकत (AUDIT OBJECTION) घेतले तर ते पैसे कुणी भरायचे? सैनिकांच्या पगारातून वसूल करायचे? कि अधिकाऱ्यांच्या? आणि एकदा असे केले कि "वहिवाट" होण्याची भीती असते ती गोष्ट वेगळी. कोणतरी बुणगा काही तरी बलतो आणि ते लोक पुढे ढकलतात. उचलली बोटे आणि लावली कळफलकाला अशी स्थिती आहे आज जो उठतो तो बेफाट आरोप करतोय

In reply to by सुबोध खरे

Blackcat Tue, 02/19/2019 - 20:18
साध्या निमलष्करी जवानांना विमान अन हेलिकॉप्टर द्यायला ते का मंत्री आहेत ? निम लस्क्री लोकांचे पगार 2012 नन्तर वाढलेले नाहीत ( आमचेही नाहीत , कॉन्ट्रॅक्टवाल्यांचे पगार 2012 ला काँग्रेस काळात वाढले होते , नन्तर काही नाही. ) आजवर हल्ल्यात जितके मेले , त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केल्यात म्हणे. https://youtu.be/IuhtlAq3yNY

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Tue, 02/19/2019 - 23:04
निम लस्क्री लोकांचे पगार 2012 नन्तर वाढलेले नाहीत २०१२ नंतर डायरेक्ट २०१४ सुरु होत हे नविनच कळल !! २०१२ ते २०१४ पर्यंत ते तुमचे भ्रष्ट सरकार काय करत होते म्हणे ? ह्यांच्या ईथे क्लीष्ट गणित सोडाच , साधे आकडे मोजण्याचे सुद्धा वांदे आहेत तर !! एक पद एक पेन्शन तर तुमच्या भ्रष्ट काँग्रेसच्या सरकार ने १० वर्षे अडगळीत टाकलेले होते हे विसरलात ?

In reply to by डँबिस००७

Blackcat Tue, 02/19/2019 - 23:15
तुमचे गणित कच्चे आहे, 2012 ला पगाराचे स्लॅब वाढले , मग पाच वर्षे किरकोळ इन्क्रीमेंट असतात , त्याही दोन तीन वर्षे मिळत नाहीत , त्यांनतर पुन्हा स्लॅब वाढणे 2017 ला अपेक्षित होते, पण भाजप सरकारने ते 2021 पर्यंत पुढे ढकलले , फक्त इन्क्रीमेंट मिळतील ह्याची घोषणा केली , तेही 2017 पासून मिळाले नाहीत. 2-3 वर्षे झाली की एखादे इन्क्रीमेंट देतात , एक दोन राखून ठेवतात

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Blackcat Tue, 02/19/2019 - 23:21
आमचे काँग्रेस निदान स्लॅब तरी पाच वर्षांनी वेळेवर वाढवत होते , मधल्या काळात इन्क्रीमेंट असेनात का मागेपुढे, पण भाजपे तर स्लॅबच पुढे ढकलत आहेत , आणि गम्मत म्हणजे महाराष्ट्रीतील भाजप सरकारने याच काळात आमदारांचे पगार 50 हजारवरून दीड लाख केले .

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 10:57
तुम्ही आपली बुद्धी बाजूला ठेवूनच प्रतिसाद लिहिता का हो? कि बेलाशक खोटे बोलणे याबद्दल तुम्हाला काहीही वाटेनासे झाले आहे? काश्मीर मधील केंद्रीय राखीव पोलीस दल हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. वेतन आयोग नावाची काही वस्तू अतित्वात आहे याबद्दल आपल्याला माहिती आहे का? सहावा वेतन आयोग २००६ साली आला आणि त्याची अंमल बजावणी २००८ मध्ये झाली. https://en.wikipedia.org/wiki/Sixth_Central_Pay_Commission तसेच २०१५च्या नोव्हेंबर महिन्यात सातव्या वेतन आयोगाचा अहवाल आला आणि तो मोदी सरकारने ५ सप्टेंबर २०१६ लागू केला On 5 September 2016 the Bharatiya Janata Party (BJP) led National Democratic Alliance (NDA) government implemented the recommendations of the 7CPC including those affecting the armed forces with minor modifications.(स्रोत विकिपीडिया) उगाच नको तेथे अक्कल पाजळणे थांबवा. केंद्रीय वेतन आयोग "१० वर्षातून" एकदाच बसतो बाकीचा वेळ फक्त महागाई भत्ता वाढवता येतो. आमचे काँग्रेस निदान स्लॅब तरी पाच वर्षांनी वेळेवर वाढवत होते.

हे सिद्ध करून दाखवा हे तुम्हाला आव्हान आहे.

नाही तर अशा धादांत खोट्या प्रतिसादाबद्दल माफी मागा

In reply to by सुबोध खरे

प्रसाद_१९८२ Wed, 02/20/2019 - 11:17
हे सिद्ध करून दाखवा हे तुम्हाला आव्हान आहे. नाही तर अशा धादांत खोट्या प्रतिसादाबद्दल माफी मागा
-- सर, आता तो मोगा तुमच्या या प्रतिसादाकडे फिरकणार देखील नाही.

In reply to by सुबोध खरे

Blackcat Wed, 02/20/2019 - 11:19
हे आलेच धावून, पाच वर्षे स्लॅब हे आमच्या पगाराबद्दल लिहिले आहे, बाकी , त्यांच्या पगाराबद्दल व्हिडिओत आहे , ते वाचा, सैनिकांना हेलिकॉप्टर वापरायचा अधिकार नाही , हे बोलून तुम्हीच आधुनिक वर्णव्यवस्थेचा पुरस्कार केला आहे , तुम्हीच देशाची माफी मागा, सैनिकांनी जीव घालवावा , पण त्यांना सुविधा मिळणार नाहीत , हे लिहिल्याबद्दल मी डॉ खरेंचा जाहीर निषेध नोंदवत आहे

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 12:07
तोंडाला येईल ते बोलू नका. सरकारी हेलिकॉप्टरचा वापर कशासाठी करायचा याची SOP (स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर)असते. सैनिकाचा( एवढेच नव्हे तर तेथील सिव्हिलियनचा सुद्धा) "जीव वाचवण्यासाठी" तेथील डॉक्टर "स्थानीक कमांडर"च्या टेलिफोनिक परवानगीने हेलिकॉप्टर बोलावू शकतो. सैनिकांना सुटीवर जाण्यासाठी आणि सुटीवरून परत आणण्यासाठी हेलिकॉप्टर वापरुन देशाचे दिवाळे वाजवायचे आहे का? काश्मीरमध्ये एकंदर २ लाख १० हजार लष्करी जवान आणि १ लाख ३० हजार केंद्रीय पोलीस दले यांचे जावं तैनात आहेत. एवढ्या सगळ्या जवानांना (३ लाख ४० हजार) हेलिकॉप्टरने नेण्यासाठी भारताकडे तेवढी हेलिकॉप्टर्स नाहीतच. बाष्कळ बडबड खोटे बोलणे या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणे इतक्या भंपक गोष्टी निर्लज्जपणे करताना जनाची नाही तरी मनाची लाज तरी बाळगा. सैनिकांनाच काय पण अधिकाऱ्यांना सुद्धा हेलिकॉप्टर वापरायचा अधिकार नाही. आधुनिक वर्णव्यवस्थेचापुरस्कार केला आहे असली घाण उगाच तोंड उचकटून कशाला बाहेर टाकता आहात? निम लस्क्री लोकांचे पगार 2012 नन्तर वाढलेले नाहीत ( आमचेही नाहीत) हे आपलेच लिखाण आहे ना? मग सातव्या वेतन आयोगाबद्दल न वाचता फुकट कळफलक बडवून खोटे नाटे कशाला लिहीत आहात?

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 12:15
मोगा खान बाकी तुम्ही आर्मीत डॉक्टर म्हणून भरती होणार होतात त्याच काय झाले? हेलिकॉप्टर मध्ये फिरायची संधी मिळेल (तुमच्याच म्हणण्याप्रमाणे) आणि भरपूर पगार, भरपूर सुट्या, स्वस्त दारू राजासारखे राहाल. केंव्हा येताय? माझा ब्रिगेडियर वर्गमित्र लष्करी मुख्यालयात दिल्लीला आहे. चिकटवून टाकू कुठेतरी तंगधार https://www.google.com/maps/search/tangdhar+army+camp/@34.8687725,72.6431672,7z गुरेझ https://www.google.com/maps/search/gurez+army+camp/@34.6268302,73.7540836,8z उडी https://www.google.com/maps/place/Uri+193123/@34.0560504,73.4232996,9z/data=!4m5!3m4!1s0x38e05748af885045:0xa67531f1a8648f93!8m2!3d34.0881166!4d74.0339852 नाही तर सियाचेन आहेच एकदम आरामात राहा. छान थंड थंड बायकोची हि कटकट नाही

In reply to by सुबोध खरे

Blackcat Wed, 02/20/2019 - 12:23
हेलिकॉप्टरची मागणी त्यांनी स्वतःच केली होती , वातावरण खराब होते म्हणून, Speaking to Asia Times, a senior security official said that travelling on the road was riskier and the attack would have been avoided if they had used helicopters instead of trucks. “Had helicopters been made available to troops then this could perhaps have been avoided. This is not the main cause and we do have a massive intelligence failure. But this could have probably saved lives,” he said. https://newscentral24x7.com/pulwama-terror-attack-modi-govt-refused-helicopters-to-ferry-crpf-officials-in-kashmir/ ते सगळ्या लोकांना मजेसाठी फिरायला हेलिकॉप्टर नव्हते मागत.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 12:37
कशाला कुठल्या तरी प्रेस्टिट्यूटच्या आड लपता आहात शिखंडी सारखे? सिनियर सिक्युरिटी ऑफिशियलचे नाव घेऊन ते खोटे बोलत आहेत त्यात तुम्ही त्यांची हांजी हांजी चालवली आहे. सिनियर सिक्युरिटी ऑफिसर जर सरकारी असेल तर त्याला वस्तुस्थिती माहिती आहे आणि सरकारी नसेल तर कुणीही बुणगा काहीही बोलतो ते तुम्ही न विचार करता पुढे पाठवून मला जाब विचारता? लष्करी दलाच्या पगारा बद्दल खोटं बोलून झालं माझ्यावर वर्णव्यवस्थेबद्दल चिखल उडवून झाला अडीच हजार सैनिकांना सुटीवरुन परत येण्यासाठी हेलिकॉप्टर कोणाचा बाप देणार होता? तीन लाख चाळीस हजार सैनिकांना वर्षात तीन वेळेस सुटीवर जाण्यासाठी आणि तीन वेळेस परत येण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवायचे तर ७०% आयकर भरावा लागेल आणि ५० % जी एस टी. भरणार का तुम्ही? बेताल आणी बाष्कळ बडबड आणि पचपच केल्याशिवाय अन्न पचत नाही का?

In reply to by सुबोध खरे

Blackcat Wed, 02/20/2019 - 14:11
मुलांना ऑक्सिजन सिलेंडरला पैसे नाहीत, सैनिकांना सुरक्षित ठेवायला पैसे नाहीत.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 19:17
मुलांना ऑक्सिजन सिलेंडरला पैसे नाहीत, सैनिकांना सुरक्षित ठेवायला पैसे नाहीत. ना शेंडा ना बुडखा नुसतीच पचपच

In reply to by सुबोध खरे

महेश हतोळकर गुरुवार, 02/21/2019 - 17:53
मिपावरच्या चर्चा सरकार एवढ्या गांभीर्याने घेत असेल हे माहिती नव्हते. जपून वावरायला पाहिजे बाबा इथं. http://mtonline.in/B-Lzua/a36my

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

रानरेडा Sun, 02/24/2019 - 22:55
मध्ये एका गावठी वैदू कडून उपचार करून घेतलेल्या ( आणि सरकारी कोलेज मधून डॉक्टर झालेल्या ) डॉक्टर ची खाणी ऐकली होती वर म्हणे तो डॉक्टर मुंबईत एका सरकारी रुग्णालयात आहे आणि मुसलमान बनून हि आधीच्याच हिंदू नावाने वावरत आहे , ह्लाला साठी झाला मुसलमान तो त्यामुळे डॉक्टर खरे यांना कशाला दोष द्या , डॉक्टर कसे असतात ते माहित आहे आम्हाला

In reply to by सुबोध खरे

तेजस आठवले Wed, 02/20/2019 - 14:33
संपादक मंडळ असल्या खोटारड्या प्रतिसादांवर काहीच कारवाई करणार नाही का ? का मोगा पुढे हात टेकले?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

lakhu risbud Wed, 02/20/2019 - 13:34
मोगा खान,तुमच्या आवाक्यातला प्रश्न MBBS म्हणवणारा कोणी डागदर धनगरी औषध वापरण्याची कबुली आणि जाहिरात कसे देऊ शकतो ?

In reply to by सुबोध खरे

अर्वाच्य Wed, 02/20/2019 - 12:59
एक लक्षात ठेवा जेन्व्हा एक हल्ला होतो तेंव्हा त्याच्या मागे कमीत कमी १०० हल्ले निकामी केलेले असतात. {{> हे वाक्य जेव्हा राहुल गांधी बोलले होते तेव्हा बरीच टिका झाली होती. तुम्हि अगदि राहुल गान्धीसारखे बोलत आहात. :-) https://goo.gl/XQ8FSQ

In reply to by अर्वाच्य

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 19:23
राहुल गांधी राजकारणी आहेत पण कुठे बोलायचे आणि कुठे नाही याचा त्यांना पोच नाही. मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून काही जबाबदारीने बोलावे कि नाही. सत्य कुठे आणि कसे बोलावे हे महत्त्वाचे असते. एखाद्या पायलटच्या मृत्यू प्रसंगी पायलटची चूक होती म्हणून तो दिवंगत झाला हे बोलणे सत्य असले तरी अप्रस्तुत आणि अनुचित असते अंधभक्ती हि अशीच आहे.

Rajesh188 Tue, 02/19/2019 - 12:13
नेहमी 370 कलम रद्द करा आसा युक्तिवाद होतो पण ते कलम रद्द करण्याचा अधिकार संसेदला आहे का . काश्मीर भारतात जेव्हा विलीन झाला तेव्हा काही करार झाला होता त्यात हे कलम सुधा आहे आस ( मला नक्की माहित नाही चुकीचं आसेल तर माहिती द्यावी ,) ते कलम रद्द केले तर भारतीय कायदे त्या राज्याला सुधा लागू होतील .आणि भारतीय जनता तिथे जावून जमीन सुधा खरेदी करू शकेल आणि तिथे बाकी समाजाची वस्ती वाढेल आसा युक्तिवाद आहे . पण आशा अस्थिर वातावरणात tas स्थलांतर होईल

In reply to by Rajesh188

खरे आहे. एवढा साधासुधा तर्क नाही ३७० मागे. नाहीतर केव्हाच रद्द केले असते आधीच्या सरकारानी. सार्वमत झाल्याशिवाय ३७० चा निर्णय घेता येणार नाही अशी अट आहे असे वाचले होते. नक्की माहित नाही. त्यामुळे ३७० रद्द करण्याचा आग्रह धरायचा तर तो कश्मिरमध्ये घेतला पाहिजे. मुंबई/पुण्यात्/दिल्लीतल्या लोकांच्या आग्रहाला विशेष महत्व नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुबोध खरे Wed, 02/27/2019 - 10:57
@माईसाहेब आधीच्या सरकारांनी तीन तलाक बंद केला नाही. आधीच्या सरकारांनी बेनामी मालमत्तेचा कायदा येऊ दिला नाही आधीच्या सरकारांनी पाकिस्तानात घुसून कार्यवाही केली नाही आधीच्या सरकारांनी ३७० कलम रद्द केले नाही. यात काही साम्य दिसतंय का माईसाहेब? आधीच्या सरकारांनी केलं नाही म्हणून आताचे सरकार या गोष्टी करू शकत नाही हे म्हणणे हास्यास्पद आहे

गामा पैलवान Tue, 02/19/2019 - 14:01
माईसाहेब, भारतीय संसद अनुच्छेद ३७० स्वत:च्या अधिकारात रहित करू शकते. इतर कोणाचीही परवानगी घ्यायची गरज नाही. कलम ३७०, परिच्छेद ३ असा आहे : Notwithstanding anything in the foregoing provisions of this article, the President may, by public notification, declare that this article shall cease to be operative or shall be operative only with such exceptions and modifications and from such date as he may specify: Provided that the recommendation of the Constituent Assembly of the State referred to in clause (2) shall be necessary before the President issues such a notification. वरील मजकुरातली Constituent Assembly (= घटना समिती) या घडीला अस्तित्वात नाही. त्यामुळे राष्ट्रपती एका वटहुकूमाद्वारे कलम ३७० रद्द करू शकतो. तसंही पाहता ३७० हे तात्पुरत्या तरतुदींसाठी अस्तित्वात आलेलं आहे. कलमाच्या शीर्षकात Temporary, Transitional and Special Provisions असा उल्लेख आहे. तात्पुरत्या तरतुदी रद्द करण्यातही खास परवानग्यांची गरज नसते. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

धन्यवाद रे पैलवाना. Constituent Assembly अस्तित्वात नसेल तर हे डेड-लॉक झाले म्हणायचे. On 3 April 2018, the Supreme Court of India gave a similar opinion declaring that the Article 370 has acquired a permanent status. It stated that, since the State Constituent Assembly has ceased to exist, the President of India would not be able to fulfil the mandatory provisions required for its abrogation.[49] https://en.wikipedia.org/wiki/Article_370_of_the_Constitution_of_India

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

गामा पैलवान Tue, 02/19/2019 - 18:02
अहो माईसाहेब, घटनासमिती अस्तित्वात नसल्याने ३७० रहित करता येणार नाही असा निर्णय जम्मूकाश्मीर उच्च न्यायालयाने दिला आहे. पुढे सर्वोच्च न्यायालयाने ३७० कायमस्वरूपी आहे असं मत प्रदर्शित केलंय. ३७० च्या शीर्षकात जरी 'तात्पुरते व अंतरिम' असा उल्लेख असला तरी त्यास कायमपणा प्राप्त झालाय. असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे. संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Article_370_of_the_Constitution_of_India#Calls_for_abrogation असं असलं तरीही माझ्या माहितीप्रमाणे घटनेचा अन्वयार्थ लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयास न्यायिक फेरआढावा ( = ज्युडिशियल रिव्ह्यू) घेता येतो. किंवा शासन तसा घेण्यास स.न्या.स विनंती करू शकतं. यामागचं कारण म्हणजे घटनासमिती हीच मुळी तात्पुरती योजना आहे. मग तिच्या अनास्तित्वाच्या आधारे तात्पुरते ३७० कायम कसे करता येईल? असा युक्तिवाद करून शासन सर्वोच्च न्यायालयाकडे पुनरावेदन ( = अपील) करून निर्णय फिरवून घेऊ शकेल. आ.न., -गा.पै.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

Blackcat Tue, 02/19/2019 - 19:08
370 हटवल्यावर तुमचे हे तिथे प्लॉट घेणारेत का ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

प्लॉट्स वगैरे मोठ्या बिल्डरांना- लोढा/हिरानंदानीना,राजकीय पुढार्यांना घेऊ देत. एखादी टाऊनशीपची जाहिरात येऊ दे.. मग बघु.. असो २६-११ च्या मुंबई हल्ल्यानंतर शिवराज पाटलांनी चार दिवसात राजिनामा दिला होता. आता ?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अर्धवटराव Tue, 02/19/2019 - 20:19
शिवाजीरावांनी दिवसभरात तीन वेळा कपडे बदलुन प्रतिक्रीया दिल्या, त्यावरुन ते ट्रोल झाले (आपली जनता ट्रोल करण्याच्या बाबतीत जरा जास्तच जागृत आहे). त्यांची देहबोली देखील मानसीक खच्चीकरण झाल्यासारखी निस्तेज झाली होती. त्यामुळे गृहमंत्रालयाची इमेज कचखाऊ झाल्यासारखी वाटत होती. तसंही, शिवाजीरावांना स्वतंत्रपणे बोलण्याचा काहि अधिकार नव्हता (आजच्या गृहमंत्र्यांना देखील तो अधिकार नाहि). त्यामुळे त्यांनी बस्तान आवरतं घेतलं. आबा पाटलांचा राजिनामा मात्र अवास्तव होता असं वाटतं. एक कार्यक्षम मंत्री म्हणुन मला आबा पाटील फार आवडायचे. त्यांच्या हिंदी प्रतिक्रीयेला उगाच ओढुन ताणुन दाखवण्यात आलं, आणि त्यांना राजीनाम द्यायला लागला (राष्ट्रवादीतली अंतर्गत स्पर्धा देखील काहि अंशी कारणीभूत असेल. पण पवार साहेबांचा आबांना नेहेमीच पाठिंबा राहिला आहे)

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Tue, 02/19/2019 - 23:16
Blackcat , ३७० कलम ठेवुन कश्मिरला स्वतःच प्राईव्हेट राज्य करायचा प्लान होता का तुमच्या लाडक्या पंडीतजींचा ? नाही म्हणजे संपुर्ण देश एकसंध केलेला असताना फक्त ह्यांच्या गावाला (काश्मिरला) स्पेशल स्टेटस का हवा होता म्हणे ? 370 हटवल्यावर तुमचे हे तिथे प्लॉट घेणारेत का ? ३७० कलम असताना कायद्याप्रमाणे भारतीय माणसाला काश्मिरमध्ये प्रॉपर्टी विकत घेता येत नाही त्यामुळे विकत घ्यायची असेल तर ३७० कलम जाण्याची वाट पहावी लागेलच !

In reply to by डँबिस००७

Blackcat Tue, 02/19/2019 - 23:23
काश्मीरचे सँस्थानिक नेहरू नव्हते , कुणीतरी हरीसिंग वा तत्सम होते ना ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 10:59
370 हटवल्यावर तुमचे हे तिथे प्लॉट घेणारेत का ? तुम्ही घ्या कि चारी बाजूला भरपूर मशिदी आणि मदरसे आहेत. तुमचा वेळ बरा जाईल

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 12:40
बघा प्लॉट घ्यायचा असेल तर दुवा पाठवला आहे. भरपूर प्लॉट्स रिकामे आहेत. https://www.justdial.com/Baramulla/Estate-Agents-in-Gurez/nct-10192623

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 19:25
तिकडे चारी बाजूनी मशिदी आणि भोंगेच आहेत इकडच्या सारखे "आरती, स्तोत्र, जय भवानी जय शिवाजी ऐकून " वगैरे ऐकून तुमचे ब्लड प्रेशर वाढणार नाही शिवाय तिथे प्लॉट फारच स्वस्तात आहेत.

In reply to by सुबोध खरे

रानरेडा Mon, 02/25/2019 - 00:10
आणि डोंगराळ भागात भरपूर वैदू , मेंढपाळ असतील तिकडे तुम्हाला औषधच औषध मिळेल ! फक्त आपण MBBS डॉक्टर आहात हे सांगू नका हा , ;) ;)

Rajesh188 Wed, 02/20/2019 - 12:46
आपण स्वतःचा जरी विचार केला तरी समजेल . मुंबई आणि राज्यात हिंदी भाषिक लोकांची संख्या वाढली आहे आणि त्या मुळे आपण सुधा अस्वस्थ होतो .हे सत्य आहेच की . कोणत्याच राज्याच्या संस्कृतीवर आक्रमण विनाश कडे घेवून जाईल

Rajesh188 Wed, 02/20/2019 - 14:08
ह्या विषयावर खूप प्रतिक्रिया वेगवेगळ्या ठिकाणी वाचल्या . पण पूर्ण विचार करून परिणामाचा विचार करून प्रतिक्रिया खूप कमी आहेत . प्रत्येक जण आपल्या विचारधारा सोडायला तयार नाहीत आणि aashich अवस्था पाकिस्तान मध्ये सुधा आहे . डोकं थोड शांत ठेवून दोन्ही देशांनी मिळून निर्णय घेणे अपेक्षित आहे इथे भावनिक mudhe काही कामाचे नाहीत. व्यवहारिक विचार झाला पाहिजे . दोन्ही देश विकसनशील देश आहेत आणि दोघे सुधा गरीबी bairojgari,लोकसंख्या अनियंत्रित वाढ आशा बऱ्याच समस्यांनी ग्रासले आहेत .जर दोन्ही देशांना काश्मीर च हित हवं आसेल तेथील जनता सुखी समाधानी झालेली बघायची आसेल तर थोड पाठी सरल पाहिजे . दोन्ही देशाची अखंडत्व आणि सर्वभोमत्व ह्या वर कसली ही तडजोड न करता सुवर्ण मध्य साधता आला पाहिजे . हा सुवर्ण मध्य दोन्ही देशांनी ठरवावं .तो आपण काय सुचवणार . आता आसा विचार केला की दोन्ही देश आपल्याला हवा तसा काश्मीर प्रश्न सोडवू लागला तर त्याचे परिणाम काय होतील aatangvad हा त्याच्या वर नक्कीच उपाय नाही आणि युद्ध हा सुधा उपाय नाही . Aatangvad ही दुधारी तलवार आहे हिचा वापर जो करेल ती तलवार त्याच्या वर सुधा वार करू शकते आणि ह्याचा चांगला अनुभव पाकिस्तान कडे आहे ते चक्रव्यूहात सापडले आहेत बाहेर येण्याचा मार्ग सध्या तरी बंद आहे . दोन्ही देशातील दुष्मानीचा फायदा बाकी देश मित्रत्वाचे वाचन देवून स्वतःचा स्वार्थ साधून घेतली त्यात होणाऱ्या नुकसानी शी त्यांचा काहीही संबंध नसेल . पाहिजे तर ह्या विषयावर bayanbaji करायला दोन्ही देशांनी बंदी घातली पाहिजे .प्रधान मंत्री व्यतिरिक्त कोणताही नेता ह्या विषयावर बोलणार नाही ह्याची काळजी घेणे . युद्ध न परवडणारे दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत आताच युद्ध खूप भयंकर आसेल .आणि युद्ध काळात सर्व विकास योजना बंद होवून रोजगाराचा प्रश्न गंभीर होईल . आपण आता कितीही बोललो तरी त्या वेळी वेगळा विचार करू . पोट भरणे अवघड झाले की afratafar maju शकते . शास्त्र विकणारे लढा चालू ठेवतील आणि दोन्ही देशाचं वाटोळे होईल . समजा आपण युद्ध जिंकाल तर पाकिस्तान मध्ये आपण सत्ता स्थापित करू शकणार नाही जागतिक विरोध होईल मग युद्ध जिंकून फायदा काय अजुन द्वेष वाढेल

Blackcat Wed, 02/20/2019 - 14:24
१९८९ पर्यंत भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबे अगदी सहजपणे काश्मिरभर हिंडून-फिरून , एक तरी कौटुंबिक फोटो-अल्बम सोबत घेऊन आनंदाने परतत होता! काश्मीर की कली, परदेसियो से ना अखिया मिलाना, किती सुंदर गाणी बघायला मिळायची. याचा अर्थ, तेव्हा तेथे दहशदवादाचा मागमूस नव्हता. नेहरुजी, शास्त्रीजी, इंदिराजी आणि राजीवजीपर्यंत काश्मिरात दहशदवाद नव्हता, आणि पाकिस्तानची हिम्मत नव्हती नजर वर करून पाहण्याची! २००१ मध्ये जम्मू- काश्मीर विधानसभेवर हल्ला झाला. पी एम होते अटलजी! अमरनाथ यात्रा हल्ला.... तेव्हाही भाजपाचे शासन! काँग्रेस-शासनात असा एकही हल्ला नाही. काश्मीरसाठी कॉंग्रेसने ३ युध्दे खेळली आणि जिंकली देखील! नव्या सरकारकडून काही अपेक्षा ठेवायच्या तर सैनिकच सुरक्षित नाहीत आणि त्यांना सुरक्षित करायचे तर म्हणे 50 % कर भरा, असे इथले तज्ञ सांगतात. आमचे पूर्वधर्माचे गोत्र काश्यप , ज्यांनी काश्मीर निर्माण केले त्या ऋषीचे नाव , बिचारे तळमळत असतील , हेचि फळ काय मम तपाला?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

आनन्दा Wed, 02/20/2019 - 15:42
१९८९-९० मध्ये तेथे दहशतवाद आला तेव्हा तुमचे शासन होत वाटते तिथे? हजारो काश्मीरी पंडितींना विस्थापित केले तेव्हा नव्हता वाटते दहशतवाद? की तो जिहाद होता?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Wed, 02/20/2019 - 19:00
बरेच विसरभोळे आहात तुम्ही !! पाकिस्तानची हिम्मत नव्हती नजर वर करून पाहण्याची! हा हा हा काँग्रेस चे कमकुवत सरकार बघुन एक दोन नव्हे तर चार चार युद्धे लादली पाकिस्तानने भारतावर !! चीन ने तर एकाच तडाख्यात लोळवल होत विसरले काय ? ते तर बर की भारतीय सेना खमकी होती म्हणुन बचावलो !! अन्यथा काँग्रेसवाल्यांनी देशच आंदण दिला असता पाकिस्तानला ! काश्मिरचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग पाकिस्तानच्या अख्त्यारीत आहे ! गीलगीट बाल्टीस्तान, अक्साई चीन हा भाग सुद्धा काँग्रेसवाल्यांनी देऊन टाकला ! कॉग्रेस मुक्त भारत झाल तर १८८५ पासुनचा रोग बरा होईल !!

In reply to by डँबिस००७

Blackcat Wed, 02/20/2019 - 19:22
जवानांच्या अंतयात्रेत उपमुख्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह, केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह, साक्षी महाराज हसत होते व प्रार्थनेत जोडे घालून आले होते, नातेवाईकांनी हाकलून लावले. व्हाट्सपवर व्हिडीओ फिरत आहेत, ते पहा. भाजपयाना तर इथलेच लोक विचारेनात , पाकिस्तान तर लांब राहिला.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 19:28

९०,००० सैनिक युद्धबंदी होते आणि पाकिस्तानी लष्करशहा हात बांधून शरण आलेले असताना काश्मीर प्रश्न सोडवण्याची सुवर्णसंधी श्रीमती इंदिरा गांधींनी घालवली.

त्याबद्दल तुमची पचपच करणारी विचारसरणी काय म्हणते आहे?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 20:21
त्यांना (९००० लोकांना) एक वेळ तरी जेवायला घालायची आपली लायकी आहे का? आपला पगार किती? आपण बोलता किती?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे गुरुवार, 02/21/2019 - 09:22
इतिहास वाचलेलाच दिसत नाही. १ कोटी बांगलादेशी निर्वासित भारतात आले होते आणि त्या निर्वासितांच्या निर्वाहासाठी आपण( सामान्य नागरिक) २० पैशाच्या पोस्टाच्या तिकिटांवर ५ पैसे निर्वासित अधिभाराचे तिकीट लावत होतो https://www.thedailystar.net/supplements/victory-day-2016-special/refugee-relief-the-postal-tax-helped-millions-1330345. त्यामध्ये ९०,००० तोंडे म्हणजे काहीच नाही

त्या "ओलिस सैनिकांच्या" बदल्यात आणि शरण आलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या बदल्यात काश्मीर प्रश्न सोडवण्याची सुवर्णसंधी श्रीमती इंदिरा गांधी यांनी घालवली.

त्या धनगराकडे मेंदू विकारावर औषध आहे का विचारुन पहा. कायम नुसती जळजळ आणि मेंदूत जळमटं झाली आहेत. कोणताही विषय अजिबात न वाचता किंवा अजिबात विचार न करता नुसती आचरटपणाची पचपच करण्याची सवय सोडून द्या जाता जाता -- मला कोणतेही निवृत्ती वेतन नाही. तेंव्हा तुम्हाला जळजळ होण्याचे कारण नाही.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

विशुमित गुरुवार, 02/21/2019 - 16:02
काश्मीर प्रश्नाला पंडित नेहरूच कारणीभूत, अमित शाह यांचा आरोप. काश्मीर प्रश्नाचे जनक कोण असा प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तर पंडित नेहरू असेच आहे. नेहरूंमुळे काश्मीरचा मुद्दा निर्माण झाला. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. काश्मीर खोरे कायम धगधगतेच असते या सगळ्याचं कारण पंडित नेहरू आहेत त्यांनी हा प्रश्न निर्माण केला आणि भिजत ठेवला असाही आरोप अमित शाह यांनी केला. सगळ्यात महत्वाचे आहे, हे तुम्ही लक्ष्यात ठेवा == पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे असे पंतप्रधान आहेत जे २४ पैकी १८ तास काम करतात. देशाच्या सुरक्षेसाठी ते कटिबद्ध आहेत त्यांच्यावर तुमच्यासारख्यांच्या आरोपांमुळे परिणाम होणार नाही असेही अमित शाह यांनी ठणकावले आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/pandit-nehru-responsible-for-kashmir-issue-says-amit-shah-1845117/ === सगळं रांकेला लावून आज ते कोरियाला भुर्र उडून गेले आहेत. तुम्ही बसा उंदरांचा पाठलाग करत!!

Blackcat Wed, 02/20/2019 - 14:24
१९८९ पर्यंत भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबे अगदी सहजपणे काश्मिरभर हिंडून-फिरून , एक तरी कौटुंबिक फोटो-अल्बम सोबत घेऊन आनंदाने परतत होता! काश्मीर की कली, परदेसियो से ना अखिया मिलाना, किती सुंदर गाणी बघायला मिळायची. याचा अर्थ, तेव्हा तेथे दहशदवादाचा मागमूस नव्हता. नेहरुजी, शास्त्रीजी, इंदिराजी आणि राजीवजीपर्यंत काश्मिरात दहशदवाद नव्हता, आणि पाकिस्तानची हिम्मत नव्हती नजर वर करून पाहण्याची! २००१ मध्ये जम्मू- काश्मीर विधानसभेवर हल्ला झाला. पी एम होते अटलजी! अमरनाथ यात्रा हल्ला.... तेव्हाही भाजपाचे शासन! काँग्रेस-शासनात असा एकही हल्ला नाही. काश्मीरसाठी कॉंग्रेसने ३ युध्दे खेळली आणि जिंकली देखील! नव्या सरकारकडून काही अपेक्षा ठेवायच्या तर सैनिकच सुरक्षित नाहीत आणि त्यांना सुरक्षित करायचे तर म्हणे 50 % कर भरा, असे इथले तज्ञ सांगतात. आमचे पूर्वधर्माचे गोत्र काश्यप , ज्यांनी काश्मीर निर्माण केले त्या ऋषीचे नाव , बिचारे तळमळत असतील , हेचि फळ काय मम तपाला?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

भंकस बाबा Wed, 02/20/2019 - 23:01
5लाख पंडितानी जीवाच्या भीतिने काश्मीर सोडले तेव्हा विद्यमान सरकारने ना त्यांची चिंता केली वा चिकित्सा, मग जे पाहिजे ते आपसुक तोंडात पडले तर कोण कशाला अतिरेकी बनतोय? उद्या काळ्या माउकड़े शांतताप्रिय धर्माचे लोक बोलायला आले की तुमची जागा आम्हाला आमचे प्रार्थनास्थळ म्हणून हवे आहे तर तुम्ही किती आनंदाने ते खाली कराल ? आधी तुमचा प्रतिसादच गंडलाय, भाजपा सरकारमधे अमरनाथ हल्ला झाला व विधानसभा हल्ला झाला मग पाकिस्तानमधून कसाब आणि कंपनी कोंग्रेसच्या काळात क़ाय आटयांपाट्या खेळायला आली होती ? हायला , यांचा क़ाय भरोसा नाय, प्रतिसाद झोम्बल्यावर कसाब आपल्या मुब्र्यातुंन आला होता बोलायला कमी करणार नाही. इशरतजहांचा बदला घ्यायला ! संपादक मंडळाला एक विनंती आहे , ह्या काळ्या माऊचा ईमेल आईडी उघड़ करावा , मग काहीतरी सामदामदंडभेद करता येईल

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

lakhu risbud गुरुवार, 02/21/2019 - 11:58
व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा व वैफल्य यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते. मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ? @ Blackcat तुमचे या विषय बद्दलचे मौलिक मत जाणून घ्यायला आवडेल. का या असल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची धमक नाही ?

In reply to by lakhu risbud

सुबोध खरे गुरुवार, 02/21/2019 - 12:56
@ Blackcat निम लस्क्री लोकांचे पगार 2012 नन्तर वाढलेले नाहीत ( आमचेही नाहीत) हे सपशेल खोटे विधान निर्लज्जपणे केलेत त्यावर पुरावा मागितला तो काही देता येत नाही. माझ्या वर्णव्यवस्थेच्या पुरस्काराबद्दल खोटारडेपणा केला त्याबद्दल कोणताही पुरावा देता येत नाही. इतका खोटारडेपणा, निलाजरेपण,, लोक टोचून बोलतात त्याबद्दल खंत नाही खेद नाही मिपावरून हाकलून दिल्यावर पन्नास वेगवेगळे डू आयडी घेऊन परत परत येण्यासारखा लोचट पणा आणि लुब्रेपणा आहे. आयुष्यातील वैफल्य जालावर काढून ते जाणार नाही आणि खोटेपणा हा लांड्या चादरी सारखा असतो. वरनं ओढली तर खालचा भाग उघड पडतो आणि खाली ओढली तर वरचा. मनाची नाहीच पण जनाची तरी लाज बाळगा.

सुबोध खरे-"उचलली बोटे आणि लावली कळफलकाला अशी स्थिती आहे आज जो उठतो तो बेफाट आरोप करतोय "प्रधान मंत्रीजी आप मुझे बताईये, सारा कम्युनिकेशन भारत सरकार के हात मे है, आप कोई भी फोन टॅप कर सकते हो, आप् ने अभीतक क्या किया? अभीभी घुसपेटी भारत के अंदर कसे आते है ? कितने आतण्कवादीयोंको आपने विदेशसे भारत लाया? आतंकवादीयोंके पास बाहर से गन आता है, गोला बारूद आता है, हवाला के माध्यमसे पैसा आता है, पैसा बँको के माध्यमसे आता है, प्रधान मंत्री, आप ईतनी निगरानी नही रख सकते? ये राज्योंका विषय नही है.. ये आपका विषय है.. काय किया है आपने ?" नरेंद्र मोदींनी २०१२ मध्ये मनमोहन सिंगांना भाषणात विचारलेले हे काही प्रश्न. (https://www.youtube.com/watch?v=SZQwy91riOo&t=737s २०:०० ते २३:००) ह्याला काय म्हणायचे रे सुबोधा? उचलली जीभ?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

डँबिस००७ Wed, 02/20/2019 - 19:26
माईसाहेब , अजुनही तुमची उचलली बोटे आणि लावली कळफलकाला अशी स्थिती आहे पुलवामा रस्त्यावर तिन तिन बॅरीकेडस होते ! कश्मिरच्या मुख्यमंत्र्यामुळे ते बॅरीकेडस बंद झाले आणि अतिरेक्यांना रस्ता साफ झाला ! पण त्या कश्मिरच्या मुख्यमंत्र्याला ना खंत ना खेद ! अजुन ही पाकिस्तानशी बोलणी कर ण्याची वार्ता करत आहे ! वायरलेस, मोबाईल, टेक्स्ट मेसेज,व ईतर कम्युनिकेशन वर करडी नजर असल्याने अतिरेक्यांनी ह्यावेळेला नविन मोबाईल + वायरलेस मेसेज सिस्टीम वापरली. चायनात बनलेली ही एनक्रिपशन सिस्टीम अजुन ही आपल्या कम्युनिकेशन ए़क्स्पर्टसना क्रॅक झालेली नाही. स्फोटके कश्मिरच्या सीमा भागातुन खंदक खणुन त्या मार्गाने आणलेली आहेत असा कयास आहे. गेल्या ६५ वर्षांत काश्मिरची सीमा सील करता आलेली नाही. त्या सीमेतुन माणसे, प्राणी , मादक पदार्थ ह्यांची तस्करी चालु असते. अश्या तस्करी मुळे सीमा पुर्ण पणे सील राहील ह्याची शाश्वती नसते. गेल्या ६५ वर्षांत सील न झालेली सीमा आता सील का झाली नाही अस विचारण म्हणजे मुर्खपणा आहे हे तुमच्या व तुमच्या ह्यांना आम्ही सांगावे म्हणजे काजव्याने सुर्याला .................. गेल्या ६५ वर्षांत जे न घडलेल आहे त्यातल जे काही ह्या ५ वर्षांत घडलेल आहे ते मात्र बघायच नाही असा प्रयास आपल्यालाच खाली घेऊन जाणार आहे !

In reply to by डँबिस००७

Blackcat Wed, 02/20/2019 - 19:59
61 चा पाढा आता 65 ला आला, त्यातली 10 भाजपचीही आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 19:35
| माईसाहेब कुरसूंदीकर १)डिसेंबर पासून हल्ले होत असतना आपली गुप्तचर यंत्रणा गप्प राहिली.. वा अपयशी ठरली. यंत्रणेच्या प्रमुखाने/गृहखात्याने हे सांगायला हवे की नको? २) बी.एस.एफ./सी.आर.पी.एफ. ने डिसेंबरमध्ये मोठ्या संख्येने बसेसने नेण्यास विरोध केला होता. हॅलिकॉप्टरची मागणी केली होती. ती अमान्य झाली. या दोन्ही गोष्टी अप्रस्तुत आणि अप्रासंगिक आहेत आणि त्यात आपला केवळ भाजप द्वेष दिसतो आहे हे मी सप्रमाण सिद्ध केलंय. ३ लाख ४० हजार सैनिकांना वर्षात तीन वेळेस हेलीकॉप्टरने घेऊन जाणे आणि परत आणणे हि अशक्य गोष्ट आहे हे शेम्बड्या पोरालाही पटेल. मुळात हि मागणी कुणी केली आहे हे तुम्हाला दाखवता येईल का? नसेल तर उगाच कळफलक बडवणे थांबवा कोणत्यातरी बोकड प्रेस्टिट्यूटने कुणाचा तरी हवाला देऊन लिहिलेले वाक्य मोगा खानने पाठवले होते उगाच फालतू प्रतिवाद करू नका आणि विषयाला फाटे फोडून पळवाट काढू नका.

In reply to by सुबोध खरे

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 02/21/2019 - 10:09
ही घ्या लिंक https://www.thequint.com/news/india/pulwama-terror-attack-crpf-request-air-transit-of-jawans-ignored#gs.9bLAc65P मूळ मुद्दा हा नाही. मोदी व भाजपा २०१२ च्या भाषणात ज्या गमजा मारत होते, मनमोहन सिंगांनाच जबाबदार ठरवत होते. कश्मिर प्रश्न हा जणू काही काँग्रेसवाल्यांनी मुद्दामून निर्माण केला आहे.. आम्ही सत्तेवर आलो की तो सोडवू... मग वाट वाकडी करून नवाझ शरीफांना केक भरवायला जाणे.. मोदी सत्तेवर आल्यापासून पाकिस्तान सूतासारखा सरळ आला आहे.. ह्या बद्दल बातम्या पसरवणे... मग सर्जिकल स्ट्राएकने कशी कायमची अद्दल घड्वली..वगैरे... ६०-६५ वर्षत जे झाले नाही ते ५ वर्षात होणार नाही हे कळण्यास राजकीय पंडिताची गरज नाही. मग जाहिरातबाजी न करता निमूटपणे काम तरी करा. प्रत्येकवेळी ईतिहासात जाऊन आधीचे सत्ताधारी कसे चुकले.. हेच सांगणार असाल तर लोक प्रश्न विचारणारच ना?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुबोध खरे गुरुवार, 02/21/2019 - 11:00
परत तेच कुणा तरी पत्रकाराने कुणाचा तरी हवाला देऊन सांगितलेली गोष्ट जी केवळ अशक्यप्राय आहे ( ३ लाख ४० हजार सैनिकांना वर्षात सहा फेऱ्या हेलिकॉप्टरने करणे). बरेच लोक मूळ वस्तुस्थिती माहित नसताना आपल्या त्रोटक माहितीप्रमाणे आणि आपल्या राजकीय कल (INCLINATION) प्रमाणे सोयीस्कर अशा काहीही गोष्टी टंकतात याबद्दल हा आक्षेप आहे. या स्थितीवर अचूक बोट ठेवणारा जालावर फिरणारा विनोद -- कुठे कुठे आणि कशी क्षेपणास्त्रे डागून पाकिस्तानला नष्ट करणारा डावपेच मी जालावर टाकणार होतोच तेवढ्यात आतून आमची हि ओरडली अहो जाता जाता धोब्याकडे इस्त्रीला कपडे टाका आणि ऑफिसमधून येताना न विसरता दळणाचा डबा घेऊन या. मुलखाचे धांदरट मेले. कुठे लक्ष असतं कुणास ठाऊक? मग लक्षात आलं -- आपण कोण आहोत आणि काय करतो आहोत

In reply to by सुबोध खरे

Blackcat गुरुवार, 02/21/2019 - 13:06
तात्पर्य : इथून पुढे चहावाल्यांनी चहावालेच रहावे ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे गुरुवार, 02/21/2019 - 19:47
हो डॉक्टर होऊन धनगराचे औषध घेण्यापेक्षा बरं नाही का?

In reply to by सुबोध खरे

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 02/21/2019 - 13:13
"आपण कोण आहोत आणि काय करतो आहोत" हे प्रथम सत्तधार्यांना सांगाय्ला हवे. अंतिम संस्काराला चपला घालुन बसणे, अंत्ययात्रा जात असताना पोझ देणे. ज्या दिवशी हल्ला झाला त्याच रात्री खाजगी पार्टीत नाचणे.... https://www.youtube.com/watch?v=CiEatCP6X6Q

In reply to by सुबोध खरे

शब्दबम्बाळ Mon, 02/25/2019 - 11:01
कोणत्यातरी बोकड प्रेस्टिट्यूटने कुणाचा तरी हवाला देऊन लिहिलेले वाक्य मोगा खानने पाठवले होते
अरेरे सरकार आता खरे साहेबानी डिक्लेर केलेल्या अश्या प्रेस्टिट्यूटने दिलेल्या बातम्यांचा विचार करून निर्णय घ्यायला लागले! आता कसं व्हायचं?! व्हात्साप्प ग्रुपवरती माहिती मिळाली नाही वाटत यावेळेस?? बाकी तुम्हीच खाली लिहिलेलं पटलं बुआ आपल्याला
बरेच लोक मूळ वस्तुस्थिती माहित नसताना आपल्या त्रोटक माहितीप्रमाणे आणि आपल्या राजकीय कल (INCLINATION) प्रमाणे सोयीस्कर अशा काहीही गोष्टी टंकतात याबद्दल हा आक्षेप आहे.
मग लक्षात आलं -- आपण कोण आहोत आणि काय करतो आहोत
येऊ द्या हं नीट लक्षात!

गामा पैलवान Wed, 02/20/2019 - 18:35
लोकहो, पुलवामा हल्ल्याचा काश्मिरियतशी कसलाही संबंध नाही. मसूद अझरचा भाऊ अब्दुल रौफ अजगर याने आत्मघातकी आक्रमणाची धमकी दिल्याची चित्रफीत समोर आली आहे. यामध्ये त्याने ‘जर मोदी सरकारने अयोध्येत राममंदिर उभारण्याचा प्रयत्न केला, तर आत्मघातकी आक्रमणे करू’, अशी धमकी दिली आहे. संदर्भ : https://sanatanprabhat.org/marathi/219206.html अधिक माहिती : https://mumbaimirror.indiatimes.com/news/india/pulwama-attack-nine-days-before-the-attack-jems-abdul-rauf-asghar-vowed-to-terrify-delhi/articleshow/68022324.cms पाकिस्तानात ५ फेब्रुवारी हा काश्मीर दिवस पाळला जातो. त्याचं चलचित्र : https://www.youtube.com/watch?v=ENOPIhZQFQA उपरोक्त चलचित्रात भारत मुर्दाबाद स्पष्टपणे म्हंटलं आहे. आ.न., -गा.पै.

Rajesh188 Wed, 02/20/2019 - 19:44
काश्मीर मध्ये घडणाऱ्या हिंसक कारवाया काश्मीर प्रश्र्नाशी संबंधित नसेल तर भारताचा इस्लामिक देश बनवायचा आहे आस अर्थ निघतो . मग डिफेन्स सुधा फक्त काश्मीर मध्ये करून चालणार नाही पूर्ण देशात आशा कारवायांवर लक्ष ठेवावे लागेल

In reply to by Rajesh188

ट्रेड मार्क Wed, 02/20/2019 - 23:26
काश्मीर मध्ये घडणाऱ्या हिंसक कारवाया काश्मीर प्रश्र्नाशी संबंधित नसेल तर भारताचा इस्लामिक देश बनवायचा आहे आस अर्थ निघतो नक्कीच बनवायचा आहे. फक्त भारतच नव्हे तर समस्त जग मुस्लिम नेशन झालं पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. गझवा-ए-हिंद म्हणजे काय हे विशद करून सांगणारा हा व्हिडिओ बघाच ही विनंती आहे. फक्त ६-७ मिनिटांचाच आहे त्यामुळे फार वेळ वाया जाणार नाही. पूर्वापार हिंदुस्थानवर होत असलेली मध्यपूर्वेकडून होणारी आक्रमणे ही याची साक्षीदार आहेत की हे फक्त प्रदेश काबीज करण्यासाठी नसून धार्मिक आक्रमण होते. हल्ले करून देवळे तोडून, ग्रंथ पुराणे जाळून, तरुण हिंदूंना मारून, हिंदू तरुण स्त्रियांना बळजबरीने इस्लाम स्वीकारायला लावणे आणि बलात्कार करून दासी म्हणून भरपूर पोरे काढून त्यांना मुस्लिम वळण लावणे हे कशाचे द्योतक आहे? सीमेवर हे उघड हल्ले तरी लोकांना दिसत आहेत, देशांतर्गत चालू असलेले छुपे हल्ले अजून लोकांच्या लक्षात येत नाहीयेत. एकीकडे हिंदू मुलींना नादाला लावण्यासाठी ग्रूमिंग गँग्स, दुसरीकडे शालेय शिक्षणात अकबर, औरंगजेब, टिपू, तैमूर यांचे गोडवे गाणारे धडे, मुस्लिम संस्कृती कशी चांगली आहे हे सांगणारे परिच्छेद आणि त्याच जोडीने हिंदू राजांबद्दल संस्कृतीबद्दल अतिशय कमी माहिती, तिसरीकडून सिनेमासारख्या माध्यमांतून उर्दू भाषेचे चाललेले कौतुक आणि चौथ्या बाजूने लोकसंख्या वाढण्यासाठी चार चार लग्न करून अनिर्बंध पोरे पैदा करणे. असा चोहीबाजूने छुपा हल्ला चालू आहे. इंग्लंडची वाट लावलीच आहे. युरोपातील बहुतांश देश येत्या २५-५० वर्षात मुस्लिम बहुल होतील, बरेचसे मुस्लिम अधिपत्याखाली जातील. त्या देशातील स्थानिक लोकसंख्या कमी जन्मदरामुळे अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. त्यावर तथाकथित मानवतावादाच्या नदी लागून भरमसाठ मुस्लिम रेफ्युजी घेऊन ठेवलेत. आता ते लोक फुकटची वैद्यकीय सेवा आणि child केअर वर मजा मारत आहेत. हे पैसे स्थानिक जनता कष्ट करून जो टॅक्स भरते त्यातून येतात. जेव्हा मुस्लिम लोकसंख्या ३०% च्या वर जाते तेव्हा हे लोक शरियाची मागणी करतात. ते पण फक्त त्यांच्यासाठी नव्हे तर संपूर्ण प्रदेशात लागू करावा असा आग्रह होतो. जेव्हा ५०% च्या वर जाते तेव्हा तिथे बिगर मुस्लिमांचे जबरदस्तीने धर्मांतरण तरी चालू होते अथवा हत्याकांड चालू होते. त्यानंतर बिगर मुसलमानांचे तिथे राहणे अशक्य होऊन जाते आणि तो प्रदेश पूर्ण मुस्लिम अधिपत्याखाली जातो. हे लक्षात घ्या की नुसती त्यांच्या अधिपत्याखाली जायची प्रोसेसच निर्दयी आणि रक्ताळलेली नसून नंतर सुद्धा हे लोक तेवढेच निर्दयी व क्रूर आहेत.

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 19:55
https://en.wikipedia.org/wiki/Category:Islamic_terrorism_in_India यात भरपूर दुवे आहेत वाचून पहा, महिनाभर तरी लागेल. मग चर्चा करू. पण असे एका धर्माला नाव ठेवायचे नसते त्याने आपल्या पुरोगामित्वाचा धक्का पोहोचतो.

मनो गुरुवार, 02/21/2019 - 01:28
दोन प्रश्नांची उत्तरे देतो - ३. आदिल अहमद दर या आतंकवाद्याने स्फोटकांनी (IED) भरलेली जीप जवानांच्या बसवर आदळली. हा अतिरेकी स्फोटतत्ज्ञ समजला जातो (बातमी कुठे वाचली ते आठवंत नाही). मात्र खरा स्फोटतत्ज्ञ असा मरंत नसतो. तो पुढच्या स्फोटांच्या तयारीस लागतो. तर या आदिल अहमद दरचा आगापिछा काय? स्फोटके खरोखरीची IED होती का? तशी असल्यास आख्खी जीप आदळवण्याची गरज बहुधा नसावी. जीप आदळतांना दिशा निश्चित नसू शकते. IED स्फोटकांची दिशा बदलली तर परिणामकारकता कमी होते. आदिल अहमद हा स्फोटतत्ज्ञ नसून एक डोके भडकावलेला आणि साधन म्हणून वापरला गेला अतिरेकी होता. त्याला आय ई डी बद्दल माहिती होती कि नाही ते माहित नाही, पण या कृत्याचे बोलावते धनी वेगळे आहेत - अश्या वेळी आय ई डी कसा वापरायचा याची माहिती आणि प्रशिक्षण आय एस आय किंवा अफगाणी तालिबान यांच्याकडून मिळते. स्फोटके स्थानिक, चोरून अथवा इतर मार्गानी जमवतात. स्थानिक मदतनीस इतर व्यवस्था (गाडी वगरे) करतात. प्रत्येकाला पूर्ण प्लॅन माहित नसतो - तो प्लॅन सीमेपलीकडून आखला जातो आणि प्रत्येकाला त्याचा भाग फक्त माहिती असतो. त्याने लाल रंगाची मारुती कार वापरलेली आहे, जीप नव्हे. फोटो पाहिलेत तर तुम्हाला त्यात लाल रंगाचे छोटे कारचे तुकडे दिसतील. प्राणहानी स्फोटामुळे नाही, तर shrapnel मुळे झाली आहे. त्यामुळे दिशा वेगळी असली तरी त्याने फरक पडलेला नाही. ४. बसवर गोळीबाराच्या खुणा दिसताहेत. स्फोटासोबत गोळीबारही झाला काय? म्हणजे दहशतवाद्यांचा पूर्ण चमूच सक्रीय होता काय? गोळीबार नाही, त्या shrapnel च्या खुणा आहेत. अश्या वेळी या घटनेमागचे मदतनीस कोण, बोलावते धनी कोण याचा पूर्ण तपास जर लावला तर आपल्याला पाकिस्तानवर पुराव्यानिशी आरोप करता येतील. पण हे पुरावे मिळणे अर्थातच फार अवघड असते.

In reply to by मनो

राघव Tue, 02/26/2019 - 21:58
१. हे सैनिक नसून निमलष्करी दलाचे जवान होते. सेनेची माणसं नेआण करायची काटेकोर चाकोरी (routine) असते. अशी काही पद्धती या दलाची होती का? हे सर्वस्वी सेनेवर अवलंबून असून सेना त्या त्या परिस्थितीत योग्य तो निर्णय घेत असते. त्यात आपण इथं खल करत बसण्यानं खरंच काही उपयोग नाही. २. एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे नक्षल्यांनी ७६ निमलष्करी जवान हल्ला करून ठार मारले. त्यापासनं काही धडे घेतले गेले होते का? ते विसरले गेले का? या प्रकाराला अँबुश अटॅक म्हणतात. हा कधीही, कुठेही, कुणावरही होऊ शकतो. जसं हार्ट अटॅक आलेला समजण्याआधी अनेक अटॅक येऊन गेलेले असतात आणि त्यांना शरीर सांभाळून घेतं, त्यासारखं. असा अटॅक येतो तेव्हा योग्य मदत मिळाली तर तोही परतवून लावता येतो. अर्थात् संपूर्ण सुरक्षीत कुणीच / कधीच नसतो. त्यामुळे अशा अटॅक्समुळे गुप्तचर यंत्रणा सपशेल अपयशी ठरली असं मकुणीच, मला तरी योग्य वाटत नाही. सर्वजण आपापल्या परीनं पूर्ण प्रयत्न करतच असतात, नाही तर पावलोपावली अटॅक्स झाले असतेत. जे अशा अपयशाच्या नावानं बोंब मारतात, ते सरकारला नव्हेत तर सेना, गुप्तचर यंत्रणा आणि समग्र संरक्षण यंत्रणेला नावं ठेवत असतात. या प्रकाराला शुद्ध कृतघ्नपणा असंच म्हणतात. एक मुखबीर नावाचा चित्रपट आहे, तो बघावा अशा लोकांनी.. चित्रपट असला तरी इतका अंगावर येतो.. प्रत्यक्षात कसं असेल याची आपल्याला कल्पनाही येऊ शकत नाही. ५. राजकीय परिणाम : मोदी म्हणाले की जवानांचं बलिदान वाया जाणार नाही. समजा जर भारताने बदला घेतला तर तो अधिकृतपणे जाहीर होईल काय? झाल्यास त्याचे राजकीय परिणाम काय होतील? कोणताही समर्थ देश हे जाहीररित्या करेल. त्याला असलं काही लपून करण्याची गरज नाही. जसं इस्रायल. आता भारतही. म्हणतांना खरंच अभिमान वाटतोय. :-) ६. नुकतंच काही दिवसांपूर्वी अजित दोभाल यांनी एक वक्तव्य केलं हे आत्ताचं नाही. जानेवारी २०१४ मधे हे वक्तव्य प्रसारित झालेलं मला चांगलं आठवतंय. मी तो विडिओ बघितलेला आहे. या तीन पातळ्यांपैकी कोणत्या पातळीवर कृती केली जाईल? आज केलेला स्ट्राईक हा ऑफेन्सिव्ह डिफेन्स याच प्रकारात मोडतो. उरीचा बदलाही असाच. पण एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे. आंतरराष्ट्रीय दबाव, आर्थिक नाकेबंदी, शत्रूच्या मित्रदेशांशी हातमिळवणी करून शत्रूला एकटे पाडणे, संरक्षण दलांना पूर्ण मोकळीक, कडक गुप्तचर यंत्रणांचे जाळे... हे सगळे नाही अशी कल्पना करा आणि मग ह्या प्रकारच्या स्ट्राईकची कल्पना करा.. उरीच्या बदल्याच्या वेळेसच मोठ्या युद्धाला तोंड फुटले असते. अचूक नियोजन करून, बिनचूक अटॅक करणे आणि शत्रूदेशाची सीमा ओलांडून ३०० ते ३५० अतिरेकी एकरकमी मारणे, हे गुप्तचर यंत्रणांच्या निर्भेळ यशाचेच द्योतक आहे. जाता जाता: मला स्वतःला असं वाटतंय की हा बालाकोटचा हल्ला पुरेसा राहणार नाही. आणिकही काही होईल. काय त्याची कल्पना नाही अर्थात्.. अवांतरः कलम ३७० कधीही रद्द करता येऊ शकते. https://www.youtube.com/watch?v=OcEpkuNZEqQ मला ३५ अ / ब याबद्दल माहिती हवी आहे. असल्यास सांगावे. राघव

सुबोध खरे गुरुवार, 02/21/2019 - 09:30
आपल्याला पाकिस्तानवर पुराव्यानिशी आरोप करता येतील. हा एक गैरसमज आहे तुम्ही वाटेल तो पुरावा द्या पाकिस्तान तो मान्य करणारच नाही. India

will not submit any evidence to Pakistan

on the role of Jaish-e-Mohammad in the Pulwama terror strike, and instead give all such facts to friendly nations to unmask the role of elements based in the neighbouring country in the attack, a senior government official said. The official was sharing the views within the government, which is not at all in favour of giving any evidence to Pakistan considering the past experience when despite giving multiple dossiers on the involvement of Pakistan-based elements in the 26/11 Mumbai terror attacks and terror strike in Pathankot airbase, Islamabad did nothing to punish the perpetrators. https://www.business-standard.com/article/pti-stories/india-won-t-give-proof-to-islamabad-but-to-friendly-nations-to-unmask-pak-role-in-terror-official-119022000941_1.html तपासाचा मूळ हेतू हा आहे कि गुन्हा कसा घडला त्याची पार्श्वभूमी त्याची पद्धत(MODUS OPERANDI) त्यात हातभार लावणारे घरभेदी कोण आहेत त्यांचा छडा लावणे हा आहे. पाकिस्तानला कितीही पुरावा दिला तरी ते ग्राह्य धरणार आहेत का? अजमल कसाबला जिवंत पकडल्यावर(प्रत्यक्ष पुरावा असताना) तो पाकिस्तानी नागरिक नाहीच म्हणून सांगितले मग परिस्थितीजन्य पुराव्याचा काय उपयोग?

In reply to by मनो

ट्रेड मार्क गुरुवार, 02/21/2019 - 19:07
घरभेदी कोण असावेत याचा अंदाज येण्यासाठी खालील लेख वाचा लेख १ लेख २ वरील लेखामधील एक परिच्छेद - २०११ च्या सुमारास अकस्मात एक बातमी भारतीय माध्यमातून झळकली आणि राजकारणात एकच खळबळ उडालेली होती. संरक्षणमंत्र्यांच्या फ़ोनवरील संभाषणही चोरून ऐकले जात असल्याची ती बातमी होती. तो आक्षेप भारतीय लष्कराच्या गुप्तचर विभागावर ठेवण्यात आलेला होता. त्याखेरीज आणखी एक अशीच अफ़वा वर्तमानपत्रातून सोडली गेलेली होती. प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने सेनादलाच्या अनेक तुकड्या राजधानी दिल्लीत संचलनाचा सराव करीत होत्या. त्याचवेळी उत्तरप्रदेशाच्या मेरठ येथून काही सेनादलाच्या तुकड्या इतरत्र कुच करीत होत्या. त्यातून भारतीय लोकशाही उलथून टाकत सेनादल सत्ता काबीज करायच्या प्रयत्नात असल्याची ती अफ़वा होती. तिला कुठलाही आधार नव्हता आणि गोंधळ उडवून देण्याचाच त्यामागचा हेतू होता. तो मोठ्या प्रमाणात यशस्वीही झाला. कारण तितके निमीत्त साधून दिल्लीची नोकरशाही, राजकारणी व तथाकथित बुद्धीमंतांनी मोठा हलकल्लोळ माजवला आणि तेव्हाचे लष्करप्रमुख व्हॊ. के. सिंग यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यात आले. उपरोक्त दोन बातम्या भारतीय सुरक्षा दलाच्या विविध दक्षता यंत्रणांना उध्वस्त करणाचा व्यापक कट होता. कारण तेव्हा सिंग व संरक्षणमंत्री अन्थोनी यांच्यात मतभेद निर्माण झाले होते आणि त्याचाच आधार घेऊन गलिच्छ राजकारण खेळले जात होते. माध्यमातून मग सिंग यांना सरसकट लक्ष्य करण्याची मोहिमच हाती घेण्यात आली. काश्मिरातील पाकवादी प्रवृतीच्या राजकारण्यांनी तोफ़ा डागल्या. सिंग लष्करी अधिकारी आणि संरक्षण खात्याचा पैसा वापरून काश्मिरी राजकारणात ढवळाढवळ करीत असल्याचाही एक आरोप त्यात समाविष्ट होता. त्यासाठी मग टीएसडी हा शब्द पुढे आला, ही टीएसडी म्हणजे टेक्नीकल सपोर्ट डिव्हीजन गुप्तचर म्हणून काम करीत नसून काश्मिरातील लोकांनी निवडलेले सरकार पाडण्यासाठी उचापती करीत असल्याचा आरोप पुढे आला. लष्करी पैसे देऊन एक अपक्ष आमदाराला खरेदी करण्यात आल्याचा बिनबुडाचा आरोप ठळकपणे पुढे आला आणि त्याचा कुठलाही पुरावा कधीच कोणी दिलेला नव्हता. पर्यायाने टीएसडी ही गोपनीय बाब चव्हाट्यावर आली आणि तिचा गाशा सेनादलाला गुंडाळावा लागला. त्यात कार्यरत असलेल्या अधिकारी व हस्तकांचे चेहरे उघडे पडले आणि अनेक अधिकारी कोर्टमार्शलचे बळी झाले. पण ती बाब महत्वाची नाही. त्यातून काश्मिरात गुपचुप जी कारस्थाने शिजवलॊ जात होती, त्यांची इत्थंभूत माहिती सेनादलाला मिळण्याचा मार्गच बंद होऊन गेला.

Rajesh188 गुरुवार, 02/21/2019 - 10:36
Kashmir आणि खलिस्तान ह्याची तुलना केली तर दोघांना सुधा स्वायतत्ता हवी होती . आणि संघर्षाचं कारण उघड तरी दोघांचं होते . मग खलिस्तान प्रश्न मिटवता आला परंतु काश्मीर धागगत राहायला ह्या मधून आसा पण निष्कर्ष निघतो की हा काश्मीर शी संबंधित प्रश्न नसून dharmikteshi संबंधित प्रश्न आहे आणि त्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म आघाड्या उघडलेल्या आहेत पण आपण फक्त ऐकाच आघाडीवर लक्ष केंद्रित केले आहे त्या मुळे तो सुटत नाही . ऐक तर्क आसा सुधा करता येतो सध्य परिस्थिती बघून

In reply to by अर्वाच्य

सिद्धार्थ ४ गुरुवार, 02/21/2019 - 11:18
तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही बोलता का हो?आज वर म्हात्रें काकांनी मिपा वर एकही खोटा किंवा असंतुलित प्रतिसाद मी तरी वाचला नाही आहे.

In reply to by अर्वाच्य

lakhu risbud गुरुवार, 02/21/2019 - 12:24
बा अर्वाच्च्या तु मिपा वरुन हाकलुन लावलेल्या ज्या कोणाचा आय डी आहेस तुझी हकालपट्टी ही तुझ्याच कर्माने झालेली आहे या याबद्दल निश्चिन्त रहा . ती का झाली असावी याचाही अंदाज आता यायला लागला आहे. म्हात्रे कांकांवर खोटारडे पणाचा आरोप त्यांच्या विचारसरणीचे विरोधकही करणार नाहीत.. जर तू डोक्यावर पडला असशील तर बाबच वेगळी आहे !

In reply to by lakhu risbud

विशुमित गुरुवार, 02/21/2019 - 13:11
अगदी बरोबर..!! शेवटी एक मिपाकरच दुसऱ्या मिपाकराच्या मदतीला येणार. खांद्यावर डोके वगैरे वगैरे..! आपल्या कांकांवर खोटारडे पणाचा आरोप म्हणजे काय ! जाहीर निषेद..! ===

In reply to by विशुमित

lakhu risbud Mon, 02/25/2019 - 15:23
इथले काका त्यांचे ते बघण्यास समर्थ आहेत हो ! तुम्ही तुमच्या काकांची काळजी करा.पुतण्याला तोंडघशी पाडलंन त्यांनी. मावळातून लढायचं म्हणे पर्यंत कात्रज चा घाट दाखवलान. तुम्हाला आता प्रचाराचा ओव्हरटाईम कसा जमणार ते बघा.

In reply to by lakhu risbud

विशुमित Mon, 02/25/2019 - 15:48
अस कस अस कस.. आपले सन्मानीय काका देखील डू आय डी चा सहारा घेत आहेत, असे जाणवते आहे. बाकी आमच्या तालुक्यातील काका पुतणे त्यांच ते बघून घेतील. तुम्ही कशाला लुडबुड करताय? चिरीमिरीसाठी एवढा निर्लज्जपणा?? अरेरे...!!

In reply to by lakhu risbud

शब्दबम्बाळ गुरुवार, 02/21/2019 - 16:12
जिथे तिथे व्यक्तिपूजाच करणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा करणार! म्हात्रेंनी वरती व्हिडीओ लिंक शेअर केली आहे ती फेक बातमी आहे, मजकूर खुबीने टाकलाच नाहीये म्हणजे असे नको व्हायला कि काही स्वतः काहीतरी लिहून जबाबदारी घ्यायला लागावी! हे आधी पण काही ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे असे होऊच्च शकत नाही टाईप प्रतिसाद तुमच्यापाशी ठेवा! बाकी जास्त काही बोलायला नको नाहीतर "जिएसटी च्या धाग्यावर त्यांनी चुकीचे टॅक्स टेबल टाकून स्वस्ताई दाखवायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा संक्षींनी व्यवस्थित विरोध केला होता आणि HSN का काहीतरी नंबर मागितला होता. जो कि द्यायला जमला नाही पण संक्षींना घालून पाडून बोललं गेलं! सोबतीला इतर सवंगडी आलेच लगेच... १-२ दिवसातच संक्षींचा आयडी देखील बॅन झाला!" असो, आताशा इकडे येणे कमीच केले असल्याने स्वतःच्या आयडीबद्दल फारसे ममत्व राहिलेले नाही त्यामुळे चालू द्यात काहीही! ट्रोल्सचे पीक चिखलात उत्तम येत आहे.

In reply to by अर्वाच्य

शब्दबम्बाळ गुरुवार, 02/21/2019 - 18:29
द्वेषातुन प्रतिसाद देण्याची काही गरज नव्हती असे वाटते... त्यांनी केलेल चांगले लिखाण हे चांगलेच आहे.. जिथे चुक वाटते तिथेच बोलणे संयुक्तिक असावे

In reply to by शब्दबम्बाळ

शब्दबम्बाळ Fri, 02/22/2019 - 14:09
अर्वाच्य हा आयडी इतक्यात बॅन पण झाला! केवढं ते स्पीड! इथले बरेच मान्यवर आयडी इतरांची लायकी/पगार काढून, शिवीगाळ करूनही कवच कुंडले पांघरून सुरक्षित राहतात असे दिसतंय! असेही खाजगी संस्थळ आहे म्हणा! पण मग जाहीर करून टाका ना, की या या आयडीना स्पेशल प्रोटेक्शन योजना आहे, बाकी लोकांनी काहीही बोलू नये अन्यथा १ दिवसाच्या आत हकालपट्टी होईल. याशिवाय फेक न्यूज पसरवल्याबद्दल अवाक्षर देखील काढलेलं नाहीये अजून कोणी! पुरावा दिल्यावर आता सवंगडी आणि फॉलोवर गायब झाले वाटत...

In reply to by शब्दबम्बाळ

यशवंत पाटील Fri, 02/22/2019 - 14:25
म्हणून गपगुमान बस्तो. काही लोकांनी कायबी लीहीलं तर चालतंय हिकड. अट एकच मोदीशेठला चांगलं म्हणा. म्हात्रे साहेब न ते दुसरे खरे साहेब यांना आवरा अस कुणी सांगायच आन कुणाला. ते गुर्जी का कोण आन ते मोदक साहेब न्हाईत वाटत आजकाल.

In reply to by शब्दबम्बाळ

विशुमित Fri, 02/22/2019 - 14:39
संपादक मंडळ- आय डी बॅन बाबत काही पारदर्शकता आणता येउ शकते का ? नाहीतर मिपा हे २०१९ च्या निवडणुकीपर्यंतच स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवू शकेल. कृपया याला कोणी "गर्भित धमकी" वगैरे असली विशेषणे लावू नका. कारण ती मी फाट्यावर मारत असतो. मला फक्त मिपाची काळजी आहे. विविध वाङ्मय रसग्रहणाची हक्काची जागा म्हणून मी या संकेतस्थळाकडे आज पर्यंत तरी पाहिले आहे.

In reply to by विशुमित

शब्दबम्बाळ Mon, 02/25/2019 - 10:50
अहो संपादक मंडळाला विनंती करताय पण त्यात कोण आहे पाहिलंय का? :) बर मागे कोणीतरी म्हटलं होत कि संपादक मंडळाला अधिकार नाहीत हकालपट्टीचे, पण "वट्ट" असला कि कोण काय बोलणारे?! ;) इतरांनी चुकीची बातमी दिली(जी फक्त भाजपशी रिलेटेड असेल) तर पानभर लिहितील समोरच्याला उपदेश! पण स्वतः दिलेली सगळी माहिती चुकीची निघाल्यावर खेद व्यक्त करायला पण जमत नाही! ब्रम्हांडनायकाकरून हि गोष्ट तेव्हडी चांगली शिकून घेतलीये त्यांच्या फोल्लोवर्सनी!

In reply to by lakhu risbud

विशुमित Mon, 02/25/2019 - 16:01
तुम्हाला सदाशिव पेठेत जायचे असताना बारामतीच्या एस टी त कसे काय बसता?? काही केमिकल लोचा आहे का?? === अवांतर- काही महाभाग वारसाहक्काने मिळाल्यासारखं मिपावर वावरत असतात. प्रत्यक्षात ही अशी बांडगुळं, स्वतःचा अजेंडा राबवायला मिपाचा गैरवापर करत आहेत. हे मी एकटाच नाही म्हणत तर मिपावरील आजीमाजी सदस्य खाजगीत बोलत असतात.

In reply to by विशुमित

lakhu risbud Tue, 02/26/2019 - 13:03
असे हिसके मारू नका हो ! गळ्यातला पट्टा अचानक दिसतो हो. अवांतर- काही महाभाग वारसाहक्काने मिळाल्यासारखं मिपावर वावरत असतात. प्रत्यक्षात ही अशी बांडगुळं, स्वतःचा अजेंडा राबवायला मिपाचा गैरवापर करत आहेत. हे मी एकटाच नाही म्हणत तर मिपावरील आजीमाजी सदस्य खाजगीत बोलत असतात. स्वतःबद्दलचे एवढे अचूक आणि परखड निरीक्षण करणारे आजकाल विरळच ! मिपाकर म्हणून तुमच्या प्रगतीबद्दल अभिमान वाटला.

In reply to by lakhu risbud

विशुमित Tue, 02/26/2019 - 13:25
असे हिसके मारू नका हो ! गळ्यातला पट्टा अचानक दिसतो हो. ==)) अस होय, सोर्री सॉरी. उगाच हिस्के मारले तुम्हाला. त्यां मेनका मैडम यायच्या धावत. तुम्हाला दुखलं असेल ना! === बाकी वरचं विश्लेषण तुमच्यासाठीच होते. वाटले होते तुम्हाला समजले असेल पण तुम्हाला एस टी चा बोर्डच नाही समजत तर हे कुठले समजायला. असो. आता तरी समजलं असेल अशी आशा करुयात. आता तुम्हाला युयु करतोय, परत आला की हाड हाडच असणार आहे ...!

In reply to by lakhu risbud

तेजस आठवले Tue, 02/26/2019 - 15:00
प्रत्यक्षात ही अशी बांडगुळं, स्वतःचा अजेंडा राबवायला मिपाचा गैरवापर करत आहेत. हे मी एकटाच नाही म्हणत तर मिपावरील आजीमाजी सदस्य खाजगीत बोलत असतात.
हे वाक्य अप्रतिम आहे, पण ते प्रत्येकालाच लागू होते ह्याची नोंद घ्यावी. वारसाहक्काने कुठले आयडी स्वतःच्या प्रतिकृती काढून येत आहेत हे सगळ्यांनाच माहित आहे.बिग्रेडी अजेंडा राबवणारे ह्याला अपवाद नाहीत.

In reply to by शब्दबम्बाळ

एकुलता एक डॉन Mon, 02/25/2019 - 02:24
जिएसटी च्या धाग्यावर त्यांनी चुकीचे टॅक्स टेबल टाकून स्वस्ताई दाखवायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा संक्षींनी व्यवस्थित विरोध केला होता आणि HSN का काहीतरी नंबर मागितला होता. जो कि द्यायला जमला मला फक्त जिएसटी माधे इन्तेरेस्त आहे ,कोनि धाग सन्गु शकेल कोन्त आहे ?

Blackcat गुरुवार, 02/21/2019 - 17:38
२०१४ पासून काश्मीरमध्ये दर दोन दहशतवाद्यांमागे एक जवान शहीद https://www.loksatta.com/desh-videsh-news/since-2014-in-kashmir-for-every-2-militants-killed-forces-lost-1-of-its-men-1845217/

Blackcat गुरुवार, 02/21/2019 - 19:31
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सैनिकांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सर्व केंद्रीय सुरक्षा दलांना आता जम्मूहून श्रीनगरला नेण्यासाठी विमान प्रवासाची सेवा पुरवली जाणार आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार आता बीएसएफ, आसाम रायफल्स, सीआरपीएफ, सीआयएसएफ, एसएसबी, एनएसजी आणि आयटीबीपीच्या जवानांना काश्मीर खोऱ्यात तैनातीसाठी हवाईमार्गे श्रीनगरला नेलं जाणार आहे. सुट्टीवर जाताना, सुट्टीवरुन परतताना किंवा सुरक्षा दलाच्या पथकाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी हवाईमार्गाचा वापर केला जाणार आहे. दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली आणि जम्मू-श्रीनगर व श्रीनगर-दिल्ली या मार्गावर विमान सेवेचा वापर केला जाईल. जवळपास 7 लाख 80 हजार जवानांना याचा लाभ मिळणार, केंद्रीय गृहमंत्रालयाचा हा निर्णय तात्काळ लागू होणार आहे. यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/after-pulwama-attack-govt-allows-air-travel-for-jawans-of-crpf-and-other-forces-deployed-in-kashmir-1845151/ मिस्ळ्पावचे तज्ञ तोण्डघशी पडले.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ गुरुवार, 02/21/2019 - 19:49
मिस्ळ्पावचे तज्ञ तोण्डघशी पडले. हे बघण्या आधी भाजपा सरकारला सैनिकांची सुरक्षा व त्यांचे जीव हे जास्त महत्वाचे आहेत हा महत्वाचा संदेश दिलेला आहे. त्यामुळे जवळपास ८ लाख सैनिक हे श्री मोदीजींचे फॅन झालेले आहेत. सैनिकांच्या रक्ताची दलाली करणार्यां काँग्रेसला व अश्या पक्षाची दलाली करणार्या निर्बुद्धाला हे कळणार नाही !!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

गामा पैलवान गुरुवार, 02/21/2019 - 21:43
ए माझ्या काळ्याकुट्ट मनीमावट्ये, तू कित्तीकीत्ती गोंडस आहेस, अगदी त्या पप्पूसारखी गं! पण तू किनई त्याच्यारखा बथ्थडपणा करू नकोस हं. विमान म्हणजे काय गं माऊ? हे वाक्य 'दारू म्हणजे काय रे भाऊ' याच्या धर्तीवर शंभर वेळा बडबडून बघ. मग तुला विमान आणि हेलिकॉप्टर यांच्यातला फरक आपोआप कळून येईल. तु. न., -गा.पै.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे गुरुवार, 02/21/2019 - 20:26
७ लाख ८० हजार एका सुटीच्या वेळेस होणारे ४ हजार येण्यासाठी आणि ४ हजार जाण्यासाठी असे ८ हजार प्रत्येकी म्हणजे ६२४ कोटी रुपये एका सुटीला देणे सरकारला ( आणि पर्यायाने जनतेला) परवडणार आहे का? वर्षात तीन वेळेस जवानांना सुटी मिळते याच्या तिप्पट खर्च शक्य आहे का? आणि असल्यास एवढी विमाने कोणाकडे आहेत? आणि आता श्रीनगर च्या विमानांचे आरक्षण मिळणे अशक्य होणार आहे. वायुदलाची किंवा एअर इंडियाची विमाने गृह खात्याकडून वापरली तर त्याचे पैसे तर द्यावेच लागतील अर्थ खात्याची मंजुरी मिळेल का? हा एक मोठा प्रश्न आहे. नि जर्क रिऍक्शन आहे एवढेच मी म्हणेन.

Blackcat गुरुवार, 02/21/2019 - 20:37
हल्ला झाला तेंव्हा महामहिम जिम कॉर्बेट पार्क मध्ये फोटो शूट करत होते म्हणे , असे सर्वत्र येत आहे, खरे आहे का ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

विशुमित Fri, 02/22/2019 - 13:52
त्यांना खराब हवामानामुळे उशीरा संदेश पोहचला, असे स्पष्टीकरण आले आहे. === ते पिश्चर मधे दाखवतात तसा रेडिओ सेट नव्हते का त्यांच्या ताफ्यात?? "अल्फा टॅगो चार्ली, ओव्हर ऍण्ड आऊट..!!""

प्रसाद_१९८२ गुरुवार, 02/21/2019 - 21:05
हल्ला झाला तेंव्हा महामहिम जिम कॉर्बेट पार्क मध्ये फोटो शूट करत होते म्हणे , असे सर्वत्र येत आहे, खरे आहे का ? -- असा हल्ला होईल, हे काय स्वप्नात आले होते का त्यांच्या ? -- तो कॉंग्रेसी सुरजेवाला डोक्यावर पडलेला माणूस आहे, फार लक्ष नका देऊ तुम्ही त्याच्याकडे.

In reply to by प्रसाद_१९८२

डँबिस००७ Fri, 02/22/2019 - 14:51
भ्रष्ट काँग्रेस सुरझेवाला , दिग्विजय सींग , मणी शंकर अय्यर सारख्या लोकांमुळे बुडणार आहे !!

या हल्ल्यामुळे सर्व सुरक्षासंस्था (सैनिकी, निमसैनिकी आणि मुलकी) चिडलेल्या असणारच. मात्र, कोणतीही सक्षम आणि विकसित व्यक्ती अथवा संस्थेची प्रतिक्रिया चिडीची व प्रतिक्षिप्त (नी जर्क) नसते. ते काम पूर्ण विचारांती आणि आपण ठरवलेल्या वेळ, स्थळ आणि पद्धतिने करायचे असते... तसे केले तरच स्वतचे शून्य/कमीत कमी नुकसान व शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान/बिमोड करणे शक्य असते. डोके गरम करून केलेली कृती स्वतःचेच जास्त नुकसान करते. पंतप्रधानांनी, त्यासंबंधी आज आणि अगोदरही अनेक संकेत दिलेले आहेतच. तेव्हा, शत्रूची आणि स्वतःची कशी परिस्थिती आहे हे माहीत नसता, उगा तर्क/वितर्क न करता थोडीशी कळ सोसणे आणि नंतर घडलेली सत्य परिस्थिती पाहणे हेच उचीत ठरेल. केवळ, "माझ्या मते काय कृती करावी" असा अपुर्‍या माहीतीवर आधारलेली (uninformed) मागणी/विधान करायचे असले तर, ठीक आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@ गामा पैलवान तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणे सुरू झाले आहे... मात्र, ही फक्त चांचणी परिक्षा आहे. ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यामधले दोन गर्भित संदेश जाणून घेण्याजोगे आहेत... १. उध्वस्त केलेल्या ३ अतिरेकी कँप्सपैकी एक बालाकोट येथिल कँप पाकिस्तानी भूमीवर (पाकव्याप्त काश्मीरमध्ये नाही) आहे (म्हणजे होता, आता १००० किलो वजनांच्या लेझर गायडेड बाँब्जनी नष्ट झाला आहे). ३. एकूण सुमारे २४५ अतिरेकी मारले गेले आहेत. त्यांत, कंदाहार विमान अपहरणात सामील असलेला, मसूद अझरचा जवळचा नातेवाईक मारला गेला आहे. ३. इतकी मोठी सैनिकी कारवाई झाली असूनही पंतप्रधानांनी त्यांचा आजचा एकही कार्यक्रम बदलला नाही. यामधील, त्यांची राजस्थानात चुरू येथे असलेली सार्वजनिक राककिय सभा सुरू झाली आहे. हा पाकिस्तानला, "तू चिलट आहेस. तुला भारत सहज चिरडू शकतो. आजची कारवाई आमच्यासाठी फार साधी आहे.", असा संदेश आहे.

दिगोचि Sat, 02/16/2019 - 05:26
प्रथम म्रुत जवानाना श्रद्धान्जली. सरकार त्यान्च्या कुटुम्बियान्ची उत्तम सोय करेलच ही खात्री आहे. या हल्ल्यात वापरलेली ३५० किलोग्राम स्फोटके काश्मिरात कोठून व कशी आली किसाठवली होतीम्वा येऊ शकली याचा शोध करणे जरूर आहे. तसेच ती आल्यावर कोठे साठवली होती. तसेच इन्टरनेटवरून कोणाशी सम्बन्ध होते हे पण जाणणे जरूर आहे. पाकीस्तानवर हल्ला करायचा असेल तर तो पूर्ण विचार करून करावा. असा हल्ला केला तर त्यासाठी पाकिस्तान तयार असेल व त्यात अनेक सैनिक शहिद होतिल त्याचा परिणाम सरकारवर पर्यायाने मोदीवर म्हणजे होणार्या निवडणुकीवर होईल. सध्या तरी पाकिस्तानवर इतर राष्ट्राकडुन दडपण आणणे, पाकिस्तानी नागरीकाना व्हिसा देणे बन्द करणे वगैरे उपाय करावे.

Rajesh188 Sat, 02/16/2019 - 08:27
निमलष्करी दल आसेल किंवा लष्करी दल आसेल जेव्हा ऐका जागेवरून दुसऱ्या जागेकडे पाठवले जाते तेव्हा त्याचे नक्कीच काहीतरी नियम आसतात .त्यात काश्मीर हा सवेदनशिल भाग आहे म्हणजे तिथे अजून कडकं नियम असणार.पण हयात ज्या मार्गे फोर्स प्रवास करणार आस्ते तो रस्ता सुरक्षित आहे का ह्याची तपासणी केली जाते तशी आता पण केली असणार . ज्या हायवे ज्या चेक पोष्ट होत्या त्या काही कारणाने local सरकारनी हटवल्या होत्या आस मी वाचलं आहे . आणि आपल्याकडे संसाधन ची कमी असल्या मुळे रस्ता खराब जरी आसेल तरी हवाई मार्गे सैन्य पाठवायला मर्यादा आहे . आता ह्या हल्ल्या नंतर जी कारवाई होईल ती गुप्त असणार आणि आसली पाहिजे .आणि हा विषय राजकारणासाठी कोणीच वापरू नये ह्या मध्येच देश हित आहे

In reply to by Rajesh188

ज्या हायवे ज्या चेक पोष्ट होत्या त्या काही कारणाने local सरकारनी हटवल्या होत्या आस मी वाचलं आहे . हे मुख्य दुखणे आहे, जे हितसंबंधी माध्यमे जनतेसमोर आणत नाही. काही काळापूर्वी, जम्मू-कश्मिरमध्ये, बॅरिकेड उभारण्यासाठी कडक नियमावली होती. त्या वेळेस स्वतःला महत्वाचा समजणारी एक व्यक्ती (आता नाव आठवत नाही) बॅरिकेडवर थांबणे म्हणजे अपमान समजली आणि तिने दोन बॅरीकेड्सना धडक देऊन गाडी पुढे काढली. तिसर्‍या बॅरिकेडला तो धडक मारत असताना तेथे असलेल्या सुरक्षासैनिकाने, अर्थातच, त्याच्यावर गोळीबार केला. त्यात ती व्यक्ती मरण पावली. या घटनेवर, त्याकाळी मुख्यमंत्री असलेल्या मेहबुबा मुफ्ती आणि (अर्थातच) मानवतेच्या तथाकथित पाठीराख्यांनी, गदारोळ केला. त्या सुरक्षासैनिकावर खटला भरला गेला आणि त्याला शिक्षा होऊन तो आता (बहुदा तिहार) तुरुंगात खितपत पडला आहे. त्यानंतर, Confidence building च्या नावाखाली सुरक्षादलांच्या बॅरिकेड्स उभारण्याच्या कृतीवर लक्षणीय बंधणे घालण्यात आली. इतर कारणांबरोबरच या कारणामुळे, पुलवामा येथे, अतिरेक्याला कॉन्व्हॉयच्या जवळ जाणे शक्य झाले. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता बॅरिकेड्सचे नियम परत कडक केले जात आहेत, अश्या बातम्या आहेत.

In reply to by अर्वाच्य

Blackcat Tue, 02/19/2019 - 20:09
https://www.indiatoday.in/fact-check/story/fact-check-viral-claim-that-mehbooba-sent-army-jawans-to-tihar-is-false-1459230-2019-02-18 Fact Check: Viral claim that Mehbooba sent Army jawans to Tihar is false BJP leader Subramanian Swami also claimed that the "army jawans were prosecuted and are still in jail". घटना झाली , केस झाली , गोळी घालणार्याला तिहारला नेलेदेखील , रेशीमरेघी मंद लोक खोट्या बातम्या लिहितात की जावेद अख्तरच्या सिनेमाची स्टोरी !!! तीन तासात स्टोरी खल्लास!! अजून एका बातमीत , न थांबणार्या जीपवर सुरक्षाकर्मिने टायरवर गोळी झाडली , पण त्यात काही आक्षेपार्ह मिळाले नसल्याचे दिले आहे,

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

राजाभाऊ Wed, 02/20/2019 - 06:38
काळीमाऊ, तुम्ही दिलेल्या लेखातलाच हा परिच्छेद - >>We reached out to Gen. Bakshi about the claims that he made during the TV show. He admitted that he was wrong about his claim regarding the armymen languishing in jail. However, he insisted that the PDP government was responsible for relaxing the security checking procedures in the Valley which were earlier being followed. व्हेन यु अँड दि सो कॉल्ड प्रेस्टिट्युट्स आर गोइंग टु अ‍ॅडमिट/नोटिस एलिफंट इन दि रूम? इथे महत्वाचं काय आहे - जवानाला झालेली (किंवा न झालेली) शिक्षा कि सिक्युरिटी लॅप्समुळे घडलेली दुर्घटना? सेना दलांच्या बाबतीत तरी हा चूक/तो चूक या पक्षिय राजकारणांतुन वर उठण्याचा प्रयत्न करा...

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अर्वाच्य Wed, 02/20/2019 - 12:51
https://goo.gl/uP1CcQ दिलेलि लिन्क शन्तपने शेवटपर्यंत वाचा. आपले महामहिम ह्याच घटनेसाठी स्वतः श्रेय घेतांना दिसतील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

शब्दबम्बाळ Wed, 02/20/2019 - 13:50
मोदी सरकार पुलवामाच्या घटनेला कसे जबाबदार नाही हे दाखवण्याचा समर्थकांचा/भक्तांचा आटापिटा बघून कीव येते बिचाऱ्याची! आधी कुठलीही योजना मनासारखी झाली नाही कि काँग्रेस वरती ढाकळायचं धोरण होत आता हा हल्ला होऊन इतके जवान शहीद झाले तरी याना आपली कातडी वाचवायचं पडलं आहे फक्त! आणि इतर वेळी आम्ही कोणाचे झेंडे घेऊन फिरत नाही म्हणणारे मिपाचे विद्वान लोक हळूच "फेक न्यूज" ढकलवतात. परत कोणी सांगितलं हे खोट आहे कि म्हणता येतं कि "लोकांनी हे पाहून त्याची समीक्षा वगैरे करावी या उद्देशाने इथे दिले होते वगैरे!" आधी पोस्टकार्ड साईझ यायच्या आता साईझ मोठा आहे. वरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली घटना मुफ्तीच्या CM काळात झालीच नाहीए! जवानांना अटकसुद्धा झालीच नाहीये! त्यात कहर म्हणजे 2014च्या घटनेनंतर स्वतः जेटली यांनी ट्विट करून त्या घटनेचा दुःख व्यक्त करत कारवाईची हमी दिलेली होती. जेटली बीजेपीचे कि आणखी कोणाचे?? त्यावर कहर म्हणजे प्रधानसेवक "मला सेवा करायची संधी द्या" सांगायला जेव्हा 2014ला श्रीनगरला गेलेले तेव्हा मोठ्या तावात (जो की नेहमीच असतो म्हणा) "गेल्या ३०वर्षात कधी असे झाले नव्हते पण केवळ मी आल्यावर सेनेने जाहीर माफी मागितली आहे आणि ज्यांनी गोळ्या चालवल्या त्यांच्यावर केसेस दाखल केल्या गेल्या आहेत. हे फक्त माझ्या सरकारमुळे होऊ शकल आहे" असे स्पष्ट म्हणताना दिसतात. मग आता अचानक यु टर्न कसा घेतला बरे? आणि घटनेचं राजकारण करू नका म्हणायचं आणि बीजेपीचे अध्यक्ष म्हणतात "आमच्या पार्टीचं सरकार आहे काँग्रेसचं नाहीये म्हणून कारवाई होणार दोषी लोकांवर"

In reply to by शब्दबम्बाळ

विनोद१८ Sat, 02/23/2019 - 00:28
'वरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली घटना मुफ्तीच्या CM काळात झालीच नाहीए! जवानांना अटकसुद्धा झालीच नाहीये! त्यात कहर म्हणजे 2014च्या घटनेनंतर स्वतः जेटली यांनी ट्विट करून त्या घटनेचा दुःख व्यक्त करत कारवाईची हमी दिलेली होती. जेटली बीजेपीचे कि आणखी कोणाचे?? त्यावर कहर म्हणजे प्रधानसेवक "मला सेवा करायची संधी द्या" सांगायला जेव्हा 2014ला श्रीनगरला गेलेले तेव्हा मोठ्या तावात (जो की नेहमीच असतो म्हणा ) "गेल्या ३०वर्षात कधी असे झाले नव्हते पण केवळ मी आल्यावर सेनेने जाहीर माफी मागितली आहे आणि ज्यांनी गोळ्या चालवल्या त्यांच्यावर केसेस दाखल केल्या गेल्या आहेत. हे फक्त माझ्या सरकारमुळे होऊ शकल आहे" असे स्पष्ट म्हणताना दिसतात. मग आता अचानक यु टर्न कसा घेतला बरे?' वरच्या तीनही विधानां संबंधी पुरावे दिलेत तर मिपाकरांच्या ज्ञानात भर पडेल. जो प्रश्न गेल्या ७० वर्षापुर्वी निर्माण केला गेला आणि आजपर्यन्त सुटला नाही तो चुटकी सरशी सोडविण्याचा काही उपाय तुमच्याकडे आहे का ?? पुलवामाच्या घटनेची जबाबदारी सरकारने झिडकारली असे का वाटते ?? काय गेल्या ७० वर्षात यापेक्षा भयानक घटना / घातपात देशात झालेच नाहीत का ?? किती माणसे आणि सैनिक या काश्मीरसाठी देशाने गमाविलेत याची मोज्दाद केलीत काय कधी ?? आधी कुठलीही योजना मनासारखी झाली नाही कि काँग्रेस वरती ढाकळायचं धोरण होत आता हा हल्ला होऊन इतके जवान शहीद झाले तरी याना आपली कातडी वाचवायचं पडलं आहे फक्त! कुठे कोणी आणि कशी आपली कातडी वाचविलेली दिसली या प्रकरणी ?? जरा विस्ताराने लिहिलेत तर त्याला काही अर्थ आहे. मुळात ह्या काश्मीर प्रश्ण निर्माण कोणी केला, त्यावर आपले राजकारण कोणी केले हे कसे विसरता येइल.

गेल्या महिन्याभरापासून सी.आर.पी.एफ.वर अधून मधून हल्ले होतच होते. दुर्दैवाने लष्कर प्रमुखांनी "आम्ही कोणत्याही हल्ल्यास तोंड देण्यास तयार आहोत" असे एका प्रश्नाला उत्तर दिले होते. १ फेब्रुवारी- अनंतनाग येथे हल्ला (https://www.tribuneindia.com/news/jammu-kashmir/two-crpf-men-among-8-hurt-in-anantnag-grenade-attack/721944.html ) १८ जानेवारी ला श्रीनगरच्या लाल्चौकात हल्ला https://economictimes.indiatimes.com/news/defence/srinagar-militants-lob-grenade-near-crpf-bunker-in-lal-chowk/videoshow/67587830.cms ११ फेब्रुवारीला ग्रेनेड हल्ला - http://risingkashmir.com/news/4-cops-3-crpf-men-among-11-injured-in-palladium-grenade-blast-343653.html

In reply to by चौकटराजा

तेजस आठवले Wed, 02/20/2019 - 14:59
ह्या बातमीची लिंक मिळेल का? खरंच ते असं म्हणाले ? कठीण आहे. एवढेच काय, उद्या औरंगजेब, अफझलखान आणि गझनीचा मेहमूद ही टोपणनामे घेऊन अनुक्रमे जोशी, बापट आणि गोडबोले ह्यांनी भारतीय जनतेवर अनन्वित अत्याचार केले असे सुद्धा हे ब्रिगेडी लोक ठोकून देतील.

गामा पैलवान Tue, 02/19/2019 - 00:30
लोकहो, पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान व सैन्य जे करायला पाहिजे ते करेलंच. पण एक सामान्य माणूस म्हणून आपण काय करू शकतो, असा प्रश्न पडणं साहजिकंच आहे. माझ्या मते आपण घटनेतलं ३७० कलम रद्द करायचा आग्रह धरू शकतो. बऱ्याच गोष्टी सुरळीत होतील. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

भारतातले राजकीय नेत्रुत्व/यंत्रणा जेव्हा जेव्हा अपयशी ठरते तेव्हा "तुम्ही काय केले देशासाठी?" हा प्रश्न सामान्य मतदारांना नेहमी विचारण्यात येतो. " देश की सेना तो काम कर रही है. लेकिन आपने क्या किया देश के लिये?" इंदिरा गांधीनी दोन-तीन वेळा भाषणात विचारल्याचे स्मरते. असो. १)डिसेंबर पासून हल्ले होत असतना आपली गुप्तचर यंत्रणा गप्प राहिली.. वा अपयशी ठरली. यंत्रणेच्या प्रमुखाने/गृहखात्याने हे सांगायला हवे की नको? २) बी.एस.एफ./सी.आर.पी.एफ. ने डिसेंबरमध्ये मोठ्या संख्येने बसेसने नेण्यास विरोध केला होता. हॅलिकॉप्टरची मागणी केली होती. ती अमान्य झाली. काल सर्वपक्षीय बैठक झाली. ह्यात सर्वानी 'पलिकडून' दहश्तवाद्यांना मिळणार्या मदतीबद्दल धिक्कार केला. ह्या ठरावात "पाकिस्तान' हा उल्लेखही नाही. ! एवढे पोलिटिकली सेफ का? असो. चीन्/सौदी अरेबियाचे काय करायचे? चीन हफीझ सईदला दहशतवादी मानायला तयार नाही. आणी पाकिस्तान हे सर्व धंदे करतो हे माहित असूनही सौदीचे राजपुत्र काल पाकिस्तान भेटीवर गेले व प्रचंड आर्थिक मदतही जाहीर केली. सौदी-पाक मैत्री जुनी आहे. आज ते भारतात येत आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विशुमित Tue, 02/19/2019 - 10:41
असले अडचणीचे प्रश्न विचारयचे नसतात ग माई. घरचा मामला आहे. जनतेने फक्त मेणबत्या पेटवायच्या, जवानांच्या कुटुंबीयांना पेटीएम द्वारे दान करायचे ( खरंच चक्क एकजण असेच म्हटला "दान करायचे,"), ठरल्याप्रमाणे मुस्लिम, कश्मिरी तरूण आणि पाकिस्तानवर बिल फाडायचं. असो..

In reply to by विशुमित

इरसाल Tue, 02/19/2019 - 16:17
ठरल्याप्रमाणे मुस्लिम, कश्मिरी तरूण आणि पाकिस्तानवर बिल फाडायचं. असो.. यातुन ह्या लोकांनी काही केलेले नाही असा अर्थ निघतोय. आणी तुम्ही असं लिहीताय म्हणजे हे कोणी केलय याबाबत तुम्हाला माहिती असावी अस दिसतय. कॄपया सरकारला योग्य ती माहिती पुरवुन गुन्हेगारांना शासन होण्यास मदत करावी ही नम्र विनंती.

In reply to by विशुमित

डँबिस००७ Tue, 02/19/2019 - 23:00
असले अडचणीचे प्रश्न विचारयचे नसतात ग माई. घरचा मामला आहे. सर्व दलीय बैठकीत पाकिस्तानचा उ ल्लेख टाळणे म्हणजे अडचणीचे प्रश्न असतील तर चक्क काँग्रेसच्या उच्च पदस्थांनी बोललेले कोणाला सांगणार ? उदा, ओसामाजी लादेन जी, ( दिग्विजय सींग ) किंवा अफजल गुरुजी ( रणदीप सुरझेवाला) हा तर फक्त कॉग्रेसच्याच घरचा मामला होता.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुबोध खरे Tue, 02/19/2019 - 20:03
१)डिसेंबर पासून हल्ले होत असतना आपली गुप्तचर यंत्रणा गप्प राहिली.. वा अपयशी ठरली. यंत्रणेच्या प्रमुखाने/गृहखात्याने हे सांगायला हवे की नको? पुलवामा मध्ये यापूर्वी म्हणजे २०१८ मध्येच तीन वेळेस चकमकी झाल्या (३० एप्रिल, २९ जून आणि १५ डिसेम्बर) या गुप्तहेर खात्याच्या बातम्यांमुळेच झाल्या ना? कि लष्कर घराघरात शिरून रोज तपासणी करीत होते? १०० धागे दोरे मिळतात त्या सर्वांवर कार्यवाही होत असते पण प्रत्यक्ष एखादाच धागा ठोस पुराव्या सोबत असतो. एक लक्षात ठेवा जेन्व्हा एक हल्ला होतो तेंव्हा त्याच्या मागे कमीत कमी १०० हल्ले निकामी केलेले असतात. खबरी मिळवणे त्याचे विश्लेषण करणे आणि त्यातून सज्जड अशी माहिती तयार करणे हे काय आपोआप होणारे काम आहे का? शेंडा ना बुडखा पण कळफलक बडवायचा २) बी.एस.एफ./सी.आर.पी.एफ. ने डिसेंबरमध्ये मोठ्या संख्येने बसेसने नेण्यास विरोध केला होता. हॅलिकॉप्टरची मागणी केली होती. ती अमान्य झाली. २५०० सैनिकांना जम्मू वरून श्रीनगरला हेलिकॉप्टरने न्यायचे या साठी हेलिकॉप्टरच्या किती फेऱ्या लागतील याची कल्पना आहे का? साधारण माणशी २० रुपये/ किमी या दराने २०० किमी (कावळा उडतो तसे) ४००० रुपये माणशी लागतील म्हणजे १ कोटी रुपये नुसते इंधनावर लागतील. हे सुद्धा सरळ उडायचे असेल तर उंची गाठायची असेल तर हे गणित बदलते. जम्मू समुद्रसपाटीच्या ३५० मीटर वर आहे आणि श्रीनगर १५८५ या उंचीवर चढवण्यासाठी इंधन दुप्पट खर्च होते. बाकी हेलिकॉप्टरच्या ५०० तासांची किंमत त्याच्या पायलटचा पगार अलाहिदा. त्यांना हेलिकॉप्टरने नेण्यासाठी परवानगी कुणी द्यायची (अशी परवानगी मंत्रालयातून मिळण्यास तीन ते चार महिने सहज लागतील). संरक्षण मंत्रालयातील बाबूंनी आणि कॅगने लेखा हरकत (AUDIT OBJECTION) घेतले तर ते पैसे कुणी भरायचे? सैनिकांच्या पगारातून वसूल करायचे? कि अधिकाऱ्यांच्या? आणि एकदा असे केले कि "वहिवाट" होण्याची भीती असते ती गोष्ट वेगळी. कोणतरी बुणगा काही तरी बलतो आणि ते लोक पुढे ढकलतात. उचलली बोटे आणि लावली कळफलकाला अशी स्थिती आहे आज जो उठतो तो बेफाट आरोप करतोय

In reply to by सुबोध खरे

Blackcat Tue, 02/19/2019 - 20:18
साध्या निमलष्करी जवानांना विमान अन हेलिकॉप्टर द्यायला ते का मंत्री आहेत ? निम लस्क्री लोकांचे पगार 2012 नन्तर वाढलेले नाहीत ( आमचेही नाहीत , कॉन्ट्रॅक्टवाल्यांचे पगार 2012 ला काँग्रेस काळात वाढले होते , नन्तर काही नाही. ) आजवर हल्ल्यात जितके मेले , त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केल्यात म्हणे. https://youtu.be/IuhtlAq3yNY

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Tue, 02/19/2019 - 23:04
निम लस्क्री लोकांचे पगार 2012 नन्तर वाढलेले नाहीत २०१२ नंतर डायरेक्ट २०१४ सुरु होत हे नविनच कळल !! २०१२ ते २०१४ पर्यंत ते तुमचे भ्रष्ट सरकार काय करत होते म्हणे ? ह्यांच्या ईथे क्लीष्ट गणित सोडाच , साधे आकडे मोजण्याचे सुद्धा वांदे आहेत तर !! एक पद एक पेन्शन तर तुमच्या भ्रष्ट काँग्रेसच्या सरकार ने १० वर्षे अडगळीत टाकलेले होते हे विसरलात ?

In reply to by डँबिस००७

Blackcat Tue, 02/19/2019 - 23:15
तुमचे गणित कच्चे आहे, 2012 ला पगाराचे स्लॅब वाढले , मग पाच वर्षे किरकोळ इन्क्रीमेंट असतात , त्याही दोन तीन वर्षे मिळत नाहीत , त्यांनतर पुन्हा स्लॅब वाढणे 2017 ला अपेक्षित होते, पण भाजप सरकारने ते 2021 पर्यंत पुढे ढकलले , फक्त इन्क्रीमेंट मिळतील ह्याची घोषणा केली , तेही 2017 पासून मिळाले नाहीत. 2-3 वर्षे झाली की एखादे इन्क्रीमेंट देतात , एक दोन राखून ठेवतात

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Blackcat Tue, 02/19/2019 - 23:21
आमचे काँग्रेस निदान स्लॅब तरी पाच वर्षांनी वेळेवर वाढवत होते , मधल्या काळात इन्क्रीमेंट असेनात का मागेपुढे, पण भाजपे तर स्लॅबच पुढे ढकलत आहेत , आणि गम्मत म्हणजे महाराष्ट्रीतील भाजप सरकारने याच काळात आमदारांचे पगार 50 हजारवरून दीड लाख केले .

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 10:57
तुम्ही आपली बुद्धी बाजूला ठेवूनच प्रतिसाद लिहिता का हो? कि बेलाशक खोटे बोलणे याबद्दल तुम्हाला काहीही वाटेनासे झाले आहे? काश्मीर मधील केंद्रीय राखीव पोलीस दल हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. वेतन आयोग नावाची काही वस्तू अतित्वात आहे याबद्दल आपल्याला माहिती आहे का? सहावा वेतन आयोग २००६ साली आला आणि त्याची अंमल बजावणी २००८ मध्ये झाली. https://en.wikipedia.org/wiki/Sixth_Central_Pay_Commission तसेच २०१५च्या नोव्हेंबर महिन्यात सातव्या वेतन आयोगाचा अहवाल आला आणि तो मोदी सरकारने ५ सप्टेंबर २०१६ लागू केला On 5 September 2016 the Bharatiya Janata Party (BJP) led National Democratic Alliance (NDA) government implemented the recommendations of the 7CPC including those affecting the armed forces with minor modifications.(स्रोत विकिपीडिया) उगाच नको तेथे अक्कल पाजळणे थांबवा. केंद्रीय वेतन आयोग "१० वर्षातून" एकदाच बसतो बाकीचा वेळ फक्त महागाई भत्ता वाढवता येतो. आमचे काँग्रेस निदान स्लॅब तरी पाच वर्षांनी वेळेवर वाढवत होते.

हे सिद्ध करून दाखवा हे तुम्हाला आव्हान आहे.

नाही तर अशा धादांत खोट्या प्रतिसादाबद्दल माफी मागा

In reply to by सुबोध खरे

प्रसाद_१९८२ Wed, 02/20/2019 - 11:17
हे सिद्ध करून दाखवा हे तुम्हाला आव्हान आहे. नाही तर अशा धादांत खोट्या प्रतिसादाबद्दल माफी मागा
-- सर, आता तो मोगा तुमच्या या प्रतिसादाकडे फिरकणार देखील नाही.

In reply to by सुबोध खरे

Blackcat Wed, 02/20/2019 - 11:19
हे आलेच धावून, पाच वर्षे स्लॅब हे आमच्या पगाराबद्दल लिहिले आहे, बाकी , त्यांच्या पगाराबद्दल व्हिडिओत आहे , ते वाचा, सैनिकांना हेलिकॉप्टर वापरायचा अधिकार नाही , हे बोलून तुम्हीच आधुनिक वर्णव्यवस्थेचा पुरस्कार केला आहे , तुम्हीच देशाची माफी मागा, सैनिकांनी जीव घालवावा , पण त्यांना सुविधा मिळणार नाहीत , हे लिहिल्याबद्दल मी डॉ खरेंचा जाहीर निषेध नोंदवत आहे

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 12:07
तोंडाला येईल ते बोलू नका. सरकारी हेलिकॉप्टरचा वापर कशासाठी करायचा याची SOP (स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर)असते. सैनिकाचा( एवढेच नव्हे तर तेथील सिव्हिलियनचा सुद्धा) "जीव वाचवण्यासाठी" तेथील डॉक्टर "स्थानीक कमांडर"च्या टेलिफोनिक परवानगीने हेलिकॉप्टर बोलावू शकतो. सैनिकांना सुटीवर जाण्यासाठी आणि सुटीवरून परत आणण्यासाठी हेलिकॉप्टर वापरुन देशाचे दिवाळे वाजवायचे आहे का? काश्मीरमध्ये एकंदर २ लाख १० हजार लष्करी जवान आणि १ लाख ३० हजार केंद्रीय पोलीस दले यांचे जावं तैनात आहेत. एवढ्या सगळ्या जवानांना (३ लाख ४० हजार) हेलिकॉप्टरने नेण्यासाठी भारताकडे तेवढी हेलिकॉप्टर्स नाहीतच. बाष्कळ बडबड खोटे बोलणे या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणे इतक्या भंपक गोष्टी निर्लज्जपणे करताना जनाची नाही तरी मनाची लाज तरी बाळगा. सैनिकांनाच काय पण अधिकाऱ्यांना सुद्धा हेलिकॉप्टर वापरायचा अधिकार नाही. आधुनिक वर्णव्यवस्थेचापुरस्कार केला आहे असली घाण उगाच तोंड उचकटून कशाला बाहेर टाकता आहात? निम लस्क्री लोकांचे पगार 2012 नन्तर वाढलेले नाहीत ( आमचेही नाहीत) हे आपलेच लिखाण आहे ना? मग सातव्या वेतन आयोगाबद्दल न वाचता फुकट कळफलक बडवून खोटे नाटे कशाला लिहीत आहात?

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 12:15
मोगा खान बाकी तुम्ही आर्मीत डॉक्टर म्हणून भरती होणार होतात त्याच काय झाले? हेलिकॉप्टर मध्ये फिरायची संधी मिळेल (तुमच्याच म्हणण्याप्रमाणे) आणि भरपूर पगार, भरपूर सुट्या, स्वस्त दारू राजासारखे राहाल. केंव्हा येताय? माझा ब्रिगेडियर वर्गमित्र लष्करी मुख्यालयात दिल्लीला आहे. चिकटवून टाकू कुठेतरी तंगधार https://www.google.com/maps/search/tangdhar+army+camp/@34.8687725,72.6431672,7z गुरेझ https://www.google.com/maps/search/gurez+army+camp/@34.6268302,73.7540836,8z उडी https://www.google.com/maps/place/Uri+193123/@34.0560504,73.4232996,9z/data=!4m5!3m4!1s0x38e05748af885045:0xa67531f1a8648f93!8m2!3d34.0881166!4d74.0339852 नाही तर सियाचेन आहेच एकदम आरामात राहा. छान थंड थंड बायकोची हि कटकट नाही

In reply to by सुबोध खरे

Blackcat Wed, 02/20/2019 - 12:23
हेलिकॉप्टरची मागणी त्यांनी स्वतःच केली होती , वातावरण खराब होते म्हणून, Speaking to Asia Times, a senior security official said that travelling on the road was riskier and the attack would have been avoided if they had used helicopters instead of trucks. “Had helicopters been made available to troops then this could perhaps have been avoided. This is not the main cause and we do have a massive intelligence failure. But this could have probably saved lives,” he said. https://newscentral24x7.com/pulwama-terror-attack-modi-govt-refused-helicopters-to-ferry-crpf-officials-in-kashmir/ ते सगळ्या लोकांना मजेसाठी फिरायला हेलिकॉप्टर नव्हते मागत.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 12:37
कशाला कुठल्या तरी प्रेस्टिट्यूटच्या आड लपता आहात शिखंडी सारखे? सिनियर सिक्युरिटी ऑफिशियलचे नाव घेऊन ते खोटे बोलत आहेत त्यात तुम्ही त्यांची हांजी हांजी चालवली आहे. सिनियर सिक्युरिटी ऑफिसर जर सरकारी असेल तर त्याला वस्तुस्थिती माहिती आहे आणि सरकारी नसेल तर कुणीही बुणगा काहीही बोलतो ते तुम्ही न विचार करता पुढे पाठवून मला जाब विचारता? लष्करी दलाच्या पगारा बद्दल खोटं बोलून झालं माझ्यावर वर्णव्यवस्थेबद्दल चिखल उडवून झाला अडीच हजार सैनिकांना सुटीवरुन परत येण्यासाठी हेलिकॉप्टर कोणाचा बाप देणार होता? तीन लाख चाळीस हजार सैनिकांना वर्षात तीन वेळेस सुटीवर जाण्यासाठी आणि तीन वेळेस परत येण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवायचे तर ७०% आयकर भरावा लागेल आणि ५० % जी एस टी. भरणार का तुम्ही? बेताल आणी बाष्कळ बडबड आणि पचपच केल्याशिवाय अन्न पचत नाही का?

In reply to by सुबोध खरे

Blackcat Wed, 02/20/2019 - 14:11
मुलांना ऑक्सिजन सिलेंडरला पैसे नाहीत, सैनिकांना सुरक्षित ठेवायला पैसे नाहीत.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 19:17
मुलांना ऑक्सिजन सिलेंडरला पैसे नाहीत, सैनिकांना सुरक्षित ठेवायला पैसे नाहीत. ना शेंडा ना बुडखा नुसतीच पचपच

In reply to by सुबोध खरे

महेश हतोळकर गुरुवार, 02/21/2019 - 17:53
मिपावरच्या चर्चा सरकार एवढ्या गांभीर्याने घेत असेल हे माहिती नव्हते. जपून वावरायला पाहिजे बाबा इथं. http://mtonline.in/B-Lzua/a36my

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

रानरेडा Sun, 02/24/2019 - 22:55
मध्ये एका गावठी वैदू कडून उपचार करून घेतलेल्या ( आणि सरकारी कोलेज मधून डॉक्टर झालेल्या ) डॉक्टर ची खाणी ऐकली होती वर म्हणे तो डॉक्टर मुंबईत एका सरकारी रुग्णालयात आहे आणि मुसलमान बनून हि आधीच्याच हिंदू नावाने वावरत आहे , ह्लाला साठी झाला मुसलमान तो त्यामुळे डॉक्टर खरे यांना कशाला दोष द्या , डॉक्टर कसे असतात ते माहित आहे आम्हाला

In reply to by सुबोध खरे

तेजस आठवले Wed, 02/20/2019 - 14:33
संपादक मंडळ असल्या खोटारड्या प्रतिसादांवर काहीच कारवाई करणार नाही का ? का मोगा पुढे हात टेकले?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

lakhu risbud Wed, 02/20/2019 - 13:34
मोगा खान,तुमच्या आवाक्यातला प्रश्न MBBS म्हणवणारा कोणी डागदर धनगरी औषध वापरण्याची कबुली आणि जाहिरात कसे देऊ शकतो ?

In reply to by सुबोध खरे

अर्वाच्य Wed, 02/20/2019 - 12:59
एक लक्षात ठेवा जेन्व्हा एक हल्ला होतो तेंव्हा त्याच्या मागे कमीत कमी १०० हल्ले निकामी केलेले असतात. {{> हे वाक्य जेव्हा राहुल गांधी बोलले होते तेव्हा बरीच टिका झाली होती. तुम्हि अगदि राहुल गान्धीसारखे बोलत आहात. :-) https://goo.gl/XQ8FSQ

In reply to by अर्वाच्य

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 19:23
राहुल गांधी राजकारणी आहेत पण कुठे बोलायचे आणि कुठे नाही याचा त्यांना पोच नाही. मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून काही जबाबदारीने बोलावे कि नाही. सत्य कुठे आणि कसे बोलावे हे महत्त्वाचे असते. एखाद्या पायलटच्या मृत्यू प्रसंगी पायलटची चूक होती म्हणून तो दिवंगत झाला हे बोलणे सत्य असले तरी अप्रस्तुत आणि अनुचित असते अंधभक्ती हि अशीच आहे.

Rajesh188 Tue, 02/19/2019 - 12:13
नेहमी 370 कलम रद्द करा आसा युक्तिवाद होतो पण ते कलम रद्द करण्याचा अधिकार संसेदला आहे का . काश्मीर भारतात जेव्हा विलीन झाला तेव्हा काही करार झाला होता त्यात हे कलम सुधा आहे आस ( मला नक्की माहित नाही चुकीचं आसेल तर माहिती द्यावी ,) ते कलम रद्द केले तर भारतीय कायदे त्या राज्याला सुधा लागू होतील .आणि भारतीय जनता तिथे जावून जमीन सुधा खरेदी करू शकेल आणि तिथे बाकी समाजाची वस्ती वाढेल आसा युक्तिवाद आहे . पण आशा अस्थिर वातावरणात tas स्थलांतर होईल

In reply to by Rajesh188

खरे आहे. एवढा साधासुधा तर्क नाही ३७० मागे. नाहीतर केव्हाच रद्द केले असते आधीच्या सरकारानी. सार्वमत झाल्याशिवाय ३७० चा निर्णय घेता येणार नाही अशी अट आहे असे वाचले होते. नक्की माहित नाही. त्यामुळे ३७० रद्द करण्याचा आग्रह धरायचा तर तो कश्मिरमध्ये घेतला पाहिजे. मुंबई/पुण्यात्/दिल्लीतल्या लोकांच्या आग्रहाला विशेष महत्व नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुबोध खरे Wed, 02/27/2019 - 10:57
@माईसाहेब आधीच्या सरकारांनी तीन तलाक बंद केला नाही. आधीच्या सरकारांनी बेनामी मालमत्तेचा कायदा येऊ दिला नाही आधीच्या सरकारांनी पाकिस्तानात घुसून कार्यवाही केली नाही आधीच्या सरकारांनी ३७० कलम रद्द केले नाही. यात काही साम्य दिसतंय का माईसाहेब? आधीच्या सरकारांनी केलं नाही म्हणून आताचे सरकार या गोष्टी करू शकत नाही हे म्हणणे हास्यास्पद आहे

गामा पैलवान Tue, 02/19/2019 - 14:01
माईसाहेब, भारतीय संसद अनुच्छेद ३७० स्वत:च्या अधिकारात रहित करू शकते. इतर कोणाचीही परवानगी घ्यायची गरज नाही. कलम ३७०, परिच्छेद ३ असा आहे : Notwithstanding anything in the foregoing provisions of this article, the President may, by public notification, declare that this article shall cease to be operative or shall be operative only with such exceptions and modifications and from such date as he may specify: Provided that the recommendation of the Constituent Assembly of the State referred to in clause (2) shall be necessary before the President issues such a notification. वरील मजकुरातली Constituent Assembly (= घटना समिती) या घडीला अस्तित्वात नाही. त्यामुळे राष्ट्रपती एका वटहुकूमाद्वारे कलम ३७० रद्द करू शकतो. तसंही पाहता ३७० हे तात्पुरत्या तरतुदींसाठी अस्तित्वात आलेलं आहे. कलमाच्या शीर्षकात Temporary, Transitional and Special Provisions असा उल्लेख आहे. तात्पुरत्या तरतुदी रद्द करण्यातही खास परवानग्यांची गरज नसते. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

धन्यवाद रे पैलवाना. Constituent Assembly अस्तित्वात नसेल तर हे डेड-लॉक झाले म्हणायचे. On 3 April 2018, the Supreme Court of India gave a similar opinion declaring that the Article 370 has acquired a permanent status. It stated that, since the State Constituent Assembly has ceased to exist, the President of India would not be able to fulfil the mandatory provisions required for its abrogation.[49] https://en.wikipedia.org/wiki/Article_370_of_the_Constitution_of_India

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

गामा पैलवान Tue, 02/19/2019 - 18:02
अहो माईसाहेब, घटनासमिती अस्तित्वात नसल्याने ३७० रहित करता येणार नाही असा निर्णय जम्मूकाश्मीर उच्च न्यायालयाने दिला आहे. पुढे सर्वोच्च न्यायालयाने ३७० कायमस्वरूपी आहे असं मत प्रदर्शित केलंय. ३७० च्या शीर्षकात जरी 'तात्पुरते व अंतरिम' असा उल्लेख असला तरी त्यास कायमपणा प्राप्त झालाय. असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे. संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Article_370_of_the_Constitution_of_India#Calls_for_abrogation असं असलं तरीही माझ्या माहितीप्रमाणे घटनेचा अन्वयार्थ लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयास न्यायिक फेरआढावा ( = ज्युडिशियल रिव्ह्यू) घेता येतो. किंवा शासन तसा घेण्यास स.न्या.स विनंती करू शकतं. यामागचं कारण म्हणजे घटनासमिती हीच मुळी तात्पुरती योजना आहे. मग तिच्या अनास्तित्वाच्या आधारे तात्पुरते ३७० कायम कसे करता येईल? असा युक्तिवाद करून शासन सर्वोच्च न्यायालयाकडे पुनरावेदन ( = अपील) करून निर्णय फिरवून घेऊ शकेल. आ.न., -गा.पै.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

Blackcat Tue, 02/19/2019 - 19:08
370 हटवल्यावर तुमचे हे तिथे प्लॉट घेणारेत का ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

प्लॉट्स वगैरे मोठ्या बिल्डरांना- लोढा/हिरानंदानीना,राजकीय पुढार्यांना घेऊ देत. एखादी टाऊनशीपची जाहिरात येऊ दे.. मग बघु.. असो २६-११ च्या मुंबई हल्ल्यानंतर शिवराज पाटलांनी चार दिवसात राजिनामा दिला होता. आता ?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अर्धवटराव Tue, 02/19/2019 - 20:19
शिवाजीरावांनी दिवसभरात तीन वेळा कपडे बदलुन प्रतिक्रीया दिल्या, त्यावरुन ते ट्रोल झाले (आपली जनता ट्रोल करण्याच्या बाबतीत जरा जास्तच जागृत आहे). त्यांची देहबोली देखील मानसीक खच्चीकरण झाल्यासारखी निस्तेज झाली होती. त्यामुळे गृहमंत्रालयाची इमेज कचखाऊ झाल्यासारखी वाटत होती. तसंही, शिवाजीरावांना स्वतंत्रपणे बोलण्याचा काहि अधिकार नव्हता (आजच्या गृहमंत्र्यांना देखील तो अधिकार नाहि). त्यामुळे त्यांनी बस्तान आवरतं घेतलं. आबा पाटलांचा राजिनामा मात्र अवास्तव होता असं वाटतं. एक कार्यक्षम मंत्री म्हणुन मला आबा पाटील फार आवडायचे. त्यांच्या हिंदी प्रतिक्रीयेला उगाच ओढुन ताणुन दाखवण्यात आलं, आणि त्यांना राजीनाम द्यायला लागला (राष्ट्रवादीतली अंतर्गत स्पर्धा देखील काहि अंशी कारणीभूत असेल. पण पवार साहेबांचा आबांना नेहेमीच पाठिंबा राहिला आहे)

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Tue, 02/19/2019 - 23:16
Blackcat , ३७० कलम ठेवुन कश्मिरला स्वतःच प्राईव्हेट राज्य करायचा प्लान होता का तुमच्या लाडक्या पंडीतजींचा ? नाही म्हणजे संपुर्ण देश एकसंध केलेला असताना फक्त ह्यांच्या गावाला (काश्मिरला) स्पेशल स्टेटस का हवा होता म्हणे ? 370 हटवल्यावर तुमचे हे तिथे प्लॉट घेणारेत का ? ३७० कलम असताना कायद्याप्रमाणे भारतीय माणसाला काश्मिरमध्ये प्रॉपर्टी विकत घेता येत नाही त्यामुळे विकत घ्यायची असेल तर ३७० कलम जाण्याची वाट पहावी लागेलच !

In reply to by डँबिस००७

Blackcat Tue, 02/19/2019 - 23:23
काश्मीरचे सँस्थानिक नेहरू नव्हते , कुणीतरी हरीसिंग वा तत्सम होते ना ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 10:59
370 हटवल्यावर तुमचे हे तिथे प्लॉट घेणारेत का ? तुम्ही घ्या कि चारी बाजूला भरपूर मशिदी आणि मदरसे आहेत. तुमचा वेळ बरा जाईल

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 12:40
बघा प्लॉट घ्यायचा असेल तर दुवा पाठवला आहे. भरपूर प्लॉट्स रिकामे आहेत. https://www.justdial.com/Baramulla/Estate-Agents-in-Gurez/nct-10192623

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 19:25
तिकडे चारी बाजूनी मशिदी आणि भोंगेच आहेत इकडच्या सारखे "आरती, स्तोत्र, जय भवानी जय शिवाजी ऐकून " वगैरे ऐकून तुमचे ब्लड प्रेशर वाढणार नाही शिवाय तिथे प्लॉट फारच स्वस्तात आहेत.

In reply to by सुबोध खरे

रानरेडा Mon, 02/25/2019 - 00:10
आणि डोंगराळ भागात भरपूर वैदू , मेंढपाळ असतील तिकडे तुम्हाला औषधच औषध मिळेल ! फक्त आपण MBBS डॉक्टर आहात हे सांगू नका हा , ;) ;)

Rajesh188 Wed, 02/20/2019 - 12:46
आपण स्वतःचा जरी विचार केला तरी समजेल . मुंबई आणि राज्यात हिंदी भाषिक लोकांची संख्या वाढली आहे आणि त्या मुळे आपण सुधा अस्वस्थ होतो .हे सत्य आहेच की . कोणत्याच राज्याच्या संस्कृतीवर आक्रमण विनाश कडे घेवून जाईल

Rajesh188 Wed, 02/20/2019 - 14:08
ह्या विषयावर खूप प्रतिक्रिया वेगवेगळ्या ठिकाणी वाचल्या . पण पूर्ण विचार करून परिणामाचा विचार करून प्रतिक्रिया खूप कमी आहेत . प्रत्येक जण आपल्या विचारधारा सोडायला तयार नाहीत आणि aashich अवस्था पाकिस्तान मध्ये सुधा आहे . डोकं थोड शांत ठेवून दोन्ही देशांनी मिळून निर्णय घेणे अपेक्षित आहे इथे भावनिक mudhe काही कामाचे नाहीत. व्यवहारिक विचार झाला पाहिजे . दोन्ही देश विकसनशील देश आहेत आणि दोघे सुधा गरीबी bairojgari,लोकसंख्या अनियंत्रित वाढ आशा बऱ्याच समस्यांनी ग्रासले आहेत .जर दोन्ही देशांना काश्मीर च हित हवं आसेल तेथील जनता सुखी समाधानी झालेली बघायची आसेल तर थोड पाठी सरल पाहिजे . दोन्ही देशाची अखंडत्व आणि सर्वभोमत्व ह्या वर कसली ही तडजोड न करता सुवर्ण मध्य साधता आला पाहिजे . हा सुवर्ण मध्य दोन्ही देशांनी ठरवावं .तो आपण काय सुचवणार . आता आसा विचार केला की दोन्ही देश आपल्याला हवा तसा काश्मीर प्रश्न सोडवू लागला तर त्याचे परिणाम काय होतील aatangvad हा त्याच्या वर नक्कीच उपाय नाही आणि युद्ध हा सुधा उपाय नाही . Aatangvad ही दुधारी तलवार आहे हिचा वापर जो करेल ती तलवार त्याच्या वर सुधा वार करू शकते आणि ह्याचा चांगला अनुभव पाकिस्तान कडे आहे ते चक्रव्यूहात सापडले आहेत बाहेर येण्याचा मार्ग सध्या तरी बंद आहे . दोन्ही देशातील दुष्मानीचा फायदा बाकी देश मित्रत्वाचे वाचन देवून स्वतःचा स्वार्थ साधून घेतली त्यात होणाऱ्या नुकसानी शी त्यांचा काहीही संबंध नसेल . पाहिजे तर ह्या विषयावर bayanbaji करायला दोन्ही देशांनी बंदी घातली पाहिजे .प्रधान मंत्री व्यतिरिक्त कोणताही नेता ह्या विषयावर बोलणार नाही ह्याची काळजी घेणे . युद्ध न परवडणारे दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत आताच युद्ध खूप भयंकर आसेल .आणि युद्ध काळात सर्व विकास योजना बंद होवून रोजगाराचा प्रश्न गंभीर होईल . आपण आता कितीही बोललो तरी त्या वेळी वेगळा विचार करू . पोट भरणे अवघड झाले की afratafar maju शकते . शास्त्र विकणारे लढा चालू ठेवतील आणि दोन्ही देशाचं वाटोळे होईल . समजा आपण युद्ध जिंकाल तर पाकिस्तान मध्ये आपण सत्ता स्थापित करू शकणार नाही जागतिक विरोध होईल मग युद्ध जिंकून फायदा काय अजुन द्वेष वाढेल

Blackcat Wed, 02/20/2019 - 14:24
१९८९ पर्यंत भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबे अगदी सहजपणे काश्मिरभर हिंडून-फिरून , एक तरी कौटुंबिक फोटो-अल्बम सोबत घेऊन आनंदाने परतत होता! काश्मीर की कली, परदेसियो से ना अखिया मिलाना, किती सुंदर गाणी बघायला मिळायची. याचा अर्थ, तेव्हा तेथे दहशदवादाचा मागमूस नव्हता. नेहरुजी, शास्त्रीजी, इंदिराजी आणि राजीवजीपर्यंत काश्मिरात दहशदवाद नव्हता, आणि पाकिस्तानची हिम्मत नव्हती नजर वर करून पाहण्याची! २००१ मध्ये जम्मू- काश्मीर विधानसभेवर हल्ला झाला. पी एम होते अटलजी! अमरनाथ यात्रा हल्ला.... तेव्हाही भाजपाचे शासन! काँग्रेस-शासनात असा एकही हल्ला नाही. काश्मीरसाठी कॉंग्रेसने ३ युध्दे खेळली आणि जिंकली देखील! नव्या सरकारकडून काही अपेक्षा ठेवायच्या तर सैनिकच सुरक्षित नाहीत आणि त्यांना सुरक्षित करायचे तर म्हणे 50 % कर भरा, असे इथले तज्ञ सांगतात. आमचे पूर्वधर्माचे गोत्र काश्यप , ज्यांनी काश्मीर निर्माण केले त्या ऋषीचे नाव , बिचारे तळमळत असतील , हेचि फळ काय मम तपाला?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

आनन्दा Wed, 02/20/2019 - 15:42
१९८९-९० मध्ये तेथे दहशतवाद आला तेव्हा तुमचे शासन होत वाटते तिथे? हजारो काश्मीरी पंडितींना विस्थापित केले तेव्हा नव्हता वाटते दहशतवाद? की तो जिहाद होता?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Wed, 02/20/2019 - 19:00
बरेच विसरभोळे आहात तुम्ही !! पाकिस्तानची हिम्मत नव्हती नजर वर करून पाहण्याची! हा हा हा काँग्रेस चे कमकुवत सरकार बघुन एक दोन नव्हे तर चार चार युद्धे लादली पाकिस्तानने भारतावर !! चीन ने तर एकाच तडाख्यात लोळवल होत विसरले काय ? ते तर बर की भारतीय सेना खमकी होती म्हणुन बचावलो !! अन्यथा काँग्रेसवाल्यांनी देशच आंदण दिला असता पाकिस्तानला ! काश्मिरचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग पाकिस्तानच्या अख्त्यारीत आहे ! गीलगीट बाल्टीस्तान, अक्साई चीन हा भाग सुद्धा काँग्रेसवाल्यांनी देऊन टाकला ! कॉग्रेस मुक्त भारत झाल तर १८८५ पासुनचा रोग बरा होईल !!

In reply to by डँबिस००७

Blackcat Wed, 02/20/2019 - 19:22
जवानांच्या अंतयात्रेत उपमुख्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह, केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह, साक्षी महाराज हसत होते व प्रार्थनेत जोडे घालून आले होते, नातेवाईकांनी हाकलून लावले. व्हाट्सपवर व्हिडीओ फिरत आहेत, ते पहा. भाजपयाना तर इथलेच लोक विचारेनात , पाकिस्तान तर लांब राहिला.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 19:28

९०,००० सैनिक युद्धबंदी होते आणि पाकिस्तानी लष्करशहा हात बांधून शरण आलेले असताना काश्मीर प्रश्न सोडवण्याची सुवर्णसंधी श्रीमती इंदिरा गांधींनी घालवली.

त्याबद्दल तुमची पचपच करणारी विचारसरणी काय म्हणते आहे?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 20:21
त्यांना (९००० लोकांना) एक वेळ तरी जेवायला घालायची आपली लायकी आहे का? आपला पगार किती? आपण बोलता किती?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे गुरुवार, 02/21/2019 - 09:22
इतिहास वाचलेलाच दिसत नाही. १ कोटी बांगलादेशी निर्वासित भारतात आले होते आणि त्या निर्वासितांच्या निर्वाहासाठी आपण( सामान्य नागरिक) २० पैशाच्या पोस्टाच्या तिकिटांवर ५ पैसे निर्वासित अधिभाराचे तिकीट लावत होतो https://www.thedailystar.net/supplements/victory-day-2016-special/refugee-relief-the-postal-tax-helped-millions-1330345. त्यामध्ये ९०,००० तोंडे म्हणजे काहीच नाही

त्या "ओलिस सैनिकांच्या" बदल्यात आणि शरण आलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या बदल्यात काश्मीर प्रश्न सोडवण्याची सुवर्णसंधी श्रीमती इंदिरा गांधी यांनी घालवली.

त्या धनगराकडे मेंदू विकारावर औषध आहे का विचारुन पहा. कायम नुसती जळजळ आणि मेंदूत जळमटं झाली आहेत. कोणताही विषय अजिबात न वाचता किंवा अजिबात विचार न करता नुसती आचरटपणाची पचपच करण्याची सवय सोडून द्या जाता जाता -- मला कोणतेही निवृत्ती वेतन नाही. तेंव्हा तुम्हाला जळजळ होण्याचे कारण नाही.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

विशुमित गुरुवार, 02/21/2019 - 16:02
काश्मीर प्रश्नाला पंडित नेहरूच कारणीभूत, अमित शाह यांचा आरोप. काश्मीर प्रश्नाचे जनक कोण असा प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तर पंडित नेहरू असेच आहे. नेहरूंमुळे काश्मीरचा मुद्दा निर्माण झाला. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. काश्मीर खोरे कायम धगधगतेच असते या सगळ्याचं कारण पंडित नेहरू आहेत त्यांनी हा प्रश्न निर्माण केला आणि भिजत ठेवला असाही आरोप अमित शाह यांनी केला. सगळ्यात महत्वाचे आहे, हे तुम्ही लक्ष्यात ठेवा == पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे असे पंतप्रधान आहेत जे २४ पैकी १८ तास काम करतात. देशाच्या सुरक्षेसाठी ते कटिबद्ध आहेत त्यांच्यावर तुमच्यासारख्यांच्या आरोपांमुळे परिणाम होणार नाही असेही अमित शाह यांनी ठणकावले आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/pandit-nehru-responsible-for-kashmir-issue-says-amit-shah-1845117/ === सगळं रांकेला लावून आज ते कोरियाला भुर्र उडून गेले आहेत. तुम्ही बसा उंदरांचा पाठलाग करत!!

Blackcat Wed, 02/20/2019 - 14:24
१९८९ पर्यंत भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबे अगदी सहजपणे काश्मिरभर हिंडून-फिरून , एक तरी कौटुंबिक फोटो-अल्बम सोबत घेऊन आनंदाने परतत होता! काश्मीर की कली, परदेसियो से ना अखिया मिलाना, किती सुंदर गाणी बघायला मिळायची. याचा अर्थ, तेव्हा तेथे दहशदवादाचा मागमूस नव्हता. नेहरुजी, शास्त्रीजी, इंदिराजी आणि राजीवजीपर्यंत काश्मिरात दहशदवाद नव्हता, आणि पाकिस्तानची हिम्मत नव्हती नजर वर करून पाहण्याची! २००१ मध्ये जम्मू- काश्मीर विधानसभेवर हल्ला झाला. पी एम होते अटलजी! अमरनाथ यात्रा हल्ला.... तेव्हाही भाजपाचे शासन! काँग्रेस-शासनात असा एकही हल्ला नाही. काश्मीरसाठी कॉंग्रेसने ३ युध्दे खेळली आणि जिंकली देखील! नव्या सरकारकडून काही अपेक्षा ठेवायच्या तर सैनिकच सुरक्षित नाहीत आणि त्यांना सुरक्षित करायचे तर म्हणे 50 % कर भरा, असे इथले तज्ञ सांगतात. आमचे पूर्वधर्माचे गोत्र काश्यप , ज्यांनी काश्मीर निर्माण केले त्या ऋषीचे नाव , बिचारे तळमळत असतील , हेचि फळ काय मम तपाला?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

भंकस बाबा Wed, 02/20/2019 - 23:01
5लाख पंडितानी जीवाच्या भीतिने काश्मीर सोडले तेव्हा विद्यमान सरकारने ना त्यांची चिंता केली वा चिकित्सा, मग जे पाहिजे ते आपसुक तोंडात पडले तर कोण कशाला अतिरेकी बनतोय? उद्या काळ्या माउकड़े शांतताप्रिय धर्माचे लोक बोलायला आले की तुमची जागा आम्हाला आमचे प्रार्थनास्थळ म्हणून हवे आहे तर तुम्ही किती आनंदाने ते खाली कराल ? आधी तुमचा प्रतिसादच गंडलाय, भाजपा सरकारमधे अमरनाथ हल्ला झाला व विधानसभा हल्ला झाला मग पाकिस्तानमधून कसाब आणि कंपनी कोंग्रेसच्या काळात क़ाय आटयांपाट्या खेळायला आली होती ? हायला , यांचा क़ाय भरोसा नाय, प्रतिसाद झोम्बल्यावर कसाब आपल्या मुब्र्यातुंन आला होता बोलायला कमी करणार नाही. इशरतजहांचा बदला घ्यायला ! संपादक मंडळाला एक विनंती आहे , ह्या काळ्या माऊचा ईमेल आईडी उघड़ करावा , मग काहीतरी सामदामदंडभेद करता येईल

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

lakhu risbud गुरुवार, 02/21/2019 - 11:58
व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा व वैफल्य यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते. मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ? @ Blackcat तुमचे या विषय बद्दलचे मौलिक मत जाणून घ्यायला आवडेल. का या असल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची धमक नाही ?

In reply to by lakhu risbud

सुबोध खरे गुरुवार, 02/21/2019 - 12:56
@ Blackcat निम लस्क्री लोकांचे पगार 2012 नन्तर वाढलेले नाहीत ( आमचेही नाहीत) हे सपशेल खोटे विधान निर्लज्जपणे केलेत त्यावर पुरावा मागितला तो काही देता येत नाही. माझ्या वर्णव्यवस्थेच्या पुरस्काराबद्दल खोटारडेपणा केला त्याबद्दल कोणताही पुरावा देता येत नाही. इतका खोटारडेपणा, निलाजरेपण,, लोक टोचून बोलतात त्याबद्दल खंत नाही खेद नाही मिपावरून हाकलून दिल्यावर पन्नास वेगवेगळे डू आयडी घेऊन परत परत येण्यासारखा लोचट पणा आणि लुब्रेपणा आहे. आयुष्यातील वैफल्य जालावर काढून ते जाणार नाही आणि खोटेपणा हा लांड्या चादरी सारखा असतो. वरनं ओढली तर खालचा भाग उघड पडतो आणि खाली ओढली तर वरचा. मनाची नाहीच पण जनाची तरी लाज बाळगा.

सुबोध खरे-"उचलली बोटे आणि लावली कळफलकाला अशी स्थिती आहे आज जो उठतो तो बेफाट आरोप करतोय "प्रधान मंत्रीजी आप मुझे बताईये, सारा कम्युनिकेशन भारत सरकार के हात मे है, आप कोई भी फोन टॅप कर सकते हो, आप् ने अभीतक क्या किया? अभीभी घुसपेटी भारत के अंदर कसे आते है ? कितने आतण्कवादीयोंको आपने विदेशसे भारत लाया? आतंकवादीयोंके पास बाहर से गन आता है, गोला बारूद आता है, हवाला के माध्यमसे पैसा आता है, पैसा बँको के माध्यमसे आता है, प्रधान मंत्री, आप ईतनी निगरानी नही रख सकते? ये राज्योंका विषय नही है.. ये आपका विषय है.. काय किया है आपने ?" नरेंद्र मोदींनी २०१२ मध्ये मनमोहन सिंगांना भाषणात विचारलेले हे काही प्रश्न. (https://www.youtube.com/watch?v=SZQwy91riOo&t=737s २०:०० ते २३:००) ह्याला काय म्हणायचे रे सुबोधा? उचलली जीभ?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

डँबिस००७ Wed, 02/20/2019 - 19:26
माईसाहेब , अजुनही तुमची उचलली बोटे आणि लावली कळफलकाला अशी स्थिती आहे पुलवामा रस्त्यावर तिन तिन बॅरीकेडस होते ! कश्मिरच्या मुख्यमंत्र्यामुळे ते बॅरीकेडस बंद झाले आणि अतिरेक्यांना रस्ता साफ झाला ! पण त्या कश्मिरच्या मुख्यमंत्र्याला ना खंत ना खेद ! अजुन ही पाकिस्तानशी बोलणी कर ण्याची वार्ता करत आहे ! वायरलेस, मोबाईल, टेक्स्ट मेसेज,व ईतर कम्युनिकेशन वर करडी नजर असल्याने अतिरेक्यांनी ह्यावेळेला नविन मोबाईल + वायरलेस मेसेज सिस्टीम वापरली. चायनात बनलेली ही एनक्रिपशन सिस्टीम अजुन ही आपल्या कम्युनिकेशन ए़क्स्पर्टसना क्रॅक झालेली नाही. स्फोटके कश्मिरच्या सीमा भागातुन खंदक खणुन त्या मार्गाने आणलेली आहेत असा कयास आहे. गेल्या ६५ वर्षांत काश्मिरची सीमा सील करता आलेली नाही. त्या सीमेतुन माणसे, प्राणी , मादक पदार्थ ह्यांची तस्करी चालु असते. अश्या तस्करी मुळे सीमा पुर्ण पणे सील राहील ह्याची शाश्वती नसते. गेल्या ६५ वर्षांत सील न झालेली सीमा आता सील का झाली नाही अस विचारण म्हणजे मुर्खपणा आहे हे तुमच्या व तुमच्या ह्यांना आम्ही सांगावे म्हणजे काजव्याने सुर्याला .................. गेल्या ६५ वर्षांत जे न घडलेल आहे त्यातल जे काही ह्या ५ वर्षांत घडलेल आहे ते मात्र बघायच नाही असा प्रयास आपल्यालाच खाली घेऊन जाणार आहे !

In reply to by डँबिस००७

Blackcat Wed, 02/20/2019 - 19:59
61 चा पाढा आता 65 ला आला, त्यातली 10 भाजपचीही आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 19:35
| माईसाहेब कुरसूंदीकर १)डिसेंबर पासून हल्ले होत असतना आपली गुप्तचर यंत्रणा गप्प राहिली.. वा अपयशी ठरली. यंत्रणेच्या प्रमुखाने/गृहखात्याने हे सांगायला हवे की नको? २) बी.एस.एफ./सी.आर.पी.एफ. ने डिसेंबरमध्ये मोठ्या संख्येने बसेसने नेण्यास विरोध केला होता. हॅलिकॉप्टरची मागणी केली होती. ती अमान्य झाली. या दोन्ही गोष्टी अप्रस्तुत आणि अप्रासंगिक आहेत आणि त्यात आपला केवळ भाजप द्वेष दिसतो आहे हे मी सप्रमाण सिद्ध केलंय. ३ लाख ४० हजार सैनिकांना वर्षात तीन वेळेस हेलीकॉप्टरने घेऊन जाणे आणि परत आणणे हि अशक्य गोष्ट आहे हे शेम्बड्या पोरालाही पटेल. मुळात हि मागणी कुणी केली आहे हे तुम्हाला दाखवता येईल का? नसेल तर उगाच कळफलक बडवणे थांबवा कोणत्यातरी बोकड प्रेस्टिट्यूटने कुणाचा तरी हवाला देऊन लिहिलेले वाक्य मोगा खानने पाठवले होते उगाच फालतू प्रतिवाद करू नका आणि विषयाला फाटे फोडून पळवाट काढू नका.

In reply to by सुबोध खरे

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 02/21/2019 - 10:09
ही घ्या लिंक https://www.thequint.com/news/india/pulwama-terror-attack-crpf-request-air-transit-of-jawans-ignored#gs.9bLAc65P मूळ मुद्दा हा नाही. मोदी व भाजपा २०१२ च्या भाषणात ज्या गमजा मारत होते, मनमोहन सिंगांनाच जबाबदार ठरवत होते. कश्मिर प्रश्न हा जणू काही काँग्रेसवाल्यांनी मुद्दामून निर्माण केला आहे.. आम्ही सत्तेवर आलो की तो सोडवू... मग वाट वाकडी करून नवाझ शरीफांना केक भरवायला जाणे.. मोदी सत्तेवर आल्यापासून पाकिस्तान सूतासारखा सरळ आला आहे.. ह्या बद्दल बातम्या पसरवणे... मग सर्जिकल स्ट्राएकने कशी कायमची अद्दल घड्वली..वगैरे... ६०-६५ वर्षत जे झाले नाही ते ५ वर्षात होणार नाही हे कळण्यास राजकीय पंडिताची गरज नाही. मग जाहिरातबाजी न करता निमूटपणे काम तरी करा. प्रत्येकवेळी ईतिहासात जाऊन आधीचे सत्ताधारी कसे चुकले.. हेच सांगणार असाल तर लोक प्रश्न विचारणारच ना?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुबोध खरे गुरुवार, 02/21/2019 - 11:00
परत तेच कुणा तरी पत्रकाराने कुणाचा तरी हवाला देऊन सांगितलेली गोष्ट जी केवळ अशक्यप्राय आहे ( ३ लाख ४० हजार सैनिकांना वर्षात सहा फेऱ्या हेलिकॉप्टरने करणे). बरेच लोक मूळ वस्तुस्थिती माहित नसताना आपल्या त्रोटक माहितीप्रमाणे आणि आपल्या राजकीय कल (INCLINATION) प्रमाणे सोयीस्कर अशा काहीही गोष्टी टंकतात याबद्दल हा आक्षेप आहे. या स्थितीवर अचूक बोट ठेवणारा जालावर फिरणारा विनोद -- कुठे कुठे आणि कशी क्षेपणास्त्रे डागून पाकिस्तानला नष्ट करणारा डावपेच मी जालावर टाकणार होतोच तेवढ्यात आतून आमची हि ओरडली अहो जाता जाता धोब्याकडे इस्त्रीला कपडे टाका आणि ऑफिसमधून येताना न विसरता दळणाचा डबा घेऊन या. मुलखाचे धांदरट मेले. कुठे लक्ष असतं कुणास ठाऊक? मग लक्षात आलं -- आपण कोण आहोत आणि काय करतो आहोत

In reply to by सुबोध खरे

Blackcat गुरुवार, 02/21/2019 - 13:06
तात्पर्य : इथून पुढे चहावाल्यांनी चहावालेच रहावे ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे गुरुवार, 02/21/2019 - 19:47
हो डॉक्टर होऊन धनगराचे औषध घेण्यापेक्षा बरं नाही का?

In reply to by सुबोध खरे

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 02/21/2019 - 13:13
"आपण कोण आहोत आणि काय करतो आहोत" हे प्रथम सत्तधार्यांना सांगाय्ला हवे. अंतिम संस्काराला चपला घालुन बसणे, अंत्ययात्रा जात असताना पोझ देणे. ज्या दिवशी हल्ला झाला त्याच रात्री खाजगी पार्टीत नाचणे.... https://www.youtube.com/watch?v=CiEatCP6X6Q

In reply to by सुबोध खरे

शब्दबम्बाळ Mon, 02/25/2019 - 11:01
कोणत्यातरी बोकड प्रेस्टिट्यूटने कुणाचा तरी हवाला देऊन लिहिलेले वाक्य मोगा खानने पाठवले होते
अरेरे सरकार आता खरे साहेबानी डिक्लेर केलेल्या अश्या प्रेस्टिट्यूटने दिलेल्या बातम्यांचा विचार करून निर्णय घ्यायला लागले! आता कसं व्हायचं?! व्हात्साप्प ग्रुपवरती माहिती मिळाली नाही वाटत यावेळेस?? बाकी तुम्हीच खाली लिहिलेलं पटलं बुआ आपल्याला
बरेच लोक मूळ वस्तुस्थिती माहित नसताना आपल्या त्रोटक माहितीप्रमाणे आणि आपल्या राजकीय कल (INCLINATION) प्रमाणे सोयीस्कर अशा काहीही गोष्टी टंकतात याबद्दल हा आक्षेप आहे.
मग लक्षात आलं -- आपण कोण आहोत आणि काय करतो आहोत
येऊ द्या हं नीट लक्षात!

गामा पैलवान Wed, 02/20/2019 - 18:35
लोकहो, पुलवामा हल्ल्याचा काश्मिरियतशी कसलाही संबंध नाही. मसूद अझरचा भाऊ अब्दुल रौफ अजगर याने आत्मघातकी आक्रमणाची धमकी दिल्याची चित्रफीत समोर आली आहे. यामध्ये त्याने ‘जर मोदी सरकारने अयोध्येत राममंदिर उभारण्याचा प्रयत्न केला, तर आत्मघातकी आक्रमणे करू’, अशी धमकी दिली आहे. संदर्भ : https://sanatanprabhat.org/marathi/219206.html अधिक माहिती : https://mumbaimirror.indiatimes.com/news/india/pulwama-attack-nine-days-before-the-attack-jems-abdul-rauf-asghar-vowed-to-terrify-delhi/articleshow/68022324.cms पाकिस्तानात ५ फेब्रुवारी हा काश्मीर दिवस पाळला जातो. त्याचं चलचित्र : https://www.youtube.com/watch?v=ENOPIhZQFQA उपरोक्त चलचित्रात भारत मुर्दाबाद स्पष्टपणे म्हंटलं आहे. आ.न., -गा.पै.

Rajesh188 Wed, 02/20/2019 - 19:44
काश्मीर मध्ये घडणाऱ्या हिंसक कारवाया काश्मीर प्रश्र्नाशी संबंधित नसेल तर भारताचा इस्लामिक देश बनवायचा आहे आस अर्थ निघतो . मग डिफेन्स सुधा फक्त काश्मीर मध्ये करून चालणार नाही पूर्ण देशात आशा कारवायांवर लक्ष ठेवावे लागेल

In reply to by Rajesh188

ट्रेड मार्क Wed, 02/20/2019 - 23:26
काश्मीर मध्ये घडणाऱ्या हिंसक कारवाया काश्मीर प्रश्र्नाशी संबंधित नसेल तर भारताचा इस्लामिक देश बनवायचा आहे आस अर्थ निघतो नक्कीच बनवायचा आहे. फक्त भारतच नव्हे तर समस्त जग मुस्लिम नेशन झालं पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. गझवा-ए-हिंद म्हणजे काय हे विशद करून सांगणारा हा व्हिडिओ बघाच ही विनंती आहे. फक्त ६-७ मिनिटांचाच आहे त्यामुळे फार वेळ वाया जाणार नाही. पूर्वापार हिंदुस्थानवर होत असलेली मध्यपूर्वेकडून होणारी आक्रमणे ही याची साक्षीदार आहेत की हे फक्त प्रदेश काबीज करण्यासाठी नसून धार्मिक आक्रमण होते. हल्ले करून देवळे तोडून, ग्रंथ पुराणे जाळून, तरुण हिंदूंना मारून, हिंदू तरुण स्त्रियांना बळजबरीने इस्लाम स्वीकारायला लावणे आणि बलात्कार करून दासी म्हणून भरपूर पोरे काढून त्यांना मुस्लिम वळण लावणे हे कशाचे द्योतक आहे? सीमेवर हे उघड हल्ले तरी लोकांना दिसत आहेत, देशांतर्गत चालू असलेले छुपे हल्ले अजून लोकांच्या लक्षात येत नाहीयेत. एकीकडे हिंदू मुलींना नादाला लावण्यासाठी ग्रूमिंग गँग्स, दुसरीकडे शालेय शिक्षणात अकबर, औरंगजेब, टिपू, तैमूर यांचे गोडवे गाणारे धडे, मुस्लिम संस्कृती कशी चांगली आहे हे सांगणारे परिच्छेद आणि त्याच जोडीने हिंदू राजांबद्दल संस्कृतीबद्दल अतिशय कमी माहिती, तिसरीकडून सिनेमासारख्या माध्यमांतून उर्दू भाषेचे चाललेले कौतुक आणि चौथ्या बाजूने लोकसंख्या वाढण्यासाठी चार चार लग्न करून अनिर्बंध पोरे पैदा करणे. असा चोहीबाजूने छुपा हल्ला चालू आहे. इंग्लंडची वाट लावलीच आहे. युरोपातील बहुतांश देश येत्या २५-५० वर्षात मुस्लिम बहुल होतील, बरेचसे मुस्लिम अधिपत्याखाली जातील. त्या देशातील स्थानिक लोकसंख्या कमी जन्मदरामुळे अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. त्यावर तथाकथित मानवतावादाच्या नदी लागून भरमसाठ मुस्लिम रेफ्युजी घेऊन ठेवलेत. आता ते लोक फुकटची वैद्यकीय सेवा आणि child केअर वर मजा मारत आहेत. हे पैसे स्थानिक जनता कष्ट करून जो टॅक्स भरते त्यातून येतात. जेव्हा मुस्लिम लोकसंख्या ३०% च्या वर जाते तेव्हा हे लोक शरियाची मागणी करतात. ते पण फक्त त्यांच्यासाठी नव्हे तर संपूर्ण प्रदेशात लागू करावा असा आग्रह होतो. जेव्हा ५०% च्या वर जाते तेव्हा तिथे बिगर मुस्लिमांचे जबरदस्तीने धर्मांतरण तरी चालू होते अथवा हत्याकांड चालू होते. त्यानंतर बिगर मुसलमानांचे तिथे राहणे अशक्य होऊन जाते आणि तो प्रदेश पूर्ण मुस्लिम अधिपत्याखाली जातो. हे लक्षात घ्या की नुसती त्यांच्या अधिपत्याखाली जायची प्रोसेसच निर्दयी आणि रक्ताळलेली नसून नंतर सुद्धा हे लोक तेवढेच निर्दयी व क्रूर आहेत.

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 19:55
https://en.wikipedia.org/wiki/Category:Islamic_terrorism_in_India यात भरपूर दुवे आहेत वाचून पहा, महिनाभर तरी लागेल. मग चर्चा करू. पण असे एका धर्माला नाव ठेवायचे नसते त्याने आपल्या पुरोगामित्वाचा धक्का पोहोचतो.

मनो गुरुवार, 02/21/2019 - 01:28
दोन प्रश्नांची उत्तरे देतो - ३. आदिल अहमद दर या आतंकवाद्याने स्फोटकांनी (IED) भरलेली जीप जवानांच्या बसवर आदळली. हा अतिरेकी स्फोटतत्ज्ञ समजला जातो (बातमी कुठे वाचली ते आठवंत नाही). मात्र खरा स्फोटतत्ज्ञ असा मरंत नसतो. तो पुढच्या स्फोटांच्या तयारीस लागतो. तर या आदिल अहमद दरचा आगापिछा काय? स्फोटके खरोखरीची IED होती का? तशी असल्यास आख्खी जीप आदळवण्याची गरज बहुधा नसावी. जीप आदळतांना दिशा निश्चित नसू शकते. IED स्फोटकांची दिशा बदलली तर परिणामकारकता कमी होते. आदिल अहमद हा स्फोटतत्ज्ञ नसून एक डोके भडकावलेला आणि साधन म्हणून वापरला गेला अतिरेकी होता. त्याला आय ई डी बद्दल माहिती होती कि नाही ते माहित नाही, पण या कृत्याचे बोलावते धनी वेगळे आहेत - अश्या वेळी आय ई डी कसा वापरायचा याची माहिती आणि प्रशिक्षण आय एस आय किंवा अफगाणी तालिबान यांच्याकडून मिळते. स्फोटके स्थानिक, चोरून अथवा इतर मार्गानी जमवतात. स्थानिक मदतनीस इतर व्यवस्था (गाडी वगरे) करतात. प्रत्येकाला पूर्ण प्लॅन माहित नसतो - तो प्लॅन सीमेपलीकडून आखला जातो आणि प्रत्येकाला त्याचा भाग फक्त माहिती असतो. त्याने लाल रंगाची मारुती कार वापरलेली आहे, जीप नव्हे. फोटो पाहिलेत तर तुम्हाला त्यात लाल रंगाचे छोटे कारचे तुकडे दिसतील. प्राणहानी स्फोटामुळे नाही, तर shrapnel मुळे झाली आहे. त्यामुळे दिशा वेगळी असली तरी त्याने फरक पडलेला नाही. ४. बसवर गोळीबाराच्या खुणा दिसताहेत. स्फोटासोबत गोळीबारही झाला काय? म्हणजे दहशतवाद्यांचा पूर्ण चमूच सक्रीय होता काय? गोळीबार नाही, त्या shrapnel च्या खुणा आहेत. अश्या वेळी या घटनेमागचे मदतनीस कोण, बोलावते धनी कोण याचा पूर्ण तपास जर लावला तर आपल्याला पाकिस्तानवर पुराव्यानिशी आरोप करता येतील. पण हे पुरावे मिळणे अर्थातच फार अवघड असते.

In reply to by मनो

राघव Tue, 02/26/2019 - 21:58
१. हे सैनिक नसून निमलष्करी दलाचे जवान होते. सेनेची माणसं नेआण करायची काटेकोर चाकोरी (routine) असते. अशी काही पद्धती या दलाची होती का? हे सर्वस्वी सेनेवर अवलंबून असून सेना त्या त्या परिस्थितीत योग्य तो निर्णय घेत असते. त्यात आपण इथं खल करत बसण्यानं खरंच काही उपयोग नाही. २. एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे नक्षल्यांनी ७६ निमलष्करी जवान हल्ला करून ठार मारले. त्यापासनं काही धडे घेतले गेले होते का? ते विसरले गेले का? या प्रकाराला अँबुश अटॅक म्हणतात. हा कधीही, कुठेही, कुणावरही होऊ शकतो. जसं हार्ट अटॅक आलेला समजण्याआधी अनेक अटॅक येऊन गेलेले असतात आणि त्यांना शरीर सांभाळून घेतं, त्यासारखं. असा अटॅक येतो तेव्हा योग्य मदत मिळाली तर तोही परतवून लावता येतो. अर्थात् संपूर्ण सुरक्षीत कुणीच / कधीच नसतो. त्यामुळे अशा अटॅक्समुळे गुप्तचर यंत्रणा सपशेल अपयशी ठरली असं मकुणीच, मला तरी योग्य वाटत नाही. सर्वजण आपापल्या परीनं पूर्ण प्रयत्न करतच असतात, नाही तर पावलोपावली अटॅक्स झाले असतेत. जे अशा अपयशाच्या नावानं बोंब मारतात, ते सरकारला नव्हेत तर सेना, गुप्तचर यंत्रणा आणि समग्र संरक्षण यंत्रणेला नावं ठेवत असतात. या प्रकाराला शुद्ध कृतघ्नपणा असंच म्हणतात. एक मुखबीर नावाचा चित्रपट आहे, तो बघावा अशा लोकांनी.. चित्रपट असला तरी इतका अंगावर येतो.. प्रत्यक्षात कसं असेल याची आपल्याला कल्पनाही येऊ शकत नाही. ५. राजकीय परिणाम : मोदी म्हणाले की जवानांचं बलिदान वाया जाणार नाही. समजा जर भारताने बदला घेतला तर तो अधिकृतपणे जाहीर होईल काय? झाल्यास त्याचे राजकीय परिणाम काय होतील? कोणताही समर्थ देश हे जाहीररित्या करेल. त्याला असलं काही लपून करण्याची गरज नाही. जसं इस्रायल. आता भारतही. म्हणतांना खरंच अभिमान वाटतोय. :-) ६. नुकतंच काही दिवसांपूर्वी अजित दोभाल यांनी एक वक्तव्य केलं हे आत्ताचं नाही. जानेवारी २०१४ मधे हे वक्तव्य प्रसारित झालेलं मला चांगलं आठवतंय. मी तो विडिओ बघितलेला आहे. या तीन पातळ्यांपैकी कोणत्या पातळीवर कृती केली जाईल? आज केलेला स्ट्राईक हा ऑफेन्सिव्ह डिफेन्स याच प्रकारात मोडतो. उरीचा बदलाही असाच. पण एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे. आंतरराष्ट्रीय दबाव, आर्थिक नाकेबंदी, शत्रूच्या मित्रदेशांशी हातमिळवणी करून शत्रूला एकटे पाडणे, संरक्षण दलांना पूर्ण मोकळीक, कडक गुप्तचर यंत्रणांचे जाळे... हे सगळे नाही अशी कल्पना करा आणि मग ह्या प्रकारच्या स्ट्राईकची कल्पना करा.. उरीच्या बदल्याच्या वेळेसच मोठ्या युद्धाला तोंड फुटले असते. अचूक नियोजन करून, बिनचूक अटॅक करणे आणि शत्रूदेशाची सीमा ओलांडून ३०० ते ३५० अतिरेकी एकरकमी मारणे, हे गुप्तचर यंत्रणांच्या निर्भेळ यशाचेच द्योतक आहे. जाता जाता: मला स्वतःला असं वाटतंय की हा बालाकोटचा हल्ला पुरेसा राहणार नाही. आणिकही काही होईल. काय त्याची कल्पना नाही अर्थात्.. अवांतरः कलम ३७० कधीही रद्द करता येऊ शकते. https://www.youtube.com/watch?v=OcEpkuNZEqQ मला ३५ अ / ब याबद्दल माहिती हवी आहे. असल्यास सांगावे. राघव

सुबोध खरे गुरुवार, 02/21/2019 - 09:30
आपल्याला पाकिस्तानवर पुराव्यानिशी आरोप करता येतील. हा एक गैरसमज आहे तुम्ही वाटेल तो पुरावा द्या पाकिस्तान तो मान्य करणारच नाही. India

will not submit any evidence to Pakistan

on the role of Jaish-e-Mohammad in the Pulwama terror strike, and instead give all such facts to friendly nations to unmask the role of elements based in the neighbouring country in the attack, a senior government official said. The official was sharing the views within the government, which is not at all in favour of giving any evidence to Pakistan considering the past experience when despite giving multiple dossiers on the involvement of Pakistan-based elements in the 26/11 Mumbai terror attacks and terror strike in Pathankot airbase, Islamabad did nothing to punish the perpetrators. https://www.business-standard.com/article/pti-stories/india-won-t-give-proof-to-islamabad-but-to-friendly-nations-to-unmask-pak-role-in-terror-official-119022000941_1.html तपासाचा मूळ हेतू हा आहे कि गुन्हा कसा घडला त्याची पार्श्वभूमी त्याची पद्धत(MODUS OPERANDI) त्यात हातभार लावणारे घरभेदी कोण आहेत त्यांचा छडा लावणे हा आहे. पाकिस्तानला कितीही पुरावा दिला तरी ते ग्राह्य धरणार आहेत का? अजमल कसाबला जिवंत पकडल्यावर(प्रत्यक्ष पुरावा असताना) तो पाकिस्तानी नागरिक नाहीच म्हणून सांगितले मग परिस्थितीजन्य पुराव्याचा काय उपयोग?

In reply to by मनो

ट्रेड मार्क गुरुवार, 02/21/2019 - 19:07
घरभेदी कोण असावेत याचा अंदाज येण्यासाठी खालील लेख वाचा लेख १ लेख २ वरील लेखामधील एक परिच्छेद - २०११ च्या सुमारास अकस्मात एक बातमी भारतीय माध्यमातून झळकली आणि राजकारणात एकच खळबळ उडालेली होती. संरक्षणमंत्र्यांच्या फ़ोनवरील संभाषणही चोरून ऐकले जात असल्याची ती बातमी होती. तो आक्षेप भारतीय लष्कराच्या गुप्तचर विभागावर ठेवण्यात आलेला होता. त्याखेरीज आणखी एक अशीच अफ़वा वर्तमानपत्रातून सोडली गेलेली होती. प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने सेनादलाच्या अनेक तुकड्या राजधानी दिल्लीत संचलनाचा सराव करीत होत्या. त्याचवेळी उत्तरप्रदेशाच्या मेरठ येथून काही सेनादलाच्या तुकड्या इतरत्र कुच करीत होत्या. त्यातून भारतीय लोकशाही उलथून टाकत सेनादल सत्ता काबीज करायच्या प्रयत्नात असल्याची ती अफ़वा होती. तिला कुठलाही आधार नव्हता आणि गोंधळ उडवून देण्याचाच त्यामागचा हेतू होता. तो मोठ्या प्रमाणात यशस्वीही झाला. कारण तितके निमीत्त साधून दिल्लीची नोकरशाही, राजकारणी व तथाकथित बुद्धीमंतांनी मोठा हलकल्लोळ माजवला आणि तेव्हाचे लष्करप्रमुख व्हॊ. के. सिंग यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यात आले. उपरोक्त दोन बातम्या भारतीय सुरक्षा दलाच्या विविध दक्षता यंत्रणांना उध्वस्त करणाचा व्यापक कट होता. कारण तेव्हा सिंग व संरक्षणमंत्री अन्थोनी यांच्यात मतभेद निर्माण झाले होते आणि त्याचाच आधार घेऊन गलिच्छ राजकारण खेळले जात होते. माध्यमातून मग सिंग यांना सरसकट लक्ष्य करण्याची मोहिमच हाती घेण्यात आली. काश्मिरातील पाकवादी प्रवृतीच्या राजकारण्यांनी तोफ़ा डागल्या. सिंग लष्करी अधिकारी आणि संरक्षण खात्याचा पैसा वापरून काश्मिरी राजकारणात ढवळाढवळ करीत असल्याचाही एक आरोप त्यात समाविष्ट होता. त्यासाठी मग टीएसडी हा शब्द पुढे आला, ही टीएसडी म्हणजे टेक्नीकल सपोर्ट डिव्हीजन गुप्तचर म्हणून काम करीत नसून काश्मिरातील लोकांनी निवडलेले सरकार पाडण्यासाठी उचापती करीत असल्याचा आरोप पुढे आला. लष्करी पैसे देऊन एक अपक्ष आमदाराला खरेदी करण्यात आल्याचा बिनबुडाचा आरोप ठळकपणे पुढे आला आणि त्याचा कुठलाही पुरावा कधीच कोणी दिलेला नव्हता. पर्यायाने टीएसडी ही गोपनीय बाब चव्हाट्यावर आली आणि तिचा गाशा सेनादलाला गुंडाळावा लागला. त्यात कार्यरत असलेल्या अधिकारी व हस्तकांचे चेहरे उघडे पडले आणि अनेक अधिकारी कोर्टमार्शलचे बळी झाले. पण ती बाब महत्वाची नाही. त्यातून काश्मिरात गुपचुप जी कारस्थाने शिजवलॊ जात होती, त्यांची इत्थंभूत माहिती सेनादलाला मिळण्याचा मार्गच बंद होऊन गेला.

Rajesh188 गुरुवार, 02/21/2019 - 10:36
Kashmir आणि खलिस्तान ह्याची तुलना केली तर दोघांना सुधा स्वायतत्ता हवी होती . आणि संघर्षाचं कारण उघड तरी दोघांचं होते . मग खलिस्तान प्रश्न मिटवता आला परंतु काश्मीर धागगत राहायला ह्या मधून आसा पण निष्कर्ष निघतो की हा काश्मीर शी संबंधित प्रश्न नसून dharmikteshi संबंधित प्रश्न आहे आणि त्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म आघाड्या उघडलेल्या आहेत पण आपण फक्त ऐकाच आघाडीवर लक्ष केंद्रित केले आहे त्या मुळे तो सुटत नाही . ऐक तर्क आसा सुधा करता येतो सध्य परिस्थिती बघून

In reply to by अर्वाच्य

सिद्धार्थ ४ गुरुवार, 02/21/2019 - 11:18
तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही बोलता का हो?आज वर म्हात्रें काकांनी मिपा वर एकही खोटा किंवा असंतुलित प्रतिसाद मी तरी वाचला नाही आहे.

In reply to by अर्वाच्य

lakhu risbud गुरुवार, 02/21/2019 - 12:24
बा अर्वाच्च्या तु मिपा वरुन हाकलुन लावलेल्या ज्या कोणाचा आय डी आहेस तुझी हकालपट्टी ही तुझ्याच कर्माने झालेली आहे या याबद्दल निश्चिन्त रहा . ती का झाली असावी याचाही अंदाज आता यायला लागला आहे. म्हात्रे कांकांवर खोटारडे पणाचा आरोप त्यांच्या विचारसरणीचे विरोधकही करणार नाहीत.. जर तू डोक्यावर पडला असशील तर बाबच वेगळी आहे !

In reply to by lakhu risbud

विशुमित गुरुवार, 02/21/2019 - 13:11
अगदी बरोबर..!! शेवटी एक मिपाकरच दुसऱ्या मिपाकराच्या मदतीला येणार. खांद्यावर डोके वगैरे वगैरे..! आपल्या कांकांवर खोटारडे पणाचा आरोप म्हणजे काय ! जाहीर निषेद..! ===

In reply to by विशुमित

lakhu risbud Mon, 02/25/2019 - 15:23
इथले काका त्यांचे ते बघण्यास समर्थ आहेत हो ! तुम्ही तुमच्या काकांची काळजी करा.पुतण्याला तोंडघशी पाडलंन त्यांनी. मावळातून लढायचं म्हणे पर्यंत कात्रज चा घाट दाखवलान. तुम्हाला आता प्रचाराचा ओव्हरटाईम कसा जमणार ते बघा.

In reply to by lakhu risbud

विशुमित Mon, 02/25/2019 - 15:48
अस कस अस कस.. आपले सन्मानीय काका देखील डू आय डी चा सहारा घेत आहेत, असे जाणवते आहे. बाकी आमच्या तालुक्यातील काका पुतणे त्यांच ते बघून घेतील. तुम्ही कशाला लुडबुड करताय? चिरीमिरीसाठी एवढा निर्लज्जपणा?? अरेरे...!!

In reply to by lakhu risbud

शब्दबम्बाळ गुरुवार, 02/21/2019 - 16:12
जिथे तिथे व्यक्तिपूजाच करणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा करणार! म्हात्रेंनी वरती व्हिडीओ लिंक शेअर केली आहे ती फेक बातमी आहे, मजकूर खुबीने टाकलाच नाहीये म्हणजे असे नको व्हायला कि काही स्वतः काहीतरी लिहून जबाबदारी घ्यायला लागावी! हे आधी पण काही ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे असे होऊच्च शकत नाही टाईप प्रतिसाद तुमच्यापाशी ठेवा! बाकी जास्त काही बोलायला नको नाहीतर "जिएसटी च्या धाग्यावर त्यांनी चुकीचे टॅक्स टेबल टाकून स्वस्ताई दाखवायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा संक्षींनी व्यवस्थित विरोध केला होता आणि HSN का काहीतरी नंबर मागितला होता. जो कि द्यायला जमला नाही पण संक्षींना घालून पाडून बोललं गेलं! सोबतीला इतर सवंगडी आलेच लगेच... १-२ दिवसातच संक्षींचा आयडी देखील बॅन झाला!" असो, आताशा इकडे येणे कमीच केले असल्याने स्वतःच्या आयडीबद्दल फारसे ममत्व राहिलेले नाही त्यामुळे चालू द्यात काहीही! ट्रोल्सचे पीक चिखलात उत्तम येत आहे.

In reply to by अर्वाच्य

शब्दबम्बाळ गुरुवार, 02/21/2019 - 18:29
द्वेषातुन प्रतिसाद देण्याची काही गरज नव्हती असे वाटते... त्यांनी केलेल चांगले लिखाण हे चांगलेच आहे.. जिथे चुक वाटते तिथेच बोलणे संयुक्तिक असावे

In reply to by शब्दबम्बाळ

शब्दबम्बाळ Fri, 02/22/2019 - 14:09
अर्वाच्य हा आयडी इतक्यात बॅन पण झाला! केवढं ते स्पीड! इथले बरेच मान्यवर आयडी इतरांची लायकी/पगार काढून, शिवीगाळ करूनही कवच कुंडले पांघरून सुरक्षित राहतात असे दिसतंय! असेही खाजगी संस्थळ आहे म्हणा! पण मग जाहीर करून टाका ना, की या या आयडीना स्पेशल प्रोटेक्शन योजना आहे, बाकी लोकांनी काहीही बोलू नये अन्यथा १ दिवसाच्या आत हकालपट्टी होईल. याशिवाय फेक न्यूज पसरवल्याबद्दल अवाक्षर देखील काढलेलं नाहीये अजून कोणी! पुरावा दिल्यावर आता सवंगडी आणि फॉलोवर गायब झाले वाटत...

In reply to by शब्दबम्बाळ

यशवंत पाटील Fri, 02/22/2019 - 14:25
म्हणून गपगुमान बस्तो. काही लोकांनी कायबी लीहीलं तर चालतंय हिकड. अट एकच मोदीशेठला चांगलं म्हणा. म्हात्रे साहेब न ते दुसरे खरे साहेब यांना आवरा अस कुणी सांगायच आन कुणाला. ते गुर्जी का कोण आन ते मोदक साहेब न्हाईत वाटत आजकाल.

In reply to by शब्दबम्बाळ

विशुमित Fri, 02/22/2019 - 14:39
संपादक मंडळ- आय डी बॅन बाबत काही पारदर्शकता आणता येउ शकते का ? नाहीतर मिपा हे २०१९ च्या निवडणुकीपर्यंतच स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवू शकेल. कृपया याला कोणी "गर्भित धमकी" वगैरे असली विशेषणे लावू नका. कारण ती मी फाट्यावर मारत असतो. मला फक्त मिपाची काळजी आहे. विविध वाङ्मय रसग्रहणाची हक्काची जागा म्हणून मी या संकेतस्थळाकडे आज पर्यंत तरी पाहिले आहे.

In reply to by विशुमित

शब्दबम्बाळ Mon, 02/25/2019 - 10:50
अहो संपादक मंडळाला विनंती करताय पण त्यात कोण आहे पाहिलंय का? :) बर मागे कोणीतरी म्हटलं होत कि संपादक मंडळाला अधिकार नाहीत हकालपट्टीचे, पण "वट्ट" असला कि कोण काय बोलणारे?! ;) इतरांनी चुकीची बातमी दिली(जी फक्त भाजपशी रिलेटेड असेल) तर पानभर लिहितील समोरच्याला उपदेश! पण स्वतः दिलेली सगळी माहिती चुकीची निघाल्यावर खेद व्यक्त करायला पण जमत नाही! ब्रम्हांडनायकाकरून हि गोष्ट तेव्हडी चांगली शिकून घेतलीये त्यांच्या फोल्लोवर्सनी!

In reply to by lakhu risbud

विशुमित Mon, 02/25/2019 - 16:01
तुम्हाला सदाशिव पेठेत जायचे असताना बारामतीच्या एस टी त कसे काय बसता?? काही केमिकल लोचा आहे का?? === अवांतर- काही महाभाग वारसाहक्काने मिळाल्यासारखं मिपावर वावरत असतात. प्रत्यक्षात ही अशी बांडगुळं, स्वतःचा अजेंडा राबवायला मिपाचा गैरवापर करत आहेत. हे मी एकटाच नाही म्हणत तर मिपावरील आजीमाजी सदस्य खाजगीत बोलत असतात.

In reply to by विशुमित

lakhu risbud Tue, 02/26/2019 - 13:03
असे हिसके मारू नका हो ! गळ्यातला पट्टा अचानक दिसतो हो. अवांतर- काही महाभाग वारसाहक्काने मिळाल्यासारखं मिपावर वावरत असतात. प्रत्यक्षात ही अशी बांडगुळं, स्वतःचा अजेंडा राबवायला मिपाचा गैरवापर करत आहेत. हे मी एकटाच नाही म्हणत तर मिपावरील आजीमाजी सदस्य खाजगीत बोलत असतात. स्वतःबद्दलचे एवढे अचूक आणि परखड निरीक्षण करणारे आजकाल विरळच ! मिपाकर म्हणून तुमच्या प्रगतीबद्दल अभिमान वाटला.

In reply to by lakhu risbud

विशुमित Tue, 02/26/2019 - 13:25
असे हिसके मारू नका हो ! गळ्यातला पट्टा अचानक दिसतो हो. ==)) अस होय, सोर्री सॉरी. उगाच हिस्के मारले तुम्हाला. त्यां मेनका मैडम यायच्या धावत. तुम्हाला दुखलं असेल ना! === बाकी वरचं विश्लेषण तुमच्यासाठीच होते. वाटले होते तुम्हाला समजले असेल पण तुम्हाला एस टी चा बोर्डच नाही समजत तर हे कुठले समजायला. असो. आता तरी समजलं असेल अशी आशा करुयात. आता तुम्हाला युयु करतोय, परत आला की हाड हाडच असणार आहे ...!

In reply to by lakhu risbud

तेजस आठवले Tue, 02/26/2019 - 15:00
प्रत्यक्षात ही अशी बांडगुळं, स्वतःचा अजेंडा राबवायला मिपाचा गैरवापर करत आहेत. हे मी एकटाच नाही म्हणत तर मिपावरील आजीमाजी सदस्य खाजगीत बोलत असतात.
हे वाक्य अप्रतिम आहे, पण ते प्रत्येकालाच लागू होते ह्याची नोंद घ्यावी. वारसाहक्काने कुठले आयडी स्वतःच्या प्रतिकृती काढून येत आहेत हे सगळ्यांनाच माहित आहे.बिग्रेडी अजेंडा राबवणारे ह्याला अपवाद नाहीत.

In reply to by शब्दबम्बाळ

एकुलता एक डॉन Mon, 02/25/2019 - 02:24
जिएसटी च्या धाग्यावर त्यांनी चुकीचे टॅक्स टेबल टाकून स्वस्ताई दाखवायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा संक्षींनी व्यवस्थित विरोध केला होता आणि HSN का काहीतरी नंबर मागितला होता. जो कि द्यायला जमला मला फक्त जिएसटी माधे इन्तेरेस्त आहे ,कोनि धाग सन्गु शकेल कोन्त आहे ?

Blackcat गुरुवार, 02/21/2019 - 17:38
२०१४ पासून काश्मीरमध्ये दर दोन दहशतवाद्यांमागे एक जवान शहीद https://www.loksatta.com/desh-videsh-news/since-2014-in-kashmir-for-every-2-militants-killed-forces-lost-1-of-its-men-1845217/

Blackcat गुरुवार, 02/21/2019 - 19:31
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सैनिकांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सर्व केंद्रीय सुरक्षा दलांना आता जम्मूहून श्रीनगरला नेण्यासाठी विमान प्रवासाची सेवा पुरवली जाणार आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार आता बीएसएफ, आसाम रायफल्स, सीआरपीएफ, सीआयएसएफ, एसएसबी, एनएसजी आणि आयटीबीपीच्या जवानांना काश्मीर खोऱ्यात तैनातीसाठी हवाईमार्गे श्रीनगरला नेलं जाणार आहे. सुट्टीवर जाताना, सुट्टीवरुन परतताना किंवा सुरक्षा दलाच्या पथकाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी हवाईमार्गाचा वापर केला जाणार आहे. दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली आणि जम्मू-श्रीनगर व श्रीनगर-दिल्ली या मार्गावर विमान सेवेचा वापर केला जाईल. जवळपास 7 लाख 80 हजार जवानांना याचा लाभ मिळणार, केंद्रीय गृहमंत्रालयाचा हा निर्णय तात्काळ लागू होणार आहे. यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/after-pulwama-attack-govt-allows-air-travel-for-jawans-of-crpf-and-other-forces-deployed-in-kashmir-1845151/ मिस्ळ्पावचे तज्ञ तोण्डघशी पडले.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ गुरुवार, 02/21/2019 - 19:49
मिस्ळ्पावचे तज्ञ तोण्डघशी पडले. हे बघण्या आधी भाजपा सरकारला सैनिकांची सुरक्षा व त्यांचे जीव हे जास्त महत्वाचे आहेत हा महत्वाचा संदेश दिलेला आहे. त्यामुळे जवळपास ८ लाख सैनिक हे श्री मोदीजींचे फॅन झालेले आहेत. सैनिकांच्या रक्ताची दलाली करणार्यां काँग्रेसला व अश्या पक्षाची दलाली करणार्या निर्बुद्धाला हे कळणार नाही !!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

गामा पैलवान गुरुवार, 02/21/2019 - 21:43
ए माझ्या काळ्याकुट्ट मनीमावट्ये, तू कित्तीकीत्ती गोंडस आहेस, अगदी त्या पप्पूसारखी गं! पण तू किनई त्याच्यारखा बथ्थडपणा करू नकोस हं. विमान म्हणजे काय गं माऊ? हे वाक्य 'दारू म्हणजे काय रे भाऊ' याच्या धर्तीवर शंभर वेळा बडबडून बघ. मग तुला विमान आणि हेलिकॉप्टर यांच्यातला फरक आपोआप कळून येईल. तु. न., -गा.पै.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे गुरुवार, 02/21/2019 - 20:26
७ लाख ८० हजार एका सुटीच्या वेळेस होणारे ४ हजार येण्यासाठी आणि ४ हजार जाण्यासाठी असे ८ हजार प्रत्येकी म्हणजे ६२४ कोटी रुपये एका सुटीला देणे सरकारला ( आणि पर्यायाने जनतेला) परवडणार आहे का? वर्षात तीन वेळेस जवानांना सुटी मिळते याच्या तिप्पट खर्च शक्य आहे का? आणि असल्यास एवढी विमाने कोणाकडे आहेत? आणि आता श्रीनगर च्या विमानांचे आरक्षण मिळणे अशक्य होणार आहे. वायुदलाची किंवा एअर इंडियाची विमाने गृह खात्याकडून वापरली तर त्याचे पैसे तर द्यावेच लागतील अर्थ खात्याची मंजुरी मिळेल का? हा एक मोठा प्रश्न आहे. नि जर्क रिऍक्शन आहे एवढेच मी म्हणेन.

Blackcat गुरुवार, 02/21/2019 - 20:37
हल्ला झाला तेंव्हा महामहिम जिम कॉर्बेट पार्क मध्ये फोटो शूट करत होते म्हणे , असे सर्वत्र येत आहे, खरे आहे का ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

विशुमित Fri, 02/22/2019 - 13:52
त्यांना खराब हवामानामुळे उशीरा संदेश पोहचला, असे स्पष्टीकरण आले आहे. === ते पिश्चर मधे दाखवतात तसा रेडिओ सेट नव्हते का त्यांच्या ताफ्यात?? "अल्फा टॅगो चार्ली, ओव्हर ऍण्ड आऊट..!!""

प्रसाद_१९८२ गुरुवार, 02/21/2019 - 21:05
हल्ला झाला तेंव्हा महामहिम जिम कॉर्बेट पार्क मध्ये फोटो शूट करत होते म्हणे , असे सर्वत्र येत आहे, खरे आहे का ? -- असा हल्ला होईल, हे काय स्वप्नात आले होते का त्यांच्या ? -- तो कॉंग्रेसी सुरजेवाला डोक्यावर पडलेला माणूस आहे, फार लक्ष नका देऊ तुम्ही त्याच्याकडे.

In reply to by प्रसाद_१९८२

डँबिस००७ Fri, 02/22/2019 - 14:51
भ्रष्ट काँग्रेस सुरझेवाला , दिग्विजय सींग , मणी शंकर अय्यर सारख्या लोकांमुळे बुडणार आहे !!
लोकहो, काश्मिरातल्या पुलवामा जिल्ह्यात अवंतीपूर जवळ गोरीपोरा येथे राष्ट्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या बसवर हल्ला झाला. त्यासंबंधी काही प्रश्न उद्भवले आहेत. १. हे सैनिक नसून निमलष्करी दलाचे जवान होते. सेनेची माणसं नेआण करायची काटेकोर चाकोरी (routine) असते. अशी काही पद्धती या दलाची होती का? २. एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे नक्षल्यांनी ७६ निमलष्करी जवान हल्ला करून ठार मारले. त्यापासनं काही धडे घेतले गेले होते का? ते विसरले गेले का? ३. आदिल अहमद दर या आतंकवाद्याने स्फोटकांनी (IED) भरलेली जीप जवानांच्या बसवर आदळली. हा अतिरेकी स्फोटतत्ज्ञ समजला जातो (बातमी कुठे वाचली ते आठवंत नाही).