भले तर देऊ...
तर मंडळी, "अशा वेळी आपण काय कराल?" या कोंबडी प्रेमींच्या धाग्यावर कट्टर मिपाकर श्री मुवि यांनी प्रतिसादातून संत तुकारामांच्या अभंगवाणीतली एक ओळ टंकली आहे. निमीत्त मुवि असले तरी सर्रास ह्या ओळी चुकीच्या लिहिल्या जातात आणि चुकीच्या शब्दानिशी स्वीकारल्याही जातात! अर्थात अश्लील शब्दांचा वापर व प्रसार टाळण्यासाठी एखादा शब्द बदलून प्रचलित केला तर हरकत नाही पण अभंगातील एकापेक्षा जास्त शब्द बदलून किंवा शब्दक्रमच बदलणे हे चूक आहे. कवीत्वाशी विश्वासघात केल्यासारखेही आहेच! अर्थ जरी एकच असला तरी मूळ शब्दांना टाकून का द्यावे? हा माझा प्रश्न आणि चर्चेचा विषय आहे.
मिसळपाव