मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

युक्रेनमधला पेचप्रसंग

गामा पैलवान ·

मदनबाण 25/03/2022 - 21:52
चांगली माहिती दिली आहे. पुतीन यांनी त्यांच्या दाढीवाल्या मित्रास नमुना पेश करायला सांगितला. मग काय, त्यानं एक ब्राह्मोस दिलं 'चुकून' पाकिस्तानात पाठवून. निरनिराळ्या देशांचे प्रमुख सध्या नव्या दिल्लीत रीघ का लावताहेत ते कळतं, नाहीका? झलक दिखाके कर गया दिवाना ....! ये कुछ पट्या नय मेरुकु... अस्थिर पाकिस्तानातील त्यांच्या सैन्याची मिसाईल ट्रेस आणि ते नष्ट करण्याच्या क्षमता किती हे आपण पडताळुन पाहिले. पाकड्यांनी चायनीज HQ16A [ LY-80 ] सरफेस टु एअर डिफेन्स मिसाईल्स [ सॅम ] त्यांच्याकडे बसवल्या आहेत, याच बरोबर इतर ही चायनीज रडार्स त्यांनी बसवल्या आहेत. चीनी वस्तुं बद्धल एक म्हण आहे :- चायना का माल चला तो चांद तक, नही तो शाम तक ! तेव्हा आपल्या मिसाईलला ते नष्ट न करु शकल्यांने त्या सर्व सिस्टीम्सचा आणि त्या ऑपरेट करणार्‍या मंडळींचा या निमित्त्याने पर्दा फाश झाला. ही घटना घडल्यावर पाकिस्तानी लष्करात जो हडकंप झाला, त्या नंतर सगळ्या प्रकारचे हाय अलर्ट्स आणि बचावात्मक उपाय अमलात आणले गेले. या निमित्त्याने आपल्याला ते अश्या परिस्थीतीत काय करतात आणि कसे वागतात याची देखील महत्वपूर्ण माहिती उपलब्ध झाली असणार.पाकिस्तानी लष्कर आणि हवाईदल यांच्या मनोबलावर याचा मोठा परिणाम झाला आहे /होईल. तसेच सर्जिकल स्ट्राईक बरोबर हे मिसाईल त्यांच्या हद्दीत बिनदिक्कत घुसवुन आपण हे जगाला दाखवुन दिले आहे की आम्ही आमचे डिफेन्सीव्ह धोरण सोडुन ऑफेस्निव्ह डिफेन्सवर शिफ्ट झालो आहोत, आम्ही हव्या त्या वेळी हवे ते टार्गेट नष्ट करु शकतो अशी भिती देखील आता पाकिस्तानच्या मनात उत्पन्न करुन ठेवण्यात यशस्वी झालो आहोत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- I'm not special , i'm just limited edition.

In reply to by गामा पैलवान

फारच उत्तम .... आंतरराष्ट्रीय राजकारण, फार वेगळ्या पातळीवर चालते त्यामुळे, तुम्ही म्हणता तशी, शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by गामा पैलवान

शशिकांत ओक 27/03/2022 - 19:11
गा. पैलवान रशियन पुतीन दंड थोपटून उभे राहिले आहेत. तुम लढते रहो हम तुम्हारे कपडे संभालते है... अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी म्हणून युक्रेनला अधांतरी ठेवले आहे. पाकिस्तान वझीरे आज़म क्रिकेटर इम्रान खान यांच्या शेवटच्या (?) भाषणाच्या प्रतीक्षेत आहे.

In reply to by शशिकांत ओक

Trump 28/03/2022 - 17:35
९ मे चा काय मुहूर्त लागला आहे?
रशियाने ९ मेला नाझी जर्मनीला हरावले आहे. आणि रशिया सध्या युक्रेनमध्ये नाझीबरोबर युध्द करत आहे.

सौन्दर्य 25/03/2022 - 23:29
लेख चांगला व माहितीपूर्ण आहे. पण ------------------ 'अमेरिकेचे विभाजन व्हायला पाहिजे' हे काही पटले नाही. ज्यावेळी दोन तुल्यबळ योद्धा समोरासमोर उभे ठाकतात त्यावेळी युद्ध होण्याची शक्यता कमी असते, मात्र बलवान योध्यासमोर किरकोळ योद्धा आला तर युद्ध अटळ असते. जे आपण रशिया विरुद्ध युक्रेन बघतोय. रशिया व अमेरिका हे तुल्यबळ प्रतिस्पर्धी असल्यामुळे दोघेही एकमेकांना वचकून आणि ओळखून आहेत असे मला वाटते. आणि त्यामुळेच तिसरे महायुद्ध अजून तरी जगावर लादले गेले नाही. उद्या ह्यातील एकजण जरी कमकुवत झाला तर दुसऱ्यासाठी युद्धाचा तसेच जगावर राज्य करण्याचा मार्ग मोकळा होईल असे मला वाटते. अर्थात चीनच्या रुपात तिसरा तुल्यबळ प्रतिस्पर्धी निर्माण झालाच आहे.

In reply to by सौन्दर्य

गामा पैलवान 26/03/2022 - 02:26
सौन्दर्य,
उद्या ह्यातील एकजण जरी कमकुवत झाला तर दुसऱ्यासाठी युद्धाचा तसेच जगावर राज्य करण्याचा मार्ग मोकळा होईल
कुणीही एक कितीही मजबूत असला तरी तो पूर्ण जगावर राज्य करू शकंत नाही. तुल्यबळ प्रतिस्पर्धी उत्पन्न होतोच. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कुणीही एक कितीही मजबूत असला तरी तो पूर्ण जगावर राज्य करू शकंत नाही. तुल्यबळ प्रतिस्पर्धी उत्पन्न होतोच.
म्हणजे तुम्हाला चीन म्हणायचे आहे का? की भारत?

निनाद 26/03/2022 - 05:37
कदाचित या युद्धाचे धोरण खूप आधी पासून आखले जात आहे. कोव्हिडमध्ये कधीही बाहेर न पडलेले पुतीन अचानक येऊन मोदींना भेटून गेले होते. अमेरिकेचे विभाजन करण्याआधी पाकिस्तान चे विभाजन आवश्यक आहे. अमेरिकेचे विभाजन केले तरी डेमोक्रॅटिक पक्ष आणि युरोपिय युनियन यांच्यातले सख्य मोडून काढले पाहिजे. डेमोक्रॅटिक पक्ष तर विसर्जित केला पहिजे असे माझे मत आहे. हा डेमोक्रॅटिक पक्ष म्हणजे जुन्या सोवियेत युनियन चे नवे रूप आहे. मायकेल खोदार्कोव्हास्की ला पुतीन ने का सोडून दिले होते हे न उलगडलेले कोडे आहे. पूतिन ने नक्की काय सौदा केला असावा? खोदार्कोव्हास्की यांनी बोरिस येल्त्सिनच्या पहिल्या सरकारचे आर्थिक सल्लागार म्हणून काम केले होते. म्हणजे हा माणूस पूर्णपणे कम्युनिझमवरील विश्वास गमावलेला आहे असे म्हणायला जागा आहे. या मायकेल खोदार्कोव्हास्कीला सपोर्ट मात्र ऍम्नेस्टी इंटरनॅशनलने केला होता. ही पाताळयंत्री संस्था प्रत्येक विवादात कशी अचूकपणे आढळते!

दीपक११७७ 27/03/2022 - 13:07
छान वाटला लेख , जाता जाता.... झुलोस्कि सारख्या आंतराष्ट्रीय व्यक्तीचा उल्लेख लेखा मध्ये नाही याचा खेद वाटतो का?!:;

कंजूस 27/03/2022 - 14:28
मला दोन तीन प्रश्न पडले आहेत. १) भारत हा दुय्यम मोठा देश आणि मुख्य मार्केट आहे म्हणून इकडे पावणे मेवणे येत जात आहेत का? २) पासष्ट वयाचा नियम पाळून मोदी पुन्हा निवडणुकीत उभे राहणार नाहीत तर भाजपात दुसरा कोणता चलाख नेता आहे. आणि सर्व विरोधी एक होऊन लढणार तर ममता दिदिला डावलणार कसे? जोपर्यंत ममता तोपर्यंत राहुल बाबाला चानस नाही. मग कोण? ३) तिसरा प्रश्न म्हणजे चीनला आपल्या लोकसंख्येला अन्न कसं पुरवायचं याची धास्ती पडल्याने किंवा त्या नियोजनात गुंतल्याने तळ्यात उडी मारत नाही का?

In reply to by कंजूस

शाम भागवत 28/03/2022 - 12:42
पासष्ट वयाचा नियम पाळून
तुम्हाला ७५ म्हणावयाचे असावे.
१) भारत हा दुय्यम मोठा देश आणि मुख्य मार्केट आहे म्हणून इकडे पावणे मेवणे येत जात आहेत का?
१. मला वाटते २०१४ नंतर चीन, रशिया व भारत हे तीन देश हे एकमेकांमधे सत्तासमतोल साधणारे देश बनत आहेत. त्या अगोदर चीनची मर्जी सांभाळण्याचीच कसरत आपण जास्त करत होतो. २. चीन भारत व रशिया हे तीन्ही देश एकत्र झाले तर नाटोला फारच जबरदस्त प्रतिस्पर्धी निर्माण होईल. अमेरिका व युरोप हे कायम दबावाखाली राहतील. यास्तव अमेरिका व युरोप आता भारताशी चांगले संबंध ठेवायचे तसेच वाढवायचे प्रयत्न करत आहेत. या अगोदर अमेरिका व युरोप यांनी रशिया व चीन एकत्र येऊ नयेत यासाठी चीनला जवळ केले होते. पण आता चीन भरवशाचा राहिला नाही. त्यामुळे आता भारताचा नंबर लागला आहे. दुसरे सर्वाधीक महत्वाचे कारण म्हणजे भारत लोकशाही देश असल्याने भारतात काय चालले आहे ते कळू शकते. तसे रशिया व चीन बद्दल म्हणता येत नाही. त्यामुळे भारताचे महत्व २०५० पर्यंत तरी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. चीनची जाहीरातबाजी खूप झाली आहे. मात्र तो तेवढा बलवान नाही हे जसजसे दिवस जातील तसतसे जगाला लक्षात येत जाईल. विशेषकरून भारताला हे जसजसे जाणवत जाईल व आपण आपली शस्त्रसामुग्रीमधे आत्मनिर्भर होत जाऊ त्याप्रमाणात पाकीस्तानचे विभाजन करायचे मनसुबे रचले जातील असे वाटते. थोडक्यात भारताची मित्रसंख्या यापुढे सातत्याने वाढतच जाताना दिसणार आहे. असे मला वाटते.

In reply to by शाम भागवत

कंजूस 30/03/2022 - 06:52
६५. अगोदर महाजन आणि सुषमा स्वराजना तिकिट तिकिट नाकारलं होतं. यामुळे पवारसाहेबही नाराज होते. तसं आपलंही होईल. पण आता म्हणतात मी नाही त्यातला. कांग्रेस एक होऊन त्याचा अध्यक्ष व्हायला तयार आहे. गजराचे घड्याळ हातावर लावेन.

In reply to by मुक्त विहारि

आनन्दा 27/03/2022 - 20:02
होणार नाहीच असे पण नाही.. तसेही बलुचिस्तान मध्ये हिंदू जवळजवळ नाहीतच.. त्यामुळे त्यावरून वाजायची भीती नाहीये.. पाकिस्तान चे मात्र कंबरडे मोडेल.. शेजारी लहान लहान देश असणे नेहमी सोपे असते, कारण ते एकमेकात भांडत बसले तर तुम्हाला त्यांचा त्रास कमी होतो

In reply to by कपिलमुनी

चौकस२१२ 28/03/2022 - 04:52
बलुचिस्तान चे मांडे खाऊ नयेत. मला नाही वाटत कोणी "मांडे" खात आहे... पाकिस्तान ला निव्वळ त्रास देण्यासाठी " "बलुचिस्तान " ची आग धुमसत ठेवणे हि केवळ एक खेळी आहे

माहिती गोळा करून मगच, विश्लेषण करता आणि मग मुद्दा मांडता... तुमच्या लेखांतील काही विचार पटत किंवा न पटोत, पण तुम्ही आधी बाण मारून, मग वर्तुळे काढत नाही... तुमचे आणि माझे, वैचारिक मतभेद असले तरी, वैयक्तिक पातळीवर ते कधीच हमरीतुमरीवर उतरले नाहीत आणि उतरण्याची शक्यता देखील नाही...

माझ्या मते आता युक्रेनचे ३ ते ५ तुकडे संभवतात. पहिला डॉन नदीचं खोरं, अर्थात डॉनबास ( Don basin ) . हा विभाग कदाचित रशियात दाखल होईल. किंवा स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहील परस्पेक्टीव्ह पटला.आजच्याच वृत्तपत्रातील विश्लेषण व तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपले भाकीत खरे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. बलुचिस्तान चे मांडे खाऊ नयेत. मला नाही वाटत कोणी "मांडे" खातय, या चौ२१२ याच्याशी सहमत आहे. माथेफीरू आणी भुक्कड शेजारी नेहमीच डोकेदुखी आसतो बदलू शकत नाही म्हणून कायम त्याला टेटंरहूक वर ठेवणे हाच एक उपाय.

सुबोध खरे 28/03/2022 - 11:48
काही न पटलेले मुद्दे १) बलुचिस्तानला भारताचा पाठिंबा ( छुपा किंवा उघड) असला तरी बलुचिस्तान भारताचं भाग कधीही होणार नाही. असे होईल अशी कोणत्याही भारताच्या (सत्ताधारी किंवा विरोधी) नेत्याची किंवा नियोजन कर्त्यांची कल्पना नाही. कारण ती व्यवहार्य नाही. (तेथे भक्ती किंवा गुलामी आणणारे लोक पूर्वग्रहदूषित/ सडक्या मनोवृत्तीचे आहेत) केवळ तो इतिहासात भारताचा अनेक भाग होता म्हणून परत बलुचिस्तान भारताचा भाग होईल हे आपल्या आयुष्यकाळात अशक्य आहे. पाकिस्तानचे चार तुकडे करणे हा भारताच्या डावपेचाचा उघड भाग आहे कारण तो देश केवळ इस्लाम या एकमेव खांबावर उभा आहे. भारतापासून वेगळे होण्यास तेवढे कारण पुरेसे असले तरी एकत्र राहण्यासाठी तेवढे कारण पुरेसे नाही. तेथे पंजाबी लोकांनी सर्वत्र सवता सुभा केल्यामुळे सिंधी, बलुची आणि पठाण या तीन इतर प्रांतातील लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे बांगला देश सारखे हे तीन प्रांत आपल्या भाषिक आणि वंशिक अस्मितेसाठी वेगळे राष्ट्र हवे हि मागणी उचलून धरतात. २) एस एस एन २२ हि क्षेपणास्त्रे जहाज विरोधी क्षेपणास्त्रे असून त्यावरुन मोठी अण्वस्त्रे नेता येत नाहीत त्यामुळे इस्त्रायल जाळून टाकण्याची त्यात क्षमता नाहीच. https://www.globalsecurity.org/military/world/russia/moskit.htm. एस एस ( सरफेस टू सरफेस) एन (naval version) २२ हि जहाजावरुन डागण्यात येणारी क्षेपणास्त्रे "Sovremennyy" या विनाशिकांवर तैनात असून या विनाशिका रशियाकडे आणि चीनकडे रशियाकडून विकत घेतलेल्या चार विनाशिका आहेत. हि क्षेपणास्त्रे भारताकडे पण आहेत https://en.wikipedia.org/wiki/Sovremenny-class_destroyer ३) अमेरिकेचे विभाजन हि तर सद्यस्थितीत अशक्य मात्र गोष्ट आहे.हि केवळ कविकल्पना आहे त्यासाठी ना जन मत आहे ना कुठली प्रशासनिक तयारी. ४)ब्राम्होस पाकिस्तानात गेलं त्यासाठी पुतीन यांनी श्री मोदी याना सांगितलं हि पण एक अशीच कपोलकल्पित गोष्ट आहे. मुळात ते क्षेपणास्त्र आपण डागलं कि अपघातानेच गेलं हे नक्की सांगणं कठीण आहे . पण जरी भारताने ते मुद्दाम डागलं असेल तर ( चुकून डागलं हा कांगावा आहे हे मान्य केलं तरी) त्यातून चीनची HQ ९ हि क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली फुसकी आहे हे सिद्ध झालं आहे. यामुळे पाकिस्तानची (आणि चीनची) हवा टाईट झाली आहे हे मात्र खरं. आणि चीनची हि प्रणाली फुसकी आहे हे ठरवल्याबद्दल अमेरिका आणि नाटो हे देश आतून भारताला धन्यवादच देत असतील. कारण आता त्यांच्या क्षेपणास्त्र प्रणालीचे भाव वधारले शिवाय चीनच्या एकंदर सामरिक स्थिती बद्दल त्यांना जास्त चांगला अंदाज बांधता येऊ शकेल विशेषतः उद्या तैवान वरून युद्धाला तोंड फुटले तर. एका चुकीच्या क्षेपणास्त्राने किती कारनामे केले ते पहा.

Trump 28/03/2022 - 17:39
खरंतर आज ट्रंप राष्ट्राध्यक्ष असते तर रशियावर युद्धाची वेळ आलीच नसती. पण ट्रंपूतात्यांची ऐन वेळेस फाफलल्याने त्यांनी निमूटपणे सत्ता सोडली. आणि जगाच्या नशिबी आलीया भोगासी .... दुसरं काय.
+१ श्री ट्रंप यांच्याइतका प्रामाणिक, मनमोकळा आणि सगळ्यांना संभाळुन घेणारा नेता आजकाल दुर्मिळच.

गामा पैलवान 29/03/2022 - 02:20
सुबोध खरे, आपला इथला संदेश वाचला. माझी मतं सांगतो. १.
.... बलुचिस्तान भारताचं भाग कधीही होणार नाही.
बलुचिस्थान स्वतंत्र देश म्हणून तग धरून राहणं जवळजवळ अशक्य आहे. एकतर लोकसंख्या कमी आणि त्यामानाने विस्तार जास्त. शिवार विपुल नैसर्गिक खनिज संपत्ती असल्याने त्यास कोण्या एका देशाचा सहारा घेऊन जगणं भाग आहे. अन्यथा त्याचं जे शोषण आत्ता होतंय तसंच पुढे चालू राहील. संरक्षण, परराष्ट्रव्यवहार वगैरे भानगडी स्वतंत्र बलुचिस्थानाच्या आवाक्यातल्या ( वाटंत तरी ) नाहीत. म्हणूनंच पाकचा भाग तोडून जरी काढला तरी तो मोकळा ठेवता कामा नये. तो भारतास जोडून घेतलाच पाहिजे. या कामासाठी बलुची मराठा लोकांची मदत घेता येईल. इतर बलुचींपेक्षा ते बरेच मवाळ आहेत. आणि मुख्य म्हणजे तो शिक्षित वर्ग आहे. हा वर्ग बाकी बलुची व भारत यांच्यातला दुवा म्हणून काम करू शकतो. २.
एस एस एन २२ हि क्षेपणास्त्रे जहाज विरोधी क्षेपणास्त्रे असून त्यावरुन मोठी अण्वस्त्रे नेता येत नाहीत त्यामुळे इस्त्रायल जाळून टाकण्याची त्यात क्षमता नाहीच.
एकदम बरोबर. पण एकाच वेळेस अनेक क्षेपणास्त्रे डागता यावीत. निदान २००३ साली तरी ती तयारी झालेली होती. शिवाय इस्रायल अतिशय चिमुकला प्रांत आहे. पालघर + ठाणे + पुणे जिल्हे इतकाच विस्तार आहे ( विकीसंदर्भ : २२०७२ चौकिमी < ५३४४ + ४२१४ + १५६४३ चौकिमी ). त्यातून सबंध इस्रायल नष्ट करायची गरजही नाही. तेल अवीव, हायफा, वगैरे तीनचार प्रमुख शहरांत प्रत्येकी अर्धा मेगाटनचं विवर पाडणं पुरेसं ठरावं. निदान २००३ साली तरी पुरेसं असावं. वरील आकडेमोड व व्यूहरचना पुतीन यांची आहे. मी ती स्पष्ट करून सांगण्यावर साहजिक मर्यादा आहेत. ३.
हि केवळ कविकल्पना आहे त्यासाठी ना जन मत आहे ना कुठली प्रशासनिक तयारी.
१९४६ साली भारताचं विभाजन ही देखील कविकल्पनाच होती. त्या कवीचं नाव महमंद इक्बाल. पण जून १९४७ मध्ये ती प्रत्यक्षांत आलीच. बाकी अमेरिकन जनमत वगैरेंना विचारतो कोण. बिडेन धडधडीतपणे निवडणूक चोरून सत्तेत आलाय. हे एक पुस्तक आहे : Civil War II: The Coming Breakup of America परिचयाव्हेर : मी पुस्तक वाचलेलं नाही. हे पुस्तक १९९७ साली पहिल्यांदा छापलं गेलं. तेव्हा त्यातल्या गोष्टी अतिरंजित वाटंत होत्या. पण आज जर ग्राहकांचे आढावे बघितले तर त्या अतिरंजित गोष्टी प्रत्यक्षांत उतरल्याहं दिसून येतं. निदान, पुस्तकाचा आढावा घेणारे ग्राहक तरी तसा अभिप्राय नोंदवताहेत. ४.
ब्राम्होस पाकिस्तानात गेलं त्यासाठी पुतीन यांनी श्री मोदी याना सांगितलं हि पण एक अशीच कपोलकल्पित गोष्ट आहे.
रिकामं ब्राह्मोस पाकिस्तानावर डागण्यात मोदी व पुतीन यांच्यात सामंजस्य आहे. कोणी कोणाला सांगितलं हे गौण आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सुबोध खरे 29/03/2022 - 19:05
तो मोकळा ठेवता कामा नये. तो भारतास जोडून घेतलाच पाहिजे. जेमतेम ५० हजार हिंदू असलेले बलुचिस्तान स्वतःचे काय लष्कर ठेवणार आणि पाकिस्तानी लष्कराकशी काय टक्कर घेणार? उगाच बलुची मराठाची बेडकी किती फुगवणार? एकाच वेळेस अनेक क्षेपणास्त्रे डागता यावीत. या क्षेपणास्त्रांचा टप्पा फक्त २५० किमी आहे हि काय रशियन जहाजांवरुन डागायची? आणि जहाजे कुठे उभी करायची भूमध्य समुद्रात? म्हणजे इस्रायली विमाने किंवा जहाजे यावरून डागल्या जाणाऱ्या गॅब्रियल ब्ल्यू स्पिअर क्षेपणास्त्रांच्या का भूमध्य समुद्राच्या तळाशी गुप्तपणे फिरणाऱ्या इस्रायली पाणबुड्यांच्या टार्गेट प्रॅक्टिस साठी? उगाच काहींच्या काही? रिकामं ब्राह्मोस पाकिस्तानावर डागण्यात मोदी व पुतीन यांच्यात सामंजस्य आहे. कोणी कोणाला सांगितलं हे गौण आहे. मुळात पुतीन यांनी मोदींना असं सांगितलं याला अंशभर तरी पुरावा आहे का? बाकी चालू द्या

गा. पै तुमची माहिती संकलन लाजवाब आहे. पण आंद्रे यांनी आठवड्या पूर्वी खफवर याची ध्वनीफीत दिली होती. त्यात १४ व्या शतकपासून इतिहास आहे.

गामा पैलवान 29/03/2022 - 20:48
सुबोध खरे, आपला इथला संदेश वाचला. १.
जेमतेम ५० हजार हिंदू असलेले बलुचिस्तान स्वतःचे काय लष्कर ठेवणार आणि पाकिस्तानी लष्कराकशी काय टक्कर घेणार?
बरोबर. म्हणजेच, स्वतंत्र झाल्यावर बलुचिस्थान परत पाकच्या ताब्यात जाणार. ते टाळण्यासाठीच तर मी त्यास भारतात सामील करून घ्यायचं म्हणतोय. २.
उगाच बलुची मराठाची बेडकी किती फुगवणार?
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. जोवर बलुची लोकं हिंगलाज देवीस आई मानतात तोवर बलुची मराठ्यांची बेडकी फुगवायला हरकत नसावी. हे माझं वैयक्तिक मत. ३.
या क्षेपणास्त्रांचा टप्पा फक्त २५० किमी आहे. हि काय रशियन जहाजांवरुन डागायची? आणि जहाजे कुठे उभी करायची भूमध्य समुद्रात? .... उगाच काहींच्या काही?
दमास्कस ते तेल अवीव हे अंतर २०० किमीच्या आतबाहेर आहे. सीरियाच्या वाळवंटात ट्रक उभे करता येतील. किंवा मग सुखोईवरनंही डागता येतील. अर्थात हा पुतीन यांचा प्रश्न आहे. त्यांचं आकलन माझ्यापेक्षा सखोल आहे. ४.
मुळात पुतीन यांनी मोदींना असं सांगितलं याला अंशभर तरी पुरावा आहे का?
असला वा नसला तरी काय फरक पडतो? रशिया-भारताने संयुक्तपणे विकसित केलेलं ब्राह्मोस चीननिर्मित बचावयंत्रणेस हुलकावणी देऊन पाकिस्तानात जाऊन पडतं. हे तथ्य आहे. त्याचा जो काही परिणाम व्हायला पाहिजे तो होणारंच आहे. माझा प्रश्न इतकाच आहे की, ही घटना नेमकी रशिया-युक्रेन युद्धाच्या वेळेसच का घडली असावी? या दोन घटनांत काहीतरी संबंध असावा हा माझा तर्क आहे. त्यानुसार मी दृष्टीकोन विकसित करू पाहतोय. हा दृष्टीकोन तुम्हांस पसंत नाही. काही हरकत नाही. तुमचे माझे विचार जुळंत नाहीत, असं म्हणून मी या मुद्द्यासंदर्भात इथे थांबतो. आ.न., -गा.पै.

तर्कवादी 30/03/2022 - 00:11
काही मुद्दे न पटणारे आहेत
माझ्या मते झेलेन्स्की हा माणूस प्रभावप्रवण ( prone to Putin's influence ) आहे. त्याला हाताशी धरून पुतीन यांना आपली खेळी अचूकपणे करता येईल.
तर मग खरा सामना पुतीन विरुद्ध झेलेन्स्की असा नसून पुतीन विरुद्ध यारोश असा आहे
ही थिअरी फारच फिल्मी वाटते पण तरी राजकारणात त्यातुनही आंतरराष्ट्रीय राजकारणात काहीही घडू शकते आणि दिसते तसे नसते हे मान्य केले तरी जर झेलेंस्की आणि पुतीन यांचं इतकंच सख्य आहे तर बंडखोर नाझींचा बीमोड करण्याकरिता (जे रशियाला हवेच आहे) झेलेन्स्की सरळपणेच रशियाची मदत घेवू शकला असता. ते रशियाकरिताही पॉलिटिकली करेक्ट ठरले असते. .. नाझींना उघडपणे कोण पाठिंबा देवू शकेल ? जर नाझींचे अस्तित्व व त्यांच्या कारवाया पद्धतशीरपणे सिद्ध करुन जगासमोर आणल्या असत्या तर नाझीविरोधी मोहिमेला नैतिक पाठबळ लाभले असते असे न करता पुतीन युद्धखोरीचा दोष का ओढवून घेत आहे ? तसेच युक्रेनमधील नाझींची संख्या किती आहे व विस्तार कसा आहे हे याचा उल्लेख नसला तरी काही मुठभर (अगदी १०% म्हणू हवं तर) नाझींचा बीमोड करण्याकरिता झेलेन्स्की युक्रेनच्या अनेक शहरांचे सर्वंकष नुकसान होवू देत आहे ? यावरुन मला मिपावर कुणीतरी टाकलेला किस्सा आठवला - ढेकूण मारण्यासाठी गादीला आग लावली जी पुढे खोलीभर पसरली. आणि झेलेन्स्की जर पुतीनच्या प्रभावाखाली आहे तर मग तो नाटोच्या नादी का लागला ? पुतीनला आवडत नसतानाही ? नाझी व नाटोचे दोन मुद्दे परस्परविरोधी वाटतात. मुळात युक्रेनमध्ये नाझींचा शिरकाव झाला कुठून ? आधीच्या सोव्हिएत युनियनमध्येच नाझी होते का ? मला तरी नाझी हा बागुलबुवा वाटतो.. असे काही नाझी आज मोठ्या प्रमाणावार अस्तित्वात असतील आणि कारवाया करत असतील हे खरं वाटत नाही.. फारतर नाझी विचाराचे काही घटक असू शकतील. लेखातील इतर मुद्दे : अमेरिकेचे विभाजन - हे काय नवीनच ? हे का होणार ? कोण करणार ? असो पाकिस्तानचे विभाजन : भारताने असल्या काही भानगडीत पडू नये. सध्या जे आहे , जसे आहे तेच व्यवस्थित सांभाळावे. बाकी भारताने पाकिस्तानावर 'चुकून' सोडलेले क्षेपणास्त्र हे ब्राह्मोसच होते का ? मी याआधी वाचलेल्या बातम्यांत फक्त क्षेपणास्त्र असाच उल्लेख होता, ब्राह्मोस नाही. आणि सध्या युक्रेनच्य्या गदारोळात जगाने या चुकीकडे दुर्लक्ष केले असले तरी यामुळे भारताने भलतेच धाडस करु नये - संरक्षण, उत्पादन व इलेक्ट्रॉनिक्स इ क्षेत्रांत स्वयंपुर्ण नसताना युद्धखोरी परवडणारी नाही.

In reply to by तर्कवादी

सुबोध खरे 30/03/2022 - 20:09
संरक्षण, उत्पादन व इलेक्ट्रॉनिक्स इ क्षेत्रांत स्वयंपुर्ण नसताना युद्धखोरी परवडणारी नाही. असा स्वयंपूर्ण देश कदाचित केवळ अमेरिकाच आहे. कारण रशिया सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये स्वयंपूर्ण नाही. बाकी युरोपीय देश तर लांबच राहिले भारताने क्षेपणास्त्र डागले ते अपघात होता कि अपघाताचे नाव दिले आहे हा मुद्दा बाजूला ठेवू ( ते नक्की फारच थोड्या लोकांना माहिती असावे) परंतु या क्षेपणास्त्राने पाकिस्तानची चीन कडून आयात केलेली क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा फुसकी ठरवली आहे हि यातील फार मोठी उपलब्धता आहे. या मुळे पाकिस्तानच काय चीनसुद्धा भारताशी कुरबुरी करताना थोडासा कचरेल यात शंका नाही. गेंडा किंवा हत्ती याना भीती दाखवण्यासाठी सिंह सुद्धा गुरगुराट करतात तसेच हे आहे. स्वातंत्र्य दिनी किंवा प्रजासत्ताकी दिनी भारत आपली सैन्य शक्ती प्रदर्शनासरथ मांडतो ती काही लोकांचे मनोरंजन म्हणून नव्हे तर जगातील इतर देशांना आपली शक्ती आणि सामर्थ्य दाखवण्यासाठी. अपघाताने का होईना पण ब्राम्होसने चीनची क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली फुसकी ठरवली हा चीनला एक मोठा धक्काच असून त्यानंतर ब्राम्होस खरेदी साठी बऱ्याच देशांनी रस दाखवलेला आहे. राहिली गोष्ट -- हे क्षेपणास्त्र ब्राम्होसच आहे कारण भारताकडे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाणारे दुसरे कोणतेही क्रूझ क्षेपणास्त्र ( जमिनीला समांतर जाणारे) नाही. अग्नी पृथ्वी सूर्य इ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत म्हणजेच वातावरणाच्या बाहेर जाऊन परत आत येणारी.

In reply to by सुबोध खरे

तर्कवादी 30/03/2022 - 20:41
भारताने क्षेपणास्त्र डागले ते अपघात होता कि अपघाताचे नाव दिले आहे हा मुद्दा बाजूला ठेवू ( ते नक्की फारच थोड्या लोकांना माहिती असावे)
क्षेपणास्त्र अपघाताने डागले गेले तर ती मोठीच नामुष्कीजनक गोष्ट आहे.
परंतु या क्षेपणास्त्राने पाकिस्तानची चीन कडून आयात केलेली क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा फुसकी ठरवली आहे हि यातील फार मोठी उपलब्धता आहे
सहमत..
गेंडा किंवा हत्ती याना भीती दाखवण्यासाठी सिंह सुद्धा गुरगुराट करतात तसेच हे आहे. स्वातंत्र्य दिनी किंवा प्रजासत्ताकी दिनी भारत आपली सैन्य शक्ती प्रदर्शनासरथ मांडतो ती काही लोकांचे मनोरंजन म्हणून नव्हे तर जगातील इतर देशांना आपली शक्ती आणि सामर्थ्य दाखवण्यासाठी.
धाक दाखवण्याकरिता थेट पाकिस्तानात क्षेपणास्त्र डागणे ही धोकादायक कृती होती. असो. जे झाले ते झाले आणि जीवितहानी झाली नसल्याने तसेच जगाचे लक्ष दुसरीकडे वेधलेले होते व आंतराराष्ट्रीय पातळीवर बहुधा या घटनेची फारशी दखल घेतली गेली नाही म्हणून बरे झाले. पण धाक दाखवण्यापुरते ठीक आहे. स्वतःहून युद्धाला तोंड फोडणे - निदान सध्यातरी योग्य होणार नाही. किंबहूना पुढेही युद्ध होवू नयेत, शांतता नांदावी असंच मी म्हणेन. पाकिस्तानाचे तुकडे होवून अराजक माजण्यापेक्षा तिथल्या लष्कराचे सरकारवरील नियंत्रण नाहीसे व्हावे, राजकारण्यांना उपरती होऊन ते योग्य मार्गाने देशाचा विकास घडवण्याकरिता प्रयत्नशील व्हावेत , भारताशी वैरभाव न ठेवता सहकार्याची भूमिका घेत परस्पर विकास साधावा हे बघायला मला अधिक आवडेल. भारत , पाकिस्तान , बांग्लादेश, नेपाळ व श्रीलंका या सर्व देशांत परस्पर सहकार्य अधिकाधिक वाढीस लागून सर्वांची भरभराट झाली तर इतर कोणताही देश यांपैकी कोणाकडेही वाकड्या नजरेने बघायला धजावणार नाही. यासर्व देशांतील जनतेत एक नैसर्गिक सहचर्याची भावना (synergy) निदान काही अंशी तरी नक्कीच आहे असे मला वाटते. जरी भारत व पाकिस्तानात सतत कुरबूरी चालत असल्या तरी सर्वसामान्य जनतेच्या मनात विरुद्ध देशातील जनतेबद्दल असा वैरभाव फारसा नाही असे मला वाटते (म्हणून इकडचे कलाकार /चित्रपट तिकडे व तिकडचे कलाकार /मालिका इकडे लोकप्रिय होत असावेत). झालेच तर जोडीला भारत जपान वाढते यांच्यातले वाढते सहचर्य आणि भारत रशिया यांच्यातील जुने सौहार्दाचे संबंध यांची परिणामकारकता वाढून पुर्वेकडील (चीन वगळता) - अमेरिका व चीन हे भरवशाचे वाटत नाहीत.
राहिली गोष्ट -- हे क्षेपणास्त्र ब्राम्होसच आहे कारण भारताकडे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाणारे दुसरे कोणतेही क्रूझ क्षेपणास्त्र ( जमिनीला समांतर जाणारे) नाही. अग्नी पृथ्वी सूर्य इ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत म्हणजेच वातावरणाच्या बाहेर जाऊन परत आत येणारी.
हे माहीत नव्हते. माहितीबद्दल धन्यवाद.

In reply to by तर्कवादी

सुबोध खरे 31/03/2022 - 19:47
CALCULATED RISK ( हिशेबी धोका पत्करणे) याला लष्करी डावपेचात अनन्य साधारण महत्व आहे. एका दगडात दोन पक्षी मारले गेले आहेत. एक तर तुमच्या क्षेपणास्त्राची चाचणी झालेली आहे आणि चीनची क्षेपणास्त्र प्रणाली फुसकी आहे याचा तुम्हाला डावपेचात्मक फायदा आणि चीनला तोटा सहज दिसून येतो आहे. बाकी पाकिस्तानने कितीही गमजा केल्या तरी यावरून आपल्याला कडक, अति कडक, महाकड्क, अतिभयंकर महाकडक खलिते आणि निषेध पाठ्वण्याव्यतिरिक्त पाकिस्तान काहीही करू शकणार नाही. पाकिस्तानने जर क्षेपणास्त्राने प्रतिहल्ला केला असता तर आपली क्षेपणास्त्र प्रतिबंधक प्रणाली त्यांच्यापेक्षा कितीतरी परिणामकारक आहे. त्यात एस ४०० सुद्धा आले आहे आणि असा एक हल्ला त्यांनी केला तर आपण केलेला प्रतिहल्ला इतका तिखट आणि परिणामकारी असेल कि पाकिस्तान परत डोके वर काढणार नाही. विंग कमांडर अभिनंदन वर्तमान याना सोडले नाही तर श्री मोदी हे पाकिस्तान वर हल्ला करतील असे बोलताना पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचे हातपाय लटलट कापत होते आणि त्यांना घाम फुटला होता हे आपण एवढ्यात विसरलात? आपल्या संसदेवर हल्ला झाला असताना तत्कालीन सरकारने भारत पाकिस्तानच्या दसपट शक्तिशाली असून शेपूटच घातले होते ना? शेवटी केवळ स्नायूमध्ये शक्ती असून उपयोग होत नाही तर पाठीचा कणा ताठ असायला आणि विचारांची बैठक पक्की असायला लागते. आणि पाकिस्तान ची अणुबॉम्ब ची धमकी फुसकी आहे हे श्री मोदी यांनी त्यांना दोन वेळेस हल्ला करून सप्रमाण दाखवून दिले आहे.. तेंव्हा आपली विधाने डॉ मनमोहन सिंह त्यांच्यासारखीच कणाहीन आणि बुळबुळीत आहेत असेच मी म्हणेन. बाकी सामंजस्य सहकार्याची भूमिका वगैरे मुद्दे गांधी जयंतीच्या वेळेस भाषण करायला छान असतात. सर्वसामान्य जनतेच्या मनात विरुद्ध देशातील जनतेबद्दल असा वैरभाव फारसा नाही असे मला वाटते. हा भाबडेपणा सोडा आणि अभ्यास वाढवा. बॉलिवूडचे सिनेमे पाहून आपली अत्यंत चुकीची समजूत झालेली आहे. बॉलिवूड निर्माते भाईचारा सामंजस्य सहकार्याची भूमिका इ इ बुळबुळीत मुद्दे आपले चित्रपट पाकिस्तानात खपावेत म्हणून पुढे करत असतात वर "गंदा है पर धंदा है" म्हणून त्याचे समर्थनही करतात पाकिस्तानच्या शालेय अभ्यासक्रमात काय शिकवले जाते ते एकदा नीट वाचून पहा. हि पिढी आता पन्नाशीला आली आहे तेंव्हा स्वातंत्र्यापूर्वी कसे सगळे गुण्यागोविंदाने राहत होते सारखे भाबडे समाजवादी विचार कालौघात मोडीत निघालेले आहेत हे तुमच्या लक्षात येईल. since the 1970s Pakistani school textbooks have systematically inculcated hatred towards India and Hindus. A 2005 report by the National Commission for Justice and Peace, a nonprofit organization in Pakistan, found that Pakistan studies textbooks in Pakistan have been used to articulate the hatred that Pakistani policy-makers have attempted to inculcate towards the Hindus. "Vituperative animosities legitimize military and autocratic rule, nurturing a siege mentality. Pakistan Studies textbooks are an active site to represent India as a hostile neighbor", the report stated. "The story of Pakistan's past is intentionally written to be distinct from often in direct contrast with, interpretations of history found in India. From the government-issued textbooks, students are taught that Hindus are backward and superstitious." Further the report stated "Textbooks reflect intentional obfuscation. Today's students, citizens of Pakistan and its future leaders are the victims of these blatant lies Pakistani textbooks cannot mention Hindus without calling them cunning, scheming, deceptive or something equally insulting. The textbooks ignore the pre-Islamic history of Pakistan except to put the Hindu predecessors in negative light the textbooks supported military rule in Pakistan, promoted hatred for Hindus, glorified wars and distorted the pre 1947 history of Pakistan. Pakistani textbooks still teach children about twelve benefits of dictatorship compared with just eight benefits of democracy.No Pakistani child is ever taught about the Pakistani military's surrender to India in 1971. They are always taught that India was the aggressor in each and every war, and most amusing is they are taught that Pakistan won the 1965 war since the 1970s Pakistan's school textbooks have systematically inculcated prejudice towards India and Hindus through historical revisionism. Recently, the contributions of Nehru, Gandhi, Ambedkar, Patel and Bose to the Indian independence movement have been omitted from Pakistani textbooks. स्रोत विकी अशा विषवल्लीला जर ७-८ वर्षांपासून बालकांच्या मनात पेरले गेल्यावर येणारी फळे बिनविषारी असतील हे समजणे अत्यंत भाबडेपणाचे असेल. असो

In reply to by सुबोध खरे

बाकी पाकिस्तानने कितीही गमजा केल्या तरी यावरून आपल्याला कडक, अति कडक, महाकड्क, अतिभयंकर महाकडक खलिते आणि निषेध पाठ्वण्याव्यतिरिक्त पाकिस्तान काहीही करू शकणार नाही. ह्यावरून आपले कडीनिंदा फएम संरक्षणमंत्री राजनाथसिंग आठवले. :) रच्याकने चिनविरूध्द तर कडीनींदा देखील बंद झालीय.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे 06/04/2022 - 18:40
@ अमरेंद्र बाहुबली तुमचे पूर्वग्रह बाजूला ठेवा आणि डोळे उघडा गालवान खोऱ्यात आणि डोकलं येथे काय झाले हे वाचून पहा. उगाच कळफलक हातात आहे म्हणून असंबद्ध बडवू नका.

In reply to by सुबोध खरे

तर्कवादी 31/03/2022 - 23:48
तेंव्हा आपली विधाने डॉ मनमोहन सिंह त्यांच्यासारखीच कणाहीन आणि बुळबुळीत आहेत असेच मी म्हणेन.
मि. सुबोध खरे जी. आपण आता राजकारण मध्ये आणलेत त्यावर बोलायची माझी इच्छा नाही.. तसेच माझ्या विधानांबद्दल असहमती मी समजू शकतो.. पण कणाहीन आणि बुळबुळीत असे हेटाळणीजनक शब्द टाळावेत अशी मी आपणास नम्र सुचना करु इच्छितो.
हा भाबडेपणा सोडा आणि अभ्यास वाढवा.
पुन्हा एकदा... मला जे वाटते ते मी मांडले होते. तुमचे मत वेगळे असू शकतेच. तुम्हाला वाटते ते तुम्ही मांडत रहा. पण "अभ्यास वाढवा" हे हेटाळणीवजा वाक्य मिपावर काहीसे प्रचलित असले तरी मी त्याचे स्वागत करीत नाही. आणि आपणास नम्रपुर्वक सुचवतो की अशा स्वरुपाची व्यक्तिगत टिप्पणी माझ्याबाबत आपण करु नये. दोन व्यक्तींमध्ये कमी अधिक प्रमाणात मतभिन्नता ही असणारच. आपली मते जुळत असली वा नसली तरी एकमेकांचा आदर करणे अधिक योग्य नाही का ? माझ्या सुचनांचा तुम्ही विचार कराल ही आशा आहे. धन्यवाद.

In reply to by सुबोध खरे

प्रदीप 01/04/2022 - 10:26
तेंव्हा स्वातंत्र्यापूर्वी कसे सगळे गुण्यागोविंदाने राहत होते सारखे भाबडे समाजवादी विचार कालौघात मोडीत निघालेले आहेत हे तुमच्या लक्षात येईल.
अगदी सहमत आहे. माझी पत्नी येथे एका स्वयंसेवी संस्थेत काही वर्षे काम करत आहे. तिथे, आमच्या येथील एथनिक मायनॉरीटीजच्या मुलांसाठी, त्यांना गृहपाठ करण्यासाठी मदत करण्याच्या कार्यांत तिचा सहभाग आहे. येथे प्रामुख्याने आर्थिक निम्नस्तरांवरील एथनिक मायनॉरीटीजची मुलेमुली येतात. त्यांत फिलीपीन्स, थायलंड, नेपाळ, म्यानमार, बांग्लादेश, भारत व पाकिस्तान येथील मुलेमुली प्रामुख्याने असतात. तर, पत्नी सांगते की पाकिस्तानी मुलांना मद्रशांत जावेच लागते. आणि त्यांच्या डोक्यांत धर्माच्या व देशांच्या सीमांच्या तसेच देशांतील, आपापसांतील संबंधांच्या भावना अतिशय तीव्र असतात. तिने स्वतः अनुभवलेली पाकिस्तानी मुलांची काही उदाहरणे: (१) पाकिस्तानी मुलगा, वय वर्षे ५ चा माझ्या पत्नीशी संवादः पा. मु. ५: तुम कितनी अच्छी हो. तुम्हारा धरम क्या है? पत्नी: मै हिंदू हूं पा. मु. ५: अरेरे. तुम मुस्लिम हो जावो. नही तो तुम्हे नरक मे जाना पडेगा. (२) दुसरा एक पा. मु. वय वर्षे १०: तुम हिंदूस्तानी हो. तब तुम मेरी दुश्मन हो. क्योंकी हिंदूस्तान हमारा दुश्मन देश है. माझा वैयक्तिक अनुभवही हा आहे, की वरवर पाकिस्तानी माणसे आपल्याशी चांगला व्यवहार करतात, व्यवहारांत थोडीफार मदत घेतात, व करतातही. मात्र हे सगळे अगदी वरवरचे असते. त्यापुढे जाऊन जेव्हा धर्माचा व देशांच्या विचारांचा संबंध येतो, तेव्हा हा चांगुलपणा सहजपणे गळून पडतो. ***************** काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवर निळूभाऊ फुलेंची एक सुंदर मुलाखत पाहिली. त्यांत निळूभाऊ त्यांच्या समाजवादी जडणघडणीविषयी सविस्तर बोलत होते. अनेक जुन्या, खूप छान कार्य केलेल्या व तळमळीच्या समाजवादी नेत्यांच्यी नावे-- उदा. एसेम, सदाशिव बागाईतकर-- त्यांच्या तोंडून ऐकतांना मला बरे वाटत होते. मग निळूभाऊंनी तेव्हाच्या (ही मुलाखत सुमारे २००५- २००६ च्या दरम्यान ध्वनिमुद्रीत झाली असावी) परिस्थितीविषयी थोडी टिपण्णी केली. त्यांत त्यांनी जयप्रकाश नारायणांचा उल्लेख केला, व म्हणाले की जेपी नेहमीच म्हणत, भारत व पाकिस्तान ह्या दोन देशांमधील सीमा व राजकीय संबंध कृत्रिम आहेत, व नक्कीच ते पुढे गळून पडतील, व दोन्ही देशांतील नागरीक एकोप्याने राहू व वागू लागतील. हे उर्ढृत करून निळूभाऊ पुढे म्हणाले-- 'पहा, आता हे खरे होत असतांना दिसते आहे, की नाही?' तर, जुन्या मुशीतल्या सोशालिस्टांचा हा भोळसटपणा काही जात नाही. नव्या मुशीतील सोशलिस्ट, हे बनेल आहेत, त्यांचे हिशेब वेगळेच. तर्कवादी अतिशय सभ्य व अंगभूत विनम्र भाषेत लिहीतात. पण त्यांजकडेही हा जुन्या समाजवाद्यांचा भोळसटपणा आहे, असे एकंदरीत दिसून येते.

In reply to by प्रदीप

तर्कवादी 01/04/2022 - 12:05
तुम्ही जी उदाहरणे दिलीत ती वय वर्षे ५ व १० वगैरे.. साधारणपणे मुलांना वा एकंदरीतच परिपक्वतेच्या प्रवासात अजून मागे असणार्‍यांना मित्र - शत्रू , चांगला- वाईट अशी सरळसोट विभागणीच समजते , आवडते. मला आठतंय मी चौथी वा पाचवीत असेन फारतर.. माझ्या आसपास - ओळखीचे कुणी मुस्लिम नव्हते. शाळेत वर्गातही कुणी मुस्लिम मुले नव्हती. पण खेळाच्या एका ग्रुपमध्ये दुसर्‍या वर्गातील एका मुलाशी ओळख झाली... कधीतरी त्याच्याबद्दल बोलत असताना कुणीतरी त्याचे नाव ऐकून तो मुस्लिम असणार असे सांगितले. त्यामुळे मला त्या मुलाशी बोलणे विचित्र वाटू लागले... पुढे खेळातले ग्रुप बदलले, त्याचा माझा संपर्क राहिला नाही. फार लहानपणीचा किस्सा असल्याने आता नेमके तपशील आठवत नाही.. पण असं काहीसं झालं होतं इतकं मात्र मनावर कोरलं गेलंय. दुसरा आठवतंय मी इंजिनिअरिंगला असताना वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी कसलंस फुटकळ विनोदी नाटक बसवलेलं होतं... विषय वेगळाच काहीतरी होता , काही ठीकठाक विनोद पण होते पण शेवटी विनाकारण - कथेचा संबंध नसताना ओढून ताणून पाकिस्तानचा उल्लेख करत एक-दोन जोषपुर्ण/ द्वेषपुर्ण वाक्ये टाकली होती आणि त्या वाक्यांना भरपूर टाळ्या व दाद मिळाली. क्रिकेटमध्येही भारतीयांना पाकिस्तानविरुध्द व पाकिस्तानी लोकांना भारताविरुद्ध पराजय पचवणे कठीण जाते. भारत पाकिस्तानात इतकी युद्धे व सतत कुरबुरी होत असताना या गोष्टी समजण्यासारख्या आहेत...दोन्हीकडच्या जनतेत एकमेकांबद्दल रोष वा द्वेषाची भावना अजिबातच नाही असे मी म्हणत नाही.. पण तितकेच सत्य नाही.. तेच सर्वंकष असेल असे वाटत नाही. ही लिंक आपण बघू शकता यावरील एका पाकिस्तानी वापरकर्त्याच्या उत्तरातील एक परिच्छेद खाली देत - त्याची पुर्ण पोस्ट ही बजरंगी भाईजान या चित्रपटाच्या संदर्भातली असली तरी त्याची पोस्ट फिल्मी नाही आणि खालील परिच्छेद चित्रपटाबद्दल नाही A simple message I want to give to all Indians, We don't hate you all. We hate your extremist groups and your officials who wish for hatred between us. We also hate extremism and hatred shown on our side too. We have a lot in common. So why not love each other too?

In reply to by सुबोध खरे

तर्कवादी 01/04/2022 - 12:17
पाकिस्तानच्या शालेय अभ्यासक्रमात काय शिकवले जाते ते एकदा नीट वाचून पहा
तुर्तास पाकिस्तानचा विषय बाजूला ठेवू पण एकंदरीतच शालेय अभ्यासक्रमातील शिक्षणाचा माणसाच्या जीवनावर दूरगामी व खोलवर परिणाम होतो का ? तसे असेल तर निदान काहीशी शिक्षित (दहावी उत्तीर्ण म्हणू हवं तर) जनता तरी अंधश्रद्धाळू असण्याचं काहीच कारण नाही. शालेय पाठ्यपुस्तकात अंधश्रद्ध शिकवल्या जात नाहीत. पण दहावी उत्तीर्णच काय शास्र / अभियांत्रिकी / वैद्यक अशा विज्ञान शाखांतून पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले लोकहि अनेक अंधश्रद्दा मानतात... खरं तर पाठ्यक्रमातील (भाषा वगळता) इतर विषयात तर ईश्वराच्या अस्तित्वाचाही उल्लेख नसतो - पण तरीही बहुतांश सुशिक्षित (यात शास्त्र शाखेचे पदवीधर, द्विपदवीधर, अभियंते, डॉक्टर ई सगळे आलेत) लोक आस्तिक असतात असं कसं ?

In reply to by तर्कवादी

सुबोध खरे 01/04/2022 - 20:06
भारत पाकिस्तानात इतकी युद्धे व सतत कुरबुरी होत असताना या गोष्टी समजण्यासारख्या आहेत...दोन्हीकडच्या जनतेत एकमेकांबद्दल रोष वा द्वेषाची भावना अजिबातच नाही असे मी म्हणत नाही.. पण तितकेच सत्य नाही.. तेच सर्वंकष असेल असे वाटत नाही. आपले बरेच संदर्भ चुकीचे आहेत. भारतीय माणसे केवळ मुसलमान म्हणून कोणत्या देशाचा द्वेष करत नाहीत. भारतीय माणूस हा पाकिस्तानचा जितका द्वेष करतो तितका बांगला देशाचा अजिबात करत नाही. खेळाच्या/ क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तान ला हरवण्याचा जितका जल्लोष होतो किंवा पाकिस्तानकडून हरल्यावर जितके वाईट वाटते तितके बांगला देश बद्दल अजिबात वाटत नाही. फार कशाला श्रीलंका ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड बरोबर पाकिस्तानचा सामना असेल तर भारतीय माणूस नक्कीच पाकिस्तान पेक्षा या देशांना प्रोत्साहन देताना दिसेल कारण पाकिस्तान सतत तुमच्या विरुद्ध कट कारस्थाने करत असतो आणि कुठे तरी आपला शेजारी, माहितीतील, ओळखीतील एखादा जवान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांकडून मारला गेला असे लोकांना अनुभव येतात यामुळे पाकिस्तान बद्दल संताप निर्माण होतो. मुंबईतील बॉम्बस्फोट पासून ते संसदेवर हल्ला पर्यंत सर्व ठिकाणचे धागे दोरे पाकिस्तानपर्यंतच जातात. भारतातील बहुसंख्य दहशतवादी कारवाया या पाकिस्तानातच उगम पावतात. भारतीय शिक्षणात पाकिस्तान बद्दल द्वेषमूलक असे काहीही शिकवले जात नाही. पण उलट स्थिती भयानक आहे. याचे हजारो पुरावे सापडतात. बाकी तुमचे समाजवादी गुळगुळीत विचार असू द्या.

In reply to by सुबोध खरे

तर्कवादी 01/04/2022 - 23:53
बाकी तुमचे समाजवादी गुळगुळीत विचार असू द्या.
हा निष्कर्ष तुम्ही काढताय.. पण तो चुकीचा.. मी समाजवाद वा अन्य कोणत्या वादाची कास धरत नाही. मला सोबत तर्कवादाची आहे. बाकी प्रत्येकाचे विचार आणि तर्क भिन्न असू शकतात.

In reply to by सुबोध खरे

तर्कवादी 01/04/2022 - 23:57
आपले बरेच संदर्भ चुकीचे आहेत. भारतीय माणसे केवळ मुसलमान म्हणून कोणत्या देशाचा द्वेष करत नाहीत.
याबाबत मी न काही भाष्य केले ना काही संदर्भ दिला !! असो. तसाही मूळ धागा युक्रेनबद्दल आहे त्यामुळे या धाग्यावर भारत-पाकिस्तान या विषयावर अधिक चर्चा करण्यात मला रस नाही

In reply to by तर्कवादी

वामन देशमुख 01/04/2022 - 01:58
पाकिस्तानचे विभाजन : भारताने असल्या काही भानगडीत पडू नये. सध्या जे आहे , जसे आहे तेच व्यवस्थित सांभाळावे. बाकी भारताने पाकिस्तानावर 'चुकून' सोडलेले क्षेपणास्त्र हे ब्राह्मोसच होते का ? मी याआधी वाचलेल्या बातम्यांत फक्त क्षेपणास्त्र असाच उल्लेख होता, ब्राह्मोस नाही. आणि सध्या युक्रेनच्य्या गदारोळात जगाने या चुकीकडे दुर्लक्ष केले असले तरी यामुळे भारताने भलतेच धाडस करु नये - संरक्षण, उत्पादन व इलेक्ट्रॉनिक्स इ क्षेत्रांत स्वयंपुर्ण नसताना युद्धखोरी परवडणारी नाही.
पाकिस्तान प्रणित / चीन प्रणित / इतर कोणते प्रणित स्लीपर सेल्स अनेकदा पुढीलप्रमाणे काम करताना दिसतात.
  1. भारत देशाने केलेल्या प्रगतीला / साधलेल्या ध्येयांना कमी लेखणे (downplay), त्यांच्या खरेपणाबद्धल संशय उत्पन्न करणे
  2. वेगवेगळ्या चर्चांमधून भारत देश / हिंदू लोक यांचे मनोबल खचेल असे मुद्दे मांडणे
  3. "भारत पाक शत्रुत्व हे केवळ राजकारण्यांनी निर्माण केलेला बागुलबुवा आहे, पाकिस्तानातील मुसलमान जनता भारतीय हिंदूंवर जीवापाड प्रेम करते" असे साफ खोटे narrative set करणे
  4. पाकिस्तानी खेळाडू / कलाकार यांची जमेल तिथे वाहवा करणे आणि त्यांच्याबद्धल soft corner तयार करत राहणे
  5. भारताला युद्ध परवडणारे आहे का, तितकी लष्करी शक्ती तरी भारताकडे आहे का असे प्रश्नचिन्ह उपस्थित करणे
  6. भारताच्या / हिंदूंच्या दुबळ्या बाबीं प्रामुख्याने पुढे आणणे आणि त्याच मुख्य बाबी आहेत असे ठसवणे
  7. राष्ट्रहितदक्ष नागरिकांना नाना प्रकारे हतोत्साहित करत राहणे
  8. एकूणच भारत हा एक दुबळा देश आहे आणि त्याने पाकिस्तान / चीनला दुखावू नये, त्यांच्या अतिरेकी कारवाया शक्य तितक्या सहन कराव्यात असे सांगत राहणे
अनेकदा, आपण स्लीपर सेल्सचा एक भाग आहोत हेही काहींच्या लक्षात येत नाही.

In reply to by वामन देशमुख

तर्कवादी 01/04/2022 - 09:42
अनेकदा, आपण स्लीपर सेल्सचा एक भाग आहोत हेही काहींच्या लक्षात येत नाही.
अपल्या प्रतिसादाकडे दुर्ल़क्ष करणे अधिक योग्य वाटत आहे त्यामुळे प्रतिसादाची अपेक्षा करु नये. धन्यवाद

In reply to by तर्कवादी

कॉमी 06/04/2022 - 17:46
या पूर्ण ल्युनॅटिक माणसाला या संस्थळावरून हाकलले पाहिजे.अर्थ माहित नसलेले काहीही शब्द हा माणूस कायम वापरतो. याच माणसाने ऐसी अक्षरे वर अतिशय बिभत्स नावाने आयडी घेतलेला. If memory serves, त्याचा सुद्धा अर्थ यांना माहित नाही असे समोर आले होते. (इतके तीव्र शब्द वापरण्याइतके तीव्र भाष्य या इसमाने नक्की केले आहे. उठसुठ हा इतर आयडींना स्लीपर सेल म्हणतो म्हणजे काय ?)

In reply to by कॉमी

तर्कवादी 06/04/2022 - 18:25
@कॉमी तुमचे म्हणणे बरोबर आहे. थोडेफार मत-मतांतर असते तर मी प्रतिवाद केला असताही पण माझे वाक्य होते की "सर्वसामान्य जनतेच्या मनात विरुद्ध देशातील जनतेबद्दल असा वैरभाव फारसा नाही असे मला वाटते " आणि त्यावर प्रतिसादात या आयडीने "पाकिस्तानातील मुसलमान जनता भारतीय हिंदूंवर जीवापाड प्रेम करते" असे साफ खोटे narrative set करणे असे विधान केले तिथेच मला या आयडीचा संपुर्ण अंदाज आला... बाकी स्लीपर सेलची थिअरी म्हणजे कळस. असो !! अशा लोकांचा प्रतिवाद केल्यास त्यांना आणखी उत्तेजन मिळते- त्यापेक्षा दुर्लक्ष करणे उत्तम , नाही का ?

In reply to by कॉमी

वामन देशमुख 06/04/2022 - 18:32
या पूर्ण ल्युनॅटिक माणसाला या संस्थळावरून हाकलले पाहिजे.अर्थ माहित नसलेले काहीही शब्द हा माणूस कायम वापरतो. याच माणसाने ऐसी अक्षरे वर अतिशय बिभत्स नावाने आयडी घेतलेला. If memory serves, त्याचा सुद्धा अर्थ यांना माहित नाही असे समोर आले होते.
हे कुणाबद्धल लिहिलंय माहित नाही म्हणून त्याचा प्रतिवाद नाही.
(इतके तीव्र शब्द वापरण्याइतके तीव्र भाष्य या इसमाने नक्की केले आहे. उठसुठ हा इतर आयडींना स्लीपर सेल म्हणतो म्हणजे काय ?
उठसुठ कुणी कुणा मिपा सदस्याला स्लीपर सेल म्हटलं आहे?
बिभत्स नावाने आयडी
एखादा हा आयडी जर कम्यूनिझम दर्शवत असेल तर हा वाक्यांश त्या आयडीलाच लागू आहे म्हणावे लागेल कारण अनेकांच्या मते कम्यूनिझमइतकी बीभत्स, मानवताविरोधी, तर्कविरोधी आणि पराभूत विचारसरणी क्वचितच दुसरी कोणती असेल. पण तो आयडी जर कॉमिक / कॉमेडी असे काही दर्शवत असेल तर मग ठीक आहे; कॉमेडी शिवाय आयुष्यात मौजमजा नाही!

In reply to by वामन देशमुख

कॉमी 06/04/2022 - 18:39
मला स्लीपर सेल म्हणाला आहात. विसरलात वाटतं. बाकी ताकाला जाऊन भांडे लपवायचे असेल तर खुशाल लपवा. तुमचा आयडी काय होता तुम्हाला माहितीये. त्यात काय विनोद होता हे तुम्हालाच माहित.

In reply to by कॉमी

वामन देशमुख 06/04/2022 - 23:10

In reply to by वामन देशमुख

अनेकदा, आपण स्लीपर सेल्सचा एक भाग आहोत हेही काहींच्या लक्षात येत नाही.... .....सहमत आहे .... गोबेल्स नीती

गामा पैलवान 31/03/2022 - 19:04
तर्कवादी, तुमचा इथला संदेश वाचला. माझी मतं सांगतो. १.
जर झेलेंस्की आणि पुतीन यांचं इतकंच सख्य आहे तर बंडखोर नाझींचा बीमोड करण्याकरिता (जे रशियाला हवेच आहे) झेलेन्स्की सरळपणेच रशियाची मदत घेवू शकला असता.
झेलेन्स्कीस जिवावरच्या धमक्या मिळाल्या होत्या. तो व पुतीन यांच्यात जराजरी सख्य दिसलं तर कशावरून त्याच्यावर विषप्रयोग होणार नाही? पूर्वी युशेन्को यांच्यावर डायॉक्झिनचा विषप्रयोग झाला होता. नुकताच सध्याचा मध्यस्थ असलेला अतिकरोडपती रोमन अब्रामोव्हिच याच्यावर किरकोळ विषप्रयोग झाला आहे. २.
काही मुठभर (अगदी १०% म्हणू हवं तर) नाझींचा बीमोड करण्याकरिता झेलेन्स्की युक्रेनच्या अनेक शहरांचे सर्वंकष नुकसान होवू देत आहे ?
युद्ध सुरू झाल्यावर काहीच करता येत नाही. शिवाय जिवावरचा बेतण्याचा मुद्दा परत लागू आहेच. ३.
... ढेकूण मारण्यासाठी गादीला आग लावली जी पुढे खोलीभर पसरली.
ढेकूण रशिया मारतोय. आणि आग युक्रेनच्या गादीस लागलीये. त्यामुळे हा किस्सा कितपत सार्थ आहे, याची शंकाच वाटते. ४.
आणि झेलेन्स्की जर पुतीनच्या प्रभावाखाली आहे तर मग तो नाटोच्या नादी का लागला ? पुतीनला आवडत नसतानाही ? नाझी व नाटोचे दोन मुद्दे परस्परविरोधी वाटतात.
ते परस्परविरोधी आहेतंच. म्हणूनंच तर झेलेन्स्कीची इकडे आड तर तिकडे विहीर अशी गोची झालीये. ५.
मुळात युक्रेनमध्ये नाझींचा शिरकाव झाला कुठून ?
लेखात लिहिल्याप्रमाणे १९४० च्या आसपास. ६.
मला तरी नाझी हा बागुलबुवा वाटतो..
ज्याला पुतीन नाझी म्हणतात त्याचा अर्थ डीप स्टेट असा आहे. ते सर्वत्र आहेत. अगदी मुंबईतही डीप स्टेट कार्यरत आहे. त्यांमुळेच १९९३ चे १३ स्फोट आणि २६/११ वगैरे प्रकरणं घडली आहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तर्कवादी 31/03/2022 - 23:58
ज्याला पुतीन नाझी म्हणतात त्याचा अर्थ डीप स्टेट असा आहे. ते सर्वत्र आहेत. अगदी मुंबईतही डीप स्टेट कार्यरत आहे. त्यांमुळेच १९९३ चे १३ स्फोट आणि २६/११ वगैरे प्रकरणं घडली आहेत.
तसे तर भारतात नक्षलवादी चळवळीपण सक्रिय आहेत म्हणून त्यांचा बीमोड करण्याकरिता भारताचे पंतप्रधाच दुसर्‍या राष्ट्राला भारतावर हल्ला करण्याकरिता छुपा पाठिंबा देतील आणि त्यात भारतातील शहरेच्या शहरे बेचिराख करु देतील अशी कल्पना तरी करवते का ? असो. तसेच रशिया युक्रेनमधील बायोलॅब्सचा (की बायोवेपन लॅब्स) उल्लेख करते, त्याबद्दल आपणास काय वाटते?

In reply to by तर्कवादी

गामा पैलवान 01/04/2022 - 18:36
तर्कवादी, भारत युक्रेनपेक्षा सर्वार्थाने मोठा आहे. आजच्या युक्रेनचं रशिया हे मातृराष्ट्र आहे. याउलट भारत स्वत:च एक मातृराष्ट्र आहे. युक्रेन आज नाटो विरुद्ध रशिया अशा कोंडीत सापडला आहे. भारत अशा तऱ्हेच्या कुठल्याही कोंडीत अडकलेला नाही. या पार्श्वभूमीवर भारतातले डीप स्टेट नक्षलवादी मोडून काढण्यासाठी परदेशी सहाय्य घेण्याची कल्पना फारशी व्यवहार्य नाही. शिवाय युक्रेन स्वत:चं डीप स्टेट नाहीसं करीत नाहीये. ते रशियाला खुपतंय. बाकी, जैविक हत्यारांविषयी माहिती नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by कंजूस

तर्कवादी 07/04/2022 - 23:57
आज/उद्या द. कोरियावर हल्ला करणारे म्हणे
द. कोरियावर हल्ला म्हणजे जणू अमेरिकेवर हल्ला.. असे काही झाल्यास तिसरे महायुद्ध दूर नाही...

गामा पैलवान 19/04/2022 - 20:44
लोकहो, नुकताच १५ एप्रिलास सर्बियन जनतेने रशियास पाठिंबा देण्यासाठी बेलग्रेडमध्ये मोठा मोर्चा काढला. बातमी ( इंग्रजी दुवा ) : https://www.reuters.com/world/europe/pro-russia-serbs-protest-belgrade-support-russia-against-nato-2022-04-16/ सर्बिया युरोपीय महासंघाचा भाग आहे. त्यामुळे त्यास अधिकृतपणे रशियाचा निषेध करावा लागतोय. मात्र जनतेची इच्छा उलट आहे. तिला रशियास पाठिंबा द्यायचा आहे. १९९३ व १९९८ साली नाटोने बेलग्रेड व इतर ठिकाणी भीषण बॉम्बफेक केली होती. ती सर्बियन लोकं आजून विसरलेली नाहीत. नाटोच्या मनात काय आहे ते तिला चांगलंच ठाऊक आहे. त्याबद्दल तिचं अभिनंदन. सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वूचिक यांना पाश्चात्य जगाचा दबाव झुगारण्याची शक्ती मिळो. आ.न., -गा.पै.

मला अजूनेक गोष्ट व्हायला हवीये. ती म्हणजे अमेरिकेचं विभाजन.
निवडणूका होऊन आपणच विजेते असं म्हणत ट्रंप आणि बायडेन दोघेही अध्यक्षपदावर दावा करत होते तेव्हा आपल्या समाजमाध्यमांवर एक विनोद फार लोकप्रिय झाला होता. आज बापूजी अमेरिकेत असते तर त्यांनी बायडेन आणि ट्रंप दोघांनाही "भांडू नका करा अमेरिकेचे दोन भाग आणि व्हा दोघेही अध्यक्ष" असा सल्ला दिला असता.

मदनबाण 25/03/2022 - 21:52
चांगली माहिती दिली आहे. पुतीन यांनी त्यांच्या दाढीवाल्या मित्रास नमुना पेश करायला सांगितला. मग काय, त्यानं एक ब्राह्मोस दिलं 'चुकून' पाकिस्तानात पाठवून. निरनिराळ्या देशांचे प्रमुख सध्या नव्या दिल्लीत रीघ का लावताहेत ते कळतं, नाहीका? झलक दिखाके कर गया दिवाना ....! ये कुछ पट्या नय मेरुकु... अस्थिर पाकिस्तानातील त्यांच्या सैन्याची मिसाईल ट्रेस आणि ते नष्ट करण्याच्या क्षमता किती हे आपण पडताळुन पाहिले. पाकड्यांनी चायनीज HQ16A [ LY-80 ] सरफेस टु एअर डिफेन्स मिसाईल्स [ सॅम ] त्यांच्याकडे बसवल्या आहेत, याच बरोबर इतर ही चायनीज रडार्स त्यांनी बसवल्या आहेत. चीनी वस्तुं बद्धल एक म्हण आहे :- चायना का माल चला तो चांद तक, नही तो शाम तक ! तेव्हा आपल्या मिसाईलला ते नष्ट न करु शकल्यांने त्या सर्व सिस्टीम्सचा आणि त्या ऑपरेट करणार्‍या मंडळींचा या निमित्त्याने पर्दा फाश झाला. ही घटना घडल्यावर पाकिस्तानी लष्करात जो हडकंप झाला, त्या नंतर सगळ्या प्रकारचे हाय अलर्ट्स आणि बचावात्मक उपाय अमलात आणले गेले. या निमित्त्याने आपल्याला ते अश्या परिस्थीतीत काय करतात आणि कसे वागतात याची देखील महत्वपूर्ण माहिती उपलब्ध झाली असणार.पाकिस्तानी लष्कर आणि हवाईदल यांच्या मनोबलावर याचा मोठा परिणाम झाला आहे /होईल. तसेच सर्जिकल स्ट्राईक बरोबर हे मिसाईल त्यांच्या हद्दीत बिनदिक्कत घुसवुन आपण हे जगाला दाखवुन दिले आहे की आम्ही आमचे डिफेन्सीव्ह धोरण सोडुन ऑफेस्निव्ह डिफेन्सवर शिफ्ट झालो आहोत, आम्ही हव्या त्या वेळी हवे ते टार्गेट नष्ट करु शकतो अशी भिती देखील आता पाकिस्तानच्या मनात उत्पन्न करुन ठेवण्यात यशस्वी झालो आहोत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- I'm not special , i'm just limited edition.

In reply to by गामा पैलवान

फारच उत्तम .... आंतरराष्ट्रीय राजकारण, फार वेगळ्या पातळीवर चालते त्यामुळे, तुम्ही म्हणता तशी, शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by गामा पैलवान

शशिकांत ओक 27/03/2022 - 19:11
गा. पैलवान रशियन पुतीन दंड थोपटून उभे राहिले आहेत. तुम लढते रहो हम तुम्हारे कपडे संभालते है... अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी म्हणून युक्रेनला अधांतरी ठेवले आहे. पाकिस्तान वझीरे आज़म क्रिकेटर इम्रान खान यांच्या शेवटच्या (?) भाषणाच्या प्रतीक्षेत आहे.

In reply to by शशिकांत ओक

Trump 28/03/2022 - 17:35
९ मे चा काय मुहूर्त लागला आहे?
रशियाने ९ मेला नाझी जर्मनीला हरावले आहे. आणि रशिया सध्या युक्रेनमध्ये नाझीबरोबर युध्द करत आहे.

सौन्दर्य 25/03/2022 - 23:29
लेख चांगला व माहितीपूर्ण आहे. पण ------------------ 'अमेरिकेचे विभाजन व्हायला पाहिजे' हे काही पटले नाही. ज्यावेळी दोन तुल्यबळ योद्धा समोरासमोर उभे ठाकतात त्यावेळी युद्ध होण्याची शक्यता कमी असते, मात्र बलवान योध्यासमोर किरकोळ योद्धा आला तर युद्ध अटळ असते. जे आपण रशिया विरुद्ध युक्रेन बघतोय. रशिया व अमेरिका हे तुल्यबळ प्रतिस्पर्धी असल्यामुळे दोघेही एकमेकांना वचकून आणि ओळखून आहेत असे मला वाटते. आणि त्यामुळेच तिसरे महायुद्ध अजून तरी जगावर लादले गेले नाही. उद्या ह्यातील एकजण जरी कमकुवत झाला तर दुसऱ्यासाठी युद्धाचा तसेच जगावर राज्य करण्याचा मार्ग मोकळा होईल असे मला वाटते. अर्थात चीनच्या रुपात तिसरा तुल्यबळ प्रतिस्पर्धी निर्माण झालाच आहे.

In reply to by सौन्दर्य

गामा पैलवान 26/03/2022 - 02:26
सौन्दर्य,
उद्या ह्यातील एकजण जरी कमकुवत झाला तर दुसऱ्यासाठी युद्धाचा तसेच जगावर राज्य करण्याचा मार्ग मोकळा होईल
कुणीही एक कितीही मजबूत असला तरी तो पूर्ण जगावर राज्य करू शकंत नाही. तुल्यबळ प्रतिस्पर्धी उत्पन्न होतोच. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कुणीही एक कितीही मजबूत असला तरी तो पूर्ण जगावर राज्य करू शकंत नाही. तुल्यबळ प्रतिस्पर्धी उत्पन्न होतोच.
म्हणजे तुम्हाला चीन म्हणायचे आहे का? की भारत?

निनाद 26/03/2022 - 05:37
कदाचित या युद्धाचे धोरण खूप आधी पासून आखले जात आहे. कोव्हिडमध्ये कधीही बाहेर न पडलेले पुतीन अचानक येऊन मोदींना भेटून गेले होते. अमेरिकेचे विभाजन करण्याआधी पाकिस्तान चे विभाजन आवश्यक आहे. अमेरिकेचे विभाजन केले तरी डेमोक्रॅटिक पक्ष आणि युरोपिय युनियन यांच्यातले सख्य मोडून काढले पाहिजे. डेमोक्रॅटिक पक्ष तर विसर्जित केला पहिजे असे माझे मत आहे. हा डेमोक्रॅटिक पक्ष म्हणजे जुन्या सोवियेत युनियन चे नवे रूप आहे. मायकेल खोदार्कोव्हास्की ला पुतीन ने का सोडून दिले होते हे न उलगडलेले कोडे आहे. पूतिन ने नक्की काय सौदा केला असावा? खोदार्कोव्हास्की यांनी बोरिस येल्त्सिनच्या पहिल्या सरकारचे आर्थिक सल्लागार म्हणून काम केले होते. म्हणजे हा माणूस पूर्णपणे कम्युनिझमवरील विश्वास गमावलेला आहे असे म्हणायला जागा आहे. या मायकेल खोदार्कोव्हास्कीला सपोर्ट मात्र ऍम्नेस्टी इंटरनॅशनलने केला होता. ही पाताळयंत्री संस्था प्रत्येक विवादात कशी अचूकपणे आढळते!

दीपक११७७ 27/03/2022 - 13:07
छान वाटला लेख , जाता जाता.... झुलोस्कि सारख्या आंतराष्ट्रीय व्यक्तीचा उल्लेख लेखा मध्ये नाही याचा खेद वाटतो का?!:;

कंजूस 27/03/2022 - 14:28
मला दोन तीन प्रश्न पडले आहेत. १) भारत हा दुय्यम मोठा देश आणि मुख्य मार्केट आहे म्हणून इकडे पावणे मेवणे येत जात आहेत का? २) पासष्ट वयाचा नियम पाळून मोदी पुन्हा निवडणुकीत उभे राहणार नाहीत तर भाजपात दुसरा कोणता चलाख नेता आहे. आणि सर्व विरोधी एक होऊन लढणार तर ममता दिदिला डावलणार कसे? जोपर्यंत ममता तोपर्यंत राहुल बाबाला चानस नाही. मग कोण? ३) तिसरा प्रश्न म्हणजे चीनला आपल्या लोकसंख्येला अन्न कसं पुरवायचं याची धास्ती पडल्याने किंवा त्या नियोजनात गुंतल्याने तळ्यात उडी मारत नाही का?

In reply to by कंजूस

शाम भागवत 28/03/2022 - 12:42
पासष्ट वयाचा नियम पाळून
तुम्हाला ७५ म्हणावयाचे असावे.
१) भारत हा दुय्यम मोठा देश आणि मुख्य मार्केट आहे म्हणून इकडे पावणे मेवणे येत जात आहेत का?
१. मला वाटते २०१४ नंतर चीन, रशिया व भारत हे तीन देश हे एकमेकांमधे सत्तासमतोल साधणारे देश बनत आहेत. त्या अगोदर चीनची मर्जी सांभाळण्याचीच कसरत आपण जास्त करत होतो. २. चीन भारत व रशिया हे तीन्ही देश एकत्र झाले तर नाटोला फारच जबरदस्त प्रतिस्पर्धी निर्माण होईल. अमेरिका व युरोप हे कायम दबावाखाली राहतील. यास्तव अमेरिका व युरोप आता भारताशी चांगले संबंध ठेवायचे तसेच वाढवायचे प्रयत्न करत आहेत. या अगोदर अमेरिका व युरोप यांनी रशिया व चीन एकत्र येऊ नयेत यासाठी चीनला जवळ केले होते. पण आता चीन भरवशाचा राहिला नाही. त्यामुळे आता भारताचा नंबर लागला आहे. दुसरे सर्वाधीक महत्वाचे कारण म्हणजे भारत लोकशाही देश असल्याने भारतात काय चालले आहे ते कळू शकते. तसे रशिया व चीन बद्दल म्हणता येत नाही. त्यामुळे भारताचे महत्व २०५० पर्यंत तरी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. चीनची जाहीरातबाजी खूप झाली आहे. मात्र तो तेवढा बलवान नाही हे जसजसे दिवस जातील तसतसे जगाला लक्षात येत जाईल. विशेषकरून भारताला हे जसजसे जाणवत जाईल व आपण आपली शस्त्रसामुग्रीमधे आत्मनिर्भर होत जाऊ त्याप्रमाणात पाकीस्तानचे विभाजन करायचे मनसुबे रचले जातील असे वाटते. थोडक्यात भारताची मित्रसंख्या यापुढे सातत्याने वाढतच जाताना दिसणार आहे. असे मला वाटते.

In reply to by शाम भागवत

कंजूस 30/03/2022 - 06:52
६५. अगोदर महाजन आणि सुषमा स्वराजना तिकिट तिकिट नाकारलं होतं. यामुळे पवारसाहेबही नाराज होते. तसं आपलंही होईल. पण आता म्हणतात मी नाही त्यातला. कांग्रेस एक होऊन त्याचा अध्यक्ष व्हायला तयार आहे. गजराचे घड्याळ हातावर लावेन.

In reply to by मुक्त विहारि

आनन्दा 27/03/2022 - 20:02
होणार नाहीच असे पण नाही.. तसेही बलुचिस्तान मध्ये हिंदू जवळजवळ नाहीतच.. त्यामुळे त्यावरून वाजायची भीती नाहीये.. पाकिस्तान चे मात्र कंबरडे मोडेल.. शेजारी लहान लहान देश असणे नेहमी सोपे असते, कारण ते एकमेकात भांडत बसले तर तुम्हाला त्यांचा त्रास कमी होतो

In reply to by कपिलमुनी

चौकस२१२ 28/03/2022 - 04:52
बलुचिस्तान चे मांडे खाऊ नयेत. मला नाही वाटत कोणी "मांडे" खात आहे... पाकिस्तान ला निव्वळ त्रास देण्यासाठी " "बलुचिस्तान " ची आग धुमसत ठेवणे हि केवळ एक खेळी आहे

माहिती गोळा करून मगच, विश्लेषण करता आणि मग मुद्दा मांडता... तुमच्या लेखांतील काही विचार पटत किंवा न पटोत, पण तुम्ही आधी बाण मारून, मग वर्तुळे काढत नाही... तुमचे आणि माझे, वैचारिक मतभेद असले तरी, वैयक्तिक पातळीवर ते कधीच हमरीतुमरीवर उतरले नाहीत आणि उतरण्याची शक्यता देखील नाही...

माझ्या मते आता युक्रेनचे ३ ते ५ तुकडे संभवतात. पहिला डॉन नदीचं खोरं, अर्थात डॉनबास ( Don basin ) . हा विभाग कदाचित रशियात दाखल होईल. किंवा स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहील परस्पेक्टीव्ह पटला.आजच्याच वृत्तपत्रातील विश्लेषण व तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपले भाकीत खरे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. बलुचिस्तान चे मांडे खाऊ नयेत. मला नाही वाटत कोणी "मांडे" खातय, या चौ२१२ याच्याशी सहमत आहे. माथेफीरू आणी भुक्कड शेजारी नेहमीच डोकेदुखी आसतो बदलू शकत नाही म्हणून कायम त्याला टेटंरहूक वर ठेवणे हाच एक उपाय.

सुबोध खरे 28/03/2022 - 11:48
काही न पटलेले मुद्दे १) बलुचिस्तानला भारताचा पाठिंबा ( छुपा किंवा उघड) असला तरी बलुचिस्तान भारताचं भाग कधीही होणार नाही. असे होईल अशी कोणत्याही भारताच्या (सत्ताधारी किंवा विरोधी) नेत्याची किंवा नियोजन कर्त्यांची कल्पना नाही. कारण ती व्यवहार्य नाही. (तेथे भक्ती किंवा गुलामी आणणारे लोक पूर्वग्रहदूषित/ सडक्या मनोवृत्तीचे आहेत) केवळ तो इतिहासात भारताचा अनेक भाग होता म्हणून परत बलुचिस्तान भारताचा भाग होईल हे आपल्या आयुष्यकाळात अशक्य आहे. पाकिस्तानचे चार तुकडे करणे हा भारताच्या डावपेचाचा उघड भाग आहे कारण तो देश केवळ इस्लाम या एकमेव खांबावर उभा आहे. भारतापासून वेगळे होण्यास तेवढे कारण पुरेसे असले तरी एकत्र राहण्यासाठी तेवढे कारण पुरेसे नाही. तेथे पंजाबी लोकांनी सर्वत्र सवता सुभा केल्यामुळे सिंधी, बलुची आणि पठाण या तीन इतर प्रांतातील लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे बांगला देश सारखे हे तीन प्रांत आपल्या भाषिक आणि वंशिक अस्मितेसाठी वेगळे राष्ट्र हवे हि मागणी उचलून धरतात. २) एस एस एन २२ हि क्षेपणास्त्रे जहाज विरोधी क्षेपणास्त्रे असून त्यावरुन मोठी अण्वस्त्रे नेता येत नाहीत त्यामुळे इस्त्रायल जाळून टाकण्याची त्यात क्षमता नाहीच. https://www.globalsecurity.org/military/world/russia/moskit.htm. एस एस ( सरफेस टू सरफेस) एन (naval version) २२ हि जहाजावरुन डागण्यात येणारी क्षेपणास्त्रे "Sovremennyy" या विनाशिकांवर तैनात असून या विनाशिका रशियाकडे आणि चीनकडे रशियाकडून विकत घेतलेल्या चार विनाशिका आहेत. हि क्षेपणास्त्रे भारताकडे पण आहेत https://en.wikipedia.org/wiki/Sovremenny-class_destroyer ३) अमेरिकेचे विभाजन हि तर सद्यस्थितीत अशक्य मात्र गोष्ट आहे.हि केवळ कविकल्पना आहे त्यासाठी ना जन मत आहे ना कुठली प्रशासनिक तयारी. ४)ब्राम्होस पाकिस्तानात गेलं त्यासाठी पुतीन यांनी श्री मोदी याना सांगितलं हि पण एक अशीच कपोलकल्पित गोष्ट आहे. मुळात ते क्षेपणास्त्र आपण डागलं कि अपघातानेच गेलं हे नक्की सांगणं कठीण आहे . पण जरी भारताने ते मुद्दाम डागलं असेल तर ( चुकून डागलं हा कांगावा आहे हे मान्य केलं तरी) त्यातून चीनची HQ ९ हि क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली फुसकी आहे हे सिद्ध झालं आहे. यामुळे पाकिस्तानची (आणि चीनची) हवा टाईट झाली आहे हे मात्र खरं. आणि चीनची हि प्रणाली फुसकी आहे हे ठरवल्याबद्दल अमेरिका आणि नाटो हे देश आतून भारताला धन्यवादच देत असतील. कारण आता त्यांच्या क्षेपणास्त्र प्रणालीचे भाव वधारले शिवाय चीनच्या एकंदर सामरिक स्थिती बद्दल त्यांना जास्त चांगला अंदाज बांधता येऊ शकेल विशेषतः उद्या तैवान वरून युद्धाला तोंड फुटले तर. एका चुकीच्या क्षेपणास्त्राने किती कारनामे केले ते पहा.

Trump 28/03/2022 - 17:39
खरंतर आज ट्रंप राष्ट्राध्यक्ष असते तर रशियावर युद्धाची वेळ आलीच नसती. पण ट्रंपूतात्यांची ऐन वेळेस फाफलल्याने त्यांनी निमूटपणे सत्ता सोडली. आणि जगाच्या नशिबी आलीया भोगासी .... दुसरं काय.
+१ श्री ट्रंप यांच्याइतका प्रामाणिक, मनमोकळा आणि सगळ्यांना संभाळुन घेणारा नेता आजकाल दुर्मिळच.

गामा पैलवान 29/03/2022 - 02:20
सुबोध खरे, आपला इथला संदेश वाचला. माझी मतं सांगतो. १.
.... बलुचिस्तान भारताचं भाग कधीही होणार नाही.
बलुचिस्थान स्वतंत्र देश म्हणून तग धरून राहणं जवळजवळ अशक्य आहे. एकतर लोकसंख्या कमी आणि त्यामानाने विस्तार जास्त. शिवार विपुल नैसर्गिक खनिज संपत्ती असल्याने त्यास कोण्या एका देशाचा सहारा घेऊन जगणं भाग आहे. अन्यथा त्याचं जे शोषण आत्ता होतंय तसंच पुढे चालू राहील. संरक्षण, परराष्ट्रव्यवहार वगैरे भानगडी स्वतंत्र बलुचिस्थानाच्या आवाक्यातल्या ( वाटंत तरी ) नाहीत. म्हणूनंच पाकचा भाग तोडून जरी काढला तरी तो मोकळा ठेवता कामा नये. तो भारतास जोडून घेतलाच पाहिजे. या कामासाठी बलुची मराठा लोकांची मदत घेता येईल. इतर बलुचींपेक्षा ते बरेच मवाळ आहेत. आणि मुख्य म्हणजे तो शिक्षित वर्ग आहे. हा वर्ग बाकी बलुची व भारत यांच्यातला दुवा म्हणून काम करू शकतो. २.
एस एस एन २२ हि क्षेपणास्त्रे जहाज विरोधी क्षेपणास्त्रे असून त्यावरुन मोठी अण्वस्त्रे नेता येत नाहीत त्यामुळे इस्त्रायल जाळून टाकण्याची त्यात क्षमता नाहीच.
एकदम बरोबर. पण एकाच वेळेस अनेक क्षेपणास्त्रे डागता यावीत. निदान २००३ साली तरी ती तयारी झालेली होती. शिवाय इस्रायल अतिशय चिमुकला प्रांत आहे. पालघर + ठाणे + पुणे जिल्हे इतकाच विस्तार आहे ( विकीसंदर्भ : २२०७२ चौकिमी < ५३४४ + ४२१४ + १५६४३ चौकिमी ). त्यातून सबंध इस्रायल नष्ट करायची गरजही नाही. तेल अवीव, हायफा, वगैरे तीनचार प्रमुख शहरांत प्रत्येकी अर्धा मेगाटनचं विवर पाडणं पुरेसं ठरावं. निदान २००३ साली तरी पुरेसं असावं. वरील आकडेमोड व व्यूहरचना पुतीन यांची आहे. मी ती स्पष्ट करून सांगण्यावर साहजिक मर्यादा आहेत. ३.
हि केवळ कविकल्पना आहे त्यासाठी ना जन मत आहे ना कुठली प्रशासनिक तयारी.
१९४६ साली भारताचं विभाजन ही देखील कविकल्पनाच होती. त्या कवीचं नाव महमंद इक्बाल. पण जून १९४७ मध्ये ती प्रत्यक्षांत आलीच. बाकी अमेरिकन जनमत वगैरेंना विचारतो कोण. बिडेन धडधडीतपणे निवडणूक चोरून सत्तेत आलाय. हे एक पुस्तक आहे : Civil War II: The Coming Breakup of America परिचयाव्हेर : मी पुस्तक वाचलेलं नाही. हे पुस्तक १९९७ साली पहिल्यांदा छापलं गेलं. तेव्हा त्यातल्या गोष्टी अतिरंजित वाटंत होत्या. पण आज जर ग्राहकांचे आढावे बघितले तर त्या अतिरंजित गोष्टी प्रत्यक्षांत उतरल्याहं दिसून येतं. निदान, पुस्तकाचा आढावा घेणारे ग्राहक तरी तसा अभिप्राय नोंदवताहेत. ४.
ब्राम्होस पाकिस्तानात गेलं त्यासाठी पुतीन यांनी श्री मोदी याना सांगितलं हि पण एक अशीच कपोलकल्पित गोष्ट आहे.
रिकामं ब्राह्मोस पाकिस्तानावर डागण्यात मोदी व पुतीन यांच्यात सामंजस्य आहे. कोणी कोणाला सांगितलं हे गौण आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सुबोध खरे 29/03/2022 - 19:05
तो मोकळा ठेवता कामा नये. तो भारतास जोडून घेतलाच पाहिजे. जेमतेम ५० हजार हिंदू असलेले बलुचिस्तान स्वतःचे काय लष्कर ठेवणार आणि पाकिस्तानी लष्कराकशी काय टक्कर घेणार? उगाच बलुची मराठाची बेडकी किती फुगवणार? एकाच वेळेस अनेक क्षेपणास्त्रे डागता यावीत. या क्षेपणास्त्रांचा टप्पा फक्त २५० किमी आहे हि काय रशियन जहाजांवरुन डागायची? आणि जहाजे कुठे उभी करायची भूमध्य समुद्रात? म्हणजे इस्रायली विमाने किंवा जहाजे यावरून डागल्या जाणाऱ्या गॅब्रियल ब्ल्यू स्पिअर क्षेपणास्त्रांच्या का भूमध्य समुद्राच्या तळाशी गुप्तपणे फिरणाऱ्या इस्रायली पाणबुड्यांच्या टार्गेट प्रॅक्टिस साठी? उगाच काहींच्या काही? रिकामं ब्राह्मोस पाकिस्तानावर डागण्यात मोदी व पुतीन यांच्यात सामंजस्य आहे. कोणी कोणाला सांगितलं हे गौण आहे. मुळात पुतीन यांनी मोदींना असं सांगितलं याला अंशभर तरी पुरावा आहे का? बाकी चालू द्या

गा. पै तुमची माहिती संकलन लाजवाब आहे. पण आंद्रे यांनी आठवड्या पूर्वी खफवर याची ध्वनीफीत दिली होती. त्यात १४ व्या शतकपासून इतिहास आहे.

गामा पैलवान 29/03/2022 - 20:48
सुबोध खरे, आपला इथला संदेश वाचला. १.
जेमतेम ५० हजार हिंदू असलेले बलुचिस्तान स्वतःचे काय लष्कर ठेवणार आणि पाकिस्तानी लष्कराकशी काय टक्कर घेणार?
बरोबर. म्हणजेच, स्वतंत्र झाल्यावर बलुचिस्थान परत पाकच्या ताब्यात जाणार. ते टाळण्यासाठीच तर मी त्यास भारतात सामील करून घ्यायचं म्हणतोय. २.
उगाच बलुची मराठाची बेडकी किती फुगवणार?
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. जोवर बलुची लोकं हिंगलाज देवीस आई मानतात तोवर बलुची मराठ्यांची बेडकी फुगवायला हरकत नसावी. हे माझं वैयक्तिक मत. ३.
या क्षेपणास्त्रांचा टप्पा फक्त २५० किमी आहे. हि काय रशियन जहाजांवरुन डागायची? आणि जहाजे कुठे उभी करायची भूमध्य समुद्रात? .... उगाच काहींच्या काही?
दमास्कस ते तेल अवीव हे अंतर २०० किमीच्या आतबाहेर आहे. सीरियाच्या वाळवंटात ट्रक उभे करता येतील. किंवा मग सुखोईवरनंही डागता येतील. अर्थात हा पुतीन यांचा प्रश्न आहे. त्यांचं आकलन माझ्यापेक्षा सखोल आहे. ४.
मुळात पुतीन यांनी मोदींना असं सांगितलं याला अंशभर तरी पुरावा आहे का?
असला वा नसला तरी काय फरक पडतो? रशिया-भारताने संयुक्तपणे विकसित केलेलं ब्राह्मोस चीननिर्मित बचावयंत्रणेस हुलकावणी देऊन पाकिस्तानात जाऊन पडतं. हे तथ्य आहे. त्याचा जो काही परिणाम व्हायला पाहिजे तो होणारंच आहे. माझा प्रश्न इतकाच आहे की, ही घटना नेमकी रशिया-युक्रेन युद्धाच्या वेळेसच का घडली असावी? या दोन घटनांत काहीतरी संबंध असावा हा माझा तर्क आहे. त्यानुसार मी दृष्टीकोन विकसित करू पाहतोय. हा दृष्टीकोन तुम्हांस पसंत नाही. काही हरकत नाही. तुमचे माझे विचार जुळंत नाहीत, असं म्हणून मी या मुद्द्यासंदर्भात इथे थांबतो. आ.न., -गा.पै.

तर्कवादी 30/03/2022 - 00:11
काही मुद्दे न पटणारे आहेत
माझ्या मते झेलेन्स्की हा माणूस प्रभावप्रवण ( prone to Putin's influence ) आहे. त्याला हाताशी धरून पुतीन यांना आपली खेळी अचूकपणे करता येईल.
तर मग खरा सामना पुतीन विरुद्ध झेलेन्स्की असा नसून पुतीन विरुद्ध यारोश असा आहे
ही थिअरी फारच फिल्मी वाटते पण तरी राजकारणात त्यातुनही आंतरराष्ट्रीय राजकारणात काहीही घडू शकते आणि दिसते तसे नसते हे मान्य केले तरी जर झेलेंस्की आणि पुतीन यांचं इतकंच सख्य आहे तर बंडखोर नाझींचा बीमोड करण्याकरिता (जे रशियाला हवेच आहे) झेलेन्स्की सरळपणेच रशियाची मदत घेवू शकला असता. ते रशियाकरिताही पॉलिटिकली करेक्ट ठरले असते. .. नाझींना उघडपणे कोण पाठिंबा देवू शकेल ? जर नाझींचे अस्तित्व व त्यांच्या कारवाया पद्धतशीरपणे सिद्ध करुन जगासमोर आणल्या असत्या तर नाझीविरोधी मोहिमेला नैतिक पाठबळ लाभले असते असे न करता पुतीन युद्धखोरीचा दोष का ओढवून घेत आहे ? तसेच युक्रेनमधील नाझींची संख्या किती आहे व विस्तार कसा आहे हे याचा उल्लेख नसला तरी काही मुठभर (अगदी १०% म्हणू हवं तर) नाझींचा बीमोड करण्याकरिता झेलेन्स्की युक्रेनच्या अनेक शहरांचे सर्वंकष नुकसान होवू देत आहे ? यावरुन मला मिपावर कुणीतरी टाकलेला किस्सा आठवला - ढेकूण मारण्यासाठी गादीला आग लावली जी पुढे खोलीभर पसरली. आणि झेलेन्स्की जर पुतीनच्या प्रभावाखाली आहे तर मग तो नाटोच्या नादी का लागला ? पुतीनला आवडत नसतानाही ? नाझी व नाटोचे दोन मुद्दे परस्परविरोधी वाटतात. मुळात युक्रेनमध्ये नाझींचा शिरकाव झाला कुठून ? आधीच्या सोव्हिएत युनियनमध्येच नाझी होते का ? मला तरी नाझी हा बागुलबुवा वाटतो.. असे काही नाझी आज मोठ्या प्रमाणावार अस्तित्वात असतील आणि कारवाया करत असतील हे खरं वाटत नाही.. फारतर नाझी विचाराचे काही घटक असू शकतील. लेखातील इतर मुद्दे : अमेरिकेचे विभाजन - हे काय नवीनच ? हे का होणार ? कोण करणार ? असो पाकिस्तानचे विभाजन : भारताने असल्या काही भानगडीत पडू नये. सध्या जे आहे , जसे आहे तेच व्यवस्थित सांभाळावे. बाकी भारताने पाकिस्तानावर 'चुकून' सोडलेले क्षेपणास्त्र हे ब्राह्मोसच होते का ? मी याआधी वाचलेल्या बातम्यांत फक्त क्षेपणास्त्र असाच उल्लेख होता, ब्राह्मोस नाही. आणि सध्या युक्रेनच्य्या गदारोळात जगाने या चुकीकडे दुर्लक्ष केले असले तरी यामुळे भारताने भलतेच धाडस करु नये - संरक्षण, उत्पादन व इलेक्ट्रॉनिक्स इ क्षेत्रांत स्वयंपुर्ण नसताना युद्धखोरी परवडणारी नाही.

In reply to by तर्कवादी

सुबोध खरे 30/03/2022 - 20:09
संरक्षण, उत्पादन व इलेक्ट्रॉनिक्स इ क्षेत्रांत स्वयंपुर्ण नसताना युद्धखोरी परवडणारी नाही. असा स्वयंपूर्ण देश कदाचित केवळ अमेरिकाच आहे. कारण रशिया सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये स्वयंपूर्ण नाही. बाकी युरोपीय देश तर लांबच राहिले भारताने क्षेपणास्त्र डागले ते अपघात होता कि अपघाताचे नाव दिले आहे हा मुद्दा बाजूला ठेवू ( ते नक्की फारच थोड्या लोकांना माहिती असावे) परंतु या क्षेपणास्त्राने पाकिस्तानची चीन कडून आयात केलेली क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा फुसकी ठरवली आहे हि यातील फार मोठी उपलब्धता आहे. या मुळे पाकिस्तानच काय चीनसुद्धा भारताशी कुरबुरी करताना थोडासा कचरेल यात शंका नाही. गेंडा किंवा हत्ती याना भीती दाखवण्यासाठी सिंह सुद्धा गुरगुराट करतात तसेच हे आहे. स्वातंत्र्य दिनी किंवा प्रजासत्ताकी दिनी भारत आपली सैन्य शक्ती प्रदर्शनासरथ मांडतो ती काही लोकांचे मनोरंजन म्हणून नव्हे तर जगातील इतर देशांना आपली शक्ती आणि सामर्थ्य दाखवण्यासाठी. अपघाताने का होईना पण ब्राम्होसने चीनची क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली फुसकी ठरवली हा चीनला एक मोठा धक्काच असून त्यानंतर ब्राम्होस खरेदी साठी बऱ्याच देशांनी रस दाखवलेला आहे. राहिली गोष्ट -- हे क्षेपणास्त्र ब्राम्होसच आहे कारण भारताकडे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाणारे दुसरे कोणतेही क्रूझ क्षेपणास्त्र ( जमिनीला समांतर जाणारे) नाही. अग्नी पृथ्वी सूर्य इ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत म्हणजेच वातावरणाच्या बाहेर जाऊन परत आत येणारी.

In reply to by सुबोध खरे

तर्कवादी 30/03/2022 - 20:41
भारताने क्षेपणास्त्र डागले ते अपघात होता कि अपघाताचे नाव दिले आहे हा मुद्दा बाजूला ठेवू ( ते नक्की फारच थोड्या लोकांना माहिती असावे)
क्षेपणास्त्र अपघाताने डागले गेले तर ती मोठीच नामुष्कीजनक गोष्ट आहे.
परंतु या क्षेपणास्त्राने पाकिस्तानची चीन कडून आयात केलेली क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा फुसकी ठरवली आहे हि यातील फार मोठी उपलब्धता आहे
सहमत..
गेंडा किंवा हत्ती याना भीती दाखवण्यासाठी सिंह सुद्धा गुरगुराट करतात तसेच हे आहे. स्वातंत्र्य दिनी किंवा प्रजासत्ताकी दिनी भारत आपली सैन्य शक्ती प्रदर्शनासरथ मांडतो ती काही लोकांचे मनोरंजन म्हणून नव्हे तर जगातील इतर देशांना आपली शक्ती आणि सामर्थ्य दाखवण्यासाठी.
धाक दाखवण्याकरिता थेट पाकिस्तानात क्षेपणास्त्र डागणे ही धोकादायक कृती होती. असो. जे झाले ते झाले आणि जीवितहानी झाली नसल्याने तसेच जगाचे लक्ष दुसरीकडे वेधलेले होते व आंतराराष्ट्रीय पातळीवर बहुधा या घटनेची फारशी दखल घेतली गेली नाही म्हणून बरे झाले. पण धाक दाखवण्यापुरते ठीक आहे. स्वतःहून युद्धाला तोंड फोडणे - निदान सध्यातरी योग्य होणार नाही. किंबहूना पुढेही युद्ध होवू नयेत, शांतता नांदावी असंच मी म्हणेन. पाकिस्तानाचे तुकडे होवून अराजक माजण्यापेक्षा तिथल्या लष्कराचे सरकारवरील नियंत्रण नाहीसे व्हावे, राजकारण्यांना उपरती होऊन ते योग्य मार्गाने देशाचा विकास घडवण्याकरिता प्रयत्नशील व्हावेत , भारताशी वैरभाव न ठेवता सहकार्याची भूमिका घेत परस्पर विकास साधावा हे बघायला मला अधिक आवडेल. भारत , पाकिस्तान , बांग्लादेश, नेपाळ व श्रीलंका या सर्व देशांत परस्पर सहकार्य अधिकाधिक वाढीस लागून सर्वांची भरभराट झाली तर इतर कोणताही देश यांपैकी कोणाकडेही वाकड्या नजरेने बघायला धजावणार नाही. यासर्व देशांतील जनतेत एक नैसर्गिक सहचर्याची भावना (synergy) निदान काही अंशी तरी नक्कीच आहे असे मला वाटते. जरी भारत व पाकिस्तानात सतत कुरबूरी चालत असल्या तरी सर्वसामान्य जनतेच्या मनात विरुद्ध देशातील जनतेबद्दल असा वैरभाव फारसा नाही असे मला वाटते (म्हणून इकडचे कलाकार /चित्रपट तिकडे व तिकडचे कलाकार /मालिका इकडे लोकप्रिय होत असावेत). झालेच तर जोडीला भारत जपान वाढते यांच्यातले वाढते सहचर्य आणि भारत रशिया यांच्यातील जुने सौहार्दाचे संबंध यांची परिणामकारकता वाढून पुर्वेकडील (चीन वगळता) - अमेरिका व चीन हे भरवशाचे वाटत नाहीत.
राहिली गोष्ट -- हे क्षेपणास्त्र ब्राम्होसच आहे कारण भारताकडे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाणारे दुसरे कोणतेही क्रूझ क्षेपणास्त्र ( जमिनीला समांतर जाणारे) नाही. अग्नी पृथ्वी सूर्य इ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत म्हणजेच वातावरणाच्या बाहेर जाऊन परत आत येणारी.
हे माहीत नव्हते. माहितीबद्दल धन्यवाद.

In reply to by तर्कवादी

सुबोध खरे 31/03/2022 - 19:47
CALCULATED RISK ( हिशेबी धोका पत्करणे) याला लष्करी डावपेचात अनन्य साधारण महत्व आहे. एका दगडात दोन पक्षी मारले गेले आहेत. एक तर तुमच्या क्षेपणास्त्राची चाचणी झालेली आहे आणि चीनची क्षेपणास्त्र प्रणाली फुसकी आहे याचा तुम्हाला डावपेचात्मक फायदा आणि चीनला तोटा सहज दिसून येतो आहे. बाकी पाकिस्तानने कितीही गमजा केल्या तरी यावरून आपल्याला कडक, अति कडक, महाकड्क, अतिभयंकर महाकडक खलिते आणि निषेध पाठ्वण्याव्यतिरिक्त पाकिस्तान काहीही करू शकणार नाही. पाकिस्तानने जर क्षेपणास्त्राने प्रतिहल्ला केला असता तर आपली क्षेपणास्त्र प्रतिबंधक प्रणाली त्यांच्यापेक्षा कितीतरी परिणामकारक आहे. त्यात एस ४०० सुद्धा आले आहे आणि असा एक हल्ला त्यांनी केला तर आपण केलेला प्रतिहल्ला इतका तिखट आणि परिणामकारी असेल कि पाकिस्तान परत डोके वर काढणार नाही. विंग कमांडर अभिनंदन वर्तमान याना सोडले नाही तर श्री मोदी हे पाकिस्तान वर हल्ला करतील असे बोलताना पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचे हातपाय लटलट कापत होते आणि त्यांना घाम फुटला होता हे आपण एवढ्यात विसरलात? आपल्या संसदेवर हल्ला झाला असताना तत्कालीन सरकारने भारत पाकिस्तानच्या दसपट शक्तिशाली असून शेपूटच घातले होते ना? शेवटी केवळ स्नायूमध्ये शक्ती असून उपयोग होत नाही तर पाठीचा कणा ताठ असायला आणि विचारांची बैठक पक्की असायला लागते. आणि पाकिस्तान ची अणुबॉम्ब ची धमकी फुसकी आहे हे श्री मोदी यांनी त्यांना दोन वेळेस हल्ला करून सप्रमाण दाखवून दिले आहे.. तेंव्हा आपली विधाने डॉ मनमोहन सिंह त्यांच्यासारखीच कणाहीन आणि बुळबुळीत आहेत असेच मी म्हणेन. बाकी सामंजस्य सहकार्याची भूमिका वगैरे मुद्दे गांधी जयंतीच्या वेळेस भाषण करायला छान असतात. सर्वसामान्य जनतेच्या मनात विरुद्ध देशातील जनतेबद्दल असा वैरभाव फारसा नाही असे मला वाटते. हा भाबडेपणा सोडा आणि अभ्यास वाढवा. बॉलिवूडचे सिनेमे पाहून आपली अत्यंत चुकीची समजूत झालेली आहे. बॉलिवूड निर्माते भाईचारा सामंजस्य सहकार्याची भूमिका इ इ बुळबुळीत मुद्दे आपले चित्रपट पाकिस्तानात खपावेत म्हणून पुढे करत असतात वर "गंदा है पर धंदा है" म्हणून त्याचे समर्थनही करतात पाकिस्तानच्या शालेय अभ्यासक्रमात काय शिकवले जाते ते एकदा नीट वाचून पहा. हि पिढी आता पन्नाशीला आली आहे तेंव्हा स्वातंत्र्यापूर्वी कसे सगळे गुण्यागोविंदाने राहत होते सारखे भाबडे समाजवादी विचार कालौघात मोडीत निघालेले आहेत हे तुमच्या लक्षात येईल. since the 1970s Pakistani school textbooks have systematically inculcated hatred towards India and Hindus. A 2005 report by the National Commission for Justice and Peace, a nonprofit organization in Pakistan, found that Pakistan studies textbooks in Pakistan have been used to articulate the hatred that Pakistani policy-makers have attempted to inculcate towards the Hindus. "Vituperative animosities legitimize military and autocratic rule, nurturing a siege mentality. Pakistan Studies textbooks are an active site to represent India as a hostile neighbor", the report stated. "The story of Pakistan's past is intentionally written to be distinct from often in direct contrast with, interpretations of history found in India. From the government-issued textbooks, students are taught that Hindus are backward and superstitious." Further the report stated "Textbooks reflect intentional obfuscation. Today's students, citizens of Pakistan and its future leaders are the victims of these blatant lies Pakistani textbooks cannot mention Hindus without calling them cunning, scheming, deceptive or something equally insulting. The textbooks ignore the pre-Islamic history of Pakistan except to put the Hindu predecessors in negative light the textbooks supported military rule in Pakistan, promoted hatred for Hindus, glorified wars and distorted the pre 1947 history of Pakistan. Pakistani textbooks still teach children about twelve benefits of dictatorship compared with just eight benefits of democracy.No Pakistani child is ever taught about the Pakistani military's surrender to India in 1971. They are always taught that India was the aggressor in each and every war, and most amusing is they are taught that Pakistan won the 1965 war since the 1970s Pakistan's school textbooks have systematically inculcated prejudice towards India and Hindus through historical revisionism. Recently, the contributions of Nehru, Gandhi, Ambedkar, Patel and Bose to the Indian independence movement have been omitted from Pakistani textbooks. स्रोत विकी अशा विषवल्लीला जर ७-८ वर्षांपासून बालकांच्या मनात पेरले गेल्यावर येणारी फळे बिनविषारी असतील हे समजणे अत्यंत भाबडेपणाचे असेल. असो

In reply to by सुबोध खरे

बाकी पाकिस्तानने कितीही गमजा केल्या तरी यावरून आपल्याला कडक, अति कडक, महाकड्क, अतिभयंकर महाकडक खलिते आणि निषेध पाठ्वण्याव्यतिरिक्त पाकिस्तान काहीही करू शकणार नाही. ह्यावरून आपले कडीनिंदा फएम संरक्षणमंत्री राजनाथसिंग आठवले. :) रच्याकने चिनविरूध्द तर कडीनींदा देखील बंद झालीय.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे 06/04/2022 - 18:40
@ अमरेंद्र बाहुबली तुमचे पूर्वग्रह बाजूला ठेवा आणि डोळे उघडा गालवान खोऱ्यात आणि डोकलं येथे काय झाले हे वाचून पहा. उगाच कळफलक हातात आहे म्हणून असंबद्ध बडवू नका.

In reply to by सुबोध खरे

तर्कवादी 31/03/2022 - 23:48
तेंव्हा आपली विधाने डॉ मनमोहन सिंह त्यांच्यासारखीच कणाहीन आणि बुळबुळीत आहेत असेच मी म्हणेन.
मि. सुबोध खरे जी. आपण आता राजकारण मध्ये आणलेत त्यावर बोलायची माझी इच्छा नाही.. तसेच माझ्या विधानांबद्दल असहमती मी समजू शकतो.. पण कणाहीन आणि बुळबुळीत असे हेटाळणीजनक शब्द टाळावेत अशी मी आपणास नम्र सुचना करु इच्छितो.
हा भाबडेपणा सोडा आणि अभ्यास वाढवा.
पुन्हा एकदा... मला जे वाटते ते मी मांडले होते. तुमचे मत वेगळे असू शकतेच. तुम्हाला वाटते ते तुम्ही मांडत रहा. पण "अभ्यास वाढवा" हे हेटाळणीवजा वाक्य मिपावर काहीसे प्रचलित असले तरी मी त्याचे स्वागत करीत नाही. आणि आपणास नम्रपुर्वक सुचवतो की अशा स्वरुपाची व्यक्तिगत टिप्पणी माझ्याबाबत आपण करु नये. दोन व्यक्तींमध्ये कमी अधिक प्रमाणात मतभिन्नता ही असणारच. आपली मते जुळत असली वा नसली तरी एकमेकांचा आदर करणे अधिक योग्य नाही का ? माझ्या सुचनांचा तुम्ही विचार कराल ही आशा आहे. धन्यवाद.

In reply to by सुबोध खरे

प्रदीप 01/04/2022 - 10:26
तेंव्हा स्वातंत्र्यापूर्वी कसे सगळे गुण्यागोविंदाने राहत होते सारखे भाबडे समाजवादी विचार कालौघात मोडीत निघालेले आहेत हे तुमच्या लक्षात येईल.
अगदी सहमत आहे. माझी पत्नी येथे एका स्वयंसेवी संस्थेत काही वर्षे काम करत आहे. तिथे, आमच्या येथील एथनिक मायनॉरीटीजच्या मुलांसाठी, त्यांना गृहपाठ करण्यासाठी मदत करण्याच्या कार्यांत तिचा सहभाग आहे. येथे प्रामुख्याने आर्थिक निम्नस्तरांवरील एथनिक मायनॉरीटीजची मुलेमुली येतात. त्यांत फिलीपीन्स, थायलंड, नेपाळ, म्यानमार, बांग्लादेश, भारत व पाकिस्तान येथील मुलेमुली प्रामुख्याने असतात. तर, पत्नी सांगते की पाकिस्तानी मुलांना मद्रशांत जावेच लागते. आणि त्यांच्या डोक्यांत धर्माच्या व देशांच्या सीमांच्या तसेच देशांतील, आपापसांतील संबंधांच्या भावना अतिशय तीव्र असतात. तिने स्वतः अनुभवलेली पाकिस्तानी मुलांची काही उदाहरणे: (१) पाकिस्तानी मुलगा, वय वर्षे ५ चा माझ्या पत्नीशी संवादः पा. मु. ५: तुम कितनी अच्छी हो. तुम्हारा धरम क्या है? पत्नी: मै हिंदू हूं पा. मु. ५: अरेरे. तुम मुस्लिम हो जावो. नही तो तुम्हे नरक मे जाना पडेगा. (२) दुसरा एक पा. मु. वय वर्षे १०: तुम हिंदूस्तानी हो. तब तुम मेरी दुश्मन हो. क्योंकी हिंदूस्तान हमारा दुश्मन देश है. माझा वैयक्तिक अनुभवही हा आहे, की वरवर पाकिस्तानी माणसे आपल्याशी चांगला व्यवहार करतात, व्यवहारांत थोडीफार मदत घेतात, व करतातही. मात्र हे सगळे अगदी वरवरचे असते. त्यापुढे जाऊन जेव्हा धर्माचा व देशांच्या विचारांचा संबंध येतो, तेव्हा हा चांगुलपणा सहजपणे गळून पडतो. ***************** काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवर निळूभाऊ फुलेंची एक सुंदर मुलाखत पाहिली. त्यांत निळूभाऊ त्यांच्या समाजवादी जडणघडणीविषयी सविस्तर बोलत होते. अनेक जुन्या, खूप छान कार्य केलेल्या व तळमळीच्या समाजवादी नेत्यांच्यी नावे-- उदा. एसेम, सदाशिव बागाईतकर-- त्यांच्या तोंडून ऐकतांना मला बरे वाटत होते. मग निळूभाऊंनी तेव्हाच्या (ही मुलाखत सुमारे २००५- २००६ च्या दरम्यान ध्वनिमुद्रीत झाली असावी) परिस्थितीविषयी थोडी टिपण्णी केली. त्यांत त्यांनी जयप्रकाश नारायणांचा उल्लेख केला, व म्हणाले की जेपी नेहमीच म्हणत, भारत व पाकिस्तान ह्या दोन देशांमधील सीमा व राजकीय संबंध कृत्रिम आहेत, व नक्कीच ते पुढे गळून पडतील, व दोन्ही देशांतील नागरीक एकोप्याने राहू व वागू लागतील. हे उर्ढृत करून निळूभाऊ पुढे म्हणाले-- 'पहा, आता हे खरे होत असतांना दिसते आहे, की नाही?' तर, जुन्या मुशीतल्या सोशालिस्टांचा हा भोळसटपणा काही जात नाही. नव्या मुशीतील सोशलिस्ट, हे बनेल आहेत, त्यांचे हिशेब वेगळेच. तर्कवादी अतिशय सभ्य व अंगभूत विनम्र भाषेत लिहीतात. पण त्यांजकडेही हा जुन्या समाजवाद्यांचा भोळसटपणा आहे, असे एकंदरीत दिसून येते.

In reply to by प्रदीप

तर्कवादी 01/04/2022 - 12:05
तुम्ही जी उदाहरणे दिलीत ती वय वर्षे ५ व १० वगैरे.. साधारणपणे मुलांना वा एकंदरीतच परिपक्वतेच्या प्रवासात अजून मागे असणार्‍यांना मित्र - शत्रू , चांगला- वाईट अशी सरळसोट विभागणीच समजते , आवडते. मला आठतंय मी चौथी वा पाचवीत असेन फारतर.. माझ्या आसपास - ओळखीचे कुणी मुस्लिम नव्हते. शाळेत वर्गातही कुणी मुस्लिम मुले नव्हती. पण खेळाच्या एका ग्रुपमध्ये दुसर्‍या वर्गातील एका मुलाशी ओळख झाली... कधीतरी त्याच्याबद्दल बोलत असताना कुणीतरी त्याचे नाव ऐकून तो मुस्लिम असणार असे सांगितले. त्यामुळे मला त्या मुलाशी बोलणे विचित्र वाटू लागले... पुढे खेळातले ग्रुप बदलले, त्याचा माझा संपर्क राहिला नाही. फार लहानपणीचा किस्सा असल्याने आता नेमके तपशील आठवत नाही.. पण असं काहीसं झालं होतं इतकं मात्र मनावर कोरलं गेलंय. दुसरा आठवतंय मी इंजिनिअरिंगला असताना वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी कसलंस फुटकळ विनोदी नाटक बसवलेलं होतं... विषय वेगळाच काहीतरी होता , काही ठीकठाक विनोद पण होते पण शेवटी विनाकारण - कथेचा संबंध नसताना ओढून ताणून पाकिस्तानचा उल्लेख करत एक-दोन जोषपुर्ण/ द्वेषपुर्ण वाक्ये टाकली होती आणि त्या वाक्यांना भरपूर टाळ्या व दाद मिळाली. क्रिकेटमध्येही भारतीयांना पाकिस्तानविरुध्द व पाकिस्तानी लोकांना भारताविरुद्ध पराजय पचवणे कठीण जाते. भारत पाकिस्तानात इतकी युद्धे व सतत कुरबुरी होत असताना या गोष्टी समजण्यासारख्या आहेत...दोन्हीकडच्या जनतेत एकमेकांबद्दल रोष वा द्वेषाची भावना अजिबातच नाही असे मी म्हणत नाही.. पण तितकेच सत्य नाही.. तेच सर्वंकष असेल असे वाटत नाही. ही लिंक आपण बघू शकता यावरील एका पाकिस्तानी वापरकर्त्याच्या उत्तरातील एक परिच्छेद खाली देत - त्याची पुर्ण पोस्ट ही बजरंगी भाईजान या चित्रपटाच्या संदर्भातली असली तरी त्याची पोस्ट फिल्मी नाही आणि खालील परिच्छेद चित्रपटाबद्दल नाही A simple message I want to give to all Indians, We don't hate you all. We hate your extremist groups and your officials who wish for hatred between us. We also hate extremism and hatred shown on our side too. We have a lot in common. So why not love each other too?

In reply to by सुबोध खरे

तर्कवादी 01/04/2022 - 12:17
पाकिस्तानच्या शालेय अभ्यासक्रमात काय शिकवले जाते ते एकदा नीट वाचून पहा
तुर्तास पाकिस्तानचा विषय बाजूला ठेवू पण एकंदरीतच शालेय अभ्यासक्रमातील शिक्षणाचा माणसाच्या जीवनावर दूरगामी व खोलवर परिणाम होतो का ? तसे असेल तर निदान काहीशी शिक्षित (दहावी उत्तीर्ण म्हणू हवं तर) जनता तरी अंधश्रद्धाळू असण्याचं काहीच कारण नाही. शालेय पाठ्यपुस्तकात अंधश्रद्ध शिकवल्या जात नाहीत. पण दहावी उत्तीर्णच काय शास्र / अभियांत्रिकी / वैद्यक अशा विज्ञान शाखांतून पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले लोकहि अनेक अंधश्रद्दा मानतात... खरं तर पाठ्यक्रमातील (भाषा वगळता) इतर विषयात तर ईश्वराच्या अस्तित्वाचाही उल्लेख नसतो - पण तरीही बहुतांश सुशिक्षित (यात शास्त्र शाखेचे पदवीधर, द्विपदवीधर, अभियंते, डॉक्टर ई सगळे आलेत) लोक आस्तिक असतात असं कसं ?

In reply to by तर्कवादी

सुबोध खरे 01/04/2022 - 20:06
भारत पाकिस्तानात इतकी युद्धे व सतत कुरबुरी होत असताना या गोष्टी समजण्यासारख्या आहेत...दोन्हीकडच्या जनतेत एकमेकांबद्दल रोष वा द्वेषाची भावना अजिबातच नाही असे मी म्हणत नाही.. पण तितकेच सत्य नाही.. तेच सर्वंकष असेल असे वाटत नाही. आपले बरेच संदर्भ चुकीचे आहेत. भारतीय माणसे केवळ मुसलमान म्हणून कोणत्या देशाचा द्वेष करत नाहीत. भारतीय माणूस हा पाकिस्तानचा जितका द्वेष करतो तितका बांगला देशाचा अजिबात करत नाही. खेळाच्या/ क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तान ला हरवण्याचा जितका जल्लोष होतो किंवा पाकिस्तानकडून हरल्यावर जितके वाईट वाटते तितके बांगला देश बद्दल अजिबात वाटत नाही. फार कशाला श्रीलंका ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड बरोबर पाकिस्तानचा सामना असेल तर भारतीय माणूस नक्कीच पाकिस्तान पेक्षा या देशांना प्रोत्साहन देताना दिसेल कारण पाकिस्तान सतत तुमच्या विरुद्ध कट कारस्थाने करत असतो आणि कुठे तरी आपला शेजारी, माहितीतील, ओळखीतील एखादा जवान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांकडून मारला गेला असे लोकांना अनुभव येतात यामुळे पाकिस्तान बद्दल संताप निर्माण होतो. मुंबईतील बॉम्बस्फोट पासून ते संसदेवर हल्ला पर्यंत सर्व ठिकाणचे धागे दोरे पाकिस्तानपर्यंतच जातात. भारतातील बहुसंख्य दहशतवादी कारवाया या पाकिस्तानातच उगम पावतात. भारतीय शिक्षणात पाकिस्तान बद्दल द्वेषमूलक असे काहीही शिकवले जात नाही. पण उलट स्थिती भयानक आहे. याचे हजारो पुरावे सापडतात. बाकी तुमचे समाजवादी गुळगुळीत विचार असू द्या.

In reply to by सुबोध खरे

तर्कवादी 01/04/2022 - 23:53
बाकी तुमचे समाजवादी गुळगुळीत विचार असू द्या.
हा निष्कर्ष तुम्ही काढताय.. पण तो चुकीचा.. मी समाजवाद वा अन्य कोणत्या वादाची कास धरत नाही. मला सोबत तर्कवादाची आहे. बाकी प्रत्येकाचे विचार आणि तर्क भिन्न असू शकतात.

In reply to by सुबोध खरे

तर्कवादी 01/04/2022 - 23:57
आपले बरेच संदर्भ चुकीचे आहेत. भारतीय माणसे केवळ मुसलमान म्हणून कोणत्या देशाचा द्वेष करत नाहीत.
याबाबत मी न काही भाष्य केले ना काही संदर्भ दिला !! असो. तसाही मूळ धागा युक्रेनबद्दल आहे त्यामुळे या धाग्यावर भारत-पाकिस्तान या विषयावर अधिक चर्चा करण्यात मला रस नाही

In reply to by तर्कवादी

वामन देशमुख 01/04/2022 - 01:58
पाकिस्तानचे विभाजन : भारताने असल्या काही भानगडीत पडू नये. सध्या जे आहे , जसे आहे तेच व्यवस्थित सांभाळावे. बाकी भारताने पाकिस्तानावर 'चुकून' सोडलेले क्षेपणास्त्र हे ब्राह्मोसच होते का ? मी याआधी वाचलेल्या बातम्यांत फक्त क्षेपणास्त्र असाच उल्लेख होता, ब्राह्मोस नाही. आणि सध्या युक्रेनच्य्या गदारोळात जगाने या चुकीकडे दुर्लक्ष केले असले तरी यामुळे भारताने भलतेच धाडस करु नये - संरक्षण, उत्पादन व इलेक्ट्रॉनिक्स इ क्षेत्रांत स्वयंपुर्ण नसताना युद्धखोरी परवडणारी नाही.
पाकिस्तान प्रणित / चीन प्रणित / इतर कोणते प्रणित स्लीपर सेल्स अनेकदा पुढीलप्रमाणे काम करताना दिसतात.
  1. भारत देशाने केलेल्या प्रगतीला / साधलेल्या ध्येयांना कमी लेखणे (downplay), त्यांच्या खरेपणाबद्धल संशय उत्पन्न करणे
  2. वेगवेगळ्या चर्चांमधून भारत देश / हिंदू लोक यांचे मनोबल खचेल असे मुद्दे मांडणे
  3. "भारत पाक शत्रुत्व हे केवळ राजकारण्यांनी निर्माण केलेला बागुलबुवा आहे, पाकिस्तानातील मुसलमान जनता भारतीय हिंदूंवर जीवापाड प्रेम करते" असे साफ खोटे narrative set करणे
  4. पाकिस्तानी खेळाडू / कलाकार यांची जमेल तिथे वाहवा करणे आणि त्यांच्याबद्धल soft corner तयार करत राहणे
  5. भारताला युद्ध परवडणारे आहे का, तितकी लष्करी शक्ती तरी भारताकडे आहे का असे प्रश्नचिन्ह उपस्थित करणे
  6. भारताच्या / हिंदूंच्या दुबळ्या बाबीं प्रामुख्याने पुढे आणणे आणि त्याच मुख्य बाबी आहेत असे ठसवणे
  7. राष्ट्रहितदक्ष नागरिकांना नाना प्रकारे हतोत्साहित करत राहणे
  8. एकूणच भारत हा एक दुबळा देश आहे आणि त्याने पाकिस्तान / चीनला दुखावू नये, त्यांच्या अतिरेकी कारवाया शक्य तितक्या सहन कराव्यात असे सांगत राहणे
अनेकदा, आपण स्लीपर सेल्सचा एक भाग आहोत हेही काहींच्या लक्षात येत नाही.

In reply to by वामन देशमुख

तर्कवादी 01/04/2022 - 09:42
अनेकदा, आपण स्लीपर सेल्सचा एक भाग आहोत हेही काहींच्या लक्षात येत नाही.
अपल्या प्रतिसादाकडे दुर्ल़क्ष करणे अधिक योग्य वाटत आहे त्यामुळे प्रतिसादाची अपेक्षा करु नये. धन्यवाद

In reply to by तर्कवादी

कॉमी 06/04/2022 - 17:46
या पूर्ण ल्युनॅटिक माणसाला या संस्थळावरून हाकलले पाहिजे.अर्थ माहित नसलेले काहीही शब्द हा माणूस कायम वापरतो. याच माणसाने ऐसी अक्षरे वर अतिशय बिभत्स नावाने आयडी घेतलेला. If memory serves, त्याचा सुद्धा अर्थ यांना माहित नाही असे समोर आले होते. (इतके तीव्र शब्द वापरण्याइतके तीव्र भाष्य या इसमाने नक्की केले आहे. उठसुठ हा इतर आयडींना स्लीपर सेल म्हणतो म्हणजे काय ?)

In reply to by कॉमी

तर्कवादी 06/04/2022 - 18:25
@कॉमी तुमचे म्हणणे बरोबर आहे. थोडेफार मत-मतांतर असते तर मी प्रतिवाद केला असताही पण माझे वाक्य होते की "सर्वसामान्य जनतेच्या मनात विरुद्ध देशातील जनतेबद्दल असा वैरभाव फारसा नाही असे मला वाटते " आणि त्यावर प्रतिसादात या आयडीने "पाकिस्तानातील मुसलमान जनता भारतीय हिंदूंवर जीवापाड प्रेम करते" असे साफ खोटे narrative set करणे असे विधान केले तिथेच मला या आयडीचा संपुर्ण अंदाज आला... बाकी स्लीपर सेलची थिअरी म्हणजे कळस. असो !! अशा लोकांचा प्रतिवाद केल्यास त्यांना आणखी उत्तेजन मिळते- त्यापेक्षा दुर्लक्ष करणे उत्तम , नाही का ?

In reply to by कॉमी

वामन देशमुख 06/04/2022 - 18:32
या पूर्ण ल्युनॅटिक माणसाला या संस्थळावरून हाकलले पाहिजे.अर्थ माहित नसलेले काहीही शब्द हा माणूस कायम वापरतो. याच माणसाने ऐसी अक्षरे वर अतिशय बिभत्स नावाने आयडी घेतलेला. If memory serves, त्याचा सुद्धा अर्थ यांना माहित नाही असे समोर आले होते.
हे कुणाबद्धल लिहिलंय माहित नाही म्हणून त्याचा प्रतिवाद नाही.
(इतके तीव्र शब्द वापरण्याइतके तीव्र भाष्य या इसमाने नक्की केले आहे. उठसुठ हा इतर आयडींना स्लीपर सेल म्हणतो म्हणजे काय ?
उठसुठ कुणी कुणा मिपा सदस्याला स्लीपर सेल म्हटलं आहे?
बिभत्स नावाने आयडी
एखादा हा आयडी जर कम्यूनिझम दर्शवत असेल तर हा वाक्यांश त्या आयडीलाच लागू आहे म्हणावे लागेल कारण अनेकांच्या मते कम्यूनिझमइतकी बीभत्स, मानवताविरोधी, तर्कविरोधी आणि पराभूत विचारसरणी क्वचितच दुसरी कोणती असेल. पण तो आयडी जर कॉमिक / कॉमेडी असे काही दर्शवत असेल तर मग ठीक आहे; कॉमेडी शिवाय आयुष्यात मौजमजा नाही!

In reply to by वामन देशमुख

कॉमी 06/04/2022 - 18:39
मला स्लीपर सेल म्हणाला आहात. विसरलात वाटतं. बाकी ताकाला जाऊन भांडे लपवायचे असेल तर खुशाल लपवा. तुमचा आयडी काय होता तुम्हाला माहितीये. त्यात काय विनोद होता हे तुम्हालाच माहित.

In reply to by कॉमी

वामन देशमुख 06/04/2022 - 23:10

In reply to by वामन देशमुख

अनेकदा, आपण स्लीपर सेल्सचा एक भाग आहोत हेही काहींच्या लक्षात येत नाही.... .....सहमत आहे .... गोबेल्स नीती

गामा पैलवान 31/03/2022 - 19:04
तर्कवादी, तुमचा इथला संदेश वाचला. माझी मतं सांगतो. १.
जर झेलेंस्की आणि पुतीन यांचं इतकंच सख्य आहे तर बंडखोर नाझींचा बीमोड करण्याकरिता (जे रशियाला हवेच आहे) झेलेन्स्की सरळपणेच रशियाची मदत घेवू शकला असता.
झेलेन्स्कीस जिवावरच्या धमक्या मिळाल्या होत्या. तो व पुतीन यांच्यात जराजरी सख्य दिसलं तर कशावरून त्याच्यावर विषप्रयोग होणार नाही? पूर्वी युशेन्को यांच्यावर डायॉक्झिनचा विषप्रयोग झाला होता. नुकताच सध्याचा मध्यस्थ असलेला अतिकरोडपती रोमन अब्रामोव्हिच याच्यावर किरकोळ विषप्रयोग झाला आहे. २.
काही मुठभर (अगदी १०% म्हणू हवं तर) नाझींचा बीमोड करण्याकरिता झेलेन्स्की युक्रेनच्या अनेक शहरांचे सर्वंकष नुकसान होवू देत आहे ?
युद्ध सुरू झाल्यावर काहीच करता येत नाही. शिवाय जिवावरचा बेतण्याचा मुद्दा परत लागू आहेच. ३.
... ढेकूण मारण्यासाठी गादीला आग लावली जी पुढे खोलीभर पसरली.
ढेकूण रशिया मारतोय. आणि आग युक्रेनच्या गादीस लागलीये. त्यामुळे हा किस्सा कितपत सार्थ आहे, याची शंकाच वाटते. ४.
आणि झेलेन्स्की जर पुतीनच्या प्रभावाखाली आहे तर मग तो नाटोच्या नादी का लागला ? पुतीनला आवडत नसतानाही ? नाझी व नाटोचे दोन मुद्दे परस्परविरोधी वाटतात.
ते परस्परविरोधी आहेतंच. म्हणूनंच तर झेलेन्स्कीची इकडे आड तर तिकडे विहीर अशी गोची झालीये. ५.
मुळात युक्रेनमध्ये नाझींचा शिरकाव झाला कुठून ?
लेखात लिहिल्याप्रमाणे १९४० च्या आसपास. ६.
मला तरी नाझी हा बागुलबुवा वाटतो..
ज्याला पुतीन नाझी म्हणतात त्याचा अर्थ डीप स्टेट असा आहे. ते सर्वत्र आहेत. अगदी मुंबईतही डीप स्टेट कार्यरत आहे. त्यांमुळेच १९९३ चे १३ स्फोट आणि २६/११ वगैरे प्रकरणं घडली आहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तर्कवादी 31/03/2022 - 23:58
ज्याला पुतीन नाझी म्हणतात त्याचा अर्थ डीप स्टेट असा आहे. ते सर्वत्र आहेत. अगदी मुंबईतही डीप स्टेट कार्यरत आहे. त्यांमुळेच १९९३ चे १३ स्फोट आणि २६/११ वगैरे प्रकरणं घडली आहेत.
तसे तर भारतात नक्षलवादी चळवळीपण सक्रिय आहेत म्हणून त्यांचा बीमोड करण्याकरिता भारताचे पंतप्रधाच दुसर्‍या राष्ट्राला भारतावर हल्ला करण्याकरिता छुपा पाठिंबा देतील आणि त्यात भारतातील शहरेच्या शहरे बेचिराख करु देतील अशी कल्पना तरी करवते का ? असो. तसेच रशिया युक्रेनमधील बायोलॅब्सचा (की बायोवेपन लॅब्स) उल्लेख करते, त्याबद्दल आपणास काय वाटते?

In reply to by तर्कवादी

गामा पैलवान 01/04/2022 - 18:36
तर्कवादी, भारत युक्रेनपेक्षा सर्वार्थाने मोठा आहे. आजच्या युक्रेनचं रशिया हे मातृराष्ट्र आहे. याउलट भारत स्वत:च एक मातृराष्ट्र आहे. युक्रेन आज नाटो विरुद्ध रशिया अशा कोंडीत सापडला आहे. भारत अशा तऱ्हेच्या कुठल्याही कोंडीत अडकलेला नाही. या पार्श्वभूमीवर भारतातले डीप स्टेट नक्षलवादी मोडून काढण्यासाठी परदेशी सहाय्य घेण्याची कल्पना फारशी व्यवहार्य नाही. शिवाय युक्रेन स्वत:चं डीप स्टेट नाहीसं करीत नाहीये. ते रशियाला खुपतंय. बाकी, जैविक हत्यारांविषयी माहिती नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by कंजूस

तर्कवादी 07/04/2022 - 23:57
आज/उद्या द. कोरियावर हल्ला करणारे म्हणे
द. कोरियावर हल्ला म्हणजे जणू अमेरिकेवर हल्ला.. असे काही झाल्यास तिसरे महायुद्ध दूर नाही...

गामा पैलवान 19/04/2022 - 20:44
लोकहो, नुकताच १५ एप्रिलास सर्बियन जनतेने रशियास पाठिंबा देण्यासाठी बेलग्रेडमध्ये मोठा मोर्चा काढला. बातमी ( इंग्रजी दुवा ) : https://www.reuters.com/world/europe/pro-russia-serbs-protest-belgrade-support-russia-against-nato-2022-04-16/ सर्बिया युरोपीय महासंघाचा भाग आहे. त्यामुळे त्यास अधिकृतपणे रशियाचा निषेध करावा लागतोय. मात्र जनतेची इच्छा उलट आहे. तिला रशियास पाठिंबा द्यायचा आहे. १९९३ व १९९८ साली नाटोने बेलग्रेड व इतर ठिकाणी भीषण बॉम्बफेक केली होती. ती सर्बियन लोकं आजून विसरलेली नाहीत. नाटोच्या मनात काय आहे ते तिला चांगलंच ठाऊक आहे. त्याबद्दल तिचं अभिनंदन. सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वूचिक यांना पाश्चात्य जगाचा दबाव झुगारण्याची शक्ती मिळो. आ.न., -गा.पै.

मला अजूनेक गोष्ट व्हायला हवीये. ती म्हणजे अमेरिकेचं विभाजन.
निवडणूका होऊन आपणच विजेते असं म्हणत ट्रंप आणि बायडेन दोघेही अध्यक्षपदावर दावा करत होते तेव्हा आपल्या समाजमाध्यमांवर एक विनोद फार लोकप्रिय झाला होता. आज बापूजी अमेरिकेत असते तर त्यांनी बायडेन आणि ट्रंप दोघांनाही "भांडू नका करा अमेरिकेचे दोन भाग आणि व्हा दोघेही अध्यक्ष" असा सल्ला दिला असता.
लोकहो, बऱ्याच दिवसांपासनं युक्रेन व रशिया यांतल्या घडामोडींवर लिहायचं मनात होतं. पण अंगभूत आळशीपणा आडवा आला. शेवटी आता ठरवलंच की लिहूया म्हणून. तर, हा लेख रशियाच्या परिप्रेक्ष्यातनं लिहिलेला आहे. ही जी दुसरी बाजू आहे ती तितक्याशा ठळकपणे समोर आलेली नाहीये. ती यावी यासाठी हा दृष्टीकोन उलगडून सांगायचा माझा प्रयत्न आहे. --------------x--------------x-------------- थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी : त्याचं असं झालं की, लेक, चेक आणि रस असे ते तीन भाऊ होते. लेक ( Lech ) पासनं पोलंड उत्पन्न झालं. चेक ( Czech ) पासनं चेक राष्ट्र बनलं. तर रस ( Rus ) पासनं रशिया बनला.