मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ब्लॉग्सची उल्लेखनीयता इत्यादी..

माहितगार ·

आदूबाळ Sat, 01/14/2017 - 11:02
लेखन कुठे आहे हा माझ्यामते प्रश्न नाही. ते मूळ लेखन पुरेसं अललित आणि संदर्भसंपृक्त आहे का हा प्रश्न आहे. उदा० भाऊ तोरसेकर बऱ्याचदा सत्तरीच्या दशकाबद्दल लिहितात. त्या घटनाचं पुष्टीकरण दुसऱ्या स्रोताद्वारे झालं तर ठीकच. अन्यथा त्या घटनेला "मला आठवतंय म्हणून" एवढाच आधार राहील, आणि ते ज्ञानकोशीय मानक नव्हे. तसंच, उद्या रामदासकाकांचा लेख वापरून विकीने "डालडा"ची एन्ट्री दुरुस्त केली, तर तेही मानकात बसणार नाही.

In reply to by आदूबाळ

माहितगार Sun, 01/15/2017 - 15:23
लेखन कुठे आहे हा माझ्यामते प्रश्न नाही. ते मूळ लेखन पुरेसं अललित आणि संदर्भसंपृक्त आहे का हा प्रश्न आहे.
अगदी सहमत आहे. अर्थात माध्यम साधनांच्या उपलब्धतेच्या असमतोल, तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांची सहज उपलब्धता असलेल्या गटातला व्यक्तिची उल्लेखनियता कशी स्विकारावी अथवा नाकारावी या सबंधाने समस्या उपस्थित होतात. काल रात्रीच मानस मादरेचा नावाच्या युवकाच्या विकिंवरील लेखाकडे लक्ष वेधले गेले. महाविद्यालयांमध्ये अनेक विद्यार्थी प्रतिनिधी असतात त्यातला एक ! सोबत हिंदीतन चारोळ्या लिहितो आणि त्याच पुन्हा इंग्रजीत अनुवाद करतो. त्याचे विद्यार्थी प्रतिनिधी असणे आणि कवितांची ब्लॉगस फेसबुक इत्यादीत नोंद आहे. सोबतीला महाविद्यालयातील सामान्य काव्यसंमेलनालाही टाईम्स ऑफ इंडीया वृत्तात सहज जागा मिळाली. एखाद्या युवकाने स्वतःला पुढे पुढे करणे काही गुन्हा नाही, माध्यमात जागा सहज मिळाली पण इतर असंख्य विद्यार्थी प्रतिनिधी अथवा असंख्य कविंच्या मांदियाळीत वेगळेपण उठून दिसावे ज्ञानकोशीय दखल घ्यावी असे काही नाही. संदर्भाची उपलब्धता मात्र सहज झालेली. म्हणूनच ब्लॉगसारख्या माध्यमातून प्रकाशात रहाणारा पण काही ज्ञानकोशासाठी विशेषत्व नसलेली आणि ज्ञानकोशासाठी विशेषत्व असलेली या व्यक्तिंमध्ये अथवा मजकुरात फरक कसे करावयाचे , किंवा निकष काय असावेत.

In reply to by माहितगार

आदूबाळ Sun, 01/15/2017 - 22:26
"जगावेगळं काहीतरी करणं" हा ज्ञानकोशीय उल्लेखाचा निकष असला पाहिजे. उदा० हजारो मराठी माणसं आजवर नेदरलँड्समध्ये गेली असावीत. पण डच प्रसारमाध्यमांत पानिपतविषयी काय बातमी आली हे शोधायचं फक्त बॅटमॅनच्या डोक्यात आलं. तस्मात ज्ञानकोशीय दखल घ्यायला तो योग्य माणूस आहे. हजारो मराठी माणसं कथा लिहितात. मीही अधूनमधून लिहितो. यात काय नवल? त्यामुळे माझी दखल घ्यायचं कारण नाही.

पैसा Sat, 01/14/2017 - 11:08
या चर्चा धाग्याच्या माध्यमातून कोणत्या ब्लॉग्स लेखांचे मिसळपावसारख्या चर्चा फोरम्सवरुन मुल्यांकन व्हावे असे तुम्हाला वाटते ? ब्लॉग्सचे लेखवार तटस्थ साक्षेपी मुल्यांकन, समिक्षण कसे करावे ? आणि त्यांच्या ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेसाठी कोणत्यास्वरुपाचे निकष लावावेत असे तुम्हाला वाटते ते जाणून घेणे आवडेल.
सगळेच वाचकाच्या आणि चर्चा करणार्‍याच्या मर्जीवर अवलंबून आणि व्यक्तिसापेक्ष आहे.

कंजूस Sat, 01/14/2017 - 21:24
लेख कुठेही असो,रोजनिशितल्या नोंदी असो त्यांतील विधानांवर आक्षेप घेतले जातीलच असे नसते. असं लेखकाचं मत आहे म्हणून सोडून दिलं जातं. परंतू काहीवेळा विरोधी प्रतिसाद /मतं मांडली गेली तर संदर्भ म्हणून वापरता येईल असा मजकूर बाहेर येईलच. काहीवेळा चमत्कार धरला जातो. ९९ लोकांनी त्यास आक्षेप घेतला नाही म्हणजे १००व्या मनुष्याच्या मतास कोण विचारतो? समजा मी बोरिवली अभयारण्यात फिरायला गेलो. खूप आतमध्ये एका बिबट्या समोर आला व त्याने मला काहीच केले नाही तर मी ती गोष्ट इतर कोणत्याही माझ्या शक्तीशी जोडू शकतो. योगविद्या ,संतपणा वगैरे. तर हा विकिसाठी संदर्भ ठरावा काय?

आदूबाळ Sat, 01/14/2017 - 11:02
लेखन कुठे आहे हा माझ्यामते प्रश्न नाही. ते मूळ लेखन पुरेसं अललित आणि संदर्भसंपृक्त आहे का हा प्रश्न आहे. उदा० भाऊ तोरसेकर बऱ्याचदा सत्तरीच्या दशकाबद्दल लिहितात. त्या घटनाचं पुष्टीकरण दुसऱ्या स्रोताद्वारे झालं तर ठीकच. अन्यथा त्या घटनेला "मला आठवतंय म्हणून" एवढाच आधार राहील, आणि ते ज्ञानकोशीय मानक नव्हे. तसंच, उद्या रामदासकाकांचा लेख वापरून विकीने "डालडा"ची एन्ट्री दुरुस्त केली, तर तेही मानकात बसणार नाही.

In reply to by आदूबाळ

माहितगार Sun, 01/15/2017 - 15:23
लेखन कुठे आहे हा माझ्यामते प्रश्न नाही. ते मूळ लेखन पुरेसं अललित आणि संदर्भसंपृक्त आहे का हा प्रश्न आहे.
अगदी सहमत आहे. अर्थात माध्यम साधनांच्या उपलब्धतेच्या असमतोल, तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांची सहज उपलब्धता असलेल्या गटातला व्यक्तिची उल्लेखनियता कशी स्विकारावी अथवा नाकारावी या सबंधाने समस्या उपस्थित होतात. काल रात्रीच मानस मादरेचा नावाच्या युवकाच्या विकिंवरील लेखाकडे लक्ष वेधले गेले. महाविद्यालयांमध्ये अनेक विद्यार्थी प्रतिनिधी असतात त्यातला एक ! सोबत हिंदीतन चारोळ्या लिहितो आणि त्याच पुन्हा इंग्रजीत अनुवाद करतो. त्याचे विद्यार्थी प्रतिनिधी असणे आणि कवितांची ब्लॉगस फेसबुक इत्यादीत नोंद आहे. सोबतीला महाविद्यालयातील सामान्य काव्यसंमेलनालाही टाईम्स ऑफ इंडीया वृत्तात सहज जागा मिळाली. एखाद्या युवकाने स्वतःला पुढे पुढे करणे काही गुन्हा नाही, माध्यमात जागा सहज मिळाली पण इतर असंख्य विद्यार्थी प्रतिनिधी अथवा असंख्य कविंच्या मांदियाळीत वेगळेपण उठून दिसावे ज्ञानकोशीय दखल घ्यावी असे काही नाही. संदर्भाची उपलब्धता मात्र सहज झालेली. म्हणूनच ब्लॉगसारख्या माध्यमातून प्रकाशात रहाणारा पण काही ज्ञानकोशासाठी विशेषत्व नसलेली आणि ज्ञानकोशासाठी विशेषत्व असलेली या व्यक्तिंमध्ये अथवा मजकुरात फरक कसे करावयाचे , किंवा निकष काय असावेत.

In reply to by माहितगार

आदूबाळ Sun, 01/15/2017 - 22:26
"जगावेगळं काहीतरी करणं" हा ज्ञानकोशीय उल्लेखाचा निकष असला पाहिजे. उदा० हजारो मराठी माणसं आजवर नेदरलँड्समध्ये गेली असावीत. पण डच प्रसारमाध्यमांत पानिपतविषयी काय बातमी आली हे शोधायचं फक्त बॅटमॅनच्या डोक्यात आलं. तस्मात ज्ञानकोशीय दखल घ्यायला तो योग्य माणूस आहे. हजारो मराठी माणसं कथा लिहितात. मीही अधूनमधून लिहितो. यात काय नवल? त्यामुळे माझी दखल घ्यायचं कारण नाही.

पैसा Sat, 01/14/2017 - 11:08
या चर्चा धाग्याच्या माध्यमातून कोणत्या ब्लॉग्स लेखांचे मिसळपावसारख्या चर्चा फोरम्सवरुन मुल्यांकन व्हावे असे तुम्हाला वाटते ? ब्लॉग्सचे लेखवार तटस्थ साक्षेपी मुल्यांकन, समिक्षण कसे करावे ? आणि त्यांच्या ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेसाठी कोणत्यास्वरुपाचे निकष लावावेत असे तुम्हाला वाटते ते जाणून घेणे आवडेल.
सगळेच वाचकाच्या आणि चर्चा करणार्‍याच्या मर्जीवर अवलंबून आणि व्यक्तिसापेक्ष आहे.

कंजूस Sat, 01/14/2017 - 21:24
लेख कुठेही असो,रोजनिशितल्या नोंदी असो त्यांतील विधानांवर आक्षेप घेतले जातीलच असे नसते. असं लेखकाचं मत आहे म्हणून सोडून दिलं जातं. परंतू काहीवेळा विरोधी प्रतिसाद /मतं मांडली गेली तर संदर्भ म्हणून वापरता येईल असा मजकूर बाहेर येईलच. काहीवेळा चमत्कार धरला जातो. ९९ लोकांनी त्यास आक्षेप घेतला नाही म्हणजे १००व्या मनुष्याच्या मतास कोण विचारतो? समजा मी बोरिवली अभयारण्यात फिरायला गेलो. खूप आतमध्ये एका बिबट्या समोर आला व त्याने मला काहीच केले नाही तर मी ती गोष्ट इतर कोणत्याही माझ्या शक्तीशी जोडू शकतो. योगविद्या ,संतपणा वगैरे. तर हा विकिसाठी संदर्भ ठरावा काय?
मिसळपाव, मायबोली अशा संस्थळांवर किंवा ब्लॉग्सवर कोणत्या विषयावर लेखनास सुरवात करावी या वर खुपशी बंधने नसतात. मराठी विकिपीडिया आणि मराठी विश्वकोश हे ज्ञानकोश आहेत. मराठी विश्वकोशासारख्या ज्ञानकोशात ज्ञानकोशीय नोंद लिहिणारा, समिक्षक आणि त्याचा संपादक कोण असेल यावरच पूर्वपात्रतेची गाळणी असते पण एकदा हे निकष पूर्ण करणार्‍या लेखकाने कोणते स्रोत वापरले यावरची बंधने अल्पशी शिथील होतात.