मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नसत्या उपद्व्यापांतून सुटका

उपयोजक ·

साहना 27/10/2020 - 23:57
जो पर्यंत लोकांनी स्वखुशीने विवाह केला आहे तो पर्यंत नवदांपत्यांना आम्ही शुभेच्छा देणे इतकेच आमच्या हातांत आहे. तिथे नावे ठेवून काहीही फायदा नाही. आपट्यांची राधिका हि इतर मुलींसारखी नाही. तिच्या रिटेनर वर असतील ४-५ वकील साहेब. आम्हाला तिची चिंता करायची गरज नाही.

कंजूस 28/10/2020 - 07:44
माझे बरेच छंद लहानपणी काही हेतू ठेवून सुरू केलेले नव्हते. ते अजूनही सुरू आहेत. आता मोठेपणी तुम्हाला तुमच्या छंदांत आवक / प्राप्ती किती हा प्रश्न पडलाय। पण छंदाला हा मुद्दाच गौण असतो. नंतर वाढत्या वयात घरातल्या तरुण वर्गाची अशी इच्छा असते की म्हातारे, ज्येषठ नागरिकांनी कशात तरी मन गुंतवावे ( आणि दिवसात दोन तीन तास बाहेर टळावे. अगदी देवदर्शनही यात मोडते. ) म्हणजे थोडक्यात सांगायचे तर वयापरत्वे छंदांचे लक्ष्य बदलते.

In reply to by कंजूस

उपयोजक 28/10/2020 - 11:22
छंदाला हा मुद्दाच गौण असतो. हो मान्य. पण य‍ा छंदाफंदापायी वेळ नि पैसा घालवणे हे काहीजणांना न परवडणारे असू शकते.

In reply to by उपयोजक

पण य‍ा छंदाफंदापायी वेळ नि पैसा घालवणे हे काहीजणांना न परवडणारे असू शकते.
ह्या गोष्टीला व्यसन म्हणतात. मुळात छंद ही फावल्या वेळेत करायची गोष्ट आहे आणि ह्याचा अर्थ ही दुय्यम गोष्ट आहे आणि जर इतर प्राथमिक गोष्टी ह्या दुय्यम गोष्टीमुळे कोलमडणार असतील तर असल्या छंदांकडे गांभीर्याने पाहायची गरज आहे.

"ते कायमचे किंवा निदान दीर्घकाळ तरी कसे बंद करता येतील? मनातून पूर्णपणे उतरावेत यासाठी काय करता येईल?" अंबानी ,अदानी ह्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावेत असे ह्यांचे मत. अगदीच जमले नाही तर शेजारच्या मिनी/सुपरमार्केट चालवणार्या मारवाडी दुकानदाराचा आदर्श ठेवावा. दुर्मिळ ग्रंथ,जगाचा ईतिहास्, दुसरे महायुद्ध,जर्मन पाणबुड्या,गांधी विरुद्ध सावरकर वगैरे वाचून काहीही आर्थिक फायदा होणार नसतो हे त्यांना लहानपणीच उमजलेले असते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

उपयोजक 28/10/2020 - 11:15
भारी! : ) खरंय. मारवाडी दुकानदार या बाबतीत आदर्श ठरावेत. ज्यातून आर्थिक फायदा नाही अशा गोष्टींपासून लांब राहण्याचे कौशल्य मारवाड्यांनी भारी जमवले आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

एखाद्या अस्सल राजस्थानी बनीयाच्या संगतीत रात्रं-दिवस रहा. काही दिवसात तुम्हाला प्रत्येक क्षणाचा पैसा करणं हेच जीवन सार्थक करण्याचं ऐकमेव ध्येय आहे असं वाटायला लागेल. एकदा आमचा सीए ग्रुप महाबळेश्वरला ट्रीपला गेला होता. सगळ्यांच्या कार्स, बरोबर दारु, भन्नाट अर्वाच्य गप्पा असा एकंदरीत महान कल्ला चालू होता. तीसर्‍या पॉइंटला गेल्यावर आमच्यातला एक बनीया ज्याम रेस्टलेस झाला; म्हणाला " भें... यात काय शा... बघण्यासारखं आहे ? हे सगळीकडून सारखंच दिसतंय. मला कुणीतरी एसटी स्टँडला सोडा, ऑफिसला जाऊन काम तरी संपवतो !"

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 29/10/2020 - 09:59
स्त्रीसंगाचा फक्त एकच उपयोग आहे, त्याला एक सेक्स टॉय असलेली बाहुली आणून द्या. किंवा २ रुपयात मिळणाऱ्या झोपेच्या गोळ्या द्या. बायकोवर होणार अफाट खर्च वाचेल.

In reply to by ताजे प्रेत

त्यामुळे ज्यातून अर्थ निष्पत्ती नाही त्यात अर्थ नाही या विचारानं तो पछाडलेला होता आणि अजूनही तसाच आहे. तुमचा गलिच्छ आयडी बघावा सुद्धा वाटत नाही. तो बदलला तरच इथून पुढे संवाद होईल. तुम्ही सुद्धा माझ्या लेखनावर किंवा प्रतिसादांवर उप-प्रतिसाद टाळलेत तर बरं.

सिरुसेरि 28/10/2020 - 21:13
विचार करायला भाग पाडणारा लेख . अनेक हौशी श्रीमंतांनी आपल्या ईस्टेटी या गाणे , शेरो शायरी अशा छंदांपायी उधळल्या आहेत . याबद्दलचेच "अशा शेरा पावशेरातच इस्टेटी गेल्या " हे एक गाजलेले वाक्य आठवले .

In reply to by सिरुसेरि

उपयोजक 30/10/2020 - 20:28
हा सुद्धा प्रचंड वेळ खाणारा छंद आहे असे बर्‍याच मिपाकरांचे मत अाहे असे जाणवले आहे.कितीतरी मिपाकर हे फेसबुक वापरतच नाहीत.किंवा फेबुवर असले तरी अनेक महिने किंवा वर्षे तिकडे फिरकलेलेच नाहीयेत.कारण काय? तर बहुतांशी एकच 'नॉन एंडिंग स्क्रोलिंग' त्यामुळे फेबुवर 'अडकून राहिले जाते' वर विविध जाहिरातींचा मारा.त्यांना बळी जाणे. हे सर्व टाळण्यासाठी फेबुच टाळले जाते.

कंजूस 29/10/2020 - 11:42
हो. इतिहासकारांनी वर्णनं लिहिली आहेत. दिल्लीत नाचणाऱ्यांच्या घराजवळचा रस्ता ट्राफिक जाम व्हायचा. सरदार उमरावांचे हत्ती पार्किंग मध्ये असत. हत्तीही जियचे आणि चालत घरी जायचे.

In reply to by रानरेडा

कंजूस 05/11/2020 - 05:47
तिकडे तिरप्या चालींचे उंटं चालत नाहीत. एक उमरावाने माणकांची खैरात कैली की त्यापेक्षा अधिक रत्नांची उधळण दुसरा करणार. ( म्हणजे असं लिहिलेलं मी वाचलंयय. मी तिथे नव्हतो.)

चौकटराजा 05/11/2020 - 09:37
खरेतर तात्त्विक पातळीवर यश ,कृतकृत्यता यांचे अगदी निरपेक्ष मूल्यमापन कठीण आहे. ! " मला आयुष्याकडून काय हवे याचे उत्तर माझे संचित व माझ्या परिसरातून माझ्यावर झालेले संस्कार ठरवीत असतात . सबब या प्रष्णाचे उत्तर प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकते नव्हे तसे ते असतेच ! दुसऱ्याना मी श्रीमंत वाटतो की नाही यापेक्षा मला मी श्रीमंत वाटतो की नाही हे महत्वाचे असते ! तुम्ही पैसा व छंद यांना आपल्या आयुष्यात कितपत महत्ता देता यावर तुमची श्रीमंतीची व्याख्या बदलत जाते. असा माझा तरी अनुभव आहे !

Jayant Naik 05/11/2020 - 10:10
" Man's Search for Meaning "By Viktor E. Frankl हे पुस्तक वाचा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. नित्झे म्हणतो तुम्ही का जगता याचे उत्तर तुमच्या कडे असेल तर तुम्ही कशाचाही सामना करू शकता. एखादा छंद किवा कला हि तुमच्या जीवनाचे कारण असू शकेल ....आणि ते करायला मिळावे म्हणून तुम्ही नोकरी किवा धंदा करत असाल .

माझ्याबद्दलचे माझे पूर्वग्रह/(मला असं वाटतं) : माझी दृश्यात्मक-बुद्धिमत्ता (विज्युअल इंटेलिजन्स) लहानपणापासून जास्त आहे. (उदा. उत्तम चित्रं काढता येणं, अगदी लहानपणीच आलेले मितींचे तारतम्य). त्यामुळे मी आधीपासूनच उत्तम स्केचेस, पोट्रेट्स करत असे. (परंतु कलात्मक जाण खूप उशीरा म्हणजे आठवी-नववीपासून यायला लागली.) रूढार्थाने स्कॉलर म्हणून पाव्हण्यारावळ्यांच्यात कोडकौतुक होत असे. म्हणजे मी अभ्यासू, विविध-गुण-दर्शन-छाप, आताच्या भाषेत नर्ड म्हणता येईल असा बहुतांश घरकोंबडा वाढलो आहे. तरीही बेताची परिस्थिती असल्याने ह्या गोष्टी जाता जाता करण्यासाठीच होत्या. संगीताची काही विशेष आवड आधीपासून नव्हती. आताही मला संगीतात नॉस्टॅल्जिक प्रकारची वगळता फारशी रूची नाही. माझ्यात भाषिक-बुद्धिमत्ता जन्मजात असावी. परंतु तिला योग्य असे वातावरण मिळाले नाही. शाळेची लायब्ररी मोठी असली तरी ती मी शिक्षक नसल्यामुळे मला कधीही खुली झाली नाही (निमशहरी आणि ग्रामीण माध्यमिक शाळांमध्ये बहुतांशी असेच चित्र असते, शोभेची/प्रतिबंधित वाचनालये). वाचन मुख्यत्त्वे पुढारी वर्तमानपत्र आणि पुरवण्या. आपल्या 'लिहावसं' वाटतं आणि साहित्य हे मराठीच्या धड्यांपुरतं मर्यादित नाही हे पहिल्यांदा जाणवलं जी.एंची राणी ही कथा मराठीच्या पुस्तकात वाचल्यावर. सध्या मी काय करतो - चित्रकलेच्या वाट्याला जायचे नाही हे शाळेतल्या चित्रकलेच्या सरांच्या दयनीय आयुष्यावरून आधीच ठरवले होते. उत्तम पैसे लवकर कमवणे ही प्राथमिक गरज राहिल्याने मेडिकलला प्रवेश मिळूनही इंजिनिअरिंग केले. सल्ले द्यायलासुद्धा आसपास लायकीचे लोक नव्हते हे एका अर्थी बरेच झाले म्हणायचे. नो रिग्रेट्स. साहित्यिक मूल्य असलेलं लिहिण्याचा गंभीरपणे प्रयत्न करतो. माझी गृहीतके अर्थात तत्त्वाच्या बाता - आपल्याइथे कलेचा ॲप्टीट्यूड जन्माला घेऊन येणे ही तीव्र फरफट असते. पहिलं म्हणजे स्वतःशी सतत होणारं आणि खूपदा मानसिक थकवा देणारं द्वंद्व. दुसरं म्हणजे मुलुखाशी झगडा. कलानिर्मितीतून येणारी कामपूर्ती ही नशीली आणि निरोगी व्यसन लावणारी असते. त्यासाठी मात्र खूप कष्ट करावे लागतात. शिवाय ती वेळखाऊ प्रक्रिया असते. तथ्याच्या बाता - तुम्ही जो इतरत्र प्रतिसाद दिला आहे तोच इथे संदर्भासाठी पुन्हा लिहितो. साहित्याच्या बाबतीच म्हणायचे तर, लेखन करून जगता येणं हे कोणत्याही भारतीय भाषेत शक्य नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात लेखनावर जीवितासाठी अवलंबून असणाऱ्यांचे प्रमाण जवळजवळ शून्य आहे. काही प्रमाणात आता संधी आहे परंतु तिथे कसलेही स्थैर्य नाही. शिवाय मराठीसारख्या बोलीभाषेत लिहिणे म्हणजे पायावर कुऱ्हाड मारून घेणे आहे. (निक टीव्हीवर जे कार्टून लागतात ते आता मराठीतही उपलब्ध असतात. माझी मराठी माध्यमात शिकणारी लहान भाचरे/पुतणे कार्टूनची हिंदी भाषा बदलू देत नाहीत. कारण त्यातली मराठी ही त्यांना हिंदीपेक्षा अवघड वाटते. महाराष्ट्रातली बहुतेक मुलं मराठीपासून, विशेषतः लेखनापासून दुरावत चालली आहेत. कारण- मराठी मोबाईलवर/कामासाठी टाईप करणं येत नाही. त्यापेक्षा रोमन लिपित टाईप करणं सोप्पं असतं. आणि सेमी इंग्लिशमुळं झालेलं भजं.) त्यामुळे जेव्हा रोजीरोटीचा प्रश्न निकालात निघाल्यावर लेखनाकडे यावे हे बरं. आता, जरी तुम्ही रोजीरोटीचा प्रश्न सोडवून गंभीर मराठी लेखनाकडे वळलात तरी ज्येष्ठ नागरिक सोडल्यास कुणीही तुमचं वाचणार नाही. बहुतांशी वाचणाऱ्या लोकांना पुलं वपु शिवाजी सावंत सात पिढ्या पुरतात. ही पिढी पुढच्या साथीपर्यंत जवळ जवळ संपून जाईल. सध्याची कॉलेजकार्टी विश्वास नांगरे पाटील छाप सोडून काहीही वाचायला तयार नाही. साहित्यिक मराठी वाचन हे तसलंच लिहिणाऱ्या लेखकांपुरतंच मर्यादित राहिल. हे ओलांडून तुम्ही स्वांतसुखाय लेखन करायला गेलात तरीदेखील तुम्हाला तुमच्याशीच झगडत बसावं लागतंच. हा झगडादेखील तुम्हाला मान्य असेल आणि तो तुमच्या कौटुंबिक, आर्थिक स्थैर्याला अहितकारक नसेल तर मग कोणताही छंद जोपासायला काहीच अडचण नाही. त्यातून मिळणारा आनंद नेहमीच मोजता येण्यासारखा नसतो आणि तो खूपदा मानसिक स्वास्थ्यासाठी पोषक असतो. म्हणजे छंद टिकवण्याचा प्रमुख निकष - कौटुंबिक, आर्थिक आणि मानसिक स्थैर्याला अहितकारक नसावा. (शारिरिक आरोग्याला अहितकारक असलेला छंदही यात जमेस धरावा). हा निकष मानायचाच नसेल तर बेफिकीरी आणि वेडेपणा कोणताही छंद तोलू शकतात. फक्त इतकंच, त्या छंदातलं ॲप्टीट्यूड हवं. हे करतो : म्हणून मी लेखन हा छंद माझ्या कुटुंबापासून लपवून वेळ मिळेल तेव्हाच आणि इतर व्यवधानं नसतील तेव्हाच पण पूर्ण मन लावून जोपासतो. आणि बाकीचा वेळ व्यवस्थित वापरला तर वर्षातून एखादा आठवडा पूर्ण मोकळा मिळतोही. तेव्हढा मी पुरेसा मानला आहे. ही तारेवरची कसरत जेव्हा जमणार नाही तेव्हा ते मी कोणत्याही पश्चातापाशिवाय लेखन बंद करेन. मला पॅराग्लाईडिंगचा अतिशय खर्चिक असा अजून एक छंद आहे. परंतू तो माझ्या कौटुंबिक, आर्थिक आणि मानसिक स्थैर्याच्या आड येत नाही म्हणून मला तो करणे परवडते. तरीही, संधीची अनुपलब्धता आणि नैसर्गिक मर्यांदांमुळे त्याच्यावर अंकुश आहेच. बेसुमार परदेशी चित्रपट पाहणे, बिंज वॉचिंग, फिल्म फेस्टिवल्स, कलावंत मित्रांशी जवळीक, टोकाचे जपानप्रेम इत्यादी गोष्टी वेळखाऊ आणि पैसाखाऊ होत्या. त्या सध्या मी पूर्णपणे बंद केल्या आहेत. फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम, ट्विटर इत्यादी सामाजिक माध्यमे मी वापरत नाही. त्याऐवजी जास्तीत जास्त moocs करणे, करियरला साहाय्यभूत होतील अशा गोष्टी करणे उदा. github प्रोफाईल सुस्थितीत ठेवणे, विविध परीक्षा देत राहणे, ज्या परदेशी भाषेचा करियरला उपयोग नाही त्या भाषेच्या वाट्याला न जाणे इत्यादी गोष्टी आवर्जून करतो. कोणत्याही प्रकारच्या बातम्या पाहत नाही, वर्तमानपत्रं वाचत नाही, टीव्ही पूर्णपणे बंद केलेली आहे. परस्पर कानावर आलेली बातमी पूर्णपणे सत्य मानतो. मिसळपाव आठवड्यातून एखादवेळेस नजरेखालून घालतो. क्वचित प्रतिसाद देतो. त्यासाठी सुद्धा लीचब्लॉकसारखी प्लगिन लावलेली आहेत. सर्व प्रकारचे सामाजिक वादविवाद टाळतो. कारण त्यातून फक्त आणि फक्त वेळेचा अपव्यय आणि मनस्ताप इतकंच होतं. क्वचित रेडिट वरती हवी ती माहिती विचारतो. लेखनासाठी आणि कामासाठी मात्र इंटरनेट भरपूर वापरतो.

साहना 27/10/2020 - 23:57
जो पर्यंत लोकांनी स्वखुशीने विवाह केला आहे तो पर्यंत नवदांपत्यांना आम्ही शुभेच्छा देणे इतकेच आमच्या हातांत आहे. तिथे नावे ठेवून काहीही फायदा नाही. आपट्यांची राधिका हि इतर मुलींसारखी नाही. तिच्या रिटेनर वर असतील ४-५ वकील साहेब. आम्हाला तिची चिंता करायची गरज नाही.

कंजूस 28/10/2020 - 07:44
माझे बरेच छंद लहानपणी काही हेतू ठेवून सुरू केलेले नव्हते. ते अजूनही सुरू आहेत. आता मोठेपणी तुम्हाला तुमच्या छंदांत आवक / प्राप्ती किती हा प्रश्न पडलाय। पण छंदाला हा मुद्दाच गौण असतो. नंतर वाढत्या वयात घरातल्या तरुण वर्गाची अशी इच्छा असते की म्हातारे, ज्येषठ नागरिकांनी कशात तरी मन गुंतवावे ( आणि दिवसात दोन तीन तास बाहेर टळावे. अगदी देवदर्शनही यात मोडते. ) म्हणजे थोडक्यात सांगायचे तर वयापरत्वे छंदांचे लक्ष्य बदलते.

In reply to by कंजूस

उपयोजक 28/10/2020 - 11:22
छंदाला हा मुद्दाच गौण असतो. हो मान्य. पण य‍ा छंदाफंदापायी वेळ नि पैसा घालवणे हे काहीजणांना न परवडणारे असू शकते.

In reply to by उपयोजक

पण य‍ा छंदाफंदापायी वेळ नि पैसा घालवणे हे काहीजणांना न परवडणारे असू शकते.
ह्या गोष्टीला व्यसन म्हणतात. मुळात छंद ही फावल्या वेळेत करायची गोष्ट आहे आणि ह्याचा अर्थ ही दुय्यम गोष्ट आहे आणि जर इतर प्राथमिक गोष्टी ह्या दुय्यम गोष्टीमुळे कोलमडणार असतील तर असल्या छंदांकडे गांभीर्याने पाहायची गरज आहे.

"ते कायमचे किंवा निदान दीर्घकाळ तरी कसे बंद करता येतील? मनातून पूर्णपणे उतरावेत यासाठी काय करता येईल?" अंबानी ,अदानी ह्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावेत असे ह्यांचे मत. अगदीच जमले नाही तर शेजारच्या मिनी/सुपरमार्केट चालवणार्या मारवाडी दुकानदाराचा आदर्श ठेवावा. दुर्मिळ ग्रंथ,जगाचा ईतिहास्, दुसरे महायुद्ध,जर्मन पाणबुड्या,गांधी विरुद्ध सावरकर वगैरे वाचून काहीही आर्थिक फायदा होणार नसतो हे त्यांना लहानपणीच उमजलेले असते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

उपयोजक 28/10/2020 - 11:15
भारी! : ) खरंय. मारवाडी दुकानदार या बाबतीत आदर्श ठरावेत. ज्यातून आर्थिक फायदा नाही अशा गोष्टींपासून लांब राहण्याचे कौशल्य मारवाड्यांनी भारी जमवले आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

एखाद्या अस्सल राजस्थानी बनीयाच्या संगतीत रात्रं-दिवस रहा. काही दिवसात तुम्हाला प्रत्येक क्षणाचा पैसा करणं हेच जीवन सार्थक करण्याचं ऐकमेव ध्येय आहे असं वाटायला लागेल. एकदा आमचा सीए ग्रुप महाबळेश्वरला ट्रीपला गेला होता. सगळ्यांच्या कार्स, बरोबर दारु, भन्नाट अर्वाच्य गप्पा असा एकंदरीत महान कल्ला चालू होता. तीसर्‍या पॉइंटला गेल्यावर आमच्यातला एक बनीया ज्याम रेस्टलेस झाला; म्हणाला " भें... यात काय शा... बघण्यासारखं आहे ? हे सगळीकडून सारखंच दिसतंय. मला कुणीतरी एसटी स्टँडला सोडा, ऑफिसला जाऊन काम तरी संपवतो !"

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 29/10/2020 - 09:59
स्त्रीसंगाचा फक्त एकच उपयोग आहे, त्याला एक सेक्स टॉय असलेली बाहुली आणून द्या. किंवा २ रुपयात मिळणाऱ्या झोपेच्या गोळ्या द्या. बायकोवर होणार अफाट खर्च वाचेल.

In reply to by ताजे प्रेत

त्यामुळे ज्यातून अर्थ निष्पत्ती नाही त्यात अर्थ नाही या विचारानं तो पछाडलेला होता आणि अजूनही तसाच आहे. तुमचा गलिच्छ आयडी बघावा सुद्धा वाटत नाही. तो बदलला तरच इथून पुढे संवाद होईल. तुम्ही सुद्धा माझ्या लेखनावर किंवा प्रतिसादांवर उप-प्रतिसाद टाळलेत तर बरं.

सिरुसेरि 28/10/2020 - 21:13
विचार करायला भाग पाडणारा लेख . अनेक हौशी श्रीमंतांनी आपल्या ईस्टेटी या गाणे , शेरो शायरी अशा छंदांपायी उधळल्या आहेत . याबद्दलचेच "अशा शेरा पावशेरातच इस्टेटी गेल्या " हे एक गाजलेले वाक्य आठवले .

In reply to by सिरुसेरि

उपयोजक 30/10/2020 - 20:28
हा सुद्धा प्रचंड वेळ खाणारा छंद आहे असे बर्‍याच मिपाकरांचे मत अाहे असे जाणवले आहे.कितीतरी मिपाकर हे फेसबुक वापरतच नाहीत.किंवा फेबुवर असले तरी अनेक महिने किंवा वर्षे तिकडे फिरकलेलेच नाहीयेत.कारण काय? तर बहुतांशी एकच 'नॉन एंडिंग स्क्रोलिंग' त्यामुळे फेबुवर 'अडकून राहिले जाते' वर विविध जाहिरातींचा मारा.त्यांना बळी जाणे. हे सर्व टाळण्यासाठी फेबुच टाळले जाते.

कंजूस 29/10/2020 - 11:42
हो. इतिहासकारांनी वर्णनं लिहिली आहेत. दिल्लीत नाचणाऱ्यांच्या घराजवळचा रस्ता ट्राफिक जाम व्हायचा. सरदार उमरावांचे हत्ती पार्किंग मध्ये असत. हत्तीही जियचे आणि चालत घरी जायचे.

In reply to by रानरेडा

कंजूस 05/11/2020 - 05:47
तिकडे तिरप्या चालींचे उंटं चालत नाहीत. एक उमरावाने माणकांची खैरात कैली की त्यापेक्षा अधिक रत्नांची उधळण दुसरा करणार. ( म्हणजे असं लिहिलेलं मी वाचलंयय. मी तिथे नव्हतो.)

चौकटराजा 05/11/2020 - 09:37
खरेतर तात्त्विक पातळीवर यश ,कृतकृत्यता यांचे अगदी निरपेक्ष मूल्यमापन कठीण आहे. ! " मला आयुष्याकडून काय हवे याचे उत्तर माझे संचित व माझ्या परिसरातून माझ्यावर झालेले संस्कार ठरवीत असतात . सबब या प्रष्णाचे उत्तर प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकते नव्हे तसे ते असतेच ! दुसऱ्याना मी श्रीमंत वाटतो की नाही यापेक्षा मला मी श्रीमंत वाटतो की नाही हे महत्वाचे असते ! तुम्ही पैसा व छंद यांना आपल्या आयुष्यात कितपत महत्ता देता यावर तुमची श्रीमंतीची व्याख्या बदलत जाते. असा माझा तरी अनुभव आहे !

Jayant Naik 05/11/2020 - 10:10
" Man's Search for Meaning "By Viktor E. Frankl हे पुस्तक वाचा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. नित्झे म्हणतो तुम्ही का जगता याचे उत्तर तुमच्या कडे असेल तर तुम्ही कशाचाही सामना करू शकता. एखादा छंद किवा कला हि तुमच्या जीवनाचे कारण असू शकेल ....आणि ते करायला मिळावे म्हणून तुम्ही नोकरी किवा धंदा करत असाल .

माझ्याबद्दलचे माझे पूर्वग्रह/(मला असं वाटतं) : माझी दृश्यात्मक-बुद्धिमत्ता (विज्युअल इंटेलिजन्स) लहानपणापासून जास्त आहे. (उदा. उत्तम चित्रं काढता येणं, अगदी लहानपणीच आलेले मितींचे तारतम्य). त्यामुळे मी आधीपासूनच उत्तम स्केचेस, पोट्रेट्स करत असे. (परंतु कलात्मक जाण खूप उशीरा म्हणजे आठवी-नववीपासून यायला लागली.) रूढार्थाने स्कॉलर म्हणून पाव्हण्यारावळ्यांच्यात कोडकौतुक होत असे. म्हणजे मी अभ्यासू, विविध-गुण-दर्शन-छाप, आताच्या भाषेत नर्ड म्हणता येईल असा बहुतांश घरकोंबडा वाढलो आहे. तरीही बेताची परिस्थिती असल्याने ह्या गोष्टी जाता जाता करण्यासाठीच होत्या. संगीताची काही विशेष आवड आधीपासून नव्हती. आताही मला संगीतात नॉस्टॅल्जिक प्रकारची वगळता फारशी रूची नाही. माझ्यात भाषिक-बुद्धिमत्ता जन्मजात असावी. परंतु तिला योग्य असे वातावरण मिळाले नाही. शाळेची लायब्ररी मोठी असली तरी ती मी शिक्षक नसल्यामुळे मला कधीही खुली झाली नाही (निमशहरी आणि ग्रामीण माध्यमिक शाळांमध्ये बहुतांशी असेच चित्र असते, शोभेची/प्रतिबंधित वाचनालये). वाचन मुख्यत्त्वे पुढारी वर्तमानपत्र आणि पुरवण्या. आपल्या 'लिहावसं' वाटतं आणि साहित्य हे मराठीच्या धड्यांपुरतं मर्यादित नाही हे पहिल्यांदा जाणवलं जी.एंची राणी ही कथा मराठीच्या पुस्तकात वाचल्यावर. सध्या मी काय करतो - चित्रकलेच्या वाट्याला जायचे नाही हे शाळेतल्या चित्रकलेच्या सरांच्या दयनीय आयुष्यावरून आधीच ठरवले होते. उत्तम पैसे लवकर कमवणे ही प्राथमिक गरज राहिल्याने मेडिकलला प्रवेश मिळूनही इंजिनिअरिंग केले. सल्ले द्यायलासुद्धा आसपास लायकीचे लोक नव्हते हे एका अर्थी बरेच झाले म्हणायचे. नो रिग्रेट्स. साहित्यिक मूल्य असलेलं लिहिण्याचा गंभीरपणे प्रयत्न करतो. माझी गृहीतके अर्थात तत्त्वाच्या बाता - आपल्याइथे कलेचा ॲप्टीट्यूड जन्माला घेऊन येणे ही तीव्र फरफट असते. पहिलं म्हणजे स्वतःशी सतत होणारं आणि खूपदा मानसिक थकवा देणारं द्वंद्व. दुसरं म्हणजे मुलुखाशी झगडा. कलानिर्मितीतून येणारी कामपूर्ती ही नशीली आणि निरोगी व्यसन लावणारी असते. त्यासाठी मात्र खूप कष्ट करावे लागतात. शिवाय ती वेळखाऊ प्रक्रिया असते. तथ्याच्या बाता - तुम्ही जो इतरत्र प्रतिसाद दिला आहे तोच इथे संदर्भासाठी पुन्हा लिहितो. साहित्याच्या बाबतीच म्हणायचे तर, लेखन करून जगता येणं हे कोणत्याही भारतीय भाषेत शक्य नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात लेखनावर जीवितासाठी अवलंबून असणाऱ्यांचे प्रमाण जवळजवळ शून्य आहे. काही प्रमाणात आता संधी आहे परंतु तिथे कसलेही स्थैर्य नाही. शिवाय मराठीसारख्या बोलीभाषेत लिहिणे म्हणजे पायावर कुऱ्हाड मारून घेणे आहे. (निक टीव्हीवर जे कार्टून लागतात ते आता मराठीतही उपलब्ध असतात. माझी मराठी माध्यमात शिकणारी लहान भाचरे/पुतणे कार्टूनची हिंदी भाषा बदलू देत नाहीत. कारण त्यातली मराठी ही त्यांना हिंदीपेक्षा अवघड वाटते. महाराष्ट्रातली बहुतेक मुलं मराठीपासून, विशेषतः लेखनापासून दुरावत चालली आहेत. कारण- मराठी मोबाईलवर/कामासाठी टाईप करणं येत नाही. त्यापेक्षा रोमन लिपित टाईप करणं सोप्पं असतं. आणि सेमी इंग्लिशमुळं झालेलं भजं.) त्यामुळे जेव्हा रोजीरोटीचा प्रश्न निकालात निघाल्यावर लेखनाकडे यावे हे बरं. आता, जरी तुम्ही रोजीरोटीचा प्रश्न सोडवून गंभीर मराठी लेखनाकडे वळलात तरी ज्येष्ठ नागरिक सोडल्यास कुणीही तुमचं वाचणार नाही. बहुतांशी वाचणाऱ्या लोकांना पुलं वपु शिवाजी सावंत सात पिढ्या पुरतात. ही पिढी पुढच्या साथीपर्यंत जवळ जवळ संपून जाईल. सध्याची कॉलेजकार्टी विश्वास नांगरे पाटील छाप सोडून काहीही वाचायला तयार नाही. साहित्यिक मराठी वाचन हे तसलंच लिहिणाऱ्या लेखकांपुरतंच मर्यादित राहिल. हे ओलांडून तुम्ही स्वांतसुखाय लेखन करायला गेलात तरीदेखील तुम्हाला तुमच्याशीच झगडत बसावं लागतंच. हा झगडादेखील तुम्हाला मान्य असेल आणि तो तुमच्या कौटुंबिक, आर्थिक स्थैर्याला अहितकारक नसेल तर मग कोणताही छंद जोपासायला काहीच अडचण नाही. त्यातून मिळणारा आनंद नेहमीच मोजता येण्यासारखा नसतो आणि तो खूपदा मानसिक स्वास्थ्यासाठी पोषक असतो. म्हणजे छंद टिकवण्याचा प्रमुख निकष - कौटुंबिक, आर्थिक आणि मानसिक स्थैर्याला अहितकारक नसावा. (शारिरिक आरोग्याला अहितकारक असलेला छंदही यात जमेस धरावा). हा निकष मानायचाच नसेल तर बेफिकीरी आणि वेडेपणा कोणताही छंद तोलू शकतात. फक्त इतकंच, त्या छंदातलं ॲप्टीट्यूड हवं. हे करतो : म्हणून मी लेखन हा छंद माझ्या कुटुंबापासून लपवून वेळ मिळेल तेव्हाच आणि इतर व्यवधानं नसतील तेव्हाच पण पूर्ण मन लावून जोपासतो. आणि बाकीचा वेळ व्यवस्थित वापरला तर वर्षातून एखादा आठवडा पूर्ण मोकळा मिळतोही. तेव्हढा मी पुरेसा मानला आहे. ही तारेवरची कसरत जेव्हा जमणार नाही तेव्हा ते मी कोणत्याही पश्चातापाशिवाय लेखन बंद करेन. मला पॅराग्लाईडिंगचा अतिशय खर्चिक असा अजून एक छंद आहे. परंतू तो माझ्या कौटुंबिक, आर्थिक आणि मानसिक स्थैर्याच्या आड येत नाही म्हणून मला तो करणे परवडते. तरीही, संधीची अनुपलब्धता आणि नैसर्गिक मर्यांदांमुळे त्याच्यावर अंकुश आहेच. बेसुमार परदेशी चित्रपट पाहणे, बिंज वॉचिंग, फिल्म फेस्टिवल्स, कलावंत मित्रांशी जवळीक, टोकाचे जपानप्रेम इत्यादी गोष्टी वेळखाऊ आणि पैसाखाऊ होत्या. त्या सध्या मी पूर्णपणे बंद केल्या आहेत. फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम, ट्विटर इत्यादी सामाजिक माध्यमे मी वापरत नाही. त्याऐवजी जास्तीत जास्त moocs करणे, करियरला साहाय्यभूत होतील अशा गोष्टी करणे उदा. github प्रोफाईल सुस्थितीत ठेवणे, विविध परीक्षा देत राहणे, ज्या परदेशी भाषेचा करियरला उपयोग नाही त्या भाषेच्या वाट्याला न जाणे इत्यादी गोष्टी आवर्जून करतो. कोणत्याही प्रकारच्या बातम्या पाहत नाही, वर्तमानपत्रं वाचत नाही, टीव्ही पूर्णपणे बंद केलेली आहे. परस्पर कानावर आलेली बातमी पूर्णपणे सत्य मानतो. मिसळपाव आठवड्यातून एखादवेळेस नजरेखालून घालतो. क्वचित प्रतिसाद देतो. त्यासाठी सुद्धा लीचब्लॉकसारखी प्लगिन लावलेली आहेत. सर्व प्रकारचे सामाजिक वादविवाद टाळतो. कारण त्यातून फक्त आणि फक्त वेळेचा अपव्यय आणि मनस्ताप इतकंच होतं. क्वचित रेडिट वरती हवी ती माहिती विचारतो. लेखनासाठी आणि कामासाठी मात्र इंटरनेट भरपूर वापरतो.
प्रेरणास्थान: http://www.misalpav.com/node/47778 सदर धाग्यावरुन सुचल्याने आभार मानतो. आता मला माझ्याच एका प्रॉब्लेमबद्दल कोणी मदत करु शकेल का पहा. सदर धाग्यात गायनकला चांगली नसणार्‍यांचे स्वानंदासाठी गायन याबद्दल लिहिले आहे.ही कला माझ्याकडेही आहे.म्हणजे मलाही गायनाची आवड आहे.गाणी गुणगुणायला आवडतात.याउप्पर शीळही चांगली घालतो.यासोबतच मला चित्रेदेखील चांगली काढता येतात.कागदापासून विविध वस्तू बनवतो. सिद्धहस्त लेखक नसलो आणि लेखनाला साहित्यिक दर्जा नसला तरी स्वानंदासाठी लिहितो.विविध भारतीय भाषा शिकतो.मराठी भाषा शिकायला कोणी परप्रांतीय इच्छुक असेल तर त्यांना मला जमेल तितकी शिकवतोसुद्धा.

ओढ....

उपयोजक ·

ट्रेड मार्क 14/02/2019 - 06:37
प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. स्वभाव, आवडनिवड, कलागुण भिन्न असणारच. अनुवांशिकता हा घटक यात महत्वाची भुमिका बजावतो. असं वाटत नाही कारण चांगल्या प्रथितयश कलाकारांची वा खेळाडूंची अपत्ये मात्र त्या त्या क्षेत्रात चमकताना फार कमी दिसतात. त्या मुलांना कदाचित लहानपणापासून आई किंवा वडील जी कला सादर करतात किंवा जे खेळतात ते बघून थोडीफार आवड निर्माण होणे पर्यंत ठीक आहे. पण त्याच क्षेत्रात आई किंवा वडिलांइतकी वा जास्त प्रगती फार थोडी अपत्ये करतात. एकाआड एक पिढी हुशार असते असं म्हणतात. पण हीच अोढ,आवड बाह्य साधनांद्वारा निर्माण करता येईल का? माझ्या मते असे करता येणार नाही. अजून तरी माणसाच्या वृत्तीमध्ये किंवा नैसर्गिक जडणघडणीमध्ये बाहेरून फेरफार करता येतील असे तंत्र नाहीये असं मला वाटतं. पुढेमागे जरी हे साध्य झालं तरी नैसर्गिकरित्या जे मिळालं आहे त्याइतकं कृत्रिमरित्या टाकलेलं करेल असं वाटत नाही.

In reply to by ट्रेड मार्क

जालिम लोशन 18/02/2019 - 14:17
त्या साठी Genetics बद्दल थोडी बहुत माहिती असायला हवी. ह्यामधे जनुके software सारखे काम करतात. जरूरी नाही ते लगेच पुढच्पा पिढी मधे express होतील. काही पिढ्यांनंतर सुध्दा ती express होतात. अनेक factor त्पासाठी काम करत असतात. ति एक स्वतंत्र विज्ञानाची शाखा आहे.

उपयोजक 14/02/2019 - 10:00
असं वाटत नाही कारण चांगल्या प्रथितयश कलाकारांची वा खेळाडूंची अपत्ये मात्र त्या त्या क्षेत्रात चमकताना फार कमी दिसतात. बापाइतकाच मुलगा गुणी असला पाहिजे अशी अपेक्षा असेल तर चमक फारशी दिसणार नाही.शिवाय बापाने जितक्या अोढीने,तळमळीने केलं असेल तेवढी मुलाकडे नसेल हेसुद्धा पहायला हवं.मुलगा स्वत:चेदेखील काही गुणअवगुण घेऊन येणारच ना? १.रोहन गावस्कर सुनिल गावस्करइतका प्रतिभावान नाही. २.याउलट आईन्सटाईन मात्र त्याच्या गणितज्ञ वडीलांच्या तुलनेत कैकपट अधिक हुशार निघाला. रोहनची तुलना सुनिलशी झाली तर तो अपयशी ठरणारंच.पण रोहन इतका वाईट क्रिकेट खेळतो का की त्याची दखलसुद्धा घेऊ नये? तो इतका वाईट क्रिकेट खेळतो का?

In reply to by उपयोजक

ट्रेड मार्क 14/02/2019 - 20:16
सुनिल गावस्कर - रोहन गावस्कर किंवा अमिताभ बच्चन - अभिषेक बच्चन मी स्वतः रोहन ला कधीच खेळताना बघितलं नाहीये, त्यामुळे तो किती प्रतिभावान आहे हे सांगता येणार नाही. पण अमिताभ आणि अभिषेक दोघांनाही काम करताना बघितलेलं आहे. माझ्या मते तरी अभिषेक बऱ्यापैकी अभिनेता आहे पण कदाचित वडिलांबरोबरच्या तुलनेमुळे तो मागे पडला असावा असं वाटतं. पण परत प्रश्न तोच आहे ना की जर अनुवांशिकरित्या कलाकार होणं त्याच्याकडे आलं असेल तर मग त्याने स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करायला पाहिजे होतं. पण मग अभिनयातच का? हरिवंशराय बच्चन कवी होते पण अमिताभ मात्र अभिनेता आहे. कदाचित अभिषेककडे दुसरी कुठलीतरी कला असेल, जी त्याने एक्सप्लोर केलीच नाहीये! हे गणित धंद्याच्या बाबतीत थोडं वेगळं आहे. जर तरुण मुलाने पिढीजात धंदा पुढे चालू ठेवायचे म्हणले तर त्याला आयता सेटअप मिळतो. आहे ते पुढे चालू ठेवायचे किंवा वाढवायचे ते त्या मुलाच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे. पण सर्वसाधारणपणे असं दिसून आलं आहे की फारसे कष्ट न करता मिळालेल्या गोष्टीची कदर सहसा नसते. याउलट आईन्सटाईन मात्र त्याच्या गणितज्ञ वडीलांच्या तुलनेत कैकपट अधिक हुशार निघाला एकाआड एक पिढीचे लॉजिक लागू झालेलं दिसतंय. पण आपल्याला आईन्स्टाईनच्या आजोबांबद्दल काहीच माहिती नाही. मला तर त्यापेक्षाही मोठा प्रश्न पडलाय. इथे तुम्ही ज्यांना आपला कल कुठे आहे ते समजलंय अश्यांबद्दल बोलताय, पण बहुसंख्य जनता अशी आहे की त्यांना स्वतःचा कल कळतच नाही. अश्यांचं काय? कदाचित आईन्स्टाईनचे वडील आईन्स्टाईनपेक्षाही हुशार असू शकतील पण त्यांना तशी संधी मिळाली नसेल किंवा योग्य परिस्थिती मिळाली नसेल तर? कदाचित गणित त्यांना आवडतही नसेल पण वडिलांनी म्हणा किंवा इतर कोणी अर्धवट कळत्या वयात सांगितल्यामुळे त्यांनी गणित निवडला पण त्यांची आवड दुसरीच असेल तर?

In reply to by ट्रेड मार्क

हेमंतकुमार 09/03/2019 - 20:05
आइन्स्टाइन यांचे एक वचन फार छान आहे.त्याचा मथितार्थ असा: जगातील प्रत्येक जणच अलौकिक बुद्धीचा आहे.पण, होतं काय की ज्याला उत्तम झाडावर चढता येत असते, त्याला आपण फर्मावतो की चल, मला मस्त पोहून दाखव बरे !

In reply to by हेमंतकुमार

चामुंडराय 10/03/2019 - 04:02
अगदी खरे आहे. प्रत्येकाला कुठल्या न कुठल्या विषयात गती असतेच. फक्त ती लवकरात लवकर, शक्यतो विद्यार्थीदशेत ओळखता यायला पाहिजे. काहींना हे कळतच नाही तर काहींना ओळखता येते परंतु संधी, अनुकूल परिस्थिती मिळत नाही. ज्यांना संधी आणि अनुकूल परिस्थिती मिळते व त्याच बरोबर गती असलेल्या विषयात पुढे आयुष्यात काम करायला मिळते अशी मंडळी जरूर यशस्वी होतात. अशी लोकं खरंच भाग्यवान म्हटली पाहिजेत.

उपयोजक 15/02/2019 - 12:17
कदाचित आईन्स्टाईनचे वडील आईन्स्टाईनपेक्षाही हुशार असू शकतील पण त्यांना तशी संधी मिळाली नसेल किंवा योग्य परिस्थिती मिळाली नसेल तर? कदाचित गणित त्यांना आवडतही नसेल पण वडिलांनी म्हणा किंवा इतर कोणी अर्धवट कळत्या वयात सांगितल्यामुळे त्यांनी गणित निवडला पण त्यांची आवड दुसरीच असेल तर?>> आईनस्टाईनच्या वडीलांचा पिढीजात व्यवसाय होता.त्यांना खरंच गणिताची आवड होती.पण व्यवसायाकडे लक्ष द्यावं लागल्याने ती अधिक विकसित करता आली नाही. आईन्सटाईनचे वडील जर त्याच्यापेक्षाही हुशार असते तर त्यांनी गणिताचा अभ्यास करणं सोडलं नसतं. माणूस एखाद्या विषयात किती हुशार आहे हे त्याच्या स्वत:च्या लक्षात आल्यानंतर आपली आवड किती पुढे न्यायची हे ती व्यक्तीच ठरवत नसेल का? आईन्सटाईनच्या वडीलांना कधीतरी गणिताकडे आपला कल असला तरी ५० जणांच्या उठून दिसू इतपतच ती आवड आहे असं दिसून आलं असावं त्यामुळे आपल्या मर्यादा लक्षात येऊन त्यांनी घरच्या व्यवसायाकडे लक्ष दिलं असावं. याऊलट आईन्सटाईनबाबत घडलं असावं.त्याचं कुतूहल शमवण्याची जिद्दच इतकी मोठी असावी सोबतीला विज्ञानविषयसंबंधी आकलनशक्तीचा वेगही सामान्य माणसापेक्षा कैकपट दांडगा असावा.हे स्वत: आईन्सटाईनलाही माहित असावं.आपण वासरात लंगडी गाय शहाणी नसून चांगली धडधाकट,मजबूत,दुभती गाय आहोत हे त्याच्या लक्षात आलं असावं. म्हणूनच हिटलरकडून होणार्‍या अत्याचारांचा त्रास होऊनही त्या त्रासामुळे वेगवेगळ्या देशात जावं लागूनही त्यानं आपलं संशोधन सोडलं नाही.यालाच मी अोढ असं म्हणतो.परिस्थिती कितीही कठीण आली तरी आपलं आवडीचं क्षेत्र न सोडणे.स्वत:च्या आवडीचा,स्वत:च्या झेपेची ऊंची नेमकी माहित असणे.

उपयोजक 16/02/2019 - 09:51
एकाच घराण्यात एकाआड एक असे गुणवंत निर्माण होत असतील तर यांना काय म्हणाल? १. पृथ्वीराज कपूर ते रणबीर कपूर २. डॉ.एम.के.सांबसिवम् डॉ.एम.एस.स्वामीनाथन् सौम्या स्वामिनाथन् मधुरा स्वामिनाथन् ३. जमसेटजी टाटा ते रतन टाटा इथे तर सलग साखळी आहे गुणवंतांची अशी अजूनही काही कुटूंबे असतील.

In reply to by उपयोजक

आनन्दा 23/02/2019 - 10:17
एकाच घराण्यात एकाआड एक असे गुणवंत निर्माण होत असतील तर यांना काय म्हणाल ))))) अपवाद!! बाकी धीरूभाईनंतर मुकलाभाई पण आहे आणि अनिलभै पण आहे यातच काय ते समजून जा..

विजुभाऊ 01/03/2019 - 14:08
जमसेटजी टाटा ते रतन टाटा इथे तर सलग साखळी आहे गुणवंतांची अशी अजूनही काही कुटूंबे असतील. इथे हे लोक एकमेकांचे आजोबा , मुलगा नातू नाहीत त्या अर्थाने एका घराण्यातील पण नाहीत. राहूल देशपांडेंचे वडील फरसे परिचीत नाहीत. पणाजोबा वसंतराव देशपांडें सर्वत्र माहीत आहेत.

युयुत्सु 02/03/2019 - 16:17
मी गेले काही दिवस fbवर पाळीव प्राण्यांविषय़ीचे व्हिडीओज नियमित बघतोय. हे व्हिडीओ घरात पाळलेल्या वाघसिंहापासुन ते अजगर आणि वेगवेगळ्या पक्ष्यांपर्यंत आहेत. कुत्रा या पूर्ण रेंजचा मध्यबिंदू आहे. हे व्हिडीओज बघताना प्राण्यांचे मानवीकरण किती वेगाने होते आहे, हे बघून मन अचंबित होते. घरातल्या लहान बाळांची काळजी घेणारी, त्यांचे पांघरूण सारखे करणारी, आजारी माणसांची काळजी घेणारी कुत्री, सोप्या बेरजा वजाबाक्या करणारी, नृत्य करणारी, इतकंच नव्हे तर गाणारी कुत्री बघून अचंबित व्हायला होते. पाळीव प्राण्यांमध्ये वाढत असलेली ही मानव-सदृश वर्तन आणि बुद्धीमत्ता बघुन काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतात आणि पटतात - आपली बुद्धीमत्ता जनुकांमध्ये असते. जनुकांचे व्यक्त होणे आजुबाजुच्या वातावरणावर अवलंबून असते. (नुकत्याच एका हायकोर्टाच्या निकालात या वास्तवाची दखल घेतली आहे). - सुरक्षा, पोषण आणि चैतन्य (stimulation) ज्या वातावरणात मिळते तिथे बौद्धिक विकास झपाट्याने होतो. वरील धाग्यात कुठेतरी वंश पुरुषाचा असतो असतो हे गृहित धरले आहे. ते मात्र चूक आहे. वंश स्त्रिचाच असतो (आज ना उद्या कायद्याला हे स्वीकारावे लागेल). तसेच आईकडुन मिळणारी जनुकीय देणगी जास्त असते. शिवाय पेशीपेटल पूर्णपणे आईकडून येत असल्याने एका अर्थाने आपले शरीर आईकडून येते पण त्याचे गुणधर्म (आई आणि वडील दोघांकडून येतात) असे म्हणणे गैर ठरणार नाही.

अभ्या.. 02/03/2019 - 16:37
ओढ कशी आणि कुठून येते हे नाही सांगता येणार, अगदी माझ्या स्वतःच्या बाबतीत बोलायचे झाले तरी माझ्या घरात चार पाच पिढ्या कुणालाच चित्रकला येत नव्हती (अपवाद एक आत्या, पण तिचे लग्न माझ्या जन्माआधीच झालेले असल्याने तिची माझी भेट क्वचितच व्हायची) पण मला येतात चित्रे काढता. चित्रे काढताना पेशन्सची मात्र (सलग बारीक बारीक डेकोरेटिव्ह काम करणे) सवय लागलेली. आता घरात भावाची छोटी मुलगी आहे ती प्रचंड पेशन्सने क्राफ्ट करते. लहान लाहान मण्यांच्या माळा, ब्रेसलेटस, वगैरे पेस्टिंग, कलरिंग हे अगदि तिच्या वयाला शोभणार नाही इतक्या पेशन्सने तीन तीन तास करत बसते. पेंटिंग फारसे करत नाही पण घरातले कुठलेही बारीक बारीक काम मात्र चिकाटीने करते (उदा, मोदक, करंज्या बनवणे, सांडलेल्या बारीक वस्तू एकेक उचलणे, कागदाचे तुकडे न तुकडे गोळा करणे) चित्रे शिकवायला गेलो तर मोठे पॅच पण छोट्या ब्रशने हळूहळू आउटलाईनच्या बाहेर न येऊ देता भरत बसते. अशी चिकाटी घरात कुणाकडेच नाही. असे गुण कसे येतात ह्याचे मात्र नवलच वाटते.

उपयोजक 09/03/2019 - 12:11
सेम पिंच! माझीही चित्रकला चांगली आहे.हे माझं नव्हे तर या क्षेत्रात काम करणार्‍यांचं मत आहे.पण गंमत अशी की माझ्या आई किंवा वडील किंवा त्या आधीचं कोणीही चित्रकला चांगली असलेलं माझ्या पाहण्यात नाही.

ट्रेड मार्क 14/02/2019 - 06:37
प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. स्वभाव, आवडनिवड, कलागुण भिन्न असणारच. अनुवांशिकता हा घटक यात महत्वाची भुमिका बजावतो. असं वाटत नाही कारण चांगल्या प्रथितयश कलाकारांची वा खेळाडूंची अपत्ये मात्र त्या त्या क्षेत्रात चमकताना फार कमी दिसतात. त्या मुलांना कदाचित लहानपणापासून आई किंवा वडील जी कला सादर करतात किंवा जे खेळतात ते बघून थोडीफार आवड निर्माण होणे पर्यंत ठीक आहे. पण त्याच क्षेत्रात आई किंवा वडिलांइतकी वा जास्त प्रगती फार थोडी अपत्ये करतात. एकाआड एक पिढी हुशार असते असं म्हणतात. पण हीच अोढ,आवड बाह्य साधनांद्वारा निर्माण करता येईल का? माझ्या मते असे करता येणार नाही. अजून तरी माणसाच्या वृत्तीमध्ये किंवा नैसर्गिक जडणघडणीमध्ये बाहेरून फेरफार करता येतील असे तंत्र नाहीये असं मला वाटतं. पुढेमागे जरी हे साध्य झालं तरी नैसर्गिकरित्या जे मिळालं आहे त्याइतकं कृत्रिमरित्या टाकलेलं करेल असं वाटत नाही.

In reply to by ट्रेड मार्क

जालिम लोशन 18/02/2019 - 14:17
त्या साठी Genetics बद्दल थोडी बहुत माहिती असायला हवी. ह्यामधे जनुके software सारखे काम करतात. जरूरी नाही ते लगेच पुढच्पा पिढी मधे express होतील. काही पिढ्यांनंतर सुध्दा ती express होतात. अनेक factor त्पासाठी काम करत असतात. ति एक स्वतंत्र विज्ञानाची शाखा आहे.

उपयोजक 14/02/2019 - 10:00
असं वाटत नाही कारण चांगल्या प्रथितयश कलाकारांची वा खेळाडूंची अपत्ये मात्र त्या त्या क्षेत्रात चमकताना फार कमी दिसतात. बापाइतकाच मुलगा गुणी असला पाहिजे अशी अपेक्षा असेल तर चमक फारशी दिसणार नाही.शिवाय बापाने जितक्या अोढीने,तळमळीने केलं असेल तेवढी मुलाकडे नसेल हेसुद्धा पहायला हवं.मुलगा स्वत:चेदेखील काही गुणअवगुण घेऊन येणारच ना? १.रोहन गावस्कर सुनिल गावस्करइतका प्रतिभावान नाही. २.याउलट आईन्सटाईन मात्र त्याच्या गणितज्ञ वडीलांच्या तुलनेत कैकपट अधिक हुशार निघाला. रोहनची तुलना सुनिलशी झाली तर तो अपयशी ठरणारंच.पण रोहन इतका वाईट क्रिकेट खेळतो का की त्याची दखलसुद्धा घेऊ नये? तो इतका वाईट क्रिकेट खेळतो का?

In reply to by उपयोजक

ट्रेड मार्क 14/02/2019 - 20:16
सुनिल गावस्कर - रोहन गावस्कर किंवा अमिताभ बच्चन - अभिषेक बच्चन मी स्वतः रोहन ला कधीच खेळताना बघितलं नाहीये, त्यामुळे तो किती प्रतिभावान आहे हे सांगता येणार नाही. पण अमिताभ आणि अभिषेक दोघांनाही काम करताना बघितलेलं आहे. माझ्या मते तरी अभिषेक बऱ्यापैकी अभिनेता आहे पण कदाचित वडिलांबरोबरच्या तुलनेमुळे तो मागे पडला असावा असं वाटतं. पण परत प्रश्न तोच आहे ना की जर अनुवांशिकरित्या कलाकार होणं त्याच्याकडे आलं असेल तर मग त्याने स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करायला पाहिजे होतं. पण मग अभिनयातच का? हरिवंशराय बच्चन कवी होते पण अमिताभ मात्र अभिनेता आहे. कदाचित अभिषेककडे दुसरी कुठलीतरी कला असेल, जी त्याने एक्सप्लोर केलीच नाहीये! हे गणित धंद्याच्या बाबतीत थोडं वेगळं आहे. जर तरुण मुलाने पिढीजात धंदा पुढे चालू ठेवायचे म्हणले तर त्याला आयता सेटअप मिळतो. आहे ते पुढे चालू ठेवायचे किंवा वाढवायचे ते त्या मुलाच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे. पण सर्वसाधारणपणे असं दिसून आलं आहे की फारसे कष्ट न करता मिळालेल्या गोष्टीची कदर सहसा नसते. याउलट आईन्सटाईन मात्र त्याच्या गणितज्ञ वडीलांच्या तुलनेत कैकपट अधिक हुशार निघाला एकाआड एक पिढीचे लॉजिक लागू झालेलं दिसतंय. पण आपल्याला आईन्स्टाईनच्या आजोबांबद्दल काहीच माहिती नाही. मला तर त्यापेक्षाही मोठा प्रश्न पडलाय. इथे तुम्ही ज्यांना आपला कल कुठे आहे ते समजलंय अश्यांबद्दल बोलताय, पण बहुसंख्य जनता अशी आहे की त्यांना स्वतःचा कल कळतच नाही. अश्यांचं काय? कदाचित आईन्स्टाईनचे वडील आईन्स्टाईनपेक्षाही हुशार असू शकतील पण त्यांना तशी संधी मिळाली नसेल किंवा योग्य परिस्थिती मिळाली नसेल तर? कदाचित गणित त्यांना आवडतही नसेल पण वडिलांनी म्हणा किंवा इतर कोणी अर्धवट कळत्या वयात सांगितल्यामुळे त्यांनी गणित निवडला पण त्यांची आवड दुसरीच असेल तर?

In reply to by ट्रेड मार्क

हेमंतकुमार 09/03/2019 - 20:05
आइन्स्टाइन यांचे एक वचन फार छान आहे.त्याचा मथितार्थ असा: जगातील प्रत्येक जणच अलौकिक बुद्धीचा आहे.पण, होतं काय की ज्याला उत्तम झाडावर चढता येत असते, त्याला आपण फर्मावतो की चल, मला मस्त पोहून दाखव बरे !

In reply to by हेमंतकुमार

चामुंडराय 10/03/2019 - 04:02
अगदी खरे आहे. प्रत्येकाला कुठल्या न कुठल्या विषयात गती असतेच. फक्त ती लवकरात लवकर, शक्यतो विद्यार्थीदशेत ओळखता यायला पाहिजे. काहींना हे कळतच नाही तर काहींना ओळखता येते परंतु संधी, अनुकूल परिस्थिती मिळत नाही. ज्यांना संधी आणि अनुकूल परिस्थिती मिळते व त्याच बरोबर गती असलेल्या विषयात पुढे आयुष्यात काम करायला मिळते अशी मंडळी जरूर यशस्वी होतात. अशी लोकं खरंच भाग्यवान म्हटली पाहिजेत.

उपयोजक 15/02/2019 - 12:17
कदाचित आईन्स्टाईनचे वडील आईन्स्टाईनपेक्षाही हुशार असू शकतील पण त्यांना तशी संधी मिळाली नसेल किंवा योग्य परिस्थिती मिळाली नसेल तर? कदाचित गणित त्यांना आवडतही नसेल पण वडिलांनी म्हणा किंवा इतर कोणी अर्धवट कळत्या वयात सांगितल्यामुळे त्यांनी गणित निवडला पण त्यांची आवड दुसरीच असेल तर?>> आईनस्टाईनच्या वडीलांचा पिढीजात व्यवसाय होता.त्यांना खरंच गणिताची आवड होती.पण व्यवसायाकडे लक्ष द्यावं लागल्याने ती अधिक विकसित करता आली नाही. आईन्सटाईनचे वडील जर त्याच्यापेक्षाही हुशार असते तर त्यांनी गणिताचा अभ्यास करणं सोडलं नसतं. माणूस एखाद्या विषयात किती हुशार आहे हे त्याच्या स्वत:च्या लक्षात आल्यानंतर आपली आवड किती पुढे न्यायची हे ती व्यक्तीच ठरवत नसेल का? आईन्सटाईनच्या वडीलांना कधीतरी गणिताकडे आपला कल असला तरी ५० जणांच्या उठून दिसू इतपतच ती आवड आहे असं दिसून आलं असावं त्यामुळे आपल्या मर्यादा लक्षात येऊन त्यांनी घरच्या व्यवसायाकडे लक्ष दिलं असावं. याऊलट आईन्सटाईनबाबत घडलं असावं.त्याचं कुतूहल शमवण्याची जिद्दच इतकी मोठी असावी सोबतीला विज्ञानविषयसंबंधी आकलनशक्तीचा वेगही सामान्य माणसापेक्षा कैकपट दांडगा असावा.हे स्वत: आईन्सटाईनलाही माहित असावं.आपण वासरात लंगडी गाय शहाणी नसून चांगली धडधाकट,मजबूत,दुभती गाय आहोत हे त्याच्या लक्षात आलं असावं. म्हणूनच हिटलरकडून होणार्‍या अत्याचारांचा त्रास होऊनही त्या त्रासामुळे वेगवेगळ्या देशात जावं लागूनही त्यानं आपलं संशोधन सोडलं नाही.यालाच मी अोढ असं म्हणतो.परिस्थिती कितीही कठीण आली तरी आपलं आवडीचं क्षेत्र न सोडणे.स्वत:च्या आवडीचा,स्वत:च्या झेपेची ऊंची नेमकी माहित असणे.

उपयोजक 16/02/2019 - 09:51
एकाच घराण्यात एकाआड एक असे गुणवंत निर्माण होत असतील तर यांना काय म्हणाल? १. पृथ्वीराज कपूर ते रणबीर कपूर २. डॉ.एम.के.सांबसिवम् डॉ.एम.एस.स्वामीनाथन् सौम्या स्वामिनाथन् मधुरा स्वामिनाथन् ३. जमसेटजी टाटा ते रतन टाटा इथे तर सलग साखळी आहे गुणवंतांची अशी अजूनही काही कुटूंबे असतील.

In reply to by उपयोजक

आनन्दा 23/02/2019 - 10:17
एकाच घराण्यात एकाआड एक असे गुणवंत निर्माण होत असतील तर यांना काय म्हणाल ))))) अपवाद!! बाकी धीरूभाईनंतर मुकलाभाई पण आहे आणि अनिलभै पण आहे यातच काय ते समजून जा..

विजुभाऊ 01/03/2019 - 14:08
जमसेटजी टाटा ते रतन टाटा इथे तर सलग साखळी आहे गुणवंतांची अशी अजूनही काही कुटूंबे असतील. इथे हे लोक एकमेकांचे आजोबा , मुलगा नातू नाहीत त्या अर्थाने एका घराण्यातील पण नाहीत. राहूल देशपांडेंचे वडील फरसे परिचीत नाहीत. पणाजोबा वसंतराव देशपांडें सर्वत्र माहीत आहेत.

युयुत्सु 02/03/2019 - 16:17
मी गेले काही दिवस fbवर पाळीव प्राण्यांविषय़ीचे व्हिडीओज नियमित बघतोय. हे व्हिडीओ घरात पाळलेल्या वाघसिंहापासुन ते अजगर आणि वेगवेगळ्या पक्ष्यांपर्यंत आहेत. कुत्रा या पूर्ण रेंजचा मध्यबिंदू आहे. हे व्हिडीओज बघताना प्राण्यांचे मानवीकरण किती वेगाने होते आहे, हे बघून मन अचंबित होते. घरातल्या लहान बाळांची काळजी घेणारी, त्यांचे पांघरूण सारखे करणारी, आजारी माणसांची काळजी घेणारी कुत्री, सोप्या बेरजा वजाबाक्या करणारी, नृत्य करणारी, इतकंच नव्हे तर गाणारी कुत्री बघून अचंबित व्हायला होते. पाळीव प्राण्यांमध्ये वाढत असलेली ही मानव-सदृश वर्तन आणि बुद्धीमत्ता बघुन काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतात आणि पटतात - आपली बुद्धीमत्ता जनुकांमध्ये असते. जनुकांचे व्यक्त होणे आजुबाजुच्या वातावरणावर अवलंबून असते. (नुकत्याच एका हायकोर्टाच्या निकालात या वास्तवाची दखल घेतली आहे). - सुरक्षा, पोषण आणि चैतन्य (stimulation) ज्या वातावरणात मिळते तिथे बौद्धिक विकास झपाट्याने होतो. वरील धाग्यात कुठेतरी वंश पुरुषाचा असतो असतो हे गृहित धरले आहे. ते मात्र चूक आहे. वंश स्त्रिचाच असतो (आज ना उद्या कायद्याला हे स्वीकारावे लागेल). तसेच आईकडुन मिळणारी जनुकीय देणगी जास्त असते. शिवाय पेशीपेटल पूर्णपणे आईकडून येत असल्याने एका अर्थाने आपले शरीर आईकडून येते पण त्याचे गुणधर्म (आई आणि वडील दोघांकडून येतात) असे म्हणणे गैर ठरणार नाही.

अभ्या.. 02/03/2019 - 16:37
ओढ कशी आणि कुठून येते हे नाही सांगता येणार, अगदी माझ्या स्वतःच्या बाबतीत बोलायचे झाले तरी माझ्या घरात चार पाच पिढ्या कुणालाच चित्रकला येत नव्हती (अपवाद एक आत्या, पण तिचे लग्न माझ्या जन्माआधीच झालेले असल्याने तिची माझी भेट क्वचितच व्हायची) पण मला येतात चित्रे काढता. चित्रे काढताना पेशन्सची मात्र (सलग बारीक बारीक डेकोरेटिव्ह काम करणे) सवय लागलेली. आता घरात भावाची छोटी मुलगी आहे ती प्रचंड पेशन्सने क्राफ्ट करते. लहान लाहान मण्यांच्या माळा, ब्रेसलेटस, वगैरे पेस्टिंग, कलरिंग हे अगदि तिच्या वयाला शोभणार नाही इतक्या पेशन्सने तीन तीन तास करत बसते. पेंटिंग फारसे करत नाही पण घरातले कुठलेही बारीक बारीक काम मात्र चिकाटीने करते (उदा, मोदक, करंज्या बनवणे, सांडलेल्या बारीक वस्तू एकेक उचलणे, कागदाचे तुकडे न तुकडे गोळा करणे) चित्रे शिकवायला गेलो तर मोठे पॅच पण छोट्या ब्रशने हळूहळू आउटलाईनच्या बाहेर न येऊ देता भरत बसते. अशी चिकाटी घरात कुणाकडेच नाही. असे गुण कसे येतात ह्याचे मात्र नवलच वाटते.

उपयोजक 09/03/2019 - 12:11
सेम पिंच! माझीही चित्रकला चांगली आहे.हे माझं नव्हे तर या क्षेत्रात काम करणार्‍यांचं मत आहे.पण गंमत अशी की माझ्या आई किंवा वडील किंवा त्या आधीचं कोणीही चित्रकला चांगली असलेलं माझ्या पाहण्यात नाही.
इंजिनिअरिंगला असणारा १९ वर्षांचा सुयश इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित माहितीचा चांगला जाणकार समजला जातो.त्यातला किडाच म्हणा ना!