मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

Abandoned २.०

स्पा · · मिपा कलादालन
भाग १ पहिला भाग लोकांना बर्यापैकी आवडल्याने त्या कलेक्शन मधले उरलेले निवडक फोटू टाकतोय १. .fgf . २. .fgf . ३ .fgf . ४ .fgf . ५ .fgf . ६ .fgf . आता देवही सोडून गेलाय ७ .fgf . ८ .fgf . ९ .मरणातही जग जगते ,म्हणतात ते असं fgf . १० .fgf . ११ .fgf . १२ .fgf . १३ .fgf . १४ .fgf . १५ .fgf . १६ .fgf . १७ .fgf . १८ .fgf . हा मला आवडलेला फोटो :) १९ .fgf . २० .fgf . २१ .fgf . २२ .fgf . २३ .fgf . २४ .fgf . २५ .fgf (समाप्त) हायरेझ इमेजेस

वाचने 10762 वाचनखूण प्रतिक्रिया 34

प्रचेतस Fri, 08/01/2014 - 16:11
फोटो छानच. पण ह्या भागात फोटोशॉप किंवा तत्सम फोटो एडिटींग सॉफ्टवेयरचा जास्तीचा वापर खटकला.

एकोणीस नंबरचा मलाही आवडला. या धाग्यातले फोटो जास्त आवडले. अकरा नंबरचाही आवडला. साखळीमध्ये वेल्डींगच्या काचेची फ्रेम हे फार आकर्षक चित्र आहे. म्हटलं तर साखळीतलं पदक, म्हटलं तर साखळीने जखडलेला भूतकाळ. काही महिन्यांपूर्वी 'द न्यू यॉर्कर' किंवा 'न्यू यॉर्क टाईम्स'च्या पानावर न्यू यॉर्कमधल्या जुन्या साखर कारखान्याचे असेच सुरेख फोटो पाहिले होते, त्यांची आठवण झाली.

चौकटराजा Tue, 08/05/2014 - 09:15
१९ व २६ यक लंबर आल्याती ! स्पांदूबुवा . पी एस मधे दोघानही फिल्टर लावून पहा. मस्त अ‍ॅबस्त्रॅक्ट पेंटिंग तयार होईल. ते चित्रगुप्त काकाना दाखीव. त्यांचे शाब्बास घे मित्रा !

सुबोध खरे Wed, 08/06/2014 - 09:23
जाता जाता वरील फोटो हे ठाकुर्ली स्टेशनच्या पश्चिमेस असलेल्या चोळे गावातील मध्य रेल्वेच्या वीज निर्मिती केंद्राचे आहेत(असावेत). हे केंद्र १९३२ साली इंग्रजांनी मुंबई पुणे आणि मुंबई इगतपुरी या रेल्वे मार्गान वीज पुरवठा करण्यासाठी बांधले होते.तेथे कामगारांना राहण्यासाठी ५२ चाळी ( या भागात माझी मावस बहिण राहत होती आणि ते केंद्र चालू असलेले माझ्या आठवणीत आहे) आणि अधिकार्यांना राहण्यासाठी १२ बंगले बांधले होते ( हि त्या भागाच्या नावाची पूर्व पीठिका आहे) हे केंद्र कोळशावर चालत असे पण १९८८ सालच्या आसपास त्याच्या बॉयलर चा स्फोट होऊन ८ कामगार मृत्यू मुखी पडले त्यानंतर हे वीज केंद्र बंद आहे. ते चालू करण्याची परवानगी श्री राम नाईक यी सरकारजवळ मागितली असताना तत्कालीन रेल्वे मंत्री माधवराव शिंदे यांनी वीज निर्मिती हे रेल्वे चे काम नाही सांगून त्या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावल्या. रेल्वे सध्या वीज टाटा कडून विकत घेते. हे केंद्र चालू करण्याचा परत एकदा प्रयत्न २०१० मध्ये झाला होता. नैसर्गिक वायू वापरून केंद्र चालवता येणे शक्य आहे कारण वीज वाहून नेण्याची सर्व सोय असून वीज केंद्राला लागणारा पाण्याचा पुरवठा बाजूच्या उल्हास नदी तून सहज होऊ शकतो. हे केंद्र परत ऊर्जितावस्थेत येईल काय याचे उत्तर काळच देऊ शकेल.

In reply to by सुबोध खरे

खेडूत Mon, 08/25/2014 - 22:29
हाही भाग आवडला. इथल्या बालपणीच्या अन सुट्टीच्या बऱ्याच आठवणी आहेत. त्याबद्दल पुन्हा कधीतरी !

नगरीनिरंजन Sun, 08/24/2014 - 20:19
खूपच छान. बंद पडलेल्या कारखान्यांचे, मॉल्सचे फोटो पाहताना मला विशेष आनंद होतो. तुम्हाला आवडलेला फोटो मलाही सर्वात जास्त आवडला (१९). सगळी एकसाची यंत्र बंद पडल्यावर आणि यंत्रासारखंच काम करणारे कामगार निघून गेल्यावर निसर्गाने आपला कुंचला सरसावून निवांतपणे रंगकाम सुरु केलं आहे आणि आधीचे शिस्तशीर रंग आता मुक्तपणे मिसळायला लागले आहेत असं वाटतं.