आजच्या सामन्यातील अग्रलेख वाचला का?
नसेल तर पहा...
मराठ्यांचे पुन्हा एकदा 'पानिपत'- शिवसेना
मुंबई
अखंड महाराष्ट्रासाठी राज्यात शिवसेनेच्या भगव्या झेंड्याने काय खस्ता खाल्या हे कदाचित नव्या पिढीला माहीत नसावे, त्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही, त्यांना भगव्या झेंड्याचे तेज ठावूक नाही आणि म्हणूनच त्यांनी हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागण्याचे काम केले आहे. त्यामुळेच फदफितुरीतून मराठी मतांमध्ये फूट पाडणा-यांना साथ देऊन मराठी एकजुटीच्या पुन्हा एकदा ठिक-या उडविल्या आहेत. पुन्हा एकदा पानिपतचा कित्ता गिरवला आहे, अशा शब्दात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या पराभवाचे खापर तरुण मतदारांवर फोडले आहे.
पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये लिहिलेल्या संपादकीय लेखात म्हटले आहे, की मोगलाईतही मराठी माणसे मानाची सरदारपदे भूषवित होती. त्यांच्याही पालख्या, अंबा-यांमध्ये हत्ती झुलत होते. मात्र त्यांच्या पालख्या अंबा-या आणि शिवरायांचे तेज यात जमीन आस्मानचा फरक होता. शिवरायांनी मराठी माणसाला स्वाभिमानाने जगवणे शिकवले. तेच तेज आणि तोच स्वाभिमान शिवसेनेने मराठी माणसाला दिला. मात्र त्या बदल्यात मराठी माणसांनी आम्हाला पराभवाची फुले दिली. पराभवाची फुले शिवसेनेच्या पदरी आली असली तरीही ती आम्ही त्यांचे निर्माल्य होऊ न देता ती जपून ठेऊ कारण त्यातूनच पुन्हा उद्याच्या क्रांतीच्या ठिणग्या उडणार आहे.
आघाडी सरकारने राज्याला दहा वर्षांत नक्षलवाद, दहशतवाद, मुंबईवरील हल्ला, भूक, बेरोजगारी, लोडशेडिंगचा अंधार आणि सुमारे 22 हजार शेतक-यांच्या आत्महत्या दिल्या हे त्यांचे योगदान कमी की काय म्हणून जनतेने महाराष्ट्राला पुन्हा एकदा नरकात ढकलले आहे. हे शासन उखडून फेकण्याची एक संधी जनतेने पुन्हा एकदा घालवली आहे.
या लेखातून पक्षाच्या पराभवाला आणि मराठी मतांमध्ये फूट पाडण्यास पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या मनसेला जबाबदार ठरविण्यात आले असून राज यांना कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा जय होणे हाच आपला विजय वाटत असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे. तरुणांनी पळत्याच्या पाठीमागे (मनसे) लागण्याचा मुर्खपणा केला असला तरीही या पळत्याच्या पाठीमागे लवकरच कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा ब्रह्मराक्षस लागणार आहे हे विसरून चालणार नाही, असा इशाराही या लेखातून देण्यात आला आहे.
------------
वि.सू.- हा अग्रलेख बाळासाहेबांनीच लिहिला असे आमचे म्हणणे नाही. मात्र वृत्तपत्रातील सर्वच मजकुरासाठी विशेषतः संपादकीय लेखांसाठी संपादक जबाबदार असतो असे संकेत असल्याने त्यात बाळासाहेबांचा उल्लेख आहे. प्रत्यक्षात तो पीआरबी कायद्यानुसार संपादकीय जबाबदारी असलेल्या व्यक्तीकडून किंवा तत्सम संपादकीय सहका-यांकडून लिहून घेतला गेला असण्याची शक्यता अधिक आहे.
वाचने
6445
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
सामनाचे
१००%
In reply to सामनाचे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जाऊदे हो...
शिवसेनेबद
विजुभाऊंश
In reply to शिवसेनेबद by विजुभाऊ
वरील
मनसे
सहमत जय
In reply to मनसे by विष्णुसूत
फक्त नवी पिढी?
उध्दवची फोटोग्राफी
उध्दवची फोटोग्राफी
उध्दवची फोटोग्राफी
मनसे
अवांतर
मत विचारपूर्वक दिले
In reply to अवांतर by शरदिनी
अपराधी कशाला वाटुन घेता तुम्ही?
In reply to अवांतर by शरदिनी
जनता शहाणी आहे...
सहमत
In reply to जनता शहाणी आहे... by योगी९००
मला तसं वाटत नाही
In reply to सहमत by गणपा
मनसेचे
जुनी पिढी
तिरशिंगरा
In reply to जुनी पिढी by तिमा
तिरशींग
In reply to जुनी पिढी by तिमा
राजे...
In reply to तिरशींग by विष्णुसूत
तिरशिंगरा
मुक्ताफळे
सामना अग्रलेख
राष्ट्र्व
शक्यता कमी
In reply to राष्ट्र्व by अविनाशकुलकर्णी