महाराष्ट्रातील राजकारणाची कुंडली...
अजून थोड्याच वेळात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकांचा निकाल लागणार आणि तमाम राजकारण्यांचा निकाल लागणार... तर अशा या निवडणूकीत म.टा. मधे म्हणल्याप्रमाणे आघाडीस इजा-बिजा-तिजाचे तर युतीस सत्तांतराचे वेध लागले आहेत. तर अशा या बातम्यांमधे एक म.टा.मधे सविस्तर लेख आला आहे ज्यात राजकारण्यांच्या कुंडल्या मांडत सत्तेमधे "येऊन येऊन येणार कोण..." याचे अंदाज बांधले आहेत.
मटामधील या लेखामधले कळीचे विधान खालील प्रमाणे:
वरील सर्व विवेचनाचा विचार करता येणारी विधानसभा ही त्रिशंकु असण्याची शक्यता वाटत नाही. कारण सत्ताधारी पक्षाच्या कुंडलीत दशमस्थानात आलेले बुध , शनि , रवि , शुक्र हे चार ग्रह आल्याने सत्ताधारी पक्षाचे स्थान अधिक बळकट झाले आहे. त्यामुळे सोनिया काँग्रेसला ८० ते ९० , राष्ट्रवादी ४५ ते ५५ जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेला ५५ ते ६५ , भाजपाला ३५ ते ४५ जागा मिळतील.आता जर ते अंदाज बरोबर ठरले (आणि तसे ते कुंडली/भविष्यामुळे नाही पण एकूणच खरे ठरण्याची शक्यता आहे) तर मग अनिस भविष्यवेभत्त्याचे ज्ञान मानणार का तरी देखील अंधश्रद्धाच म्हणणार? ;) तसेच या धाग्यासंदर्भात जर अजून कुणाला असल्या खर्या/खोट्या ठरलेल्या राजकीय भविष्यांबद्दल माहीती घालावी ही विनंती.
वाचने
3497
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
या
त्रिशंकू
काँग्रेस
तूर्तास
हा हा हा!
थोडे अवांतर