"सप्तपदी १,२,३" मधे युयुत्सु यांचा द्रुष्टिकोन हा पुरुषवादी होता , कदाचीत तसे अनुभव , केसेस त्यांनी पाहिल्या असतील. म्हणुन त्याचे मत टोकाचे आहे.. सगळ्य चर्चेतले तात्पर्य/सारांश मांडण्याचा प्रयत्न... गडबडीत खरडले आहे. शुद्धलेखनाच्या चुकांबद्द्ल दिलगीर .
====
भारताची समाज व्यवस्था तसेच विवाह व्यवस्था ही पुरुषप्रधान आहे.. कायदे ६० वर्षांचे आहेत पण ही पुरुषप्रधान रचना तर शेकडो वर्षांची आहे. इथे पुरुषांना जसे अधिकार दिले आहेत तसेच जबाबदरया देखिल दिल्या आहेत. लग्नाचाच विचार केला तर सप्तपदी बरोबरच होते ते कन्यादान .. " ही माझी कन्या आता तुला दान करीत आहे , तिची काळजी हे ".. तेव्हा पालन/पोषणाची/रक्षणाची तसेच पत्नी म्हणुन तिच्या शारिरीक / मानसीक/ कौटुंबिक गरजा पुर्ण करण्याची नवरयाची जबाबदारी ठरते.. पण तरीहि स्त्रियांना कुटुंब/समाजव्यवस्थेत दुय्यम स्थान होते ( आजही आहे. ) , कौटुंबिक/ शारिरीक छ्ळाला सामोरे जावे , सती सारख्या भयंकर प्रथा , हुंडाबळी या सगळ्या पार्श्वभूमीवर १९५० सालचे कायदे जर स्त्रीयांच्या बाजुचे / स्त्रीयांना न्याय मिळवून देण्याच्या हेतुने केले असतील तर त्यात काहीही चुकीचे नाही आहे.
धार्मिक / सांस्कॄतिक चौकट, सामाजीक/घरच्यांचे दडपण , घराण्याचे/घराचे समाजातील स्थान , नावलौलीक , अपरिहार्यता अशा अनेक कारणांमुळे का होइना पण भारतात एखादे वैवाहीक संबंध चांगले नसले तरी ते घटस्फोटापर्यंत जात नाहीत. अशी उदाहरणे अनेक पहायला मिळतात . १०००:११ असा घटस्फोटाचा दर भारतात आहे . आता शहरी भागात 'जग जवळ आले आहे , पण माणसे लांब गेली आहेत’ , इथे घटस्फोटाचे प्रमाण दर वर्षी ३-४ पट वाढते आहे. शहरात / आधुनिक , पुढारलेल्या कुटुंबात म्हणू हवे तर , स्त्रीयाचा सामाजीक स्तर उच्च आहे, आपल्या हक्कांबद्द्ल जागरुकता आहे , वैवाहीक आयुष्य हे फक्त "तो व ती" इतकेच आहे अशा परिस्थित याला पुरुषप्रधान न म्हणता ज 'सम-समान' कुटुंबव्यवस्था म्हणायला काही हरकत नसावी. ( आपण मुद्दा समजावा म्हणुन शहरी जीवनप्रणालीचा विचार करतोय.. याचा अर्थ ग्रामीण भागात स्त्रीया जागरुक नाहीत असे न्हवे. तसेच शहरातील स्त्रीयांना 'सासुरवास' नसतो असेही न्हवे )
मग अशा परीस्थितीत जेव्हा एखादे वैवाहीक संबंध घटस्फोटापर्यंत पोचतात तेव्हा ही कायदे हे स्त्रीयांच्या बाजुचेच आहेत.. आता इथे वैवाहीक संबंध बिघडण्यास जरी दोघेही सारखेच किंवा ती जास्त जबाबदार असेल , किंवा एखाद्या दुर्देवी तरुणाच्या बाबतीत जर बायको अगदी कजाग निघाली .. भांडकूदळ असेल, त्या तरुणाने, त्याच्या घरच्या व्यक्तींनी कितिही प्रयत्न केले, नमते घेतले तरी ती नांदायला तयार नसेल तरीही घटस्फोटाच्या वेळी कायदा हा तिच्याच बाजूचा आहे. पुरुषांना जास्तीत जास्त मिळतो तो 'घटस्फोट' तेही आर्थिक किंमत मोजायला लागुन.
आणी हे फक्त भारतात न्हवे तर जगातल्या प्रगत देशांमधे जीथे घटस्पोटाचे प्रमाण १०००:४८० आहे , तिथे सुदधा कायदे हे स्त्रीयांच्या बाजुचेच आहेत.
अर्थात तिलाही यातून काही फार आनंद होतो असे न्हवे. जेव्हा तो/ती घटस्फोटासाठी वकीलांची पायरी चढतात तेव्हा त्यांचे वैवाहीक संबंध कधीच संपुष्टात आलेले असतात, आपल्या वैवाहीक संबंधांचे वकीलाने कायद्याचा किस पाडत, भर न्यायालयात चीरफाड करणे कूणाला आवडेल. पण तिथे कोर्टात ते असतात फक्त वादी-प्रतीवादी , पती-पत्नी न्हवे आणि उद्दिष्ट असते ते ’ केस जिंकणे' . मग अशावेळी त्याला/ त्याच्या आई/वडिल/भाउ/बहीण यांना त्रास देण्याकरता ती ४९८ सारख्या कायद्यांचा दुरुपयोग करु शकते. अशा केसेसचे प्रमाण आज-काल वाढत आहे. आणि न्यायदेवता आंधळी आहे , तीथे चालतात ते पुरावे व कायदे त्यामुळे जरी दुरुपयोग होत आहे असे आढळले तरी कोर्ट पुरुषाच्या बाजुने निकाल देउ शकत नाही., फारतर ठेवलेल्या आरोपातून मुक्तता करेल , पण स्त्रीने दुरुपयोग केला असे असले तरी तिला काही सजा देता येत नाही..
मग याच्यावर उपाय काय ?..
युयुत्सु म्हणतात त्या प्रमाणे , सप्तपदी/शपथ घ्यायचीच नाही ??. त्याने काय होणार पण ??.. हिंदु विवाह हा सप्तपदीशीवाय होतच नाही तसेच .. एकतर्फी कायदे आहेत म्हणुन जर असा पावित्रा घेणे हे म्हणजे " भविष्यात कधीतरी भूकंपाने पडेल म्हणुन घर बांधायचेच नाही, आणि तंबुत राहायला जायचे "
मग कायदा बदलायचा ?? हेही नाही कारण ज्या स्त्रीयांना लग्नानंतरच्या जाचास सामोरे जावे लागते , शारिरीक छळ सहन करावा लागतो त्यांचा हे कायदे हा एकमेव आधार आहे . तुलनाच करायची झाली तर या कायद्याने मिळणारया न्यायाची उदाहरणे ही याच्या दुरुपयोगाच्या कित्येक पट जास्त असतील..
पारर्दशकता ?? लग्न ठरवताना दोन्ही कडच्या घरांनी पारर्दशकता ठेवणे , घरातच्या चांगल्या-वाईट परंपरा , आर्थिक स्थिती , स्वभाव यांची पारख करुन लग्न ठरवणे ?? कुणाची खात्री देता येते सांगा ? आज मी निर्व्यसनी आहे , उद्या दारुत बुडालेला असेन.. आज ती माझ्याशी एकनिष्ठ आहे , उद्या बॊस बरोबर पळुन जाईल...
मग उपाय काय , तर काहिही नाही... लग्न, संसार हा दोघांचा असतो , त्यात वाद होणारच , तेव्हा समंजसपणा दाखवणे टोकाची भुमिका न घेणे.. हे नात टिकवणे हे दोघांची जबाबदारी ती "आज" प्रामाणिकपणे पार पाडणे हाच उपाय.. बाकी सगळे "उद्या"वर सोडुन द्या... वकिलाची/कोर्टाची पायरी न चढणे हेच उत्तम
जास्तच जोरात भांडण झालेना तर ’हाताची घडी, तोंडावर बोट’ ठेउन मस्त एखादा पुरिया-धनश्री ( http://www.esnips.com/doc/a20a76ae-1087-4c9f-9cb3-7a17b99fc9ca/01---Raa… ) ऎका.. डोक शांत होइल अन सगळे वाद संपतील .. :)
वाचने
8325
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्याने काय होणार पण ??
हॅहॅहॅ
In reply to त्याने काय होणार पण ?? by युयुत्सु
एकदा लग्न
In reply to त्याने काय होणार पण ?? by युयुत्सु
रजिस्टर मॅरेज
सप्तपदीचे
In reply to रजिस्टर मॅरेज by युयुत्सु
महाराजांचा विजय असो
चला आता मग
पण
In reply to चला आता मग by नीधप
ह्म्म्म मग
In reply to पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
ते आता पुढच्या जन्मी
In reply to चला आता मग by नीधप
हे अजुनी चालुच आहे का ???
हो.
हो.
वकीली
<<१. बायको
In reply to वकीली by JAGOMOHANPYARE
आमचीही
In reply to <<१. बायको by विशाल कुलकर्णी
वकिलाची
लै भारी.
In reply to वकिलाची by JAGOMOHANPYARE
पण सप्तपदीशिवाय झालेले लग्न हिंदु मॅरेज अॅक्ट मानतो त्याचे काय
आमची माहिती
In reply to पण सप्तपदीशिवाय झालेले लग्न हिंदु मॅरेज अॅक्ट मानतो त्याचे काय by प्रसन्न केसकर
पण विवाह
In reply to आमची माहिती by प्रकाश घाटपांडे
सक्ती
In reply to पण विवाह by ३_१४ विक्षिप्त अदिती
असा वर्ग
In reply to सक्ती by प्रकाश घाटपांडे
तात्पर्य
In reply to असा वर्ग by ३_१४ विक्षिप्त अदिती
पूर्ण माहिती करून घ्या आणि मग विधाने करा