परवाच दहावीचा निकाल लागला. यावेळचा सर्वसाधारण निकाल कमी असला तरी मुलांना मिळालेल्या गुणांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. पहिला नंबर ९८.६%चा. मराठीत यावेळी ९८ व इंग्रजीत ९८ गुण सर्वाधिक आहेत. कोल्हापुरातील उषाराजे हायस्कूल मधील ३७ मुलींना मराठीत ९० ते ९७ मध्ये गुण मिळाले आहेत. बघावे तिकडे गुणच गुणच दिसत आहेत.
ह्या गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी कष्ट केले नव्हते असे मला अजिबात म्हणायचे नाही. मात्र ज्याप्रमाणात गुण वाटले गेले तेवढी मुलांची तयारी होती का? मराठीसारख्या विषयात इतके भरमसाठ गुण देणे चुकीचे नाही का?
काही जण म्हणतील की, दिले इतके गुण तर काय बिघडले? मात्र या अतिरिक्त गुणांमुळे मुलांचेच नुकसान होते. या भरमसाठ गुणांमुळे आपण नक्की कुठे आहोत याचा अंदाजच लावता येत नाही. पालकांच्या मुलांकडून अपेक्षा वाढतात. मात्र मुले पुढील स्पर्धांमध्ये मागे पडू शकतात.
मी मागच्या वर्षी दहावी पास झालो. आमच्या वेळीही गुण वाटले गेले होते. पण यावर्षी तर अतीच झाले असे वाटत नाही का?
वाचने
2668
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्या साठी
हा ट्रेन्ड
>>मार्क
हम्म्म्म्म्म्म नीट सांग ना
नाही हो
In reply to हम्म्म्म्म्म्म नीट सांग ना by वेताळ
मग मात्र
In reply to नाही हो by मिहिर
कदाचित....
तशी शक्यता आहे
मी आणि
In reply to तशी शक्यता आहे by मिहिर
राज्यात मराठीत पहिल्या आलेल्या मुलीला - मराठीत ९८% गुण