Skip to main content

मृत्यु

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 13/06/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मला मृत्युचि खुप भिति वाटते..तो अटळ आहे हे मला समजते.. मृत्युचे विचार मनात आले कि मी अर्धमेला होतो....माझी भिति कशी घालवु?

वाचने 9094
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

मरणाला आपलेसे करा! म्हणजे मित्र समजा हो! ;)

In reply to by Nile

मला एका ओळीच्या धाग्यांची खुप भिति वाटते..ते अटळ आहेत हे मला समजते.. एक ओळीच्या धाग्यांचे विचार मनात आले कि मी अर्धमेला होतो....माझी भिति कशी घालवु? पराविनाश सर्पकर्णी º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

तुम्हाला घाबरवायचे म्हणुनच तर ते टाकत नाहीत ना? नावातच विनाश आहे त्यांच्या! ;) आमचे म्हणणे ऐका हो विनाशी साहेब. म्हणजे सुटका होईल एकदाची. कोणाची ते कळलेच असेल. ;)

In reply to by Nile

घाब्र्ता काय जा पाणीपुरि खावुन या ;) चुचु

'अजून जिवंत आहे म्हणजे मला काही होणार नाहीये' असा विचार करा. अवांतरः आपल्यावर बरेच लोक अवलंबून आहेत हा विचार काढून टाका म्हणजे भीती वाटणार नाही. खराटा (रंग माझा वेगळा)

आम्ही जातो आमुच्या गावा मेलो , वारलो , खपलो, गचकलो, ठार झालो, यमसदनास गेलो, मृत पावलो, कैलासवासी झालो, ईश्वराला प्यारे झालो, निजधामास गेलो. मेलो , वारलो , खपलो, गचकलो, ठार झालो, यमसदनास गेलो, मृत पावलो, कैलासवासी झालो, ईश्वराला प्यारे झालो, निजधामास गेलो. मेलो , वारलो , खपलो, गचकलो, ठार झालो, यमसदनास गेलो, मृत पावलो, कैलासवासी झालो, ईश्वराला प्यारे झालो, निजधामास गेलो. मेलो , वारलो , खपलो, गचकलो, ठार झालो, यमसदनास गेलो, मृत पावलो, कैलासवासी झालो, ईश्वराला प्यारे झालो, निजधामास गेलो. मेलो , वारलो , खपलो, गचकलो, ठार झालो, यमसदनास गेलो, मृत पावलो, कैलासवासी झालो, ईश्वराला प्यारे झालो, निजधामास गेलो. विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)

फारंच विचार करणारा काथ्याकुट काढल्याने सफर लेखकाचं अभिणंदण . खुप खुप आवडला काथ्याकुट !! अजुन असेच कौल येउन द्या !! (स्वगत : एक गोष्ट आठवली. एक तरसाचं जोडपं असतं ... नुकताच त्यांचा समलैंगिक विवाह झालेला असतो, तरस-१ ला नुसतेच कौल काढायची सवय.. तरस-२ एक लाईनीचे धागे काढत असे... तरस-२ नविन आलेला असतो , तिथेच एक कोल्हा रहात असतो .. रोज पुचके धागे काढले की गुहे समोर येउन तो त्यांना शिव्या द्यायचा .. तरस-१ नेहमीच शांत .. तरस-२ त्याचं मोठं आश्चर्य वाटे ... बर्‍याच वेळा असं झाल्यावर तरस-२ ने त्याला विचारलं .. तु एवढा शुर कौलकाढू ... तु का बरं शांत ... तरस-१ म्हणतो बाबा ... तुच का काही करत नाहीस ? पुढच्या एक लाईनचा काथ्याकुट काढताच .... कोल्हा पुन्हा तिथे येउन त्यांना शिव्या द्यायला लागला ! ह्यावेळेस मात्र तरस-२ चिडला ... तो कोल्ह्याच्या मागे पळाला .. कोल्हा तयारच होता .. तो पळत पळत एका पोकळ ओंडक्यात शिरला .. तरस-२ त्याच्या मागे तिथे घुसण्याचा प्रयत्न करू लागला !!पण त्याला फक्त कमरेपर्यंत घुसता आले ... तो तिथे आडकला .. कोल्हा दुसर्‍या टोकाने निघाला ...आणि त्याने काय केलं हे सुज्ञ जाणतातच ... थोड्या वेळाने तरस-२ अर्धमेला होउन गुहेत परतला. तरस-१ म्हणाला .. आता कळालं का ? मी का शांत आहे ते ? तसं ही माझा आय.डी. जंगलातून एक्स्पायर करण्यात आला आहे. तुला शुभेच्छा !! तरस-२ परिणाम माहीत अजुनही धागे काढत आहे .. आणि कोल्हाही आपले काम करत आहे . -(कोल्हा)टारायक गजकर्णी

In reply to by टारझन

खणखणीत =)) च्यायला टा-या तुला पण आता जंगलातल्या कथा लिहिता यायला लागल्या ! :) जियो !!! (टा-याचा पंखा) अवलिया

In reply to by अवलिया

हाण तेज्यायला !! काय रे डांबरट टारु कोल्ह्या, तुझ्या सगळ्या कथा 'टारनारायणाची कथा' ह्या पुस्तकाखाली प्रसिद्ध करायच्या का ? º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

आज पर्यंतचा मि पा वरचा हा आमचा सर्वात आवडलेला काथ्याकुट आहे..... मरणाचा विचार करायला इथे वेळ कोणाला आहे???? कुळकर्णी साहेब आपण वानप्रस्थ स्विकारावा.... त्या मुळे हळु हळु जिवनाच्या पाशातुन तुमची मुक्तता होईल.... चायला काय लिहिले मी मलाच कळत नाहिये... टार्‍या लै भारी जंगल कथा.... आवडली आपल्याला... अरे जाता जाता एक दिवस सलग दहा वेळा जिंदा नावाचा चित्रपट बघा.... त्यातले जिंदा हु मै गाणे सतत ऐका तुमची भिती जाइल ==निखिल

In reply to by निखिल देशपांडे

एका ओळीचा काथ्याकूट आवडला,त्यावर आलेली जंगल कथा अजिबात नाय आवडली.....;-) (जंगली) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

एकदा काय ते मरून जा म्हणजे पुन्हा भीती वाटायचा प्रश्न नाही. (हे उत्तर असंस्कृत वाटल्यास प्रतिसाद काढून टाकावा) खराटा (रंग माझा वेगळा)

कशाची तरी सतत भिती वाटते, बाहेरुन माणूस जरी नॉर्मल वाटत असला तरी, मनात नुसते विचारांचे काहूर माजलेले असते. जीव घाबरा होणे,हातपाय गार पडणे,जीभ कोरडी पडते. अशा वेळी ज्या विचाराने मनात भीती वाट्ते, त्या शिवाय विचार करण्याचा प्रयत्न करावा. वाचण्यात मन रमवावे, आवडते संगीत ऐकावे, पर्यटन स्थळी जाऊन यावे. आपल्या मनातली भिती व्यर्थ आहे, उगाच आपण त्याला भितो. असेही मनाला समजावण्याचा प्रयत्न करावा. भितीमूळे निराशा येते. जगण्यातली रुची कमी होऊ लागते. तेव्हा त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत भय इथले संपत नाही..... खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकमेव योग्य प्रतिसाद

मरायच्या आधी एकदातरी मी काढलेल्या धाग्याला १०० प्रतिसाद द्या. म्हणजे मी शापमुक्त होईन. पुन्हा म्हणून मी तुम्हास पिडणार नाही! १०० प्रतिसादरुपी उतारा न दिल्यास एखाद्या नवसदस्याला हाताशी धरून यापेक्षा अधिक विनाश घडवेन. विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)

एका ओळिच्या धाग्याचा इतका इथे राग राग का केला जातो?? किति ओळिचा धागा असावा?कहि मार्ग दर्शक तत्वे आहेत का?..किति ओळिचा धागा टाकावा??

In reply to by अविनाशकुलकर्णी

एका ओळिच्या धाग्याचा इतका इथे राग राग का केला जातो?? किति ओळिचा धागा असावा?कहि मार्ग दर्शक तत्वे आहेत का?..किति ओळिचा धागा टाकावा?? नशीब या साठी वेगळा धागा नाही काढला गेला ! :) एका ओळिच्या धाग्याचा इतका इथे राग राग का केला जातो?? पार मोठी कहाणी आहे, एका ओळीत सांगता येणार नाही. किति ओळिचा धागा असावा? १००+ कहि मार्ग दर्शक तत्वे आहेत का?.. नाही. स्वबंधन किति ओळिचा धागा टाकावा?? १००+ --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

In reply to by अवलिया

>> एका ओळिच्या धाग्याचा इतका इथे राग राग का केला जातो?? तुमचे एकोळीचे धागे 'कोणते दुध', 'पायमोजे', 'आंबे' अश्या जिवनोन्नतीच्या सहा सोपानावर अवलंबून असतात म्हणून असावे बहुतेक. >> किति ओळिचा धागा असावा?कहि मार्ग दर्शक तत्वे आहेत का?..किति ओळिचा धागा टाकावा?? तुमच्या सारख्या जेष्ठ सदस्याला (वयाने आणि मिपावरच्या वास्तंव्यानेही) असा प्रश्न पडू नये असे वाटते. -अनामिक

In reply to by अवलिया

नशीब या साठी वेगळा धागा नाही काढला गेला !
आग्गायायायायायाया !!! =)) =)) =)) च्यायचा घो !! म्हणजे कोल्हेकुइ ने मिपाजंगलाचं आसमंत दुमदुमुनच गेलं असतं की रं णाण्या !! लेका किती हासवशीला ? - टारझन कोल्हेपाटील

http://www.dadabhagwan.org/Books/free-spiritual-english-books.html name of book:During, Before and After Death . हे पुस्तक नक्कि वाचा ,,,,,,,तुमची मृत्युचि भिति पुर्ण निघुन जाईल......... What is death? What happens before death? What happens during death? What happens after death? Who can talk about the experience of death? Pujya Dadashree has exposed all the facts and mysteries surround death, through the power of his Gnan. read this book. and please go with this site to understand the real who r u? http://www.dadabhagwan.org/Books/free-spiritual-hindi-books.html http://www.dadabhagwan.org/Books/free-self-realization-life-books.html home page:http://www.dadabhagwan.org/

ह्या मुर्ख धाग्याच्या प्रतिसादातुन आपल्याला एक महान जंगल कथा लेखक मिळाला हे काय थोडके नव्हे. तुम्ही मरणाला घाबरता हे वाचुन खुप करमणुक झाली. तुमच्या माहितीत कोणाला अमरत्व प्राप्त झालेले एकण्यात आहे का?मग कशाला राव मरणाला घाबरता. मृत्यु अटळ आहे म्हणता व घाबरता हे चुकीचे आहे. मरण एक ना एक दिवस येणार आहे परंतु त्याचा विचार करत बसला तर हातात जे काही आनंदाचे क्षण आहेत ते देखिल हरवुन बसाल. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

मरणाला भिताय ? माझे अनुकरण करा. मी तर या सार्‍या जगाचाच नाश कधी होईल याकडे डोळे लावून बसलो आहे. माझ्या मते हे जग इतके बिघडलेले आहे की ते सुधारताच येणार नाही. पत्त्यांत कसे, पेशन्स् चा डाव अडला की तो मोडूनच पुन्हा चालू करावा लागतो तसे हे जग पूर्णपणे नष्ट होऊन पुन्हा तयार झाले पाहिजे. उलट मेल्यावर नक्की काय होते ते बघण्याची उत्सुकता वाटली पाहिजे. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

इंडीया टीव्ही वर सारखे जगाच्या नाशाबद्दल रात्री कार्यक्रम चालु असतात. माया संस्कृती च्या दिनदर्शिकेच्या प्रमाणे २१/१२/२०१२ ला हे जग नष्ट होणार आहे. त्यामुळे काळजी नसावी. परवा मात्र त्यानी त्यावर कहर केला ,त्यानी असे सांगितले कि माया व वैदीक संस्कृतीचा अभ्यास केल्या नंतर असे लक्षात आले आहे कि २१/१२/२०१२ पासुन सतयुगाची सुरुवात होणार आहे.कलियुगाची ५०५६ वर्षे २०१२ ल संपत आहेत.म्हणजे आमच्या सारख्याना खरे तर आता झोप लागायला नको. पण मला तरी झोप नीट येते.आता तुम्ही ठरवा सतयुगात जाण्यासाठी तुम्ही किती पुण्य केले आहे.वेळ खुप कमी म्हणजे ३.५ वर्षे बाकी आहेत. कामाला लागा. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

सत् युगात खात्रीचा प्रवेश हवा असेल तर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय महाविद्यालयाचे सदस्य व्हा. असे तिथल्या लोकांनी मी अबू येथे गेलो असताना मला सांगितले होते. पण मला परत जन्मच घ्यायचा नसल्यामुळे मी त्यांचे ऐकले नाही. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

१) बन्जी जम्पिग करा. २) माहीती आद्दान परदान करनार्‍या सायटीवरच सगल लेख वाचा. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

हा अव्या म्हणजे अकालि वार्धक्य आलेला प्राणी दिसतो. त्यामुळे याला मरणाचे भय वाटु लागलेले दिसते. कदाचित याला मरणानंतर आपण घोस्ट, मुंजा वेताळ, खविस, ब्रम्हराक्षस वगैरेत जाण्याची भीती वाटते का ? हा हडळ होऊ शकत नाही.

In reply to by हरकाम्या

नाही हो ते बहुतेक लिमिट गेज बनवतात/विकतात. त्यामुळे त्यांना हॅम्लेटसारखा 'गो' की 'नॉट गो' असा प्रश्न पडलाय. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by हरकाम्या

अर्रे वा ! आपणास बरीच म्हाईती दिसते .. औत्सुक्य म्हणून विचारतो .. हे "मधले" मेले की कोण होतात ? कुबड्या खवीस

मेल्याशिवाय मृत्युची भिती जायची नाही! :) जिंदगी तो बेवफा है एक दिन ठुकराएगी मौत मेहबुबा है अपने साथ लेकर जाएगी! तात्या.

मरणाच्या भितीने जगण्यात काय अर्थ आहे...? आत्ताचा क्षण अनुभवायला शिका... हर पल याहाँ, जी भर जियो.. जो है समा,कल हो न हो...

In reply to by स्मिता श्रीपाद

आत्ताचा क्षण अनुभवायला शिका... लाख रुपये की बात..! तात्या.