नमस्कार मिपाकरांनो,
भारत हा एक प्रगतीशील देश आहे आणी होणारी प्रगती आपण सर्व पहातच आहोत. हळुहळु आपण आर्थिक सुबत्ता आणी उच्च जीवनशैली कडे वाटचाल करत आहोत. जागोजागी चालु असलेले बांधकाम, मोटारींची वाढलेली संख्या, उच्चशिक्षणाकडे लोकांचा कल, वाढलेल्या रोजगाराच्या संधी या सर्व गोष्टी प्रगतीची साक्ष्च देत आहेत.
जागतिकीकरणाच्या शर्यतीत आपण फारच वेगाने पुढे चाललो आहोत आणी याचाच एक भाग म्हणुन आपल्याकडे बाहेरच्या देशातील काम आउट्सोर्सिंग होऊ लागले आणी आयटी (माहिती व तंत्रज्ञान) सारख्या क्षेत्रामधे रोजगारांच्या खुप संधी निर्माण झाल्या. भरपूर मॅनपॉवर आणी करंसी कमी असल्यामुळे भरगोस पगार देऊन उच्चशिक्षित तरुणांना आकर्षित केले जाउ लागले आणी तरुणांनी या संधीचे सोने केले हे निश्चित. बलाढ्य पगार असल्यामुळे सगळ्या ईच्छा पुर्ण करयला तरुण/तरुणीना वाव मिळाला. कितीतरी जण आईवडिलाना परदेशी फिरवयास नेऊ शकले, पुर्ण सुखसोयी असलेल्या जीवन्शैलीकडे वाटचाल करु शकले. भारतात उत्पादन वाढले यामुळेच आणखी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ लागल्या. आयटीमुळे बरेच लोक आयुष्याचे सोने करु शकले.
अर्थात याला अपवाद आहेतच. कमी वयात जास्त पैसे हातात पडल्याने अफाट खर्च करायची काहे तरुणांना सवय लागली. ३०-४० हजार दरमहा उत्पन्न असताना सुद्धा क्रेडिट कार्ड, लोन, इतर देणी जाउन पुन्हा महिन्याच्या १५-२० तारखेपर्यंत मित्राकडे हात पसरणारे महाभाग मी पाहिले आहेत. असो...
माझ्या मनात हा प्रश्न नेहमी निर्माण होतो कि काही लोकाना आयटी बद्दल भयानक राग आहे. एखादा अतिरेकी मारला गेला कि जस मन सुखावतं तसं एखाद्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली कि काही लोक सुखावतात. जागतिक मंदी सुरु आहे, आणी परिस्थिती बिकट आहे त्याचे त्याना काही घेणे देणे नाही पण आयटी च्या लोकांच्या नोकर्या गेल्या आणी त्यांचे पगार कमी झाले कि ह्या लोकाना बरं वाटतं. मुंबई पुण्यात फ्लॅट च्या किमती वाढल्या, वस्तु महाग झाल्या, भाजी महाग झाली कि या सर्वाला आयटी वाले जबाबदार, हे गणित मला काही अजुन सुटले नाही. "आयटी ला एवढे पगार नसावेत. एक लाख कुठे पगार असतो का? काहीतरीच" अशी वाक्ये सर्रास कानावर पडतात. बेंगलोर मधे रिक्शावाला सुद्धा आयटी वाला दिसला कि उरलेले पैसे द्यायचे टाळतो, ह्याला काय म्हणावे.
अगदी सुशिक्षित लोकंसुद्धा "आयटी मुळे महागाई वाढली असे म्हणतात."
बिचारे ईंजीनीर एकतर मर मर अभ्यास करुन चांगले गुण मिळवतात. त्यानंतर आयटी मधे प्रवेश काय खुप सोपा वाटला का लोकाना? ऍप्टीटुड टेस्ट, कॉमुनिकेशन स्किल्स, ऍनालायटिकल स्किल्स या सगळ्या कडक प्रवेशप्रक्रियांमधुन उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी मिळते. आणी कोणतीही कंपनी फुकट बसायचा पगार देत नाही. जेवढा पगार असतो त्याच्या चारपट काम करावे लागते.
त्या पगारावर त्यांचा हक्क नाही का? आणी त्यामुळे देशाच्या प्रगतीला हातभार लागतो आहे त्याकडे दुर्लक्ष का लोकांचे?
असो हे सगळं चालायचच. हा लेख मी नॉन आयटी लोकांबद्दल लिहिलेला नाही कृपया गैरसमज करुन घेऊ नये.
हा एक अनुभव आहे आणी मी माझे विचार मांडले, तुमच्या अनुभवांचे व विचारांचे स्वागत आहे.
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
वाचने
5699
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुळीच नाही...
हम्म
सुंदर विवेचन
अचानक वाढणारे उत्पन्न
आय्.टी.
दुबार तेच
ह्या
In reply to दुबार तेच by विंजिनेर
माझे दोन पैसे
उत्तम प्रतिसद.
In reply to माझे दोन पैसे by नितिन थत्ते
सुंदर विवेचन
In reply to माझे दोन पैसे by नितिन थत्ते
संतुलीत प्रतिसाद
In reply to माझे दोन पैसे by नितिन थत्ते
होय
In reply to संतुलीत प्रतिसाद by गणा मास्तर
अंशतः सहमत ...
In reply to संतुलीत प्रतिसाद by गणा मास्तर
छान!!!
In reply to माझे दोन पैसे by नितिन थत्ते
म्हागाय याणीच वाढवली
चान्गले आहे