नमस्कार मंडळी,
गेला बरेच काळ मी मिसळपावचा सदस्य आहे, त्याआधीपासून वाचक आहे!
माझ्या मनात कित्येक दिवसांपासून एक किडा वळवळत आहे. :/
किडा असा आहे की:
एकूण लेख आणि कविता यांचा विचार करता जेव्हा जेव्हा वीकांत येतो तेव्हा तेव्हा मिपावर लेखांचा ढीग पडतो! (स्पर्धा पहावी तर इथे! १००वा लेख काय:O , ५० ओळींचे कवित्व म्हणावे का महाकाव्य! )
या लेखांना प्रतिक्रिया म्हणून महाढीग उत्तरे येतात, वाद घडतात, भावी लेखांची बीजे रोवली जातात. एकंदरीत, विपुल लेखन जाहले आणि उदंड पीक आले अशी परिस्थिती निर्माण होते. यात जर जोडून सुट्टी आली तर मग विचारायला नको अशी परिस्थिती होते. :)
तेच जर अवीकांत (मराठीत: वीक एन्ड) असेल तर मात्र निवडक प्रतिक्रिया आणि हजर सभासद यांच्यानुसार उत्तरे येतात. मुख्यतः पडीक सभासद यांनी पुढाकार घेतला आणि सुप्रसिद्ध तात्यांनी त्यात त्यांचे दोन आणे जोडले तर लेखाला प्रसिद्धी लाभते!
सारांश असा की: तात्या व संपादक वर्गाने लेख उचलला आणि पडीक सभासदांची अनुकूल प्रतिक्रिया लाभली तर तो लेख/ कविता कित्येक तास मुख्यपानावर विराजमान राहते!
आता गंमत अशी की,
जर एखाद्या नवख्या लेखकाने सुरवात केली आणी कर्म-धर्म संयोगाने तो नेमका वीकांताच्या आसपास वर चिटकवला (मराठी: अपलोड) तर तो लेख इतरांच्या उत्तम लिखाणामुळे दुसर्या-तिसर्यापानावर दबून जाईल. परत त्यावर येऊ शकणार्या प्रतिक्रियांच्या संख्येवर अवेळी संक्रात येईल ती वेगळीच! :(
आणि या बिचार्याला ;) कोणतीच कल्पना नसते की दोन दिवसांनंतरपण :SSकोणीच प्रतिक्रिया का देत नाहीये? बिचारा लेखक दर दोन मिनिटांनी 'फ५' ला दाबत असतो, न जाणे लिंक तुटली असेल तर :( ...
अर्थात याला अपवाद असतील, आहेत आणि होतीलही! जसे आपले बिपिनदा, केशवसुमार, रामदास आणि यादी लांबत जाते...
माझ्यासारखे अनेक मित्र, बंधु आणि भगिनी सोमवार ते शुक्रवार हापिसात पिसत पिसत (पत्ते नव्हे!) समोरच्या खिडकीतून दिसणार्या चौकोनी तुकड्यांवर टिचक्यामारून या महाजालावरिल विविध पियुषांचे/पेयांचे काही घोट घेत असतात. याला अपवाद पडतो तो वीकांताचा! :D
वीकांताला यातले बरेच जण घरकामात, मुलांचे अभ्यास, साप्ताहिक प्रगती (?) आणि जमलेच तर सुंदर पेयांच्या आस्वादात तल्लिन असतात.
आता जेव्हा सोमवार (परत एकदा :S ) उजाडतो तेव्हा हापिसात येणे क्रमप्राप्त असते (नाहीतर खायला कोण कमवणार?).
थोड्यावेळाने आठवण येते ती मिपाची! कामाच्या वेळात वेळ काढून ५ मिनिटे तरी मिपावर डोकावणे होतेच!
मिपा उघडल्यावर दिसते ती लेखांची भली मोठ्ठी यादी वीकांताला वर चिकटवली गेलेली! ती ही जगभरातून B) !
कधी बिपिनदा, कधी डॉनचे पाक किस्से तर कधी नवे मिपा कट्टा वृतांत्त! अगदी घरच्या गप्पा माराव्यात तशी मंडळी लिहितात मग त्याकडे लक्ष नको द्यायला ? घरच्या माणसाला कोणी नाही म्हणतं का ?
कोणाच्याही अंगात एवढा संयम नसतो की हा बॅकलॅग येता आठवडाभर शिल्लक ठेवावा; हळू हळू संपवावा...
मग काम बाजूला राहून पुढचे २ तास मिपा मिपा खेळण्यात कधी निघून जातात कळतच नाही! (इथूनच का ते बग बग म्हणतात ते प्राणी सुरू होतात?)
म्हणजेच माझ्यासारख्या अनेकांना सोमवारी हापिसात आल्यावर, दोन 'च्या' झाल्यावरपण जी काय तल्लफ येते ती गेले अनेक महिने मिपा भरून काढत आहे!
या सगळ्यामागचा प्रपंच असा की, अशी काही माहिती नीलकांत किंवा तात्या किंवा संपादक मंडळ देऊ शकेल काय ज्यावरून माझ्या तर्काला पुष्टी मिळेल/ खोडून काढता येईल? शिवाय नवख्या लेखकांना मार्गदर्शन होइल ते वेगळेच!
आपली यावरची मते/अनुभव जाणून घ्यायला आवडेल! शेवटी पहिला लेख हा स्वत:साठी स्पेशल असतोच ना!
अवांतरः या शक्यतेचा विचार केला आहे की मिपा सर्व्हर/ आरेखन या गोष्टींची दखल घेऊन/ न घेता सोडून देत असेल. पण जिज्ञासा स्वस्थ बसू देत नाही.
वाचने
3102
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
पहिला लेख असला तरी
चांगला लेख ..
कोण कोण
प्राजू आणि
+१
In reply to प्राजू आणि by ३_१४ विक्षिप्त अदिती
रायडर
प्रमेय,
+१
In reply to प्रमेय, by चतुरंग
हे