आहो...
इथे परदेशात कोणाला ही ह्या वाळणताई डे चे कौतूक नाही. काही जणांना तर ह्याचा अर्थ पण ठावूक नाही.
आपणच भारतीय मुर्ख..उगाचच कोणीतरी काही प्रथा सुरू करतो आणि पुर्ण भारतभर वारे पसरते.
जे लोकं प्रेमात आहेत (म्हणजे ज्यांचे प्रेमप्रकरण चालू आहे) त्यांना तर आजचा दिवस म्हणजे "सोनियाचा दिन"" असेच वागत असतात. (आणि गंमत म्हणजे बरोबर ९ महिन्यांनी बाल दिन (children's day)).
एवढ्याच उत्साहात आपण दसरा, संक्रात साजरा करतो का? हाच प्रश्न सात च्या आत घरात ह्या चित्रपटात विचारला होता. बाकी जाऊद्या हो. खरी व्हॅलंटाईन डे ची कहाणी अशी आहे...(एका इ-पत्रकाद्वारे मला कळली)..थोडक्यात सांगतो..
पुर्वी गुजरात मध्ये बायकांना त्यांचे नवरे चांगली वागणूक देत नसत. म्हणून एका त्रासलेल्या बायकोने आपल्या नवर्याला ह्या सुदिनी बेलन (लाटणे) घेऊन बदडले. हि गोष्ट बघता बघता सगळीकडे पसरली. सर्व गुज्जू बायकांना हा प्रकार खुपच आवडला आणि त्यांनी १४ फेब्रुवारी हा दिवस ह्या प्रकारासाठी निश्चित केला. ह्या दिवसाला "बेलन टाईम डे" म्हणजेच नवर्याला लाटणे-प्रसाद देण्याचा काळ असे नामकरण करण्यात आले. अर्थात ह्या गोष्टीची त्यांच्या नवर्यांना कुणकूण लागली होती. बायकोने आपल्याला बेलनने लाटू नये म्हणून नवरोबांनी त्यांना खुष करण्यासाठी भेटवस्तू आणण्यास सुरूवात केली. आणि बघता बघता ह्या "बेलन टाईम डे" चा "व्हॅलंटाईन डे" होऊन गेला.
लगेच आपल्या लोकांनी त्या संत व्हॅलंटाईन चा संबंध येथे जोडून टाकला आणि लगेच काही राजकिय पक्षांना विरोध करायला निमित्त सापडले.
अजून एक कहाणी अशी आहे..जेव्हा प्रभू रामचंद्राने सीतामाईची अग्निपरीक्षा केली, त्यावेळी वरून (म्हणजे आकाशातून) बघण्यार्या पार्वतीमातेचा राग अनावर झाला. नवर्याने केलेल्या चुकीची शिक्षा बायकोने भोगली आणि वर नवरा तिलाच सांगतोय की अग्निपरीक्षा दे. त्या काळी स्त्रीया शस्त्र चालवण्यात पारंगत नसाव्यात. फक्त रथ आणि तोंड चालवण्यात त्यांना पी.एच. डी. मिळायची (आठवा कैकेयी ....) . म्हणून तेव्हा पार्वतीमातेने आपल्या नवर्याकडूनच एक प्रभावी शस्त्र वरदान म्हणून घेतले. तेच हे बेलन ..... चालवण्यास सोपे..वापरण्याआधी आकाशात बघून कोठलाही मंत्र म्हणायची जरूरी नाही... हलके..धनूष्यासारखे जड तर मुळीच नाही...म्हणूनच हे बेलन खुपच प्रसिद्ध झाले. भोळ्या शिवाकडून ज्या दिवशी वरदान मिळाले तोच हा सुदिन..
आता ह्यातली नक्की खरी कहाणी कोठली ते मला ठावूक नाही.. (चाल : ठावूक नाही मजकाही..ठावूक आहे का तुजकाही..). पण भारतीय खरा इतिहास आपल्यासमोर कधीच आला नसल्याने आणि आपल्या कायम पश्चिमात्त संस्क्रुतीच्या उद्दात्तिकरण करण्याच्या धोरणामुळे मला आता काही खास वाटत नाही. काही का निमित्त असेना..करूया व्हॅलंटाईन डे..
कदाचित मी हि खरी बेलन कहाणी इथे सांगायला नको होती..मि.पा.च्या जावयांचे मला शिव्याशाप येण्याची शकत्या आहे.
तेव्हा असण्यार्या आणि होण्यार्या नवरोबांनो..ह्या दिवसाचे महत्व लक्षात घ्या..आणि आपापल्या प्रियतमेला खुष ठेवा..
खादाडमाऊ
वाचने
3791
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्हणून
जे काही लिहिलं आहेस..
व्हॅलेंटाईन डे - विरोध
हे अगदी बरोबर..
In reply to व्हॅलेंटाईन डे - विरोध by विकास
.
In reply to व्हॅलेंटाईन डे - विरोध by विकास
मुद्दा
शॉलीड मजा आया!
खुष
आता ते मी तरी कसे सांगू..?
In reply to खुष by विनायक प्रभू
अनुभव
In reply to आता ते मी तरी कसे सांगू..? by योगी९००
प्रेम
तुमचं आमचं सेम अस्त
In reply to प्रेम by आपलाभाउ
बेलनटाईम
लागोपाठ