आत्ताच बातमी वाचली. निठारी हत्याकांडाचे आरोपी कोळी आणि पांढेर ह्या दोघांनाही स्पेशल कोर्टाने देहदंडाची शिक्षा सुनावली.
ही केस सुरु झाली 29 Dec. 2006.
ह्या केस मधे (भारताच्या) आपल्या दृष्टीने जरा लवकर न्याय दिला गेला.नाहीतर नेहेमी प्रमाणे कमित कमी १० वर्ष सेशन कोर्ट, नंतर १० वर्ष हाय कोर्ट नंतर पुढ्ची २० वर्ष सुप्रिम कोर्ट अशा चक्रव्युहात अडकली असती.
अर्थात आपले षंढ सरकार कोर्टाने शिक्षा देउन पण त्या दोघांना टांगायला ( फाशी द्यायला) चाल ढकल करतिल.
पुनः पुन्हा तीच नावे लिहित नाही. पण ही फाशी जर लवकर दिल्या गेली जावी एवढीच इच्छा...
दोन प्रश्न्...
स्पेशल कोर्टाच्या सजेवर अपिल होतं कां?? की ही फायनल सजा?
अशाच प्रकारे इतर हाय प्रोफाइल प्रकरणे निकालात काढण्यात काय हरकत आहे?
कसाबची केस पण अशिच लवकर संपवुन त्याला पण टांगावं...
तुमचं मत काय आहे?
वाचने
1422
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
मत
काही