२६ जानेवारी, १५ ऑगस्ट या आणि इतर दिवशी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांचे इतके कोडकौतुक होते की त्याला काही मर्यादाच नाहीत. जणू काही भारताला स्वातंत्र्य ह्याच दोघांनी मिळवून दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके, राजगुरू, सुखदेव, भगतसिंग, इतरप्रांतीय अनेक अज्ञात स्वातंत्र्यसैनिक यांचे काहीच योगदान नाही ? ते काय तुरुंगात गोट्या खेळत होते ? ज्या शिक्षा ह्या स्वातंत्र्यसैनिकांनी भोगल्या आहेत त्या प्रकारच्या शिक्षा गांधी,नेहरू यांनी भोगल्या आहेत काय ? निदान मला तरी माहीत नाही. असल्यास माझा गैरसमज दूर करावा. या दोघांच्या जयंत्या,पुण्यतिथ्या ज्या मोठ्या प्रमाणावर साजर्या केल्या जातात, तेच भाग्य इतर हुतात्म्यांना का नाही मिळत ? २ ऑक्टोबर ला असणारी गांधीजयंती रजा देऊन साजरी होते. पण याच दिवशी लाल बहादूर शास्त्रीं यांची ही जयंती असते. नुकतीच २३ जानेवारीला सुभाषचंद्र बोसांचीही जयंती होती.
इतर प्रातांचे राहू दे पण निदान महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्यसैनिकांची तरी त्यांच्या त्यांच्या तिथ्यांना आठवण ठेवायला कोणत्याही पक्षाच्या सरकारची हरकत नसावी.पण कॉंग्रेस ला गांधी आणि नेहरू यांच्या व्यतिरिक्त इतर कोणी दिसत नाहीत आणि बाकीचे पक्ष इतर कोणत्याही मुद्यांवरून राजीनामा मागीतील पण या मुद्याला हात सुद्धा घालणार नाहीत. आपण मराठी माणसं जर आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या तिथ्यांबद्दल अशी उदासिनता बाळगत असू तर; सरकार काय शेवटी राजकारणापुरतंच आहे.
वाचने
10869
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत
पण
पण ह्याला
In reply to पण by निखिल देशपांडे
ज्या
इतर
In reply to ज्या by नितिन थत्ते
ह्या
नाना,
In reply to ह्या by अवलिया
अहो आपली
गांधी नेहरू
रूपायाच्या नोटेवर फक्त गांधीचाच फोटो का
आणखी एक
स्वातंत्र
इंदिरा गांधी
फिरोझ गांधी
In reply to इंदिरा गांधी by हुप्प्या
हे बघा
In reply to इंदिरा गांधी by हुप्प्या
हेच खरे आहे असे वाटते
In reply to हे बघा by भास्कर केन्डे
शोध
In reply to हे बघा by भास्कर केन्डे
टाईमपास ...
In reply to हे बघा by भास्कर केन्डे
फिरोझ
In reply to इंदिरा गांधी by हुप्प्या
छान सुरु
राहुल ने
In reply to छान सुरु by महेंद्र (verified= न पडताळणी केलेला)