एक मर्यादित कंपनी जेवढा नफा कमावते त्याच्या प्रमाणात तिला कर भरावा लागतो आणि तिचे सममूल्यधारक उरलेल्या संपत्तीचे वाटेकरी बनतात. सरकार आणि सममूल्यधारक यांना त्यांचा न्याय्य वाटा द्यावा लागू नये या उद्देशाने कांही स्वार्थी संचालक हिशोबाच्या वहीत लिहिलेल्या आकडेवारीत कंपनीला झालेला नफा कमी दिसेल अशी तरतूद करून नफ्याचा कांही भाग स्वत:च्या घशात घालतात असे यापूर्वी ऐकले होते. पण या राजू महाशयांनी याच्या विपरीत जाऊन कंपनीला न झालेला फायदा झाला असे दाखवले असे दिसते. न झालेल्या नफ्यातून त्यांनी सरकारला कर कसा भरला आणि सममूल्यधारकांना परतावा कसा दिला ? अखेर तसे केल्याने त्यांनी काय साध्य केले असेल? यावर कोणी उजेड टाकला तर अज्ञ लोकांना या प्रश्नांचा उलगडा होईल.
वाचने
2512
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्यांनी काय साध्य केले असेल...
पहिली तिन वाक्य
In reply to त्यांनी काय साध्य केले असेल... by कोलबेर
पुढची कारणे...
In reply to पहिली तिन वाक्य by केदार
नेमके प्रश्न
आभास
आणि इतर कंपन्या.....
मं....द बुद्धी!